* प्रतिनिधी

  • मी ३० वर्षीय अविवाहित तरुणी आहे. लहानपणापासूनच माझ्याबरोबरच घरात ३ मोठे भाऊ आहेत. मी एकुलती एक छोटी बहीण होते. त्यामुळे भावांची लाडकी असायला हवे होते, पण लाड तर दूरच राहिले, कोणी माझ्याशी सरळ तोंडी बोलतही नसे. आई सतत आजारी राहात असे. त्यामुळे अभ्यासाबरोबर मी घरातील कामही करू लागले. एवढे करूनही माझा मधला भाऊ कुणास ठाऊक का, माझा द्वेष करत असे. नेहमी भांडण आणि मारझोड करीत असे. एकदा त्याने गळा दाबून मला ठार मारण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी आईने मधे पडून मला कसेतरी वाचवले.

माझा भाऊ बहुतेक त्याच्या बेरोजगारीमुळे तणावात राहात असे. इतर कोणावरही त्याची जोरजबरदस्ती चालत नसे. त्यामुळे तो बघावे तेव्हा मला मारझोड करीत असे. कोणीही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला नाही आणि एके दिवशी त्याने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर आईची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागली आणि मग तिचाही मृत्यू झाला. मोठया भावाने लग्न केले. मला वाटले, वहिनी घरात असल्याने आईच्या मृत्यूनंतर घरात आलेले औदासिन्य दूर होईल. मलाही घरातील कामात थोडी मदत मिळेल. माझ्या जीवनात थोडे सुख येईल, पण स्थिती अजून वाईट झाली. वहिनी घरातील कुठल्याही कामाला हात लावत नसे. माझे काम अजून वाढले. ती येताच तिने माझ्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. माझी शाळा तर आईच्या मृत्यूनंतर सुटली होती. मला शिक्षणाची आवड होती. म्हणून मी प्रायव्हेट परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन केले.

मला लग्न करायचे नाहीए. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे, परंतु दोन्ही भाऊ यासाठी परवानगी देत नाहीत. छोटा भाऊ मारहाण करतो आणि सांगतो की लग्न करायचे नसेल, तर घरातून चालती हो. या घरात राहण्याचा तुला काहीही अधिकार नाही. घरावर त्या दोघांचा हक्क आहे.

अनेक वेळा वाटते की विष घेऊन स्वत:चे आयुष्य संपवून टाकावे. लहानपणापासून आतापर्यंत मी केवळ दु:खच पाहात आले आहे. कधीही कोणाकडूनही प्रेमाचे दोन शब्द ऐकायला मिळाले नाहीत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...