* डॉ. अनामिका श्रीवास्तव

अशी कोणती समस्या आहे जी मुलीला घर सोडायला भाग पाडते. साधारणपणे सर्व दोष मुलीला दिला जातो, मात्र अशी अनेक कारणं असतात, जी मुलीला   स्वत:वर इतका मोठा अन्याय करण्यास भाग पाडतात. काही मुली आत्महत्येचा मार्गही अवलंबतात. परंतु ज्या जगू इच्छितात, स्वतंत्र होऊ इच्छितात, त्याच परिस्थितीपासून बचाव म्हणून घरातून पळून जाण्याचा मार्ग अवलंबतात. ही त्यांची हतबलता आहे.

आजचा बदलता काळ याचं एक कारण आहे. आज घडतं असं की प्रथम आईवडील मुलींना स्वातंत्र्य देतात, परंतु जेव्हा मुलगी काळासोबत स्वत:ला बदलू पाहाते, तेव्हा ते त्यांना अर्थात आईवडिलांना पसंत पडत नाही.

थोड्याबहुत चुकांसाठी मध्यमवर्गीय मुलींना समजावण्याऐवजी मारझोड केली जाते. घालूनपाडून बोललं जातं, ज्यामुळे मुलीच्या नाजूक भावना दुखावतात आणि ती बंडखोर बनते. घरातील दररोजच्या दोषारोपाने भरलेल्या वातावरणाला त्रासून जाऊन ती घरातून पळून जाण्यासारखं पाऊल नाइलाजास्तव उचलते.

जेव्हा घरातील वातावरणाचा मानसिकरित्या तिला खूप त्रास होऊ लागतो तेव्हा तिला इतर कोणताही मार्ग उमजत नाही. त्यावेळी बाहेरील वातावरण तिला आकर्षित करतं. आईवडिलांचं तिच्यासोबत उपेक्षित वर्तन सहन न होऊन ती या तणावग्रस्त स्थितीतून मुक्तता मिळवण्याचा प्रयत्न करते.

आज मुलामुलींना समान वागणूक दिली जाते. परंतु मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये मुलींच्या मुलांशी मैत्री करण्याला संशयी दृष्टिकोनातून पाहिलं जातं. जर एखादी मुलगी एखाद्या मुलाशी बोलत असेल, तर तिच्यावर संशय घेतला जातो. जेव्हा घरच्या मंडळींचे टोमणे ऐकून मुलीच्या भावना दुखावतात तेव्हा तिच्यामध्ये विद्रोहाची भावना जागृत होते; कारण ती विचार करते की ती चुकीची नसतानाही तिच्याकडे संशयी दृष्टीने पाहिलं जातं, मग समाज आणि लोक जसा विचार करतात तसंच आपलं व्यक्तिमत्त्व का बनवू नये? ही विद्रोहाची भावना विस्फोटकाचं रूप धारण करते. परंतु अशा परिस्थितीतही घरच्यांशी सहकार्यपूर्ण वर्तणूक तिची बाहेर वळणारी पावलं थांबवू शकतात, मात्र बऱ्याचदा आईवडिलांची उपेक्षित वागणूकच यासाठी सर्वाधिक जबाबदार असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...