‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा

* सोमा घोष

राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा! ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल  हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून  स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे  पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

पाहायला विसरू नका, ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, लग्नसोहळा महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

‘कोण होणार करोडपती’ – रंगणार ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ!

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील  ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. मागील वर्षीदेखील या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षीदेखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.  ‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे.

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. ते एक अष्टपैलू कलाकार आहेत.  त्याचबरोबर त्यांच्याकडे उत्तम संवाद कौशल्य आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून स्पर्धक येत असतात. आणि येणाऱ्या प्रत्येकाशी ते खूप आपलेपणाने बोलत असल्याने स्पर्धकांना ते लगेच आपलेसे वाटतात. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला मानसिक धीर देणं हे काम ते मोठ्या खुबीने करतात. त्याचबरोबर स्पर्धकांना बोलतं करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास त्यांची खूप छान मदत होते. सचिन खेडेकर हे मनोरंजन क्षेत्रातील खूप मोठं नाव असल्याने ज्ञानार्जन आणि मनोरंजन या दोन्हींची ते उत्तम सांगड घालतात.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सोनी मराठी वाहिनीवरचा ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे. तुमचं ज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं, हे या कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. या कार्यक्रमाचं नवं पर्व येत्या 6 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तर त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीनी स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा सहभागी झाले आहेत. या वेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून 6 लाखांपेक्षा अधिक फोन नोंदणीकरता आले. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा  प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत. मागच्या वर्षी  नाना पाटेकर, आनंद शिंदे, यजुर्वेंद्र महाजन, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे, मेधा पाटकर, सोनाली कुलकर्णी, कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी  करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्तीदेखील सहभागी झाली आहे. आणि इतर सहभागी स्पर्धकांमध्ये डॉक्टर, पोलीस उपनिरीक्षक, महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन, एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनौन्सरदेखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून, खेड्यापाड्यांतून सहभागी झाले आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या भरघोस बक्षिसं जिंकण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम टीव्हीवर पाहता-पाहता सोनी लिव्ह ॲपवर प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’ आणि जिंकू शकतात भरपूर बक्षिसं आणि हॉटसीटवर येण्याची संधी. पाहायला विसरू नका ‘कोण होणार करोडपती’. 6 जूनपासून सोम.-शनि., रात्री 9 वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर स्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी येणार सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल !

* सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले आहेत. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. या स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलंय. ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून येणार आहेत. यावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटलं असं त्या म्हणाल्या.

अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमीळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांतील चित्रपटांतूनही पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचं पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झालं. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या यशोदा या मराठी चित्रपटाद्वारे प्रमुख पार्श्वगायिकेच्या रूपात त्‍यांची कला प्रथमच श्रोत्यांसमोर आली. तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या करताहेत. अनुराधा पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. ज्यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होतं अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.

फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. निर्मित ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम आणि त्यात अनुराधा पौडवाल यांना नक्की बघा.

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ साम्राज्ञी देणार इतिहासातील बलाढ्य शत्रूला टक्कर

* प्रतिनिधी

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेतून 15 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. ताराबाईंच्या नेतृत्वाखाली स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करण्याची अवघड कामगिरी शिरावर घेऊन ती फत्ते केली.

मराठ्यांच्या दोन शूर सेनानींनी, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी. एक वाघ तर दुसरा सिंह. चारही दिशांना विखुरलेले अवघे मराठी लष्कर या दोन सेनानींच्या नेतृत्वाखाली आणि ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अतिशय कमी वेळात एकवटले आणि मराठी साम्राज्यात देदीप्यमान इतिहास घडला.

संताजी आणि धनाजी यांची मोगल सैन्यावर इतकी दहशत होती की, मोगली घोडे मराठी मुलखाचे पाणी प्यायला बिचकू लागले. तुम्हांला पाण्यात काय संताजी-धनाजी दिसतात का….असे मोगल सेनापती आपल्या घोड्यांना विचारू लागले.

स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत या दोन धुरंधर सेनानींची गोष्टही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अमित देशमुख आणि रोहित देशमुख हे दोघे संताजी आणि धनाजी यांची भूमिका साकारत आहेत. यासाठी त्यांच्या घोडेस्वारी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा मर्दानी खेळांच्या तालमी सुरू आहेत. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी हे

दोन्ही कलाकार अतिशय कसून मेहनत घेत आहेत.

मराठ्यांना धुळीस मिळवायचे, भगवा ध्वज कायमचा उखडून फेकायचा, या ईर्षेने आपल्या अफाट सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या सर्वसत्ताधीश औरंगजेबाला ताराराणींनी आपल्या पराक्रमाने दख्खनच्या मातीत गाडला. त्याची कबर औरंगाबादेत, मुलखातच खोदली गेली.

ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर हे मालिकेत औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. व्यक्तिरेखेचा प्रचंड अभ्यास करणारा यतीन कार्येकरांसारखा सामर्थ्यशाली अभिनेता या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रोमोमधला औरंगजेब पाहतानाही त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड राग यावा, असा अभिनय त्यांनी केला आहे.

इतिहासातला सर्वांत क्रूर, संशयी, जुलमी, कपटी बादशाह असलेल्या औरंगजेबाची भूमिका शब्दश: जिवंत झाल्याचा भास त्यांच्याकडे पाहून होतो. त्यांचा हा अप्रतिम अभिनय प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे, म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!

‘कोण होणार करोडपती’च्या कर्मवीर विशेष भाग

*सोमा घोष

या आठवड्यात कर्मवीर विशेष भागात आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील येणार आहेत. भास्करराव पाटोदा/गंगापूर नेहरी या गावाचे सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या गावाला ‘आदर्श गाव’ पुरस्कार मिळाला आहे. गावाला आत्तापर्यंत विविध २२ पुरस्कारही मिळाले आहेत. दर १५ मिनिटांवर हात धुण्याची सोय, स्त्रियांसाठी सॅनिटरी नॅपकीन्स, शेतीसाठी गावात पाणी आणण्याची सोय, एक गाव एक गणपती योजना, अद्ययावत शाळा; असे अनेक उपक्रम भास्कररावांनी आपल्या गावासाठी आणि गावातल्या लोकांसाठी राबवले आहेत.

भास्कररावांनी महासत्ता म्हणजे नेमकं काय आणि ती कशी असावी, याबद्दलही सांगितलं. त्यांना वाचनाची आवड आहे. वेगवेगळे प्रयोग करत राहणं आणि आपल्या गावाचा विकास करणं त्यांना आवडतं. गावात प्रत्येकानी शिक्षित असावं, आपल्या पायांवर उभं असावं असा त्यांचा प्रयत्न असतो. माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून भास्कररावांचा सन्मान झाला आहे. या आदर्श गावाला अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांनी भेट दिली आहे.

कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार आहेत.

सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ‘घरबसल्या लखपती’ होण्याची संधी घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती – प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि/किंवा हॉट सीटवर येण्याची संधी.

पाहा, ‘कोण होणार करोडपती – कर्मवीर विशेष’ ३१ जुलै, शनिवार, रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

माझ्यासाठी रोज आनंदी राहणे गरजेचे आहे – रूचा इनामदार

* सोमा घोष

मॉडेलिंग आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री रुचा इनामदार हिने मराठी कमर्शियल चित्रपट ‘भिकारी’मधून मराठी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले, ज्यात तिचा को-स्टार स्वप्नील जोशी होता. याशिवाय तिने पंजाबी आणि कित्येक वेब सिरीजमध्येही काम केले आहे. पंजाबी लघुचित्रपट ‘मोह दिया तंधा’ यासाठी तिला २०१७ मध्ये ‘दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवल’मध्ये उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरास्कारसुद्धा मिळाला. स्वभावाने शांत आणि स्पष्टवक्त्या रुचाला सगळया प्रकारच्या भूमिका करणे आवडते. भाषा कोणतीही असो, पण ती भूमिकेला जास्त महत्व देते. हेच कारण आहे की तिचा मराठी चित्रपट ‘वेडींगचा सिनेमा’ रिलीज झाला आहे, ज्यात तिच्या भूमिकेला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळत आहे. रुचा प्रत्येक नव्या चित्रपटाला एक आव्हान समजते आणि या प्रक्रियेला एन्जॉय करते. तिच्याशी झालेल्या बातचितातील काही भाग अशाप्रकारे आहे :

चित्रपटात येण्याची प्रेरणा कशी मिळाली? कुटुंबाचे सहकार्य कसे होते?

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. मी ३ वर्षांची असताना अभिनय करायला सुरूवात केली. स्टेज परफॉर्मन्सची माझ्यात आवड उत्पन्न झाली. मी गाणे, डान्स आणि पेंटिंग सगळे शिकत मोठी झाले आहे. माझा अकॅडमिक परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला होता. घरच्यांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावे आणि मी तसेच केले. पण त्यांना माहीत होते की मी यात खुश नाहीए. मग एक दिवस आईनेच मला आपल्या आवडीला पुढे न्यायचा सल्ला दिला आणि मी अभिनय क्षेत्रात आले.

आईचे सहकार्य होते, म्हणून काम करणे माझ्यासाठी कठीण नव्हते. माझे कुटुंब आणि माझे मित्र हेच माझ्यासाठी सगळे काही आहेत.

पहिला ब्रेक कसा मिळाला?

इंडस्ट्रीत माझी काही ओळख नव्हती, म्हणून आधी मी एका दिग्दर्शकाला असिस्ट करायचे काम सुरु केले. तिथेच अभिनेता आनंद अभ्यंकर यांनी एका मॉडेल कोऑर्डीनेटरचा नंबर दिला आणि फोटो काढून ऑडिशन द्यायला सांगितले. मी तेच केले आणि कित्येक ऑडिशन दिल्यानंतर मला दिग्दर्शक सुजित सरकारसोबत एक जाहिरात करायची संधी मिळाली. यानंतर तर जाहिरातीची रांगच लागली. मी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, जॉन अब्राहम वगैरे कित्येक मोठया अभिनेत्यांसोबत जाहिराती केल्या आहेत. यामुळे माझी ओळख निर्माण झाली आणि मला पहिला हिंदी चित्रपट ‘चिल्ड्रन ऑफ वॉर’ मिळाला, ज्यात मी एका बांगलादेशी मुलीची भूमिका निभावली होती. समीक्षकांनी माझ्या कामाची खूप प्रशंसा केली. यानंतर आणखी एक हिंदी चित्रपट ‘अंडर द सेम’मध्ये काम करायची संधी मिळाली. यात मी एका राजस्थानी मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातसुद्धा गेला होता. यामुळे लोक मला ओळखू लागले आणि गणेश आचार्य यांनी मला मराठी चित्रपट ‘भिकारी’ मध्ये लीड रोल दिला.

संघर्ष किती होता?

संघर्ष फार नव्हता, कारण चित्रपटात काम करणे ही माझी मानसिकता होती. जगण्याची पद्धत माझ्यासाठी वेगळी आहे. रोज काही चांगले व्हावे हे गरजेचे नाही. मी एक जर्नी ठरवली आहे. ज्याद्वारे मी वाढले आहे. सध्या मी कथ्थक शिकत आहे. कॉलेजमध्ये मी एक ग्रेसफुल डान्सर होते. मी मराठी चित्रपट ‘वेडिंगचा सिनेमा’मध्ये गोंधळ स्टाईलमध्ये डान्स केला आहे, जो करणे खूप कठीण होते. मी सेटवर हा डान्स शिकले. आनंदाची गोष्ट ही आहे की प्रेक्षकांना हा डान्स खूप आवडला. माझ्यासाठी संघर्ष काहीच नाहीए, कारण प्रत्येक क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी संघर्ष असतोच.

मराठी आणि हिंदी चित्रपट इंडस्ट्रीच्या काम करण्याच्या पद्धतीत काय फरक वाटतो?

दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळया आहेत, कारण दोघांच्या प्रोडक्शन व्हॅल्यूजही वेगळया असतात. भावनात्मक रूपात पाहिले तर दोन्ही सारखेच आहेत. याशिवाय मराठीत कुटूंबासारखे वातावरण असते, ज्यात तुम्ही अगदी आरामात काम करू शकता. मला हिंदीतही काही त्रास झाला नाही, कारण मला सगळे चांगले लोक भेटले, जे माझ्याश चांगले वागले आणि अभिनय करणे खूप सोपे गेले.

एखादा ड्रीम प्रोजेक्ट आहे का?

कलाकाराच्या रूपात मी ज्या भूमिका जगले नाही, त्या करण्याची इच्छा आहे, पण जर चित्रपट निर्माता ऋषिकेश मुखर्जीच्या कथेसारख्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली, तर मजा येईल. त्यांच्या कथा आजही प्रत्येक घरात असतात. त्यांच्या चित्रपटातील भूमिका, प्रत्येक व्यक्तिच्या हृदयाशी जोडलेल्या असतात.

जीवनात येणाऱ्या नकारात्मक गोष्टींना दूर कशी करतेस?

मी खूप सकारात्मक आहे आणि नकारात्मक गोष्टीही सकारात्मकतेने घेते. कित्येकदा जेव्हा ऑडिशनमध्ये मला नकाराचा सामना करावा लागायचा, तेव्हा अतिशय वाईट वाटायचे, पण नंतर मी विचार करायचे की यातून मला काय शिकायला मिळाले आणि यापेक्षा अजून चांगले करण्यासाठी काय करायला हवे? माझ्यासाठी रोज आनंदी राहणे खूप गरजेचे आहे.

तुम्हाला कधी स्त्री असण्याचे दु:ख झालेले आहे का?

मी मुंबईत वाढले आहे, म्हणून माझ्या घरात स्त्री आणि पुरुष यात काही फरक नाही. मी माझ्या इच्छेनुसार ग्रो झाले. कोणीही मला टोकले नाही. मला प्रवास करणे खूप आवडते आणि मी खूप भटकंती करते.

वेळ मिळाला तर काय करायला आवडते?

अभिनयाव्यतिरिक्त माझे कितीतरी छंद आहेत, म्हणजे लिहिणे, चित्रपट दिग्दर्शित करणे वगैरे जे मी कामाच्या अधेमधे करत असते.

आवडता पोशाख –    साडी

डिझायनर –     विक्रम फडणीस

आवडता रंग – ब्ल्यू, ब्लॅक, व्हाईट

आदर्श    – माझी आजी

जीवनातील सफलता – प्रामाणिकपणा आणि मेहनत

आवडते पुस्तक – लव्ह अँड बेली

आवडते परफ्युम – बर्साची, ह्युगोबॉस

आवडते पर्यटन स्थळ – भारतात वाराणसी, केरळ आणि परदेशात क्रबि.

पहिल्या पावसात मी भिजतेच भिजते – गौरी  नलावडे

* सोमा घोषलहानपणापासून अभिनयाची आवड असलेली मराठी अभिनेत्री गौरी नलावडे मुंबईची आहे. तिला नेहमीच वेगळया आणि चांगल्या कथांवर भूमिका साकारायला आवडते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती अभिनयाकडे वळली आणि एकामागून एक चित्रपट करत आहे. तिची पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’मधील तिच्या कामाचे समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि तिच्या कारकीर्दीची यशस्वी वाटचाल सुरू झाली. गौरीच्या या प्रवासात तिची आई अरुणा नलावडे यांनी तिला मोलाची मदत केली. कारण, लहान वयातच तिच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले. तिच्या मुख्याध्यापक आईने तिचे पालनपोषण केले. तिचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नम्रपणे वागणाऱ्या आणि परखड बोलणाऱ्या गौरीशी तिच्या प्रवासाबाबत गप्पा मारता आल्या. याच गप्पांमधील हा काही खास भाग :

सध्या तू काय करत आहेस? कोविडदरम्यान काय काय केलेस?

जे चित्रपट बाकी होते ते पूर्ण केले आणि जे पूर्ण झाले आहेत, त्यांच्या प्रदर्शनाची वाट बघत आहे. ३० एप्रिलला मराठी चित्रपट ‘गोदावरी’ प्रदर्शित होणार होता, पण कोरोनामुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. सर्व ठीक झाल्यावर लवकरच तो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. एक चित्रपट ‘द डिसाईपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी चरित्र अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्यांचे एडिटिंग सुरू आहे. कोविड महामारीमुळे खूप कमी चित्रपटांची निर्मिती होत आहे. जाहिराती आणि शूटिंगमध्ये उरलेली कामे केली जात आहेत. सध्या चित्रपटांची शूटिंग बंद आहे. या काळात घरात राहून पुस्तके वाचणे, घरातल्यांसोबत वेळ घालवणे, जेवण बनवणे, वर्कआऊट, झोप पूर्ण करुन घेणे इत्यादी कामे करत आहे. कोविडदरम्यान मी एक शॉर्ट फिल्म शूट केली होती, ज्यात माझ्यासोबत अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी काम केले आहे. कोविडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन खबरदारी घेऊनच आम्ही शूटिंग पूर्ण केले.

अभिनयाची प्रेरणा तुला कुठून मिळाली?

जेव्ही मी टीव्ही सुरू करायचे तेव्हा माधुरी दीक्षित, श्रीदेवी अशा सर्व अभिनेत्रींचा डान्स बघत असे. मला हे माध्यम खूपच प्रभावी वाटायचे, ज्याद्वारे व्यक्ती आपल्या सर्व भावना व्यक्त करू शकतो. मला तासन्तास टीव्हीसमोर बसून रहायला आवडत असे. शाळेतही अभ्यासाव्यतिरिक्तच्या इतर सर्व कार्यक्रमात मी सक्रिय सहभागी होत असे. मला कलेची आवड आहे, हे घरच्यांना माहीत होते. अभिनयाची इच्छा मी आईकडे बोलून दाखवली, कारण मला नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करायचा होता. आईने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला, कारण या क्षेत्रात काम मिळेलच अशी खात्री नसते. सोबतच मला कोणीही गॉडफादर नाही, म्हणूनच मला माझ्या मेहनतीवर यश मिळवावे लागेल.

तुला कुटुंबाचे कितपत सहकार्य मिळाले?

कुटुंबाने नेहमीच सहकार्य केले. आईने माझ्या कामाचे भरभरुन कौतुक केले. फार्मसीची पदवी घेतल्यानंतर मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली. अगदी अल्पावधीतच मला पहिली मालिका ‘स्वप्नांच्या पलीकडले’ मिळाली आणि वैदेहीच्या रुपात मी घराघरात लोकप्रिय झाले. माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी चित्रपटात काम करू लागले. या मालिकेने मला ओळख मिळवून दिली.

तू तुझ्या प्रवासाकडे कशी बघतेस? हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे का?

माझ्या प्रवासाबाबत मी खूपच आनंदी आहे, पण कलाकार कधीच आपल्या कामात समाधानी नसतो. त्याची इच्छा वाढतच जाते. चांगल्या भूमिकेच्या शोधात आहे. जिथे मला नजरेसमोर ठेवून कथानक लिहिलेले असेल. यामुळेच मला योग्य काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हिंदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे, पण कथानक चांगले असायला हवे, जे मला समोर ठेवून लिहिलेले असेल. हिंदी आणि मराठी चित्रपटातील फरक हा केवळ भाषेचा असतो.

तुला कधी नेपोटिमचा सामना करावा लागला आहे का?

चित्रपट निवडताना मला एखाद्या तज्ज्ञाची कमतरता सतत भासते, ज्याचा सल्ला घेऊन मी योग्य निर्णय घेऊ शकेन. मला इंडस्ट्रीत खूप चांगली माणसे भेटली आणि त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळाले. नेपोटिझमचा सामना कधीच करावा लागला नाही.

तू नकाराचा सामना कशी करतेस?

सुरुवातीला मला नकार मिळायचा तेव्हा स्वत:वरच संशय यायचा. खूपच वाईट वाटायचे. काळानुरुप लक्षात आले की, काही भूमिकांसाठी विशिष्ट चेहऱ्यांची गरज असते. निवडही सर्वांच्या मतानुसारच होते, कारण हा एक व्यवसाय आहे, ज्यात खूप पैसे लावले जातात. खरंतर माणूस नकारातून खूप काही शिकतो. म्हणूनच प्रत्येक नकारानंतर मी माझ्यातील कमतरतेवर मात करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आता मला नकाराची भीती वाटत नाही.

तूला आईच्या हातचे काय खायला आवडते?

माझी आई पुरणपोळी खूपच छान बनवते. आईच्या हातच्या पुरणपोळीची चव खूपच वेगळी असते. मी चिकन चांगले बनवू शकते.

तू पावसाळयात स्वत:ची काळजी कशी घेतेस?

मला पावसाळा खूपच आवडतो. पहिल्या पावसात मी आवर्जून भिजते. पावसात गरम पाणी पिणे, वाफ घेणे, लवंगाचे पाणी पिणे, स्वत:ला स्वच्छ ठेवणे याकडे लक्ष देते. जेवणात तूपाचा वापर अवश्य करते. पावसाचे दिवस आहेत, हे लक्षात ठेवूनच प्रत्येक काम करायला हवे. मान्सूनमध्ये मी जास्त नॉनवेज खात नाही. अशा वातावरणात शरीरातील आर्द्रता टिकवून ठेवणे फारच अवघड असते. त्यामुळे जास्त पाणी पिणे, चेहऱ्याला मॉईश्चराईज करणे गरजेचे असते. मला तूप खूप आवडते. जेवणात सकाळ, संध्याकाळ मी प्रत्येकी एक चमचा तूप घेते. तूप एखाद्या पदार्थात टाकून खाल्ल्यास वजन वाढत नाही.

एखादा मेसेज, जो तू देऊ इच्छितेस?

प्रत्येक दिवस सारखा नसतो. जीवनात कोणतीच गोष्ट कायम टिकून राहत नाही. म्हणूनच वर्तमानकाळात जे आनंदाचे क्षण मिळतात ते कुटुंबासोबत साजरे करा. परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि याला सर्वांनाच सामोरे जावे लागते. सध्या योग्य प्रकारे श्वास घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. प्राणवायू मिळू न शकल्याने लोक मरत आहेत आणि ही खूपच  दु:खद गोष्ट आहे.

आवडता रंग – गुलाबी.

आवडता पेहराव – जीन्स, टी शर्ट.

आवडते पुस्तक – द फोर्टी रुल्स ऑफ लव, लेखक एलिक शफाक.

वेळ मिळाल्यास – चित्रपट पाहणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, चेहऱ्यासाठी वेगवेगळया प्रकारचे मास्क बनवणे, डायरी लिहिणे.

आवडता परफ्यूम – अरमानी.

आवडते पर्यटनस्थळ – देशात हिमाचल प्रदेश, परदेशात अमेरिका.

जीवनातील आदर्श – करुणा, माणुसकी.

सामाजिक कार्य – गरजवंतांना मदत करणे.

स्वप्नातील राजकुमार – जो माझ्या मनासारखा असेल.

स्वप्न – कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करणे.

‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेचे चित्रीकरण गोव्यात सुरू!

* सोमा घोष 

एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सोनी मराठी वाहिनीवरील नवी  मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. साधी, गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावतले प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

राज्यातील चित्रीकरणावर बंदी आल्यामुळे मालिकांचं चित्रीकरण थांबलं, पण ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेचे नवे भाग प्रेक्षकांना आत्तापर्यंत पाहायला मिळाले आणि सिनेसृष्टीत ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हटले जाते, त्याप्रमाणे हे मनोरंजनअसेच अखंडित सुरू राहणार आहे. मनवा नाईकच्या स्ट्रॉबेरी प्रोडक्शन या संस्थेची निर्मिती असलेली मालिका ‘तू सौभाग्यवती हो’चा चमू आता गोव्याला पोचला असून मालिकेच्या पुढील भागांचे चित्रीकरण गोव्यात होईल.

पाहत राहा, ‘तू सौभाग्यवती हो’,

सोम.-शनि., संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर.

झोंबिंवर आधारित पहिला मराठी चित्रपट ‘ झोंबिवलीचा ‘ टिझर लाँच!

* सोमा घोष

चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. नुकताच या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल.

२०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे.

मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे.

टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात.

या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात, ” मराठीमध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल. आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत या सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे.”

असा हा भव्य चित्रपट अनेक अर्थांनी अनोखा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहावा.

 

मराठी चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या भूमिकेत

सोमा घोष

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता.

 अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसाइटीमध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेच्या हिस्सेचे डब्बिंग पूर्ण केले ह्यावेळी चित्रपटाचे निर्माते श्री शांताराम भोंडवे अवार्जुन उपस्थित होते. ह्यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये ह्यांनी निर्मात्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या, आणि लवकरच चित्रपट सिनेमाघरात लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 सलमान सोसायटी ह्या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे , नम्रता आवटे महाराष्ट्रा ची हास्यजत्रा फेम आपल्याला एका वेगळ्या ,महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट ,माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.

सलमान सोसायटीचे चित्रीकरण एकूण ३ शेडूल पूर्ण केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी, नाशिक, मुंबई, नवी मुंबई च्या जवळील भागातच झाले आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी  लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें