* दीपान्विता राय बॅनर्जी

कॉलेजच्या दिवसांत सुभाष नेहाला नोट्स वगैरे देऊन तिची खूप मदत करायचा. त्यानंतर नेहाचे लग्न ठरले तरी तो बिनधास्त तिच्या घरी जायचा. तिचा भावी पती आणि सासरच्यांसमोरही कधीही तिला फोन करायचा. हे सर्वांना खटकू लागताच नेहाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुभाष रागावला आणि विनाकारण नेहावर भावनिक दबाव आणू लागला.

तिकडे नेहाच्या भावी पतिनेही नेहाला सुभाषसोबतचे नाते संपवण्यास सांगितले. नेहा दोन्ही बाजूंनी अडकली. शेवटी तिला सुभाषला कायमचे गुडबाय करावे लागले. साधी मैत्री ती का टिकवू शकली नाही, हे सुभाष समजू शकला नाही.

श्वेता आणि आकाश एकाच शाळेत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. लग्नानंतरही आकाशचे तिच्या घरी येणे-जाणे होते. सोशल मिडियावर श्वेताने प्रायव्हसी शेअर केल्याने आकाशची हिंमत वाढली.

श्वेताचा पती उदारमतवादी होता. पण त्याला वाटले की आपले घर तुटत आहे. त्यामुळे त्याने आकाशसोबतच्या श्वेताच्या मैत्रीवर निर्बंध घातले.

या दोन्ही घटनांमध्ये मदत करणाऱ्या आणि चांगल्या मित्राला गमवावे लागले, कारण त्यांना त्यांच्या सीमांचे भान ठेवता आले नाही.

आजची शिक्षणप्रणाली, धावपळीचे जीवन आणि विचारांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे स्त्री-पुरुषामधील मैत्री ही सामान्य गोष्ट आहे. मात्र ती टिकवताना काही खास गोष्टींवर लक्ष न ठेवल्यास हीच मैत्री दु:ख किंवा अपमानास कारणीभूत ठरते.

हे खरे आहे की आपण ज्या समाजात राहतो तो वैचारिकदृष्टया कितीही प्रगत झाला असला तरी त्याची दोरी अजूनही मध्ययुगीन अंधसंस्कारांच्या हातात आहे. या व्यवस्थेत स्त्रीच्या मर्यादा आधीपासून ठरवल्या आहेत. त्यामुळे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री निभावणे हे मोठे आव्हान आहे.

शाळा, कॉलेजमध्ये अशी मैत्री ग्रुपला सोडून दोघांमधील वैयक्तिक गाठीभेटीत अडकते, तेव्हा धोका वाढतो. ते वयच असे असते, ज्याला मुलेही काहीच करू शकत नाहीत. अशा प्रकारच्या स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत सोशल मिडियासुद्धा एक मोठे आव्हान आहे. शाळेच्या दिवसांत मिळालेला एकांत मुला-मुलीतील साध्या मैत्रीला धोकादायक वळणावर घेऊन जातो. आपसात समजूतदारपणा नसेल आणि मजामस्ती, फ्लर्टच्या सीमेचे लग्नानंतरही भान ठेवले नाही तर मैत्री भारी पडू शकते.

स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत स्पर्श आणि डोळे हे आव्हान आहे. त्याच्या चुकीच्या प्रयोगाने मैत्रीचा अर्थ बदलतो. अशा मैत्रिला रोमान्स आणि सेक्समध्ये बदलणे शक्य नसेल तर स्वत:वर नियंत्रण ठेवा किंवा अशा मैत्रीला गुडबाय करणेच चांगले.

आजकाल दृश्य माध्यमांत स्त्री-पुरुषातील मैत्री मीठ-मसाला लावून दाखवली जाते. याचा सर्वसामान्यांवर खोलवर परिणाम होतो. लोक स्त्री-पुरुषाच्या सामान्य मैत्रीवरही उलटसुलट प्रश्न करतात.

या सर्वांव्यतिरिक्त वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या विरुद्ध लिंगी व्यक्तिची मैत्री मोठे आव्हान असते. ही मैत्री निभावणे आणि वैवाहिक जीवनही आनंदी ठेवणे सर्वांसाठीच शक्य नसते.

आजही लॉजिक आणि उपयोगापेक्षा पूर्वापारच्या प्रथांनुसारच मत व्यक्त केले जाते. त्यामुळे अशाप्रकारच्या मैत्रीला गैरसंबंधांचेचे नाव दिले जाते. समाज आणि नातेवाईकांकडे दुर्लक्ष करून मैत्री निभावणे योग्य नाही. त्यामुळे पतिला सोबत घेऊनच पुढे जाणे, सत्य सांगणे हेच योग्य.

सोशल मिडियाचा गैरवापर

सोशल मिडियावर खासगी चॅटिंग खूपच धोकादायक आहे. जेव्हा दोघेही नादानपणे वागतात, तेव्हा चांगली मैत्री तुटण्याच्या मार्गावर असते.

नाते आकर्षणाचे

स्त्री-पुरुषामध्ये स्वाभाविक संबंध आकर्षण हा आहे. छोटीशी जरी चूक झाली तरी दोघांमध्ये शारीरिक, मानसिक आकर्षणाचे हार्मोन्स उत्तेजित होतात. ही चूक मैत्रीवरच प्रश्न उपस्थित करते.

डोळे बोलतात

डोळे बोलतात आणि स्पर्श मेलेल्यालाही जिवंत करतो. यामुळे स्त्री-पुरुषाच्या मैत्रीत डोळयांचे भाव अर्थाचा अनर्थ करू शकतात. स्पर्श भावनेत वाहवत जाण्यास भाग पाडतो. ही मैत्री रोमांसमध्ये बदलू शकत नसेल तर वेळीच सांभाळा. अशावेळी उपाय हाच आहे की त्याच्या कथित गोष्टीवर जास्त लक्ष देऊन टेंशन घेण्याऐवजी तुमचे हावभाव स्वच्छ ठेवा. शक्य असेल तर जवळच्या लोकांना मैत्रीची स्पष्ट कल्पना द्या.

लग्नानंतर आणि लग्नासोबतच भिन्न लिंगी व्यक्तिशी मैत्री चांगल्याप्रकारे टिकवण्याबाबत रिलेशनशिप प्रशिक्षक आणि लेखक रशेल डी आल्टो यांचे म्हणणे आहे की मैत्री रोमांसमध्ये बदलणे शक्य नसेल तर मैत्रीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच हे स्पष्ट करा. लग्न झाले असल्यास ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे.

वैवाहिक जीवन निभावतानाच विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री कशी टिकवाल :

* तुम्ही पती असाल किंवा पत्नी, विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री करायचीच असेल तर मित्र असा हवा, जो तुमचे वैवाहिक संबंध अधिक मजबूत करू शकेल. जसे की तुमची मैत्रीण किंवा तुमचा मित्र तुमच्या पत्नी किंवा पतिचा चांगला मित्र बनून त्याला योग्य सल्ला देण्यास लायक असेल. त्याच्यात एवढा समजूतदारपणा हवा की तो दाम्पत्याच्या नात्याला महत्त्व देईल आणि स्वत:चे नाते तुमच्या नात्यावर ओझे होऊ देणार नाही.

* लग्न संबंध कायम ठेवणे केवळ स्वत:साठीच नाही तर मुलांचे सुरक्षित भविष्य आणि सामाजिक हितासाठीही गरजेचे आहे. अशा वेळी पती किंवा पत्नीला आपल्या जोडीदाराच्या विरुद्ध लिंगी व्यक्तिशी मैत्री आवडत नसेल आणि लाखो प्रयत्नांनंतरही जोडीदार समजून घ्यायला तयार नसेल तर वैवाहिक जीवनालाच महत्त्व द्या.

* वैवाहिक नात्यात राहून विरुद्ध लिंगी व्यक्तिच्या मैत्रीबाबत असूया महत्वाची गोष्ट आहे, जी पती किंवा पत्नीला जोडीदाराच्या मित्राबाबत वाटू शकते किंवा मित्राला आपल्या मित्राच्या पती किंवा पत्नीबाबत. अशा वेळी पती किंवा पत्नीच्या रूपात आपली परिस्थिती अतिशय तणावपूर्ण होते.

* लग्नानंतर अशा विरुद्ध लिंगी मैत्रीत स्पर्श, द्विअर्थी बोलणे, भावनात्मक मागणी आणि फ्लर्ट वगैरे यापासून सांभाळा. मैत्री सहज, सरळ आणि निखळ ठेवा. तुमच्या मित्राकडून चुकीचा संकेत मिळाल्यास हे तुमचे कर्तव्य आहे की ते वेळीच रोखा. तुमची बाजू स्पष्टपणे मांडा.

लग्नासोबतच विरुद्ध लिंगी मैत्री टिकवण्यात खूप आव्हाने असतात. प्रत्यक्षात लग्न असो किंवा मैत्रीची माळ, दोन्ही भावना आणि त्यागाच्या छोटया छोटया मोत्यांनी बनते. यातील काही मोती निखळले तर नाती सांभाळणे कठीण होते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...