* गरिमा पंकज

लग्नानंतर सृष्टीची पहिलीच दिवाळी होती. तिचे सासूसासरे आणि दिर जाऊ जवळच दुसऱ्या फ्लाटमध्ये राहत असत. सृष्टीचे पती मनीष यांना कंपनीतर्फे वेगळा फ्लॅट मिळाला होता. त्यात दोघे पतिपत्नी एकटे राहत असत. सृष्टीही नोकरी करत असल्याने घराला दिवसभर कुलुप असे.

ऑफिसमध्ये दिवाळीची सुट्टी एकच दिवस होती पण सृष्टीने २ दिवस सुट्टी घेतली होती. तिला तिची दिवाळी अविस्मरणीय बनवायची होती. दिवाळीच्या दिवशी मनीषला महत्त्वाच्या मिटींगसाठी बाहेर जावे लागले. मिटींग लांबली. परतताना सायंकाळ झाली. मनीषने सृष्टीला फोन केला तर तिने उचलला नाही. घरी परतताना मनीष विचार करत होता की आज नक्कीच सृष्टी त्याला टोमणे देईल किंवा मग निराश तरी झालेली असेल.

गोधंळाच्या मन:स्थितित त्याने बेल दाबली. दरवाजा उघडला, पण आत अंधार होता. तो क्षणात एकदम घाबरला आणि जोरात ओरडला, ‘‘सृष्टी, कुठे आहेस गं, आय एम सॉरी.’’

तितक्यात अचानक सृष्टी आली आणि त्याला बिलगून हळूच म्हणाली, ‘‘आय लव यू डिअर, हॅप्पी हॅप्पी दिवाली.’’

तितक्यात दोघांवरही फुलांची बरसात होऊ लागली. पूर्ण खोलीत रंगबेरंगी मेणबत्ती जळू लागल्या आणि मनमोहक संगुधाने वातावरण भरून गेले. समोर खूपच आकर्षक आणि सांजश्रृंगार केलेली सृष्टी उभी राहून हसत होती. मनीषने पटकन् तिला उचलून कवेत घेतले. सर्व घर व्यवस्थित सजवलेले होते. टेबलावर खूप मिठाया आणि फायरक्रॅकर्स ठेवले होते. सृष्टी हळूच हसत होती.

दोघांनी १-२ तास आतषबाजीची मजा लुटली. तोपर्यंत मनीषचे आईवडिल, भाऊवहिनी आणि त्यांची मुलेही आली. सृष्टीने सर्वांना आधीच आमंत्रित केले होते. पूर्ण कुटुंबाने एकत्रित दिवाळी साजरी केली. मनीष आणि सृष्टीसाठी ही दिवाळी आयुष्यभारासाठी संस्मरणीय ठरली होती.

मनंही प्रकाशाने उजळू दे

याला म्हणतात दिवाळीचा आनंद ज्यामुळे घरासोबतच मनंही उजळून निघतात. लग्नानंतरच्या दिवाळीचं विशेष महत्त्व असते. जर हा दिवस भांडणं, वादावादी किंवा तणावात घालवलात तर समजा तुम्ही मौल्यवान क्षण वाया घालवले. आयुष्य आनंद साजरे करण्याचेच नाव आहे, तर मग दिवाळीसारख्या विविधरंगी आणि प्रकाशाच्या क्षणाने आपले तनमन का बरे उजळू नये?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...