मूल रडतंय का…

* डॉ. परिणीता तिवारी

लहान मूल अनेक कारणांमुळे रडत असतं. त्याच्यामध्ये इतकी क्षमता नसते की ते आपल्याला काय त्रास होतोय हे मोठ्यांना सांगू शकेल. म्हणूनच ‘रडणं’ हाच एकमेव उपाय दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे असतो. सर्व आईवडिलांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की त्यांचं बाळ का रडत आहे? त्याच्या रडण्याचं कारण काय आहे? त्याला काय सांगायचं आहे, कधीकधी हे समजून घेणं खूपच कठीण होतं. खासकरून जेव्हा प्रथमच कुणी जोडपं आईवडील झालेले असतात.

खरंतर ‘रडणं’ हा मुलाच्या जीवनाचा एक भागच असतो. लहान बाळ तर दिवसाला किमान दोन तास रडतं आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत जातं किंवा कमी कमी होत जातं. मूल जन्माला आल्यापासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत दिवसाला २-३ तास तरी हमखास ते रडत राहातं, मग तुम्ही त्याची कितीही काळजी घ्या. ६ महिन्यांनंतर मुलाचं रडणं कमी होऊन ते दिवसात फार तर एखादं तासच रडतं. हळूहळू आईला आपल्या बाळाच्या गरजा समजू लागतात तेव्हा ती बाळाच्या गरजा वेळीच पूर्ण करू लागते तेव्हा बाळाचं रडणं आणखीनच कमी होतं.

अनेक कारणं आहेत रडण्याची

भूक लागणे : जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा त्याला भूक लागली असावी ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात येते, परंतु हळूहळू आई आपल्या बाळाची लक्षणं ओळखू लागते तेव्हा ती बाळाला रडण्याआधीच खायला देऊ लागते. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा ते रडू लागतं, कुणाकडे जायलाही तयार नसतं, सतत तोंडामध्ये हात घालत राहातं.

डायपर खराब होणे : अनेक मुलं रडून हे सांगत असतात की त्यांचं डायपर बदलण्याची गरज आहे, तर काही मुलं अशीही असतात जी अस्वच्छ डायपरमध्येही राहातात. म्हणूनच वेळोवेळी डायपर तपासत राहा.

झोप येणं : नेहमी आपल्याला असं वाटतं की मुलं किती नशीबवान आहेत जी थकल्यावर किंवा झोप आल्यावर जेव्हा हवं तिथे झोपू शकतात. पण तसं नाहीए. मुलालादेखील झोपण्यासाठी आरामदायी आणि शांत जागेची गरज असते. जर असं झालं नाही तर मुलं रडू लागतात, त्रस्त होतात, चिडचिडी होतात आणि खासकरून जेव्हा ते फार थकलेले असतात.

कडेवर उचलून घेणं : लहान मुलाला आईवडिलांनी उचलून घेतलेलं खूप आवडतं. त्याला आई जेव्हा उचलून घेते तेव्हा ते खूपच आनंदित होते. मुलाला उचलून घेतलं की त्यांचं हसणं-खिदळणं ऐकू येतं, त्याच्या हृदयाची धडधड जवळून जाणवते. इतकंच काय, मूल आपल्या आईचा गंधदेखील ओळखू लागतो. लहान बाळांसाठी रडणं हे केवळ उचलून घेण्यासाठीचं कारण असतं.

पोटाचा त्रास : मूल रडण्याचं आणखी एक कारण पोटदुखीही होऊ शकतं. सर्वसाधारणपणे पोटाच्या त्रासामुळे मूल दिवसातून कमीत कमी ३ तास तरी रडतं आणि जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचं रडणं अधिकच वाढतं. जर मुलाने खाल्ल्यानंतर त्वरित उलटी केली किंवा अधिकच ते रडू लागलं तर याचा अर्थ असा आहे की मुलाच्या पोटात दुखत आहे. अशावेळी मुलाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावं.

दुधाचं पचन होण्यासाठी : जर मुलाने दूध प्यायल्यानंतर लगेचच रडायला सुरुवात केली तर याचा अर्थ त्याला व्यवस्थितपणे दुधाचं पचन झालेलं नाही आणि त्याला ढेकर येण्याची गरज आहे. म्हणून मूल दूध प्यायलाबरोबर लगेचच त्याला झोपवू नका; कारण काही मुलं दुधासोबत हवाही पोटात घेतात. यामुळे पोटात दुखू लागतं आणि ती रडू लागतात.

खूप थंडी अथवा गरमी : काही वेळा मूल अधिक थंडी किंवा गरमीच्या त्रासानेही रडू लागतं. जेव्हा आई आपल्या मुलाचं डायपर बदलत असते किंवा स्वच्छ करत असते तेव्हा मुलाच्या रडण्याचं हेच कारण असतं.

एखादी लहानशी गोष्ट : मुलाला एखाद्या लहानशा गोष्टीचाही त्रास होऊ शकतो आणि आपल्याला ते सहजपणे लक्षातही येत नाही. उदा. केस, चकचकीत कपडे, आईने घातलेले दागिने, कपड्यांवर लावलेला स्टीकर किंवा टॅग इत्यादी. काही मुलं अधिक संवेदनशील असतात, त्यांच्या शरीरावर या गोष्टींचा वाईट प्रभाव पडतो.

दात येणं : जेव्हा मुलाला दात यायला सुरुवात होते तेव्हा ते खूप रडू लागतं; कारण त्यावेळेस मुलाला खूप वेदना होत असतात. तेव्हा मूल खूपच चिडचिडंदेखील होतं. जर तुमच्या मुलाला खूपच त्रास होत असेल आणि त्याला नेमकं काय होतंय हे कळत नसेल तर त्याच्या तोंडात हात घालून पाहा, कदाचित त्याचे दात येत असतील. सर्वसाधारणपणे ४ ते ७ महिन्यांच्या दरम्यान बाळाला पहिला दात यायला सुरुवात होते.

एक लहान मूल बऱ्याच गोष्टींनी घेरलेले असतं, जसं की लाइट, आवाज, बरीचशी लोक इत्यादी. लहान मुलाला सर्व काही एकसाथ हे कळत नसतं, म्हणूनही ते रडायला लागतं. त्याला आपल्या रडण्याद्वारे हे सांगायचं असतं की मला हे सर्व त्रासदायक होतंय. काही मुलं रडून इतरांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करू पाहातात. अशा मुलांना गप्प करण्याचा एकच उपाय असतो आणि तो म्हणजे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ हसण्याखेळण्यात घालवावा, त्यांच्यासोबत खेळावं. याव्यतिरिक्त मुलाच्या रडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याची तब्येत बिघडणं, हेदेखील असू शकतं. मुलाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर तो स्वत:हून सांगू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झाल्यास ताप, सर्दी, पोटदुखी याविषयी मुलाला स्वत:हून सांगता येत नाही. तापामुळे जेव्हा मूल रडू लागतं, तेव्हा त्याचं रडणं इतर सर्व कारणांमुळे रडण्यापेक्षा वेगळं असतं.

खरंतर मुलाला रडताना पाहून आईवडिलांनी आपला संयम सोडू नये. मूल का रडतंय, या गोष्टीची चिंता करत बसण्याऐवजी मुलाच्या रडण्याचं, त्याच्या त्रस्त होण्याचं कारण शोधावं. म्हणूनच अशावेळी मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेकदा मुलाच्या रडण्याचं कारण त्यांच्या मनात बसलेली भीतीही असते. आईवडिलांनी या सर्व गोष्टीही विशेष करून लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी मुलांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.

शिष्टाचार कोणासाठी?

– रीता गुप्ता

‘‘आई, मला माझ्या मैत्रिणीच्या निशाच्या घरी जायचे आहे. आज तिने वर्गात खूप छान नोट्स बनवल्या आहेत. उद्या परीक्षा आहे. मी एकदा तिच्या घरी जाऊन वाचून येते. जवळच रहाते ती. स्कूटीने जाऊन लगेच येते,’’ शशीने सुधा म्हणजे तिच्या आईला सांगितलं.

‘‘ही वेळ आहे का मुलींनी घराबाहेर पडण्याची? मी पहातेय सुधा की तू जरा जास्तच सूट देऊन ठेवली आहेस हिला काही बरंवाईट घडले ना, मग पश्चात्ताप करण्याची वेळ येईल आयुष्यभर,’’ आईने काही बोलायच्या आतच शशीची आजी म्हणाली.

‘‘वर्गातच नोट्स घ्यायचे होते ना तू. रात्र व्हायची वाटच कशाला पाहायची?’’ बाबा घरात शिरताच म्हणाले.

‘‘बेटा, तिच्या नोट्स सोड, तू स्वत: नोट्स बनव. आता रात्री ९ वाजता तुझे असे घराबाहेर पडणे योग्य नाही,’’ आईनेही समजावले.

साधारण तासाभराने शशीचा भाऊ त्याच्या खोलीतून बाहेर आला व आईला म्हणाला, ‘‘आई संध्याकाळपासून कुठे बाहेर गेलो नाहीए मी, एक चक्कर मारून येतो आणि मग बाईक घेऊन निघून गेला. कुठुनही कसला आवाज आला नाही. कोणीच काही विचारले नाही व म्हटलेही नाही.’’

दुटप्पी मानसिकता

प्रत्येक भारतीय घरात जवळपास हीच स्थिती असते. मुलीला तर सातत्याने शिकवण दिली जाते. कधी परक्या घरी जायचे आहे म्हणून, तर कधी जग चांगलं राहिलं नाही म्हणून. असं बोलू नकोस, असं चालू नकोस इ.ची लांबलचक यादी असते. मुलींना शिकवण्यासाठी कधी सरळसरळ तर कधी आडून आडून मुलींना सांगितले जाते की रस्त्यात गुंड मवाल्यांकडे कसे लक्ष द्यायचे नाही. वाटेत कोणी छेडछाड केली तर प्रतिउत्तर न देता निमूटपणे घरी कसे यायचे. जर काही गंभीर घडलेच तर चूका शोधून मुलींनाच दोषी ठरवले जातं की, तिने कपडेच असे घातले होते किंवा मग चांगल्या घरच्या मुली रात्रीचं फिरतात का? वर्तमानपत्रात येणाऱ्या बलात्कारांच्या बातम्या ऐकवून त्यांना अजूनच घाबरवले जाते.

असे नाही वाटू शकत का की त्रास खरं तर मुलांमुळेच आहे? तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की काही मुलींनी मिळून एका मुलाला छेडले, बलात्कार केला किंवा असेच काही अजून? नाही ना? रस्त्यांवर वेगाने दुचाकी चालवणारे काही अपवाद वगळले तर अपघातग्रस्त किंवा मृत्यू पावणाऱ्यांमध्येही अधिकीने मुलेच असतात. जेव्हा की मुलीही आता दुचाकी चालवतात.

लहानपणापासूनच शिकवावे

मुली लहानपणापासूनच खूप समजूतदार आणि भावनाप्रधान असतात. आता थोडे ज्ञान मुलांनाही दिले गेले पाहिजे. मुलांना लहानपणापासूनच सांगितले जाते, ‘अरे रडतो कशाला, ‘तू मुलगी आहेस का?’ ‘भित्रा कुठला, मुलगी आहेस का तू?’, ‘बांगड्या भरल्या आहेत का हातात?’, ‘अरे, तू किचनमध्ये काय करत आहेस?’ वगैरे. असे बोलून बोलून त्यांना आधीपासूनच संवेदनाहीन बनवले जाते.

दोष कुणाचा

घरात मुलींना नालायक मुलांपासून स्वत:चा बचाव करणे शिकवण्याबरोबरच मुलांना चांगली वर्तणूक करायला शिकवावे. मुले तर मुलेच असतात. मातीच्या गोळ्यासारखी. आपल्याला हवे तसे आपण त्यांना घडवू शकतो. आपल्याला हवे ते संस्कार, विचार त्यांना देऊ शकतो. मग तो मुलगा असो की मुलगी.

जेव्हा आपण एखाद्या रोडरोमियोला किंवा एखाद्या बलात्कारी माणसाला किंवा एखाद्या हिटलरशाही पतीला पाहतो तेव्हा मनमानी, मुजोरी करणे हा आपला हक्कच असल्याचे त्यांच्या वर्तमानातून जाणवते. अशावेळी लक्षात घेतले पाहिजे की हा दोष त्यांच्या संगोपनाचाही आहे. काही अनर्थ घडायला नको म्हणून सुधाने तर तिच्या मुलीला बाहेर जाऊ दिले नाही. पण असेही होऊ शकते की साधाभोळा दिसणारा गुणी मुलगा बाहेर काही अनर्थ घडवून आलेला असेल.

फादर्स डे स्पेशल : पालकांचा पाल्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव

* राजलक्ष्मी त्रिपाठी

तुम्ही जेव्हा विवाह बंधनात बांधले जाता, तेव्हा जीवनात अनेक बदल होतात. आयुष्यात प्रेमासोबत जबाबदाऱ्यांचाही समावेश होतो. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनसाथीसह त्याच्या कुटुंबालाही मनापासून स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या आनंदाचा प्रवेश होतो.

पती-पत्नीचे संबंध अधिक संवेदनशील असतात. ज्यात प्रेम-माया आणि एकमेकांच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारण्याची भावना असते. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुमच्या संबंधांवर तुमच्या आई-वडिलांचा परस्पर संबंध कसा होता याचा कळत-नकळत परिणाम पडतो. सत्य तर हे आहे की तुमच्या व्यक्तित्वावर कुठे ना कुठे तुमच्या पालकांची छाप पडलेली असते. तसेच तुमच्या जीवनातील दृष्टीकोनांवर पालकांचा प्रभाव दिसून येतो.

अनेकदा नकळतपणे इच्छा नसतानाही तुम्ही तुमच्या पालकांकडून चूकीच्या सवयी शिकता, ज्यामुळे कळत-नकळतपणे तुमचे संबंध प्रभावित होतात.

जर तुमच्यामध्ये तुमच्या पालकांची अशी कोणती सवय असेल, ज्यामुळे जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये कटूता येत असेल तर ती सवय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कधी प्रेम तर कधी तक्रार

रिलेशनशीप काउन्सिलर डॉ. निशा खन्ना यांच्या मते, पती-पत्नीचे नाते संवेदनशील असते. ज्यात प्रेमासह तक्रारीदेखील असतात. पण ही तक्रार जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा दोघांच्या नातेसंबंधांमधील दरी वाढू लागते. खरं तर पती-पत्नी आपले संबंध अगदी तसेच बनवू पाहतात, जसे त्यांच्या आई-वडिलांचे होते. यामुळे दोघांच्यात संबंध दूरावू लागतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर आपली मते थोपू लागतात, त्यावेळी त्यांच्यातील प्रेम हळूहळू संपू लागते. मग ते शुल्लक गोष्टींवरून वाद घालू लागतात. सामान्यत: पत्नीची तक्रार असते की पती वेळ देऊ शकत नाही आणि पतीची तक्रार असते की ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर पत्नी किटकिट करते.

पती-पत्नीमधील ही सवय सामान्यपणे त्यांच्या पालकांकडून आलेली असते. जर तुमच्या पालकांना आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची सवय असेल तर तुमच्या नकळत ही सवय तुमच्यात येते. सुखी दांपत्य जीवनासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारलं पाहिजे. प्रयत्न करा की तुमच्या जीवनात अशा नकारात्मक गोष्टी येऊ नयेत, ज्या तुमच्या पालकांच्या जीवनात होत्या.

ज्या दांपत्यांच्या पालकांची सवय साथीदाराला गृहीत धरण्याची असेल तर त्यांची मुलेदेखील त्यांच्या साथीदारासोबत तशाच प्रकारचा व्यवहार करतात आणि तसेच संबंध प्रस्थापित करतात. अशाप्रकारचा विचार परस्पर संबंध कधीच फुलू देत नाहीत.

खरं तर पती-पत्नी एकमेकांचे पूरक असतात. जेव्हा दोघे एकत्र येऊन चालतात, तेव्हा जीवनाची गाडी सहजपणे पुढे जाते. पण जेव्हा दोघांमध्ये तणाव वाढतो, तेव्हा संबंधांची गाठ सुटण्यास वेळ लागत नाही. आपले नाते सहजपणे पुढे नेण्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला गृहीत धरण्याची चूक करू नका. त्याला आपला मित्र, जोडीदार समजून आपले सुख-दु:ख वाटून घ्या.

आपलंच म्हणणं खरं ठरवू नका

जर तुमच्या पालकांना आपले म्हणणे बरोबर म्हणण्याची सवय असेल तर नक्कीच तुमच्यातही हा गुण आला असेल. आपण आपला हा विचार बदलण्याची गरज आहे. आजकाल पती-पत्नी एकमेकांसह मिळून काम करत आहेत. घर-कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडत आहेत. अशावेळी दोघांची मते महत्त्वाची असतात. यात जर तुम्हाला तुमचेच म्हणणे खरं ठरवण्याची सवय असेल तर ही सवय सोडून आपल्या साथीदाराचे म्हणणे ऐका. प्रत्येकवेळी तुम्हीच बरोबर असलं पाहिजे असं नाही. तुमचा साथीदार जो विचार करतो, जे सांगतो तेही बरोबर असू शकतं.

सामायिक जबाबदारी

सामान्यपणे बऱ्याच जणांचे पालन पोषण अशा वातावरणात होते, जिथे पती पैसे कमावून आणतो आणि पत्नी घरातील जबाबदाऱ्या सांभाळते. म्हणजेच वडील आईकडे पैसे सोपवून जबाबदाऱ्यांतून मुक्त होतात. मात्र गरज पडल्यास आई ने साठवलेले पैसे कोणताही विचार न करता लगेच वडिलांना देते.

जर तुमचा असाच विचार असेल तर, यात बदल केला पाहिजे. जर, बदलत्या जगात पती-पत्नी दोघेही काम करतात, अशावेळी गरजेचे आहे की दोघांनीही आपले संबंध मजबूत बनवण्यासाठी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहयोग दिला पाहिजे. यावेळी पतीने हा विचार करता कामा नये की हे घरचे काम फक्त पत्नीचे आहे. तर पत्नीने हा विचार करता कामा नये की घरखर्च चालवणे फक्त पतीचे काम आहे.

बदलते जग

जीवनसाथीच्या संबंधांमधील दृढतेसाठी पारंपरिक जुन्या गोष्टींतून बाहेर पडणं गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुमची आई साडी नेसत होती, डोक्यावर पदर घेत होती तसंच तुमच्या पत्नीने करावं हे जरूरी नाही. तुमची आई मंदिरात जात असे, पूजा करत असे याचा अर्थ हा नाही की तुमची पत्नी असंच करेल. तिला तिच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य द्या. पत्नीलादेखील हे समजणं गरजेचं आहे की घरासंबंधित बाहेरच्या कामांची जबाबदारी फक्त पतीची नाही. हे गरजेचे नाही की तुमचे वडील बाहेरची सर्व कामे घरी बसून करतात तर तसंच तुमच्या पतीनेही करावं. बदलत्या जगानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या संबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होईल.

नको भांडण-तंटा

तुमचे पालक छोटया-छोटया गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालायचे म्हणजे तुम्हीदेखील तुमच्या साथीदाराशी प्रत्येक गोष्टीवरून वाद घालत राहावं असं नाही.

खरं तर, तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, जेणेकरून संबंध सुधारतील.

क्लालिटी लव्ह

जर तुमच्या मनात तुमच्या पालकांना पाहून काही विचारांनी घर केलं असेल की पालकत्व आल्यानंतर एकमेकांसोबत जवळीक साधणं चुकीचं आहे. तर तुम्ही हे विचार तुमच्या डोक्यातून बाहेर काढा.

सामान्यपणे आई बनल्यानंतर पत्नीचे पूर्ण लक्ष आपल्या बाळावर असते. ज्यामुळे बऱ्याचदा पती त्रासून जातो. पालक बनल्यानंतरही एकमेकांसोबत वेळ घालवा, फिरायला जा आणि छोटया गोष्टींमधून आपले प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमचे संबंध मजबूत राहतील. मुलांची जबाबदारी एकत्रितपणे घ्या. हा विचार नका करू की बाळाची जबाबदारी फक्त आईची आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

* जर तुमचे वडील तुमच्या आजोळच्या लोकांचा आदर करत नाहीत तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या पत्नीच्या कुटुंबाशी असा व्यवहार करावा. जर तुम्ही तुमच्या सासरच्यांना पूर्ण मान-सन्मान दिला तर पत्नीचं तुमच्याप्रति असलेलं प्रेम अधिक वाढेल आणि तीदेखील मनापासून तुमच्या कुटुंबाचा स्वीकार करेल आणि मान-सन्मान देईल.

* जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मोठ-मोठयाने ओरडण्याची सवय असेल तर ती सोडून द्या. घरात प्रेमपूर्ण वातावरणाची निर्मिती करा.

* कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे निभावली पाहिजे.

* आपल्या साथीदाराला संपूर्ण स्पेस द्या.

* जर कोणत्या गोष्टीवरून तुमचे मन दुखावले असेल तर मोठ-मोठयाने एकमेकांशी भांडून वाद वाढवण्यापेक्षा गप्प बसा.

* सुखी दांपत्य जीवनासाठी एकमेकांवर चुका थोपवण्यापेक्षा एकमेकांच्या चुकांचा स्वीकार करण्याची वृत्ती ठेवा.

असा वाढवा मुलांचा आत्मविश्वास

* ऋचा शुक्ला, सीसेम, वर्कशॉप इंडिया

राहुलने वर्तुळातून चेंडू काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. आणि मग हताश होऊन रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची आई तिथे आली आणि त्याला उचलून मिठी मारली. मग तिने सांगितले की सातत्याने प्रयत्न करत राहा म्हणजे नक्कीच यशस्वी होशील. तिने राहुलला त्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा तो आपले नावही लिहू शकत नव्हता. सातत्यापूर्ण प्रयत्नांनी तो पुढे आपले नाव लिहू लागला.

अशाप्रकारच्या प्रोत्साहन आणि सकारात्मकतेमुळे मुलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होते. मुलांच्या स्वत: आणि प्रतिच्या धारणा कमी वयातच विकसित होतात. एक मूल कसा विचार करते? काय पाहते? काय ऐकत असते? आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देते? इत्यादी बाबी त्याच्या संपूर्ण प्रतिमेची निर्मिती करतात. जर एखाद्या मुलामध्ये चिंता, ताण, असंतोष आणि भयाची भावना निर्माण झाली तर तो चिडचिड करू लागतो. त्याचा आत्मविश्वास ढळू लागतो.

अनेक संशोधनातून कळंय की लहान वयातच अनेक मुले ताण-तणावाचे बळी बनतात. बालपणीच्या नकारात्मक अनुभवांमुळे त्यांच्या शरीरावर आयुष्यभरासाठी नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून येते.

मुल तणावग्रस्त राहण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यात एखादे कठीण कार्य करताना, काही विरूद्ध परिस्थिती निर्माण होते. मूल जेव्हा आपल्या शाळा आणि ट्यूशनचा अभ्यास समजण्यात किंवा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते, तेव्हादेखील त्याच्यात तणाव निर्माण होतो. तो प्रदर्शित करण्यास आणि अभ्यास करण्यात ते स्वत:ला अपयशी समजू लागतो, कारण त्याच्या मित्रांसाठी असे करणे सोपे असते. यामुळे आत्मविश्वास ढळू लागतो.

मुलाने गमावलेला आत्मविश्वास हे त्याच्या संकोचावरून वा गप्प असण्यावरून समजू शकते. अशावेळी आई-वडिलांनी हे संकेत ओळखणे गरजेचे असते. अशा काही पद्धतींचा अवलंब करावा, जेणेकरून मुलांना आपल्या समस्यांना तोंड देण्यात सहाय्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आईवडिलांची भूमिका ही घरातील वातावरण मैत्रीपूर्ण करण्याच्या दृष्टीने असावी. मुलांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांना कोणीही न ओरडू नये. त्यांचे म्हणणे त्यांना निर्धास्त सांगण्याची संधी मिळाली पाहिजे.

संवाद ठेवा : मुलांमध्ये सामाजिक कौशल्य विकास हे त्यांच्या कुटुंबासोबत जोडले गेल्याने तसेच संवाद साधल्याने होतो. त्यामुळे मुलांसोबत प्रभावी संवाद साधा. सहयोगी, सुखदायी आणि स्नेहशील बना. यामुळे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत होईल. मग, मुलांमध्ये मोकळेपणाने आत्मविश्वास वाढेल.

आपली आवड निवडण्याची संधी : आपली आवड निवडणे, पर्याय आणि मतं मांडण्यात त्यांना मदत करण्यात पालकांची महत्त्वाची भूमिका असते. पण त्यांना त्यांच्या आवडीची निवड करण्याची संधी द्या. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी ही सर्वात योग्य पद्धत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात, स्वत:ची निवड समजण्यात ते सक्षम होतात, ज्यामुळे त्यांना आनंद मिळू शकतो.

प्रशंसा आणि पुरस्कार : आपल्या मुलांना सांगा की आपले त्यांच्यावर किती प्रेम आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती विशेष आहे. प्रत्येकाची स्वत:ची क्षमता आणि प्रतिभा असते. हे आईवडिलांनी मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलांसाठी सकारात्मक आठवणींची निर्मिती करा. छोट्या-छोट्या संकेतांच्या माध्यमातून त्यांच्या यशाचे कौतुक करा. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टिकर, कुकीज अशा छोट्या वस्तूंनी त्यांना पुरस्कृत करा. तुमच्या अपेक्षांवर खरे न उतरल्यास त्यांना ओरडू नका. पुढच्या वेळेस त्यांना चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करा.

तुलना कधीच करू नका : आपल्या मुलांच्या क्षमतांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करू नका. सर्व मुलांच्या मनात वेगवेगळे भाव असतात. त्यांच्या मित्रांशी त्यांची तुलना केल्याने त्याच्या मनात हीनभावना निर्माण होते. तुलना केल्याने प्रतिस्पर्धी असल्याची भावना मुलाच्या मनात निर्माण होते, ज्यामुळे मुलांच्या मनात ईर्षा होते आणि मुलांसाठी हानिकारक ठरू शकते.

कामात दृढ असणे : मूल जेव्हा त्याला दिले गेलेले काम पूर्ण करतं तेव्हा त्याला स्वत:मध्ये आत्मविश्वास जाणवतो. त्याला प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ जेव्हा विवेक आपल्या बूटाची लेस बांधण्याचा सातत्याने प्रयत्न करत होता, पण तरीही त्याला जमत नव्हते. तेव्हा तो निराश झाला. यावेळी त्याच्या आईवडिलांनी त्याला हार न मानता प्रयत्न चालू ठेवण्यास यशस्वी होशील असे सांगितले आणि तो खरंच यशस्वी झाला. त्यांना अशाप्रकारे समजवण्याची गरज असते, जेणेकरून त्यांना ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

शिक्षकांशी बातचीत करा : आईवडिलांनी मुलाची शिक्षक आणि मित्रांप्रति असलेली वागणूक समजूण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मुलाचं सामाजिक जीवन समजण्यास मदत मिळते. बाहेरच्या जगात त्याचे वागणे समजून घेणे गरजेचे आहे. जर तो घरी एखादी गोष्ट करू शकत नसेल, तर तो शाळेत करण्यास सक्षम आहे का?

यामुळे त्यांच्या आईवडिलांना हे समजेल की मुलांना शिकण्यात काही समस्या येत आहेत का? किंवा त्यांच्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे का? मुलांच्या मित्रांशी तसेच शिक्षकांशी बोला, जेणेकरून त्याची रूची जाणून घेता येईल.

काल्पनिक खेळ खेळा : काल्पनिक खेळांच्या माध्यमातून मुले त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या आणि वस्तूंच्या मदतीने काल्पनिक परिस्थिती तयार करतात आणि त्यात आपली भूमिका बजावतात. अशा खेळात त्यांना खूप विचार करता येतो. ते ज्या प्रकारचे जीवन असण्याची इच्छा बाळगतात त्याविषयी माहिती मिळते. या खेळांत सामील झाल्यामुळे आईवडिलांना त्यांच्या काल्पनिक जगात डोकावण्याची आणि त्यांना आत्मविश्वासाने प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.

मुलासह विश्वासाचे आणि मित्रत्त्वाचे संबंध विकसित करा, जेणेकरून जेव्हा त्याला समस्या असेल तेव्हा तो तुमच्याजवळ येईल. तुमचं ऐकेल आणि तुमच्या सल्ल्याचा सन्मान त्याला आपलं मत विकसित करण्यात मदत करा. त्याच्या आत्मविश्वास आणि समजूतदार होण्याची सीमा वाढेल. यामुळे त्याला आपल्या मित्रांसमोर आपले म्हणणे मांडण्यात त्यांचे म्हणणे ऐकण्यात आणि दुसऱ्यांच्या मनांचा मान ठेवण्यात मदत मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लोकांमध्ये आपली ओळख आणि स्वतंत्र अस्तित्त्व राखण्याच्या दृष्टिने हे महत्त्वाचे ठरेल.

एकटी आई आणि मुलं

– चारुलता सूर्यवंशी

मुलांचं संगोपन आईवडील दोघांनाही करावं लागतं. पण काही कारणामुळे मुलांना जर वडिलांना मुकावं लागलं, तर मुलांचं संगोपन केवळ आईलाच करावं लागतं.

हेच एकलपालकत्व (सिंगल पॅरेंटिंग) होय

पालक व बालक या दोघांसाठीही हे जीवनातील एक आव्हान ठरतं. यात बाईला आई व बाबा या दोन्ही भूमिका पार पाडणं भाग पडतं. साहजिकच यामुळे अनेक विपरीत घटनांना तिला सामोरं जावं लागतं व यामुळे संताप, भय, एकटेपणा व असहाय्यता या भावना तिला सतत जाणवू लागतात. पण यातून मार्गही अखेर तिलाच काढायचा असतो. यासाठी तिने काही खास बाबी ध्यानात ठेवल्या तर या अडचणींवर तिला सहजतेने मात करता येऊ शकेल.

मनातील संताप आवरा

मुलाला आईहून अधिक वडिलांची गरज असते असं मानलं जातं. आईवडील दोघांचंही प्रेम मिळणारी मुलं जीवनात अधिक सफल होतात. पण काही कारणामुळे जर ही जबाबदारी केवळ एकट्या आपल्यावरच येऊन पडली तर घाबरू नका. उलट या जबाबदारीला एक आव्हान समजून सामोरं जा.

जीवनातील आव्हानं पेलताना आपला विकास होत असतो. आपण ती चांगली पेलू शकलात तर आज टीका करणारे लोक उद्या तुमचं कौतुकही करू लागतील.

अनेकदा एकल पालकत्व निभावणाऱ्या आयांना आपल्या मुलांना वडिलांची माया मिळू शकत नाही यासाठी अकारण हळहळ वाटते. पण असे विचार मनात आणणंही चुकीचं आहे; कारण अशाने तुमचं जगणंही कठीण होईल.

अशा तणावातून बाहेर यायचं तर आधी आपण कणखर बना, मुलांनाही तसं बनवा. आपणासारख्या इतरही अनेक महिला या जगात अशा घटनांचा सामना करत असतील याचा विचार केलात की मग आपण एकाकी नाही या सुखद जाणिवेने आपणास मोठा दिलासा मिळेल.

योग्य मार्गदर्शन

योग्य मार्गदर्शन, प्रेम, सहकार्य व वेळ या गोष्टी असतील तर एकटी आईदेखील मुलांचं पालनपोषण सहजतेने करू शकेल.

याबाबत पत्रकार मानसी काणे सांगते, ‘‘लग्नानंतर दीड वर्षांतच एका अपघातात माझे पती वारले. पण आधी आम्हाला एक मुलगा झालेला होता. आज या घटनेला १० वर्षं उलटून गेली आहेत. मुलासोबत गेली १० वर्षं मी एकटीच राहातेय. त्याला घडलेलं सारं ठाऊक आहे. पण तो अगदी सहजतेने समाजात वावरतोय. अशा जीवनातील अडचणी त्याला ठाऊक आहेत व त्यावरील उपायही तो जाणतो.

‘‘पतीच्या निधनानंतर मी नोकरीला लागले. पत्रकारितेतील नोकरीची माझी दिनचर्या त्यालाही आता माहिती झालेली आहे व यामुळे आम्ही मजेत जगतोय.’’

उचित निर्णय

मानसी पुढे सांगते, ‘‘एखादी बाई पतीला गमावल्याने एकटी पडते तेव्हा तिला अनेकदा दुसरा विवाह कर असा सल्ला दिला जातो आणि बहुतेकदा ती याला नकार देते. याचं कारण आजची स्त्री जीवनातील संकटांचा सामना करायला सक्षम बनलेली आहे. तिच्यात कमालीचा आत्मविश्वास आलेला आहे. मलाही खूप जणांनी दुसरं लग्न कर असा सल्ला दिला होता.

पण ते करायचं नाही असं मी ठरवलेलं होतं. आज १० वर्षांनंतरदेखील मला व माढ्या मुलालाही या निर्णयाचा अभिमान वाटतोय.’’

गरज भावनिक आधाराची

एकल पालकांच्या मुलांनादेखील काही सामाजिक संकटांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीचा आत्मविश्वासाने सामना कसा करावा याची शिकवण आईच मुलांना देऊ शकते.

एकल वडील व एकल आई यांच्या भूमिकांत अनेकदा आपल्याला फरक जाणवेल. मुलांचं संगोपन, घर, कुटुंब, नोकरी ही सर्वच कामं आईला करावी लागतात. या सर्व कामात ताळमेळ साधणं खूप अवघड असतं.

आधाराने जखमा भरतात

याबाबत स्वाती कटारे सांगतात, ‘‘मी ८ वर्षांची असताना माझे वडील पोलिसांचं कर्तव्य निभावताना मारले गेले. यामुळे आमच्या कुटुंबाचा आधारच हरपला. पण माझी आई डगमगली नाही. तिने अनेक सामाजिक संकटांचा धाडसाने सामना केला व आम्हालाही भावनिक तणावातून बाहेर काढलं.

‘‘आज मागे वळून पाहताना मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. कारण कुटुंबाच्या वाईट काळात व विपरीत परिस्थितीत ती एक शक्ती बनून आमच्यामागे उभी राहिली होती.’’

अभिमानाची बाब

आज अनेक महिला विवाहित नसूनही मुलांना सांभाळत आहेत. एकल आई बनणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची बाब ठरलीए. मिस यूनिवर्स सुष्मिता सेनने याबाबतीत एक आदर्श घालून दिलाय. आपलं धकाधकीचं जीवनमान सांभाळून तिने एक यशस्वी पालक असा लौकिक मिळवलाय.

सुष्मिता सेन सांगते, ‘‘मला मुलांची भारी आवड असल्याने मी आधी एका मुलीला दत्तक घेतलं. काही वर्षांनी तिला कोणीतरी जोडीदार हवी म्हणून आणखी एक मुलगी मी दत्तक घेतली. माझ्या दोन्ही मुली आता एखादा सामाजिक कार्यक्रम असो वा फॅशन पार्टी हरेक समारंभात सतत माझ्यासोबत असतात.’’

धाडसी पाऊल

टीव्हीवरील कलाकार उर्वशी ढोलकिया उर्फ कोमोलिका व नीना गुप्ता यादेखील एकल माताच आहेत. उर्वशीने एका रिअॅलिटी शोमध्ये या करुण कथेचा खुलासाही केला होता. नीना गुप्तानेदेखील आपली मुलगी मसाबाला धाडसाने स्वीकारून तिला समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं.

एकल आई वा एकल वडील होणं आजकाल खूपच कठीण आहे, पण अखंड सावधानता व धाडस बाळगल्याने जीवनाला एक नवी दिशा मिळू शकते. पण आशा व विश्वास सोडला तर तुमच्याबरोबरच मुलाची प्रगतीही खुंटेल. यासाठी निर्भयतेने एकल पालकाची भूमिका चोख पार पाडून इतरांसाठी एक आदर्श बना!

घरातून पळून जाणं उपाय नव्हे

* डॉ. अनामिका श्रीवास्तव

अशी कोणती समस्या आहे जी मुलीला घर सोडायला भाग पाडते. साधारणपणे सर्व दोष मुलीला दिला जातो, मात्र अशी अनेक कारणं असतात, जी मुलीला   स्वत:वर इतका मोठा अन्याय करण्यास भाग पाडतात. काही मुली आत्महत्येचा मार्गही अवलंबतात. परंतु ज्या जगू इच्छितात, स्वतंत्र होऊ इच्छितात, त्याच परिस्थितीपासून बचाव म्हणून घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. ही त्यांची हतबलता आहे.

आजचा बदलता काळ याचं एक कारण आहे. आज घडतं असं की प्रथम आईवडील मुलींना स्वातंत्र्य देतात, परंतु जेव्हा मुलगी काळासोबत स्वत:ला बदलू पाहाते, तेव्हा ते त्यांना अर्थात आईवडिलांना पसंत पडत नाही.

थोड्याबहुत चुकांसाठी मध्यमवर्गीय मुलींना समजावण्याऐवजी मारझोड केली जाते. घालूनपाडून बोललं जातं, ज्यामुळे मुलीच्या नाजूक भावना दुखावतात आणि ती बंडखोर बनते. घरातील दररोजच्या दोषारोपाने भरलेल्या वातावरणाला त्रासून जाऊन ती घरातून पळून जाण्यासारखं पाऊल नाइलाजास्तव उचलते.

जेव्हा घरातील वातावरणाचा मानसिकरित्या तिला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा तिला इतर कोणताही मार्ग उमजत नाही. त्यावेळी बाहेरील वातावरण तिला आकर्षित करतं. आईवडिलांचं तिच्यासोबत उपेक्षित वर्तन सहन न होऊन ती या तणावग्रस्त स्थितीतून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करते.

आज मुलामुलींना समान वागणूक दिली जाते. परंतु मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मुलींच्या मुलांशी मैत्री करण्याला संशयी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. जर एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलत असेल, तर तिच्यावर संशय घेतला जातो. जेव्हा घरच्या मंडळींचे टोमणे ऐकून मुलीच्या भावना दुखावतात तेव्हा तिच्यामध्ये विद्रोहाची भावना जागृत होते; कारण ती विचार करते की ती चुकीची नसतानाही तिच्याकडे संशयी दृष्टीने पाहिलं जातं, मग समाज आणि लोक जसा विचार करतात तसंच आपलं व्यक्तिमत्त्व का बनवू नये? ही विद्रोहाची भावना विस्फोटकाचं रूप धारण करते. परंतु अशा परिस्थितीतही घरच्यांशी सहकार्यपूर्ण वर्तणूक तिची बाहेर वळणारी पावलं थांबवू शकतात, मात्र बऱ्याचदा आईवडिलांची उपेक्षित वागणूकच यासाठी सर्वाधिक जबाबदार असते.

आईवडिलांची मोठी चूक

बहुतेक आईवडील मुलांना समजून घेण्याऐवजी रागावतात. वास्तविक युवावस्था एक अशी अवस्था असते, जिथे मुलांना सर्वकाही नवनवीन वाटतं, त्यांच्या मनात सर्वांना जाणून आणि समजून घेण्याची जिज्ञासा असते. जर त्यांना चांगल्याप्रकारे समजावून सांगितलं तर ते अशी पावलं उचलणार नाहीत; कारण हा वयाचा असा टप्पा असतो, जिथे त्यांना कुणीही कितीही थांबवलं तरी ते थांबत नाहीत.

तारुण्यावस्थेत मनातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा वेडा ध्यास असतो, जो केवळ आणि केवळ आईवडिलांची सहानुभूती आणि प्रेमळ वागणूकच नियंत्रित करू शकतो. जर आईवडिलांनी असा विचार केला की त्यांच्या रागावल्याने, मारण्याने वा उपेक्षित वर्तणुकीने मुलं सुधारतील तर हा त्यांचा सर्वात मोठा गैरसमज ठरतो.

सहकार्यपूर्ण वर्तणूक आवश्यक

मुलींच्या घरातून पळून जाण्याला त्या स्वत:च जबाबदार आहेत. परंतु यामध्ये आईवडिल आणि बदलत्या काळाचीही प्रमुख भूमिका असते. आईवडील मुलींच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. परंतु आईवडीलांची सहकार्यपूर्ण वर्तणूक अत्यंत जरूरी असते.

मुलींनीही भावनांच्या आहारी जाऊन वा अट्टाहासापायी कोणतेही निर्णय घेणं योग्य नाही. मोठ्यांचं म्हणणं विचारपूर्वक ऐकूनच कोणाताही निर्णय घ्यावा; कारण एका पिढीच्या अंतरामुळे विचारांमध्ये मतभेद असू शकतात. मोठ्यांना विरोध करावा, परंतु त्यांच्या योग्य गोष्टी मान्यही कराव्यात नाहीतर हीच पलायन प्रवृत्ती कायम राहिली तर तुम्ही कल्पना करा की भविष्यात आपल्या समाजाचं स्वरूप काय असेल?

पाळणाघराबद्ल या गोष्टी जाणून घ्या

 

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एका पाळणाघरामध्ये दहा महिन्यांच्या मुलीला जबर मारहाण करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. जेव्हा पोलिस आणि मुलीच्या पालकांनी पाळणाघराचे सीसी टीव्ही कॅमेरे पाहिल्यावर ते आश्चर्यचकित झाले. फुटेजमध्ये पाळणाघरातील सेंटरमधील मुलगी मुलीला मारहाण करीत होती. त्याला लाथा मारत होती आणि चापट मारत होती. बरं, पाळणाघरामधील मुलांमध्ये असं प्रथमच घडले नाही आहे.

याआधीही दिल्लीतील पोलिसांनी सुमारे 70 वर्षांच्या एका व्यक्तीला पाळणाघरामध्ये जाऊन अटक केली होती. ज्यावर पाळणाघरात एका 5 वर्षाच्या मुलीची छेडछाड केल्याचा आरोप होता.

अशा घटना आगामी काळात घडतात, ज्यात पाळणाघरामधील मुलांवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार होतात.

वास्तविक, आज महिलांना सासरी किंवा करियरमध्ये राहणे आवडत नाही. ती एक प्रकारची तडजोड करते. त्यांना असे वाटते की तेथे काही पाळणाघरं आहेत, जिथे त्यांची मुले सुरक्षित राहू शकतात. त्यांच्यासाठी खाणे, खेळणे, आराम करणे आणि क्रियाकलाप शिकण्याची संपूर्ण व्यवस्था होती.

सकाळी मुलाला ऑफिसच्या वाटेवर सोडून ती संध्याकाळी घरी परत जात असताना सोबत गेली. जर एखाद्या दिवशी ते झोपले तर पाळणाघरात ऑपरेटरला कॉल करा आणि त्यांना सांगा. जेव्हा मुलाला घरी आणले जाते तेव्हा त्याच्याबरोबर वेळ घालवण्याऐवजी इतर कामांमध्ये व्यस्त राहा. ती फक्त रविवारी मुलाबरोबर वेळ घालवते. परंतु आपल्या मुलास पाळणाघरामध्ये काळजी घेण्यासाठी पूर्णपणे सोडणे योग्य नाही. हे करून आपण आणि बॉन्डिंग मुलामध्ये होत नाही. तो आपले शब्द आपल्याशी सांगण्यात अक्षम आहे, दु:खी होऊ लागते आहे. बर्‍याच वेळा मुलाला त्याच्याबरोबर होत असलेले शोषण, त्याच्याबरोबर काय होत आहे हे समजण्यास अक्षम होतो.

पाळणाघरामध्ये मुलाची चांगली काळजी घेतली जाते, तो तेथे नवीन गोष्टी शिकतो, परंतु हे मुलाला दररोज पालणाघरामध्ये कसे ठेवले जाते याची पर्वा न करता, त्याने तेथे कोणीतरी असावे कोणतीही अडचण नाही, कारण मुले काहीच बोलत नाहीत, फक्त रडत रहा आणि पालकांना असे वाटते.

त्यांना तिथे जायचे नाही, म्हणून ते रडत आहेत. त्या बाळाला ओळखण्याची आपली जबाबदारी आहे तिथे का जायचे नाही.

हे काम दररोज करा

  • ऑफिसमधून घरी आल्यानंतर आपण कितीही कंटाळलेले असलात तरी आपल्या मुलाबरोबर वेळ नक्कीच आहे
  • खर्च करा. आज पाळणाघरामध्ये त्याने काय केले, त्याने काय खाल्ले, काय शिकले? मजा आहे की नाही?
  • मुलाला काही विचित्र उत्तर दिल्यास, त्यास हळूवारपणे घेऊ नका, परंतु मुलास ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा

 

तो असे का बोलत आहे?

  • जेव्हा तुम्ही कचेरीतून परत याल, तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतेही खूण नसल्याचे तपासा. असेल तर मुलाला विचारा की मार्क कसा आला, तसेच त्याचे लबाडी बदलली आहे का ते पहा.
  • आपण जेवणाच्या वेळी जे जे जेवताना दिले ते त्याने खाल्ले काय?

पाळणाघर कधी निवडायच

  • मुलासाठी खेळण्यासाठी, पलंग स्वच्छ आहे की नाही याची वीज आणि पाण्याची काय व्यवस्था आहे? खेळणी आहेत, हे निश्चितपणे पहा.
  • पाळणाघर नेहमी हवेशीर, खुले आणि हलके असावे. जो मुलगा त्याची देखभाल करतो, तो मुलांच्या बाबतीत कसा वागतो हे देखील पहा.
  • तिथे आलेल्या मुलांच्या पालकांशी बोला. पाळणाघर कसे आहे, ते समाधानी आहेत की नाही, ते त्यांची मुले आहेत तेव्हापासून त्यांना तिथे पाठविण्यात आले आहे
  • आपल्या मुलास स्वस्त आणि घराच्या जवळ कोणत्याही जागी ठेवू नका, कारण तेथे तुमची मुले व्यवस्थित राहतील, म्हणून स्वच्छ पाळणाघर करण्याचा प्रयत्न करा.

घाणेरड्या काकांपासून मुलाला वाचवा

– गरिमा पंकज

दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेकडे लक्ष द्या. शाहदरातील विवेक विहार परिसरात ९ वर्षीय मुलीची भाडेकरू छेड काढायचा. निरागस मुलीला हे समजतच नव्हते की तिच्यासोबत काय घडत आहे. तिला ते आवडत नव्हते, पण काही समजतही नव्हते. एके दिवशी जेव्हा वर्गात टीचरने गुड टच आणि बॅड टचबाबत सविस्तर सांगितले, तेव्हा मुलीच्या ते लक्षात आले आणि तिने तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती दिली. तिने सांगितले की त्यांच्या घरातील भाडेकरू काका तिला कुठेही हात लावतात, जे तिला आवडत नाही. ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी भाडेकरूला अटक केली. अशाप्रकारे एक मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली.

ईस्ट दिल्लीतील शाळांमध्ये ऑगस्ट, २०१८ पासून जानेवारी, २०१९ पर्यंत बलात्कार आणि विनयभंगाच्या २०९ घटना समोर आल्या. मुलांसोबत लैंगिक शोषणाच्या घटना घरात, बाहेर, शाळेत, शेजारीपाजारी कुठेही घडू शकतात. काही मुले तर अशी असतात जी लैंगिक अत्याचारानंतर लाजेने किंवा मार मिळेल या भीतिने कोणाला काहीही सांगत नाहीत. बहुसंख्य घटनांमध्ये शोषण करणारी व्यक्ती तिच असते जिच्यावर मुलाच्या घरातल्यांचा पूर्ण विश्वास असतो. सुमारे ३० टक्के गुन्हेगार बाहेरचे असतात आणि ६० टक्के कुटुंबातील मित्र, बेबीसीटर, शिक्षक किंवा शेजारी असतात.

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलांसोबत लैंगिक गैरवर्तनाच्या घटना मुख्यत्वे ५ आणि १२ वर्षांच्या वयात घडतात. त्यावेळी ते आपली वेदना सांगू शकण्याइतके सक्षम नसतात, कारण प्रेम आणि शोषण यात फरक करण्याची समज या वयात नसते. यामुळेच मुलांच्या बाबतीतील बहुतांश गुन्हे समोर येत नाहीत आणि ते सिद्धदेखील होऊ शकत नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत जाते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें