मराठी चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमये दिसणार पाहूण्या भूमिकेत

सोमा घोष

दिग्दर्शक कैलाश काशीनाथ पवार यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचा मुहूर्त अभिनेता सोनू सूदच्या उपस्थितीत पार पडला होता.

 अभिनेता उपेंद्र लिमये ह्यांनी चित्रपट सलमान सोसाइटीमध्ये एक पाहुण्या भूमिकेत दिसणार आहेत, काही दिवसांपूर्वी उपेंद्र लिमये ह्यांनी आपल्या भूमिकेच्या हिस्सेचे डब्बिंग पूर्ण केले ह्यावेळी चित्रपटाचे निर्माते श्री शांताराम भोंडवे अवार्जुन उपस्थित होते. ह्यावेळी अभिनेते उपेंद्र लिमये ह्यांनी निर्मात्यांना चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या, आणि लवकरच चित्रपट सिनेमाघरात लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

 सलमान सोसायटी ह्या चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे , नम्रता आवटे महाराष्ट्रा ची हास्यजत्रा फेम आपल्याला एका वेगळ्या ,महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. बाल कलाकार पुष्कर लोनकरने ह्या आदी एलिझाबेथ एकादशी, बाजी, रांजण, चि .व चि .सौ. का, फिरकी आणि टी. टी. एम. एम चित्रपटात अभिनय केलाय तर  शुभम मोरे ह्याने हिंदी चित्रपट रईस मध्ये बालपणच्या शाहरुख़ खान ची भूमिका वटवली तसेच हाफ टिकिट, फास्टर फेने सारखे उत्तम मराठी चित्रपट केलेत तर बाल कलाकार विनायक पोतदार याने हाफ टिकिट ,माउली, ताजमहल आणि येरे येरे पावसा मध्ये भूमिका केल्या आहेत.

सलमान सोसायटीचे चित्रीकरण एकूण ३ शेडूल पूर्ण केले असून चित्रपटाचे चित्रीकरण आटपाडी, नाशिक, मुंबई, नवी मुंबई च्या जवळील भागातच झाले आहे तसेच चित्रपट ह्या वर्षी  लवकरात लवकर प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.

कोरोना लॉकडाऊन वेडिंग (ना वऱ्हाडी, ना वाजंत्री असे आहे नवे लग्न)

* मिनी सिंह

देशात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आले. ते अशावेळी जाहीर झाले जेव्हा देशात लग्नाचा हंगाम असतो. लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. परंतु काही जोडपी अशीही आहेत ज्यांना लग्नाच्या बंधनात अडकायचे आहे. त्यामुळेच लॉकडाऊनमध्येही यावर पर्याय शोधून त्यांनी लग्नगाठ बांधली. ऑनलाइन लग्न केले. यात मेहंदी, संगीत आणि इतर सर्व विधीही ऑनलाइनच झाल्या. लोकांनाही ऑनलाइन आमंत्रण दिले. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून लग्न ऑनलाइन करण्यात आले.

नवरा एकीकडे आणि नवरी दुसरीकडे

उत्तर प्रदेशातील शहर बरेलीमध्ये असाच एक अनोखा, ऑनलाइन लग्न सोहळा पहायला मिळाला. नवरा सुषेनचे असे म्हणणे आहे की, भलेही येत्या काही दिवसांत लॉकडाऊन संपेल, पण आम्हाला तोपर्यंत लग्नासाठी वाट पाहत रहायचे नव्हते. म्हणूनच, एक जबाबदार नागरिक या नात्याने आम्हाला असे वाटले की सामाजिक अंतर राखण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

हे लग्न शादी डॉट कॉमद्वारे करण्यात आले. शादी डॉट कॉमने ‘वेडिंग फ्रॉम होम सर्व्हिस’ सुरू केली आहे. या सेवेअंतर्गत सर्व पाहुणे लग्नात ऑनलाइन सहभागी झाले आणि फेरेही ऑनलाइनच घेण्यात आले. इतकेच नाही तर या लग्नात सनई-चौघडयांचीही ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली होती. हे लग्न इतर लग्नांप्रमाणेच सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात आले होते.

भारतात जिथे लग्नाची तयारी अनेक महिन्यांपूर्वीपासून सुरू होते, तिथे केवळ दोन तासांत लग्न होणे आश्चर्याची गोष्ट आहे.

परंतु कोरोनाच्या महामारीने आयुष्यच बदलून टाकले. याच बदलामुळे भारतीय लग्नाचे रुपही बदलले. तेच लग्न जिथे नवरा- नवरीसोबत वऱ्हाडी, वाजंत्री आणि न जाणो किती मित्रमैत्रीणी सहभागी होत असत. कितीतरी महिने आधीपासूनच तयारी सुरू केली जायची आणि नंतर हळद, मेहंदीसारख्या बऱ्याच विधी झाल्यावर तो खास दिवस उजाडायचा ज्या दिवशी नवरा-नवरी कायमचे एकमेकांचे होऊन जायचे. परंतु आता कोरोना युगाने लग्नाचा हॉल, मंडप, केटरिंगची संकल्पना अशी काही बदलली आहे की, लग्नात सामाजिक अंतर आणि ऑनलाइन वेडिंगसारख्या अनेक संकल्पना नव्याने जोडल्या गेल्या आहेत.

आज अनेक जोडपी व्हिडीओ कॉलिंग अॅप्सद्वारे लग्न करीत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणांहून अशी काही जोडपी चर्चेत आली ज्यांनी व्हर्च्युझअल वेडिंगचा मार्ग स्वीकारला. अशा प्रकारे लग्न करणाऱ्या काही जणांनी सांगितले की, वाजंत्री, वरातीसह लग्न करायची इच्छा होती, पण आता ते नाही तर निदान ऑनलाइन सनई-चौघडेही चांगले आहेत.

स्वत:हूनच नटत आहे नवरी

लग्नाच्या दोन-तीन महिने आधीपासूनच नवरा आपल्या चेहऱ्यावर खास लक्ष देत असे, नवरी महागातले महाग प्री ब्रायडल पॅकेज घेत असे. आता मात्र कोरोनाच्या या काळात वर आणि वधूचा तोच चेहरा मास्कखाली झाकलेला पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर लग्नात सहभागी होणारे मोजके नातेवाईकही मास्क लावलेलेच पहायला मिळतात. आता लग्नासाठी नवरी एखाद्या पार्लरमध्ये नाही तर स्वत:कडे असलेल्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करुन स्वत:च किंवा आपल्या नातेवाईकांच्या मदतीने तयार होत आहे.

कुटुंबातील माणसे बनली फोटोग्राफर

आतापर्यंत लग्नसोहळयाव्यतिरिक्त प्री-वेडिंग, मेहंदी आणि हळदीसाठीची फोटोग्राफी तसेच व्हिडीओग्राफी केली जात होती, पण आता जी लग्नं होत आहेत, तिथे फक्त नवरा-नवरीचे बहीण-भाऊ किंवा मग जवळचे नातेवाईकच फोटो काढताना किंवा व्हिडीओ शूटिंग करताना दिसत आहेत. या कोरोना काळाने दोन्ही बाजूंकडचा मोठा खर्च कमी केला आहे आणि फोटो काढल्यानंतर फोटोग्राफरसोबत बसून त्यातील खास फोटो निवडण्यासाठीचा वेळही वाचवला आहे.

घरच झाले लग्नाचा हॉल

लग्नाच्या दिवशी वरात हॉलमध्ये येताच सर्वत्र आनंदाच्या वातावरणाची निर्मिती होते. इकडे सनई-चौघडे वाजतात आणि तिकडे नवरीच्या हृदयाची धडधड वाढते. पण आता लग्नसोहळे अतिशय शांततापूर्ण वातावरणात होत आहेत. वाजंत्री नाही, वरात नाही. नवरा काही मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना घेऊन नवरी मुलीच्या घरी येऊन तिच्याशी लग्न करतो आणि तिला घेऊन जातो. आता कुटुंबीयांना लग्नपत्रिका छापायाची किंवा पाहुण्यांचे आदरातिथ्य करायची गरज नाही. लग्नात दोन्ही बाजूंकडील लाखो रुपयांची बचत होत आहे. यामुळे हुंडयाची परंपराही मोडीत निघत असल्याचे पहायला मिळत आहे. मास्क लावलेले नवरा-नवरी पवित्र बंधनात बांधले जात आहेत.

तसे तर ऑनलाइनने आपल्या जीवनात खूप आधीपासूनच प्रभाव पाडायला सुरुवात केली आहे. इंटरनेटच्या या युगात खूप काही बदलले, पण आयुष्य जगण्याची पद्धत आहे तशीच आहे. सध्या ज्या प्रकारे ऑनलाइन होणाऱ्या लग्नाला विरोध होत आहे, तसाच तो फारपूर्वी गॅस आणि कुकरलाही झाला होता. जेव्हा गावात एखाद्याच्या घरी टीव्ही आला तेव्हाही विरोध करण्यात आला होता. मुले संस्कार विसरतील म्हणून पालक त्यांना बाहेरगावी अभ्यासासाठी पाठवायला तयार नव्हते. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यांना कालपर्यंत विरोध केला जात होता त्याच आज सामान्य होऊन गेल्या आहेत. अशाच प्रकारे, ऑनलाइन लग्नही सामान्य गोष्ट आहे.

घातक आहे धार्मिक उन्माद

* दीपान्विता रायबनर्जी

धार्मिक ढोंगीपणा माणसांची विचारसरणी संकुचित बनवितो यामुळे माणसं अतिक्रूर बनून आपलं तनमनधन सर्वकाही हरवून बसतात.

२ जून, २०१६ साली झालेला मथुरा कांड याचं ताजं उदाहरण आहे. रामवृक्ष यादवने आपल्या संकुचित विचारसरणीमुळे २४ निरपराध्यांचे जीव घेण्याबरोबरच      स्वत:देखील आपल्या अंधश्रद्धांसोबत स्फोटात जीव गमावून बसला.

वेडेपणाच्या नादात हा इसम देशाची घटना, कायदा आणि सरकार तिन्ही गोष्टींशी विद्रोह करून स्वत:ला देव समजू लागला होता. आपल्या उन्मादी भाषणांद्वारे अंधश्रद्धाळू भक्तांची फौज एकत्रित करत होता. मथुराच्या जवाहर बागेत स्फोटक सामुग्री जमा करत होता. दुर्घटनेच्या दिवशी उन्मादी भक्तांनी या व्यक्तिसोबत मिळून भयानक स्फोट घडविला. अंधश्रद्धा जर रोखली गेली नाही तर हे किती विध्वंसक होऊ शकतं हे कोणापासूनही लपलेलं नाहीए.

कोणीही यापासून बचावलं नाहीए

देश असो वा परदेश, अंधश्रद्धेच्या विषवृक्षाने नेहमीच अतिवादी विचार पसरवले आहेत.

आंतरराष्ट्रीय पटलावर कुकलक्स कलान यांचं भयानक नाव बनून समोर आलं. जेव्हा दक्षिण युरोपात गणराज्याची स्थापना झाली तेव्हा काळ्या लोकांची गुलामगिरीतून सुटका झाली. तेव्हा एलीट लोकांच्या समूहातून कूकलक्स कलान नावाची भयानक जातीयवादी संघटना प्रस्थापित झाली जी काळ्या लोकांच्या गुलाम प्रथेची समर्थक होती आणि गोऱ्या लोकांची सुपरमॅसी म्हणजेच बाजूची होती. या संघटनेच्या लोकांनी शाळा, चर्चेसवर हल्ले करायला सुरूवात केली. रात्रीच्या अंधारात हे भीतिदायक कपडे घालून काळ्या लोकांवर हल्ले करत असत. त्यांनी काळ्या लोकांना धमकावण्यापासून ते त्यांचा खून करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सरकारी दबावामुळे यांचा प्रभाव कमी झाला, परंतु आता यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. हे आफ्रिकन अमेरिकन हेट ग्रपुच्या सिद्धांतावर चालतात.

या सर्व घटना चरमपंथाशी संबधित आहेत, जिथे मानव उलटसुलट तर्क, सहनशीलता, उदारता यांची कट्टर विरोधक बनते. त्यांच्यासाठी स्वत:चा स्वार्थ सर्वोपरी होतो.

आज आयएसआयएस कट्टरवादी आतंकवादाचा क्रूरतम चेहरा आहे, ज्याची प्रत्येकाला दहशत आहे. स्वत:ला वा विशेष धर्माला अथवा जातीला मोठं करून अंधश्रद्धेखाली लोकांना आणलं जाण्यासाठी दहशत पसरवली जाते.

अमेरिकन राष्ट्रपतींनी आयएसआयएसवरच्या कारवाईच्यावेळी सांगितलं होतं की यांचा सिद्धांत नॉनइस्लामिक आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे की धर्माच्या आड केलं जाणारं क्रूरतम काम कधीही वास्तविक धर्माचं उद्देश्य पूर्ण करू शकत नाही.

ढोंगी बाबाबुवांचं जाळं

आपल्या देशात आसाराम बापू प्रकरण तसं फारसं जुनं नाहीए. कथित परमपूज्य आसाराम बापूला १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आलं. या मुलीचे आईवडील आसारामच्या आश्रमात अनेक वर्षापासून सेवा करत होते.

आसारामवर खून, बलात्कार, तांत्रिक मंत्रसिद्धीद्वारे वशीकरण, कामोत्तेजना वाढविणाऱ्या औषधांचं सेवन करवून स्त्रिया आणि मुलींचं शारीरिक शोषण, जमीन हडपणं इत्यादी अनेक आरोप लागले आहेत.

आसाराम हरपलानी, जन्म १९४१, पूर्वी टांगेवाला, नंतर रस्त्यालगत चहा विकणारा आणि त्यानंतर जमिनी बळकावत स्वयंभू भगवान बनतो. त्याने जवळजवळ ३० लाख अंधश्रद्धाळू भक्तांची फौज तयार केली, त्यांच्यासाठी हा पूज्य संत श्री आसाराम बापू बनला.

आसारामचे अंधभक्त अतिरेकी संघटनेतील जिहादीसारखे आहेत, जे याच्या एका इशाऱ्यावर मरण्यास आणि मारण्यासदेखील तयार होतात. यांच्यासाठी गुरूच्या अंधशक्तीपेक्षा अधिक असं काहीही नाहीए. आता जरा विचार करा की देशातील एवढी मोठी लोकसंख्या जर अंधश्रद्धेच्या वेडेपणाच्या मानसिकतेत असेल, बुद्धी आणि तर्कवार त्याच्यापुढे गौण ठरत असेल तर देशाचा विकास कसा होईल?

स्त्रियादेखील सावज ठरतात

धर्माच्या नावाखाली लोकांना विश्वासात घेऊन एकामागोमाग एक अतिरेक्यांच्या क्रूरकर्मा संघटना मजबूत होत चालल्या आहेत. जातिधर्माच्या ढोंगाचं जाळं पसरवून अशा संघटनांचे कर्ताधर्ता आपल्या मानसिक संकीर्णतेला संतुष्ट करतात.

अगदी गृहिणीदेखील धर्म आणि ढोंगीपणाचं खातं उघडून बाबाबुवा, मौलवी, भटब्राह्मण, तांत्रिकांच्या मागे लागलेल्या दिसतात. मग मूल आजारी असो, पदोन्नती, शत्रूंचा बीमोड असो वा मनासारखी वास्तू मिळवण्याची गोष्ट असो, लोक आश्रम, देऊळ, मस्जिदची गुलामी करू लागतात. धर्माच्या आड लोकांना घाबरवून स्वत: विलासी जीवन जगणं ही तर भटब्राह्मण, मौलवी, पाद्री यांचा व्यवसाय आहे.

धर्माच्या ठेकेदारीने हे ढोंगी कुशल तंत्राने लोकांना वश करणं खूपच चांगलं जाणून आहेत. भीतीला हत्यार बनवून हे लोकांची मानसिकताच बोथट करून टाकतात.

आपल्या इच्छेनुसार सर्व काही मिळविण्याच्या लालसेपायी मनुष्य           भ्रष्ट होत जातो. लोकांच्या या लालसेला ढाल बनवून हे पंडित, मुल्ला आपलं काम साधून घेतात.

माणसाने जर आपल्या डोक्याचा योग्य वापर केला तर त्याला कोणाताही धर्म वा अंधश्रद्धेची गरज पडणार नाही. बाबाबुवांच्या फेऱ्यात सापडून लोकांची विचारसरणी बोथट होते, तेव्हा हे बाबाबुवा साधना, तंत्रमंत्र, दान, भक्तीच्या गोष्टी सांगून पैसा उकळत राहातात. नंतर वेगवेगळ्या व्यवसायात पैसा लावतात. आपल्यामागे स्वत:च्या साम्राज्याच्या रक्षणासाठी सेना उभी करतात, बलात्कारापासून ते अगदी खुनापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत यांचे हात माखलेले असतात.

सुशिक्षित अंधश्रद्धाळू

आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या या युगातदेखील लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

मनुष्य होण्याची सार्थकताही आपण अंधश्रद्धेच्या अधीन जाऊ नये यातच आहे. आस्थेचं एक महत्त्व आहे, परंतु ही आस्था सत्याच्या आधारावर असावी, लबाडी, थोतांडावर नसावी.

आयुष्यात जादूने काहीही होत नाही, सर्वकाही मेहनत आणि वैज्ञानिक सत्यावर आधारित असतं. जर अंधश्रद्धा आणि नक्कल करणाऱ्यांच्या भरवशावर अवलंबून      राहिलात तर आयुष्यात अशी ठोकर बसेल की सांभाळण्याची संधीदेखील मिळणार नाही. म्हणून न्याय आणि सत्याच्या मार्गाने अंधश्रद्धेला न जुमानता चला, मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील.

लढाई…अशीच हरू नका

* नितिन शर्मा, ‘सबरंगी

दृष्टीकोन बदलला की बरंच काही बदलतं. उदास वाटणाऱ्या आयुष्यातही उत्साह संचारतो. यासाठी संयम, विवेक आणि योग्य संतुलन आवश्यक आहे. जे असं करू शकत नाहीत ते निराशेच्या गर्तेत ढकलले जातात. जेव्हा तुम्ही जिंकण्याच्या निर्धाराने पुढे जात राहाता तेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितिलाही अनुकूल बनवता. पण जो वेळेआधीच हरतो तो स्वत: तणावाखाली राहातो आणि आपल्या कुटुंबालाही न विसरू शकणारं दु:खं देतो. समाजातही चुकीचा संदेश जातो. लोक त्याला भित्रा म्हणू लागतात. त्याच्या जिंवतपणी किंवा पश्चात ‘भित्रा’ अशी त्याची ओळख बनली तर ती त्याच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकते.

उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात राहाणारी ४६ वर्षीय नीता गुलाटी सरकारी शाळेत शिक्षिका होती. ती इतकी सुंदर होती  की सगळे तिची स्तुती करत. तिचा नवराही सरकारी कर्मचारी होता. तिचा एक मुलगा आणि मुलगी उच्चशिक्षण घेत होते. कुटुंबात आनंद नांदत होता. वरवर दिसताना सगळं ठिक दिसत होतं. पतिपत्नीमध्ये कोणताही वाद नव्हता किंवा घरात कशाचीही कमतरता नव्हती. या सगळ्यापासून लांब नीता एका वेगळ्याच दुनियेत जगत होती, ती डिप्रेशनमध्ये होती आणि याची जाणीव तिच्या नवऱ्यालाही नव्हती.

एके दिवशी संध्याकाळी नीता घरात एकटी होती. नवरा घरी आला तेव्हा त्याला तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. आपल्या अर्धांगिनीची ती अवस्था पाहून तो बेभान झाला. नीताने गळ्याभोवती फास आवळून आपल्या श्वासांची मालिका रोखून भ्याडपणा दाखवून दिला होता. आजूबाजूची माणसं गोळा झाली.  आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि आनंदी कुटुंबातल्या नीताने हे पाऊल उचललं यावर कोणाचा विश्वासच बसत नव्हता.

आत्महत्येचं कारण

नीताने आपल्या आत्महत्येचं कारण एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. ‘‘सॉरी, पण काय करु? माझ्या आजारपणाने हैराण झाले आहे.’’

खरंतर नीता सनबर्नला कंटाळली होती आणि यामुळे डिप्रेशनमध्ये होती. ३ वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. उपचारांनी आजार बरा होऊ शकत होता. पण तरीही नीता डिप्रेशनमध्ये होती.

सूर्याच्या अल्ट्राव्हायोलट किरणांमुळे त्वचा जळजळते, त्याला सनबर्न म्हणतात. पाणी पिऊन त्वचा झाकून ठेवून, उन्हापासून लांब राहून आणि सनस्क्रीन लावून हा आजार सहज बरा होऊ शकतो. पण नीताला नकारात्मकतेने ग्रासलं होतं. हळूहळू ती डिप्रेशनमध्ये इतकी शिरत गेली की तिने कुटुंबाचा आणि स्वत:चा विचार न करता चुकीचा मार्ग निवडला.

नीताच्या जवळच्या माणसांचा विश्वासच बसत नव्हता की इतक्या क्षुल्लक कारणासाठी कोणी आत्महत्या करू शकतं. पण संशय येण्यासारखं काहीच नव्हतं. नीता तिच्या कुटुंबासाठी आता फक्त आठवणीतच राहिली. सकारात्मक दृष्टीकोन आणि विचारानं ती स्वत:लाही सावरू शकत होती.

धावपळीच्या आयुष्यात विविध कारणांमुळे डिप्रेशन येणे ही मोठी गोष्ट नाही. प्रत्येकजण थोड्याफार प्रमाणात याचा बळी ठरतोच. पण वेळीच या तणावावर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचं रूपांतर विविध आजारांमध्ये होऊन तुमचं आयुष्य तुम्हाला वाईट दिसू लागतं. हे ते भयंकर क्षण असतात जे तुम्हाला मृत्यूच्याजवळ नेऊन ठेवतात.

आयुष्य ओझं वाटत असेल तर जगण्याची पद्धत बदला. नाजूक क्षणी विचारीपणाने निर्णय घेतले तर भविष्यातील अडचणी टाळता येतात. जे वेळीच सावरत नाहीत, त्यांना अनपेक्षित घटनांना सामोरं जावं लागतं.

तुम्हाला तुमच्या जवळपास असे काही लोक भेटतील जे तुमच्यापेक्षा जास्त त्रासात आहेत. कोणी अंध आहेत तर कोणी अपंग. पण आपल्या हिंमतीच्या जोरावर वेळ निभावून नेतात आणि इतरांसाठी आदर्श बनतात. लक्षात ठेवा, या जगात करोडो लोक आहेत जे तुमच्यासारखं आयुष्य जगायला आसुरतात. कोणाकडे खायला अन्न नाही, कोणाकडे कपडे नाहीत, डोक्यावर छत नसतं, उपचारासाठी पैसे नाहीत, पण तरीही ते आनंदाने जगत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची चमक पाहण्यासारखी असते. लहानसहान गोष्टींमुळे विचलित होऊन लोक आयुष्यात हार मानू लागले तर त्यांची यादी रोज मोठी असेल. आयुष्यातली ध्येयं कायम ठेवा आणि प्रत्येक स्थितीत जगण्याची कला शिका, कोणत्याही वाईट विचारांना आणि त्रासाला तुमच्यावर ताबा मिळवू देऊ नका. यामुळे अडचणी कमी होण्यापेक्षा वाढतील. प्रतिकूल स्थिती कधीच कायम राहात नाही, आपलं संपूर्ण लक्ष समस्येतून मार्ग काढण्याकडे असलं पाहिजं.

अशीही माणसं आहेत जी आपला दृष्टीकोन बदलून आपल्या हाताने आयुष्य सावरतात, अगदी तेव्हाही जेव्हा मनात काही वाईट विचार येतात आणि आयुष्य डोंगराएवढं वाटू लागतं.

उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये राहाणाऱ्या अनिता शर्मा उर्फ भैरवी यांच्या कानाखाली एक गाठ आली. गाठीने कॅन्सरचं रूप घेतलं. यामुळे अनिताची झोपच उडाली आणि ती चिंताग्रस्त झाली. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असं वाटू लागलं.  पण त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला. तेव्हा त्यांना कळलं की सकारात्मक बनून आजाराबरोबरच अनेक नकारात्मक गोष्टींशी लढता येतं. आता त्या चांगलं आयुष्य जगत आहेत. निराशेमुळे त्रास आणखी वाढतो याची जाणीव झाली. अनीताने आयुष्य जगण्याची पद्धत बदलली. त्या आपला जास्तीत  जास्त वेळ झाडंझुडपं, प्राणी-पक्षी यांच्यासह घालवू लागल्या. यामुळे त्यांना जणू काही जगण्याचं कारण मिळालं. अनिताचं महागडं ऑपरेशन होणार आहे. इतके पैसे त्यांच्याकडे आता नाहीत की तात्काळ उपचार होतील. पण यामुळे त्या अस्वस्थ नाहीत. त्या आपलं संतुलन राखून आनंदी जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. परिस्थिसमोर हरणं म्हणजे आयुष्य नाही.

पोलिस विभागात वायरलेस ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी सिंह पुंडीरनेही दृष्टीकोन बदलून स्वत:ला आणि कुटुंबाला सावरण्याचं काम केलं. २ वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सरचं निदान झालं. आजारपणाच्या विचारानेच त्या कोसळल्या. ऑपरेशन आणि केमोथेरेपीने प्रकृती अधिकच बिघडली.

आजारपणावर लाखो रुपये खर्च झाले आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडलं. अशा परिस्थितीशी झगडताना अशा आयुष्यापासून सुटका करून घ्यावी असं वाटायचं. पण अशावेळी त्या आपल्या ३ मुलांचा विचार करत. त्यांच्यासह स्वप्नं रंगवत. डिप्रेशन बरात काळ राहिलं. पण त्या आपल्या सकारात्मक विचारांनी निराशेवर मात करत. परिणामी बऱ्याच उपचारांनंतर त्यांचा आजार बऱ्याचअंशी नियंत्रणात आला.

‘‘जेव्हा तुमच्यासोबत काही नकारात्मक घडतं तेव्हा एक गोष्ट सकारात्मक घडते की तुम्ही तुमची आशा कधीच सोडत नाही. ठाम विश्वास मनात असला पाहिजे. असाच विचार करा की मला जगायचंय. मग एक दिवस सगळं ठीक होतं.

माझ्या शरीरात कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला होता. फोर्थ स्टेजला होता. मी असाच विचार केला की मला जगायचंय आणि माझ्या आजाराला हरावं लागलं.’’ असं लक्ष्मी सांगतात.

डिप्रेशनला बळी पडू नका

डिप्रेशन म्हणजे तणाव एक गंभीर मानसिक आजार आहे. बऱ्याच संशोधनात   असं लक्षात आलं आहे की पुरुषांच्या तुलनेत या आजाराचं प्रमाण महिलांमध्ये    जास्त आढळतं. बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिप्रेशन भावना, आकलन, वर्तणूक आणि विचारांवर वाईट परिणाम करते. हळूहळू ते माणसाला अशा अवस्थेत नेतं की त्याचं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटू लागतं. जगण्यासारखं काही उरलेलंच नाही असं वाटू लागतं. यामुळे माणूस आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतो. याची बरीच कारणं असू शकतात. मेंदूमध्ये संदेश प्रसारीत करणाऱ्या रासायनिक संदेशवाहक न्यूरोट्रांसमीटरच्या असामान्य स्तराची डिप्रेशनमध्ये महत्त्वाची भूमिका असते. मानसिक रोग,   कमकुवत व्यक्तिमत्त्व, निराशाजनक दृष्टीकोन ही कारणं त्यामागे असतात. याच्या लक्षणांत उदासिनता, निराशा, निद्रानाश, भूक कमी लागणे, थकवा, न्यूनगंड, एकटेपणा, आनंदी क्षणांपासून अलिप्त राहाणं, अस्वस्थता, चिडचिड, सतत डोकेदुखी यांचा समावेश असतो.

डिप्रेशनचा उपाय आपल्या स्वत:च्या हातात असतो. तुम्ही त्यातून कशाप्रकारे     बाहेर पडू इच्छिता हे तुमच्यावर अवलंबून असतं.

मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सकारात्मक दृष्टीकोन बाळगल्याने तुम्ही डिप्रेशनमधून पूर्णपणे बाहेर पडू शकता. स्वत:ची काळजी घेण्यासाठी पुरेसा          वेळ काढा. सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा, कारण व्यसन डिप्रेशनला पूरक असतं. आपले छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. अशी नाती जोडा जिथे तुम्हाला         मनमोकळं बोलता येईल. माणसांमध्ये मिळून मिसळून राहा. तरीही डिप्रेशन कमी झालं नाही तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडे जा. त्यांनी दिलेल्या औषधांचे नियमित सेवन करा आणि त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा फक्त औषध हाच यावरचा उपाय नाही. याच तुमची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टीकोनही तितकाच महत्त्वाचा आहे.

कोरोनापासून सावध राहावे गर्भवती महिलांनी

– डॉ. सागरिका अग्रवाल

गर्भावस्था ही अशी स्थिती आहे, ज्यात एका महिलेला सर्वात जास्त देखभालीची व सावधगिरी बाळगायची गरज असते. हे सत्य आहे की गर्भार महिला जो आहार घेते आणि ज्याप्रकारच्या जीवनशैलीचे पालन करते त्याचा थेट परिणाम तिच्या गर्भावस्थेवर व होणाऱ्या बाळावर होतो. कोव्हिड -१९ ने प्रत्येक व्यक्तिची जीवनशैली संपूर्णत: बदलून टाकली आहे. देशात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गर्भार महिलांमध्ये या संक्रमणाचा धोका जास्त आहे. खरे पाहता गर्भार महिलांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज भासते पण कोरोनाकाळात त्यांचे बाहेर जाणे धोक्याचे आहे. घराबाहेर जावे लागू नये यासाठी गायनाकॉलॉजिस्ट गर्भार महिलांना ऑनलाईन व्हिडिओ कन्सल्टेशनचा सल्ला देतात.

चांगली बातमी ही आहे की व्हायरस प्लॅसेंटाच्या पलिकडे जाऊ शकत नाही. याचा अर्थ हा की पोटात वाढणाऱ्या गर्भाला या व्हायरसचा काही धोका नाही. लॉकडाऊनदरम्यान एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने अगदी सुदृढ बालकाला जन्म दिला होता.पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमच्या तब्येतीबाबत व गर्भावस्थेबाबत निष्काळजीपणा करावा, कारण असे करणे तुमच्यासाठी व तुमच्या होणाऱ्या बाळासाठी अजिबात योग्य ठरणार नाही.

कोरोना व्हायरसमुळे वाढली आहे ताणवाची पातळी

हार्मोनल बदलांमुळे गर्भार महिलांच्या मानसिक स्थितीवर सखोल परिणाम होतो. त्यांच्यात ताण, नैराश्य, चिंता, राग, मूड स्विंग वगैरे या सामान्य समस्या निर्माण होतात, म्हणून या महामारीदरम्यान त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. कोरोनाचा धोका अशा महिलांना जास्त असल्याने त्यांना तणाव वाटणे स्वाभाविक आहे. एखाद्या गर्भार महिलेला हे खूप जड जाऊ शकते.

या जाणून घेऊ की कोरोना व्हायरस दरम्यान गर्भार महिलांनी कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यायला हवे व कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगायला हवी, ज्यामुळे बाळबाळंतीण दोघेही स्वस्थ राहतील.

असे राहा निरोगी

एक चांगली दिनचर्या तयार करा : एक चांगली दिनचर्या तयार करा व रोज त्याचे पालन करा. मातृत्व या विषयावर पुस्तकं वाचलीत तर तुम्हाला कळेल की स्वत:ची व गर्भात वाढणाऱ्या बाळाची निगा कशी राखली जाऊ शकते दिवसभर चांगल्या अॅक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहा.

हलकेफुलके व्यायाम करा : व्यायाम ना केवळ तुम्हाला शारीरिक दृष्टया तर मानसिक दृष्टयाही सुदृढ ठेवतात. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करा. यामुळे मेंदूमधील रक्ताभिसरण सुधारते, आनंदाचे हार्मोन्स स्रवतात व ऑक्सिडेंटिव्ह ताण कमी होतो. हलक्या फुलक्या व्यायामाने तब्येत चांगली राहील.

पौष्टिक आहार : तुम्हाला पौष्टिक व संतुलित आहार व शारीरिक चलनवलनाकडे नीट लक्ष द्यायला हवे. अशा पदार्थाचे सेवन करा, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ति बळकट होईल. हार्मोनल चढउतारामुळे कधीकधी भूक जास्त लागते, तर कधी काहीही खाण्याची इच्छा होत नाही. खरी समस्या जी असेल त्यावर लक्ष केंद्रीत करा, दूरदृष्टी बाळगून विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.

चांगली झोप गर्भार महिलेला रोज ६-७ तास झोपेची गरज असते. झोप पूर्ण झाल्याने तिला स्वस्थ व उत्साहित वाटते. चांगल्या झोपेने ताणाची पातळीसुद्धा कमी होते.

विश्रांती आवश्यक : गर्भार महिलेने फार काम अथवा जड सामान उचलू नये. व्यायामसुद्धा हलकाफुलकाच करायला हवा, ज्यामुळे तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाही. ज्या महिला जड सामान उचलतात किंवा खूप काम करतात व नीट आराम करू शकत नाही त्याच्यात गर्भपाताचा धोका जास्त असतो. म्हणून दुर्लक्ष करू नये व गरजेपेक्षा अधिक काम करू नये.

स्वच्छता आवश्यक : गर्भार महिलेने स्वच्छतेकडे अतिशय लक्ष द्यायला हवे. तसेच कोरोनादरम्यान स्वच्छतेकडे लक्ष देणे आणखीनच आवश्यक आहे. म्हणून व्यक्तिगत स्वच्छतेकडे संपूर्ण लक्ष द्या.

गर्भार महिलेने नेहमी सकारात्मक विचार करायला हवा, ज्यामुळे तिचे भावनात्मक संतुलन कायम राहते. आपला मूड आपले आरोग्य व आपल्या आसपासचे वातावरण कसे आहे यावर अवलंबून आहे. त्यामुळे अशा कोरोनाच्या वातावरणात स्वत:कडे विशेष लक्ष द्या. पौष्टिक आहार व वेळेत जेवण्याची सवय तुम्हाला निरोगी ठेवण्यात मदत करते. शिवाय स्वच्छ वातावरण तुम्हाला मानसिक पातळीवर आनंदी ठेवते. गायनोकोलॉजिस्टने सांगितलेली सर्व औषधे नियमित घ्या. गरज भासल्यास ऑब्स्टेट्रीशिअनशी संपर्क करण्यात मागेपुढे पाहू नका.

काय करू नये

* जोवर स्थिती पूर्णपणे सामान्य होत नाही, घराबाहेर पडू नका.

* तेलकट पदार्थ व जंक फूड खाणे टाळा.

* असा कोणताही पदार्थ खाऊ नका, ज्याने तुम्हाला व तुमच्या बाळाला इजा  पोहोचू शकेल.

* ताप, डोकेदुखी, खोकला व इतर आरोग्यविषयक तक्रारी जाणवल्या तर डॉक्टरच्या सल्ल्याविना कोणतेही औषध घेऊ नका.

* सर्दी पडसे कितीही किरकोळ असले तरीही डॉक्टरशी संपर्क करण्यास अजिबात विसरू नका.

* आपल्या आजूबाजूची जागा अस्वच्छ ठेवू नका.

* घरातील सदस्यांशी बोलताना अंतर ठेवा.

* जड सामान स्वत: उचलू नका.

* खूप वेळ उभे, झोपलेले अथवा बसून राहू नका, याने बाळाच्या वाढीवर परिणाम होतो.

* धूम्रपान, दारू अथवा तंबाखू याचे सेवन टाळा.

* चहा, कॉफीसुद्धा जास्त प्रमाणात घेऊ नका.

* आपल्या गर्भावस्थेबाबत सल्ल्यासाठी जास्त लोकांशी चर्चा करू नका, कारण एखादी व्यक्ति आपल्या अनुभवानुसार सल्ला देते. आपल्या समस्यांबाबत आपल्या डॉक्टरांशी चर्चा करणे योग्य असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें