कथा * दीपा थोरात

‘‘ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा...’’ बैठकीच्याखोलीतून विवेकनं हाक मारली.

रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली, ‘‘मला आत नीट ऐकायला आलं नाही, काय म्हणताय?’’

‘‘अगं, ती विम्याच्या फायलींची सूटकेस हवी आहे.’’ विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्या पाठोपाठ ऐकायला आल्या. ‘‘बघ, बघ, तुला तुझा मित्र बोलावतोय...शिट्या वाजवतोय...’’ विवेकनं हसून मस्करी केली.

‘‘भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं कामं संपेनात अन् तुम्ही मध्येच हाक मारता.’’

‘‘अगं, हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलीसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल.’’

‘‘खरंच? मग कुठं तरी फिरायला जाऊयात का?’’ खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं.

‘‘आणि ऋचालीच्या लग्नाचं काय?’’ विवेकनं विचारलं.

‘‘अजून लहान आहे ती. दोन तीन वर्षं तरी अजून तिचं लग्न नाही करणार.’’

‘‘पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे दोन तीन वर्षांत लेकाचंही लग्न करावंच लागेल ना? आता पोरांची लग्नं की आपला दुसरा हनीमून तूच ठरव.’’ ब्रीफकेस उघडून फायलींमधले कागद बघत विवेकनं म्हटलं.

रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात, वर्षांमागून वर्षं सरतात. रीमाच्या लग्नाला पंचवीस वर्षं झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती. साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात, जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्नं सोनेरी होतं. पण त्यावर विद्रुप डागही होते.

शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरा व्हायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला पाच वर्षं झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, बालवाडीचं सर्टिफिकेट अन् ऋचा अन् रोहन अशी दोन बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू, सासरे, दोघं दीर, दोन जावा, त्यांची चार मुलं अन् एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी चौदा माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य, भाज्या मिळायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेंशन अन् तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट कामं उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचा उरक, शिक्षण, येणाऱ्यांशी चांगलं वागणं, बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धिनं, रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं, बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनंही ते समजून घेतलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...