- सुधा जुगरान

जर काही कारणास्तव तरूण मंडळी आपला भावी जोडीदार स्वत: शोधू शकले नाहीत किंवा ते शोधू इच्छित नसतील आणि आपल्या आईवडिलांच्या मदतीनेच विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल तर आजच्या काळात पालकांसाठी आपल्या मुलाचे लग्न लावून देणे अवघड होत चालले आहे.

स्थळासंबंधी कोणत्याही एका मुद्यावर पालक आणि मुलांचे एकमत होणे सोपे नाही. तिथेही जनरेशन गॅप स्पष्टपणे दिसू लागला आहे आणि बहुतांश तरुण लव्ह मॅरेज करू लागल्याने अरेंज्ड मॅरेजसाठी विवाहयोग्य मुलामुलींचा जणू दुष्काळ पडू लागला आहे. शिवाय मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात राहात असतील तर लग्नाच्या स्थळाबाबत त्यांच्याशी बोलणे कठीण नव्हे तर अशक्य होते.

उच्च शिक्षित गृहिणी असलेल्या सुधा थपलियाल सांगतात की मुलीसाठी स्थळे येतात, पण फोनवर तिच्याशी याबाबत चर्चा करायची इच्छा असते तेव्हा सकाळी ती घाईत असते, संध्याकाळी दमलेली असते आणि सुटीच्या दिवशी विश्रांतीच्या मूडमध्ये असते. लग्नाबाबत चर्चा करू तर ती कोणाशी करू.

सावी शर्मा यादेखील एक उच्चशिक्षित गृहिणी आहेत. त्यांनी सांगितले की मी मुलाचे अरेंज्ड मॅरेज केले, पण मला फारसा त्रास झाला नाही, कारण मुलाने सर्व माझ्यावर सोपविले होते. त्यामुळे जी स्थळे मला योग्य वाटली त्याच मुलींशी त्याची भेट घडवून आणली आणि त्यातीलच एका ठिकाणी लग्न ठरले.

पालकांचा त्रास मुलांनी समजून घ्यावा

आजकाल अरेंज्ड मॅरेज ठरवताना पालकांसमोरील सर्वात मोठा पेच हा आहे की मुलांच्या अवास्तव अपेक्षांना जमिनीवर आणणे, जे अशक्य आहे. सोबतच कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमी पाहता योग्य ताळमेळ जुळेल अशी स्थळे शोधणे, कारण ती शोधताना मुले कमी सहकार्य करतात.

अनेक तरुण विचार तर खूप करतात, पण लग्नाचं सर्व खापर पालकांच्या माथी फोडतात, जसे की पालकांनी सुरुवातीलाच त्यांच्या अवास्तव अपेक्षांची जाणीव करून द्यायला हवी होती, त्यांनी ते केले नाही ही त्यांची चूक आहे. पण तरुणांनी हे समजून घेतले पाहिजे की अवास्तव अपेक्षा पूर्ण होत नाहीत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...