कमी सेक्सचे साईड इफेक्ट

* पूनम अहमद

एक व्यक्ती आपल्या आयुष्यात ५,७७८ वेळा सेक्स करते, असं म्हटलं जातं. तसंही प्रत्येक व्यक्तीची खाजगी बाब आहे, तिची आवडनिवड आहे की ती किती वेळा सेक्स करते. परंतु सेक्सची उणीव तुमच्या शरीरावरती काय प्रभाव टाकते, चला, जाणून घेऊया :

एक्सपर्टचा सल्ला : तुमचं सेक्स ड्राइव्हसाठी म्हणू शकता की हे ‘युज इट अँड लूज इट’ची केस होते. ‘‘जी लोकं सेक्सपासून दूर राहतात ती खूप सुस्त राहतात आणि हळूहळू त्यांची सेक्सची इच्छा कमी होत जाते. माझे क्लाएंट्स स्वत: सांगतात की ‘आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माईंड’ची गोष्ट या केसमध्ये योग्य बसते,’’ हे म्हणणं आहे सैरी कूपरचं जे सेक्स थेरेपिस्ट आहेत.

जास्त अंतर योग्य नाही : जेव्हा काही प्रौढ स्त्रिया दीर्घ काळानंतर सेक्स करतात, तेव्हा त्यांना ल्यूब्रीकेशनची समस्या येते. वैजाईनल वॉल्स लूज होतात, एस्ट्रोजन हार्मोन कमी होतं. डॉक्टर लॉरेन सांगतात, ‘‘२० वा ३० वर्षाच्या युवती सेक्स करत नसल्या तरीदेखील त्यांचे एस्ट्रोजन हार्मोन पर्याप्त असतं, त्यांचे टिशूज हेल्दी राहतात. परंतु ६० वर्षे वयाच्या स्त्रियांसोबत असं होत नाही.’’

नियमित करा सेक्स : सैरी म्हणते की, ‘‘ज्या स्त्रिया मेनोपोजच्या जवळ असतात आणि सेक्सपासून दूर राहतात तेव्हा त्यांचं वय वाढतं तसं वैजाइनल वॉल्स लूज होतात आणि त्या जेव्हादेखील सेक्स करतात तेव्हा, त्यांना खूप पेन होतं. मेनोपोजच्यावेळी वेजनाइल हेल्थकडे लक्ष देण्यासाठी नॉर्थ अमेरिकन मेनोपोज सोसायटी नियमित सेक्सचा सल्ला देते.’’

शरीरावर होतो परिणाम : ही गोष्ट विचित्र वाटू शकते, कदाचित विश्वास ही बसणार नाही परंतु पिरियडच्यावेळी सेक्सने मेन्स्ट्रुअल क्रांटम कमी होतात. डॉक्टर स्ट्रेचरचं म्हणणं आहे की, ‘‘पिरियडच्यावेळी सेक्सवेळी एंडोर्फीन्स वाढतात, ज्यामध्ये मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. युटरस एक मास पेशी आहे आणि ऑरगॅझमच्यावेळी रक्तप्रवाह वेगाने होतो ज्यामुळे पिरियडच्यावेळी होणारा क्रांटम कमी होतो.’’

औषध आहे सेक्स : सेक्स तुम्हाला कोणत्याही संक्रमणापासून वाचवतं. जर्नल अमेरिकन फॅमिली फिजिशियनच्या नुसार सेक्श्युअल इंटरकोर्समध्ये कमी येऊ देऊ नका. हे यूटीआय आणि एसटीडीपासून दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतं.

पुरुषांमध्ये कमजोरी : ‘युज इट आणि लूज इट’च्या फॉर्म्युलानुसार एका अभ्यासातून सिद्ध झालं आहे की सेक्सच्या कमीमुळे पुरुषांमध्ये शिघ्र स्खलनाची शक्यता वाढते. प्रौढ पुरुषांमध्ये ही गोष्ट अधिक पाहायला मिळते.

तणाव करतो दूर : जर तुमच्या आयुष्यात सेक्सची कमी असेल तर तुम्ही तणावात राहू शकता. नियमित सेक्सने तणाव कमी होतो. याच्या कमतरतेमुळे ब्लड प्रेशरदेखील हाय होऊ शकतं. सोबतच इतर विविध प्रकारचे त्रास होऊ शकतात. या गोष्टीवरती लक्ष देत राहा की तुमच्या जीवनातील धावपळ, व्यस्ततेच्या दरम्यान सेक्स हरवलं तर नाही आहे ना. आयुष्यचं हे एक महत्त्वाचं अंग आहे.

शारीरिक आणि मानसिक फिटनेसमध्ये सेक्सचं महत्त्वाचे योगदान आहे. याला कमी समजू नका. सेक्स एक योग्य व्यायामाप्रमाणे तुमच्यासाठी लाभदायक आहे. कारण या दरम्यान तुमच्या सर्व मासपेशी ताणतात आणि मोकळया होतात. प्रेमाच्या या क्षणाच्या दरम्यान तुम्ही तुमच्या साथीदारासाठी प्रेम आणि महत्त्वपूर्ण होण्याची अनुभूती तुमची आत्मप्रतिष्ठादेखील वाढवते.

बनावट सौंदर्याच्या शिकार होऊ नका

* गरिमा पंकज

नवीन वर्ष, नवी पहाट, नवीन इच्छा आणि सर्वात सुंदर दिसण्याची इच्छा. भलेही सोहळा कोणताही असो आणि पार्टी कुठेही असो, सर्वांत सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. काही मुलींना निसर्गानेच अतुलनीय सौंदर्य दिलेले असते तर काहींना त्यांच्या शारीरिक कमतरतांशी तडजोड करावी लागते. या उणीवा दूर करण्याच्या किंवा त्याहूनही सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात अनेकदा त्यांना मोठा फटका बसतो.

तुम्हीही या नवीन वर्षात स्वत:ला अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न जरूर करा, पण अतिशयोक्ती नकोच. याचा अर्थ असा की, आपल्या नैसर्गिक सौंदर्याशी अशा प्रकारे छेडछाड करू नका की, त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होईल.

अशा अनेक नोकऱ्या किंवा काम असते जिथे महिलांना नीटनेटके दिसणे गरजेचे असते आणि याच नादात त्यांना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागते. उदाहरणार्थ, हवाई सुंदरींना अनेकदा १२ तासांपेक्षा जास्त काळ उंच टाचांच्या चपला घालाव्या लागतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळेच नुकताच एक निर्णय घेण्यात आला, त्यानुसार, युक्रेनच्या स्काय अप एअरलाइन्सच्या महिला क्रु मेंबर्स आता पेन्सिल स्कर्ट, हाय हिल्स आणि ब्लेझरऐवजी आरामदायी ड्रेस पँट, सूट आणि स्नीकर्समध्ये दिसतील.

अशाच प्रकारे अभिनेत्रींना तासन्तास पूर्ण मेकअपमध्ये राहावे लागते, त्यामुळे त्यांचा चेहरा खराब होतो. करीना कपूरचाच चेहरा घ्या, अलीकडच्या काळात तिचे असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये तिचा चेहरा मेकअपशिवाय खूपच खराब दिसत आहे. इतर अनेक अभिनेत्रींसोबतही असेच घडले आहे. वास्तविक, वर्षानुवर्षे सतत मेकअप केल्यामुळे त्वचेचे नुकसान होते.

अशाच प्रकारे ब्रेस्ट इम्प्लांटसारख्या कृत्रिम सौंदर्यामुळेही अनेकदा महिलांचे आरोग्य बिघडते. कधी महिला जाणूनबुजून तर कधी वर्क कल्चरमुळे पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्वत:ला अधिक सुंदर, आकर्षक आणि कामुक बनवतात. सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी मुली काहीही करायला तयार असतात.

काही शस्त्रक्रियांवर करोडो रुपये खर्च करतात तर काही अनेक प्रकारच्या क्रीम्स आणि औषधे खरेदी करतात. स्वस्तच्या नादात अनेक मुली स्वत:चे खूप नुकसान करून घेतात. अनेकदा आधीच सुंदर असलेल्या अनेक मुली अधिक सुंदर दिसण्याच्या नादात आपला चेहरा आणि आयुष्य उद्धवस्त करून घेतात.

सौंदर्य वाढण्याऐवजी ठरली चेष्टेचा विषय

असेच काहीसे इंग्लंडमधील लँकशायरमध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय ऑलिव्हिया मॅककॅनसोबत घडले. व्यवसायाने हवाई सुंदरी असलेल्या ऑलिव्हियाने तिच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ओठांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, मात्र शस्त्रक्रियेनंतर तिचे ओठ तिप्पट मोठे झाले.

ऑलिव्हियाचा चेहरा पाहून लोक हसू लागले. तिची चेष्टा करू लागले. खरेतर, २१ वर्षीय हवाई सुंदरी ऑलिव्हियाने १० हजार रुपयांमध्ये तिच्या ओठांची शस्त्रक्रिया करून घेतली होती. तिला थोडेसे मोठे ओठ हवे होते. सौंदर्य तज्ज्ञांनी सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर तिच्या ओठांवरची सूज कमी होईल आणि तिचे ओठ नैसर्गिकरित्या सुंदर दिसतील, पण असे झाले नाही. सुंदर दिसण्यासाठी तिने शस्त्रक्रिया केली खरी, पण या शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा विद्रुप होईल आणि तिचे ओठ तिप्पट मोठे होतील याची तिला कल्पना नव्हती.

शस्त्रक्रियेनंतर, ऑलिव्हियाच्या ओठांवर फोड आले होते जे खूप वेदनादायक होते. अनेक महिने तिची अवस्था अशीच बिकट होती. त्यानंतर हळूहळू ती थोडी बरी झाली. ऑलिव्हियाने सुंदर दिसण्यासाठी तिच्या ओठात आधीच फिलर्स लावले होते.

बनावट सर्जनची लबाडी

स्वत:ला बार्बी सर्जन म्हणवणारी ओलगिसा अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असे. त्याचवेळी मुलींना तिच्यासारखे सुंदर बनवण्याचे आमिष दाखवून प्लास्टिक सर्जरीसाठी प्रवृत्त करत असे. तिच्याकडे या व्यवसायाची कोणतीही पदवी नव्हती. परिणामी, ओलगिसाचे अनेक रुग्ण आज अत्यंत वाईट अवस्थेत आहेत.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ओलगिसाची छायाचित्रे पाहून ती प्रभावित झाली. त्यानंतर तिला भेटली आणि स्वत:चे नाक तसेच भुवया उंचावण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास तयार झाली. ओलगिसाने तिची शस्त्रक्रिया केली.

मात्र त्यानंतर तिच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला जळजळ सुरू झाली. याचा परिणाम असा झाला की, तिला ७ दिवस डोळे उघडता आले नाहीत. अशाच समस्या घेऊन सुमारे ११ महिला पुढे आल्या. अनेक तक्रारी समोर आल्यानंतर, ओलगिसा तिच्या दवाखान्यातून पळून गेली.

सौंदर्याच्या नादात गमवावे लागले दोन्ही पाय

असेच काहीसे सविंक सेक्लिक नावाच्या मुलीसोबत घडले. सुंदर चेहऱ्याच्या हव्यासापोटी तिला नाकाची शस्त्रक्रिया करणे महागात पडले. तुर्कीच्या प्लास्टिक सर्जरी क्लिनिकमध्ये नाकाची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला तिचे दोन्ही पाय गुडघ्याखालून कापून टाकावे लागले. २५ वर्षीय सविंक सेक्लिकने तिचे नाक लहान करण्यासाठी इस्तंबूलमधील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली.

सुमारे २ तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी तिला घरी पाठवले. घरी गेल्यावर सेविंकला ताप येऊ लागला, मात्र, ही सामान्य लक्षणे आहेत, घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे रुग्णालयाने ठामपणे सांगितले, पण तिची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती.

तिने खाणे-पिणे सोडले. ती सतत आजारी पडू लागली. तिच्या पायाचा रंग काळा झाला होता. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविंकला रक्तात विषबाधा झाली होती. अखेर तिचा जीव वाचवण्यासाठी तिचे पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. तिचे गुडघ्याखालचे पाय कापावे लागले. सौंदर्याच्या नादात तिने सामान्य जीवन जगण्याचा आनंदही गमावला.

हातातून गेल्या अनेक भूमिका

अशाच प्रकारे चिनी अभिनेत्री आणि गायिका गाओ लिऊ हिने नुकतीच कॉस्मेटिक सर्जरी केली, पण तिलाही ही शस्त्रक्रिया करणे महागात पडले. अभिनेत्रीने तिच्या शस्त्रक्रियेपूर्वीचे आणि नंतरचे काही फोटो सोशल मीडियावर तिच्या ५० लाख फॉलोअर्सना शेअर केले, ज्यामध्ये कॉस्मेटिक सर्जरीनंतर तिच्या नाकावर डाग दिसत आहेत. नाकाचा पुढचा भाग काळा आणि सपाट दिसतो.

खरेतर, एका मित्राच्या सांगण्यावरून, अभिनेत्रीने अधिक सुंदर दिसण्यासाठी कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये नाकाची शस्त्रक्रिया केली होती. सुमारे ४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीला तिच्या नाकासाठी हवा असलेला आकार तर मिळाला नाहीच, शिवाय तिच्या नाकातील काही उती मृत झाल्या. अभिनेत्रीला नंतर कळले की, तिने ज्या क्लिनिकमध्ये शस्त्रक्रिया केली होती त्यांच्याकडे शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नव्हती.

गाओ लिऊच्या म्हणण्यानुसार तिला वाटत होते की, शस्त्रक्रियेनंतर तिला अधिक भूमिका मिळू लागतील, पण आता चेहरा बिघडल्यामुळे तिच्या मनात आत्महत्येसारखे विचार येत असून अनेक भूमिका हातातून निसटून गेल्या आहेत. गाओ सांगते की, या शस्त्रक्रियेमुळे तिला ६१ दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दोन चांगले प्रोजेक्ट गमवावे लागले, त्यामुळे तिचे करोडोंचे नुकसान झाले.

प्लास्टिक सर्जरी करणाऱ्यांपैकी बहुतांश तरुणी आहेत. सोशल मीडियावर सुंदर दिसण्यासाठी आणि प्रभावशाली  वाटण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे शस्त्रक्रियेची ही बाजारपेठ झपाटयाने वाढत आहे. सुंदर दिसण्यानेच आपल्याला इच्छित ध्येय गाठता येईल, अशी अनेक मुलींची मानसिकता असते. नातेसंबंध असोत किंवा करिअर असो, त्यांच्या दृष्टीने सौंदर्य ही यशाची सर्वात महत्त्वाची पायरी असते.

त्यामुळेच सुंदर दिसण्यासाठी त्या कोणतेही पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पुढे जेव्हा याचे दुष्परिणाम समोर येतात तेव्हा खंत करण्याशिवाय दुसरे काहीच हाती उरत नाही. म्हणूनच मुलींनी समजून घेतले पाहिजे की, निसर्गाने बहाल केलेले सौंदर्य जपण्यातच शहाणपण आहे आणि जे मिळाले ते इतरांच्या लालसेपोटी वाया घालवू नये. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनवू शकता आणि नैसर्गिक पद्धतीने तुमचे सौंदर्य खुलवू शकता.

स्वत:ला निरोगी आणि स्मार्ट बनवा

सौंदर्याचे पहिले प्रमाण म्हणजे तुमचे निरोगी व्यक्तिमत्व. जर तुम्ही निरोगी असाल, शारीरिकदृष्टया अपंग नसाल, साहसी असाल, खूप लठ्ठ नसाल आणि खूप बारीकही नसाल, तुमचे खांदे उतरलेले नसतील आणि तुम्ही जे काही घालता ते तुम्हाला शोभत असेल तर तुमचे शरीर संतुलित आहे असे समजावे. असे असेल तर तुमच्यापेक्षा सुंदर दुसरा कोण असू शकतो? आकर्षक व्यक्तिमत्व आणि सौंदर्यासाठी नाक, ओठ किंवा स्तनाचा आकार महत्त्वाचा नसून तुम्ही निरोगी आणि स्मार्ट असणे जास्त महत्त्वाचे असते.

डोळयात हवी काहीतरी करण्याची चमक

सौंदर्य डोळयात दिसते. तुमचे डोळे सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असतील, तुम्ही तुमच्या डोळयांनी हसत असाल आणि डोळयांनी समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्यास सक्षम असाल, तर तुम्हाला सौंदर्याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा विश्वास आणि जिद्द डोळयात दिसली तर लोक स्वत:च तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला तुमच्या कामातून ओळख मिळेल. तुमच्या डोळयात आत्मविश्वास दिसला पाहिजे तरच तुम्ही करिअरच्या वाटेवर वेगाने वाटचाल करू शकाल.

सकारात्मक दृष्टिकोन

काही लोकांचे बोलणे असे असते की, समोरच्या व्यक्तीला ते ऐकल्यावर खूप बरे वाटते. दोघांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजूबाजूचे वातावरणही सकारात्मक होते. मग तो कर्मचारी असो किंवा मित्र, प्रत्येकाला अशा व्यक्तीशी नाते जपायचे असते. म्हणूनच तुमच्या सौंदर्यापेक्षा तुमच्या वृत्तीवर काम करणे जास्त महत्त्वाचं असते. दृष्टिकोन सकारात्मक असेल तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

जेव्हा पत्नी करते विश्वासघात

* सोमा घोष

एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ग्लीडनच्या मते, भारतातही लोक आता उघडपणे व्यभिचाराच्या संधी शोधत त्यांच्या साइट्सला भेट देतात आणि अशा अनेक साइट्स आहेत, ज्यावरून कोणताही विवाहित किंवा अविवाहित पुरुष त्याच्या इच्छेनुसार महिलांशी संपर्क साधू शकतो. विश्वासघात ही पूर्वीच्या काळी आश्चर्याची गोष्ट नव्हती आणि आजही नाही. ‘साहब बीवी गुलाम’सारख्या चित्रपटात जमीनदार कुटुंबात लग्न झालेल्या पत्नीवर तिच्या पतीने व्यभिचारी असल्याचा संशय घेऊन ठार मारले होते, जेव्हा की तो स्वत: उघडपणे इतर स्त्रियांकडे जात होता.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारा नीरज त्याच्या पत्नीमुळे त्रासला आहे. त्याला वाटते की, लग्नाच्या ७ वर्षानंतर पत्नीचे तिच्या कार्यालयातील अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत. तो तिला याबाबत विचारायलाही घाबरतो, कारण त्याला या गोष्टीवर पूर्ण विश्वास नाही. पत्नी त्याच्यापेक्षा चांगली कमावते. अनेकदा त्याने तिचा मोबाईल किंवा मेसेजही तपासले, पण त्याच्या हाती काही लागले नाही. हे सर्व मागील २ वर्षांपासून सुरू आहे. आजकाल तो तिच्याशी प्रत्येक गोष्टीवरून भांडतो. सोसायटीतील लोक या भांडणाची मजा घेतात. आपापसात कुजबुजतात. त्यांच्या भांडणाला घाबरून त्यांची मुलगी नीरा हळूच जवळच्या खोलीतून आत डोकावून पाहाते. अनेकदा नीरजला पत्नीला सोडून जावंसं वाटतं, पण तो मुलगी आणि पैसा आठवून गप्प बसतो. त्याने आपल्या कुटुंबीयांना हे सर्व सांगितले आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की काय करायच, हे त्यानेच ठरवायला हवे.

राग विनाशाकडे नेतो

अशा प्रकारची समस्या शहरांमध्ये सामान्य आहे. येथे पती-पत्नी दोघेही नोकरी करतात, कारण येथे फ्लॅट विकत घेण्यासाठी आणि आजच्या जीवनशैलीशी जुळवून घेण्यासाठी दोघांनाही काम केल्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत जर पत्नीने संपूर्ण दिवस कार्यालयात घालवला आणि एखाद्याशी जवळीक निर्माण केली तर मात्र पतीला ते सहन करणे अशक्य होते. अनेक पती मारहाण करतात तर काही तिची हत्या करतात. नंतर कळते की, हे प्रकरण तितके गंभीर नव्हते, जितके त्यांना वाटत होते, पण रागाच्या भरात चुकीचे कृत्य केल्यावर ती चूक भरून काढता येत नाही. कधीकधी उलट घडते. व्यभिचारी पत्नीच आपल्या पतीची हत्या करते.

गंभीर परिणाम

एका अहवालानुसार, लखनऊत सप्टेंबर २०२२ मध्ये पत्नीने तिच्या प्रियकरासह पतीचा खून केला. त्याचा अपघाती मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी आधी त्याचा गळा दाबून खून केला आणि नंतर मृतदेह कारने चिरडला. पोलिसांनी तपासाअंती पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. अशाच प्रकारे नुकतेच गाझियाबाद येथे पतीने पत्नीला प्रियकरासह पाहिल्यामुळे दोघांनीही त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून शेतात फेकला. तपासाअंती दोघेही पकडले गेले.

नैतिकता तपासा

कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी नैतिकता तपासणे गरजेचे आहे. या विषयावर एक प्रसिद्ध लेखक म्हणतात की, निसर्गाने स्त्रीला जन्मापासूनच असे संस्कार दिले, ज्यामुळे तिला नेहमीच सहन करावे लागते. इतिहास साक्षी आहे की ४० वर्षांपूर्वी स्त्रिया याला सहन करणे, असे म्हणत नव्हत्या. पतीचे एखाद्या स्त्रीशी संबंध असल्यास तो त्याचा हक्क असून अशा पतीला सहन करणे हे त्या स्वत:चे कर्तव्य समजायच्या.

२० वर्षांपूर्वीपासून स्त्रियांनी ही सहनशीलता स्वीकारली आहे. लग्नानंतर महिलांचे एखाद्या पुरुषाशी संबंध असले तर ते केवळ शारीरिक सुखासाठीच असतील असे नाही. अनेकदा कुटुंबाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे स्त्रियांना मानसिक आधाराची गरज भासते, जी त्यांना पतीकडून मिळत नाही, परिणामी, त्या ज्या कोणाशीही त्यांचे विचार मांडू शकतात त्यांना आपले मानतात. अनेकदा काही स्त्रियांना एका पुरुषाकडून समाधान मिळत नाही, त्यामुळे त्या पर पुरुषाचा आधार घेतात, पण हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यांना वारांगना म्हणता येणार नाही.

नातं टिकवणं महत्त्वाचं

आज नैतिकतेची मूल्ये बदलली आहेत. स्त्री बाहेर एखाद्या पुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर ते का? स्त्रिया नेहमीच कुटुंबाची जबाबदारी घेत आल्या आहेत. कोणतेही नाते त्या अगदी सहजपणे तोडू इच्छित नाहीत. एखाद्या पुरुषाला आपल्या पत्नीवर संशय असेल तर तो तिला मारहाण, शिवीगाळ करणे आणि समजात बदनाम होण्यापेक्षा अशा अनेक संस्थांकडे जाऊ शकतो, ज्या पुरुषांसाठी काम करतात.

साधारणपणे एखाद्या पुरुषाचे बाहेरच्या स्त्रीशी प्रेमसंबंध असले तर त्याचा दोष स्त्रीला दिला जातो. लोक म्हणतात, तिचा पती बाहेर का जातो? कदाचित पत्नीमध्ये काही दोष असू शकतो. पतीला कधी व्यभिचारी मानले जात नाही. त्याच्या वागण्यावर पडदा टाकला जातो. भारतीय संस्कृतीत एकीकडे स्त्रीला देवी मानले जाते, तर दुसरीकडे तिला मानवी अधिकारही दिला जात नाही.

शांतपणे तोडगा काढा

हे खरं आहे की, पुरुष कधीकधी पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतात. आजूबाजूला कोणी विधवा असेल तर तिला जाळयात ओढायला बघतात. यात कोणालाही काही चुकीचे वाटत नाही, पण पत्नीने असे केल्यास तिला मारहाण आणि शिवीगाळ करून घराबाहेर काढले जाते किंवा तिची हत्याही केली जाते.

जर पत्नीचे कोणावर प्रेम असेल तर पतीने शांतपणे बसून त्या समस्येवर तोडगा शोधायला हवा. कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी काही गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी. कारण आता हा फौजदारी गुन्हा ठरत नाही.

२०१०पर्यंत भारतीय दंड संहितेच्या कलम ४०७ नुसार, विवाहित स्त्रीवर प्रेम केल्याबद्दल पती एखाद्या पुरुषाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करू शकत होता, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना ते घटनाबाह्य ठरवले आहे. एडल्ट्री म्हणजे व्यभिचार आता केवळ वैवाहिक गुन्हा आहे. या आधारावर केवळ घटस्फोट घेता येतो.

धर्मापासून दूर राहा

पत्नीचे कोणाशी प्रेमसंबंध असले तर गैर काय? असे अनेक पुरुष आहेत जे पत्नीव्यतिरिक्त २-३ स्त्रियांशी संबंध ठेवतात, तरी त्यांना कोणी काही बोलत नाही. काही धर्मात तुमची क्षमता असेल तर तुमच्या पत्नीशिवाय तुम्ही २-३ पत्नी करू शकता. त्यांना तशी परवानगी असते.

जर तुमच्याकडे संयम असेल तर शक्य आहे की २-३ दिवसांनी तिला तिची चूक समजून ती घरी परत येईल. असह्य झाल्यास घटस्फोट घ्या. वाद घालू नका, कारण हे पूर्वापार चालत आले आहे आणि पुढेही सुरू राहील. लोक सत्य कधी ओळखू शकले नाहीत आणि कधी ओळखू शकणार नाहीत. समाज आणि धर्माच्या नावाच्या आड कधी जाऊ नका, ते सर्व निरर्थक आहे.

का गरजेची आहे मेडिक्लेम पॉलिसी

* नसीम अंसारी कोचर

आजकाल विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. ज्यांचे नाव यापूर्वी कधी ऐकले नव्हते असे आजार होत आहेत. कोरोना महामारीमुळे लोकांच्या शरीरात इतर अनेक आजार वाढले आहेत. काळी बुरशी, पांढरी बुरशी, रक्त गोठणे यासारख्या समस्या समोर येत असून, त्यावरील उपचारासाठी लाखो रुपये खर्च येतो. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना रुग्णालयाचा खर्च करणे जवळपास अशक्य झाले आहे.

आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञान वाढत असल्याने आजारांवर होणारा खर्चही वाढत आहे. पूर्वी डॉक्टर तपासणी करून, रुग्णाची नाडी तपासून किंवा किरकोळ चाचण्या करून उपचार करायचे, पण आता ताप आला तरी सर्व प्रकारच्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या लिहून देतात. गंभीर आजार झाल्यास रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना चाचण्या, क्ष-किरण, एमआरआय, थेरपी इत्यादी महागडया उपचारांचा सामना करावा लागतो.

एखादा मोठा आजार माणसाची सर्व बचत खाऊन टाकतो. अशा परिस्थितीत फॅमिली मेडिक्लेम असणे अत्यंत गरजेचे आहे. मेडिक्लेम पॉलिसी अर्थात वैद्यकीय विमा कठीण काळात तणावमुक्त आणि आर्थिकदृष्टया सुरक्षित राहण्यास मदत करतो. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विमा कंपनीच्या जाळयाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये विमाधारकावर उपचार केले जातात. या अंतर्गत, विमा कंपनी दाव्याचा काही भाग किंवा संपूर्ण रक्कम रुग्णालयाला देते. त्यामुळे रुग्ण तसेच त्याच्या कुटुंबावर अचानक आर्थिक भार पडत नाही.

सुरक्षित पर्याय

अनपेक्षित वैद्यकीय गरज उद्भवल्यास, त्यावर होणारा प्रचंड खर्च भागवण्यासाठी मेडिक्लेम हा आजचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. ज्या व्यक्तीचा मेडिक्लेम असेल त्याला त्याच्या खिशातून पैसे भरण्याची आवश्यकता नसते. जर त्याला कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल केले असेल तर सर्व खर्च मेडिक्लेम कंपनी उचलते.

तुमची मेडिक्लेम पॉलिसी अपघात, गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया इत्यादी बाबतीत रुग्णालयाचा खर्च उचलते, सोबतच रुग्णालयातून घरी पाठवल्यानंतर वेळोवेळी होणाऱ्या औषधांचा आणि चाचण्यांचा खर्चही करते. सर्व परिस्थिती मेडिक्लेम पॉलिसीमध्ये समाविष्ट असते. आज, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत मेडिक्लेम सेवा वरदान आहे.

मेडिक्लेमचे फायदे

मेडिक्लेम पॉलिसी ही आरोग्य विमा योजना आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत :

* ही सोयीस्कर कॅशलेस हॉस्पिटलायझेशन प्रदान करते.

* तुमच्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात मोठी आर्थिक मदत करते.

* ती तुम्हाला आर्थिक ओझ्यात बुडण्यापासून वाचवते.

* विविध कंपन्यांमध्ये मेडिक्लेम पॉलिसी ऑनलाइन खरेदी करण्याची सुविधा आहे, ज्यामुळे वेळ आणि ऊर्जा वाचते.

* आयकर कायदा १९६१ अंतर्गत ती कर सवलतही मिळवून देते.

* ज्येष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत, ज्येष्ठांना अतिरिक्त फायदे दिले जातात. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरचा वैद्यकीय खर्च काही अटींच्या अधीन राहून मेडिक्लेम पॉलिसींद्वारे केला जातो.

* नियमित वॉर्ड किंवा इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयु)साठी जो काही खर्च येतो तो मेडिक्लेम पॉलिसीद्वारे कव्हर केले जातो. भारतातील विविध आरोग्य विमा कंपन्या वैद्यकीय खर्चाच्या बाबतीत विविध प्रकारच्या पॉलिसी देतात. यामध्ये मोठया संख्येने लोक वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी, फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी, ज्येष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसी, गंभीर आजार मेडिक्लेम पॉलिसी, ओव्हरसीज मेडिक्लेम पॉलिसी, लो कास्ट मेडिक्लेम पॉलिसी आणि ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी काढतात.

कौटुंबिक आरोग्य योजना

कौटुंबिक आरोग्य योजना सर्वात चांगली आहे. उदाहरणार्थ, जर कुटुंबात ५ सदस्य असतील आणि प्रत्येक व्यक्तीच्या नावे प्रत्येकी १ लाख रुपयांचा स्वतंत्र विमा असेल तर कुटुंबातील कोणताही एक सदस्य विमा कंपनीकडून त्याच्यासाठी १ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत मिळवू शकत नाही. पाचही व्यक्तींसाठी हा विमा स्वतंत्र पॉलिसीनुसार काम करतो, पण तेच जर ५ लाख रुपयांची कौटुंबिक आरोग्य योजना म्हणून पॉलिसी घेतल्यास कोणताही सदस्य ५ लाख रुपयांपर्यंतची मदत मिळवू शकतो.

त्याचप्रमाणे, गंभीर आजार जसे की, कर्करोग, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका, शस्त्रक्रिया, अर्धांगवायू, स्ट्रोक, अवयव प्रत्यारोपण, बायपास शस्त्रक्त्रिया किंवा इतर अशा गंभीर आजारांसाठी मेडिक्लेम पॉलिसी खूप चांगले कव्हर मिळवून देते.

ज्येष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसी

ज्येष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसी वयाची ६० वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा रुग्णालयाचा खर्च कव्हर करण्यासाठी तयार केली आहे. ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा पॉलिसी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच अनेक गोष्टींची काळजी घेते.

याचप्रमाणे ग्रुप मेडिक्लेम हा भारतातील बहुतांश उद्योगांच्या कर्मचाऱ्यांसाठी काढला जातो. मोठ्या क्लब किंवा संस्थांच्या सदस्यांसाठीही ग्रुप मेडिकल क्लेम केले जातात. हे कॉर्पोरेट जगताचे धोरण आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारातून काही टक्के रक्कम प्रीमियम पेमेंट म्हणून कापली जाते.

मेडिक्लेम नक्की काढा

मेडिक्लेममुळे तुम्हाला कठीण काळात तणावमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत होते. आता लहानसहान आजारांवरही लाखोंचा खर्च होत आहे. आरोग्य विमा तुमच्या खिशावरचा भार कमी करण्यास मदत करतो. सतत वाढत असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या या युगात, शक्य तितक्या लवकर मेडिक्लेम पॉलिसी घेणे शहाणपणाचे आहे.

केंद्रिय आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत ८० टक्के प्रकरणे आर्थिक अडचणींमुळे बिघडतात. अपघात झाल्यास तुम्हाला उपचारावर पैसे तर खर्च करावे लागतातच, पण तुमची कमाईची क्षमताही कमी होते. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीला दुहेरी धक्का बसतो.

जर तुमची मेडिक्लेम पॉलिसी असेल तर अशावेळी तुमची हिंमत खचणार नाही आणि तुम्हाला चांगले उपचारही मिळतील. आरोग्य विम्यासाठी तुम्ही ठराविक अंतराने थोडया प्रमाणात प्रीमियम भरून तुमच्यासाठी वैद्यकीय खर्चाची व्यवस्था करू शकता. आजच्या युगात हे फार महत्वाचे आहे.

जेव्हा रूग्णाला पाहायला रूग्णालयात जाल

* गरिमा पंकज

अलीकडेच, क्रिकेटपटू ऋषभ पंतला उत्तराखंडमधील रुडकी येथील नारसन सीमेवर भीषण कार अपघात झाला. त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस त्याच्यावर उपचार करण्यात आले, त्या दरम्यान ऋषभ पंत आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत होते, कारण लोक मोठया संख्येने त्याला भेटायला येत होते. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे ऋषभ पंतला विश्रांती घेता येत नव्हती.

खरं तर ऋषभ पंत जखमी झाल्याच्या वृत्ताने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली होती. प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व असल्याने काही खास लोकांव्यतिरिक्त त्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी चाहतेही रुग्णालयात पोहोचू लागले. खास लोकांपैकी आमदार, मंत्री, अधिकारी तसेच काही चित्रपट कलाकार त्याची विचारपूस करण्यासाठी मॅक्स रुग्णालयात पोहोचले. पाहुण्यांच्या या गर्दीमुळे जखमी ऋषभ आणि त्याचे कुटुंबीय काहीसे अस्वस्थ झाले.

ऋषभ पंतच्या कुटुंबीयांनी सांगितले की, नियोजित वेळेनंतरही लोक त्याला भेटायला येत होते. त्याच्या प्रकृतीची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय पथकातील एका सदस्याने सांगितले की, ऋषभला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक होते. त्याला शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज होती. अपघातात झालेल्या दुखापतीमुळे त्याला वेदना होत होत्या.

भेटायला येणाऱ्या लोकांशी बोलून त्याची उर्जा वाया जाणार होती, जी तो लवकर बरा होण्यासाठी वापरणे गरजेचे होते. शेवटी डॉक्टरांना सांगावे लागले की, जे त्याला भेटायचे ठरवत आहेत त्यांनी सध्या तरी येऊ नये. त्यांनी ऋषभ पंतला आराम करायला द्यायला हवे.

एक महत्त्वाचा उद्देश

रुग्णालयात येण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ४ ते ५ अशी होती. या कालावधीत केवळ एक जण रुग्णाला भेटू शकणार होता. ऋषभ पंत प्रसिद्ध असल्याने त्याला भेटण्यासाठी बरेच लोक येत होते. त्यामुळे ही मोठी समस्या बनली होती.

केवळ प्रसिद्ध व्यक्तीच नाही तर आपलेच कोणीतरी, एखादा ओळखीचा किंवा नातेवाईक आजारी पडला तर सौजन्याने आपण त्याला भेटायला, त्याला धीर द्यायला किंवा मदत करायला रुग्णालयात जातो. कोविड-१९ च्या काळात, जेव्हा लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती, तेव्हा आपण व्हिडीओ कॉलिंगद्वारे एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. आजारी व्यक्तीला भेट देण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे त्याला असे वाटू नये की, तो एकटा आहे. आपण त्याला धीर द्यायला जातो आणि दाखवतो की तो एकटा नसून या कठीण काळात आपण त्याच्यासोबत आहोत.

रुग्णाबद्दलची आपली काळजी काहीवेळा रुग्णाला त्रासदायक ठरते. म्हणून, जर आपल्याला रुग्णालयात एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जायचे असेल तर आपण या सामान्य शिष्टाचारांची काळजी घेतली पाहिजे.

योग्य वेळी जा

जाण्यापूर्वी रुग्णालयाच्या भेटीची वेळ जाणून घ्या. प्रत्येक रुग्णालयात भेटीची वेळ ठरलेली असते. तो नियम नेहमी पाळला पाहिजे. आपल्याला दिलेल्या वेळेत रुग्णाला भेटायला जावे, डॉक्टरांच्या फेरीवेळी, रुग्णाच्या जेवणाच्या वेळी, रुग्णालयातील साफसफाई करताना रुग्णाला भेटायला जाणे टाळावे.

गर्दी करू नका

आजारी व्यक्तीभोवती शक्यतो गर्दी करू नका. डॉक्टरांच्या भेटीची वेळ झाल्यावर शांतपणे बाहेर जा, फक्त कुटुंबातील सदस्य आणि डॉक्टरांना आजारी व्यक्तीसोबत राहू द्या.

इतरांचीही काळजी घ्या

आजारी व्यक्तीला जास्त बोलण्यासाठी प्रवृत्त करू नका. विनोद करून वातावरण हलके होईल, असा गैरसमज करून घेऊ नका. रुग्णालयात आणखी काही रुग्ण असतात, कदाचित त्यांची परिस्थिती गंभीर असेल, त्यांचाही विचार करा.

जेव्हा रुग्ण महिला असेल

आजारी महिलेला भेटणार असाल तर विशेष काळजी घ्या, विचारल्याशिवाय आत प्रवेश करू नका. तिच्या जवळ जास्त वेळ बसू नका, उपचारादरम्यान तिला अनेक वैद्यकीय उपकरणे लावली असतील, ज्यामुळे तिची स्थिती अवघडल्यासारखी झाली असेल, अशा परिस्थितीत तुमच्या उपस्थितीत महिलेला किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांना थोडेसे अवघडल्यासारखे वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला मदतीसाठी जरी जावे लागले तरी काही क्षण बसा आणि बाहेर या. तुम्ही बाहेर असलेल्या तिच्या कुटुंबियांशी बोलू शकता.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत योग्य वर्तन

रुग्णालयातील कर्मचारी जसे वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर, वॉर्ड सिस्टर, रिसेप्शनिस्ट इत्यादींशी चांगले वागले पाहिजे, कारण ते सर्व रुग्णांची काळजी घेतात. त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नका. उपचारानंतर रुग्णाला बसवलेल्या उपकरणांशी छेडछाड करू नका. विनाकारण डॉक्टरांशी बोलू नका. ओळख वाढवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांचा वेळ वाया घालवू नका.

रुग्णाच्या खोलीला सहलीचे ठिकाण बनवू नका

बऱ्याचदा आपल्यापैकी अनेकजण एकत्र रुग्णालयात जातात. सोबत रुग्णासाठी फळे तसेच इतर खाद्यपदार्थ घेऊन जातात. यामुळे एक प्रकारे रुग्णाची खोली आपण एखाद्या सहलीच्या ठिकाणासारखी बनवतो. परंतु आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आजार सामान्य असो किंवा गंभीर, अनेकदा इतर लोकांच्या संसर्गामुळे रुग्णाला सर्वात जास्त नुकसान होते.

रुग्णाला एकावेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी भेटायला जाऊ नये. जर रुग्णाला काही खायला किंवा प्यायला द्यायचे असेल तर आधी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांना विचारा. तुम्ही घरूनच काहीतरी तयार करून चहा, नाश्ता वगैरे, रुग्णांसाठी नाही तर त्याची काळजी घेत असलेल्या कुटुंबीयांसाठी नेल्यास बरे होईल.

स्वच्छतेची काळजी घ्या

रुग्णाला भेटायला जाण्यापूर्वी, आपले हात साबणाने किंवा हँडवॉशने चांगले धुवा. बहुतेक संक्रमण किटाणूंनी भरलेली नखं आणि हातांमधून होते. स्वत:ला सॅनिटाइज केल्यानंतरच भेटायला जा, मास्क घालून जा, परवानगी मिळाल्यानंतरच रुग्णाच्या जवळ जा, अन्यथा कुटुंबातील सदस्यांशी बोलून त्याच्या आरोग्याबद्दल जाणून घेणे चांगले.

नकारात्मक बोलू नका

अनेकदा कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने त्रस्त रुग्णाला भेटायला गेल्यावर लोक नकारात्मक बोलू लागतात. रुग्णासमोर आजारपणाचा खर्च, जीवन-मरण इत्यादी बोलणे चुकीचे आहे. चिंता व्यक्त करताना, आपण अशा एखाद्या कॅन्सर रुग्णाबद्दल बोलतो ज्याचा मृत्यू झालेला असतो. ते ऐकून कॅन्सर रुग्णाचे काय होत असेल, याची कल्पना करा.

कोणत्याही आजाराने त्रस्त रुग्णाशी नेहमी सकारात्मक आणि उत्साहवर्धक बोला.

रुग्णाला तुमचा सल्ला आणि मार्गदर्शनाची नाही तर तुमचे प्रेम आणि प्रोत्साहनाची गरज आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की व्यक्ती आधीच त्याच्या आजाराने त्रस्त आहे. त्याला आणखी त्रास देणे योग्य नाही.

तुमच्या ज्ञानावर नियंत्रण ठेवा

रुग्णाच्या आजारासाठी कोणत्या प्रकारचे उपचार दिले जात आहेत याबद्दल बोलताना, आपण इतर संभाव्य उपचार पर्यायांबद्दल बोलू शकता, पण गरजेपेक्षा जास्त ज्ञान पाजळू  नका. त्याला कोणत्याही प्रकारचा ताण देऊ नका. अनेकदा इंटरनेटवर आजाराबद्दल अपूर्ण माहिती मिळवून रुग्ण आणि डॉक्टरांसमोर आपण आपले ज्ञान पाजळतो.

हे लक्षात ठेवले पाहिजे की, जो रोग आणि उपचारासाठी डॉक्टरांनी बरीच वर्षे अभ्यास केला आहे, त्यांच्यासमोर आपले ज्ञान पाजळणे चुकीचे आहे. एखादा उपाय किंवा औषधाबद्दल सल्ला देऊ नका. तसेही रुग्णाशी जास्त बोलू नये, कारण यामुळे त्याला थकवा जाणवतो.

क्लाउड किचन, कमी किंमतीत जास्त नफा

* गरिमा पंकज

व्यवसाय लहान असो किंवा मोठा, जर ऑफलाइन ग्राहकांबरोबरच ऑनलाइन ग्राहकांना लक्षात घेऊन व्यवसायाची रणनीती ठरवली तरच जास्तीत जास्त नफा मिळवता येतो, कारण आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये अमर्यादित डेटा आहे. आता बहुतांश कामे ऑनलाइन होत आहेत. त्यामुळेच क्लाउड किचन व्यवसाय हा भारत आणि जगभरातील सर्वात ट्रेंडिंग व्यवसायांपैकी एक आहे.

क्लाउड किचन, ज्याला बऱ्याचदा ‘घोस्ट किचन’ किंवा ‘व्हर्च्युअल किचन’ म्हणून ओळखले जाते, हे एक प्रकारचे रेस्टॉरंट आहे जिथे फक्त अन्नपदार्थांची ऑर्डर स्वीकारता येते. क्लाउड किचन हा ऑनलाइन फूड ऑर्डरिंग सिस्टीमद्वारे ग्राहकांना अन्न पुरवण्यासाठी सुरू केलेला व्यवसाय आहे. झोमॅटो आणि स्विगीसारख्या फूड डिलिव्हरी अॅप्लिकेशन्सने त्याच्याशी टाय-अप अर्थात करार केला आहे.

२०१९ मध्ये भारतात जवळपास ५,००० क्लाउड किचन होते. ऑनलाइन फूड ऑर्डरिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या सहकार्यामुळे क्लाउड किचनला मोठा आधार मिळाला आहे. आज भारतात ३०,००० पेक्षा जास्त क्लाउड किचन आहेत.

योग्य नियोजन करा

हे काम तुम्ही फक्त ५ ते ६ लाख रुपयांमध्ये चांगल्या पातळीवर सुरू करू शकता. महिलाही या व्यवसायात सक्रिय सहभाग घेत आहेत. अशाच एका क्लाउड किचन ‘द छौंक’च्या सहसंस्थापक मंजरी सिंह आणि हिरण्यमी शिवानी यांच्याशी आम्ही बोललो. कोविड-१९ दरम्यान, जेव्हा लोक त्यांच्या घरात बंदिस्त होते तेव्हा हिरण्यमी शिवानीही त्यांच्या मूळच्या घरी जाऊ शकल्या नव्हत्या. त्यादरम्यान त्यांना क्लाउड किचन सुरू करण्याची कल्पना सुचली. त्या बिहारच्या आहेत. लोकांना घरच्या जेवणाची चव देण्याच्या उद्देशाने, विशेषत: स्वादिष्ट बिहारी खाद्यपदार्थ देण्याच्या उद्देशाने, त्यांनी जुलै २०२१ मध्ये गुरुग्राममध्ये बिहारी खाद्यपदार्थांचे ‘द छौंक’ सुरू केले. त्यांची सून मंजरी सिंग यांनीही त्यांना या कामात साथ दिली आणि दोघींनी मिळून या व्यवसायात पदार्पण केले.

वाढले आहे काम

मंजरी सिंह सांगतात की, सुरुवातीला त्यांनी घरूनच व्यवसाय सुरू केला. ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅपद्वारे त्या घरीच जेवण बनवून लोकांपर्यंत पोहोचवत. आज त्यांची दिल्ली/एनसीआरमध्ये ५ आउटलेट आहेत. बहुतेक प्रणाली स्वयंचलित आणि ऑनलाइन आहे. त्यांनी स्विगी, झोमॅटोसोबत करार केला आहे.

वार्षिक उलाढाल सुमारे २ कोटी रुपये करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. यावर्षी त्यांना १५-१६ टक्के नफा अपेक्षित आहे. सध्या त्यांच्याकडे २८ कर्मचारी असून त्यापैकी ६ कार्यालयात तर उर्वरित किचनमध्ये आहेत.

काम खूप वाढले आहे. महिला असण्याची एकच समस्या आहे की, त्या सोर्सिंग म्हणजे बाहेरून सामान आणण्यासाठी फारसा पुढाकार घेऊ शकत नाहीत. भाजीपाला, मसाले, धान्य इत्यादी कच्चा माल मिळवावा लागतो. बाजारात काही नवीन असेल तर ते पाहायला जावे लागते. बहुतेक बाजार खूप गजबजलेले आणि आतील भागात आहेत, जिथे महिला वारंवार जाऊ शकत नाहीत.

दोघीही गृहिणी आहेत आणि त्यांना मुलांचीही काळजी घ्यावी लागते. या समस्येचा सामना करण्यासाठी, त्यांनी सोर्सिंग व्यवस्थापक आणि अनेक कर्मचारी नियुक्त केले आहेत जे त्यांना कामात बरीच मदत करतात. याशिवाय त्यांना इतर कोणतीही अडचण आलेली नाही.

जीएसटी आणि आर्थिक समस्या

रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन व्यवसायाला ५ टक्के जीएसटी लागू आहे. ऑर्डर झोमॅटो आणि स्विगीद्वारे आल्यास जीएसटीचा परतावा ते मिळून भरतात. वेबसाइटद्वारे ऑर्डर आल्यास क्लाउड किचनला ५ टक्के जीएसटी भरावा लागतो. याशिवाय कुठलाही अप्रत्यक्ष कर नाही. त्यामुळेच क्लाउड किचनला उद्योगात कर नियमन गुंतागुंतीचा सामना करावा लागत नाही.

कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

* एग्रीगेटरच्या उच्च कमिशनमुळे (सुमारे ३० टक्के), हा अतिशय कमी मार्जिन असलेला व्यवसाय आहे. त्यामुळे मिळणाऱ्या परताव्यापेक्षा तांत्रिक खर्च खूप जास्त आहे. ग्राहकांशी थेट संपर्काचा अभाव आहे. अभिप्राय आणि पुनरावलोकनासाठी ग्राहकांशी थेट संवाद साधता येत नाही. एग्रीगेटर ग्राहकांशी थेट संपर्क साधू देत नाहीत.

* या क्षेत्रात अनेक ब्रँड आणि कॅटेगरीज आल्या आहेत, त्यामुळे स्पर्धा मोठी आहे. क्लाउड किचन ६ ते ७ किलोमीटर परिसरापुरतेच मर्यादित असते. या अंतरावर सुमारे २-३ हजार रेस्टॉरंट, १००० + ब्रँड आहेत. त्यामुळे ग्राहकाला अनेक पर्याय मिळतात. साहजिकच मार्केटिंगवर खूप खर्च करावा लागतो, जेणेकरून तुम्ही केंद्रस्थानी दिसाल. अनेक ऑफर्स द्याव्या लागतात. त्यामुळे नफ्यातील मोठा हिस्सा वाया जातो.

* बहुतेक ब्रँड्स संघटित नाहीत. शेफ/कर्मचारी जास्त पगारासाठी नोकऱ्या बदलत राहतात, ज्यामुळे चव टिकवणे कठीण होते. नवीन कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागते. अनुभवी झाल्यानंतर ते दुसरीकडे कुठेतरी जातात आणि त्यामुळे नुकसान होते. ग्राहक एकसारखे नसतात. मोठया संख्येने असलेल्या ब्रँड्समुळे ते बदलत राहतात. त्यामुळे जाहिरातीवर होणारा खर्च खूप जास्त आहे.

* क्लाउड किचनसाठी कोणतेही वेगळे सरकारी धोरण नाही, शिवाय ते खूप वेगळे असले तरीही ते रेस्टॉरंट म्हणून ग्राह्य धरले जाते. रेस्टॉरंटचे कमिशन कमी जाते. त्यांचा नफा मार्जिन जास्त असल्यामुळे पॉलिसी त्यांच्या बाजूने जाते.

या समस्या सामान्य स्वरूपाच्या असून, प्रत्येक व्यवसायात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतात. प्रत्येक व्यवसायाचे स्वत:चे फायदे आणि तोटे असतात. क्लाउड किचनबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे बरेच फायदे आहेत :

यात कमी गुंतवणुकीत जास्त नफ्याची अपेक्षा केली जाऊ शकते. हे काम करणेही सोपे आहे आणि ते तुम्ही घर सांभाळूनही करू शकता. इतर पारंपरिक रेस्टॉरंट आणि जेवणाच्या तुलनेत, क्लाउड किचनमध्ये मटेरियल मॅनेजमेंट कॉस्ट, ओव्हरहेड कॉस्ट, लेबर कॉस्ट खूप कमी आहे. येथे फक्त अन्न तयार करून पॅक केले जाते आणि वितरित केले जाते, त्यामुळे अधिक कर्मचारी ठेवण्याची गरज नसते, शिवाय साफसफाईसाठी कमी मेहनत घ्यावी लागते.

छंदाचे करा व्यवसायात रुपांतर

क्लाउड किचनला कमी जागा लागते. ते शहराच्या कोणत्याही भागात सुरू केले जाऊ शकते. महिलाही घरातूनच याची सुरुवात करू शकतात. तुमचं घर व्यावसायिक परिसरात असायला हवं, एवढंच लक्षात ठेवायचं. नंतर, जसा व्यवसाय वाढतो तशी वेगळी जागा घेता येते.

दीर्घकालीन नफा

तुम्ही ऑफलाइन व्यवसायही करू शकता. जसे की रेस्टॉरंटमध्ये नियमित पुरवठा करणे, वसतिगृहे आणि कॉर्पोरेट कार्यालयांची टिफिनची दैनंदिन गरज भागवणे, पार्टीसाठी कॅटरिंग ऑर्डर घेणे इ. त्याचबरोबर सण-उत्सवांच्या काळात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांची ऑर्डर घेता येते.

तरुण मुलींना सेक्सी वाटणे चुकीचे नाही

* ललिता गोयल

तरुण मुली

मुलींना पाय पसरून बसण्याची सवय समाज चुकीची मानतो आणि समाज अशा मुलींकडे सकारात्मक दृष्टीने का पाहत नाही? जर एखाद्या मुलीने सेक्सबद्दल बोलले तर ते समाजात पाप मानले जाते आणि तिला शाप दिला जातो, का? आजही भारतीय समाजात लग्नापूर्वी सेक्स करणे निषिद्ध मानले जाते, का? स्त्रीसुखाबद्दल बोलणे पाप मानले जाते, का? आपल्या इच्छा उघडपणे व्यक्त करणाऱ्या मुलींना समाज बेलगाम आणि घाणेरडे समजतो, का? मुलींनी सेक्स टॉईज वापरल्यास किंवा हस्तमैथुन केल्यास समाज चुकीचा आणि संस्कृतीच्या विरोधात मानतो, पण जर एखाद्या मुलाने तेच केले तर त्यावर प्रश्नच येत नाही, का?

मासिक पाळी ही एक सामान्य नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे परंतु आजही मुलींना त्याबद्दल उघडपणे बोलू नये असे शिकवले जाते. जर एखाद्या मुलीने तिच्या मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलले तर समाजातील लोक तिला निर्लज्ज समजतात आणि तिच्याकडे विचित्रपणे पाहतात.

आपल्या समाजात मुलांनी ड्रग्स घेणे आणि रात्री उशिरा पार्टी करणे हे मुलींसाठी चुकीचे का नाही? घरातून कॉलेज आणि कॉलेजमधून घरी जाणाऱ्या मुलीला समाज योग्य मानतो, पण मुलांशी मैत्री करणाऱ्या मुलींना चुकीचं मानतो, का?

जर एखाद्या मुलीला बॉयफ्रेंड असेल तर ती मुलगी चारित्र्यहीन असते पण जो मुलगा तिचा प्रियकर आहे त्याला चारित्र्यहीन म्हटले जात नाही. मुलगी चुकीची असेल तर मुलगा बरोबर कसा? तो चारित्र्यहीन होता. प्रत्येक गोष्टीत मुलींवर आरोप का होतात?

मुलींसाठी मुलांइतकाच सेक्स महत्त्वाचा आहे

समाजाने हे समजून घेतले पाहिजे की सेक्स हा मुलगा आणि मुलगी दोघांच्याही जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर कोणाला वाटत असेल की फक्त मुलांनाच सेक्स आवडतो तर तो चुकीचा आहे. तरुण मुलींनाही मुलांइतकाच सेक्स हवा असतो.

ज्याप्रमाणे मुले लैंगिक खेळणी शोधतात आणि स्वतःला आनंद देण्यासाठी हस्तमैथुन करतात, त्याचप्रमाणे मुलींसाठी देखील हस्तमैथुन ही एक पूर्णपणे सामान्य आणि निरोगी लैंगिक क्रिया आहे, ज्यामुळे त्यांना समाधान मिळते.

हस्तमैथुन करण्याचा कोणताही एक मार्ग नाही. हा एक वैयक्तिक अनुभव आहे, त्यामुळे तरुण मुलींनी त्यांच्या शरीराचा शोध घेण्यास कोणतीही हानी नाही. समस्या अशी आहे की मुलींना स्वतःचे शरीर नीट माहीत नसते. सेक्सी वाटणे काय आहे हे त्यांना समजत नाही. या वयात सेक्सचा विचार करणे चुकीचे नाही, हे त्यांना समजून घ्यावे लागेल.

मुलींमध्ये त्यांच्या शरीराचे अवयव आणि त्यांच्या आकाराबद्दल अनेक गैरसमज असतात आणि त्यांना स्वतःच्या शरीराच्या अवयवांबद्दल लाज वाटते. त्यांना त्यांच्या शरीराला काय आवश्यक आहे हे समजू शकत नाही, ज्यामुळे त्यांना त्यांच्या लैंगिक संबंधांमध्ये समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, तरुण मुलींनी त्यांच्या शरीराचा शोध घेणे आणि समजून घेणे यात काही नुकसान नाही.

सेक्स जादू नाही

भारतीय समाजासाठी सेक्स ही अजूनही जादू आहे. समाजाने आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे की तरुण मुली आणि मुलांमध्ये लैंगिक भावना असणे स्वाभाविक आहे. ते थांबवता येत नाही आणि करू नये. लग्नापूर्वी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे किंवा करणे यात काही गैर नाही. जोपर्यंत दोन व्यक्तींमध्ये संमतीने सेक्स होत आहे तोपर्यंत इतरांच्या मताला काही फरक पडू नये.

जर दोन सजग व्यक्ती लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेत असतील, मग ते नातेसंबंधात असतील किंवा नसतील, तर समाजाला त्यांचे निवडीचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार नाही. ही त्यांची स्वतःची इच्छा आहे.

आईची जबाबदारी

मातांनी आपल्या किशोरवयीन मुलींना सुरक्षित लैंगिक शिक्षण देण्यात अजिबात संकोच करू नये. सेक्सला अशा प्रकारची बोगी बनवता कामा नये ज्यामुळे ती चिंताग्रस्त होईल. त्याऐवजी, त्यांनी आपल्या तरुण मुलीला तिच्या भावना समजून घेतल्याची जाणीव करून देणे आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यातून प्रत्येकजण जातो.

सेक्सी किंवा बोल्ड वाटणे चुकीचे नाही

मुलींना हे समजून घेणे आवश्यक आहे की ज्या मुली सेक्सी आणि दबंग दिसतात त्यांच्याशी गोंधळ करणे सोपे नाही. मुलंही त्यांना चिडवायला घाबरतात. ठळक कपडे घालणाऱ्या अनेक मुली, मुले त्यांच्याकडे उसासे टाकून पाहतात, पण त्यांना काही सांगण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात नसतो.

खऱ्या अर्थाने मादक वाटणे, स्वत:च्या शरीरात सहजता अनुभवणे, चांगले वाटणे, स्वतःला महत्त्व देणे म्हणजे आत्मविश्वास वाटणे. काही तरुणींना सुस्थितीतील कपडे घालूनही ठळक वाटते.

चांगली केशरचना करूनही अनेक मुलींना सेक्सी वाटते. काही टाच घालून सेक्सी वाटते. तुमचा आवडता परफ्यूम लावल्याने तुम्हाला बोल्ड आणि हॉटही वाटू शकते.

  • एक लहान काळा ड्रेस कोणत्याही तरुण मुलीला सेक्सी वाटू शकतो
  • मेणाचे चमकदार पाय देखील सेक्सी वाटण्याचा एक सोपा मार्ग आहे.
  • लाल लिपस्टिक लावणे हा देखील स्वतःला सेक्सी वाटण्याचा एक सोपा मार्ग आहे.
  • सॉफ्ट, सॅटिन आणि लेस मॅचिंग सेक्सी इनरवेअर किंवा पुशअप ब्रा घातल्याने तुम्हाला सेक्सी वाटू शकते.
  • पोषक तत्वांनी युक्त निरोगी आहार मुलींना सुडौल शरीर आणि चमकदार त्वचा देऊन सेक्सी वाटण्यास मदत करतो.
  • नियमित व्यायामामुळे आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला सेक्सी वाटते.
  • फ्लर्टिंग देखील कोणत्याही मुलीला सेक्सी वाटू शकते.

दारू : अमर्याद दारूच्या ऑफरमुळे लग्नाची मजा खराब होऊ देऊ नका

* सोनिया राणा

अल्कोहोल

लग्न हा आयुष्यातील एक खास दिवस आहे, जो प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण बनवायचा असतो. या प्रसंगी, वधू-वरांना हळदी, मेहंदी, संगीत यांसारख्या पार्ट्या आणि कार्यक्रमांद्वारे त्यांच्या मनापासून इच्छा पूर्ण करायच्या आहेत, जेणेकरून प्रत्येक समारंभ संस्मरणीय बनवता येईल. पण या सगळ्यात काहीतरी आहे जे लग्नातली मजा आणि वातावरण बिघडू शकते आणि ती म्हणजे दारू.

आजकाल, पार्ट्यांमध्ये अमर्यादित दारू देणे ही एक सामान्य गोष्ट बनली आहे, मग ते दिवसाचे असो वा रात्रीचे.

अशा प्रकारे, कोणत्याही कारणास्तव दारू पिणे हे मेंढर आहे आणि हे दुष्कृत्य सरकार आणि दुष्ट लोकांनी प्रत्येक घरात पोहोचवले आहे. यातून सरकारला टॅक्स मिळतो, मारामारी झाल्यास केस झाकण्यासाठी पोलिसांना पैसे मिळतात, हिंसाचाराने त्रस्त आणि त्रस्त झालेल्या महिला भाविकांकडून पुजाऱ्याला पैसे मिळतात.

दारूचा फायदा व्यापाऱ्यांना होतो आणि दारूच्या आसपास चालणारे धंदेही. दारुडे नसतील तर सावकारी व्यवसाय दोन दिवसात कोलमडून जाईल. दारूला सामाजिक मान्यता मिळाली असली तरी लग्नसमारंभात आजही दारूचे सर्रास सेवन केले जाते, ही खेदाची बाब आहे.

जर ते काळजीपूर्वक वापरले नाही तर ते आनंदाच्या क्षणांना त्रासात बदलू शकते. काही लोक ‘आज माझ्या मित्राचे लग्न आहे’ असा विचार करून अति मद्यपान करतात. दारूच्या प्रभावाखाली लोकांचे स्वतःवरील नियंत्रण सुटते, काही विनाकारण मारामारी करतात तर काहींना ठिकठिकाणी उलट्या होताना दिसतात, ज्यामुळे लग्नाचे वातावरण बिघडते.

जर तुम्हाला लग्नाचा सोहळा चांगल्या आठवणींनी जपायचा असेल आणि तुमचे ठिकाण एखाद्या गलिच्छ ट्रेन किंवा लोकांच्या उलट्या भरलेल्या प्लॅटफॉर्मसारखे दिसावे असे वाटत नसेल तर तुम्ही या टिप्स नक्कीच वापरून पाहू शकता :

दारूवर मर्यादा घाला

लग्नसमारंभात दारूवर मर्यादा घालणे सर्वात महत्त्वाचे आहे. निमंत्रण पत्रिकेवर हे स्पष्टपणे लिहिले जाऊ शकते की फंक्शनमध्ये दारू दिली जाणार नाही. यामुळे पाहुण्यांना पार्टीमध्ये दारू पिणे मर्यादित आहे की निषिद्ध आहे हे आधीच कळेल आणि ते त्यानुसार तयारी करतील.

कॉकटेल पार्टीनंतर 1 दिवसाचे अंतर ठेवा

जर लग्नाचे अनेक दिवस असतील आणि त्यात कॉकटेल पार्टीचा समावेश असेल तर दुसऱ्या दिवशी कोणतेही मोठे कार्य न करण्याचा प्रयत्न करा. याद्वारे, लोक कॉकटेल पार्टीनंतर आरामात आराम करू शकतात आणि ताजेपणासह लग्नाच्या मुख्य कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. यामुळे प्रत्येकजण पूर्णपणे रिचार्ज होईल आणि लग्नाच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकतील.

अल्कोहोलच्या सेवनाचे निरीक्षण करा

काही लोक दारूच्या प्रभावाखाली मर्यादा ओलांडतात. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला जबाबदारी द्या, जसे की मित्र किंवा कुटुंबातील सदस्य, जो कोणी आवश्यकतेपेक्षा जास्त मद्यपान करत आहे की नाही यावर लक्ष ठेवू शकेल. आवश्यक असल्यास, दारूची सेवा हलकी करावी जेणेकरून कोणीही जास्त नशा करू नये.

सॉफ्ट ड्रिंक आणि मॉकटेल ऑफर करा

अल्कोहोलसोबतच शीतपेय आणि मॉकटेलचाही चांगला पर्याय असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला दारूशिवाय मजा करण्याचा पर्याय मिळेल. मॉकटेल्स अमर्यादितपणे सर्व्ह केले जाऊ शकतात.

दारू पिल्यानंतर खाण्याबाबत काळजी घ्या

रिकाम्या पोटी अल्कोहोलचे सेवन करणे नेहमीच वाईट असते, म्हणून लोकांनी दारू पिण्यापूर्वी काहीतरी खाण्याची खात्री करा. यासाठी स्नॅक्सची चांगली व्यवस्था करा जेणेकरुन लोक हळू हळू दारूचे सेवन करतात आणि जास्त मद्यपान करू नयेत.

वाइनच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या

तसेच दारूचा दर्जा लक्षात ठेवा. स्वस्त आणि बनावट मद्याचे सेवन केल्याने अनेकदा जास्त नशा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून, फक्त चांगली आणि मध्यम दर्जाची दारू देण्याचा प्रयत्न करा. यामुळे लोकांच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही आणि मौजमजेचे वातावरणही राहील.

आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था करा

अल्कोहोलच्या सेवनाने काहीवेळा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की उलट्या, डोकेदुखी किंवा पोटदुखी. म्हणून, लग्नाच्या ठिकाणी काही आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था ठेवण्याची खात्री करा. जसे काही आपत्कालीन औषधे, उलट्या प्रतिबंधक औषधे, वेदनाशामक आणि हँगओव्हर कमी करणारी औषधे उपलब्ध असावीत.

कठोर नियमांचे पालन करा

लग्नात लहान मुले किंवा मोठी माणसे सहभागी होत असतील तर त्यांना दारूच्या सेवनापासून दूर ठेवा. याशिवाय पार्टीदरम्यान दारू पिऊन वाहन चालवण्यास सक्त मनाई करा आणि त्यासाठी नियम बनवा. जर एखाद्याने जास्त मद्य प्राशन केले असेल तर तो सुरक्षितपणे घरी पोहोचू शकेल म्हणून वाहतुकीची व्यवस्था करा.

मर्यादित सर्व्हिंग पर्याय आहे

तुम्ही मर्यादित मद्य पुरवण्यासाठी एक प्रणाली तयार करू शकता. उदाहरणार्थ, प्रत्येक अतिथीला ठराविक संख्येने कूपन दिले जाऊ शकतात जे फक्त 1 किंवा 2 पेयांपर्यंत मर्यादित आहेत. हे लोकांना जास्त मद्यपान टाळण्यास आणि पार्टीचा आनंद घेत राहण्यास देखील मदत करेल.

लग्नसमारंभात दारूऐवजी मौजमजा करण्यावर भर द्या

लग्नात मद्यपान करण्याऐवजी, लाइव्ह बँड, डीजे, डान्स परफॉर्मन्स किंवा गेम्स यासारख्या इतर मनोरंजनाची निवड करा. यामुळे लोक दारूवर कमी आणि मौजमजेवर जास्त लक्ष केंद्रित करतील.

अशाप्रकारे, तुमच्या लग्नाचे वातावरण सकारात्मक होईल आणि प्रत्येकजण चांगला आनंद घेऊ शकेल.

लग्नासारख्या खास प्रसंगी दारूचे सेवन मर्यादित आणि समंजसपणे केले तर आनंद अनेक पटींनी वाढतो.

लग्नाची खरी मजा आपण मित्र आणि कुटुंबियांसोबत आनंदाने घालवलेल्या क्षणांमध्ये असते. दारू हे एक माध्यम असू शकते, पण ते तुमच्या लग्नाचे सुंदर क्षण खराब करू देऊ नका.

या छोट्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन खरोखरच अविस्मरणीय आणि आनंदाने भरलेले बनवू शकता.

डेटिंग टिपा : तारीख महत्त्वाची का आहे?

* प्रतिनिधी

आजच्या व्यस्त जीवनात, प्रेमाच्या मार्गावर कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी, मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांबद्दल खूप काही जाणून घ्यायचे असते. यासाठी ते डेटवर जाण्याचा विचार करतात. असो, कोणतेही प्रेमळ नाते पूर्ण करण्यासाठी काही भेटीगाठी खूप महत्त्वाच्या असतात. तुमचे भविष्य कसे असेल हे या बैठकी ठरवतात.

  1. लाइफ इन मेट्रोचित्रपटाचा नायक

इरफान खान आणि नायिका कोंकणा सेन नियोजित पहिल्या तारखेला भेटतात. पण इरफान जेव्हा तिला पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्याची नजर कोंकणाकडे कमी आणि तिच्या कपड्यांवर आणि फिगरवर जास्त असते. अशा स्थितीत कोकणाचा मूड बिघडतो आणि ती विचार करू लागते, हे असे काय आहे? त्याचे लक्ष फक्त माझ्या कपड्यांवर आणि फिगरवर असते. त्यामुळे कोंकणा सेनला तारखा आवडत नाहीत.

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमची तारीख अविस्मरणीय बनवायची असेल, तर काही खास गोष्टी जाणून घ्या, ज्यामुळे तुमचं प्रेम तर वाढेलच पण काही भेटींमध्ये तुमची जवळीकही वाढेल.

  1. डेटिंग महत्वाचे का आहे

मानसोपचारतज्ज्ञ प्रांजली मल्होत्रा ​​सांगतात, “विपरीत लिंगाच्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद कोणत्याही व्यक्तीला रोमांच भरतो. डेटिंग एखाद्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या कामापासून दूर घेऊन जाते आणि त्याला जीवनात एक स्पार्क देते आणि यामुळे चांगल्या भावना येतात. तुम्ही फक्त स्वतःकडेच नाही तर तुमच्या कपड्यांकडे आणि वागण्याकडेही पूर्ण लक्ष देण्यास सुरुवात करता. वास्तविक, आपल्या सर्वांमध्ये एक लैंगिक ऊर्जा असते, जी मनाला उत्साहाने भरते. जेव्हा एखाद्याला भेटल्याचा आनंद मिळतो तेव्हा ती अशी अनुभूती देते की ती शब्दात व्यक्त करता येत नाही. त्याला असे वाटते की तो एखाद्यासाठी इतका महत्वाचा आहे किंवा समाजात हवा आहे. मग कोणीतरी त्याला भेटू इच्छितो. डेटिंग आपल्याला सामाजिक शिष्टाचार देखील शिकवते.

  1. डेटिंग जोमाने करा

डेटिंग जोडीदार निवडण्यासाठी असो किंवा मैत्रीसाठी, डेटिंग जोमाने करा. डेटवर जाणे हा एक मनोरंजक अनुभव आहे. या माध्यमातून एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते.

  1. पहिली तारीख

डेटवर जाणे एखाद्या मोठ्या टास्कपेक्षा कमी नाही. कोणत्याही मुलासाठी किंवा मुलीसाठी हा एक महत्त्वाचा क्षण असतो. मग जेव्हा पहिल्या डेटवर जाण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही तुमची पहिली डेट अविस्मरणीय बनवणं अधिक महत्त्वाचं ठरतं. पहिल्या तारखेला तुम्ही असा संस्कार द्यावा की समोरची व्यक्ती तुम्हाला पुन्हा भेटण्यासाठी आतुर होईल. यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

वेळ आणि ठिकाण आगाऊ निवडा आणि तुमच्या नियोजित वेळेपूर्वी पोहोचा.

* जर तुम्ही पहिल्यांदाच डेटवर जात असाल तर खूप चकचकीत कपडे घालण्याऐवजी साध्या सोबर पद्धतीने जा. मेकअप कमीत कमी ठेवा.

* पहिल्यांदा भेटताना, तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू घेण्यास विसरू नका आणि भेटवस्तू त्याला/तिला आवडेल अशी असावी.

* पहिल्या तारखेला जास्त उत्साह दाखवू नका. वर्तन नियंत्रणात ठेवा. त्यात कृत्रिमता आणू नका.

  1. अशा प्रकारे डेटिंग यशस्वी करा

पोशाखाची निवड : तुम्ही असे कपडे निवडले पाहिजेत जे तुमचे व्यक्तिमत्व तर वाढवतीलच पण तुम्हाला आरामदायक वाटतील.

  1. डेटिंगचे ठिकाण आणि वेळ : प्रथम

तारखेसाठी सार्वजनिक ठिकाण निवडा जेणेकरून तुम्हाला आरामदायक आणि सुरक्षित वाटेल. पहिल्या तारखेला जास्त वेळ घालवू नका. शक्य असल्यास, फक्त जेवणासाठी भेटा. यामुळे तुमच्या पार्टनरलाही तुमच्या वेळेची किंमत समजेल. पहिल्या तारखेला येणारे बिल शेअर करा.

  1. काय करू नये

* डेटिंगला फक्त टाईमपास किंवा मजा म्हणून समजू नका, तर समोरच्या व्यक्तीला जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची संधी द्या.

* डेटिंग करताना फ्लर्ट करू नका.

* डेटिंग दरम्यान धूम्रपान किंवा मादक पदार्थांचे सेवन करू नका.

* पहिल्या तारखेलाच खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका.

* जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एखादी गोष्ट आवडत नसेल तर गप्प राहा. कोणत्याही गोष्टीवर वाद घालू नका.

* पहिल्या तारखेला शारीरिक बनण्याचा प्रयत्न करू नका.

* पहिल्या तारखेला, स्वत: बोलू नका, परंतु त्याचे देखील ऐका.

* डेटिंगला मुलाखत देऊ नका आणि विचारपूर्वक विनोद करू नका.

  1. जेव्हा तुम्हाला तुमचा जोडीदार आवडत नाही

एखाद्याला भेटण्यापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीचा सकारात्मक विचार करा. पण भेटल्यानंतर त्याच्या/तिच्या दिसण्याबद्दल आणि वागण्याबद्दल सत्य समोर येते. दुरून सर्व काही छान दिसते. तुम्हाला तुमचा जोडीदार आवडत नसेल तर या गोष्टींचा विचार करा:

* पहिल्या तारखेला लग्नाच्या समान समजू नका. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही फक्त मैत्री टिकवू शकता.

* जर तुम्हाला ते आवडत नसेल तर त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू नका.

* पहिल्या तारखेला तुम्हाला ती आवडत नसली तरीही, तिला तुम्हाला नापसंत होऊ देऊ नका.

*जेव्हा तुम्ही एखाद्याला पहिल्या डेटला भेटता तेव्हा त्याच्याबद्दल आधीच माहिती घ्या आणि तो कसा आहे, मग कोणतीही अडचण येणार नाही.

  1. डेटिंग रोमांचक करा

तुम्ही तुमची पहिली तारीख या प्रकारे रोमांचक बनवू शकता:

क्लोव्ह ड्राईव्ह : तरुणांमध्ये लवंग ड्राईव्हची खूप क्रेझ आहे. तुमच्या जोडीदाराला अशा ठिकाणी घेऊन जा जिथे तुम्ही दोघेही लाँग ड्राईव्हचा आनंद घेऊ शकता.

चित्रपट किंवा पार्क : डेटिंग दरम्यान तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी जाऊ शकता. जर तुम्हाला चित्रपट पाहणे आवडत नसेल तर तुम्ही उद्यानात बसू शकता.

स्वारस्यपूर्ण कल्पना : डेटिंगला रोमांचक बनवण्यासाठी, आपण नौकाविहार, मासेमारी किंवा इतर मनोरंजक कल्पना शोधू शकता.

विंडो शॉपिंग : तुम्ही खिडकी शॉपिंग किंवा हटके शॉपिंग देखील मजा आणि आनंदाने करू शकता. याद्वारे तुम्ही एकमेकांच्या आवडीनिवडीही जाणून घेऊ शकाल.

गेटोगेदर : एखाद्याला जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी गेटटोगेदर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या जोडीदाराला अधिक आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही घरी काही मित्रांसोबत गेट टूगेदर देखील करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरी कॅन्डल लाईट डिनरही करू शकता.

हळदी समारंभ : लग्न समारंभात हळदी विधीचा आनंद घ्या आणि दिखावा करू नका

* आरती सक्सेना

हळदी समारंभ : लग्नात हळदी विधीला जेवढे महत्त्व आहे, त्यापेक्षा जास्त या विधीदरम्यान होणारी मजा आणि नृत्य लग्नाची मजा द्विगुणित करते. त्यामुळेच लग्नात हळदी समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परंतु या सराव दरम्यान अनेक गोष्टी घडतात ज्याकडे लक्ष देणे योग्य आहे. हळदी समारंभात या गोष्टी लक्षात ठेवल्या तर लग्नादरम्यान हळदी समारंभाची मजा द्विगुणित तर होईलच पण ती संस्मरणीयही होईल. हा क्रम पहा :

लग्नात हळदी विधीचे महत्व

लग्नसराईचा हंगाम आला आहे, सगळीकडे लग्नांचा जल्लोष आहे. वर आणि वधू महागड्या खरेदीत व्यस्त आहेत. लग्नाची सुरुवात हळदी समारंभाने होते. हळदी, मेहंदी, संगीत ही अशी लग्नाची फंक्शन्स आहेत ज्यांचा आनंद फक्त वधू-वरच नाही तर लग्नातील पाहुणेदेखील घेतात कारण हळदी शुभ मानली जाते.

त्यामुळे लग्नाची सुरुवात हळदी समारंभाने होते. वधू-वरांना हळदी अर्पण केली जाते. या विधीमागील एक कारण म्हणजे थंड भागात राहणाऱ्या लोकांनी अनेक दिवस आंघोळ केली नाही, त्यामुळे त्यांच्या शरीरावर घाणीचे थर साचले. यासाठी वधू-वरांना हळद लावली जात असे. पुष्कळ वेळा हळदीचा रंग पिवळ्या ते काळ्या रंगात बदलत असे जे वधू किंवा वर आंघोळ करत नसल्याचा पुरावा होता. हे लक्षात घेऊन हळदीचा विधी पूर्वजांनी सुरू केला होता, जेणेकरून वधू-वरांनी लग्नाला केवळ शुभच नाही तर स्वच्छ राहून हजेरी लावावी.

हळदी समारंभासाठी कपडे आणि दागिने दाखवणे टाळा

हळदीच्या कार्यक्रमात पिवळे कपडे घालण्याची प्रथा आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी वधू-वरापासून लग्नाच्या पार्टीपर्यंत सर्वजण पिवळे कपडे घालतात आणि जुळणारे दागिने बनवतात. सोशल मीडियावर महागडे पिवळे रंगाचे कपडे आणि दागिने घालून बॉलीवूड स्टार्स आणि अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुका पाहून सर्वसामान्य लोकही याचे अनुकरण करून हळदी समारंभासाठी महागडे कपडे मिळवण्याचा प्रयत्न करतात.

अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ते या विधीमध्ये खर्च करू शकता. परंतु ज्यांचे बजेट हा मोठा खर्च उचलू शकत नाही त्यांनी हा खर्च टाळावा आणि दिखाऊपणा करू नये तर आपल्या सोयीनुसार खर्च करावा. अशा प्रसंगी, हळदी समारंभासाठी, वधू-वरांच्या कुटुंबियांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या खिशाचा विचार करून मुलींसाठी पिवळी चुन्नी आणि मुलांसाठी पिवळा स्कार्फ लावणे योग्य ठरेल. या विधीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणालाही चुनी आणि स्कार्फ द्यावा आणि इतरांना विधी पाहण्याची संधी द्यावी.

ज्यांना फक्त हा विधी पहायचा आहे आणि त्यात भाग घ्यायचा नाही त्यांनी पिवळे कपडे घालू नयेत. फक्त हा विधी पाहण्याचा आनंद घ्या.

हळदी समारंभात सर्वांना हळदी लावण्याचा प्रयत्न करू नका

अशावेळी जेव्हा लोक हळद लावून होळी खेळत असतात, तेव्हा हेही लक्षात ठेवा की, बळजबरीने कोणाला हळद लावू नका, कारण कधी-कधी या सोहळ्याचा आनंद घेताना काहींना हळद लावणे आवडत नाही त्यांच्या चेहऱ्यावर गुलालाची उधळण करा आणि मजा करा. कारण जर काही लोक गमतीशीर आणि मस्तीखोर असतील तर काही लोक गंभीर आणि गंभीर देखील असतात. अशा लोकांना हळद लावण्याचा विधी देखील आवडत नाही. त्यामुळे हळद ज्यांना आवडते त्यांनाच लावावी.

हळदी समारंभात अनेक वेळा मौजमजा करण्यासाठी काही लोक वधू-वरांना अशा ठिकाणी हळदी लावतात, जी वधू किंवा वराला अजिबात आवडत नाही. यानंतर, हळद लावण्याचा विधी अनेकदा भांडणात बदलतो. त्यामुळे अशा कामांपासून सावध राहावे.

लग्नात हळदी समारंभात या गोष्टींची विशेष काळजी घेतली तर लग्नाची मजा द्विगुणित होऊ शकते आणि लग्न संस्मरणीय ठरू शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें