* पूजा

पावसाची रिमझिम, ओल्या मातीचा मृदगंध आणि हिरवेगार गवत डोळयांचे पारणे फेडते आणि मनाला मोहून घेते. पण यासोबतच रस्त्यांवर खड्डयांमध्ये साचलेले पाणी चिखल आणि घाण आजारांनासुद्धा आमंत्रण देत असते. अशावेळी घर स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते, कारण घर एक अशी जागा आहे, जिथे आपण सर्वात जास्त वेळ घालवतो आणि सहज बॅक्टेरियांच्या संपर्कात येऊन आजारी पडू शकतो, जर तुम्ही या ऋतूत आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून पावसाचा पुरेपूर आनंद उपभोगू पाहात असाल तर या स्वच्छतेच्या टिप्सवर अवश्य लक्ष ठेवा :

अँटीबॅक्टेरिअल टाईल्स

घराला बॅक्टेरियापासून दूर ठेवायचे असेल तर अँटीबॅक्टेरियल टाईल्स लावून घ्या. या टाईल्स अँटीबॅक्टेरिअल टक्नोलॉजी वापरून बनवलेल्या असतात. या टाईल्स किटाणू नष्ट करतात व तुम्हाला किटाणूमुक्त वातावरण देतात.

जोडे बाहेर काढा

रस्त्यांवर असलेले चिखल शूज आणि चपलांवर लागून घरात येतात म्हणजे नकळत तुम्ही घाण आणि बॅक्टेरियासुद्धा आपल्यासोबत घेऊन येता. म्हणून हेच बरे की आपला शू रॅक घराच्या बाहेर ठेवा आणि तिथेच जोडे काढा आणि घाला. असे केल्याने घर अगदी साफ आणि किटाणूमुक्त राहील.

व्हेंटिलेशन अत्यंत आवश्यक

घरात असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यात व्हेंटीलेशन खूप महत्वाची भूमिका बजावते. घरात असलेल्या आर्द्रतेपासून दूर राहण्यासाठी योग्य व्हेंटीलेटर वा ह्युमिडीफायरमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा वातावरण निरभ्र असेल तेव्हा घराच्या खिडक्या उघडया ठेवा. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ द्या. असे केल्याने घरात किटाणूंची वाढ होणार नाही.

योग्य पडद्यांची निवड करा

वर्षा ऋतूत वजनदार आणि जाड पडद्यांची निवड चुकूनही करू नका, कारण या ऋतूत पडदे धुणे आणि नंतर सुकवणे अतिश वैतागवाणे असते. याशिवाय जाड पडदे लावल्याने खोलीत दमटपणाचा स्तर वाढतो, त्यामुळे पावसाळयात हलके आणि पारदर्शक पडदे वापरा, कारण हे लावल्याने जसा खोलीत आपला खाजगीपणा कायम राहतो तसाच सूर्यप्रकाशही सहज येतो. या पडद्यांमुळे खोलीत अतिशय हलकेपणा जाणवतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...