* मंजुळा वाधवा

काल संध्याकाळी ती शेजारी नविता गुप्ताला भेटायला गेली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि त्रागा असल्याचे स्पष्ट दिसत होते. विचारल्यावर केविलवाणे म्हणाली, ‘‘निकिता (तिची १३ वर्षांची मुलगी) गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी हरवल्यासारखी, उदास राहते. पूर्वीसारखी ती किलबिलाट करत नाही, किंवा ती मैत्रिणींसमवेत फिरत नाही. विचारल्यावर कोणतेही योग्य उत्तर देत नाही.’’

आजकाल बहुतेक माता आपल्या किशोरवयीन मुलांविषयी काळजीत असतात की ते मित्रांसोबत तासन्तास गप्पा मारतील, इंटरनेटवर चॅटिंग करत वेळ घालवतील. पण आम्ही विचारल्यावर काही नाही आई म्हणत गप्प बसतील. मला चांगले आठवते, माझ्या महाविद्यालयीन काळात माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रिण होती. आईच चांगले-वाईटाचे ज्ञान करून देत असे आणि माझ्या मैत्रिणी घरी आल्या की आई त्यांच्यातदेखील खूप मिसळत असे व प्रत्येक विषयावर त्यांच्याशी गप्पा मारत असे. म्हणूनच आजच्या पिढीने त्यांच्या पालकांशी केलेला व्यवहार पाहून मला खूप आश्चर्य वाटते.

कारण काय आहे

सत्याच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी मी काही किशोरवयीन मुला-मुलींशी चर्चा केली. १४ वर्षांची नेहा पटकन म्हणाली, ‘‘आंटी, मम्मी एक काम तर खूप चांगल्या प्रकारे करते आणि ते म्हणजे सारखे टोकणे. हे करू नकोस, तिथे जाऊ नकोस, स्वयंपाकघरातील काम शिक.’’

१० वीत शिकणारी स्वाती आपल्या आईचा पूर्णपणे आदर करते, पण आईबरोबर सर्व गोष्टी सामायिक करायला तिला आवडत नाही. १७ वर्षाच्या शैलीला या गोष्टीचे दु:ख आहे की आईने तिच्या भावाला रात्री ९ वाजेपर्यंत घरी येण्याची सूट देऊन ठेवली आहे, परंतु मला म्हणेल की मुलगी आहेस, वेळेवर घरी येत जावे. कुठे अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस वैगरे.

या सर्व किशोरवयीन मुलींशी बोलल्यानंतर हे स्पष्ट झाले की किशोरवयीन मुले खेळण्यास, चित्रपट पाहण्यास, गप्पा मारण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी भले मित्र शोधत असतील, परंतु जेव्हा त्यांच्यासमोर कुठल्या प्रकारची समस्या येते तेव्हा ते निसंकोच ज्या प्रकारे त्यांच्या आईकडे जाऊ शकतात, त्याप्रकारे वडील, बहीण, भाऊ किंवा जवळच्या मित्राकडे जात नाहीत. अशा परिस्थितीत आई हीच त्यांची मार्गदर्शक असते आणि उत्तम मित्रही.

तर मग बहुतेक किशोरवयीन मुले-मुली त्यांच्या आईशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्यास का असमर्थ आहेत? सत्य हे आहे की या प्रभावी अवस्थेत आजची मुले असे मानत असतात की आजच्या परिस्थितीनुसार त्यांना सर्व काही माहित आहे आणि त्यांच्या माता काहीच जाणत नाहीत.

१५ वर्षीय ऋतू सांगतो, ‘‘मम्मी काळानुसार चालण्यासाठी तयारच नाही. छान कपडे घालून कॉलेजला जाणे, मित्रांशी फोनवर जास्त वेळ बोलणे, एखाद्या फिल्मला किंवा रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत महिन्यातून किमान एकदा तरी जाणे, काळानुसार चालण्यासाठी किती महत्वाचे आहे हे सर्व मम्मीला कळत नाही.’’

आई-वडिलांचीही चूक

प्रामाणिकपणे बघितले तर आजच्या वेगवान गतीच्या आयुष्यात पालक कीर्ती, प्रतिष्ठा पूर्ण करण्याच्या शर्यतीत पळत तर आहेत, परंतु त्यांच्या मुलांच्या मनामध्ये संस्कार रुजवण्याऐवजी पैशाची प्राथमिकता आणि वयाच्या आधी प्रौढता निर्माण करीत आहेत. पूर्वी मुले संयुक्त कुटुंबात वाढायचे, प्रत्येक गोष्ट भावंडांसह शेयर करायचे. आज एकटया कुटुंबात १ किंवा २ मुले असतात. आईचा मुलांवर सर्वाधिक परिणाम होत असतो. नि:संदेह पूर्वीच्या तुलनेत आई आणि मुलांमधील ओढ वाढली आहे. पूर्वीपेक्षा अधिक प्रखरताही आली आहे. आजच्या किशोरांना त्यांच्या आईंनी त्यांना समजून घ्यावे, त्यांच्या गरजा समजून घ्याव्यात अशी त्यांची नक्कीच इच्छा असते, परंतु मातांनासुद्धा त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात हे समजण्यास ते तयार नसतात.

मानसशास्त्रज्ञ स्नेहा शर्मा यांच्या मते, ‘‘आजच्या पिढीने मालकी हक्क गाजविण्याच्या वातावरणात डोळे उघडले आहेत. आजची मुले जेव्हा आपल्या आईला हे सांगतात की तुला कसे तयार होऊन, कोणता ड्रेस घालून आमच्या शाळेत यायचे आहे तेव्हा आपल्या पालकांवर मुलांचा किती दबाव आहे हे आपण समजू शकता.’’

शाळेतील शिक्षिका निर्मला एक उदाहरण देत म्हणतात, ‘‘माझ्या शाळेत, इयत्ता १२ वीची विद्यार्थीनी दररोज १५-२० मिनिटे उशिराने शाळेत येत असे. तिचे पालक तिच्या उशीरा येण्याचे समर्थन करत म्हणत असत की ती थोडी उशीराने आली तर काय झाले? जेव्हा पालक स्वत:च शिस्तीचे महत्त्व विसरले असतील, तेव्हा ते मुलीला कोणती शिस्त शिकवतील? चांगल्या संगोपनाचा अर्थ चांगले खाणे-पिणे आणि दिसणे राहून गेले आहे. मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजवणे आता चांगल्या संगोपनाचा भाग राहिले नाहीत.’’

त्यांचेही काही ऐका

दोन्ही पालक कार्यरत असल्या कारणामुळे मुलांच्या विचारसरणीवर परिणाम झाला आहे. नोकरी करणारे पालक अधूनमधून मुलांना मोठे झाल्याची जाणीव करून देतात. साहजिकच मुलेही मोठयांप्रमाणे वागू लागतात. अशा परिस्थितीत मुलांच्या बालपणाबरोबरच बालिशपणाचे भोळे-भाबडेपणदेखील हरवले गेले आहे आणि त्यामुळे उपग्रहाच्या जगामध्ये पतित लैंगिक संबंध अजूनच मारधाडीचे रूप घेऊन चुकले आहेत. आई-वडिलांना मुलांच्या माध्यमातून त्यांची मोडलेली स्वप्न वा आकांक्षा पूर्ण करायची असते. अशा परिस्थितीत हे आवश्यक नाही काय की पालकांनी आपल्या मुलांना हवे ते द्यावे परंतु त्याचबरोबर त्यांनी आपला मौल्यवान वेळही दिला पाहिजे.

माझी सखी शर्बरीचा मुलगा संध्याकाळ होताच कार्टून चैनल लावून बसायचा. ऑफिसमधून घरी आल्यावर शर्बरीला तिची आवडती टीव्ही मालिका बघायला आवडत असे. जेव्हा तिने धाकदपटशा करण्याऐवजी प्रेमळपणे मुलाला समजावून सांगितले तेव्हा मला ते आवडले, ‘‘मुला, दररोज संध्याकाळी आधी माझ्या आवडीची मालिका बघत जाऊ आणि नंतर तुझे कार्टून चॅनेल.’’

अशा प्रकारे, प्रेमाने समजावून सांगितलेली गोष्ट मुलाने समजून घेतली आणि आई त्याची सर्वात चांगली मित्र बनली.

दुसरीकडे सुनीताने आपल्या मुलांशी सोयीचे नाते राखले आहे. स्वत: मिनीला ‘सिली’, ‘स्टुपिड’ यासारख्या विशेषणांनी बोलवते आणि मग मुलांच्या तोंडातून जेव्हा तेच शब्द बाहेर येतात तेव्हा त्यांना फटकारते. आधी सुनीताने स्वत:च्या भाषेवर नियंत्रण ठेवले असते तर बरे झाले असते.

या उपग्रहाच्या युगात बहुतेक वेळा पाहण्यात येते की जेव्हा प्रत्येक चॅनेल उघडपणे सेक्स संबंधित गोष्टी / जाहिराती पुरवीत आहेत, तरीही माता तारुण्याच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या आपल्या मुलींना लैंगिक संबंधाविषयी आरोग्यदायी माहिती देत नाहीत. वरून त्याविषयाचे एखादे मासिक किंवा पुस्तक त्यांनी वाचल्याबद्दल त्यांना फटकारते, अशा परिस्थितीत हे चांगले होईल की मातांनी त्यांचे कर्तव्य समजून घ्यावे. किशोरवयीन मुलींना योग्य प्रकारे संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून त्या त्यांच्या आईंवर पूर्ण विश्वास करू शकतील आणि विकृत मार्गावर जाणार नाहीत.

मुलांशी मैत्रीपूर्ण वागणूक, त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ भलेही तो गुणवत्तेचा वेळ खूप कमी असेल, त्यांना आपल्याशी त्यांच्या नात्याचे महत्त्व समजावून सांगेल आणि तेव्हा आपण स्वत: आपल्या प्रिय मुलांचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक व्हाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...