- गरिमा पंकज

दिवाळीच्या दिवशी बाह्य अस्वच्छतेसोबत मनातील मलिनता व अंधार दूर लोटणंही तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे सकाळच्या वेळी दवबिंदू सूर्यप्रकाश परावर्तित करतात, त्याचप्रमाणे आपली मन:स्थितीसुद्धा चेहऱ्यावर दिसून येते. मग आपलं मनही सकारात्मक भावनांनी प्रकाशमान करूया, जेणेकरून त्याचं प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावरही झळकू लागेल व ही दीपावली आपल्या सर्वांसाठी नवीन प्रकाशाचं, नवीन तेजाचं द्योतक ठरेल.’’

मनात अंधार अन् मलिनता पसरवणारे काही प्रमुख भाव हे आहेत.

संशय : संशयाचे बळी आपण सगळेच होत असतो. खासकरून स्त्रिया थोड्या जास्तच संशयी असतात.

विल्यम शेक्सपिअर म्हणतो की आपला संशय आपल्याला सर्वात जास्त फसवतो. यामुळेच आपल्या हातातून ते सारे निसटून जाते, जे आपण सफलतेने मिळवू शकत असतो. मग दिवाळीच्या या मंगलप्रसंगी आपण आपल्या मनातून, डोक्यातून हरतऱ्हेचा संशय दूर करून पूर्ण विश्वासाने आयुष्याच्या या प्रवासाचे मार्गक्रमण करूया.

भीतिला दूर पळवून लावा : फॉर्म्यूला वन कार रेसर, नारायण कार्तिक याचं म्हणणं आहे की, ‘‘जीवनात भीतिला कुठलेही स्थान नाही. मी भीतिशी मैत्री केली आहे. भीतिची जागा आता विश्वासाने घेतली आहे.’’

वास्तविक, जोपर्यंत आपल्याला आपल्या शक्तीचा अंदाज नसतो किंवा आपल्या मनात एखाद्या गोष्टीचं भय निर्माण झालेलं असतं, तेव्हा आपण उगीचच घाबरू लागतो. अज्ञान व अंधश्रद्धेची धुंदी आपल्या डोळ्यांसमोर पसरते. वास्तव आपल्याला समजून येत नाही आणि मग आयुष्य आपल्याला आयुष्याप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यातून आपण नकारात्मकता व भीती फेकून दिली पाहिजे. अज्ञानामुळे भीतिचा जन्म होतो आणि अडाणीपणा अंधश्रद्धेला जन्म देतो. मग आपण घाबरू लागतो की असे तर नाही ना होणार किंवा तसे झाले तर. यासाठी हेच योग्य आहे की ही भीती आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून हद्दपार करून टाकू व मनात विश्वासाचे दिप प्रज्वलित करू.

क्रोध : मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे राग, क्रोध आणि या रागाचा जन्म होतो अहंकारामुळे. रागात व्यक्तिचा स्वत:वरील ताबा सुटतो. यामुळे तो स्वत:ला शारीरिक त्रास तर करून घेतोच, पण नात्यांमध्येही यामुळे दरी निर्माण होते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...