* गरिमा पंकज

आज रंजनाला कार्यालयात बॉसचा ओरडा मिळाला होता. गेल्या काही दिवसापासून तिची मुलगी आजारी होती त्यामुळे ऑफिसमध्ये कामावर पूर्ण लक्ष देऊ शकत नव्हती. तर दुसरीकडे तिचं तिच्या सर्वात खास मैत्रीणीशीदेखील एका गोष्टीवरून भांडण झालं होतं. त्यामुळे घरी परततेवेळीदेखील तिचं मन खूपच अस्वस्थ होतं. तिच्या मनात येत होतं की घरी पोहोचताच कोणीतरी गरमागरम चहा द्यायला हवा म्हणजे डोकेदुखी थोडी कमी होईल. परंतु तिला माहीत होतं की असं कधीच होऊ शकत नाही. मुलीची तब्येत खराब आहे आणि मुलगासुद्धा अजून खूपच लहान आहे. पती तर रात्री ९ वाजण्यापूर्वी घरी येतच नाहीत.

थोडी वैतागतच ती घरात घुसली तेव्हा मुलाने तिच्याकडे चॉकलेटची मागणी करत मिठी मारली. रंजना त्याच्याकडे दुर्लक्ष करून खाली बसली, तेव्हा तो रडू लागला. यावर रंजनाला खूपच राग आला. तिने मुलाला एक लगावून दिली. मुलगा जोरजोरात रडू लागला. आता तर रंजनाचं डोकं अजूनच दुखायला लागलं. कसबसं मुलाला गप्प बसून ती स्वयंपाकघरात आली आणि स्वत:साठी चहा केला. नंतर जेवणाची तयारी करू लागली. जेवण बनविण्यात तिचं अजिबात मन लागत नव्हतं, तेव्हा तिने सकाळचीच भाजी आणि पराठे बनवून मुलांना जेवायला वाढलं. जेव्हा पती घरी परतले तेव्हा सकाळचंच जेवण पाहून तेदेखील वैतागले. रात्री एका छोटया गोष्टीवरून दोघांचे भांडण झालं आणि रंजना रडत रडत झोपी गेली.

तणावात राहू नकाखरंतर रंजना आपल्या ऑफिसचा तणाव घरी घेऊन आली होती, ज्यामुळे तिला घरातदेखील आनंद मिळू शकला नाही. एवढेच नाही तर घरातील दुसऱ्या सदस्यांनादेखील तिच्या तणावाचा त्रास भोगावा लागला. कार्यालयातील तणाव घरी आणल्यामुळे घराची शांती भंग होते. ज्या अन्नासाठी आपण पैसा कमवतो जर तोच तणाव त्या अन्नाला वाया घालवत असेल तर कमविण्याचा काय फायदा? तुम्ही जे अन्न खाता तसाच तुमचा स्वभाव बनतो. खाण्यामुळेच तुम्ही कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकता आणि अन्नच तुम्हाला निरोगी आणि मजबूत बनवतं. मग या खाण्याबाबत एवढे बेपर्वा होऊन कसे चालेल?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...