* दीपान्विता रायबनर्जी

धार्मिक ढोंगीपणा माणसांची विचारसरणी संकुचित बनवितो यामुळे माणसं अतिक्रूर बनून आपलं तनमनधन सर्वकाही हरवून बसतात.

२ जून, २०१६ साली झालेला मथुरा कांड याचं ताजं उदाहरण आहे. रामवृक्ष यादवने आपल्या संकुचित विचारसरणीमुळे २४ निरपराध्यांचे जीव घेण्याबरोबरच      स्वत:देखील आपल्या अंधश्रद्धांसोबत स्फोटात जीव गमावून बसला.

वेडेपणाच्या नादात हा इसम देशाची घटना, कायदा आणि सरकार तिन्ही गोष्टींशी विद्रोह करून स्वत:ला देव समजू लागला होता. आपल्या उन्मादी भाषणांद्वारे अंधश्रद्धाळू भक्तांची फौज एकत्रित करत होता. मथुराच्या जवाहर बागेत स्फोटक सामुग्री जमा करत होता. दुर्घटनेच्या दिवशी उन्मादी भक्तांनी या व्यक्तिसोबत मिळून भयानक स्फोट घडविला. अंधश्रद्धा जर रोखली गेली नाही तर हे किती विध्वंसक होऊ शकतं हे कोणापासूनही लपलेलं नाहीए.

कोणीही यापासून बचावलं नाहीए

देश असो वा परदेश, अंधश्रद्धेच्या विषवृक्षाने नेहमीच अतिवादी विचार पसरवले आहेत.

आंतरराष्ट्रीय पटलावर कुकलक्स कलान यांचं भयानक नाव बनून समोर आलं. जेव्हा दक्षिण युरोपात गणराज्याची स्थापना झाली तेव्हा काळ्या लोकांची गुलामगिरीतून सुटका झाली. तेव्हा एलीट लोकांच्या समूहातून कूकलक्स कलान नावाची भयानक जातीयवादी संघटना प्रस्थापित झाली जी काळ्या लोकांच्या गुलाम प्रथेची समर्थक होती आणि गोऱ्या लोकांची सुपरमॅसी म्हणजेच बाजूची होती. या संघटनेच्या लोकांनी शाळा, चर्चेसवर हल्ले करायला सुरूवात केली. रात्रीच्या अंधारात हे भीतिदायक कपडे घालून काळ्या लोकांवर हल्ले करत असत. त्यांनी काळ्या लोकांना धमकावण्यापासून ते त्यांचा खून करण्यापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर सरकारी दबावामुळे यांचा प्रभाव कमी झाला, परंतु आता यांनी पुन्हा डोकं वर काढलंय. हे आफ्रिकन अमेरिकन हेट ग्रपुच्या सिद्धांतावर चालतात.

या सर्व घटना चरमपंथाशी संबधित आहेत, जिथे मानव उलटसुलट तर्क, सहनशीलता, उदारता यांची कट्टर विरोधक बनते. त्यांच्यासाठी स्वत:चा स्वार्थ सर्वोपरी होतो.

आज आयएसआयएस कट्टरवादी आतंकवादाचा क्रूरतम चेहरा आहे, ज्याची प्रत्येकाला दहशत आहे. स्वत:ला वा विशेष धर्माला अथवा जातीला मोठं करून अंधश्रद्धेखाली लोकांना आणलं जाण्यासाठी दहशत पसरवली जाते.

अमेरिकन राष्ट्रपतींनी आयएसआयएसवरच्या कारवाईच्यावेळी सांगितलं होतं की यांचा सिद्धांत नॉनइस्लामिक आहे.

एक गोष्ट मात्र खरी आहे की धर्माच्या आड केलं जाणारं क्रूरतम काम कधीही वास्तविक धर्माचं उद्देश्य पूर्ण करू शकत नाही.

ढोंगी बाबाबुवांचं जाळं

आपल्या देशात आसाराम बापू प्रकरण तसं फारसं जुनं नाहीए. कथित परमपूज्य आसाराम बापूला १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली गजाआड करण्यात आलं. या मुलीचे आईवडील आसारामच्या आश्रमात अनेक वर्षापासून सेवा करत होते.

आसारामवर खून, बलात्कार, तांत्रिक मंत्रसिद्धीद्वारे वशीकरण, कामोत्तेजना वाढविणाऱ्या औषधांचं सेवन करवून स्त्रिया आणि मुलींचं शारीरिक शोषण, जमीन हडपणं इत्यादी अनेक आरोप लागले आहेत.

आसाराम हरपलानी, जन्म १९४१, पूर्वी टांगेवाला, नंतर रस्त्यालगत चहा विकणारा आणि त्यानंतर जमिनी बळकावत स्वयंभू भगवान बनतो. त्याने जवळजवळ ३० लाख अंधश्रद्धाळू भक्तांची फौज तयार केली, त्यांच्यासाठी हा पूज्य संत श्री आसाराम बापू बनला.

आसारामचे अंधभक्त अतिरेकी संघटनेतील जिहादीसारखे आहेत, जे याच्या एका इशाऱ्यावर मरण्यास आणि मारण्यासदेखील तयार होतात. यांच्यासाठी गुरूच्या अंधशक्तीपेक्षा अधिक असं काहीही नाहीए. आता जरा विचार करा की देशातील एवढी मोठी लोकसंख्या जर अंधश्रद्धेच्या वेडेपणाच्या मानसिकतेत असेल, बुद्धी आणि तर्कवार त्याच्यापुढे गौण ठरत असेल तर देशाचा विकास कसा होईल?

स्त्रियादेखील सावज ठरतात

धर्माच्या नावाखाली लोकांना विश्वासात घेऊन एकामागोमाग एक अतिरेक्यांच्या क्रूरकर्मा संघटना मजबूत होत चालल्या आहेत. जातिधर्माच्या ढोंगाचं जाळं पसरवून अशा संघटनांचे कर्ताधर्ता आपल्या मानसिक संकीर्णतेला संतुष्ट करतात.

अगदी गृहिणीदेखील धर्म आणि ढोंगीपणाचं खातं उघडून बाबाबुवा, मौलवी, भटब्राह्मण, तांत्रिकांच्या मागे लागलेल्या दिसतात. मग मूल आजारी असो, पदोन्नती, शत्रूंचा बीमोड असो वा मनासारखी वास्तू मिळवण्याची गोष्ट असो, लोक आश्रम, देऊळ, मस्जिदची गुलामी करू लागतात. धर्माच्या आड लोकांना घाबरवून स्वत: विलासी जीवन जगणं ही तर भटब्राह्मण, मौलवी, पाद्री यांचा व्यवसाय आहे.

धर्माच्या ठेकेदारीने हे ढोंगी कुशल तंत्राने लोकांना वश करणं खूपच चांगलं जाणून आहेत. भीतीला हत्यार बनवून हे लोकांची मानसिकताच बोथट करून टाकतात.

आपल्या इच्छेनुसार सर्व काही मिळविण्याच्या लालसेपायी मनुष्य           भ्रष्ट होत जातो. लोकांच्या या लालसेला ढाल बनवून हे पंडित, मुल्ला आपलं काम साधून घेतात.

माणसाने जर आपल्या डोक्याचा योग्य वापर केला तर त्याला कोणाताही धर्म वा अंधश्रद्धेची गरज पडणार नाही. बाबाबुवांच्या फेऱ्यात सापडून लोकांची विचारसरणी बोथट होते, तेव्हा हे बाबाबुवा साधना, तंत्रमंत्र, दान, भक्तीच्या गोष्टी सांगून पैसा उकळत राहातात. नंतर वेगवेगळ्या व्यवसायात पैसा लावतात. आपल्यामागे स्वत:च्या साम्राज्याच्या रक्षणासाठी सेना उभी करतात, बलात्कारापासून ते अगदी खुनापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत यांचे हात माखलेले असतात.

सुशिक्षित अंधश्रद्धाळू

आश्चर्याची बाब म्हणजे आजच्या या युगातदेखील लोक अंधश्रद्धेच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

मनुष्य होण्याची सार्थकताही आपण अंधश्रद्धेच्या अधीन जाऊ नये यातच आहे. आस्थेचं एक महत्त्व आहे, परंतु ही आस्था सत्याच्या आधारावर असावी, लबाडी, थोतांडावर नसावी.

आयुष्यात जादूने काहीही होत नाही, सर्वकाही मेहनत आणि वैज्ञानिक सत्यावर आधारित असतं. जर अंधश्रद्धा आणि नक्कल करणाऱ्यांच्या भरवशावर अवलंबून      राहिलात तर आयुष्यात अशी ठोकर बसेल की सांभाळण्याची संधीदेखील मिळणार नाही. म्हणून न्याय आणि सत्याच्या मार्गाने अंधश्रद्धेला न जुमानता चला, मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...