मनीचेही दीप करा प्रज्वलीत

– गरिमा पंकज

दिवाळीच्या दिवशी बाह्य अस्वच्छतेसोबत मनातील मलिनता व अंधार दूर लोटणंही तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे सकाळच्या वेळी दवबिंदू सूर्यप्रकाश परावर्तित करतात, त्याचप्रमाणे आपली मन:स्थितीसुद्धा चेहऱ्यावर दिसून येते. मग आपलं मनही सकारात्मक भावनांनी प्रकाशमान करूया, जेणेकरून त्याचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावरही झळकू लागेल व ही दीपावली आपल्या सर्वांसाठी नवीन प्रकाशाचं, नवीन तेजाचं द्योतक ठरेल.’’

मनात अंधार अन् मलिनता पसरवणारे काही प्रमुख भाव हे आहेत.

संशय : संशयाचे बळी आपण सगळेच होत असतो. खासकरून स्त्रिया थोड्या जास्तच संशयी असतात.

विल्यम शेक्सपिअर म्हणतो की आपला संशय आपल्याला सर्वात जास्त फसवतो. यामुळेच आपल्या हातातून ते सारे निसटून जाते, जे आपण सफलतेने मिळवू शकत असतो. मग दिवाळीच्या या मंगलप्रसंगी आपण आपल्या मनातून, डोक्यातून हरतऱ्हेचा संशय दूर करून पूर्ण विश्वासाने आयुष्याच्या या प्रवासाचे मार्गक्रमण करूया.

भीतिला दूर पळवून लावा : फॉर्म्यूला वन कार रेसर, नारायण कार्तिक याचं म्हणणं आहे की, ‘‘जीवनात भीतिला कुठलेही स्थान नाही. मी भीतिशी मैत्री केली आहे. भीतिची जागा आता विश्वासाने घेतली आहे.’’

वास्तविक, जोपर्यंत आपल्याला आपल्या शक्तीचा अंदाज नसतो किंवा आपल्या मनात एखाद्या गोष्टीचं भय निर्माण झालेलं असतं, तेव्हा आपण उगीचच घाबरू लागतो. अज्ञान व अंधश्रद्धेची धुंदी आपल्या डोळ्यांसमोर पसरते. वास्तव आपल्याला समजून येत नाही आणि मग आयुष्य आपल्याला आयुष्याप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातून आपण नकारात्मकता व भीती फेकून दिली पाहिजे. अज्ञानामुळे भीतिचा जन्म होतो आणि अडाणीपणा अंधश्रद्धेला जन्म देतो. मग आपण घाबरू लागतो की असे तर नाही ना होणार किंवा तसे झाले तर. यासाठी हेच योग्य आहे की ही भीती आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून हद्दपार करून टाकू व मनात विश्वासाचे दिप प्रज्वलित करू.

क्रोध : मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे राग, क्रोध आणि या रागाचा जन्म होतो अहंकारामुळे. रागात व्यक्तिचा स्वत:वरील ताबा सुटतो. यामुळे तो स्वत:ला शारीरिक त्रास तर करून घेतोच, पण नात्यांमध्येही यामुळे दरी निर्माण होते.

रागिट व्यक्तींपासून लोकच काय पण आनंदही दूर जाऊ लागतो. एखादी सतत आरडाओरडा चिडचिड करणारी स्त्री कधीच पतीची आवडती होऊ शकत नाही.

द्वेष व इर्ष्या : आपल्या अयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ आपण बऱ्याचदा इतरांचा द्वेष व इर्ष्या करण्यात वाया घालवतो. यामुळे आपली मानसिक स्थिती तर आपण बिघडवून घेतोच पण इतरांच्या समस्यादेखील वाढवतो. दूरदर्शनवरील मालिकांचंच उदाहरण घ्या. प्रत्येक मालिकेत कुठली न कुठली स्त्री इरेला पेटून दुसऱ्या महिलेच्या विरोधात कारस्थान रचत असलेली दिसते. ‘जोधा अकबर’मधील स्कैया बेगम किंवा ‘बालिका वधू’मधील बुआजी यांचीच कारस्थानं पाहा. अशाप्रकारचे द्वेषपूर्ण विचार आपल्याला उद्ध्वस्त करून टाकतात.

दीपावलीच्या याशुभप्रसंगी मनातील कलुषित भाव दूर करून सकारात्मक विचारांसाठी जागा निर्माण केली पाहिजे.

निराशा : ‘‘मानसिक स्थितीचा आपल्या शरीरावर थेट प्रभाव पडतो,’’ असे डॉ. विलिअम एम. एडलर यांचे म्हणणे आहे.

स्वत:ला निराशेच्या अंध:कारातून बाहेर काढण्याची वेळ म्हणजे दिवाळी. नकारात्मक विचारांचा स्वत:वर प्रभाव पाडून घेऊ नका. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रूजवेल्ट यांचे दोन्ही पाय निकामी होते. पण त्यामुळे निराश होण्याऐवजी पुढे जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली.

चिंता : अमेरिकेचे मेंदू चिकित्सक डॉ. जेकोबी यांच्या शब्दात, ‘‘अति चिंता केल्याने शरीरावर असा प्रभाव पडतो जसा शरीरावर गोळ्या किंवा तलवारीचे वार केल्यावर होईल.

‘‘चिंता मनुष्याला आतून पोखरून काढते व जास्त भावूक असल्यामुळे स्त्रिया सतत छोट्या मोठ्या गोष्टींची चिंता करत राहातात. समजा आपला मेंदू उघडून त्यावर एका छोट्या हातोडीने सतत घाव घालाला तसा चिंतेचा यांत्रिक प्रभाव असतो त्यामुळे मेंदूतील पेशी विघटित होतील व कार्यक्षमताच हरवून बसेल. म्हणून डोक्यातून, मनातून सर्व चिंता काढून टाका व फक्त प्रकाशाला थारा द्या. या दिवाळीत आधी एवढं काम कराच.’’

हीनभावना : ज्यांच्या मनात इतरांविषयी हीनभावना असते, अशा व्यक्ती स्वत: आनंदी राहू शकत नाहीत व इतरांनाही आनंद देऊ शकत नाही. स्वत:ला कमी समजत राहिलं की त्या गोष्टींचा ताण चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागतो. आपल्या कमकुवतपणाचे ते एक मोठे कारण बनते. आपण एकदा कमकुवत झालो की इतर लोकही आपल्याशी चांगले वागत नाहीत.

डेव्हिड टी जॉन यांचे म्हणणे आहे, ‘‘स्वत:बद्दल वाईट विचार करणे ही जगातील सर्वात वाईट सवय आहे, यामुळे शरीरात नकारात्मक उर्जा तयार होते.’’

या सर्व उणिवा, कलुषित मनोभाव दूर लोटून मनाच्या अंगणात पुढील विचार रूजवा.

हास्याचे फटाके उडवा

जेव्हा तुम्ही हसता तेव्हा आमाशयामध्ये नृत्यासारख्या हालचाली होत असतात. यामुळे पाचनतंत्राची प्रकिया वेगाने घडते. हृदयाचे ठोके जलद होतात. रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह खेळकर राहतो. डोळ्यांत आगळीच चमक येते व शरीराचा प्रत्येक अवयव औषधासारखा काम करतो. प्रसन्न भाव आणि हास्य या दोन गोष्टी महिलांचे अलंकार आहेत. प्रसन्न दिसणारी गृहिणी तिच्या पतीबरोबच पूर्ण कुटुंबाला आवडते, हवीहवीशी वाटते.

दिवाळीच्या दिवशी स्मितहास्याचे फटाके उडवा, तरच दिवाळीचा आनंद वर्षभर तूमच्या आयुष्याला नवचैतन्य देत राहिल.

सकारात्मक विचारांचा प्रकाश

आयुष्याकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एखाद्या अर्ध्या रिकाम्या ग्लासाला अर्धा भरलेला आहे असंही म्हणू शकता. आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणणे खूप महत्वाचे आहेत.

प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ प्रो. रिचर्ड फॉक्स म्हणतात, ‘‘सकारात्मक बदल चांगल्या गोष्टींच्या लहरी तयार करतात. ज्यामुळे तुमचं आयुष्य व आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती या लहरींमुळे आनंदी होऊ शकतो. एक बदल मग दुसऱ्याला जन्म देतो व यानंतर बदल घडत जातात व आपल्या आयुष्यात आनंदाचे गाणे झिकारू लागते.’’

आत्मविश्वासाचे दिवे

स्वत:ला कधीही कोणापेक्षा कमी समजू नये. आत्मविश्वास बाळगावा. जेम्स इलियट म्हणतात, ‘‘जेव्हा तमचा आत्मविश्वास बळकट असतो, तेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खुश राहू शकता आणि एक आनंदी व्यक्ती प्रचंड क्रियाशील व कल्पकसुद्धा असते.’’

एनर्सन म्हणतात, ‘‘काहीजण जिंकत आलेला खेळही हरतात, कारण त्यांचा स्वत:वर विश्वास नसतो. जर तुम्हाला हरत चाललेला डाव जिंकायचा असेल तर स्वत:वर विश्वास ठेवा.’’

यासंदर्भात सुधा चंद्रन यांचे उदाहरण घेता येईल. अपघातामध्ये दोन्ही पाय गमावूनही आपला आत्मविश्वास त्यांनी डळमळू दिला नाही व नकली पायांच्या सहाय्याने नृत्य क्षेत्रात वेगळीच उंची गाठली.

माजी राष्टपती अब्दुल कलाम यांचं म्हणणं होतं की जितकी मोठी स्वप्नं तुम्हाला पाहाता येतील तितकी पाहा व ती पूर्णही करा. पण डोळे बंद करून स्वप्नं पाहू नका, स्वप्नं असं पाहा की ते पूर्ण होण्यासाठी तुमची झोप उडून जाईल.

प्रेमाची पणती लावा

दिवाळीच्या झगमगत्या वातावरणात आपल्या आयुष्याला प्रेमाची भेट द्या. रूसलेल्यांची समजूत काढा व आपल्या प्रियजनांसोबतचे प्रेमाचे बंध अजून दृढ करा व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांना दाखवून द्या की त्यांचे तुमच्या आयुष्यात किती मोलाचे स्थान आहे. या दिवाळीत तुम्ही त्यांना अशी भेट देत द्या जी त्यांनाही हवी आहे व तुम्हालाही त्यांना द्यायची आहे.

पत्नीला खूश करायचे असेल तर तिच्यासाठी दागिने, कपडे, किचनसंबंधी साहित्य किंवा इतर काही वस्तू घेऊ शकता. या दिवसांमध्ये कपड्यांवर सूट आणि वरायटीही उपलब्ध असते. जागोजागी सेल ही लागलेले असतात.

कासा ब्रॅण्डच्या संचालिका विनिता मित्तल सांगतात, ‘‘सणासुदीच्या दिवसांत तऱ्हेतऱ्हेचं डिस्काउंट मिळतं. एक असतं कॅश डिस्काउंट, ज्यात विक्रेता वस्तूंची किंमत घटवून विक्री करतात. दुसऱ्यात दुकानदार लोन किंवा हप्त्यावर वस्तू विकतात. तसं पाहाता यावर इंटरेस्ट रेट शून्य असतो.’’

दागिने ही स्त्रियांची पहिली आवड आहे आणि या सीझनमध्ये अनेक मोठे ज्वेलर्स अशा सवलती देतात की तुम्हाला एकरकमी पैसे देता येत नसतील तर तुम्ही हप्त्यांमध्ये ती रक्कम देऊ शकता. अनेकदा शेवटचा हप्ता त्यांच्याकडूनच भरला जातो. हप्त्यावर सोने घेतले तर तुमचे खर्चाचे गणितही बिघडत नाही. तुम्ही सोन्याची नाणी किंवा ब्रिक्सदेखील घेऊ शकता.

आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा

इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रीज, एलसीडी अशा वस्तू तुम्ही वर्षभरात कधीही खरेदी करू शकता. पण यावर्षी दिवाळीच्या दिवशीच या वस्तू खरेदी करून घरच्यांचा आनंद द्विगुणित करा.

तुमच्या घरात सिंगलडोअर जुना फ्रिज असेलही पण त्यात पुरेसं कुलिंग होत नसेल व पत्नी त्याची नेहमी तक्रार करत असेल तर यावेळी बाजारात आलेला नवीन पद्धतीचा वीज बचत करणारा, जास्त क्षमतेचा फ्रिज घेऊन या. घरात जर सेमीऑटोमेटिक वॉशिंग मशिन असेल तर या दिवाळीत फुली ऑटोमॅटिक किंवा फ्रंट लोडेड वॉशिंग मशिन खेरदी करू शकता.

याचप्रकारे दिवाळीला खर्चाचे गणित बसवून गाडी घेण्याचेही ठरवू शकता. तुमच्या मुलीसाठी किंवा पत्नीसाठी स्कूटी घेऊ शकता किंवा पूर्ण कुटुंबासाठी मोठी कार घेऊन सर्वजण एकत्र फिरायला जाऊ शकता.

स्त्रिया पतीसाठी मनगटी घड्याळ, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप अशा वस्तू घेऊ शकतात किंवा नविन फर्निचर, गालिचे, पडदे, चादरी अशा वस्तू विकत घेऊन पूर्ण घरभर एक नवा रंग व नवा उत्साह आणू शकता.

फेस्टिवलचे रंग वुडन क्राफ्टच्या संगे

– प्रियदर्शिनी सिंह स्वीटी

अवंतिकाला कळत नव्हतं की, या वेळच्या फेस्टिव सिझनमध्ये फ्रेंड्समध्ये आयकॉनिक होस्टर कसं बनावं? यासाठी तिला काही अनोख्या भेटवस्तू निवडायच्या होत्या. तिने खूप गिफ्ट कॉर्नर्स, एम्पोरियम, आर्ट अँड क्राफ्ट सेंटर्स पालथे घातले, पण काहीही मनाजोगं मिळालं नाही.

एके दिवशी या विषयावर बोलल्यानंतर अवंतिकाची फ्रेंड आयेशाने सुचवलं, ‘‘या वेळी वुडन आयटम्स का नाही ट्राय करत? लुकमध्येही मस्त आणि ट्रेंडमध्येही फर्स्ट आणि दिल्यानंतरही इंप्रेशन टिकून राहतं, हे विशेष.’’

अवंतिकाला आयेशाची आयडिया परफेक्ट वाटली. म्हणून तिने पटकन जवळच्याच वुडन क्राफ्ट एम्पोरियममध्ये जाऊन फेस्टिव सिझनसाठी भरपूर खरेदी केली. आता ती संतुष्ट होती आणि खूशही.

यावेळी तुम्हीही मागे राहू नका. वुडन आर्ट अँड क्राफ्ट शोपीसेसची क्रेझ वेगाने वाढत आहे. हे केवळ लुकमध्येच युनिक दिसत नाहीत, तर बजेटमध्येही परवडणारे असतात. प्रत्येक वेळी काच, क्रिस्टल किंवा मेटलच्या भेटवस्तू देण्याऐवजी यावेळी थोडं वेगळं ट्राय करा. नक्कीच आपल्या मित्रमंडळींना आपण दिलेली भेटवस्तू आवडेल. बाजारात वुडन क्राफ्टच्या खूप साऱ्या व्हरायटी उपलब्ध आहेत, त्यामध्ये आपल्या चॉइसच्या खूप साऱ्या वस्तू मिळतील. महागडया आणि कंटाळवाण्या गिफ्टला वुडन क्राफ्ट एक उत्तम पर्याय आहे.

काय निवडाल?

वुडन आर्ट शोपीसेसची एक वाइड रेंज बाजारात उपलब्ध आहे. मात्र या कुठूनही खरेदी करू नका. एखाद्या विश्वसनीय एम्पोरियममधूनच खरेदी करा. गुगलवर सर्च करून अशा एखाद्या एम्पोरियम किंवा आर्ट गॅलरीबाबत जाणून घेऊ शकता. जर एखाद्या फीमेल फ्रेंडला भेटवस्तू द्यायची असेल, तर आजकाल वुडन ज्वेलरी बॉक्स, रिंग कॅबिनेट, वुडन वॅनिटी बॉक्स, बँगल बॉक्स इ. चे खूप चलन आहे.

जर गोष्ट मेल फ्रेंडला गिफ्ट द्यायची असेल, तर वुडन पेन स्टँड, वुडन पियानो, वुडन टी कोस्टर, वुडन टेबल वॉच, वुडन कॅलेंडर, कार्ड होल्डर, वुडन क्लॉक इ.ची निवड करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

* वुडन शोपीसेसचे अपर पॉलिश जरूर चेक करा. ओल्ड आणि रिजेक्टेड पीसेसचं पॉलिश उडालेलं असतं. अनेक वेळा शॉपर यांची रीपॅकिंग करतात.

* रफ वुडन सरफेस, क्रॅक्स व कटची समस्या सामान्य आहे. म्हणून आयटम खरेदी करताना क्रॅक्स ल टीयरनेस आत-बाहेरून चांगल्या प्रकारे चेक करून घ्या.

* स्मॉल साइज असलेल्या बहुतेक शोपीसेसना गोंद किंवा फेविकॉलने चिकटवून आकार देऊ शकतात. जुनाट झाल्यामुळे अनेक वेळा जोड सरकू लागतात आणि त्यांच्यामध्ये गॅप येतो.

* स्वस्त किंमतीकडे आकर्षित होऊ नका. जर क्वालिटी चांगली असेल, तर किंमतीशी तडजोड करू नका.

धोकादायक ठरू शकते, दिशाभूल करणारे मेसेज पाठवणे

– नसीम अंसारी कोचर

आजकाल सोशल मिडिया सर्वात वेगाने धावणारे प्रसारणाचे माध्यम बनले आहे. ज्या वेगाने फेसबूक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, लिंकडिनसारख्या सोशल साइट्सवर मेसेज व्हायरल होतात, तेवढा वेग तर इलेक्ट्रॉनिक मिडियाही दाखवू शकत नाही. सध्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत. महिला तर सर्व कामधंदा सोडून संपूर्ण दिवस मोबाइलवरच चॅटिंग करण्यात बिझी असतात. एक मेसेज पट्कन त्यांच्या फोनवर येत नाही तोच काही मिनिटांत पूर्ण ग्रुपवर फॉरवर्ड होतो.

जोक्स, विचार, फोटो, धार्मिक संदेश, आरोग्य सल्ले, रेसिपीज आणि न जाणो काय काय सोशल साइट्सवर शेअर होत आहे. रिकामा वेळ तर आता कोणाकडेच नाही. सद्यस्थितीत २०० मिलियन यूजर्स व्हॉट्सअॅपवर सक्रिय आहेत.

व्हॉट्सअॅप सर्वांच्याच आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनले आहे. सर्वच आपले मित्र, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करतात. पण हेच व्हॉट्सअॅप सध्या फसव्या बातम्या, व्हिडिओ पसरवण्याचे माध्यम बनले आहे. सोबतच यूजर व्हॉट्सअॅपच्या अनामिक जगात अफवांचे शिकार होत आहेत. अफवा कुठून आली, कोणी पाठवली, हे कोणालाच माहीत नाही, पण अनाहूतपणे तिला फॉरवर्ड केले जाते.

खरंतर आपला हेतू आपल्या ओळखीच्यांना अमुक एका घटनेबाबत सावध करण्याचा असतो, पण नकळतपणे आपण एका निर्दोष व्यक्ती विरुद्धच्या गुन्ह्यात सहभागी होतो, जेव्हा की या अफवा पसरवणारे वाचतात. त्यांचे बिंग फोडणे कठीण होऊन जाते.

आता खैर नाही

म्हणूनच सावधान. सर्वोच्च न्यायालय विचार न करताच मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांविरोधात आता खूपच कठोर झाले आहे. नुकतेच दक्षिण भारतातील भाजप नेते एस. वी. शेखर, जे यापूर्वी एक कलाकार आणि खूप चांगले पत्रकार म्हणूनही ओळखले जायचे, त्यांना देशातील सर्वात मोठया न्यायालयाने फैलावर घेतले आणि त्यांची अग्रिम जामीन याचिकाही फेटाळली, कारण त्यांनी विचार न करताच महिलांना अपमानित करणारा एक मेसेज आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर आणि फॉरवर्ड केला.

एस. व्ही. शेखर दक्षिण भारतात भाजपचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. एप्रिल महिन्यात त्यांनी महिला कर्मचाऱ्यांसंबंधी एक अपमानजनक गोष्ट आपल्या फेसबूक अकाउंटवर शेअर केली होती, जी दुसऱ्या कुणीतरी त्यांना पाठविली होती. शेखर यांनी ती लिहिली नव्हती, तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्ह्याचा खटला दाखल झाला आणि अटकेपर्यंतची वेळ आली.

अटकेपासून वाचण्यासाठी एस. व्ही. शेखर मद्रास हायकोर्टात गेले. जिथे त्यांना चांगलेच फटकारले गेले आणि त्यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. येथेही न्यायालयाने त्यांना फैलावर घेत त्यांची याचिका रद्द केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि एम. एम. शांतनागौडार यांच्या खंडपीठाने एस. व्ही शेखरच्या वकील बालाजी श्रीनिवासन यांना सांगितले, ‘‘ते खूप मोठे अभिनेते आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण आम्हाला माहिती आहे. पण कायद्यांतर्गत कोणालाही विशेष वागणूक देता येत नाही. तुम्ही खालच्या न्यायालयात जा आणि नियमित जामीनाची मागणी करा.’’

खंडपीठाने त्यांचा अग्रिम जामीनाचा अर्ज नाकारत सांगितले की कायद्यात असे स्पष्ट आहे की चौकशी पूर्ण झाल्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच आरोपीला नियमित जामीन मिळवता येतो.

यापूर्वी मद्रास हायकोर्टाने एस. व्ही. शेखर यांनी अशोभनीय मेसेज फॉरवर्ड केल्याप्रकरणी सांगितले की आलेला मेसेज दुसऱ्याला फॉरवर्ड करणे याचा अर्थ तुम्ही त्याचा स्वीकार करता आणि त्याचे समर्थन करता. सांगण्यात काय येते ते महत्वपूर्ण आहे, पण हे कोण सांगतेय तेदेखील खूपच महत्त्वाचे असते, कारण लोक सामाजिक स्टेटस असलेल्या व्यक्तींचा सन्मान करतात.

जेव्हा एखाद्या व्यक्तीप्रमाणे एक सेलिब्रिटी अशा प्रकारचा मेसेज फॉरवर्ड करतो, तेव्हा सामान्य जनतेचा त्यावर विश्वास बसतो. हे समाजाला चुकीचा संदेश देते. शेखर यांच्या मेसेजमधील भाषा आणि वापरलेले शब्द अप्रत्यक्ष नाहीत, तर प्रत्यक्ष क्षमता असलेली अश्लील भाषा आहे, जी अशी क्षमता आणि वयाच्या व्यक्तीकडून अपेक्षित नाही.

न्यायालयाने स्पष्ट केले की आपल्या अनुयायांसाठी एक आदर्श मॉडेल व्हायचे सोडून त्यांनी एक चुकीचा आदर्श ठेवला आहे. सामाजिक भावनांसंदर्भात असे प्रकार सोशल मिडियावर केल्याप्रकरणी रोज तरुणांना अटक होत असल्याचे पाहायला मिळते. कायदा सर्वांसाठी सारखा आहे आणि लोकांचा आपल्या न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडता कामा नये. चूक आणि गुन्हा हे समान नाही. चुका फक्त मुलंच करू शकतात, ज्यांना माफ करता येते. पण हेच वयस्कर व्यक्तीने केले तर तो गुन्हा ठरतो.

फेक मेसेजचे गंभीर आव्हान

सोशल मिडियाद्वारे व्हायरल होणारे फेक न्यूज/मेसेज सरकारसाठी आता गंभीर आव्हान ठरत आहे, दुसरीकडे सामान्य जनता याचे दुष्परिणाम भोगत आहे. मागे व्हॉट्सअॅपद्वारे पसरलेल्या अफवेमुळे अनेकांचे जीव गेले होते.

महाराष्ट्रात एका जमावाने मुले पळवणारे असल्याच्या संशयावरून ५ जणांना मारहाण करून त्यांचा जीव घेतला. खरंतर ही पहिली घटना नाही. याआधीही सोशल साइट्सवर पसरलेल्या अफवांमुळे अनेकांचे जीव गेले. अशावेळी हे गरजेचे आहे की योग्य आणि चुकीच्या बातमीतील फरक ओळखा आणि भूलथापांना फसू नका.

देशात व्हॉट्सअॅपचे २० कोटी अॅक्टिव्ह यूजर्स आहेत. याद्वारे एकमेकांना पाठवण्यात येणारे कितीतरी मेसेज, फोटो आणि व्हिडिओ फेक असतात, पण विचार न करता ते शेअर केल्यामुळे व्हायरल होतात. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात की त्याचा समाजावर काय परिणाम होईल.

धोकादायक परिणाम

विचार न करताच व्हॉट्सअॅपवर मेसेज फॉरवर्ड केल्याचा किती धोकादायक परिणाम होऊ शकतो, याचे आणखी एक उदाहरण पाहा. ४ वर्षे जुना एक मेसेज अनेकांनी फॉरवर्ड केला आणि सत्य समोर आले, तेव्हा सर्वच स्तब्ध झाले.

बंगळुरूतील बाणशंकरीत विभागात राहणारे व्यावसायिक प्रशांत यांना व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला, ज्यात म्हटले होते की केपगौडा इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये एक मुलगा डोक्याला दुखापत झाल्याने दाखल आहे. त्याची ओळख पटलेली नाही. त्याच्या आईवडिलांचा शोध घेण्यासाठी हा मेसेज आणि फोटो फॉरवर्ड करायला सांगितले होते.

हा मेसेज कुणीतरी प्रशांत यांनाही फॉरवर्ड केला. यात ज्या मुलाचा फोटो होता, त्याचा चेहरा त्यांच्या भाच्याशी मिळताजुळता होता. त्यांनी लगेच बहिणीला फोन केला. मुलगा हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचे ऐकून ती खूपच अस्वस्थ झाली. तिच्या कुटुंबात खळबळ उडाली. ती पतिसह मुलाच्या शाळेत गेली. जिथे त्यांनी पाहिले की मुलगा अगदी व्यवस्थित आहे. शाळेचे प्राचार्य मात्र यामुळे नाराज झाले की सुशिक्षित असूनही ते व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलेल्या मेसेजवर विश्वास कसे काय ठेवतात?

दुसरीकडे प्रशांत त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागले, ज्याने सर्वात आधी हा मेसेज पाठवला होता. त्यांना त्या व्यक्तीचा शोध लागला, तेव्हा सत्य ऐकून ते थक्क झाले. त्या व्यक्तीने सांगितले की त्याने नवा फोन घेतला होता आणि बॅकअप रिस्टोर करत होता. व्हॉट्सअॅप सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने ४ वर्षे जुना मेसेज फॉरवर्ड केला. त्या मेसेजसोबत पाठवलेला फोटो प्रशांत यांच्या भाच्याशी मिळताजुळता होता.

सावध व्हा

तुम्हीही व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज विचार न करताच फॉरवर्ड करत असाल तर सावध व्हा, कारण याबाबत आता देशातील न्यायालये कठोर झाली आहेत.

पोलीसही आता कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यावर ती तात्काळ दाखल करुन आरोपीविरुद्ध त्वरित कारवाई करू लागले आहेत.

नुकतेच बहराइचमधील बडीहाटचे रहिवासी असलेल्या एका व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह कार्टून पाठवल्याप्रकरणी लखनौचा रहिवासी चंद्रशेखरवर केस दाखल झाली. बडीहाट येथे राहणारे शफीक अली यांनी जबानीत सांगितले की त्यांच्या मोबाइलवर एका व्यक्तीने एक आक्षेपार्ह कार्टून पाठवले. चौकशीत समजले की तो नंबर लखनौमधील अलीगंजचे रहिवासी चंद्रशेखर त्रिपाठी वापरतात. शफीक अली यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रशेखर त्रिपाठीवर धार्मिक भावना भडकवल्याचा आणि आक्षेपार्ह व्यंगचित्र पाठवल्याचा खटला दाखल करत तुरुंगात पाठवले.

नेटवरील टीप्स टाळा

सोशल मिडियावर पसरवल्या जाणाऱ्या माहितीला फसून लोक आपल्या आरोग्याशीही खेळ खेळत असल्याचे पाहायला मिळते. खासकरून सध्या विविध आजारांपासून वाचण्याचे उपाय वेगाने फॉरवर्ड होत आहेत. अनेकदा तर कॅन्सर, टीवीसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक किंवा यूनानी उपचार व्हॉट्सअॅप ग्रुपवर सर्क्युलेत होत आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महिलांचा सहभाग सर्वात जास्त असतो.

अशाच प्रकारे काही धार्मिक मेसेजही येतात. ज्यावर लिहिलेले असते की हे कमीत कमी १०० लोकांपर्यंत पोहोचवा. यामुळे तुमचे दु:ख दूर होईल. सहृदय महिलांना यामागचे कपट समजत नाही आणि त्या ग्रुप्समध्ये हा मेसेज फॉरवर्ड करतात. आतातर व्हॉट्सअॅपने ५ पेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी मेसेज फॉरवर्ड करायला बंदी घातली आहे. पण जेव्हा असे मेसेज ग्रुपवर फॉरवर्ड होतात तेव्हा शेकडो लोकांपर्यंत पोहोचतात.

अफवाच अफवा

नोटबंदीवेळी तर अफवांचा पूर आला होता. कुठे नोटांमध्ये चिप असल्याची अफवा तर कुठे गोणीत नोटा मिळाल्याची अफवा. त्याच दिवसांत एक मेसेज खूपच सर्कुलेट झाला होता की मीठ महाग होणार आहे. खऱ्याखोटयाची शहानिशा न करताच लोकांनी फोनद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पाठवणे सुरू केले. पाहता पाहता ही बातमी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि लोकांनी मिठाच्या खरेदीसाठी बाजारात धाव घेतली. दुकानदार, व्यापाऱ्यांनी याचा चांगला फायदा घेतला आणि जे मीठ २० रुपये प्रति किलोग्रॅमने विकले जात होते ते ६०० आणि ७०० रुपये किलोग्रॅमपर्यंत विकले गेले. यामागे काळाबाजार करणाऱ्यांचा हात होता. काही वर्षांपूर्वी जग नष्ट होण्याची मोठी अफवा पसरली होती. फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात याची दहशत होती. अनेकदा अफवांमुळे जातीय तणाव पसरतो आणि दंगलीची परिस्थिती निर्माण होते.

असामाजिक तत्त्व अफवांद्वारे देशाचे वातावरण खराब करू इच्छितात आणि त्यांच्या या षडयंत्राचा आपण सर्वच एक भाग बनतो, त्यांनी पाठवलेला बनावट मेसेज आपल्या ओळखीतल्यांना पाठवून फेसबूकवर तर अश्लील मेसेजेसचा भडिमार होतो. सरदार, मौलवी, महिलांवरील जोक्स, अश्लील कमेंट, अश्लील फोटोग्राफ्समुळे लोकांचे फेसबूक अकाउंट भरले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या संबंधात जी कठोर पावले उचलली आहेत ती पाहाता आता एखाद्या व्यक्तीला फेसबूक अकाउंट किंवा व्हॉट्सअॅपवर अशाप्रकारचा मेसेज आला, ज्यामुळे त्याची धार्मिक भावना किंवा श्रद्धेला तडा गेला असेल तर तो हा मेसेज पाठवणाऱ्यांविरुद्ध पोलीस तक्रार करू शकतो. म्हणूनच विचार न करताच कुठलाही मेसेज कुणाला फॉरवर्ड करू नका, भलेही मग तो जोक असेल. शिवाय व्हॉट्सअॅपची मजा किरकिरी होऊ नये आणि पोलिसांनी तुमचा दरवाजा ठोठावू नये. लक्षात ठेवा,  एकदा पोलीस केस तयार झाली की मग त्यातून मुश्किलीनेच सहिसलामत सुटता येते.

गरम पेहरावांची निगा

– अर्चना सोगानी

महागाईच्या युगात लोकर व इतर गरम पेहराव वारंवार खरेदी करणं तसं शक्य होत नाही. अशावेळी आपले जुने लोकरीचे व इतर गरम पेहराव व्यवस्थित सांभाळून ठेवून ते पुन्हा वापरात आणता येतात. सादर आहे, थंडीच्या दिवसांत गरम कपड्यांची निगा राखण्याचे काही महत्वपूर्ण उपाय :

* रूईच्या रजईत नैसर्गिक ऊब निर्माण करण्यासाठी ती २-३ तास उन्हात ठेवा.

* मेंदी वा अत्तराचा उपयोग रजईतदेखील केला जाऊ शकतो. रूई पिंजतेवेळी हे रूईत टाकल्याने रजईत अधिक ऊब येते.

* नवीन रजई व उशा भरतेवेळी थोडासा कापूर टाकल्यास ढेकूण अजिबात होणार नाहीत.

* हिना, शमामा आणि मुख्वीना नावाच्या अत्तरांचा परिणाम गरम असतो. त्यामुळे हे लोकरीच्या कपड्यांवर लावल्याने शरीराला ऊब मिळते.

* लोकरीचे कपडे वूलमार्कने सुचविलेल्या डिटर्जंटनेच धुवावेत. जर लोकरीचे कपडे चुरगळले तर ते स्टीम बाथरूममध्ये ठेवावेत.

* लोकरीचे कपडे प्रेस करण्यासाठी स्टीम आयरनचा वापर करा.

* गरम कपडे वापरण्यापूर्वी ड्रायक्लीन करून घ्या अन्यथा ते मळामुळे फाटू शकतात.

* ओलसर वा दमट गरम कपड्यांना इस्त्री करू नका. असं केल्याने त्यांची चमक फिकी पडू शकते.

* गरम कपडे ब्लीच करू नका अन्यथा त्यांचा रंग उडू शकतो.

* लोकरीचे कपडे सुकवितेवेळी अस्तरची काळजी घ्या अन्यथा ते लटकू लागतील.

* लोकरीचे कपडे उलटे करून धुवा आणि सुकवा.

* दमट जागी गरम कपडे कधीच ठेवू नका अन्यथा ते खराब होऊ शकतात.

* लोकरीने विणलेलं स्वेटर हाताने धुऊ शकता परंतु शिवलेल्या लोकरीच्या कपड्यांना ड्रायक्लीन करून घ्या.

* लोकरीचे कपडे जाड टॉवेलमध्ये लपेटून त्यांचा ओलसरपणा कमी करून नंतर सरळ पसरवा.

* तुमच्या गरम कपड्यांवर कॉफी पडली आणि डाग पडले असतील, तर तुम्ही अल्कोहोल आणि पांढरं व्हिनेगर समप्रमाणात घेऊन डाग असलेला भाग त्यामध्ये बुडवा. नंतर डाग असणाऱ्या जागी थोडंसं घासून स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. डाग निघून जाईल.

* जर गरम कपड्यावर तूप, सॉस वा ग्रीसचा भाग लागला तर ते चमच्याने खरडवा. त्यानंतर कपड्याला ड्रायक्लीन फ्ल्यूडमध्ये भिजवून हलकेसे रगडा. डाग गायब होतील.

* अंड, दूध वा शाईने लोकरीचे कपडे खराब झाले असतील तर व्हाइट स्पिरिटमध्ये एक कपडा बुडवून डाग रब करा. नंतर पांढरं व्हिनेगर वापरून धुवा.

* जर तुमच्या गरम कपड्यांवर अल्कोहोल पडलं तर ते त्वरित स्वच्छ कपड्याने पुसून गरम पाणी आणि सर्जिकल स्पिरिटने धुवा. अल्कोहोल निघून जाईल.

अमावस्येच्या नावावर अंधश्रद्धेचा विळखा

* श्रीमती प्रतिभा अग्निहोत्री

उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या जवळ असलेल्या ५२ कुंडांत वर्षातून दोनदा सोमवती अमावस्या आणि शनिचरी अमावस्या यादिवशी खूप गर्दी असते. इथे अशी अंधश्रद्धा आहे की इथे स्नान केल्याने भूतप्रेत, हडळ, पिशाच या बाधांचा नाश होतो.

१७ मार्च, २०१८ रोजी शनिचरी अमावस्येची मी प्रत्यक्षदर्शी होते. मी इथे फार विचित्र घटना घडताना पाहिल्या. सादर आहे त्यावरचा हा रिपोर्ट.

दृश्य १

एका २५ वर्षीय नवयुवतीला तिचे कुटुंबीय जबरदस्तीने पाण्यात बुडी घ्यायला भाग पाडत होते. त्यांच्यासोबत असलेला तांत्रिक त्यांना मार्गदर्शन करत होता पण ती युवती जोरजोरात ओरडत होती, ‘‘मला सोडा, मी या पाण्यात स्नान करणार नाही. किती घाणेरडा वास येतोय पहा या पाण्यातून. मला काहीही झालेले नाही. मी आजारी आहे… काही भूतप्रेत वगैरे नाही… प्लीज मला सोडा.’’

त्या नवयुवतीचे बोल ऐकून त्यांच्यासोबत आलेला पंडित म्हणाला, ‘‘फारच जबरदस्त आणि वयस्कर हडळीचा हिच्यावर प्रभाव आहे, जराही कमजोर पडू नका. स्नान करायला लावा. त्यानंतर मी सर्वकाही ठीक करीन.’’

पंडिताच्या सांगण्यावरून घरातील मंडळी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तिला बुडी मारायला भाग पाडण्यात व्यस्त झाले आणि तांत्रिक आपल्या तंत्रमंत्राच्या पूजेत व्यस्त झाला. घरातील मंडळी दानदक्षिणा तयार करू लागले.

दृश्य २

एका ३० वर्षीय महिलेला तिच्या घरातले लोक महागडया गाडीतून घेऊन येतात. हसतमुख, सर्वसामान्य दिसणाऱ्या त्या महिलेकडे पाहून कोणाला वाटणारही नाही की तिला काही त्रास असेल. परंतु जशी तिने कुंडात बुडी घेतली आणि पाण्यातून बाहेर आली, तेव्हा तिचे संपूर्ण केस मोकळे होते आणि मग ती जोरजोरात ओरडायला लागली.

तिच्याबरोबर आलेला तांत्रिक मोठमोठया मोत्यांच्या माळा परिधान केलेल्या त्या महिलेच्या तोंडावर काळा कपडा टाकून मंत्र म्हणत त्या महिलेचे केस पकडून मोठया आवाजात तिला विचारतो,

‘‘बोल, कोण आहेस तू? का त्रास देत आहेस?’’

‘‘मी याची शेजारीण आहे, जिचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला होता,’’ महिलेच्या आतील भूत उत्तर देते.

‘‘बोल तू का त्रास देत आहेस?’’

‘‘आता त्रास देणार नाही पण मला वचन हवे.’’

‘‘बोल काय?’’

‘‘सासरची माणसे मला चक्की चालवायला लावणार नाहीत, मला शेतावर पिकाची कापणी करायला पाठवणार नाहीत, नवरा माझ्यावर हात उगारणार नाही.’’

‘‘होहो, आम्हाला सर्व गोष्टी मंजूर आहेत. तू फक्त हिचा पिच्छा सोड,’’ सासरची माणसे हात जोडून घाबरलेल्या स्वरात उत्तर देतात.

‘‘बस, यापुढे मी त्रास देणार नाही.’’

यानंतर काही वेळातच ती महिला एका सर्वसामान्य महिलेसारखी वागूबोलू लागते. तांत्रिक आपली तगडी फी वसूल करून तिथून निघून जातो.

दृश्य ३

एका ३५ वर्षीय युवकाला घेऊन काही पुरुष आलेले असतात. त्याला पकडून जबरदस्ती कुंडात बुडी घ्यायला लावत असतात. जसा तो युवक कुंडातून बाहेर येतो जोरजोरात आरडाओरडा आणि विचित्र आवाज काढायला लागतो. तांत्रिक जवळच शेणी जाळून मंत्रोच्चार करत काही गोष्टी आगीत टाकत असतो. युवक तांत्रिकावरच हमला करण्यास सज्ज झालेला असतो. तेव्हा तांत्रिक त्याच्या पाठीवर दांडयाने ३-४ वेळा प्रहार करतो आणि मानगूट पकडून म्हणतो, ‘‘बोल, आता याला त्रास देशील?’’

‘‘मला सोडा. मी आता काहीही करणार नाही.’’

तांत्रिक त्याला सोडून देतो आणि तो युवक हार मानून बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळतो.

तांत्रिक युवकाच्या कुटुंबीयांना सांगतो, ‘‘तुम्ही एकदम निश्चिंत होऊन घरी जा.’’

हिंदू पाखंडयांचा खुला खेळ

ही तिन्ही दृश्ये सर्वसामान्य जनतेत पसरलेल्या अंधश्रद्धेची साक्षात उदाहरणे आहेत. कशाप्रकारे आम्ही भारतीय काल्पनिक,अविश्वसनीय समजुती आणि कल्पनांवर विश्वास ठेवतो. तांत्रिक आणि भोंदूबाबांद्वारे कशाप्रकारे भोळयाभाबड्या जनतेला आपल्या सापळयात ओढले जाते याचेही साक्षात उदाहरण आहे.

अशा प्रकारच्या तांत्रिकांच्या फसवणुकीचे बळी झालेले माझे एक परिचित आपल्या सोबत घडलेली घटना अशी सांगतात :

‘‘माझी १४ वर्षीय लहान बहीण एकेदिवशी अचानक बेशुद्ध पडली. तिचे हातपाय थरथर कापत होते आणि तिच्या तोंडातून फेस येत होता. तोंडातून आवाजही येत होते. काही वेळाने तिच्या तोंडावर पाण्याचे हबकारे मारल्यावर ती ठीकही झाली. पण हे पुन्हा पुन्हा होऊ लागले. एकदा माझ्या गावी राहणाऱ्या मावशीसोबतही असेच झाले होते. मावशीने हा प्रेतात्म्याचा प्रभाव आहे असे सांगितले आणि माझ्या आईवडिलांना अनेकदा तांत्रिकाकडे जायला लावले.

तांत्रिक प्रत्येक वेळी आपली तगडी दक्षिणा घेत असे आणि पुढच्या वेळेस पूर्ण बरी होईल असे आश्वासन देत असे. पण सतत २ वर्षे जाऊनही काहीच परिणाम होत नव्हता. माझ्या बहिणीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होऊ लागली होती. एक दिवस आमच्या लांबच्या नात्यातील एक डॉक्टर आमच्या घरी आली असता ती बहिणीला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेली.

‘‘डॉक्टरांनी आकडी येण्याचा आजार आहे असे निदान केले आणि पुढे बरेच दीर्घ उपचार करून माझी बहीण पूर्णपणे ठीक झाली.’’

वरती सांगितलेल्या दृश्य २ प्रमाणे ग्रामीण महिलांचे जिथे अत्याधिक शोषण केले जाते, त्या या भूताप्रेताचा आपल्या काम न करण्याचे शस्त्र म्हणूनही वापर करतात, कारण सर्वसाधारणपणे त्यांचे सासरच्या मंडळींसमोर काही चालत नाही, पण भूतप्रेतांमुळे त्यांची प्रत्येक गोष्ट सहज स्वीकारली जाते.

तांत्रिक नाही डॉक्टरची गरज

मानसशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ समुपदेशक राकेश डांगी यांच्या मते, ‘‘वास्तविक हे भूतप्रेत नाही, पण माणसाच्या मेंदूत खोलवर रुतून बसलेला हा एक भ्रम आहे. त्यांच्या याच भ्रमाला कुटुंबीयांकडून भूतप्रेत आणि पिशाच अशाप्रकारे प्रस्तुत केले जाते तेव्हा त्या व्यक्तिच्या मनातही मग हीच धारणा निर्माण होते.

‘‘जेव्हा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते अज्ञानापायी तांत्रिक आणि पंडितपुजाऱ्यांकडे जातात, तेव्हा ते आपल्या कमाईसाठी भूतप्रेत बाधा झाली आहे याचे समर्थनच करतात. ज्यामुळे हा समज अधिकच पक्का होतो. खरंतर या प्रकारच्या सर्व व्यक्ती या मानसिक आजारांच्या शिकार असतात. आणि त्यांना कुठल्याही तांत्रिकाची नव्हे तर मनोचिकित्सकाची गरज असते.’’

अमावस्येच्या दिवशी अशाप्रकारची भयानक दृश्ये पाहून माझ्या अंगावर तर काटाच उभा राहिला. सर्वसामान्य जनतेचे अज्ञान आणि अंधश्रद्धा याचा फायदा घेण्यासाठी तांत्रिकांद्वारे रचला गेलेला हा एक असा सापळा आहे, ज्यातून बाहेर पडण्यासाठी माणसाला भ्रमासारखी भावना आपल्या मनातून बाहेर करता आली पाहिजे. आपल्या तर्क शक्तीचा विकास करून स्वस्थ मानसिकता विकसित करावी लागेल नाहीतर अशा प्रकारच्या अमावस्या वर्षानुवर्षे आपला प्रभाव दाखवत राहतील.

जोपर्यंत हिंदू धर्माच्या रक्षणाच्या नावावर त्यातील साऱ्या चुकीच्या धारणांचे विज्ञान संमत प्रयत्न सुरू राहतील, यापासून सुटका मिळणे अशक्य आहे. सध्या मात्र जनतेचा पैसा जोरजबरदस्तीने या अंधश्रद्धेच्या प्रचारावर वाया जात आहे आणि देशाच्या तार्किक विचारसरणीला चिरडले जात आहे.

हृदयस्पर्शी गोष्ट

३०-३५ वर्षांपूर्वीची घटना आहे. चांगलं घरदार बघून खूप आधीच माझं लग्न झालं. मनात शिक्षण घेण्याची इच्छा दाबून १०वीसुद्धा पास करू शकले नाही. कारण आमच्या गावात मुलीचं लग्न लवकर करणं चांगलं मानलं जायचं.

सासरी खूप मोठा परिवार होता, पण इतकी शिस्त की आपलं अस्तित्व खुंटीवर टांगून ठेवावं लागलं. सासूबाई शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या होत्या आणि माझ्या पुढील शिक्षणाच्या विरोधात होत्या. माझ्या पतीशीसुद्धा मला फार बोलायला वेळ मिळत नसे. पण माझ्या शिकायच्या इच्छेबाबत त्यांना नक्की माहीत होतं.

काही महिन्यांनी मी माझ्या माहेरी आले. माझ्या वाढदिवशी मी माझ्या पतिची व्याकुळ होऊन वाट बघत होते. ते रात्री साधारण १० वाजता आले. माझा चेहरा उतरला होता. जेवणही थंड झालं होतं. गरम होता तो माझा मूड. त्यामुळे ते येताच मी संतापले, ‘‘आत्ता आठवण आली वाढदिवसाची? इतके घाबरट होतात तर लग्न कशाला केलं?’’

ते गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘‘भेट नाही बघणार का?’’ भेट बघून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी १०वीच्या वर्गाचा अॅडमिशन फॉर्म आणला होता. ते म्हणाले, ‘‘खूप मुश्किलीने मनवलं सगळयांना.’’

‘‘माझ्या इच्छेचा तुमच्या मनात इतका मान आहे, हे तर मला माहीतच नव्हतं.’’ असं म्हणून मी त्यांना मिठीच मारली.

ऑनलाइन पूजा लुबाडणूकीचे माध्यम

– मनीष अग्रहरि

विकसित देशांच्या तुलनेत भारत विकासाच्या बाबतीत भलेही मागे पडत असेल, पण पुजाऱ्यांनी धर्माच्या मदतीने विधी, पूजापाठ आदींना बरेच उंचीवर नेऊन ठेवले आहे. पूजापाठ आणि विधींचा पगडा सामान्यांवर जस जसा वाढू लागला तशी पुजाऱ्यांचीही भरभराट होत गेली.

१९९१ सालापासून देशात उदारीकरण आणि खासगीकरणाचे युग सुरू झाले. यामुळे लोकांचे स्थलांतर आणि रोजगारही वाढला. अशा परिस्थितीत लोकांचा पूजापाठ आणि धार्मिक विधींवरील विश्वास उडू लागला. यामुळे परिश्रम न करता फुकट खाणाऱ्या पुजाऱ्यांचा धंदा मंदावला. त्यामुळे त्यांनी फसवणुकीसाठी नवे माध्यम आत्मसात केले, जे ऑनलाइन दर्शन, आरती, पूजापाठ आणि पिंडदान, तर्पण, श्राद्धासारख्या विधींच्या रूपात पाहायला मिळत आहे. स्काईप, गुगल, फेसबुक चॅटसारख्या अॅप्लिकेशन्सशी कनेक्ट झालेले हे ऑनलाइन पुजारी ऑनलाइन खिसे कापण्यात तरबेज आहेत.

अर्थ स्पष्ट आहे की पुजारी वर्ग प्रत्येक स्तरावर पूजापाठ कायम ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हद्द म्हणजे सरकारही या कामासाठी मदत करीत आहे. मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्वच उरत नसले तरी ऑनलाइन पूजापाठ पॅकेजद्वारे लाइव्ह पिंडदानातून मोक्ष मिळवून देण्याचा धंदा जोरात आहे. प्रसिद्ध मंदिरांची आरती व दर्शन ऑनलाइन दाखवून आधुनिक पुजारी आपले खिसे भरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी ऑनलाइन पूजेसाठीची ऑफर देणाऱ्या पुजाऱ्यांपासून सावध राहाणेच योग्य ठरेल.

लाइव पिंडदान

अलिकडेच अलाहाबाद, आताच्या प्रयागराज येथील काही पुजाऱ्यांनी लाइव्ह पिंडदानाची ऑफर सुरू केली. येथील पुजाऱ्यांनी सांगितले, ‘‘व्हिडीओ कॉलिंगद्वारे लाइव्ह पिंडदान करण्यात येते. विधीवेळी एक व्यक्ती मोबाइल घेऊन उभा राहातो. सर्व त्यावर दाखवतो. यामुळे दूर राहणारे यजमानही ते सहज पाहू शकतात. मोबदल्यात आम्ही त्यांच्याकडून बक्कळ रक्कम वसूल करतो.’’

धर्माने बनवले पुजाऱ्यांना धनवान

पुजारी अनेक प्रकारे धर्माच्या नावे पैसे उकळतातच पण, खरी समस्या सुशिक्षित श्रीमंत लोकांच्या विचारसरणीची आहे, ज्यांचे खिसे गरम आहेत आणि धर्माला घाबरून ते पैसे देतात. या श्रीमंत यजमानांना पाहून गरीब समाजही अशाच प्रकारे पुजाऱ्यांसमोर नतमस्तक होतो. हेच कारण आहे की लाइव्ह फसवणूक करणाऱ्या पुजाऱ्यांची मजा होत आहे.

ऑनलाइन पिंडदानाचे अलिकडचेच उदाहरण पाहा. प्रयागराजचे पुजारी विजय पांडेय यांना जयपूरच्या भोलेंद्र राजपूत, विरेंद्र कुमार आणि भैरो सिंह यांनी पिंडदानासाठी २१-२१ हजार रुपये पाठविले. पुजारी आशुतोष पालीवाल यांना मुंबईचे विरेंद्र पांडेय, मोहनीश भार्मा, भयाम द्विवेदी, नवी दिल्लीच्या विकेश, छिंदवाडाच्या विंकेश्वर सिंह चौहान यांनी हजारो रुपये पाठवून ठरलेल्या तिथीला पिंडदान करून घेतले.

हे विचार करण्यासारखे आहे की जिथे एक मजूर दिवसरात्र मेहनत करूनही दरमहा २० हजार रुपये कमावू शकत नाही तिथे पिंडदान करणारे पुजारी फक्त काही तासांत २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा गंडा सुशिक्षित माणसांना घालतात. स्वत: कोणतेही काम न करणारे हे पुजारी विधीच्या नावाखाली सुशिक्षित माणसालाही धर्माची भीती दाखवून कंगाल करत आहेत.

ऑफरवर सरकारची मोहोर

अलिकडेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाळ मंदिरात दर्शन आणि आरतीसाठी ऑनलाइन बुकिंग करण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले आहे. तेथे भस्म आरतीचे प्रशासक प्रदीप सोनी यांनी दर्शन काउंटरला त्वरित २५० रूपयांचे पास तयार करण्याचे निर्देश दिले होते. म्हणजेच महाकाळ मंदिर प्रशासन भक्तांकडून दर्शनासाठी २५० रूपयांचे शुल्करूपी धन गोळा करण्यात गुंतले होते.

उघड आहे की आणखी जास्त वसुलीसाठी ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असेल. इतकेच नाही तर महाकाल मोबाइल अॅपही सुरू करण्यात आले. या माध्यमातून सुरुवातीला ऑनलाइन दर्शन दिले जात होते पण, नंतर लगेचच बुकिंग करण्यासाठी ते बंद करण्यात आले.

अशाच प्रकारे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या चौका लगतच्या काली मंदिरात २०१८च्या नवरात्रीला सजावटीसाठी २,१०० रूपयांची बुकिंग केली जात होती. अन्य एका प्रकरणात राजस्थानच्या पुष्करमधील ब्रह्मा मंदिरात ५,१०० रुपये ऑनलाइन जमा करून अभिषेक करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मंदिरात व्हीआयपींच्या दर्शन व्यवस्थेसाठी बुकिंग सुरू झाले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम मंदिर विकासासाठी वापरली जाईल असा दावा केला जात आहे. आश्चर्य म्हणजे पुष्करमध्ये ज्या वेळी हे सर्व निर्णय घेण्यात आले त्यावेळी मंदिराचे व्यवस्थापन एका सरकारी समितीकडे होते. जिचे अध्यक्ष तत्कालीन जिल्हाधिकारी होते.

मृत्यूनंतरही भीती

खरेतर, हिंदू धर्मग्रंथांनी लोकांना इतके भयभीत केले आहे की मृत्यूनंतर जिथे कुणाचे अस्तित्वच उरत नाही त्या वेळेचा विचार करून लोक घाबरतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार, कुटुंबातील आप्ताने मुखाग्नी दिल्याशिवाय मृत व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. पण पुजाऱ्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी नियमात बदल केला आहे जसे की आप्त अंतिम संस्कार करू शकत नसेल तर ब्राह्मण अंतिम संस्कार करू शकतात. यामुळे मृतात्म्याला मोक्ष मिळण्यापासून कुठलीच अडचण येत नाही. अशा प्रकारे ब्राह्मणाच्या मदतीने मोक्ष मिळत असल्याची खात्री गरूड पुराण आणि स्मृती पुराण देते. मृत्यूनंतर मोक्ष मिळवून देण्यासाठी देशातील प्रमुख धार्मिक शहरांच्या हायटेक पुजाऱ्यांसोबतच आता अशा बऱ्याच वेबसाइट्स आणि मोबाइल अॅप्स आहेत जे अशा प्रकारांचा खुलेआम प्रचार करीत आहेत.

पुजाऱ्यांसोबत सरकार

केंद्र सरकारने २०१६मध्ये टपाल खात्याच्या माध्यमातून सर्व निवडक टपाल कार्यालयांमधून गंगाजल विकण्याची घोषणा केली होती. जेणेकरून गंगोत्रीसारख्या शहरांतून ऑनलाइन बुकिंग करून कोणतीही व्यक्ती गंगाजल मिळवू शकेल. पाटण्यातील जीपीओसह तत्कालीन मंत्री रविशंकर प्रसाद, मनोज सिन्हा, रामकृपाल यादव यांच्या उपस्थितीत सरकारने गाजावाजा करीत टपाल कार्यालयांमधून गंगाजल विक्री सुरू केली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी माध्यमांना सांगितले, ‘‘टपाल खाते ही आपली पुरातन संस्था आहे आणि गंगा ही आपली सर्वोच्च श्रद्धा आहे. संस्थेच्या सहकार्याने श्रद्धेला घरोघरी पोहोचवले जाईल.’’

उल्लेखनीय आहे की वर्तमानात भाजप शासित राज्यात धार्मिक भावनांना खतपाणी घालण्यासाठी सरकार धार्मिक यात्रा व धार्मिक कार्यक्रमांवर कोटयवधी रुपये खर्च करीत आहे. हरियाणा सरकारने गीता महोत्सवासाठी १०० कोटी रुपये खर्च केले आहेत. केंद्र सरकारने प्रयागराजच्या कुंभासाठी १,१५० कोटी रुपये मंजूर केले. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने २०१९च्या अर्धधकुंभासाठी २,५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. मध्य प्रदेश सरकार तर देशाबरोबरच परदेशातील धार्मिक यात्रांसाठी पैसे देते.

मात्र, पंजाबच्या काँग्रेस सरकारने ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना’ बंद करून एक चांगली सुरुवात केली आहे. अन्य राज्यातील सरकारनेही पंजाब सरकारचे अनुकरण करणे योग्य ठरेल. एका धर्मनिरपेक्ष देशाने अशा प्रकारे धार्मिक भावनांना खतपाणी घालून जनतेच्या कष्टाचा पैसा लुटू नये. उलट यातून शिल्लक राहिलेल्या निधीचा वापर शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी केल्यास अधिक चांगले होईल. दुसरीकडे लोकांनी पुजाऱ्यांनी पसरवलेल्या ऑनलाइन पूजापाठ, विधींच्या जाळयात अडकण्यापासून दूर राहावे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें