कथा * अर्चना पाटील

वैदेही फार्मसीच्या लास्ट इअरला होती. मोहिते कुटुंबातील एकदमच शांत मुलगी होती ती. घरी कोणी पाहुणे आले तर पाण्याचा ग्लास देण्यासाठीही ती कधी हॉलमध्ये येत नसे. विचारल्याशिवाय कधी कोणाशी बोलणार नाही, शिस्तीत वागणे, अभ्यासात हुशार, दिसायला देखणी त्यामुळे तिच्यासाठी उत्तम स्थळ भेटणार याची सगळयांनाच खात्री होती. घरात आजी आजोबा, लहान बहीण अक्षरा आठवीला, वडील नितिनरावांचे किराणामालाचे दुकान आणि सोज्वळ आई मालिनीताई असं सुंदर कुटुंब होतं वैदेहीचं.

‘‘अगं ए मालिनी, आठ वाजले, नाश्ता देतेस का नाही की उपाशी मारतेस म्हातारीला?’’

‘‘हो, हो आणते. आम्हाला कशी मेली कामं करून भुक लागत नाही आणि यांनाच मात्र खाटेवर बसुन बसुन भुका लागतात. दोन मुलं जन्माला घातलीत तर दोघांकडे रहायचंना. मीच एकटीने ठेका घेतला आहे का या म्हातारा म्हातारीचा.’’

‘‘पुरे कर हं आई, काय सकाळी सकाळीच चालू होऊन जातं तुमचं दोघींचं.’’

‘‘सुनबाई, चहा ठेव. वामनकाका आले आहेत.’’

‘‘बारा वाजेपर्यंत चार कप चहा पिऊन जाईल हा म्हातारा. कधी सासुरवास संपेल माझी, काय माहिती. संपूर्ण आयुष्य निघून गेलं यांचं करण्यात.’’

‘‘सुनबाई आणते ना चहा.’’

‘‘आली हो आबा.’’

आजीआजोबांमुळे आईची होणारी सतत चिडचिड पाहून वैदेहीला तर वाटत असे की लग्नच करू नये. आपण शिकलेलो आहोत. स्वत: कमवावं आणि खावं. का म्हणून लग्न करून परक्या कुटुंबात मोलकरणीसारखं रहावं? वैदेही संध्याकाळी कॉलेज करून घरी आली. आईबाबा हॉलमध्येच बसले होते.

‘‘का हो, चला ना, आपण चारपाच दिवस कुठेतरी फिरून येऊ. आता मुलंही मोठी झाली आहेत.’’

‘‘मालिनी, मी तुला सांगितले आहे पैसे घे आणि तुझ्या मुलांना घेऊन कुठेही फिरायला जा. आईबाबांना सोडून मी बाहेरगावी येऊ शकत नाही.’’

‘‘हो ना ,नेहमीप्रमाणेच कारणं सांगा तुम्ही. तुमच्या लहान भावाकडे पाठवून द्या की त्यांना पाच दिवस.’’

‘‘मी असं करणार नाही आणि यावर वाद नको ’’ असं म्हणत हातातला पेपर फेकत नितिनराव घरातून बाहेर निघून गेले. मालिनीताई नेहमीप्रमाणे किचनमध्ये डोळयात पाणी आणून रडू लागल्या.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...