* दीप्ती अंगरीश
प्रत्येक पालकांची अशी इच्छा असते की त्यांच्या मुलाने तो स्तर गाठला पाहिजे,
जो त्यांनी साध्य केला नाही. कधीकधी यासाठी मुलांवर अतिरिक्त दबावदेखील
निर्माण केला जातो. आजकाल टीव्हीवरील सर्व प्रकारचे रिअॅलिटी शो मुलांशी
संबंधित देखील आहेत. या बद्दलही पालक आपल्या मुलांबद्दल अधिक जागरूक
होत आहेत. प्रत्येकजण आपल्या मुलास एक सुपर किड बनवू इच्छित आहे. मूलं
जसजसे मोठे होत जाते तसतसे ते आपल्या सभोवतालच्या वातावरणावरून
शिकत जाते. प्रथम कुटुंबातून, नंतर मित्रांकडून किंवा मग टीव्ही कार्यक्रमांमधून.
सृष्टीचे वय अंदाजे ८ वर्षे आहे. ती शाळेत जाते. शाळेतून परत येईपर्यंत तिचे
संगीत शिक्षक घरी येतात. त्यानंतर तिला शिकवणी वर्गात जावे लागते, तेथून
परत येईपर्यंत पोहण्याच्या वर्गात जाण्याची वेळ होते. संध्याकाळी नृत्य वर्ग
असतात. तेथून परत आल्यावर गृहपाठ पूर्ण करायचा असतो. तोपर्यंत तिला
जांभई येऊ लागते. जेव्हा ती डुलक्या देऊ लागते तेव्हा तिला आईची ओरड
ऐकावी लागते.
आता आपणच विचार करा की एक लहानसा जीव आणि इतके अधिक ओझे. या
धावपळीच्या दरम्यान ना तर निरागस बालपणाला आपल्या स्वत:च्या इच्छेने
पंख पसरायला वेळ आहे आणि ना थकल्यावर आराम करण्याची वेळ आहे.अशी
दिनचर्या आजकाल प्रत्येक त्या मुलाची आहे, ज्याचे पालक त्याला सर्वकाही
बनवू इच्छित आहेत. आजकाल पालकांनी कळत-नकळत आपली अपूर्ण स्वप्ने

आणि इच्छा, निरागस मुलांच्या क्षमतेचे आणि आवडी-निवडींचे आकलन न
करता त्यांच्यावर लादल्या आहेत. प्रत्येक पालकांची केवळ एकच इच्छा असते
की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिस्थितीत त्यांचे मूल अव्वल यावे. त्याचे मूल
अष्टपैलू असावे. इतर मुलांपेक्षा अधिक हुशार असावे. सुपर हिरोंप्रमाणेच त्यांचे
मूलही एक सुपर किड असावे.
दिल्लीचे ज्येष्ठ अधिवक्ता सरफराज ए सिद्दीकी यांचे म्हणणे आहे की
पालकांच्या या महत्त्वाकांक्षेचा बोजा निष्पापांना नैराश्याकडे नेत आहे. गुणांच्या
खेळामध्ये अव्वल असणे ही त्यांची विवशता बनली आहे. हेच कारण आहे की
दरवर्षी परीक्षेचा निकाल येतो तेव्हा आपल्याला मुलांच्या आत्महत्येच्या दु:खद
बातम्या वाचायला मिळतात. असे करू नये. प्रत्येक पालकांनी असा विचार केला
पाहिजे की प्रत्येक मुल प्रत्येक क्षेत्रात अव्वल असू शकत नाही.
पालक मुलांची खूप काळजी घेतात. पण परिणाम काहीही नाही. तर मग
कमतरता कुठे आहे? सत्य तर हे देखील आहे की टीव्हीवरील मुलांच्या रियलिटी
शोने निष्पाप मुलांच्या जीवनात क्रांती घडविली आहे.
त्यांची प्रतिभा सिद्ध करण्याच्या या धडपडीच्या नावाखाली पालकांनी आपले
नाव जगभरात प्रसिद्ध करण्याचे एक साधन म्हणून त्यांना समजले आहे.
त्यांना अष्टपैलू बनवण्याच्या खेळामध्ये बालपणातील निर्मळता आणि उत्स्फूर्तता
हरवली आहे. मुले नैसर्गिकरित्या खूप काल्पनिक असतात हे सांगण्याची गरज
नाही.
समाजशास्त्रज्ञ डॉ. राकेश कुमार म्हणतात की मुलांना ज्या क्षेत्रात रस आहे
त्यात त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. मुलांना
कौशल्यानुसार आणि क्षमतेनुसार स्वत:ला सुधारण्यासाठी, त्यासाठी सर्वतोपरी
प्रयत्न करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांद्वारेच त्यांना मार्गदर्शन केले जाऊ शकते,
मुलांचे मन समजून घेतले पाहिजे, अशा प्रकारे त्यांना सहकार्य आणि पाठींबा

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...