आल्याच्या मदतीने कंबर आणि मांडीची चरबी कमी करा

* गृहशोभिका टीम

आल्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि माणसाला निरोगी ठेवण्यासाठी आले खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे. तुम्हाला डाळींची चव वाढवायची असेल किंवा थंडीच्या वातावरणात चहामध्ये उबदारपणा आणायचा असेल, आले खूप प्रभावी आहे. याशिवाय खोकला आणि कफ यांमध्ये हे खूप फायदेशीर आहे.

या बातमीत आम्‍ही तुम्‍हाला अद्रकाच्‍या सेवनाने वजन कसे कमी करू शकाल ते सांगणार आहोत. याशिवाय, तुम्ही हिप्स, कंबर आणि मांड्यांवर जमा झालेली चरबी जाळण्यासाठी याचा वापर करू शकता.

ही रेसिपी कशी बनवायची

१.५ लिटर पाण्यात आल्याचे ३ ते ४ तुकडे टाका. यानंतर मंद आचेवर उकळा. सुमारे 15 मिनिटे पाणी उकळल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्या. आता या पाण्याचे सेवन केल्याने तुमचे वजन कमी होईल.

आले फायदेशीर आहे

आम्ही तुम्हाला सांगतो की आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे सांधेदुखी आणि सूज यापासून आराम मिळतो. संधिवात आणि ऑस्टियोआर्थरायटिस यांसारख्या आजारांवर हे अत्यंत प्रभावी आहे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर

आल्यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करते. आम्ही तुम्हाला सांगतो की कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. आल्याचे पाणी प्यायल्याने सीरम आणि यकृतातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. याशिवाय रक्तदाबही सामान्य राहतो.

हिवाळ्यात फिट राहण्यासाठी या टिप्स फॉलो करा

* मोनिका अग्रवाल एम

या ऋतूत व्यायामाकडे थोडे लक्ष दिल्यास आरोग्याच्या किरकोळ समस्याही टाळता येतात. परंतु जर तुम्हाला हृदयाची समस्या असेल तर तुम्हाला अतिरिक्त संरक्षणाची गरज आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले आरोग्य हवे असेल तर हा ऋतू सर्वोत्तम आहे. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी टिप्स –

  1. भरपूर पाणी प्या

लांब फिरायला जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्या, यामुळे खूप थंडी असली तरीही शरीरातील हवा श्वसनमार्गापर्यंत पोहोचेपर्यंत गरम राहते. गरम श्वासामध्ये भरपूर आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता असते. शारीरिक हालचालींसोबत जड श्वास घेतल्याने शरीरातून जास्त प्रमाणात उष्णता बाहेर पडते त्यामुळे श्वसनमार्ग कोरडा पडतो. कोरड्या हवेच्या मार्गामुळे श्वास घेण्यास आणि व्यायाम करण्यास त्रास होतो. कोरड्या हवेच्या मार्गाची समस्या टाळण्यासाठी चालण्याआधी पाणी पिणे हा एक चांगला उपाय आहे.

  1. गरम पेये टाळा

गरम पेये किंवा अल्कोहोल घेतल्यावर बाहेर पडू नका. यामुळे आपल्या रक्तवाहिन्या शिथिल होतात आणि त्वचेतून उष्णता बाहेर पडू लागते.

  1. तुमच्या शरीराला थोडी विश्रांती द्या

व्यायामामुळे शरीरातून सामान्य स्थितीपेक्षा दहापट जास्त उष्णता बाहेर पडते. कठोर परिश्रम केल्याने वातावरणात उष्णता पसरते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या स्नायूंचा विस्तार होतो आणि हृदयावरही दबाव पडतो, त्यामुळे हिवाळ्यात अतिव्यायाम करणे टाळावे.

  1. हिवाळ्यात जलक्रीडा टाळा

थंडीच्या मोसमात थंड स्विमिंग पूलमध्ये पोहणे टाळा. पाणी हे उष्णतेचे उत्तम वाहक आहे. यामुळे खूप उष्णता बाहेर पडते आणि ही उष्णता पुन्हा निर्माण होण्यासाठी आपल्या शरीराला थोडा वेळ लागतो.

  1. थंड वारे टाळा

थंड वाऱ्यात चालण्याने एनजाइनाचा धोका वाढतो. जर तुम्ही जोरदार वाऱ्यात चालत असाल तर सावकाश चाला. हळू चालण्याने तुमच्या आरोग्याला जलद चालण्यासारखेच फायदे मिळतील. चालल्यानंतर थोडा वेळ थांबून घराच्या आत जावे म्हणजे अंगाला घाम येतो.

  1. खबरदारी घेणे आवश्यक आहे

1- व्यायामाला जाण्यापूर्वी एक कप गरम चहा किंवा गरम दूध प्या

२- व्यायामासाठी असे कपडे वापरा जे सैल आणि शरीराला फिट असतील.

३- व्यायाम केल्यानंतर किमान ३० मिनिटांनी आंघोळ करा.

4- व्यायामानंतर लगेच कपडे बदलू नका, उघड्या ठिकाणी जाऊ नका.

मासिकपाळी कुप्रथांवर प्रश्नचिन्ह

* प्रेम बजाज

मासिकपाळी प्रजनन क्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे, ज्यामध्ये गर्भाशयातून रक्त योनीतून बाहेर पडतं. ही प्रक्रिया मुलींमध्ये जवळजवळ ११ ते १४ वर्षे वयापासून सुरू होते. ही नैसर्गिक प्रक्रिया तिला समाजात स्त्रीचा दर्जा देते.

मासिकपाळी मुलींसाठी एक अद्वितीय घटना आहे, जी जुन्या दंतकथांनी घेरलेली आहे आणि समाजाचे ठेकेदार मासिकपाळीतून जाणाऱ्या स्त्रिया व मुलींच्या आयुष्याचे सामाजिक व सांस्कृतिक पैलूतून बाहेर करतात, खरंतर याचवेळी त्यांना देखभालीची अधिक गरज असते. इजिप्त आणि ग्रीकच्या तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे की दर महिन्याला स्त्रीमध्ये सेक्षू अल डिझायरचं वादळ निर्माण होतं.

जेव्हा हे डिझायर पूर्ण होत नाही तेव्हा शरीरातून रक्त वाहतं आणि यालाच मासिकपाळी म्हटलं जातं. मासिकपाळीपूर्वी स्त्रीच्या मूडमध्ये बदल होतो. कधी कधी चिडचिडेपणा आणि शरीरातील कोणत्याही भागात असंख्य वेदना होतात. हे गरजेचं नाही की सर्व स्त्रियांसोबत असंच होतं. काही सामान्य तर काहींना असहनीय वेदना होतात. काहींचं म्हणणं आहे की हे सेक्सच्या वंचणेमुळे होतं. यामुळे आजदेखील काही लोकं मुलींना सांगतात की लग्नानंतर सर्व वेदना ठीक होतील.

विचित्र तर्क

भारतामध्ये याचा उल्लेख वर्जीत राहिला कारण हिंदू संस्कृतीनुसार याच्या मागे एक कथा प्रचलित आहे, ज्यामध्ये इंद्रदेवताकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. ज्याच्या पापाचा चौथा भाग स्त्रियांना देण्यात आला.

तर यामुळे त्यांना मासिकपाळी येते आणि यामध्ये त्यांना अपवित्र समजलं जातं म्हणून त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची मनाई केली जाते. तसंच दुसरं कारण हे मानलं जातं की हिंदू देवी देवतांचे मंत्र संस्कृतमध्ये आहेत. जे वाचण्यासाठी एकाग्रतेची गरज असते आणि मासिकपाळीमध्ये असहनीय वेदना झाल्यामुळे एकाग्रता होत नाही.

खरंतर हे ढोंग प्रत्येकवेळी स्त्रियांना याची जाणीव देण्यासाठी केलं जातं की त्या पापी आहेत आणि जोपर्यंत दानपुण्य धनाबरोबरच शरीराने देखील करतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल. या ढोंगीनी शारीरिक नैसर्गिक प्रक्रियेचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर केला आहे.

मासिकपाळीशी संबंधित जवळजवळ प्रत्येक जुनी गोष्ट बिनबुडाची आहे. मासिकपाळीमध्ये शहरी भागात मंदिर वा प्रामुख्याने गावामध्ये स्वयंपाक घरात जाण्यासदेखील मनाई आहे. त्याचं मुख्य कारण हे सांगितलं जातं की मासिकपाळीच्यावेळी शरीरातून खास गंध निघतो. ज्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना लोणचं इत्यादीला हात लावण्यासदेखील मनाई केली जाते. तर वैज्ञानिक परीक्षणमध्ये असं काहीच आढळलं नाही. यावेळी मंदिरामध्ये प्रवेश आणि यौन संबंध ठेवण्यास मनाई केली जाते.

बिनबुडाच्या गोष्टी

स्वामीनारायण संप्रदायने त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे की स्त्रियांनी या दिवसात या नियमांचे पालन का करायला हवं. त्यानुसार स्त्रिया अत्याधिक शारीरिक श्रम करतात ज्यामुळे त्या थकतात आणि या दिवसात त्यांच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो. त्यांना आराम मिळावा या हेतूने त्यांना वेगळं ठेवलं जातं. परंतु याचा अर्थ असा झाला की त्या घरातील सर्वात घाणेरडया खोलीत पडून राहाव्यात. मासिकपाळी एक शारीरिक प्रक्रिया आहे, जर हेच रक्त शरीराच्या आतमध्ये वाहिल्यास ती स्त्री पवित्र असते तर ते रक्त बाहेर आल्यास अपवित्र कशी? या सर्व गोष्टी बिनबुडाच्या आहेत.

मासिकपाळीच्या दरम्यान स्त्रियांची अवस्था ना रुग्णांसारखी होते, ना आपण त्यांच्यावर दया दाखवायला हवी. हे असं आहे जसं की प्रत्येक व्यक्ती रात्रीपर्यंत थकून झोपू इच्छिते. मासिकपाळी स्त्रियांच्या परीपूर्णतेची ओळख आहे.

असं ठेवा अन्न ताजं

* पारुल भटनागर

मुलांची शाळा असो वा कॉलेज लंच पॅक करण्याबद्दल असो वा मग पतींचा टिफिन तयार करणं वा पिकनिक वा ट्रॅव्हलिंगसाठी अन्न पॅक करण्याबद्दल असो, नेहमी आपल्या डोक्यात सर्वप्रथम नाव अल्युमिनियम फॉईलचच येतं कारण हे अन्नाला दीर्घकाळ गरम ठेवण्याबरोबरच ते ताज ठेवण्याचे देखील काम करतं. म्हणून तर टिफिनमध्ये खाणं पॅक करण्यासाठी प्रत्येक आई व प्रत्येक घराची पसंत बनला आहे. तुम्हाला फॉईल प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात पाहायला मिळेलच.

चला तर जाणून घेऊया अॅल्युमिनियम फाईलमध्ये अन्न पॅक करतेवेळी आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी :

कसं काम करतं

जसं की नावावरूनच समजतं की अॅल्युमिनियम फाईल अॅल्युमिनियमने बनलेलं असतं. ज्यामध्ये परावर्तक गुण असण्यामुळे याच्या आतमध्ये ऑक्सिजन, मॉइश्चर आणि बॅक्टेरिया पोहोचू शकत नाही, ज्यामुळे अन्न दीर्घकाळापर्यंत गरम ताजं व त्याचा आरोमा कायम राखण्यात मदत मिळते. अल्युमिनियम फॉईलमध्ये एका बाजूला मॅट फिनिशची साईड असते आणि दुसऱ्या बाजूला शायनिंगचं, जे पाहताच आपण समजू शकतो की मॅट फिनिशची बाजू आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि शायनिंगची बाजू बाहेरच्या दिशेने. कारण खाण्याची हिट रिप्लेट होऊन लॉक होते आणि जर लाईट याच्यावर पडला तरी देखील रिप्लेट होऊन बाहेरच राहतो आणि खाण्याला आतून कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही.

काय आहे त्याचे फायदे

लाँगलास्टिंग : याच्या लाँगलास्टिंग प्रॉपर्टीज याला खास बनवतात. कारण यामध्ये बॅक्टेरिया व मॉइश्चर एंटर प्रवेश करू शकत नाही. ज्यामुळे अन्न सुरक्षित व दीर्घकाळपर्यंत अन्नाची क्वॉलिटी व फ्रेशनेस एकसारखं बनवून राहतं. म्हणून तर टिफिन पॅक करण्यात अॅल्युमिनियम फॉईल प्रत्येक घराची पसंत बनली आहे.

सॉफ्ट : यामध्ये अन्न सॉफ्ट ठेवणाऱ्या प्रॉपर्टीज दीर्घकाळापर्यंत अन्नाला सॉफ्ट बनविण्यात मदत करतात. म्हणून तर अनेक घरांमध्ये अॅल्युमिनियम फाईल शिवाय खाणं पॅकिंग करण्याची कल्पनादेखील करू शकत नाही.

पॉकेट फ्रेंडली : हे इतर प्रकारच्या पॅकेजिंगच्यापेक्षा स्वस्त आहे. सोबतच हे कॅरी करणं अधिक सहजसोपं होतं. फक्त यामध्ये खाणं पॅक केलं आणि तुम्ही सहजपणे ते कॅरी करून कुठेही घेऊन जाऊ शकता.

जेव्हा कराल फॉईलचा वापर

जर तुम्ही अन्न पॅक करण्यासाठी अॅल्युमिनियम फाईलचा योग्य वापर करत नसाल, तर ते तुमच्या अन्नाला गरम व फ्रेश ठेवणार नाही आणि सोबतच यामुळे तुम्हाला अनेक त्रासांचादेखील सामना करावा लागेल. यासाठी याच्या वापरापूर्वी या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे :

* आज प्रत्येकाची लाईफ स्टाईल खूपच व्यस्त झाली आहे. अशावेळी आपण नेहमी धावपळ व कायम घाईतच असतो. ज्यामुळे अनेकदा आपण टिफिन पॅक करतेवेळी फाईलमध्ये गरम अन्न पॅक करतो, परंतु तुम्हाला माहित आहे का की फॉईल पेपरमध्ये कधीसुद्धा खूप गरम अन्न पॅक करता कामा नये. कारण त्यामुळे अॅल्युमिनियम फाईल लवकर वितळून तुमच्या अन्नामध्ये मिसळतं. जे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. म्हणून थोडं थांबून यामध्ये खाणं स्टोअर करणं योग्य असतं.

* बाजारात तुम्हाला अनेक अल्युमिनियम फॉईल पेपर मिळतील परंतु नेहमी फूड स्टोरेज करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं फाईल पेपर वापरायला हवं.

* अॅल्युमिनियम फॉईलमध्ये विटामिन सीने पुरेपूर अॅसिडिक गोष्टी ठेवू नका कारण हे अॅल्युमिनियमसोबत रिअॅक्ट करून ऑक्सिडाईज होतं. यामुळे गोष्टी लवकर खराब होण्यासोबतच आरोग्यासाठीदेखील अजिबात योग्य नसतं. म्हणून या गोष्टी फॉईलमध्ये ठेवू नका आणि योग्य प्रकारे अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करून अन्न ताजं व गरम ठेवा.

तर लग्नात राहाल फिट अँड फाईन

* रवी शोरी नीना

काही अपवाद वगळंता प्रत्येक तरुण वा तरुणीला आपल्या आयुष्यात वर वा नववधू बनण्याची संधी फक्त एकदाच मिळते. यावेळी अनेक तरूणांना वरूण धवन वा आदित्य धरप्रमाणे स्मार्ट आणि तरुणीना यामी गौतमप्रमाणे सुंदर दिसावंस वाटतं.

लग्नाच्यावेळी लग्नाच्या आयोजनाची सर्व जबाबदारी तर कुटुंबीयांचीच असते. वर वधूना तर फक्त लग्नाच्यावेळी स्वत:साठी पेहराव निवडून जवळच्या मित्रमैत्रिनींना या कार्यक्रमात येण्यासाठी आमंत्रण देणं आणि स्वत:च्या फिटनेसबद्दल विचार करणं एवढंच काम असतं.

या क्षणी अनेक तरुण-तरुणी स्वत:ला सजविण्यासाठी फिटनेस मिळवण्याच्या मागे लागतात. फिटनेससाठी या दिवसात ते खूप मेहनत करतात.

संतुलित आहार आणि नियमित व्यायाम

स्वराजचं लग्न ठरलं होतं परंतु त्याचं लग्न दोन महिन्यानंतर होणार होतं. या अल्पावधीतच स्वराजला स्वत:च्या शरीरामध्ये अशी सुधारणा आणायची होती की लोकं त्याच्या सासरच्यांना म्हणाली पाहिजेत की मुलगा तुम्ही सुशिक्षित निवडलातच परंतु तो सुंदरदेखील आहे.

आपल्यांकडून आणि दुसऱ्यांकडून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक करण्यासाठी स्वराजने जिम जॉईन केली. तिथे तो भरपूर घाम गाळत होता.

स्वराजला जेव्हा तू या सर्वाचा अगोदर का विचार केला नाहीस, लग्नाच्या वेळेसचं फिट बॉडी बनवण्याची कशी आठवण आली? यावर तो म्हणाला, ‘‘मला माझा मित्र गौतमच्या लग्नातली घटना आठवते. माझ्या मित्राच्या सप्तपदीच्यावेळी त्याची होणारी पत्नी प्रियाच्या अनेक मैत्रिणी कुजबुजत होत्या की प्रियाच्या कुटुंबीयांनी मुलाचं फक्त पद आणि कुटुंबच पाहिलं आहे. हा मुलगा तर प्रियाच्या जोडीदारापेक्षा काकाच जास्त दिसतोय. प्रियाच्या कुटुंबीयांनी चांगला मुलगा बघितला असता तर बरं झालं असतं. ही जोडी तर अजिबात छान दिसत नाही आहे.

‘‘म्हणून मला आणि माझ्या पत्नीबाबत कोणीही अजिबात म्हणू नये की ही जोडी अजिबात चांगली दिसत नाही आहे. हे मला अजिबात ऐकायचं नव्हतं. मला खात्री आहे की माझ्या लग्नापूर्वी फिजिकली मी असा फिटनेस मिळविन की लोकं म्हणतील की अरे व्वा! किती छान जोडा आहे. जेवढी मुलगी सुंदर आहे, तेवढाच मुलगादेखील सुंदर आहे.’’

केवळ तरुणच नाही तर लग्नापूर्वी अनेक तरुणीदेखील उत्तम शरीरसंपदा मिळविण्यासाठी भरपूर मेहनत करतात.

स्मृती व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे. तिच्या कामामुळे तिला तासन्तास एका जागी बसून काम करावं लागतं म्हणून ती थोडी ओवरवेट झाली आहे.

स्मृतीला वाटतं की लग्नानंतर हनिमूनला जातेवेळी तिच्या वजनामुळे कोणी तिच्या पार्टनरची ताई वा काकी समजू नये. म्हणून ती लग्नपूर्वीच नियमितपणे जिमला जाते आणि यामुळे ती खूप आनंदीत आहे की समतोल आहार आणि नियमित व्यायामामुळे आता ती पूर्वीपेक्षा कमी वयाची आणि ताजीतवानीदेखील दिसते.

जिम जॉईन करण्याची गरज का?

या प्रश्नावरती मधूचं म्हणणं आहे की ‘‘प्रत्येक तरुणीचा बॉडी शेप वेगवेळा असतो. एखादी तरुणी आपली ब्रेस्ट शेप तर एखादी तिच्या थाईज आणि हीप्सचे प्रॉब्लेम्स घेऊन येते. या प्रॉब्लेमचं उत्तर केवळ नियंत्रित आहार, डायटिंग व स्वत: आपल्या मर्जीने व्यायाम केल्याने होऊ शकत नाही. मी ज्या जिममध्ये जाते तिथेदेखील लेडीज इन्स्ट्रक्टर आहेत, सोबतच डायटेशनदेखील. इन्स्ट्रक्टरच्या मदतीने हेवी भागामध्ये मला चांगलं काम करायचं आहे, तिथे डायटिंगशियनच्या मदतीने संतुलित आहार व पौष्टिक आहार घेण्याचं गायडन्सदेखील मिळतं.’’

रत्नाजवळ जिममध्ये जाण्यात, शरीर संवर्धनासाठी वेळ नव्हता तेव्हा तिने घरच्या घरीच ट्रेडमिल मशीन मागवली. ट्रेडमिल मशीनच्या माध्यमातून घरच्या घरी ती अधिक चालण्याचा प्रयत्न करू लागली.

लग्नापूर्वी सजण्याचा लाभ आजदेखील आहे

लग्नापूर्वी सजण्याचा लाभ लग्नाच्या प्रसंगी तर मिळतोच, १०-२० वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या लग्नाचे व्हिडिओ बघता तेव्हा एक सुखद अनुभूती होते. तेव्हा पुरुष विचार करतो की किती स्मार्ट होतो त्या दिवसात तेव्हा किती घनदाट केस होते डोक्यावरती. ना ढेरी होती आणि ना ही डोळयांवरती आजच्याप्रमाणे जाडजूड चष्मा होता.

तर स्त्रिया विचार करतात की मी किती बारीक होती तेव्हा जो कोणी पहात असे तो पहातच राहायचा. म्हणून व्यायामाची सवय आपल्या आयुष्याचा अनिवार्य भाग असायला हवा. कोणत्याही कारणामुळे लग्नपूर्वी ही सवय नक्कीच लावून घ्यायला हवी आणि लग्नानंतर आपल्या छोटया बहीणभावंडांना फिटनेसचे फायदे समजावत व्यायाम करण्यासाठी उत्साहीत करायला हवं. म्हणजेच लग्नाच्यावेळी त्यांना फिटनेससाठी अधिक मेहनत करण्याची गरज लागणार नाही

हृदयाला बंद होण्यापासून वाचवा

* डॉ. संजीव अग्रवाल, एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार, हृदय विज्ञान, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली

उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. ते जास्त आरामदायी जीवन जगू लागले आहेत. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या इर्षेने तणावाची पातळी वाढत चालली आहे. त्यातच गॅजेट्सच्या अतिवापराने शरीराची हालचाल जवळपास संपवून टाकली आहे. यामुळे भारतात हृदयरोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आपल्या देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सुरुवातीला या आजाराकडे वृद्धांना होणारा आजार म्हणून पाहिले जायचे. आता मात्र हा अतिशय वेगाने तरुणांचीही शिकार करत आहे.

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवून हृदयरोगापासून स्वत:ला वाचवता येते. जर तुम्ही हृदयरोगाच्या जाळयात अडकला असाल तर घाबरू नका. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेले उपचार फारच प्रभावी ठरत आहेत.

हृदयरोगाशी संबंधित प्रमुख समस्या

हृदयरोगाचा टका : मानवी हृदय मांसपेशींनी बनले आहे. त्याला सतत अन्न आणि ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या आकुंचन पावल्या असतील तर हृदयाच्या मांसपेशींना अन्न आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मृत होऊ लागतात. यामुळे हृदय कमकुवत होते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रक्रियेला हार्टअटॅक म्हणजेच हृदयरोगाचा झटका येणे असे म्हणतात.

हृदयाचे अनियंत्रित ठोके : हृदयाचे अनियंत्रित ठोके हे हृदय बंद होण्याचे संकेत असू शकतात. सामान्य आणि निरोगी माणसासाठी हृदयाचे ठोके ६० ते ९० बीट प्रती मिनिट असतात, मात्र अनेकदा ते अनियंत्रित होऊ शकतात. हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास कार्डियक अरेस्ट किंवा हार्टअटॅक येऊ शकतो. अॅनिमिया हेही हृदयाच्या अनियंत्रित ठोक्यांसाठी कारणीभूत ठरू शकते, कारण यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे हृदयाला शरीरातुन रक्त पुरवठा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि लेफ्टवॅट्रिक्युलर हायपरट्रोफी (एलवीएच) हा गंभीर आजार होतो. यात हृदयाच्या मांसपेशींचा आकार वाढतो. यामुळे हृदय बंद पडणे किंवा लाल रक्तपेशी लवकर नष्ट होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्यानेही हृदयाचे ठोके वाढतात.

कार्डियक अरेस्ट : कार्डियक अरेस्टमध्ये हृदय बंद झाल्याने रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. याला कार्डियकपलमोनरी अरेस्ट किंवा सर्क्युलेटरी अरेस्ट असे म्हणतात. जे लोक हृदयरोगाने त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात हार्टअटॅकची समस्या आनुवंशिक आहे त्यांना कार्डियक अटॅकचा धोका जास्त असतो. अनेकदा सुदृढ माणूसही याच्या जाळयात ओढला जाऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाचा अतिरेक हे या आजारास कारणीभूत ठरू शकतात.

हार्ट फेल्युअर : हार्ट फेल होणे ही एक गंभीर समस्या आहे. अशी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हृदयाच्या मांसपेशींचे जास्तीत जास्त नुकसान होते, त्यामुळे त्या शरीरात पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह करू शकत नाहीत. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि तळव्यांना सूज येणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. हार्ट फेल्युअरचा अर्थ हृदय बंद पडणे किंवा हृदयाने कार्य करणे बंद केले असा होत नाही. याचा अर्थ असा की, हृदय रक्ताला योग्य पद्धतीने आणि जितकी गरज आहे तितके पंप करू शकत नाही. हे कोरोनरी हार्ट डिसिस, हृदयाचा व्हॉल्व म्हणजे झडपा किंवा मांसपेशींचे नुकसान होणे किंवा व्हायरसच्या संक्रमणामुळे होऊ शकते.

एनजाइना : एनजाइना म्हणजे हृदयविकाराचा दाह. छातीत दुखणे हे याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. एनजाइना आर्थोस्लोरोसिसद्वारे होतो. यामुळे हृदयात रक्ताचा प्रवाह कमी होतो. यात छाती, डावा हात, खांदा किंवा जबडा दुखू लागतो. शारीरिक श्रम करताना वेदना अधिक वाढतात. थोडासा आराम केल्यावर त्या कमी होतात. एनजाइनाची लक्षणे दिसू लागली असतील तर लगेचच हृदयरोग विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

या संकेतांकडे गांभीर्याने पाहा

* छातीत अस्वस्थ वाटणे, छाती जड होणे.

* छातीत दुखण्यासह धाप लागणे.

* खूप जास्त घाम येणे.

* सतत चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा.

* खांदे सुन्न होणे.

* बोलताना जीभ अडखळणे.

हृदयासाठी आवश्यक टीप्स

खालील उपाय करून तुम्ही हृदयाला आजारी होण्यापासून वाचवू शकता :

* सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे कमीत कमी सेवन करा. तुमच्या आहारातून लाल मांस कायमचे वगळा, त्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

* शारीरिक रूपात सक्रिय राहा, कारण शरीराच्या सततच्या हालचालींमुळे अतिरिक्त चरबी जळून जाते. कोलेस्टेरॉल आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे हा हार्टअटॅकपासून वाचण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे.

* धुम्रपान, दारू पिणे टाळा.

* हृदयरोग बराचसा अनुवंशिक आहे. ज्यांचे आईवडील, भावंडांना हृदयरोग आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

उपचाराचे नवीन तंत्रज्ञान

हृदयरोग हा आरोग्याशी निगडित एक गंभीर आजार समजला जातो. म्हणूनच असे उपाय करा ज्यामुळे तुम्ही याच्या जाळयात येण्याची भीती कमी होईल. त्यानंतरही जर हा आजार झालाच तरी घाबरू नका. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे जीवन वाचवणारे समजले जाते. म्हणूनच हृदयरोगाची लक्षणे ओळखून लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी

हृदयाच्या मांसपेशींना वाचवण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे सर्वाधिक गरजेचे असते. यासाठीच एंजिओप्लास्टी एक प्रभावी उपचार समजला जातो. याद्वारे हार्टअटॅकमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करता येऊ शकते. सुरुवातीला रक्ताच्या गुठळया विरघळवण्यासाठी औषध दिले जात असे, पण ते त्या विशेष ठिकाणावर पोहोचण्याआधीच संपूर्ण शरीरात पसरत असे. यामुळे कधीकधी ब्लिडिंगची समस्या निर्माण होत असे. प्राथमिक एंजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या गुठळया स्क्रीनवर पाहाता येतात. त्यांना काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला जातो. गरजेनुसार अत्याधुनिक एंजिओप्लास्टी केली जाते. यात धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी एक लवचिक नळी टाकली जाते. याव्यतिरिक्त बायपास सर्जरीही केली जाते.

ऐऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट

जर हृदयातील एखादा व्हॉल्व किंवा झडप योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलण्यासाठी सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया गरजेची असते. ती व्हॉल्व बदलून तिच्या जागी कृत्रिम व्हॉल्व बसवली जाते.

हृदय प्रत्यारोपण

यात आजारी किंवा खराब झालेले हृदय बदलून त्या ठिकाणी निरोगी हृदय बसवले जाते. या प्रक्रियेचा उपयोग हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त रुग्णांसाठी अंतिम उपचार म्हणून केला जातो. यासाठी त्या लोकांचे हृदय घेतले जाते ज्यांना ब्रेन डेथ म्हणून घोषित केले जाते. दात्याच्या शरीरातून काढल्यानंतर ६ तासांच्या आत हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. अशी शस्त्रक्त्रिया यशस्वी होण्याची ३० टक्के शक्यता असते. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीत बदल करणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण त्याशिवाय कोणताही उपचार किंवा औषध प्रभावी ठरू शकत नाही.

हृदयाला बंद होण्यापासून वाचवा

* डॉ. संजीव अग्रवाल, एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार, हृदय विज्ञान, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली

उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. ते जास्त आरामदायी जीवन जगू लागले आहेत. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या इर्षेने तणावाची पातळी वाढत चालली आहे. त्यातच गॅजेट्सच्या अतिवापराने शरीराची हालचाल जवळपास संपवून टाकली आहे. यामुळे भारतात हृदयरोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आपल्या देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सुरुवातीला या आजाराकडे वृद्धांना होणारा आजार म्हणून पाहिले जायचे. आता मात्र हा अतिशय वेगाने तरुणांचीही शिकार करत आहे.

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवून हृदयरोगापासून स्वत:ला वाचवता येते. जर तुम्ही हृदयरोगाच्या जाळयात अडकला असाल तर घाबरू नका. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेले उपचार फारच प्रभावी ठरत आहेत.

हृदयरोगाशी संबंधित प्रमुख समस्या

हृदयरोगाचा टका : मानवी हृदय मांसपेशींनी बनले आहे. त्याला सतत अन्न आणि ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या आकुंचन पावल्या असतील तर हृदयाच्या मांसपेशींना अन्न आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मृत होऊ लागतात. यामुळे हृदय कमकुवत होते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रक्रियेला हार्टअटॅक म्हणजेच हृदयरोगाचा झटका येणे असे म्हणतात.

हृदयाचे अनियंत्रित ठोके : हृदयाचे अनियंत्रित ठोके हे हृदय बंद होण्याचे संकेत असू शकतात. सामान्य आणि निरोगी माणसासाठी हृदयाचे ठोके ६० ते ९० बीट प्रती मिनिट असतात, मात्र अनेकदा ते अनियंत्रित होऊ शकतात. हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास कार्डियक अरेस्ट किंवा हार्टअटॅक येऊ शकतो. अॅनिमिया हेही हृदयाच्या अनियंत्रित ठोक्यांसाठी कारणीभूत ठरू शकते, कारण यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे हृदयाला शरीरातुन रक्त पुरवठा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि लेफ्टवॅट्रिक्युलर हायपरट्रोफी (एलवीएच) हा गंभीर आजार होतो. यात हृदयाच्या मांसपेशींचा आकार वाढतो. यामुळे हृदय बंद पडणे किंवा लाल रक्तपेशी लवकर नष्ट होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्यानेही हृदयाचे ठोके वाढतात.

कार्डियक अरेस्ट : कार्डियक अरेस्टमध्ये हृदय बंद झाल्याने रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. याला कार्डियकपलमोनरी अरेस्ट किंवा सर्क्युलेटरी अरेस्ट असे म्हणतात. जे लोक हृदयरोगाने त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात हार्टअटॅकची समस्या आनुवंशिक आहे त्यांना कार्डियक अटॅकचा धोका जास्त असतो. अनेकदा सुदृढ माणूसही याच्या जाळयात ओढला जाऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाचा अतिरेक हे या आजारास कारणीभूत ठरू शकतात.

हार्ट फेल्युअर : हार्ट फेल होणे ही एक गंभीर समस्या आहे. अशी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हृदयाच्या मांसपेशींचे जास्तीत जास्त नुकसान होते, त्यामुळे त्या शरीरात पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह करू शकत नाहीत. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि तळव्यांना सूज येणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. हार्ट फेल्युअरचा अर्थ हृदय बंद पडणे किंवा हृदयाने कार्य करणे बंद केले असा होत नाही. याचा अर्थ असा की, हृदय रक्ताला योग्य पद्धतीने आणि जितकी गरज आहे तितके पंप करू शकत नाही. हे कोरोनरी हार्ट डिसिस, हृदयाचा व्हॉल्व म्हणजे झडपा किंवा मांसपेशींचे नुकसान होणे किंवा व्हायरसच्या संक्रमणामुळे होऊ शकते.

एनजाइना : एनजाइना म्हणजे हृदयविकाराचा दाह. छातीत दुखणे हे याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. एनजाइना आर्थोस्लोरोसिसद्वारे होतो. यामुळे हृदयात रक्ताचा प्रवाह कमी होतो. यात छाती, डावा हात, खांदा किंवा जबडा दुखू लागतो. शारीरिक श्रम करताना वेदना अधिक वाढतात. थोडासा आराम केल्यावर त्या कमी होतात. एनजाइनाची लक्षणे दिसू लागली असतील तर लगेचच हृदयरोग विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

या संकेतांकडे गांभीर्याने पाहा

* छातीत अस्वस्थ वाटणे, छाती जड होणे.

* छातीत दुखण्यासह धाप लागणे.

* खूप जास्त घाम येणे.

* सतत चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा.

* खांदे सुन्न होणे.

* बोलताना जीभ अडखळणे.

हृदयासाठी आवश्यक टीप्स

खालील उपाय करून तुम्ही हृदयाला आजारी होण्यापासून वाचवू शकता :

* सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे कमीत कमी सेवन करा. तुमच्या आहारातून लाल मांस कायमचे वगळा, त्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

* शारीरिक रूपात सक्रिय राहा, कारण शरीराच्या सततच्या हालचालींमुळे अतिरिक्त चरबी जळून जाते. कोलेस्टेरॉल आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे हा हार्टअटॅकपासून वाचण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे.

* धुम्रपान, दारू पिणे टाळा.

* हृदयरोग बराचसा अनुवंशिक आहे. ज्यांचे आईवडील, भावंडांना हृदयरोग आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

उपचाराचे नवीन तंत्रज्ञान

हृदयरोग हा आरोग्याशी निगडित एक गंभीर आजार समजला जातो. म्हणूनच असे उपाय करा ज्यामुळे तुम्ही याच्या जाळयात येण्याची भीती कमी होईल. त्यानंतरही जर हा आजार झालाच तरी घाबरू नका. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे जीवन वाचवणारे समजले जाते. म्हणूनच हृदयरोगाची लक्षणे ओळखून लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी

हृदयाच्या मांसपेशींना वाचवण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे सर्वाधिक गरजेचे असते. यासाठीच एंजिओप्लास्टी एक प्रभावी उपचार समजला जातो. याद्वारे हार्टअटॅकमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करता येऊ शकते. सुरुवातीला रक्ताच्या गुठळया विरघळवण्यासाठी औषध दिले जात असे, पण ते त्या विशेष ठिकाणावर पोहोचण्याआधीच संपूर्ण शरीरात पसरत असे. यामुळे कधीकधी ब्लिडिंगची समस्या निर्माण होत असे. प्राथमिक एंजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या गुठळया स्क्रीनवर पाहाता येतात. त्यांना काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला जातो. गरजेनुसार अत्याधुनिक एंजिओप्लास्टी केली जाते. यात धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी एक लवचिक नळी टाकली जाते. याव्यतिरिक्त बायपास सर्जरीही केली जाते.

ऐऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट

जर हृदयातील एखादा व्हॉल्व किंवा झडप योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलण्यासाठी सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया गरजेची असते. ती व्हॉल्व बदलून तिच्या जागी कृत्रिम व्हॉल्व बसवली जाते.

हृदय प्रत्यारोपण

यात आजारी किंवा खराब झालेले हृदय बदलून त्या ठिकाणी निरोगी हृदय बसवले जाते. या प्रक्रियेचा उपयोग हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त रुग्णांसाठी अंतिम उपचार म्हणून केला जातो. यासाठी त्या लोकांचे हृदय घेतले जाते ज्यांना ब्रेन डेथ म्हणून घोषित केले जाते. दात्याच्या शरीरातून काढल्यानंतर ६ तासांच्या आत हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. अशी शस्त्रक्त्रिया यशस्वी होण्याची ३० टक्के शक्यता असते. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीत बदल करणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण त्याशिवाय कोणताही उपचार किंवा औषध प्रभावी ठरू शकत नाही.

रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारी मिठाई

* संकल्प शक्ती, लाइफस्टाइल गुरू आणि संस्थापक, गुडवेज फिटने

२०२१ मधील सण-उत्सवांवेळी आपल्या नातेवाईकांसोबत बसून विविध प्रकारच्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे तितकेसे सोपे राहिलेले नाही. कोविड -१९ ने लोकांना चांगलेच घाबरवले आहे. अशावेळी तुमच्यातील रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया, सण-उत्सवांदरम्यान कोणत्या प्रकारच्या मिठाईद्वारे तुम्ही तुमच्यातील इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकता :

सुंठ : मिठाई बनविताना सुंठीचा वापर करा. ही एक प्रकारची औषधी असून यात रोगनिवारक गुणधर्म असतात. यात अँटीऑक्सिडंट्स, अँटीइम्प्लिमेंट्री जसे की, बीटा कॅरोटीन, कॅप्सेसीन इत्यादी भरपूर प्रमाणात असते. ती मधुमेह, अर्धशिशी, हृदय रोग, गुढघेदुखी, संधिवात यावर परिणामकारक असून चयापचय प्रक्रियेचे कार्य व्यवस्थित सुरू राहण्यासाठी लाभदायी आहे. सुंठ गरम असते.

खजूर : खजुराचा वापर तुम्ही साखरेला पर्याय म्हणून करू शकता. साखरेत ‘ओ’ नावाचे न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्त्व असते, ज्यामुळे लठ्ठपणासह अनेक आजारांना निमंत्रण मिळते. याउलट खजुरात शरीराला बळकट करण्यासाठी आवश्यक कार्बोहायड्रेड, मिनरल्स, फायबर्स आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशी पोषक तत्त्वे असतात. खजूर रोगप्रतिकारक क्षमता वाढविते आणि कर्करोगाच्या पेशींविरोधात लढण्याची ताकद मिळवून देते.

तीळ : हे कॅल्शियम वाढवितात. महिलांना  कॅल्शियमची खूपच जास्त गरज असते. तीळ हाडे मजबूत करतात. यकृतही निरोगी ठेवतात. वजन नियंत्रणात ठेवून त्वचेला आरोग्यदायी आणि स्नायू बळकट करतात. मधुमेह नियंत्रणात ठेवून रोगप्रतिकारक क्षमता वाढवितात. यात झिंक, आयर्न, बी, ई जीवनसत्त्वासह मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

नारळ : हे पीसीओडी, पीरिएड्सच्या दिवसांत प्रचंड वेदना होणे, लघवीची समस्या, छातीत जळजळ, मुरूम, पुटकुळया, त्वचेवर व्रण उमटणे, अंडाशयातील गाठी यासारख्या अनेक समस्या बरे करणारे फळ आहे. नारळ थंड असून पित्तदोष कमी करतो.

तूप : याचा जेवणात समावेश करणे खूपच फायदेशीर आहे. ते शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करून आजारांपासून रक्षण करते. तुपातील ई जीवनसत्त्व त्वचा तसेच केसांसाठी खूपच उपयुक्त आहे. संधिवात, वात दूर करणे तसेच वजन कमी करण्यासाठीही तुपाचे सेवन खूपच गरजेचे आहे. रिफाइंड तेल खराब कोलेस्ट्रॉल तर तूप चांगले कोलेस्ट्रॉल वाढविते. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तूप स्मरणशक्ती वाढवून शरीरही मजबूत बनविते.

अक्रोड : हे मेंदूतील गोंधळ कमी करून एकाग्रता वाढविते. चयापचय प्रक्रिया सुधारून वजन कमी करण्यास मदत करते. यातील ओमेगा ३ मुळे ते शरीरासाठी अँटीऑक्सिडंटचे काम करते.

गूळ : याचा गोडवा नैसर्गिक आहे आणि साखरेच्या तुलनेत पदार्थाला गोडवा मिळवून देण्यासाठी गूळ खूपच चांगले आणि पोषक आहे. यात कॅल्शिअम, फायबर, आयर्नसह ब जीवनसत्त्व असते. गुळाच्या सेवनामुळे अॅनिमियाची समस्या दूर होते. अपचन होत असल्यासही ते उपयोगी ठरते. तुम्ही किसमिस किंवा मधाचाही वापर करू शकता.

ज्येष्ठमध : हे गॅस, पित्त, डोकेदुखी, तणाव, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे, वेदना, संधिवात, मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची समस्या तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी वापरले जाते. स्वयंपाकात याचा वापर म्हणजे एक प्रकारे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मदत करण्यासारखेच आहे.

या सर्वांचाच तुम्ही दैनंदिन आहारात समावेश करू शकता, जसे की :

* पाणी किंवा दुधासोबत तिळाचे सेवन केल्यास कॅल्शियम कमी होण्याची समस्या कधीच निर्माण होत नाही. विशेष करून महिलांनी याचे सेवन अवश्य करायला हवे.

* जेवणापूर्वी खजूर खाल्ल्यास आपण कमी जेवतो, शिवाय अन्न लवकर पचते. गोड म्हणून चॉकलेट, कँडी, केक खाण्याऐवजी खजूर खाणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते.

* जेवल्यानंतर गूळ खाल्ल्यामुळे पचन चांगले होते. ते गरम पाण्यासोबत खाल्ल्यामुळे पोटविकार दूर होऊन वजनही कमी होते.

* तुपाच्या सेवनामुळे वजन कधीच वाढत नाही. मात्र बऱ्याच महिला याकडे दुर्लक्ष करतात आणि संधिवाताच्या शिकार होतात.  डाळ, भाज्या, भात, पुलाव, पोळी, मिठाई आदींवर १-२ चमचे तूप घालून त्याचे नियमित सेवन करावे. खाण्यासाठी गायीचे तूप उत्तम असते.

महिलांमध्ये थायरॉईड उपाय आहे

* प्रतिनिधी

काही आजार असे असतात जे महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. ‘हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम’ हे थायरॉईडशी संबंधित २ आजार आहेत.

स्त्रियांना अनेक मानसिक, शारीरिक आणि हार्मोनल बदलांना सामोरे जावे लागते. स्त्री जीवनाच्या वेगवेगळया टप्प्यांमध्ये हार्मोनल बदल होतातच, पण जर हे बदल असामान्य असतील तर ते अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळेच महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता जास्त असते.

प्रिस्टीन केअरच्या डॉ. शालू वर्मा यांनी महिलांमध्ये वाढत्या थायरॉईडच्या समस्या आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याबद्दल माहिती दिली –

थायरॉईड काय आहे?

थायरॉईड ही मानेच्या खालच्या भागात आढळणारी फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. या ग्रंथीतून ट्रायओडोथायरोनिन (टी३) आणि थायरॉक्सिन (टी४) नावाचे २ मुख्य संप्रेरक स्रवते. दोन्ही संप्रेरके शरीरातील अनेक क्रिया नियंत्रित करण्यात विशेष भूमिका बजावतात.

पण, जेव्हा दोनपैकी कोणत्याही हार्मोन्सच्या उत्पादनाच्या प्रमाणात बदल होतो, तेव्हा शरीरात विविध समस्या निर्माण होतात. हायपोथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझममधील फरक जेव्हा थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन आवश्यकतेपेक्षा जास्त होते तेव्हा त्या स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात, तर थायरॉईड संप्रेरकांच्या कमी उत्पादनाच्या स्थितीला हायपोथायरॉईडीझम म्हणतात. दोन्ही परिस्थिती असामान्य आहेत आणि रुग्णाला उपचारांची आवश्यकता असते.

स्त्रिया होतात पुरुषांपेक्षा जास्त प्रभावित

हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये १० पट अधिक सामान्य आहे. आकडेवारीनुसार, दर ८ पैकी जवळजवळ १ स्त्री थायरॉईडने त्रस्त असते.

याचे एक कारण असे की, थायरॉईडचे विकार बहुतेक वेळा स्वयंप्रतिकार प्रतिक्रियांमुळे उद्भवतात. जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वत:च्या पेशींवर हल्ला करू लागते तेव्हा हे घडते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये स्वयंप्रतिकार स्थिती अधिक सामान्य असते.

मासिक पाळी दरम्यान हार्मोन्समध्ये होणारे चढउतार आणि थायरॉईड हार्मोन्समधील परस्पर क्रियेमुळे थायरॉईडचे विकारही स्त्रियांमध्ये दिसून येतात. थायरॉईडची समस्या कधीही उद्भवू शकते, परंतु रजोनिवृत्तीनंतर हार्मोन्सच्या पातळीत अचानक बदल झाल्यामुळे थायरॉईडचे विकार होणे खूप सामान्य आहे.

या व्यतिरिक्त, थायरॉईडायटिस (थायरॉईड ग्रंथीची जळजळ), आयोडीनची कमतरता आणि जास्त आयोडीन यामुळेही हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

अशा प्रकारे होतो थायरॉईड विकारांवर परिणाम

स्त्री प्रजनन प्रणाली आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य यामध्ये चांगला समन्वय असणे अत्यंत आवश्यक असते. जर थायरॉईड कमी किंवा जास्त सक्रिय असेल तर यामुळे विविध हार्मोनल विकार होतात आणि याचा स्त्रीच्या पुनरुत्पादक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

मासिक पाळी

थायरॉईड विकारांमुळे मासिक पाळी असामान्यपणे लवकर किंवा उशिरा येऊ शकते. याशिवाय, थायरॉईड संप्रेरकांच्या कमी किंवा जास्त उत्पादनामुळे मासिक पाळीच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, जसे की अनियमित कालावधी, मासिक पाळीची अनुपस्थिती आणि खूप जास्त रक्तस्त्राव इ.

गरोदरपणात

जर एखादी स्त्री गर्भवती असेल आणि तिला थायरॉईडचा विकार असेल तर अनेक गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. हायपरथायरॉईडीझम मॉर्निंग सिकनेसची शक्यता वाढवू शकतो, तर हायपोथायरॉईडीझममुळे अकाली प्रसूती, गर्भपात आणि इतर गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

रजोनिवृत्ती

थायरॉईड विकारांमुळे अकाली रजोनिवृत्ती येऊ शकते. मात्र, योग्यवेळी उपचार घेऊन प्रीमेनोपॉज टाळता येऊ शकतो.

अशा प्रकारे करा रक्षण

थायरॉईड विकाराने ग्रस्त झाल्यानंतर, ते थांबवणे कठीण असते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीला लक्षणे दिसली तर तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हा रोग टाळण्यासाठी निरोगी स्त्री खालील उपाय करू शकते :

प्रक्रिया केलेले अन्न टाळा : प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम होतो. म्हणून, थायरॉईड विकार टाळण्यासाठी, स्त्रीने कमीतकमी प्रक्रिया केलेले अन्न सेवन केले पाहिजे. जर एखाद्या स्त्रीला थायरॉईडचा विकार असेल तर तिने हे अन्न अजिबात सेवन करू नये.

सोया टाळा : जरी हा अतिशय आरोग्यदायी असला तरी तो थायरॉईडच्या संबंधात तो आरोग्यदायी नाही. सोयाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने थायरॉईड संप्रेरकांच्या निर्मितीवर परिणाम होतो.

धूम्रपान थांबवा : धुम्रपान करताना बाहेर पडणारे विष थायरॉईड ग्रंथीला अधिक संवेदनशील बनवू शकतात, ज्यामुळे थायरॉईडचे विकार होऊ शकतात. धुम्रपान हे थायरॉईड ग्रंथीच नव्हे तर आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचे मूळ बनू शकते.

तणाव कमी करा

थायरॉईड रोगासह इतर अनेक आरोग्य विकारांमध्ये तणावाची मोठी भूमिका आहे. तणाव कमी करण्यासाठी स्त्रिया ध्यान, संगीत इत्यादींची मदत घेऊ शकतात.

नियमितपणे डॉक्टरांकडे जा

तुमच्या डॉक्टरांकडे नियमित जा. नियमित तपासणी केवळ तुमच्या आरोग्यासाठीच नाही तर थायरॉईडच्या आरोग्यासाठीही चांगली असते. थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे दिसल्यास डॉक्टर काही औषधांच्या मदतीने हा आजार नियंत्रणात आणू शकतात.

थायरॉईड ग्रंथीमधून स्रवित होणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करतात, जसे की, कॅलरीजच्या वापराचे प्रमाण नियंत्रित करणे, हृदयाची गती नियंत्रित करणे इ. पण जर या स्रावांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी असेल तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हे स्त्रीच्या पुनरुत्पादक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम करू शकते.

याची लक्षणे दिसल्यावर, स्त्रीने विलंब न करता त्वरित निदानासाठी एंडोक्रिनोलॉजिस्टकडे जावे. वेळेवर उपचार करून, काही औषधे किंवा थेरपीच्या मदतीने ते नियंत्रित केले जाऊ शकते. काही गंभीर प्रकरणांमध्ये थायरॉइडेक्टॉमीही आवश्यक असू शकते. ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. जेव्हा थायरॉईड विकार औषधांनी बरा होऊ शकत नाही तेव्हा हे गरजेचे असते.

संतुलित आहार घेणे आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे उत्तम ठरते. हे केवळ थायरॉईड रोगच सुधारत नाही तर तुमचे सामान्य जीवनही सुधारेल.

काय आहे पोस्टपार्टम नैराश्य?

* प्रतिनिधी

जगातल्या सुमारे १३ टक्के महिलांना प्रसूतीनंतर मानसिक तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्या अस्वस्थ राहतात. प्रसूतीनंतर लगेच येणाऱ्या नैराश्याला पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये ही संख्या २० टक्यांपर्यंत आहे. २०२० मध्ये सीडीसीने केलेल्या अभ्यासानुसार, हे उघड झाले आहे की, ८ पैकी १ महिला प्रसूतिपश्चात नैराश्याने ग्रस्त आहे. विशेषत: टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये प्रसूतिपश्चात नैराश्याची शक्यता जास्त असते.

या संदर्भात बंगळूरूमधील मणिपाल रुग्णालयाच्या सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हेमनंदिनी जयरामन सांगतात की, जेव्हा महिलांना मानसिक समस्या येतात तेव्हा त्या आतून तुटतात, जे घरातील सदस्यांनाही समजत नाही, त्यामुळे त्यांना खूपच एकटेपणा जाणवतो.

पोस्टपार्टम म्हणजे प्रसूतीनंतरचा काळ अर्थात बाळाच्या जन्मानंतरचा काळ. प्रसूतीनंतर लगेचच महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील बदलांना पोस्टपार्टम म्हणतात. पोस्टपार्टम अवस्थेपर्यंत पोहोचण्यापूर्वीचे तीन टप्पे असतात, जसे की इंट्रापार्टम म्हणजे प्रसूतीपूर्वीचा काळ आणि एट्रेपार्टम म्हणजे प्रसूतीदरम्यानचा काळ तर पोस्टपार्टम म्हणजे बाळाच्या जन्मानंतरचा काळ.

भलेही बाळंतपणानंतर अनोखा आनंद मिळत असला, तरी अनेक महिलांना प्रसूतीनंतरचा त्रास सहन करावा लागतो. प्रसूती सामान्य होते की, शस्त्रक्रियेद्वारे होते याच्याशी या समस्येचा काहीही संबंध नसतो. प्रसूतीदरम्यान शरीरातील सामाजिक, मानसिक आणि हार्मोनल बदलांमुळे महिलांमध्ये पोस्टपार्टम म्हणजे प्रसूतीनंतरच्या समस्या उद्भवतात.

नैराश्याचे कारण

पोस्टपार्टम नैराश्य आई आणि बाळ दोघांनाही येऊ शकते. पहिल्या प्रसूतीनंतर आईमध्ये अनेक संप्रेरक आणि शारीरिक बदल दिसून येतात, ज्याची लक्षणे वारंवार रडणे, जास्त झोपण्याची इच्छा, कमी खाण्याची इच्छा, बाळाशी नीट संबंध ठेवू न शकणे इत्यादी आहेत. या नैराश्यामुळे अनेकदा आई स्वत:चे तसेच बाळाचेही नुकसान करते.

प्रसूतीनंतर महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी बाळासोबतच त्यांनी स्वत:चीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते, कारण या काळात शरीर कमकुवत होण्यासोबतच अंगावर स्ट्रेच मार्क्स येणे, वाढत्या ताणामुळे पाठदुखी, सततची केस गळती, स्तनांच्या आकारात बदल अशा बदलांमधून आईला जावे लागते. यासोबतच ती नोकरदार असेल तर करिअर पुढे सुरू ठेवण्याची चिंताही तिला सतावत असते.

कुटुंबाचा पाठिंबा

अशा परिस्थितीत फक्त एकच व्यक्ती तिच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकते आणि ती म्हणजे बाळाचे वडील, कारण जेव्हा आईचे शरीर कमकुवत असते आणि ती तिच्या नवीन आयुष्याशी संघर्ष करत असते, तेव्हा तिचा जोडीदार तिला सर्व प्रकारे मदत करत असतो, जसे की, सर्व चांगले होईल, मी आणि माझे संपूर्ण कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. अशा परिस्थितीत पोस्टपार्टम समस्येतून जाणाऱ्या महिलेला जोडीदाराच्या बोलण्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि तिलाही वाटू लागते की, आता ती बाळाची योग्य काळजी घेऊ शकेल, म्हणजेच जोडीदार आणि कुटुंबाच्या मदतीने ती या समस्येतून बाहेर पडते.

तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक अशा परिस्थितीत पूर्ण समजूतदारपणे आणि परिपक्वतेने सामोरे जाण्याचा सल्ला महिलांना देतात. विशेषत: ज्या महिलांना जुळी मुले आहेत किंवा दिव्यांग मुले आहेत त्यांना तज्ज्ञ डॉक्टर तसेच कुटुंबातील सदस्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना या परिस्थितीवर सहज मात करता येईल.

अनेक महिलांना आपण डिप्रेशन अर्थात नैराश्यातून जात असल्याची साधी कल्पनाही नसते. अशा परिस्थितीत आपण त्यांना या परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. पोस्टपार्टम नैराश्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते, कारण या अवस्थेवर वेळीच उपचार केले नाहीत तर महिला स्वत:वर तसेच बाळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. याशिवाय, ती बाळाच्या गरजाही समजू शकत नाही. खरं तर जन्मानंतर बाळाला आईची सर्वात जास्त गरज असते. म्हणूनच वेळेवर उपचार घेणे आवश्यक आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें