* गरिमा पंकज

बदलत्या काळानुसार लोकांच्या फॅशन आणि लाइफस्टाइल म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल तर झालाच, पण हा बदल नातेसंबंधातही होताना दिसत आहेत. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. त्यांची विचारसरणी, शैली, पेहराव, जीवनशैली आणि राहणीमानातून त्यांच्यातील हे नावीन्य दिसून येते. पण, खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रेम आणि रिलेंशनशिप म्हणजेच नातेसंबंधांच्या पद्धतीही बदलल्या आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलगा, मुलगी किंवा पुरुष आणि स्त्री यांच्यात प्रेमाचा अर्थ वेगळा होता. नात्याची सुरुवात बोलण्यातून होत असे. त्यानंतर, मैत्री होणे, एकमेकांबद्दल आकर्षण आणि ओढ वाटणे, त्यानंतर फिरायला जाणे आणि प्रेमात पडणे, ही एक अतिशय नैसर्गिक आणि भावनिक गोष्ट होती. त्यानंतर दोघं लग्नाचं स्वप्नं पाहायचे आणि संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे वचन द्यायचे. मग आई-वडिलांची ओळख करून देण्याची धडपड सुरू व्हायची. तो काळ असा होता जेव्हा लोक प्रेमासाठी काहीही करायला तयार असत आणि नाती भावनांनी विणलेली होती.

पण, आजच्या डिजिटल युगात सगळेच बदलू लागले आहे. वेगवान आधुनिक पिढीला सर्वकाही बदलण्याची आणि काहीतरी नवीन निवडण्याची सवय आहे. मोठया उत्साहाने विकत घेतलेला मोबाइल एक-दीड वर्षातच नकोसा वाटू लागतो. त्याला बाजूला ठेवून नवीन मोबाइल घेण्याची स्पर्धा सुरू होते. अशाच प्रकारे त्यांना नातीही बदलत राहण्याची सवय लागली आहे. आयुष्यभर एकच नातं कोण वाहून नेणार? कोणास ठाऊक, उद्या तुम्हाला आणखी सुंदर मुलगी भेटू शकते, उद्या तुम्हाला कोणीतरी अधिक शांत, श्रीमंत आणि हुशार मुलगा आवडेल. या कारणामुळेच आजची युवा पिढी नात्यातील कमिटमेंट म्हणजेच समर्पण टाळू लागली आहे.

रोमांचक अनुभव

लोकांना सर्वकाही झटपट हवे आहे आणि जेव्हा त्यांचे मन भरते तेव्हा ते लगेचच स्क्रोल करतात आणि पुढे जातात. डिजिटल युगामुळे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे एकाच्या शोधात वेळ वाया घालवला जात नाही. त्यामुळेच आज रिलेशनशिपच्या ट्रेंडमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज तरुणाईच्या नात्यात बांधिलकीचा अभाव दिसून येतो. त्यांनी सिच्युएशनशिप म्हणजे परिस्थितीजन्य बदल, या संकल्पनेचा अवलंब सुरू केला आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...