Diwali Special: दीवाळीत काय खावे आणि काय खाऊ नये

* नीरा कुमार

सणाच्या हंगामात स्वत:ला कसे निरोगी ठेवावे जेणेकरुन वजन वाढू नये आणि जीवनशैलीशी संबंधित कोणताही आजार होणार नसेल. उदाहरणार्थ, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ. यासाठी खालील गोष्टी लक्षात घेऊन खाणेपिणे महत्वाचे आहे, तरच तुम्ही निरोगी असाल :

गोडधोडबरोबर तडजोड नाही

* दिवाळीच्या वेळी मिठाईच्या गुणवत्तेवर आपण विश्वास करू नये कारण खवा, तूप आणि इतर पदार्थ कसे वापरले गेले आहेत हे आपल्याला माहिती नसते. मिष्टान्न आकर्षक बनविण्यासाठी मुबलक प्रमाणात फूड कलर वापरला जातो. अशा परिस्थितीत खूप जलद बनणारे मिष्टान्न घरीच बनवण्याचा प्रयत्न करा.

* जर एवढाही वेळ नसेल तर काजूबादाम वगैरे भाजून घ्या. मध आणि चाटमसाला घालून सर्व्ह करावे.

* लाडू, बर्फी, खूप साऱ्या चॉकलेट्सचा सुगंध आणि चवीबद्दल नुसता विचार करूनच तोंडाला पाणी येते. म्हणून ते तयार करण्यासाठी नाचणी, ज्वारी आणि बाजरी निवडा. एकतर यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, दुसरे म्हणजे कमी कॅलरी असते. यामध्ये गोड घालण्यासाठी गुळाचे चुरण, देशी खांडसरी इत्यादींचा वापर योग्य असतो. चवीनुसार थोडे कमीच घालावे.

* साखरेच्या जागी सिंथेटिक स्वीटनर्सचा वापर केला जाऊ शकतो परंतु याचे प्रमाणदेखील नियंत्रणात ठेवा. सिंथेटिक स्वीटनर्स मोठया प्रमाणात सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणामदेखील होतात.

* दिवाळीत मिठाई, खीर, कस्टर्ड वगैरे बनवण्यासाठी फक्त टोन्ड केलेले दूध वापरा. यामध्ये सोया दुधाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, प्रथिने अधिक आढळतात आणि फायबरदेखील असते, परंतु कॅलरी कमी असतात.

* मिठाई वाफेमध्येही शिजवून बनवता येते. जसे बाष्प संदेश, वाफवलेली बर्फी इत्यादी.

* जर तुम्ही खीरपुडी बनवत असाल तर त्यात साखरेऐवजी गोड फळांचा रस किंवा खजूर, खारीक पावडर आणि मंजीर घाला.

शेवटी, आपल्या मिष्टान्नाच्या चवीवर थोडे नियंत्रण ठेवा. मिठाईऐवजी फळे खा, कोशिंबीर खा. घरी येणाऱ्या पाहुण्यांना फळांचा चाट द्या, ग्रीन टी, नारळाचे पाणी प्यायला द्या. या व्यतिरिक्त लिंबू सरबत बनवा. त्यात काही सिया बिज घाला. मिष्टान्नामध्ये थोडे मध घाला. चव आणि आरोग्य दोन्ही अबाधित ठेवेल.

चवीबरोबरच आरोग्यदेखील

* नाश्ता असो, लंच किंवा डिनर असो, कचोरी, पकौडी इत्यादी खोल तळलेल्या गोष्टींपासून अंतरच ठेवा. त्याऐवजी चवदार रोटी किंवा पराठा कमी तेलाने बनवा.

* जर तुम्हाला कोफ्ता खायचा असेल तर नक्की खा, ग्रेव्ही तेल काढण्याचा प्रयत्न करा आणि १-२ कोफ्त्यांमध्येच पूर्ण चव घ्या. घरात कोफ्ते बनवत असाल तर आप्पा पात्रात २ छोटे चमचे तेलात सुमारे ११-१२ कोफ्ते बनवा, ग्रेव्हीमध्येही १-२ छोटे चमचेच तेल वापरा. चव तीच पण पद्धत वेगळी आहे.

* आतिथ्य करण्यासाठी न्याहारीला मुरमुरे, भेळपुरी, भाजलेले सोयाबीन, फळांचा चाट, भाजलेले मखाणे इत्यादी बरेच काही आहे ज्यांना नवीन पद्धतीने केले जाऊ शकते व कौतुक मिळवता येऊ शकते.

* खोल तळलेल्या गोष्टी जसे समोसे, करंज्या इत्यादी भाजलेदेखील जाऊ शकतात. यामुळे तेलाचे प्रमाण कमी लागेल आणि चवदेखील भरपूर असेल.

तेला-तुपाची योग्य निवड योग्य तेल-तूप वापरणे फार महत्वाचे आहे. चांगल्या प्रतीचे मोहरी तेल, राईस ब्रेन ऑइल किंवा गायीच्या तुपाचा वापर करावा. याशिवाय आवश्यक तेवढेच वापरा. आपण एकदा डीप फ्राय केलेल्या तेलामध्ये पुन्हा-पुन्हा तळणे टाळावे.

भरपूर पाणी प्या, मॉर्निंग वॉक करा आणि काही व्यायाम अवश्य करा. जर आपण कोणतेही औषध घेत असाल तर ते वेळेत घ्यावे.

स्किन अॅलर्जीपासून बाळाचे करावे रक्षण

* पारुल भटनागर

मुलांची स्किन विशेषकरून नुकत्याच जन्मलेल्या बाळाची स्किन खूप नाजूक असते. अशक्त असल्यामुळे ते खूप लवकर अॅलर्जी व इन्फेक्शनच्या संपर्कातही येऊ लागते. त्यासाठी त्यांना विशेष काळजीची आवश्यकता असते.

याविषयी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल साइंसचे डॉक्टर सुमित चक्रवर्ती बाळाला अॅलर्जीपासून वाचवण्यासाठी काही विशेष टीप्स सांगत आहेत :

स्किन अॅलर्जी काय आहे

जेव्हा बेबीची स्किन अॅलजर्न अर्थात अॅलर्जी तयार करणाऱ्या तत्वांनी प्रभावित होते किंवा मग शरीर जेव्हा एका अॅलर्जीद्वारे ट्रिगर रासायनिक हिस्टामाइनचे उत्पादन करते तेव्हा स्किन अॅलर्जी होते.

मुलांमध्ये साधारणपणे ही अॅलर्जी डायपरद्वारे, खाण्यातून, साबण व क्रीमने, हवामानात आलेल्या बदलावामुळे व बऱ्याच वेळा कपडयांमुळेही होते. याचा प्रभाव विशेषकरून सेंसिटिव स्किनवर सर्वाधिक पडतो, ज्यास विशेष काळजीची आवश्यकता हवी असते.

कशा-कशा स्किन अॅलर्जी

एक्जिमा : हा नेहमी ३-४ महिन्यांच्या बाळांमध्ये बघायला मिळतो. यात शरीराच्या कुठल्याही अंगावर लाल रंगाचे चट्टे बघायला मिळतात. ज्यामुळे एवढी खाज येते की बाळाला ते सहन करणे अवघड होते.

कारण : हा आजार नेहमी एकतर आनुवंशिकपणे किंवा मग कपडे, साबण, अस्वच्छता व बदलत्या हवामानामुळे होतो. अशा स्थितीत आपणास जेव्हा ही आपल्या बाळाच्या स्किनवर लाल रंगाचे चट्टे बघावयास मिळाले तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.

काय करावे : आपल्या मुलाच्या स्किनला रोज माईल्ड सोपने स्वच्छ करा. स्किन जास्त वेळेपर्यंत ओली ठेवू नये नाहीतर तिला अॅलर्जी होण्याचे चान्सेस वाढतात.

डायपर पुरळ : बाळाने साउंड स्लिप घ्यावी यासाठी पेरेंट्स त्याला नेहमी डायपर घालून ठेवतात, परंतु बऱ्याच काळासाठी डायपर परिधान केल्याने बाळाच्या त्वचेवर सूज येते आणि पुरळ उठते.

कारण : दीर्घ काळापर्यंत डायपर चेंज न करणे, जास्त ओला डायपर, आवश्यकतेपेक्षा जास्त टाइट डायपर पुरळ उठण्याचे कारण बनतो.

काय करावे : प्रत्येक दोन-तीन तासांनी डायपर बदलावे आणि चेंज करण्यापूर्वी स्किन व्यवस्थितपणे स्वच्छ करावी. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्यानुसार डायपर पुरळावर क्रिमपण लावावे. जर मुलाला डायपर घालण्यास त्रास होत असेल तर त्याची त्वचा उघडीच ठेवावी.

बग बाइट रॅशेज : बहुतेकदा उन्हाळयात डास किंवा बैड बग्जमुळे मुलांच्या त्वचेवर चट्टे आणि त्यांना खाजल्यामुळे त्यांच्या त्वचेलाही खाज येते, ज्यामुळे मुले शांत झोपत नाहीत.

कारण : बऱ्याचवेळा अस्वच्छतेमुळे घरात किडे होतात, यांपासून वाचण्यासाठी आपले घर रोज व्यवस्थित स्वच्छ करावे.

काय करावे : त्वरित डॉक्टरांना दाखवावे, जेणेकरुन अँटीबायोटिक मलममुळे चट्टे आणि जळजळ कमी होण्यास मदत होईल. मुलाला अधिक घट्ट कपडे घालण्याचे टाळावे.

हिट रॅशेज : उन्हाळयात मुलांच्या त्वचेवर विशेषत: त्यांच्या चेहऱ्यावर, मान, अंडरआर्म आणि मांडीच्या जवळ गर्मीमुळे रॅशेज येतात, ज्यांत खाज सुटल्यामुळे त्यांना खूप त्रास होतो.

कारण : शरीरावर घाम साचणे व कपडे घालणे हिट रैशेजचे कारण बनते.

काय करावे : मुलाला थंड जागेवर ठेवावे. त्याला घट्ट कपडे परिधान करू नयेत.

गजकर्ण : हा एक प्रकारचा बुरशीजन्य संसर्ग आहे, जो सामान्यत: टाळू व पायांवर परिणाम करतो आणि स्पर्श केल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरतो.

कारण : हे घाणेरडे टॉवेल्स, कपडे, खेळणी व घाम एका जागी साचल्याकारणाने होते.

काय करावे : जेव्हाही मुलाला त्रास होत असेल तेव्हा त्याला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अँटीफंगल क्रीम लावावे आणि या गोष्टीची विशेष काळजी घ्या की क्रीम लावण्यापूर्वी प्रभावित जागेला व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्या.

डोक्यावर पापुद्रा जमणे : जन्माच्या वेळेस बाळाच्या डोक्यावर पापुद्रा असतो. जी साधारण गोष्ट आहे. परंतु बऱ्याच वेळा कालांतरानेसुद्धा मुलांमध्ये अशीच समस्या बघावयास मिळते, जी खूप त्रासदायक असते.

कारण : शरीराच्या तेलाच्या ग्रंथींमध्ये जास्त तेल तयार झाल्यामुळे ही समस्या बाळाला होते.

काय करावे : स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

त्वचेची निगा राखण्यासाठी टीप्स

या गोष्टींची काळजी घेत नवजात बालकांना त्वचेच्या संसर्गापासून वाचवता येते.

* बाळाला अंघोळीनंतर बेबी क्रीम लावायला विसरू, कारण यामुळे स्किन कोरडी होत नाही.

* नवजात बालकासाठी साबण आणि शम्पू डॉक्टरांच्या सल्यानुसारच खरेदी करा.

* जर कुटुंबातील कोणा सदस्याला स्किन अॅलर्जी असेल तर त्यापासून बाळाला दूरच ठेवावे.

* अस्वच्छ हातांनी बाळाच्या त्वचेला स्पर्श करू नये.

* फक्त मऊ फॅब्रिकचे कपडेच घालावेत.

* खाण्या-पिण्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

* बेबीला कव्हर करून ठेवावे, जेणेकरून किटक चावण्याची भीती राहणार नाही.

या 15 टिपांनी Diabetes नियंत्रण ठेवा

* प्रतिनिधी

जरी मधुमेह जगभरात पसरला आहे, परंतु आज भारत त्याचा सर्वात मोठा गड आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 21 व्या शतकातील जीवनशैली. पण जर वेळीच त्याकडे लक्ष दिले गेले आणि आहारात सुधारणा झाली तर ते बऱ्याच अंशी नियंत्रणात राहू शकते.

हा उपाय करा

  1. व्यायाम अभ्यास दर्शवतो की व्यायाम केल्याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो आणि रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. परिणामी, उच्च चयापचय आणि मधुमेहाचा धोका कमी असतो.
  2. साखर घेऊ नका तुम्ही कमी साखर, गूळ, मध, कोल्ड्रिंक्स इत्यादी खावे, जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी पूर्णपणे नियंत्रणात राहील. जास्त साखरयुक्त पदार्थ आणि शर्करायुक्त पेये वापरल्याने इन्सुलिनची पातळी वाढू शकते.
  3. फायबर – रक्तातील साखर शोषण्यात फायबर महत्वाची भूमिका बजावते. म्हणून, आपण गहू, तपकिरी तांदूळ किंवा गव्हाची भाकरी इत्यादी खावी, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होईल, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होईल.
  4. ताजी फळे आणि भाज्या – फळांमध्ये नैसर्गिक साखरेचे मिश्रण असते आणि शरीराला सर्व प्रकारचे पोषण प्रदान करते. ताज्या फळांमध्ये जीवनसत्त्वे अ आणि क असतात, जे रक्त आणि हाडांचे आरोग्य राखतात. याशिवाय झिंक, पोटॅशियम, लोह यांचे चांगले मिश्रणही आढळते. पालक, खोभी, कडू, अरबी, खवय्या इत्यादी मधुमेहामध्ये आरोग्य वाढवणारे आहेत. त्यात कॅलरीज कमी आणि व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन आणि मॅग्नेशियम जास्त आहे, जे मधुमेह बरे करते.
  5. ग्रीन टी – दररोज साखरेशिवाय ग्रीन टी प्या कारण त्यात अँटी -ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि रक्तातील साखरेची पातळी राखतात.
  6. कॉफी जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन केल्याने हृदयरोग होऊ शकतो, परंतु जर ते कमी प्रमाणात घेतले तर ते रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात राखू शकते.
  7. अन्नाची विशेष काळजी घेणे – थोडा वेळ अन्न न घेतल्याने, हायपोग्लाइसीमिया होण्याची शक्यता खूप वाढते, ज्यामध्ये साखर 70 च्या खाली येते. सुमारे अडीच तासांनी अन्न घेत रहा. दिवसातून तीन वेळा खाण्याऐवजी थोडेसे सहा-सात वेळा खा.
  8. दालचिनी – संशोधन असे सूचित करते की दालचिनी शरीरातील दाह कमी करते आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करते. अन्न, चहा किंवा गरम पाण्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून हे प्या.
  9. तणाव कमी करा – ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन दोन्ही तंत्रिकाच्या कार्यावर परिणाम करतात. जेव्हा तणावाच्या काळात एड्रेनालाईन सोडले जाते तेव्हा ते विस्कळीत होते, ज्यामुळे मधुमेहाचा उच्च धोका निर्माण होतो.
  10. उच्च प्रथिनेयुक्त आहार जे लोक मांसाहारी खातात त्यांनी त्यांच्या आहारात लिल मांसाचा समावेश करावा. उच्च प्रथिनेयुक्त आहार खाल्ल्याने शरीर मजबूत राहते कारण मधुमेहाच्या रुग्णांना कर्बोदके आणि जास्त चरबीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
  11. फास्ट फूडला नाही म्हणा – शरीराची वाईट स्थिती फक्त जंक फूड खाण्यामुळे होते. त्यात केवळ मीठच नाही तर तेलाच्या स्वरूपात साखर आणि कर्बोदके देखील असतात. हे सर्व तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतात.
  12. मीठावर बंदी – मीठाची योग्य मर्यादा मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल विसंगतींचा धोका वाढतो. या व्यतिरिक्त, हे टाइप 2 मधुमेह देखील वाढवू शकते.
  13. भरपूर पाणी प्या – पाणी रक्तातील वाढलेली साखर गोळा करते, ज्यामुळे तुम्ही दररोज 2.5 लिटर पाणी प्यावे. हे तुम्हाला हृदयरोग किंवा मधुमेह देणार नाही.
  14. व्हिनेगर व्हिनेगर रक्तातील सांद्रित साखर स्वतःच विरघळवून हलका करतो. अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की जेवणापूर्वी दोन चमचे व्हिनेगर घेतल्याने ग्लुकोजचा प्रवाह कमी होतो.
  15. सोया सोया मधुमेह कमी करण्यासाठी जादुई प्रभाव दाखवते. त्यात असलेले आयसोफ्लेव्होन्स साखरेची पातळी कमी करून शरीराला पोषण देतात.

Festival Special : सणांमध्ये कसे राहावे निरोगी

* सतकाम दिव्य, सीईओ, क्लिनिक अॅप्स

आज कोरोना दरम्यान सणउत्सव साजरे करताना आपण सेवन करत असलेले खाद्यपदार्थ घरी बनलेले असावे ही बेसिक काळजी सर्वांनीच घेणे जरूरीचे आहे. सणांमध्ये शरीर निरोगी व वजन नियंत्रणात ठेवणे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही ही काळजी घ्याल, की तुम्ही काय आणि किती खाता. आहाराचा प्रकार व पोर्शनचा आकार तुम्हाला हे जाणण्यात मदत करतो, की तुम्ही रोज किती कॅलरी घेत आहात. जर तुम्ही निरोगी व योग्य शेपमध्ये राहू इच्छिता, तर गरजेचे आहे की अन्न विचार करून खावे. आपण सर्व जाणतो, की सण हा आनंदासोबतच मिठाईचादेखील काळ असतो. मिठाईसोबत तुम्ही जास्त कॅलरीचे सेवन करता. यामुळे तुमचे शरीर व स्वास्थ्यदेखील खराब होऊ शकते.

काय खावे काय खाऊ नये

आहारासंबंधी या बेसिक गोष्टींची काळजी उत्सवाच्या काळात घेतली गेली पाहिजे. यादरम्यान डायट खूप महत्त्वाचे आहे व बेसिक गोष्टींची सुरुवात यादरम्यान खाण्यासाठी योग्य पदार्थांचा स्टॉक ठेवून केली जाऊ शकते. जर तुम्ही कॅलरीवर लक्ष ठेवून असता, तर गरजेचे आहे की तुमच्याजवळ खाण्यासाठी योग्य गोष्टी असाव्यात. यामुळे तुम्ही आनंदी व मिठायांसोबत असूनदेखील तुमचा आहार निरोगी ठेवू शकाल.

हवे असल्यास तुम्ही याकाळात ड्रायफ्रूट्सची निवड करू शकता. यात स्वास्थ्यकर फॅट्स असतात, जे वजनाला काही हानी न पोहोचवता तुमची त्वचा व केसांना नीट करण्यात मदत करू शकतात. मूठभर मेवा, जसे की मनुके, बदाम, पिस्ता, काजू, जर्दाळू, अंजीर इत्यादी सणांच्यावेळी काही आरोग्यदायी पदार्थ व भेट देण्याचे उत्तम पर्याय आहेत.

हे देखील महत्वाचे आहे, की तुम्ही पांढरी साखर, तूप वा तेलात तळलेल्या गोष्टींपासून दूर राहावे. यांच्या ऐवजी गूळ वा डार्क चॉकलेट व ड्रायफ्रूट्स बनलेल्या मिठायांचे सेवन करा. हा एक चांगला पर्याय असेल. मैदा, साखर वा तुपाने बनलेल्या मिठाया कमीत कमी खा. जेणेकरून खूप जास्त कॅलरीजना दूर ठेवू शकाल.

मसाल्याऐवजी आरोग्यदायी गोष्टींचा उपयोग केला जायला हवा. गोड पदार्थांमध्ये लवंग, केसर, दालचिनी, वेलची व काळीमिरी इत्यादींचा उपयोग केला जाऊ शकतो. हे खाद्यपदार्थांना चांगली चव देण्यासोबतच पुष्कळ जैविक गुणांनीदेखील समृद्ध असतात व यामुळेच आरोग्याला खूप प्रकारचे फायदे देतात.

खरेदीच्या दरम्यान हलकेफुलके खाण्याची रीतदेखील आहे. यादरम्यान तुम्ही काय खाता याची काळजी घेणे तब्येतीसाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही काय खाता याकडे लक्षदेणे गरजेचे आहे.

आरोग्यदायी डाएटसाठी काही टिप्स

स्वत:ला निरोगी व फिट ठेवण्यासाठी खालील उपायांचा अवलंब करू शकता.

* जर तुम्ही रोज काही वर्कआउट करता तर आपल्या या दिनचर्येची पालन करीत रहा, कारण वर्कआउटमध्ये बाधा आल्यानंतर खाण्यात जरादेखील गडबड झाली, तर जास्त नुकसान होऊ शकते. तुमचे वजन वाढेल.

* अन्न बनवणे बऱ्याच जणांसाठी तणाव कमी करण्याचे काम करते. वास्तविक रिकाम्या पोटी अन्न बनवण्यानेमध्ये खाण्याची इच्छा होते. यापासून वाचण्याचा उपाय हा, की तुम्ही अशा वेळी पदार्थ बनवा, जेव्हा तुम्ही भुकेलेल्या नसाल किंवा मग अनारोग्यदायी गोष्टी जवळ ठेवू नका. तुम्ही जो पदार्थ बनवाल, तो आरोग्यदायी असावा याची काळजी घ्या व यासाठी आरोग्यदायी गोष्टींचा वापर करा. गोडाच्या जागी मध, गूळ व ताज्या फळांचादेखील उपयोग केला जाऊ शकतो.

* सणांच्या पूर्वतयारी दरम्यान खरेदीचा संबंध काही सिद्धांतानुसार व्हायला हवा. यात फक्त आरोग्यदायी पदार्थ निवडणे व सुरुवातीपासूनच अनारोग्यदायी गोष्टींना दूर ठेवणे यांचा सहभाग आहे.

* मांसाहारी भोजनाचे सेवन टाळा व खाण्यात जास्त करून नैसर्गिक गोष्टी, भाज्या, फळे घ्या. जर हे शक्य नसेल, तर मांसाहारी व शाकाहारी भोजन यांच्यामध्ये संतुलन पाळण्याच्या मंत्राचे पालन करा.

* हायड्रेटेड राहायला विसरू नका. पुष्कळ पाणी व इतर पेय पदार्थ प्या. उत्सवांमध्ये आपण घाईतदेखील असतो. आपल्याला आपल्या कामासोबत फिरणे, खरेदी करणे व पुष्कळ बाकी गोष्टींचा समन्वय साधायचा असतो. या व्यस्ततेत आपण कधी पोषण व स्वास्थ्य विसरता कामा नये. इतकेच नाही, कित्येक वेळा तहानेलाच भूक मानले जाते. मग जास्त खाणे खाल्ले जाते. पाणी कमी प्यायले जाते. यामुळे अनिश्चित काळासाठी पाण्याचे असंतुलन होऊ शकते व शरीरावर तणाव होऊ शकतो. यामुळे यावेळी लग्न वा सणांच्या खरेदीदरम्यान पुष्कळ पाणी व हलके पदार्थ घ्या व आनंदी राहा.

हृदयविकाराच्या झटक्यात एक तास कार्डियाक अरेस्टमध्ये

* डॉक्टर. वनिता अरोरा (कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, दिल्ली)

जेव्हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक सेकंदाची गणना होते. ही वेळ आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने काय कारवाई करायची हे ठरवायचे असते. जेव्हा आपल्याकडे रुग्णासाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी एक तास असतो, तेव्हा आपण बरेच काही करू शकतो, परंतु जेव्हा कोणाचे प्राण वाचवण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतात, तेव्हा ती वेगळी बाब असते. या दोन्ही परिस्थितींमध्ये, आपण उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे.

जीव वाचवण्यासाठी उपलब्ध असलेला सुवर्ण तास आणि सोनेरी सेकंद यातील फरक हार्ट अटॅक आणि अचानक कार्डियाक अरेस्टच्या बाबतीतही आहे.

आणीबाणीत सुवर्ण तास

सुवर्ण तास ही संकल्पना रुग्णांना गंभीर दुखापत किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत लागू होते. यानंतर पहिला एक तास खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये योग्य उपचार आणि व्यवस्थापन रुग्णाचे किंवा त्याच्या शरीराचे अवयव खराब होण्यापासून वाचवू शकतात. जरी असे म्हणता येत नाही की कोणतीही पायरी एक स्ट्रीक सिद्ध होईल, परंतु जर रुग्णाला क्लेशकारक घटनेनंतर पहिल्या एका तासाच्या आत योग्य वैद्यकीय सेवा मिळाली तर त्याचे आयुष्य वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.

हृदयविकाराचा झटका आल्यास, बऱ्याचदा असा सल्ला दिला जातो की रुग्णाला तो आल्यानंतर पहिल्या एका तासाच्या आत आपत्कालीन काळजी घ्यावी. पण कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.

हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट दरम्यान गोंधळ

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका यात फरक आहे. बहुतेक लोक हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट सारख्याच गोष्टी मानतात, तर दोघांमधील फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट या दोन वेगवेगळ्या हृदय समस्या आहेत.

हृदयविकाराचा झटका : एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा त्याच्या हृदयापर्यंत ऑक्सिजन युक्त रक्ताचा योग्य प्रवाह नसतो, जिथून रक्त शरीराच्या इतर भागांमध्ये पंप केले जाते. हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान, रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता अंशतः कमी होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतरही हृदय रक्त पंप करत राहते, पण त्याची गती मंदावते. हृदयविकाराचा झटका आल्यास, एखादी व्यक्ती काही मिनिटे किंवा काही तासांपर्यंत जगू शकते आणि जगू शकते, परंतु यासाठी रुग्णाला शक्य तितक्या लवकर आपत्कालीन काळजी घेणे आवश्यक आहे कारण शरीराचे बरेच भाग आणि मेंदू आहेत रक्त परिसंवादाचा अभाव त्या अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकतो. अशा परिस्थितीत, स्ट्रोक येऊ शकतो, अगदी अचानक कार्डियाक अरेस्ट देखील येऊ शकतो.

कार्डियाक अरेस्ट : प्रश्न उद्भवतो की कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? कार्डियक अरेस्ट अचानक कोणत्याही इशारा किंवा चेतावणी चिन्हाशिवाय होऊ शकतो. कार्डियाक अरेस्टमुळे, रुग्णाचे हृदय काम करणे थांबवते, कारण अशा स्थितीत हृदयाच्या विद्युत प्रणालीमध्ये समस्या असते आणि पंपिंगची प्रक्रिया विस्कळीत होते. याचा परिणाम म्हणून, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. काही सेकंदातच रुग्ण बेशुद्ध होतो आणि त्याची नाडी नाहीशी होते आणि पुढच्या काही मिनिटांत रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक

हृदयविकाराचा झटका हृदयविकारासाठी जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी एक आहे. खराब हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, हृदयरोग, अतालता (अनियमित हृदयाचा ठोका) किंवा अनियमित हृदयाचा ठोका हे इतर अनेक घटकांपैकी आहेत जे हृदयाच्या विद्युत प्रणालीवर परिणाम करतात आणि कार्डियाक अरेस्ट होऊ शकतात.

कार्डियाक अरेस्टला फक्त सोनेरी सेकंद लागतात

हृदयविकाराच्या बाबतीत, जेथे रुग्णाचा परिचारक किंवा बचावकर्ता रुग्णाला रुग्णालयात नेण्याचा सुवर्ण तास असतो, कार्डियाक अरेस्ट झाल्यास, त्या व्यक्तीकडे फक्त काही महत्वाचे सेकंद असतात. अशा परिस्थितीत, कार्डियाक अरेस्टची लक्षणे ओळखणे आणि त्वरित कारवाई करणे फार महत्वाचे आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट येतो तेव्हा ताबडतोब रुग्णवाहिका बोलवावी आणि कार्डिओपल्मोनरी रीसिसिटेशन (सीपीआर) देखील करावे. सीपीआरमध्ये, रुग्णाच्या छातीवर तळहातांसह मजबूत दबाव तयार केला जातो. या दरम्यान प्रति मिनिट 120 कॉम्प्रेशन्सचा वेग असावा. रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हे केले पाहिजे.

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका या एकाच गोष्टी नाहीत आणि त्याच प्रकारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, या दोघांची संपूर्ण माहिती ठेवण्याची जबाबदारी आपली बनते, या दोन्ही परिस्थितींना अज्ञान आणि अज्ञानाची स्थिती देऊन निष्काळजी होऊ नये, विशेषत: कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत, जिथे आपल्याला काही सोनेरी सेकंद घ्यावे लागतील जीव वाचवण्यासाठी.

जेव्हा सणात पीरियड्स सुरू होतात

* पूजा भारद्वाज

सणांच्या आनंदाच्या वातावरणात प्रत्येक जण आनंदाच्या मूडमध्ये असतो, परंतु स्त्रियांचा सणांचा आनंद तेव्हा खराब होतो, जेव्हा त्यांना अशावेळी पीरियड्स सुरू होतात. तेव्हा यादरम्यान येणारा थकवा, कंबर व पोटाच्या वेदना, जास्त ब्लीडिंग व डोकेदुखीसारख्या समस्या त्यांचा सर्व उत्साह कमी करतात व त्या इच्छा असूनही काही करू शकत नाहीत. त्यांची प्रत्येक इच्छा तशीच्या तशीच राहून जाते. घरातल्या इतरांना आनंद साजरा करताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर निराशा पसरते. अशात जर त्यांनी या गोष्टींची काळजी घेतली, तर त्यांचा सणांचा आनंददेखील कमी होणार नाही :

रहा टेन्शन फ्री

अशा वेळी स्त्रिया स्वत:ला एका मर्यादित व्याप्तीने बांधून घेतात व आजारपणासारखे वाटून घेतात, परंतु हे कोणतेच आजारपण नाही, तर ही तर एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे दबून नाही, खुलेपणाने जगा. पीरियडसंबंधी जास्त तणाव घेऊ नका, कारण जास्त तणाव घेणे त्यांच्या तब्येतीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे विचार सकारात्मक ठेवले, तर जास्त चांगले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट आहे की, परिस्थिती कशीही असू द्या, आनंदी राहा. कारण जेव्हा तुम्ही आतून आनंदी रहाल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील तेजाची गोष्टच वेगळी असेल.

हॉट वॉटर बॉटलने शेक

पीरियड्सच्या दरम्यान पोटात जर जास्त वेदना असेल, तर तुम्ही गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेऊ शकता. कारण पीरियड्समध्ये पोटाच्या खालच्या भागात गरम पाण्याच्या बाटलीने शेक घेण्याने गर्भाशयाच्या मांसपेशींना आराम मिळतो व वेदनेपासून आराम होतो.

घ्या स्वच्छतेची विशेष काळजी

पीरियड्सच्या दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्या जेणेकरून तब्येतीवर याचा वाईट परिणाम होऊ नये. यादरम्यान वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याने तुम्ही कित्येक प्रकारच्या आजारांपासून, जसे की यूटीआय व इन्फेक्शनपासून वाचू शकता व यात सगळयात महत्त्वाची भूमिका त्या पॅड वा सॅनिटरी नॅपकिन्सची असते, जे तुम्ही पीरियड्स दरम्यान वापरता. याशिवाय पीरियड्स दरम्यान अँटिबायोटिक साबण वा क्लिंजरने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करा. अंघोळ जरूर करा. कारण यामुळे तुम्ही स्वत:ला फ्रेश वाटेल.

कंफर्ट गरजेचा

आजदेखील अशा कित्येक स्त्रिया आहेत, ज्या पीरियड्सदरम्यान सॅनिटरी पॅड्सच्या जागी अस्वच्छ कपडे, वर्तमानपत्रे, पाने किंवा चुकीच्या पॅडचा वापर करतात, ज्यात त्या स्वत:ला अनकम्फर्टेबल वाटतात व कपडे घाण होण्याच्या भीतीने कुठे जात नाहीत व उत्सवांचा पुष्कळ आनंद घेऊ शकत नाहीत. त्यामुळे या काळात फक्त पॅड्सचाच वापर करा, जेणेकरून तुम्ही मोकळेपणाने जगू शकाल.

योग्य पॅड्स निवडा

पीरियड्सच्या दरम्यान पुष्कळ काळासाठी एकाच पॅडचा वापर तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे पॅड कितीही चांगल्या क्लालिटीचे का असेना, कमीतकमी दिवसातून तीन वेळा जरूर बदला. सोबतच पॅडच्या क्वालिटीवरदेखील लक्ष द्या, कारण पुष्कळ स्त्रिया स्वस्तपणाला बळी पडून प्रॉडक्टच्या गुणवत्तेसोबत तडजोड करतात व कमी पैशांमध्ये हीन ब्रँडचे नॅपकिन्स वापरू लागतात, ज्यामुळे त्यांना रॅशेस येतात.

तसे तर बाजारात निरनिराळया कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत, परंतु यांची गोष्टच वेगळी आहे, कारण हे तुम्हाला मोकळेपणाने जगण्याचे स्वातंत्र्य देते. याशिवाय हे हेवी फ्लोसाठी उपयुक्त आहे व लीकदेखील होत नाही. याला डिस्पोज करणेदेखील खूप सोपे आहे. शिवाय हे पॉकेट फ्रेंडली आहे.

गरजेच्या गोष्टी

* सॅनिटरी नॅपकिन तीन-चार तासांनी बदलत राहा.

* पाळीमध्ये स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घ्या, जेणेकरून तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही.

* पाळीमध्ये प्रायव्हेट पार्टच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या.

* सुती अंडरवेअर वापरा.

* पाळीमध्ये डीहायड्रेशनची समस्यादेखील होऊ शकते. त्यामुळे जास्त पाणी प्या.

* या काळात तंग कपडे शक्यतो वापरू नका. सैल कपडे घाला.

5 Tips : जेव्हा दाढीमध्ये वेदना होतात

* गृहशोभिका टीम

जर तुमची बुद्धीची दाढ आली असेल, तर तुम्हाला त्याच्या वेदनांची कल्पना येईल आणि जर तुमची बुद्धीची दाढ अजून आली नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा एक अतिशय वेदनादायक अनुभव आहे.
बहुतेक लोकांच्या बुद्धीचे दात 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान येतात, परंतु ब-याच लोकांमध्ये ते 25 नंतरही येतात. हे आपल्या तोंडातील शेवटचे, सर्वात मजबूत दात आहेत आणि शेवटचे येतात.
सर्वप्रथम, शहाणपणाचे दात येण्यापूर्वी वेदना का होतात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. वास्तविक, शहाणपणाचे दात शेवटचे येतात आणि यामुळे त्यांना तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. यामुळे, जेव्हा हे दात येतात, तेव्हा ते उर्वरित दात देखील ढकलतात. यासोबतच हिरड्यांवरही दबाव निर्माण होतो. यामुळे, दात दुखणे, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थतेची तक्रार आहे.
या दरम्यान, केवळ तीव्र वेदनाच नाही तर कधीकधी दुर्गंधी, खाण्यात अडचण आणि डोकेदुखीची तक्रारदेखील असते. शहाणपणाची दाढ वेदना कोणत्याही वेळी होऊ शकते आणि ती किमान एक किंवा दोन दिवस टिकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला हवे असल्यास, या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही या वेदनापासून आराम मिळवू शकता.

1. लवंगा
आपल्यापैकी बरेच जण दातदुखीसाठी लवंगा वापरतात. हे शहाणपण दात काढताना देखील वापरले जाऊ शकते. त्याचे अनेस्थेटिक आणि वेदनशामक गुणधर्म वेदना शांत करण्यासाठी उपयुक्त आहेत. याशिवाय, त्याचे अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणदेखील संसर्ग होऊ देत नाहीत. आपण इच्छित असल्यास, आपण काही लवंगा तोंडात ठेवू शकता किंवा आपण त्याचे तेल देखील वापरू शकता.

2. मीठ
दातदुखीमध्ये मीठ वापरणे देखील खूप फायदेशीर आहे. हे हिरड्यांची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय मीठ वापरल्याने संक्रमणाचा धोकाही कमी होतो.

3. लसूण
लसणीमध्ये अँटिऑक्सिडेंट, प्रतिजैविक, दाहक-विरोधी आणि इतर अनेक औषधी गुणधर्म आहेत जे शहाणपणाच्या दातांची वेदना कमी करण्यास मदत करतात. तसेच तोंडातील जीवाणू वाढू देत नाही.

4. कांदे
कांद्यामध्ये अँटी-सेप्टिक, बॅक्टेरियाविरोधी आणि इतर अनेक गुणधर्म आहेत. याचा वापर केल्याने दातदुखीवर आराम मिळतो. हे हिरड्यांना संसर्गापासून सुरक्षित ठेवण्यासदेखील उपयुक्त आहे.

5. पेरूची पाने
पेरूची पाने दातदुखीमध्ये औषधाप्रमाणे काम करतात. पेरूच्या पानांमध्ये दाहक-विरोधी आणि सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मदेखील असतात जे दातदुखीवर फायदेशीर असतात.

हर्निया जेव्हा वेदना नकोशा होतील

* पारूल भटनागर

बदलता दिनक्रम, वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादींमुळे हर्नियाचा आजार मोठया प्रमाणावर पसरत आहे. जेव्हा शरीराचा एखादा भाग वर येतो, सहनशीलतेपलीकडे तसेच अधूनमधून अचानक खूप दुखत असेल तर ही हर्नियाची सामान्य लक्षणे आहेत. योग्यवेळी उपचार न घेतल्यास हे अधिकच गंभीर होते. म्हणूनच तुम्हालाही स्वत:मध्ये अशी लक्षणे जाणवत असतील तर लगेच डॉक्टरकडे जा, जेणेकरून परिस्थिती गंभीर होणार नाही.

चला, ‘एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे डायरेक्टर सर्जन डॉ. वेद प्रकाश यांच्याकडून याबाबत सविस्तर जाणून घेऊया :

हर्निया म्हणजे काय?

हर्निया सर्वसाधारपणे तेव्हा होतो जेव्हा मांसपेशींनी तयार झालेली पेरिटोनियम नावाची भिंत कमजोर होते. यामुळे पोटाच्या आतील भाग नियोजित ठिकाणी न राहता वर आल्यासारखा दिसू लागतो. या स्थितीला हर्निया असे म्हणतात.

हर्नियाचे किती प्रकार आहेत?

फीमोरल हर्निया : हा हर्निया सर्वसाधारणपणे महिलांना आणि त्यातही विशेषकरून गरोदर तसेच जाड महिलांना होतो. हा तेव्हा होतो जेव्हा धमन्यांच्या वरील जांघेत घेऊन जाणाऱ्या नलिकेत आतडी प्रवेश करतात.

इसेंन्शिअल हर्निया : पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या भागावर जास्त दाब पडल्यामुळे मांसपेशी खूपच जास्त ताणल्या जातात. यामुळे तो भाग वर येतो.

नाभी हर्निया : यात पोटातील सर्वात कमजोर मांसपेशी नाभी किंवा बेंबीच्या माध्यमातून वर येतात. हा हर्निया सर्वसाधारणपणे जाड महिला तसेच ज्या महिलांना जास्त मुले होतात त्यांना होतो कारण, सतत शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांच्या मांसपेशी कमजोर होतात.

इंगुइनल हर्निया : इंगुइनल हर्नियात आतडी पोटातून बाहेरच्या दिशेने वर येतात किंवा पोट आणि जांघेच्यामधील भाग हा इंगुइनल नलिकेत असतो. त्या भागातील कमजोरीमुळे अशा प्रकारचा हर्निया होतो.

हर्निया सर्वात जास्त महिलांनाच का होतो :

महिलांना ऐब्डोमिनल म्हणजे उदरातील हर्निया होणे खूपच सामान्य गोष्ट आहे. कारण गरोदरपणात अंतर्गत ओटीपोटातील स्नायू ताणले जातात. शस्त्रक्रिया झालेल्या ठिकाणी हर्निया होण्याची शक्यता सर्वात जास्त असते कारण, ती जागा सर्वात जास्त ताणली जाते.

हर्नियाचे टप्पे

रिड्युसिबल हर्निया : यात झोपल्यानंतर गाठ गायब होते. पण खोकताना, शिंकताना ती दिसते. गाठीचा आकार खूप मोठा नसेल तर तो नियंत्रणात ठेवता येतो किंवा कमी करता येतो.

इरिड्युसेबल हर्निया : यात कोणत्याही स्थितीत गाठ दिसतेच.

ऑब्स्ट्रक्शन हर्निया : आतडयांवर दाब वाढल्याने ती फाटतात, मोशनवेळीही त्रास होतो तेव्हा त्याला ऑब्स्ट्रक्शन हर्निया असे म्हणतात.

कशी असते उपचार पद्धती?

परिस्थिती नियंत्रणात असेल तर औषधोपचार केले जातात पण, हर्नियाचा आकार मोठा असेल आणि खूपच दुखत असेल तर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला जातो. लेप्रोस्कोपिक आणि ओपन सर्जरी अशा दोन प्रकारे शस्त्रक्रिया केली जाते.

लेप्रोस्कोपिक सर्जरीत हर्निया बरा करण्यासाठी छोटासा छेद करून छोटा कॅमेरा आणि लघु निर्मित शल्य चिकित्सा उपकरणांची मदत घेतली जाते.

ओपन सर्जरीत मोठा छेद केला जातो, जो बरा व्हायला खूप वेळ लागतो. रुग्णाला १-२ आठवडे चालणे, फिरणे अवघड होते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्याल?

* लवकर बरे होण्यासाठी औषधे वेळेवर घ्या.

* शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच आंघोळ करा.

* शस्त्रक्रियेनंतर ५-६ दिवसांनी थोडे चाला, जेणेकरून पायात रक्त साकळणार नाही आणि रक्त प्रवाह सुरळीत होईल.

* अवजड वस्तू उचलू नका.

* नियमित चेकअप करा.

* पोष्टिक आहारासोबतच भरपूर पाणी प्या.

होऊन जाऊ दे दोन कप चहा

* गरिमा पंकज

चहाच्या घोटासोबत, या जोडूया काही निवांत क्षण, मैत्रीचा सुगंध आणि आपलेपणातल्या आनंदाचे क्षण.’

आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर त्या बहाण्याने, कधी पावसाचे टपोरे थेंब पडू लागले की गरमागरम भजी सोबत पिण्याच्या बहाण्याने किंवा कधी शरीराचा थकवा, मरगळ दूर करण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी, चहा पिण्यासाठी कारण लागत नाही. अतिशय सुंदर क्षणांचा सोबती होतो चहाचा कप. म्हणूनच तर ढाबा असो की मोठमोठी रेस्टॉरंट्स, चहा सगळीकडे मिळतोच. फक्त तो बनवायच्या पद्धती वेगवेगळया असू शकतात. चीनमध्ये याला वेलकम ड्रिंकचे नाव दिले आहे तर जपानमध्ये पाहुणे आल्यावर ‘टी सेरेमनी’ केला जातो.

चहाचा इतिहास

चहाचा इतिहास फार जुना आहे. सर्वात प्रथम चीनमध्ये चहा पिण्यास सुरुवात झाली. नंतर सहाव्या शतकात चीनमधून चहा जपानमध्ये पोहोचला. तिथे चहाला फार पसंती मिळाली. एशियामध्ये चहाचे आगमन हे १९व्या शतकात झाले. आज भारत हा चहाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.

चहाचे फायदे

चहा हृदय तंदुरुस्त ठेवतो. हा अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी डायबिटिक अशा गुणांनी परिपूर्ण आहे. दातांसाठीही चहा चांगला असतो. चहामध्ये पोटॅशिअमसह इतर अनेक खनिज पदार्थ असतात. चहात असेलेले कॅटेचिन, पॉलिफिनॉल आणि अँटी ऑक्सिडंट्स याला आरोग्यपूर्ण बनवतात. भारतात चहाची लागवड ही प्रामुख्याने उत्तर भारतात कौसानी, दक्षिणमध्ये निलगिरीचे पठार क्षेत्र, उत्तरपूर्वेचे दार्जिलिंग आणि आसाम आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी केली जाते.

ब्लॅक टी : ब्लॅक टी हा पूर्ण ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेने निर्माण होतो. यात कॅफिनचे प्रमाण हे ५० ते ६५ टक्के असते. ब्लॅक टी ही चहाची सर्वात कॉमन व्हरायटी आहे आणि संपूर्ण जगात ७५ टक्के लोक याचा वापर करतात.

फायदे : हा चहा हृदयरोगाचा धोका कमी करतो. डायबिटीजच्या रुग्णांनाही हा फायदेशीर असतो. ब्लॅक टी रोमछिद्रांमध्ये तरतरी आणतो आणि लाल रक्त पेशींचे रक्षण करतो.

ओलोंग टी : चीनी भाषेत ओलोंगचा अर्थ आहे ब्लॅक ड्रॅगन. यात कॅफिन कन्टेन्टचे प्रमाण हे ग्रीन टी आणि ब्लॅक टी यांच्या मधले असते. याला स्वत:चा असा वेगळा सुगंध असतो. तसा तर हा ब्लॅक टी सारखाच असतो, पण याचे फर्मेंटेशन हे कमी वेळ केले जाते ज्यामुळे याचा स्वाद फार सुंदर लागतो.

फायदे : हा वजन कमी करायला मदत करतो. फॅट कमी करतो. त्वचेवर वयाचा दिसणारा प्रभाव कमी करतो.

ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये केवळ १० ते ३० टक्के कॅफिनच असते. यात स्वादासाठी लिंबू, पुदिना किंवा मध मिसळता येतो, पण साखर घातली जात नाही.

फायदे : कॅटेचिन नामक अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असलेला हा चहा तुम्हाला कॅन्सरपासून हृदय रोगासारख्या आजारांपासून वाचवतो. एका अभ्यासानुसार दररोज १ कप ग्रीन टी घेतल्याने कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका १० टक्क्यांपर्यंत कमी करतो. लट्ठपणा कमी करायचा असेल तर दिवसातून ३ वेळा ग्रीन टी जरूर प्या.

मसाला टी : मसाला चहा हा काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी इ. वाटून बनवला जातो. यात मसाला पहिल्यापासूनच तयार ठेवला जातो. चहा बनवायचा असतो  तेव्हा तयार मसाल्यातील थोडासा कपात टाकला जातो.

व्हाइट टी : व्हाइट टी हा अगदी माइल्ड फ्लेव्हरवाला असतो. याचा स्वादही शानदार असतो. याच्या एका कपात फक्त १५ मिलिग्रॅमपर्यंतच कॅफिन असते.

फायदे : हा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजपासून संरक्षण देतो आणि कॅन्सरशी लढायलाही सहाय्य करतो. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायलाही मदत करतो.

हर्बल टी : हर्बल टी हे खरंतर काही ड्रायफ्रुट्स आणि हर्ब्स यांचे कॉम्बिनेशन आहे. यात कॅफिन नसते आणि साखरेची आवश्यकताही नसते. याला वेगळाच सुगंध आणि स्वाद असतो.

फायदे : जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार दररोज २ ते ३ कप हर्बल टी चे सेवन केल्यास हायपर टेन्शनच्या रुग्णांना ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतो.

लेमन टी : लेमन टीसुद्धा फॅशनमध्ये आहे. यात साखर किंवा मध, पुदिना, सुंठ किंवा पावडर, काळे मीठ जे काही आवडत असेल ते घालून पिता येतो. हा चहाही फायदेशीर असतो. यातून लिंबाचे होणारे लाभ शरीराला मिळतात.

निरोगी नात्यात स्वच्छतेचं महत्त्व

* लव कुमार सिंह

राणी आणि रजनी खास मैत्रिणी. दोघीही मध्यमवर्गीय, सुशिक्षित, उदार, सहिष्णू, मितभाषी, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या, नवनवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक.

फक्त दोघींमध्ये एकच अंतर. ते अंतर म्हणजे देह प्रेमाबाबतचं. एका छताखाली राहात असूनदेखील राणी आणि तिच्या पतीमध्ये शारीरिकसंबंध जुळण्यास खूप वेळ लागतो. महिने असेच निघून जातात.

इकडे रजनी आणि तिचा पती आठवड्यातून १-२ वेळा तरी शारीरिकसंबंध ठेवतात. राणी तर या संबंधांना घाणेरडंदेखील समजते, तर रजनी मात्र असा विचार करत नाही. दोघी एकमेकींमधल्या या अंतराच्या गोष्टी जाणून आहेत.

तुम्ही आता म्हणाल हे कसलं बरं अंतर? होय, हेच तर खूप मोठं अंतर आहे. काही दिवसांपूर्वी या एका अंतराने दोघी मैत्रिणींमध्ये अनेक अंतरं निर्माण केली होती.

या एका अंतरानेच राणी शरीर स्वच्छ ठेवण्यात संकोचली होती. एवढंच नाही तर, तिच्या पतीचीदेखील अशीच काहीशी अवस्था होती. त्याला त्याच्या व्यवसायातून फुरसत नव्हती. तो सतत गुटखादेखील चघळत असायचा.

सेक्स स्वच्छता शिकवतं

इकडे रजनी पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक बाबतीत सतर्क होती. योग्य ताळमेळ, प्रेम, सुसंवाद आणि नियमित सहवासामुळे रजनीला याची जाणीव होती की एकांत, वेळ आणि सहवास मिळाल्यावर पती कधीही तिला मिठीत घेऊ शकतो. तो कधीही तिच्या कोणत्याही शरीराच्या भागाचं चुंबन घेऊ शकतो. कधीही दोघांच्या लैंगिक अंगांचं मीलन होऊ शकतं. अशा परिस्थितीत ती शरीराच्या आंतरिक स्वच्छतेबाबत बेपर्वा होऊ शकत नव्हती. रजनीकडून या प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया तिच्या पतीलादेखील आंतरिकरित्या स्वच्छ ठेवण्यात मदत करायची.

या एका अंतरामुळे राणी तिचा देह आणि खानपानाबाबतदेखील निष्काळजी झाली होती. जेव्हा तुमचं शरीर न्याहाळणारं, देहाची स्तुती करणारं कोणी नसेल तर अनेकदा लग्नानंतर अशा प्रकारचा निष्काळजीपणा वागण्यात येतो. राणी याचं अगदी ठळक उदाहरण होती. अशाप्रकारे काळाबरोबरच तिने चरबीच्या अनेक थरांना जणू निमंत्रण दिलं होतं. इकडे रजनीचं स्वत:वर व्यवस्थित नियंत्रण होतं. त्यामुळे ती छान सडपातळ होती.

या अशा त्यांच्या अंतरामुळेच राणी एक दिवस डॉक्टरच्या समोर बसली होती. रजनीदेखील सोबत होती. राणीला जननेंद्रियाच्या भागात वेदनेची समस्या होती, जी बऱ्याच दिवसांपासूनची होती. डॉक्टरांनी सांगितलं की इन्फेक्शन आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली होती.

राणीची ही गोष्ट रजनीच्या पतीलादेखील समजली होती. खरंतर तशी प्रत्येक गोष्ट रजनी आणि तिच्या पतीला तशी समजायचीच. दोघेजण यावर चर्चादेखील करायचे. रात्री जेव्हा रजनीने पती राजेशला ही गोष्ट सांगितली तेव्हा राजेश म्हणाला, ‘‘तू तुझ्या मैत्रिणीला समजवायला हवं की समागम ही वाईट गोष्ट नाहीए. मला असं नाही म्हणायचंय की अशी सर्व विवाहित लोक जी संबंध ठेवत नाहीत, ती शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहात असतील. परंतु एक गोष्ट मी गॅरण्टीने सांगू शकतो की जर पतिपत्नी नियमितपणे समागम करत असतील तर दोघेही आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहू शकत नाहीत. म्हणजेच जर ते एकमेकांच्या सहवासात आनंद घेत असतील तर ते अधिक निरोगी आणि स्वच्छ राहातात.’’

सेक्स औषध आहे

राजेश अगदी बरोबर म्हणाला होता. खरंतर जेव्हा पतिपत्नींना ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना शारीरिकरित्या लवकर जवळ यायचं असतं, याची जाणीव असते तेव्हा ते दोघेही स्वाभाविकपणे आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत सचेत राहातात. यामुळे दोघांचं व्यक्तिमत्त्व दृढ होतं आणि दोघांमध्ये मधुर संबंधदेखील निर्माण होतात. तसंच अनेक रागांपासूनदेखील शरीर दूर राहातं. याउलट जी जोडपी शारीरिकसंबंधांबाबत उदासीन राहातात, ते त्यांच्या स्वच्छतेबाबतदेखील बेपर्वा असू शकतात.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वैवाहिक जीवनात पतिपत्नीमध्ये शारीरिक संबंधाचे २ प्रमुख उद्देश्य असतात. पहिलं म्हणजे गर्भवती होणं आणि दुसरं म्हणजे आनंद मिळवणं. परंतु बारकाईने पाहाता सहवासामुळे अजून एक तिसरं उद्दिष्टदेखील साधता येतं. याला आपण असंदेखील म्हणू शकतो की जर पतिपत्नीमध्ये नियमित अंतराने शारीरिकसंबंध बनत असतील तर ते अधिक निरोगी असतात.

नक्कीच, पतिपत्नीमध्ये सेक्सला अनेक प्रकारचे त्रास दूर करण्याचं औषध असल्याचं सांगण्यात आलंय. सेक्सबाबत जगभरात खूप संशोधन करण्यात आलंय आणि केलं जातंय. विविध शोधानंतर जगभरातील तज्ज्ञांनी सेक्सचे फायदे अशाप्रकारे सांगितले आहेत.

* पतिपत्नींमध्ये नियमितपणे शारीरिकसंबंध निर्माण झाल्याने तणाव आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो; तेव्हा इतर अन्य रोगदेखील आजूबाजूला फिरकत नाहीत.

* आठवड्यातून १-२ वेळा केलेला सेक्स रोगप्रतिरोधकक्षमता वाढवितो.

* सेक्स खुद्द एक शारीरिक व्यायाम आहे आणि तज्ज्ञांनुसार अर्ध्या तासाचा सेक्स जवळजवळ ९० कॅलरीज कमी करतो म्हणजेच सेक्सच्या माध्यमातून वजन कमी करण्यासदेखील मदत मिळते.

* एका संशोधनानुसार जी व्यक्ती आठवड्यातून १-२ वेळा सेक्स करते त्यांच्यामध्ये हृदयविकाराची शक्यता खूपच कमी असते. कारण शारीरिक प्रेम हे एकप्रकारे भावनात्मक प्रेमाचं बाहेरचं रूप आहे, म्हणून जेव्हा आपण शारीरिक प्रेम करतो, तेव्हा भावनांचं घर म्हणजेच आपलं हृदय निरोगी राहातं.

* वैज्ञानिकांच्या मते सेक्स, फील गुडच्या अनुभूतीबरोबरच स्वसन्मानाची भावना वाढविण्यास सहाय्यक ठरतो.

* शारीरिकसंबध हे प्रेमाचं हार्मोन ऑक्सीटॉसिन वाढविण्याचं काम करतं; ज्यामुळे स्त्रीपुरुषाचं नातं मजबूत होतं.

* सेक्स शरीरातील अंतर्गत अशा उपजत पेनकिलर एण्डोर्फिसला उत्तेजन देतं, ज्यामुळे सेक्सनंतर डोकेदुखी, मायग्रेन आणि अगदी सांधेदुखीपासूनदेखील आराम मिळतो.

* वैज्ञानिकांच्या मते ज्या पुरुषांमध्ये नियमित अंतराने स्खलन (वीर्यपतन) होत असतं, त्यांच्यामध्ये वय वाढताच प्रोटेस्टसंबंधी समस्या वा प्रोटेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. इथे नियमित अंतराने म्हणजे एका आठवड्यातून १-२ वेळा समागम करण्याशी आहे.

* झोप न येण्याचा त्रास हा सेक्समुळे कमी होतो; कारण सेक्स केल्यानंतर खूप छान झोप येते.

* समागम एक औषध आहे. औषधदेखील असं की ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. म्हणूनच पतिपत्नींनी निरोगी राहाण्यासाठी या औषधांचं नियमित अंतराने सेवन आवर्जून करायला हवं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें