* प्राची भारद्वाज

भारतीय समाजात सुरूवातीपासूनच काही स्त्रियांवर निरनिराळी बंधने लादली जातात. त्यांना तरूणांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले जाते. कुटुंबामध्ये, मग ते उच्चवर्गीय असो किंवा मध्यमवर्गीय, शिक्षित असो किंवा कमी शिकलेले, मुलीच्या जन्मावर एवढा आनंद साजरा होत नाही जेवढा मुलाचा जन्म झाल्यावर होतो. मुलगा झाल्यावर पूर्ण परिसरात नातेवाईकांना मिठाई वाटली जाते. कित्येक दिवस उत्साहाचे वातावरण असते. मुलगा झाला हे शुभ लक्षण आहे म्हणून ब्राम्हण भोजन केले जाते. मुलाच्या हाताने स्पर्श करून मंदिरांमध्ये दान दिले जाते. नामकरण ते मुंजीपर्यंत सर्व समारंभ अगदी थाटामाटात साजरे केले जातात.

मुलीला मात्र सुरूवातीपासूनच हे सांगून दबाव टाकला जातो की तू तर मुलगी आहेस, तू घरात बैस. स्वयंपाक पाणी कर हेच सासरी उपयोगी पडेल. जास्त उडण्याची गरज नाही.

त्यांची इच्छाही विचारली जात नाही. लग्नाआधी त्यांना नवऱ्यामुलाकडे पाहूही दिले जात नाही. उलट ही ताकीद दिली जाते की तूला परतून यायचे नाही. सासर घरूनच आता तुझी तिरडी निघेल आणि यातच सगळ्यांचे भले आहे. अशा कडक शिस्तीत मुलींचे संगोपन होते, तर मुलांना मात्र मोकळीक असते की कुठेही जावे कधीही घरी यावे.

काळ बदलला, सोबतच समाजाच्या बऱ्याचशा मान्यताही बदलल्या आहेत. आज मुली कॉलेजला जात आहेत. नोकऱ्या करत आहेत. फॅशनेबल कपडेही घालत आहेत. पण तरीही इतके सर्व असूनही कुठेना कुठे मुलांच्या तुलनेत तरी त्यांना ती सूट कमीच आहे. त्यांना आजही कमकुवत समजले जाते. मुलगी उशीरा घरी परतत असेल तर घरच्यांची काळजी वाढते. आईवडिल ताबडतोब तिच्या मैत्रिणींना फोनाफोनी करतात आणि जोपर्यंत ती घरी येत नाही तोवर ते स्वस्थ बसत नाहीत.

रोजच वृत्तपत्रात मुलींवर झालेल्या बलात्काराच्या बातम्या छापून येतात. त्यांच्या अगतिकपणावर कुठलीही दया न दाखवता समाज कानाडोळा करतो आणि मुले त्यांचा हेतू साध्य करून निघून जातात. सर्व दोष मुलीला दिला जातो की फॅशनेबल कपडे घातले का असेच होणार, यात मुलांचा काय दोष म्हणजे मुलांना जसे सर्व काही करायचे लायसेंन्सच मिळाले आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...