* राजलक्ष्मी त्रिपाठी

तुम्ही जेव्हा विवाह बंधनात बांधले जाता, तेव्हा जीवनात अनेक बदल होतात. आयुष्यात प्रेमासोबत जबाबदाऱ्यांचाही समावेश होतो. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनसाथीसह त्याच्या कुटुंबालाही मनापासून स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या आनंदाचा प्रवेश होतो.

पती-पत्नीचे संबंध अधिक संवेदनशील असतात. ज्यात प्रेम-माया आणि एकमेकांच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारण्याची भावना असते. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुमच्या संबंधांवर तुमच्या आई-वडिलांचा परस्पर संबंध कसा होता याचा कळत-नकळत परिणाम पडतो. सत्य तर हे आहे की तुमच्या व्यक्तित्वावर कुठे ना कुठे तुमच्या पालकांची छाप पडलेली असते. तसेच तुमच्या जीवनातील दृष्टीकोनांवर पालकांचा प्रभाव दिसून येतो.

अनेकदा नकळतपणे इच्छा नसतानाही तुम्ही तुमच्या पालकांकडून चूकीच्या सवयी शिकता, ज्यामुळे कळत-नकळतपणे तुमचे संबंध प्रभावित होतात.

जर तुमच्यामध्ये तुमच्या पालकांची अशी कोणती सवय असेल, ज्यामुळे जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये कटूता येत असेल तर ती सवय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कधी प्रेम तर कधी तक्रार

रिलेशनशीप काउन्सिलर डॉ. निशा खन्ना यांच्या मते, पती-पत्नीचे नाते संवेदनशील असते. ज्यात प्रेमासह तक्रारीदेखील असतात. पण ही तक्रार जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा दोघांच्या नातेसंबंधांमधील दरी वाढू लागते. खरं तर पती-पत्नी आपले संबंध अगदी तसेच बनवू पाहतात, जसे त्यांच्या आई-वडिलांचे होते. यामुळे दोघांच्यात संबंध दूरावू लागतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर आपली मते थोपू लागतात, त्यावेळी त्यांच्यातील प्रेम हळूहळू संपू लागते. मग ते शुल्लक गोष्टींवरून वाद घालू लागतात. सामान्यत: पत्नीची तक्रार असते की पती वेळ देऊ शकत नाही आणि पतीची तक्रार असते की ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर पत्नी किटकिट करते.

पती-पत्नीमधील ही सवय सामान्यपणे त्यांच्या पालकांकडून आलेली असते. जर तुमच्या पालकांना आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची सवय असेल तर तुमच्या नकळत ही सवय तुमच्यात येते. सुखी दांपत्य जीवनासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारलं पाहिजे. प्रयत्न करा की तुमच्या जीवनात अशा नकारात्मक गोष्टी येऊ नयेत, ज्या तुमच्या पालकांच्या जीवनात होत्या.

ज्या दांपत्यांच्या पालकांची सवय साथीदाराला गृहीत धरण्याची असेल तर त्यांची मुलेदेखील त्यांच्या साथीदारासोबत तशाच प्रकारचा व्यवहार करतात आणि तसेच संबंध प्रस्थापित करतात. अशाप्रकारचा विचार परस्पर संबंध कधीच फुलू देत नाहीत.

खरं तर पती-पत्नी एकमेकांचे पूरक असतात. जेव्हा दोघे एकत्र येऊन चालतात, तेव्हा जीवनाची गाडी सहजपणे पुढे जाते. पण जेव्हा दोघांमध्ये तणाव वाढतो, तेव्हा संबंधांची गाठ सुटण्यास वेळ लागत नाही. आपले नाते सहजपणे पुढे नेण्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला गृहीत धरण्याची चूक करू नका. त्याला आपला मित्र, जोडीदार समजून आपले सुख-दु:ख वाटून घ्या.

आपलंच म्हणणं खरं ठरवू नका

जर तुमच्या पालकांना आपले म्हणणे बरोबर म्हणण्याची सवय असेल तर नक्कीच तुमच्यातही हा गुण आला असेल. आपण आपला हा विचार बदलण्याची गरज आहे. आजकाल पती-पत्नी एकमेकांसह मिळून काम करत आहेत. घर-कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडत आहेत. अशावेळी दोघांची मते महत्त्वाची असतात. यात जर तुम्हाला तुमचेच म्हणणे खरं ठरवण्याची सवय असेल तर ही सवय सोडून आपल्या साथीदाराचे म्हणणे ऐका. प्रत्येकवेळी तुम्हीच बरोबर असलं पाहिजे असं नाही. तुमचा साथीदार जो विचार करतो, जे सांगतो तेही बरोबर असू शकतं.

सामायिक जबाबदारी

सामान्यपणे बऱ्याच जणांचे पालन पोषण अशा वातावरणात होते, जिथे पती पैसे कमावून आणतो आणि पत्नी घरातील जबाबदाऱ्या सांभाळते. म्हणजेच वडील आईकडे पैसे सोपवून जबाबदाऱ्यांतून मुक्त होतात. मात्र गरज पडल्यास आई ने साठवलेले पैसे कोणताही विचार न करता लगेच वडिलांना देते.

जर तुमचा असाच विचार असेल तर, यात बदल केला पाहिजे. जर, बदलत्या जगात पती-पत्नी दोघेही काम करतात, अशावेळी गरजेचे आहे की दोघांनीही आपले संबंध मजबूत बनवण्यासाठी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहयोग दिला पाहिजे. यावेळी पतीने हा विचार करता कामा नये की हे घरचे काम फक्त पत्नीचे आहे. तर पत्नीने हा विचार करता कामा नये की घरखर्च चालवणे फक्त पतीचे काम आहे.

बदलते जग

जीवनसाथीच्या संबंधांमधील दृढतेसाठी पारंपरिक जुन्या गोष्टींतून बाहेर पडणं गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुमची आई साडी नेसत होती, डोक्यावर पदर घेत होती तसंच तुमच्या पत्नीने करावं हे जरूरी नाही. तुमची आई मंदिरात जात असे, पूजा करत असे याचा अर्थ हा नाही की तुमची पत्नी असंच करेल. तिला तिच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य द्या. पत्नीलादेखील हे समजणं गरजेचं आहे की घरासंबंधित बाहेरच्या कामांची जबाबदारी फक्त पतीची नाही. हे गरजेचे नाही की तुमचे वडील बाहेरची सर्व कामे घरी बसून करतात तर तसंच तुमच्या पतीनेही करावं. बदलत्या जगानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या संबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होईल.

नको भांडण-तंटा

तुमचे पालक छोटया-छोटया गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालायचे म्हणजे तुम्हीदेखील तुमच्या साथीदाराशी प्रत्येक गोष्टीवरून वाद घालत राहावं असं नाही.

खरं तर, तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, जेणेकरून संबंध सुधारतील.

क्लालिटी लव्ह

जर तुमच्या मनात तुमच्या पालकांना पाहून काही विचारांनी घर केलं असेल की पालकत्व आल्यानंतर एकमेकांसोबत जवळीक साधणं चुकीचं आहे. तर तुम्ही हे विचार तुमच्या डोक्यातून बाहेर काढा.

सामान्यपणे आई बनल्यानंतर पत्नीचे पूर्ण लक्ष आपल्या बाळावर असते. ज्यामुळे बऱ्याचदा पती त्रासून जातो. पालक बनल्यानंतरही एकमेकांसोबत वेळ घालवा, फिरायला जा आणि छोटया गोष्टींमधून आपले प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमचे संबंध मजबूत राहतील. मुलांची जबाबदारी एकत्रितपणे घ्या. हा विचार नका करू की बाळाची जबाबदारी फक्त आईची आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

* जर तुमचे वडील तुमच्या आजोळच्या लोकांचा आदर करत नाहीत तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या पत्नीच्या कुटुंबाशी असा व्यवहार करावा. जर तुम्ही तुमच्या सासरच्यांना पूर्ण मान-सन्मान दिला तर पत्नीचं तुमच्याप्रति असलेलं प्रेम अधिक वाढेल आणि तीदेखील मनापासून तुमच्या कुटुंबाचा स्वीकार करेल आणि मान-सन्मान देईल.

* जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मोठ-मोठयाने ओरडण्याची सवय असेल तर ती सोडून द्या. घरात प्रेमपूर्ण वातावरणाची निर्मिती करा.

* कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे निभावली पाहिजे.

* आपल्या साथीदाराला संपूर्ण स्पेस द्या.

* जर कोणत्या गोष्टीवरून तुमचे मन दुखावले असेल तर मोठ-मोठयाने एकमेकांशी भांडून वाद वाढवण्यापेक्षा गप्प बसा.

* सुखी दांपत्य जीवनासाठी एकमेकांवर चुका थोपवण्यापेक्षा एकमेकांच्या चुकांचा स्वीकार करण्याची वृत्ती ठेवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...