* शशी पुरवार
जेव्हा एखादे तरुण जोडपे एकटे राहाते आणि त्यांना मुलं नसतात, तेव्हा ते दवाखान्याच्या फेऱ्या मारत राहातात आणि तेव्हा सासूचे टोमणे ऐकावे लागत नसतानाही आयुष्यात तणाव निर्माण होतो. आज जीवन जगण्याचा अर्थच बदलला आहे. तरुण जोडप्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे जीवन जगायला आवडते. मौजमजा आणि स्वत:ची वेगळी जीवनशैली, सोबतच कोणतेही कौटुंबिक बंधन नाही, कोणत्याही जबाबदाऱ्या नाहीत आणि कोणाचाही हस्तक्षेप नाही. नोकरदार जोडपी त्यांच्या कुटुंबांपासून वेगळे राहाते, त्यांच्या स्वत:च्या मर्जीनुसार, स्वत:चे जग तयार करते.
आजकाल, लवकर मुलं होण्याचा ट्रेंड संपला आहे. लग्नानंतर, त्यांना काही वर्षे जबाबदाऱ्या स्वीकारायला आवडत नाहीत. ते त्यांच्या करिअर आणि मौजमजेत इतके मग्न होतात की, कधीकधी परिस्थितीकडे दुर्लक्ष करणे त्यांच्यासाठी नुकसानदायक ठरते, कारण करिअरमुळे वय वाढल्यानंतर लग्न होणे आणि मुलं न होणे, ही आजच्या काळात एक खूप गंभीर समस्या बनली आहे. एकटे राहाणाऱ्या आणि मुलं नसणाऱ्या तरुण जोडप्यांमध्ये तणाव वाढू लागतो. त्यांच्यासाठी या तणावातून जाणे खूप आव्हानात्मक असते. याचा थेट परिणाम कौटुंबिक नातेसंबंधांवर होतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे नवे अनुभव आणि समन्वयाचा अभाव यामुळे पती-पत्नीमधील नात्यात कटुता निर्माण होत आहे. लग्नानंतर संगीता आणि प्रवीण त्यांचे आयुष्य मोकळेपणाने जगत होते. मौजमजा, खाणे, रात्री उशिरापर्यंत पार्टी करणे, हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता. काही काळानंतर, जेव्हा त्यांच्या मित्रांना मुलं झाली तेव्हा त्यांनी त्यांना भेटणे बंद केले.
जेव्हा मित्र त्यांच्या कौटुंबिक जीवनात व्यस्त झाले, तेव्हा दोघांनीही स्वत:चे कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी होऊ शकले नाहीत. जसे ते सांगतात की, वेळ कोणासाठीही थांबत नाही. दोघांनाही समजले की खूप उशीर झाला असावा, त्यामुळे परस्पर सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि संपूर्ण तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना औषधांसोबत महिन्याभरासाठी सूचना आणि पथ्य दिले, त्यामुळे त्यांच्या आशा जागवल्या. दोघांनीही सकारात्मक उर्जेने प्रयत्न करायला सुरुवात केली, पण त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.





