* गरिमा पंकज

भारतात घटस्फोटाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. १० वर्षांपूर्वी एक हजार लोकांमध्ये एक व्यक्ती घटस्फोट घेत होती, तिथे आता ती संख्या हजारावर १३पेक्षा जास्त झाली आहे. घटस्फोटांसाठी अर्ज पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येने दाखल होत आहेत. विशेषत: मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौसारख्या मोठया शहरात हा ट्रेंड जास्त पाहायला मिळत आहे. या शहरांमध्ये केवळ पाच वर्षांत घटस्फोटाचे अर्ज फाइल करण्याच्या प्रकरणांत तिप्पटीने वाढ नोंदविण्यात आली.

२०१४मध्ये घटस्फोटाच्या ११,६६७ केस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१०मध्ये ही संख्या ५,२४८ होती. अशा प्रकारे २०१४मध्ये लखनौ आणि दिल्लीमध्ये क्रमश: ८,३४७ आणि २,००० केसेस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१० मध्ये ही संख्या क्रमश: २,३८८ आणि ९०० होती.

घटस्फोटांच्या प्रकरणांची वाढणारी संख्या आणि दाम्पत्यांमध्ये वाढत्या मतभेदाचे कारण काय आहे, नाते का टिकत नाहीत, अशी काय कारणे आहेत, जी नात्यांचे आयुष्य संपवितात?

या संदर्भात अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ आणि विवाह तज्ज्ञ जॉन गॉटमॅनने ४० वर्षांचा अभ्यास आणि अनुभवांच्या आधारावर निष्कर्ष काढलाय की मुख्य रूपाने अशी चार कारणे आहेत, ज्यामुळे दाम्पत्यामध्ये संवादहिनतेची स्थिती निर्माण होऊ लागते. या स्थितीच्या चार वर्षांत त्यांचा घटस्फोट होतो.

टीकात्मक वागणे : तसे तर कधी ना कधी सर्वच एकमेकांवर टीका करतात. अर्थात, पतिपत्नीमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. मात्र समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा टीका करण्याची पद्धत एवढी वाईट असते की समोरच्याच्या मनालाच जखमा होतात. कोणत्याही परिस्थितीत एकजण दुसऱ्याला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर आरोपांवर आरोप केले जातात. अशा वेळी पतिपत्नी एकमेकांपासून एवढे दूर निघून जातात की तिथून परतणे शक्य नसते.

घृणा : जेव्हा आपल्या मनात जोडीदाराबाबत घृणा आणि तिरस्काराच्या भावना निर्माण होऊ लागतात, तेव्हा समजून जा की हे नाते जास्त दिवस टिकणार नाही. घृणा व्यक्त करताना टोमणे मारणे, नक्कल करणे, एकेरी बोलणे यासारख्या अनेक गोष्टी सामील असतात. ज्यामुळे समोरच्याला महत्त्वहिन वाटते. अशा प्रकारचे वागणे नात्याच्या मुळावरच घाव घालते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...