* पूनम अहमद

फेसर सुमित्रा यांच्या घरी उत्साहपूर्ण वातावरण होतं. ३ महिन्यांपूर्वी बुक करण्यात आलेली नवीन ऑडी आज घरी येणार होती. पंडितजींनी कार घरी आणण्याचा मुहूर्त आजचा काढला होता. त्यांचे पती डॉक्टर चंद्रभूषण जे शहरातील प्रसिद्ध चिकित्सक आहेत, त्यांनी आज आल्या नर्सिंग होममध्ये जाऊन महत्वपूर्ण ऑपरेशन्सची जबाबदारी अन्य डॉक्टरांना सोपवली होती; कारण त्यांनी पूजेला बसणं जरुरी होतं. एमडी करणारा आणि इंजिनीअर असलेला चिराग मयंक यांनी आज सुट्टी घेतली होती, पंडिजींची पूजा बऱ्याच वेळापासून सुरू होती.

मुलं गाडी घेऊन आली तेव्हा पंडिजींनी कारला फुलांचा हार घातला, गोल प्रदक्षिणा घालत अनेकदा लाल टिळा लावला, प्रत्येक चाकावर पाणी शिंपडून, मग रस्त्यावर कारसमोर नारळ फोडला. कित्येक मंत्रोच्चार केले जे कुणालाच कळले नाहीत. सर्वांची नावं उच्चारून गाडीच्या चहूबाजूंनी प्रदक्षिणा घालत मंत्र पुटपुटले. त्यानंतर सर्वजण त्यांच्या पाय पडले.

पौराणिक मानसिकता

पंडिजींनी आधीच अंदाजे ५० लाखांच्या ऑडीच्या हिशेबाने ५ हजारांच्या शुभदानाचे संकेत दिले होते. गरीब रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या डॉक्टर चंद्रभूषणला कुणा पंडिताला कारच्या पूजेसाठी इतकी दक्षिणा देणं तितकंसं चुकीचं वाटलं नाही.

प्रश्न असा निर्माण होतो की उच्चशिक्षित कुटुंबही आधुनिक तंत्रज्ञानाची कार खरेदी करून पूजा मात्र पुराण काळातील का करतात? मंत्र, जप, पूजापाठ, कारचालकांचं आणि त्यात बसणाऱ्यांचं संरक्षण करतात का? जर कुणी सीटबेल्ट बांधत नसेल, सुरक्षेच्या कायद्याचं पालन करत नसेल. मद्यपान करून गाडी चालवत असेल, नटबोल्टची माहिती बाळगत नसेल, अशावेळी पंडितजींचे हे मंत्र त्यांचा जीव वाचवणार आहेत का? रोज रस्त्यावर इतक्या दुर्घटना घडतात, काही क्षणात अॅक्सिडण्ट्मध्ये गाड्यांचा चक्काचूर होऊन जातो. त्या कारचीही पूजा केलेलीच असते ना, मग?

आपण आधुनिक विज्ञानाच्या नवनवीन पद्धती पाहून इतक्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन आनंदित होतो परंतु मानसिकरित्या आपण कदाचित पुराण काळातच जगत आहोत, जिथे पंडित-मौलवींनी सांगितलेले कर्मकांड, दानदक्षिणा वगैरे आपला पिच्छा सोडत नाहीत वा असं म्हणता येईल की आपल्यालाच त्या त्यागायच्या नाहीत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...