आरोग्य परामर्श

* प्रतिनिधी

प्रश्न : मी 38 वर्षांचा आयटी व्यावसायिक आहे. मी ऑफिसमध्ये बसलो असताना मला माझ्या गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना आणि जडपणा आहे. मला क्वचितच जिममध्ये जाण्याची आणि वर्कआउट करण्याची वेळ मिळते. जेव्हा मी गुडघेदुखीची लक्षणे शोधली तेव्हा मला आढळले की गुडघा संधिवात 30 आणि 40 च्या दशकाच्या सुरुवातीला एक सामान्य समस्या आहे. गुडघ्यांचा संधिवात दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदलांच्या गरजेवर तुम्ही अधिक प्रकाश टाकू शकता का? कोणत्या मूलभूत गोष्टी आहेत ज्याद्वारे मी माझे गुडघे फिट ठेवू शकतो आणि वेदनांच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो?

उत्तर : तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्या गुडघ्यांवर योग्य उपचार करा. इंटरनेटवर पाहून स्वतःचे उपचार केल्याने तुम्हाला चुकीची माहिती मिळू शकते आणि तुमची स्थिती आणखी वाईट होऊ शकते. आपले गुडघे निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला जिममध्ये जाऊन बराच वेळ बसून वेळोवेळी ब्रेक घेऊन हलका व्यायाम करावा लागत नाही. कोणत्याही प्रकारचा हलका व्यायाम जसे 30 मिनिटे चालणे आणि एस्केलेटरऐवजी पायऱ्या चढणे तुम्हाला गुडघेदुखीपासून खूप आराम देऊ शकते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे वजन जास्त असेल तर ते तुमचे गुडघे मजबूत ठेवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे.

 

हेही वाचा – मला ऑस्टियोआर्थरायटिसचे निदान झाले आहे, त्याचा माझ्या गुडघ्यांवर परिणाम होईल का?

संधिवात आता आपल्या देशाचा एक सामान्य रोग बनला आहे आणि त्यातून ग्रस्त लोकांची संख्या सतत वाढत आहे. केवळ प्रौढच नव्हे तर आजचे तरुण देखील आर्थरायटिसने ग्रस्त आहेत. ज्याची कारणे आजची आधुनिक जीवनशैली, अन्न, जीवनशैली इ. आज प्रत्येक व्यक्तीला सांत्वन हवे आहे, जीवनात मेहनत संपली आहे. परिणामी, एंडस्टेज आर्थरायटिसने ग्रस्त अनेक रुग्णांना संयुक्त बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. अरविंद वैद्य, आयव्हीएफ एक्सपर्ट,
इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : माझे वय २८ वर्षे आहे. माझ्या लग्नाला एकच वर्ष झालं आहे. मी आणि माझे पती दोघंही मायनर थॅलेसीमिक आहोत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर आम्ही मुलाचं प्लॅन केलं, तर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता ९० टक्के असेल. यासाठी काही मेडिकल उपाय आहे का?

उत्तर : आईवडील दोघंही थॅलेसीमिक असल्यावर मुलाला मेजर थॅलेसीमिक होण्याची शक्यता २५ टक्के, मायनर थॅलेसीमिक होण्याची ५० टक्के आणि सामान्य होण्याची २५ टक्के शक्यता असते. संपूर्ण जगात असं कोणतंही औषध नाही, जे याला रोखू किंवा बरं करू शकेल. मुलाला थॅलेसीमिकच्या विळख्यातून वाचवण्यापासून जन्मापूर्वी डायग्नोसिसच्या दोन पध्दती आहेत.

पहिली सीव्हीएम म्हणजेच क्रोनिक विलस बायोप्सी. अशा वेळी मूल जर असामान्य असेल, तर गर्भपात करून घ्यावा. दुसरं आईवडील दोघांच्या म्युटेशन स्टडीनंतर पीजीडी म्हणजेच प्रीजेनेटिक डायग्नोसिस करून घ्यावे. त्यानंतर निरोगी भ्रूणाची निवड करून गर्भाशयात इंप्लांट केले जाते.

प्रश्न : माझं वय ३७ वर्षे आहे. लग्नाच्या ८ वर्षांत माझे ४ गर्भपात झाले आहेत. अशा वेळी मी काय केले पाहिजे? मी असं ऐकलं आहे की, आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो?

उत्तर : हे अगदी बरोबर आहे की आयव्हीएफमध्येही गर्भपात होऊ शकतो, विशेषत: ३ महिन्यांमध्ये. जर आपला ४ वेळा गर्भपात झाला असेल, तर आयव्हीएफचा पर्याय निवडा. अशा स्थितीत भ्रूणांना तयार केल्यानंतर त्यांची जेनेटिक स्क्रिनिंग केली जाते. निरोगी भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. त्यामुळे गर्भावस्थेचा दरही वाढतो आणि गर्भपाताचा धोकाही कमी होते.

प्रश्न : माझे वय ३० वर्षे आहे. मी अजून लग्नासाठी तयार नाहीए, पण आई बनायची इच्छा आहे. वाढत्या वयाबरोबर मी आई बनण्याचं सुख गमावू शकते का? मी काय केले पाहिजे?

उत्तर : आपण वय वाढल्यानंतरही आपली बायोलॉजिकल अपत्य प्राप्त करू शकता. त्यासाठी २ पर्याय उपलब्ध आहेत. जर आपण विवाहित असाल किंवा आपला पार्टनर फिक्स असेल, तर आपण अँब्रियो फ्रीजिंगचा पर्याय निवडू शकता. यात अंडी आणि शुक्राणूंना फलित करून भ्रूण तयार करून त्याला फ्रीज करता येतं. जर आपण सिंगल असाल, तर आपण एग फ्रीज करू शकता. याला विट्रीफिकेशन म्हणतात. यात तरल नायट्रोजनमध्ये यांना प्रीझर्व्ह करून ठेवले जाते. अनेक वर्षे याला सुरक्षित ठेवले जाते. यासाठी आपल्याला वार्षिक शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न : मी २७ वर्षीय अविवाहित महिला आहे. मला फायब्रॉइडची समस्या आहेत. मग याचा अर्थ मी कधीही आई बनू शकत नाही का?

उत्तर : असं आवश्यक नाहीए, सर्वप्रथम समस्या किती गंभीर आहे, याची तपासणी केली जाते. फायब्रॉइड अनेक प्रकारचे असतात. जेव्हा फायब्रॉइडचा आकार खूप मोठा होतो आणि समस्या गंभीर होते, तेव्हा त्याला ऑपरेशनद्वारे काढलं जातं. अनेक प्रकरणांत तर ते न काढताच गर्भधारणा शक्य होते.

प्रश्न :  कमी वयात डायबिटिक असलेल्या महिलेला कंसिव्ह करण्यात खूप समस्या येते का?

उत्तर : बऱ्याच प्रकरणांत डायबिटिक महिला निरोगी मुलांना जन्म देतात. डायबिटिसबरोबर जी सर्वात मोठी समस्या जोडलेली आहे, ती आहे शुगर लेव्हलची. जर शुगर अनियंत्रित असेल, तर मुलांमध्ये आनुवंशिक व्यंग निर्माण होण्याची शक्यता खूप वाढते. परंतु रक्तात शुगरच्या प्रमाणाला नियंत्रित केले गेले, तर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करून सामान्य मुलाला जन्म देणे शक्य आहे.

प्रश्न : मी असं ऐकलं आहे की महिला आपलं अंड दान करून दुसऱ्या एखाद्या महिलेला आई बनायला मदत करू शकते. मी अशा एखाद्या महिलेला मदत करू शकते का आणि याचा माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो का?

उत्तर : कोणतीही महिला अंडी दान करू शकते. केवळ तिला डोनर बनण्यापूर्वी काही तपासण्या करून घ्याव्या लागतात. अंडी दान करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक रूपाने फिट असणे खूप आवश्यक आहे. एका डोनरचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असायला हवे.

प्रश्न : माझे वय ४५ वर्षे आहे. माझ्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत, परंतु मूल झालेलं नाहीए. मी अलीकडेच एका बातमीत पाहिलं होतं की ५० वर्षांच्या वयातही महिला आई बनू शकतात. मेनोपॉजनंतरही मी आई बनू शकते का?

उत्तर : असिस्टिव्ड रीप्रोडक्टिव्ह तंत्राने मेनोपॉजनंतरही आई बनणे शक्य बनले आहे. मेनोपॉजचा अर्थ अंडी संपणं. अशावेळी एखाद्या एग डोनरकडून अंडी घेतली जातात आणि ती प्रयोगशाळेत फलित करून भ्रूण तयार केला जातो. मग भ्रूणाला गर्भाशयात इंप्लांट केले जाते. तसेही आईव्हीएफमध्येही उत्तम परिणाम ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्याच महिलांना मिळतात. आपले वय ४५ वर्षे आहे, जर आपण शारीरिकरीत्या फिट आहात, तर पॉझिटिव्ह परिणाम मिळण्याची शक्यता जास्त आहे.

सौंदर्य समस्या

* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • मला माझे कर्ली केस सांभाळायला खूप त्रास होतो. कारण ते खूप गुंततात. त्याबरोबर निर्जीव व कोरडेही झाले आहेत? आणि गळुही लागले आहेत. कृपया काही उपाय सांगा.

कर्ली केसांना कोमट तेलाने मालीश केल्याने केसांना फायदा होतो. असे नियमितपणे केल्यास आपले कर्ली केस खूप सुंदर होतात. कोकोनट ऑइल, ऑलिव्ह किंवा मग आल्मंड ऑइलने आपण केसांना मसाज करू शकता. दररोज शाम्पू केल्याने केस खराब होऊ शकतात, त्यामुळे केस गळती सुरू होते आणि केस डिहायड्रेट होऊ लागतात. त्यामुळे हा सल्ला दिला जातो की केस जास्त धुऊ नका.

कर्ली केस जास्त घट्ट बांधू नयेत. असं केल्यास कुरळे केस मुळातून कमजोर होऊन तुटू लागतात. जर आपले केस कुरळे असतील, तर ते हलके ओले असताना विंचरा. त्यामुळे केस कमी गुंततील. कुरळ्या केसांवर ड्रायरचा वापर कमी करा. कारण याच्या जास्त वापराने केस कमजोर होतात.

  • माझे वय ३५ वर्षे आहे. मी माझ्या कपाळावर मोठी टिकली लावते. त्यामुळे त्या ठिकाणी कायमचा स्पॉट पडला आहे. या स्पॉटला घरगुती उपायाने दूर केले जाऊ शकते का?

घरगुती उपचारांवर वेळ न घालवता जेवढ्या लवकर शक्य आहे, तेवढ्या लवकर स्किन स्पेशालिस्टला दाखवा. आपल्या मर्जीने कोणतेही औषध किंवा क्रीम वापरू नका. खरे तर खराब क्वालिटीच्या टिकलीमध्ये मोनोबँजॉइल इस्टस ऑफ हाइड्रोक्यूनोन पदार्थ आढळतो. त्यामुळे त्वचेला डाग पडतात. त्यामुळे ब्रँडेड टिकलीच लावा.

  • पेन्सिल आयलाइनर आणि लिक्विड आयलाइनरमध्ये कोण चांगला रिल्ट देतं?

लिक्विड आयलाइनरने डोळे जेवढे मोठे आणि आकर्षक दिसतात, तेवढे पेन्सिल आयलाइनरने दिसत नाही. लिक्विड आयलाइनर खूप वेळपर्यंत टिकून राहतो. ज्या लोकांची त्वचा ऑइली असते, त्यांच्यासाठी लिक्विड आयलाइनर एका जॅकपॉटप्रमाणे असतो. लिक्विड लाइनर दीर्घकाळपर्यंत त्याच शेपमध्ये राहतो. सोबतच हा अगदी स्वच्छही दिसतो. तर दुसऱ्या बाजूला पेन्सिल किंवा पावडर आयलाइनर डोळ्यांच्या आजूबाजूला ऑइल प्रोड्यूस झाल्यामुळे दिवसभर त्याचा शेप खराब करू शकतं किंवा मग संपूर्ण पुसूनही जाऊ शकतं. लिक्विड आय लाइनरचा एक सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण याच्या मदतीने आपली काहीही क्रिएटिव्हिटी करू शकता.

माझे वय २० वर्ष आहे. माझी नखं खूप खरखरीत आणि कडक आहेत. ती सॉफ्ट करता येतील का?

नखे केवळ ती नाहीत, जी दिसतात. नखांच्या दिसणाऱ्या भागाला नेल प्लेट म्हणतात. त्याच्याखाली नेल बॅड असतो. तो सामान्य त्वचेसारखा असतो. नेल मॅट्रिक्सला मिळणारे पोषक तत्त्वच नखे हेल्दी किंवा कमजोर होण्यास जबाबदार असतात. कोरडी व निर्जीव नखे व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, हृदयरोग किंवा रोगप्रतिकार क्षमतेच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी १०० ग्रॅम बिटाचे सेवन रोज जरूर करा. त्याचबरोबर आयर्न, व्हिटॅमिन डी व कॅल्शियमयुक्त भोजन नियमितपणे घ्या.

  • माझे वय २६ वर्षे आहे. मला नखे वाढविण्याचा खूप शौक आहे. पण माझ्या नखांचा रंग पिवळा आहे, जो दिसायला चांगला दिसत नाही. काही घरगुती उपाय आहेत का, जेणेकरून माझ्या नखांवर चमक येईल व ती पिवळी दिसणार नाहीत?

ऑलिव्ह ऑइल नखांसाठी खूप चांगले असते. त्यामुळे नखांना पोषण मिळते आणि त्यात चमक येते. रोज रात्री झोपण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइलला हलके गरम करून बोटे आणि नखांवर मसाज करा. काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसू लागतील. प्रत्येक ती गोष्ट ज्यात व्हिटॅमिन ई आहे, नखांसाठी खूप चांगली असते. याबरोबरच व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण आहार घेतल्यानेही नखांचे आरोग्य चांगले राहते.

  • मी २५ वर्षांची आहे. मी जेव्हा माझ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची क्रीम लावते, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर व्हाइट हेड्स येतात. आपण ते दूर करण्यावर उपाय सांगाल का?

व्हाइट हेड्स अॅक्नेचा एक प्रकार आहे, जे त्वचेची रंध्रे तेलाच्या पाझारण्याबरोबरच घाण जमा झाल्यामुळे उत्पन्न होतात. व्हाइट हेड्स त्वचेच्या अंतर्गत पातळीवर तयार होतात. त्यांना प्रकाश वगैरे मिळत नाही आणि त्यांचा रंग सफेद राहतो.

आपल्या त्वचेमध्ये नैसर्गिकरीत्या तेल असते. जे आपल्या त्वचेमध्ये ओलावा आणि मॉइश्चरायजर टिकवून ठेवते. जर आपल्या त्वचेवर जास्त तेल तसेच राहील, तर त्यामुळे आपल्या त्वचेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही क्रीम अशा असतात, ज्या आपल्या त्वचेला अजून चिकट बनवतात. त्यामुळे आपल्या त्वचेवर मुरमे येऊ लागतात. जर आपली त्वचा ऑयली असेल, तर आपण ऑइल फ्री क्रीमच लावा

व्हाइट हेड्स दूर करण्यासाठी मेथीच्या पानात पाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर चोळा. विशेषत: जिथे व्हाइट हेड्स असतील, तिथे चोळा. या प्रक्रियेमुळे व्हाइट हेड्स निघून जातात. पेस्ट सुकल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुऊन घ्या.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर : आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवासाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते.

सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

प्रश्न : मी २२ वर्षांची विवाहित महिला आहे. माझ्या पतिचे वय ३१ वर्षे आहे. आमच्या विवाहाला १ वर्ष झाले आहे. परंतु इच्छा असूनही मी गरोदर राहू शकले नाही. मी आई होण्याचे सुख मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?

उत्तर : कदाचित आपल्याला हे सत्य माहीतच असेल की महिलेला प्रेग्नंट होण्यासाठी हे खूप आवश्यक आहे की, पतिपत्नीने त्या दिवसांत शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत, ज्या दिवसांत महिलांमध्ये संतानप्राप्तीची शक्यता असते. हा संयोग महिलेच्या मासिकपाळीच्या चक्राच्या मध्यावर ओव्हरीतून डिंब सुटण्याच्या ४८ ते ७२ तासांपर्यंत आणि डिंब सुटल्यानंतर ४८ तासांपर्यंत जास्त असतो. त्या काळात झालेल्या  समागमात जर पतीच्या शुक्राणू बीजांनी पत्नीच्या डिंबाला फलित केले, तर प्रेग्नंसी येते.

आपण आपल्या पतीसोबत एखाद्या इन्फर्टिलिटी विशेषज्ञाचा सल्ला घेणे उचित ठरेल.

उपलब्ध आकड्यांनुसार, देशातील ७५ टक्के जोडप्यांना इच्छा असूनही संतानसुख प्राप्त होत नाही. वांझपणाची ही समस्या केवळ महिलांशीच जोडलेली नसते. संतान न होण्याच्या २५-४० टक्के प्रकरणांत ही समस्या पुरुष वंध्यत्वाशी जोडलेली असते. ४० टक्के प्रकरणात महिलांमध्ये प्रजनन क्षमतेची कमतरता असते. १० टक्के प्रकरणात समस्या स्त्रीपुरुष दोघांशीही संबंधित असते आणि जवळपास तेवढ्याच प्रकरणांत सर्व तपासण्या करूनही हे स्पष्ट होत नाही की प्रेग्नंसी कोणत्या कारणामुळे येत नाहीए.

आपण आपल्या पतिसोबत एखादद्या योग्य इन्फर्टिलिटी विशेषज्ञाला भेटा. कदाचित आपली समस्या छोटी असेल, असे होऊ शकते आणि त्यावर लवकर उपचार करता येतील. तसेही आपले वय अनुकूल आहे. १९ ते २५च्या दरम्यानचे वय महिलेला आई बनण्यासाठी सर्वात चांगले वय म्हटले जाते. या काळात तिचे प्रजनन अंग, लैंगिक हार्मोन्स आणि मानसिक लय प्रजननासाठी सर्वात अनुकूल अवस्थेत असते.

सौंदर्य समस्या

* शंकांचे निरसन ब्युटी एक्सपर्ट, इशिका तनेजा यांच्याकडून

1. माझी नखं खूप लवकर तुटतात. शिवाय त्यांची चमकसुद्धा   नाहीशी झाली आहे. कृपया ते परत सुंदर, मजबूत व चमकदार   बनावे यासाठी एखादा घरगुती उपाय सांगा?

लिंबू हे व्हिटॅमिन सी गुणाने पररिपूर्ण असते. हे तुमच्या नखासाठी खूप फायदेशीर ठरेल. याच्या वापराने नखांची लांबी वाढण्यासोबतच चमक आणि मजबूतीही येते. याचा वापर करण्याकरिता एका बाऊलमध्ये एक चमचा लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइलचे थोडे थेंब टाकून चांगले मिसळा. १० मिनिटं आपल्या नखांवर चोळत राहा. यानंतर पाण्याने धुवून टाका. ऑलिव्ह ऑइलमध्ये अनेक असे घटक असतात जे नखांसाठी उपयोगी असतात.

2.मी माझ्या चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांमुळे खूप त्रस्त आहे. कृपया एखादा घरगुती उपाय सांगा, ज्याचे काही साईड इफेक्ट नसतील.

पुदिन्यात अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात, जे त्वचा स्वच्छच करत नाही तर त्वचेला नैसर्गिक टोनही देतात. हे त्वचेत असलेले विषारी पदार्थ व अशुद्धता काढण्यात मदत करते, शिवाय मुरुमांपासून सुटका मिळवून देते. पुदिन्याच्या रसात असलेले सॅलिसिलिक अॅसिड मृत त्वचा हटवते. मुरूम नाहीसे करण्याकरीता मूठभर पुदिन्याची पानं कुटून त्याचा रस काढा. त्यानंतर तो संपूर्ण चेहऱ्यावर लावा. १० मिनिटांनी रस वाळल्यावर चेहरा धुवा. गुलाबजलात  पुदिन्याचा रस मिसळून लावल्यावरही मुरूम नाहीसे होतात.

3. डोळयांच्या सौंदर्यासाठी काही साध्या टिप्स सांगा, जेणेकरून माझे डोळे सर्वात सुंदर दिसतील?

आपण आय मेकअपमध्ये प्रायमर, हायलायटर व मस्कारा वगैरे वापरतो, जेणेकरून आपले डोळे सुरेख दिसतील व आपल्या व्यक्तिमत्त्वाला स्मार्ट लुक देतील. डोळयांना मेकअप करण्याआधी प्रायमर अवश्य लावा. याने डोळयांवर लावलेले आयशॅडो दीर्घ काळ टिकेल आणि त्याचा रंगही उठून दिसेल. हे पापण्यांच्या त्वचेला कोमल ठेवते. पापण्या आणि भुवया यांच्या मधला भाग म्हणजे ब्रॉबोनवर हायलाईटर लावल्यास डोळयांना एक सुरेख आकार मिळतो. मस्कारा तुमच्या डोळयांना उठावदार बनवण्यात उपयोगी पडतोत. हे डोळयांच्या वरच्या आणि खालच्या तीनही कडांना लावा. जर तुमच्या डोळयांचा आकार बदामी नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलचा वापर करू नये. कारण यामुळे तुमचे डोळे आणखीनच लहान दिसतील.

4. सोडा वॉटर फेस वॉशप्रमाणे वापरता येतो का?

होय, सोडा वॉटरच्या वापरामुळे कांतीवर एक वेगळीच चमक येते. याच कारणामुळे सोडा हे महिलांमध्ये सर्वात आवडते सौंदर्य प्रसाधन बनले आहे. सोडयात कार्बन डायऑक्साईड असतो, ज्यामुळे निर्माण होणारे बुडबुडे त्वचेला व त्यावरील छिद्रांना खोलवर स्वच्छ करते. याने मृत त्वचा नाहीशी होते, तसेच त्वचेत घट्टपणासुद्धा येतो. एक चमचा सोडा वॉटरमध्ये पाणी मिसळून कापसाच्या बोळयाने चेहऱ्याला लावा. थोडया वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

5. माझ्या ओठांच्या आसपास अनेकदा पांढरी त्वचा दिसू लागते. माझे ओठही रुक्ष व पिवळे आहेत. लिपस्टिक लावल्यावर बाजूची त्वचा पांढरी दिसू लागते. मी काय करू?

ओठांच्या चहूबाजूंचा रुक्षपणा नाहीसा करण्यासाठी रात्री झोपण्याआधी ओठांना लोणी किंवा तूप लावा. पिवळेपणा नाहीसा करायला गुलाबाच्या पाकळया वापरा. यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कायम राहतो व ओठांना गुलाबी बनवतो. एका बाऊलमध्ये गुलाबाच्या पाकळया घ्या. त्यावर कच्चे दूध ओतून काही तास तसेच ठेवा. यानंतर चांगले कुस्करून त्याची पेस्ट तयार करून ते ओठांवर लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

6. मी ३० वर्षीय काम करणारी महिला आहे. माझी त्वचा खूप ऑयली आहे. समस्या ही आहे की माझ्या नाकावर ब्लॅकहेड्स आहेत आणि गालांच्या     बाजूंवर व्हाईटहेड्स आहेत. यामुळे माझा चेहरा खूप खराब दिसतो. शिवाय मला   पार्टी किंवा लग्नसमारंभात जायलसंकोच वाटतो. मी नेहमी हे हाताने दाबून काढते. पण यामुळे मला खूप वेदना जाणवतात व हे परत दिसू लागतात. सांगा  मी काय करू?

ब्लॅकहेड्स नाहीसे करायला एक बटाटा किसून घ्या व प्रभावित जागेवर थोडा वेळ चोळा. मग सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. व्हाईटहेड्ससाठी ६-७ बदाम बारीक करून घ्या. यात गुलाबजलाचे थोडे थेंब मिसळून पेस्ट तयार करा व व्हाईटहेड्सवर लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धुवा.

7. दीर्घ काळापासून मी साबणाने चेहरा धुते पण काही दिवसांपासून माझा चेहरा रुक्ष दिसू लागली आहे. मी काय करायला हवे?

शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्यांची त्वचा नाजूक असते. म्हणून आपल्या त्वचेच्या गरजेनुसार आणि प्रकारानुसार फेस वॉश वापरा. घरगुती उपचार म्हणून तुम्ही हे वापरू शकता – एका मोठया बाऊलमध्ये ४ मोठे चमचे बेसन व १ लहान चमचा ताजी साय एकत्र करा. घट्ट पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी एका मुलावर खूप प्रेम करते. आम्ही अनेकदा शरीरसंबंध ठेवले आहेत, परंतु त्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र यावेळेस निष्काळजीपणामुळे संबंध ठेवताना गर्भनिरोधक साधनांचा वापर केला नाही. आता मला भीती वाटते की जर मला गर्भ राहिला तर काय होईल? कृपया सांगा की असं झाल्यास मी या समस्येतून कशी मुक्तता मिळवू?

तुम्ही सविस्तरपणे खुलासा केलेला नाही की तुम्ही संबंध साधून किती कालावधी झाला आहे. सुरूवातीच्या कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्या असतात, ज्यांचं सेवन करून तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. परंतु कालावधी अधिक उलटला असेल तर गर्भनिरोधक उपाय उपयोगाचे ठरणार नाहीत. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ लेडी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर गर्भ राहिला असेल तर गर्भपात करून घेऊ शकता. भविष्यात चुकूनही विवाहापूर्वी संबंध साधू नका.

  • मी १६ वर्षीय तरुणी आहे, सध्या शिकत आहे. एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला नव्हता, परंतु त्याच दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करू लागले. या गोष्टीला ६-७ महिने उलटून गेल्यावर जेव्हा मी त्याच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याने ना धड होकार दिला ना नकार. त्याच्या या तटस्थ वागणूकीचा मी काय अर्थ काढू? त्याची प्रतिक्षा करू की आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू?

आता तुझं वय प्रेमात पडण्याचं वा व्यक्तिला समजून घेण्याचं नाहीए. ज्याला तू प्रेम समजतेस ते प्रेम नाहीए, तर केवळ लैंगिक आकर्षण आहे, जे या वयात विरूद्धलिंगी व्यक्तीप्रति जाणवणं स्वाभाविक आहे. यावेळी तुझ्यासाठी आपल्या करिअरहून अधिक महत्त्वाचं काही असता कामा नये. त्यामुळे सध्या आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं उत्तम.

  • मी ३१ वर्षीय विवाहिता आहे व २ मुलींची माता आहे. माझ्या लग्नाला १६ वर्षं झाली आहेत. मी माझ्या वैवाहिक जीवनात खुश नाही. माझे पती माझ्या मोठ्या बहिणीवर प्रेम करतात. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंधसुद्धा आहेत. ही गोष्ट मला ४ वर्षांपासून माहीत आहे. परंतु इच्छा असूनही मी काही करू शकले नाही, कारण माझे पती हुकूमशाही वृत्तीचे आहेत. लहानसहान गोष्टींवरून त्यांचा राग अनियंत्रित होतो. मी त्यांना विरोध करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व बघून केवळ कुढत राहाते. ते माझ्या मुलींवरही लक्ष देत नाहीत.

माझी मुलगी ज्या शिक्षकांकडे गेल्या ९ वर्षांपासून शिकत आहे, त्यांना जेव्हा मी त्रस्त असल्याचं कळलं तेव्हा माझ्या चिंतेचं कारण समजून घेत त्यांनी माझ्याप्रति सहानुभूति दर्शवली. आता मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. ६ महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी माझ्यासोबत ते आपला आनंद वाटून घेऊ इच्छितात असं सांगितलं तेव्हा मी चकित झाले. अशा संबंधांमध्ये निर्माण होणारी जवळीक वाढणं स्वाभाविक असतं, परंतु मला भीती वाटते. मी काय केलं पाहिजे, तुम्हीच सांगा?

४ वर्षांपूर्वी तुम्हाला तुमच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची गोष्ट ठाऊक झाली होती, तेव्हाच तुम्ही याला विरोध करायला हवा होता. पती कितीही हुकूमशाही करणारे असले तरी या अन्यायविरूद्ध आवाज न उठवून तुम्ही त्यांना स्वैराचार करण्यासाठी मोकळीक दिली. पतीला घाबरत होतात हे खरं. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या बहिणीला रागवायला हवं होतं. अजूनही वेळ आहे. तिच्या पतीकडे तक्रार करा. आपल्या माहेरीसुद्धा तिची करतूत सांगा. हे असं केल्याने ती तुमच्या मार्गातून बाजूला होईल.

उरला प्रश्न मुलीच्या शिक्षकांचा तर त्यांना तुम्ही आपली खाजगी गोष्ट सांगायला नको होती. ते सहानुभूती दाखवून तुमच्या अडचणीचा गैरफायदा उठवू पाहत आहेत. अशा संधीसाधू व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. बाहेर आनंद शोधण्याऐवजी आपल्या कुटुंबात हरवलेला आनंद शोधा. तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्यावर २ मुलींची जबाबदारीसुद्धा आहे. तुम्हीच म्हणता की तुमचे पती मुलींवर लक्ष देत नाहीत. मग अशावेळी तर तुमची जबाबदारी अधिक वाढते, तेव्हा समजूतदारपणे वागा.

  • माझ्या भावाचं लग्न १० वर्षांपूर्वी कोटा येथील मुलीशी झालं होतं. मुलीची मोठी बहिण घटस्फोटित होती. हे लग्न जुळवताना लोक आम्हाला हे स्थळ योग्य नसल्याचं सुचवत होते. मुलीची आई मुलींना भडकवते. त्यामुळे मोठ्या मुलीचं सासरी पटू शकलं नाही. आम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि लग्न जुळवलं. परंतु लग्नानंतर सत्य अनुभवास आलं. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी वहिनी माहेरी निघून गेली. प्रसूतीनंतर परतणार असं सांगून गेली होती. मुलगी झाल्यावर ३-४ वेळा भाऊ तिला आणायला गेला, परंतु ती परतली नाही. याच दु:खात माझा भाऊ रात्रंदिवस दारू पिऊ लागला आणि २ महिन्यांपूर्वी वारला. आता मुलीकडचे म्हणतात की आम्ही भावाच्या मुलीला ताब्यात घ्यावं, जेणेकरून त्यांना वहिनीचं पुन्हा लग्न लावता येईल. असंही धमकावतात की आम्ही मुलीला ताब्यात घेतलं नाही तर तिला अनाथाश्रमात सोडून देणार. सांगा काय करू?

लग्न जुळवताना एकमेकांबद्दलची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. तुम्हाला मुलीच्या घरच्यांबद्दल लोकांनी सावध करूनही तुम्ही त्याकडे डोळेझाक केलीत. आत जे घडलं ते घडलं. ते बदलता येणार नाही. त्यापेक्षा भावाच्या मुलीला ताब्यात घ्या, जेणेकरून त्या लहानग्या जीवावर अन्याय होणार नाही.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४१ वर्षीय महिला आहे. मला २ मुलगे आहेत. दीर्घ काळापासून माझ्या गर्भाशयात २ छोटे-छोटे फायब्रॉइडच्या गाठी आहेत. पण नुकतेच माझे अल्ट्रासाउंड झाले, तेव्हा कळले की, या फायब्रॉइड्सची साइज वाढून २.५ सेंटीमीटर झाली आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, माझी इच्छा असेल गर्भपिशवी काढताही येईल. परंतु त्यांच्या असण्याने मला कोणताही त्रास नाहीए. तरीही भीती वाटते की काही कॉम्प्लिकेशन्स येऊ नयेत. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर : फायब्रॉइड महिलांच्या गर्भाशयात होणाऱ्या सामान्य गाठी आहेत. अल्ट्रासाउंड केल्यानंतर जवळपास ४० टक्के महिलांच्या गर्भाशयात या गाठी आढळून येतात. काही महिला जसं की आपल्या केसमध्ये या गाठी छोट्या-छोट्या आहेत आणि  काहींमध्ये तर या फूटबॉलएवढ्या मोठ्याही असतात.

जोपर्यंत फायब्रॉइडमुळे मासिकपाळीच्या वेळी खूप जास्त रक्तस्त्राव होण्याची समस्या निर्माण होत नसेल, एखाद्या महिलेला मूल हवंय आणि फायब्रॉइडमुळे ही इच्छा पूर्ण होण्यात अडचण येत नसेल किंवा फायब्रॉइड्समुळे काही कॉम्प्लिकेशन्स होत नसतील उदा. गाठ आपल्या स्थानी चक्रासारखी फिरणे आणि रक्तपुरवठा भंग होण्यासारख्या इमर्जेन्सी उत्पन्न होत नसतील किंवा या गाठी खूप मोठ्या झाल्याने ब्लॅडर दबणे अथवा मलाशय दबल्यामुळे कोणती समस्या निर्माण होत नसेल, तर तिला तिच्या स्थितीवर सोडून देण्यातच शहाणपण आहे.

सध्या तुमचे जे वय आहे, ते पाहता या गाठींना सहजपणे कोणतीही छेडछाड न करता सोडता येऊ शकते. विशेषत: अशा स्थितीत जेव्हा आपले कुटुंब पूर्ण झाले असेल आणि या गाठी असण्याने आपल्याला कोणताही त्रास नसेल.

जसजसे आपले वय वाढेल आणि आपली रजोनिवृत्ती होईल तसेच आपल्या शरीरात लैंगिक हार्मोन्सचे प्रमाण घटत जाईल, तसतशा या गाठी आपोआपच आकुंचन पावत जातील.

प्रश्न : मी २६ वर्षांची आहे आणि मला गर्भावस्थेचा तिसरा महिना चालू आहे. मला सकाळी उठताच उलट्या होण्याचा त्रास चालू आहे. चक्कर येते आणि अशक्तपणाही जाणवतो. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी ग्लुकोजच्या बॉटलची ड्रीपही लावली, परंतु त्यामुळेही काही फायदा झाला नाही. काहीतरी असा उपाय सांगा, ज्यामुळे त्रास दूर होऊ शकेल.

उत्तर : गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या शरीरात एकाच वेळी खूप सारे बदल होतात. त्यात हार्मोनल फेरबदलही सामील आहेत. त्यामुळे उलटीचा त्रास होतो. हे लक्षण साधारणपणे गर्भावस्थेच्या दुसऱ्या महिन्यात सुरुवातीच्या काळात दिसते. याची तीव्रता एखाद्या महिलेमध्ये कमी तर एखादीमध्ये जास्त असते. एखादीला थोडाशीच मळमळ होते, कोणाला जास्त उलट्यांचा त्रास होतो. परंतु बहुतेक महिलांमध्ये हा त्रास चौथा-पाचवा महिना उलटल्यानंतर आपोआपच दूर होतो.

तोपर्यंत आराम मिळवण्यासाठी आपण काही छोटे-छोटे उपाय करू शकता. जर उलट्या सकाळीच जास्त होत असतील, तर सकाळी अंथरुणावरून उठण्यापूर्वी एक सुका टोस्ट किंवा बिस्कीट खा. आपण आपल्या खाण्यापिण्यात बदल केल्यास उत्तम होईल.

खाण्याच्या काही पदार्थ किंवा वासामुळे मळमळत असेल, तर त्या पदार्थांपासून लांब राहा. गर्भावस्थेत गंधाबाबत संवेदनशीलता वाढते. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरमागरम पदार्थ खाण्याऐवजी थंड पदार्थ खाणे योग्य ठरते. कारण थंड पदार्थांमध्ये सुगंध कमी जाणवतो.

जिथे चक्कर येणे आणि अशक्तपणा वाटण्याची गोष्ट आहे, तिथे डॉक्टरांकडूनच तपासणी करून घेणे उत्तम असते. याचा संबंध रक्ताची कमतरता आणि ब्लड प्रेशर कमी होणे याच्याशीही असू शकतो. गर्भातला भ्रुणाच्या वाढीसाठी कॅलरीज, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजाच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी गर्भवतीने आपल्या खुराकाकडे लक्ष देणे आवश्यक असते. जर एखाद्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेबाबत कळले तर ती पूर्ण करण्यासाठी डॉक्टर गोळी, कॅप्सूलही देऊ शकतात.

प्रश्न : माझे वय १५ वर्षे आहे. मला दर १५ दिवसांनी पाळी येते. डॉक्टरला दाखवल्यानंतर त्यांनी औषध दिले. ते घेतले की आराम मिळतो, पण ते सोडले तर पुन्हा मासिक चक्र १५ दिवसांचे होते. हे एखाद्या गंभीर रोगाचे लक्षण तर नाही ना?

उत्तर : किशोरावस्थेत सुरुवातीच्या काळात हार्मोनल असंतुलनामुळे मासिकपाळीची वेळ अनियमित होणे सामान्य गोष्ट आहे. कमी दिवसांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा रक्तस्त्राव झाल्यास नक्कीच त्रास होत होतो. त्यामुळे मनही शंकाकुल होते.

अशा वेळी हेच योग्य ठरेल की हा शरीर परिपक्व होण्याच्या शारीरिक क्रियेचा सामान्य भाग मानून स्वत:हून ही गोष्ट सामान्य होण्यास वेळ द्या. यामुळे विचलित होऊ नका किंवा आपल्यात अशी धारणा निर्माण होऊ देऊ नका की आपल्याला एखादा रोग झाला आहे. रजस्वला झाल्यानंतर काही वर्षांत बहुतेक किशोरींचे देह आपोआपच मासिक पाळीचे चक्र नियमित करतात.

तरीही एखाद्या तरुणीला धीर नसेल किंवा तिच्या शरीरात रक्ताची खूप कमी आली असेल, तर डॉक्टरांना भेटा. ते लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या देऊन चक्राचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या डॉक्टरांनीही असेच केले, पण हा प्रयत्न अनेक महिन्यांपर्यंत पुन्हा-पुन्हा करण्याची आवश्यकता असते.

जोपर्यंत मासिक पाळी नियमित होत नाही, तोपर्यंत लैंगिक हार्मोन्सच्या गोळ्या घेणे आवश्यक ठरू शकते. दुसरा पर्याय हा आहे की आपण आपल्या शरीराला स्वत:हून त्याची नियमितता स्थापित करू द्यावं.

आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. सातत्याने रक्तस्त्राव झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता येणे स्वाभाविक आहे. यापासून वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमितपणे आयर्न आणि फोलिक अॅसिडच्या गोळ्या घ्या आणि आहारात लोहयुक्त पदार्थ, हिरव्या भाज्या आणि प्रोटीन घ्या.

गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.

वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?

आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.

  • मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.

सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?

तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.

तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.

मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.

कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?

थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.

हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.

याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.

सौंदर्य समस्या

*समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या कपाळाच्या दोन्ही बाजूला काळसर डाग आहेत. कृपया उपाय सांगा?

चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी बेसनाचा वापर उत्तम आहे. अर्धा चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा हळद, २ चमचे बेसन यांचं चांगलं मिश्रण करून पेस्ट बनवा. चेहऱ्याला लावून सुकू द्या. असं दिवसातून एकदा नियमित करा. काळसर डाग नाहीसे होतील.

  • सकाळी उठल्यावर माझा चेहरा नॉर्मल भासतो. पण दुपारपर्यंत लाल होतो. हे कशामुळे होतं?

ऊन, काळजी, चॉकलेट व मसालेदार खाणं वगैरे यामुळे असे त्वचेचे आजार होतात. यावर उपाय म्हणजे रोज चेहरा नीट साफ करा व आहारांकडे विशेष लक्ष द्या. उन्हात जायचं असल्यास १५ ते २० मिनिटे आधी सनस्क्रीन लावा, जे तुमच्या स्कीनचं युव्हीए व युव्हीबीपासून संरक्षण करेल. जास्तवेळ उन्हात राहायचं असेल तर २ तासांनी परत सनस्क्रीन लावा. भरपूर पाणी प्या.

  • माझ्या कपाळावर व ओठांभोवती काळपटपणा आला आहे. यावर उपाय काय?

ओठांच्या काळपटपणासाठी आधी ओठांना माइश्चराइज करण्याची गरज आहे. यासाठी भरपूर पाणी प्या. रात्री झोपण्याआधी बेंबीत ई-व्हिटामिन तेलाचे ३ थेंब टाका. ओठांचा काळेपणा घालवण्यासाठी गुलाबाच्या पानांची पेस्ट लावणे हा अचूक उपाय आहे. नियमित वापर केल्यास ओठांचा रंग हलका गुलाबी व चमकदार होतो. हवं असल्यास या पेस्टमध्ये तुम्ही थोडंसं ग्लिसरीन टाकू शकता.

  • मी १९ वर्षांची आहे. एक वर्षापूर्वी मी भुवयांवर पियरसिंग केलं होतं. पण मला आता त्यात काही घालायचं नाही. मी हे कॉस्मेटिक सर्जरी करून बंद करू शकते का? यात किती खर्च येईल?

नक्कीच. कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या रिकाम्या जागा भरू शकता. यात कमीतकमी रू. १०-३० हजार रुपये खर्च आहे.

  • मी ४५ वर्षांची आहे. माझे केस खूप तेलकट आहेत. आठवड्यातून मी ३-४ वेळा शाम्पूने केस धुते. पांढऱ्या केसांसाठी डाय करते. परंतु १५-२० दिवसात परत भांगाच्या आसापास पांढरे केस दिसू लागतात. मी माझ्या केसांबद्दल चिंतीत आहे. केस दिर्घकाळ काळे राहावे यासाठी सोपा उपाय सांगा?

तेलकट केसांसाठी पाण्यात १ चमचा व्हिनेगर, २-३ थेंब लव्हेंडर इसेंशियल तेल टाकून केस धुवा. कलर्ड केसांसाठी असा कोणताही स्थायी उपचार नाही. पण जर तुम्ही प्रोफेशनल सलूनमध्ये जाऊन वर टचअप केला तर फायदा होईल.

केस सौम्य शाम्पूने धुवा. जमल्यास जास्वंदाच्या फुलांच्या पाकळ्या वाटून १ चमचा भिजवलेल्या मेथ्या बारीक करून मिश्रण तयार करा. ते २-३ तास डोक्याच्या त्वचेवर लावा व नंतर शाम्पू करा.

  • मी २५ वर्षांची आहे. माझे केस खूप गळतात. असा काहीतरी घरगुती उपाय सांगा, ज्यामुळे केस गळणं कमी होईल?

केस गळण्यामागे चुकीची जीवनशैली, सुंतलित आणि पौष्टिक आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण आणि हार्मोन्समधील बदल अशी बरीच कारणं असतात. सोबतच एखादा आजार वा औषधाच्या सेवनामुळेही केसगळती होऊ शकते. आधी तुम्ही तुमचे केस गळण्याची कारणं जाणून घ्या. मग त्यानुसार उपाय करा.

घरगुती उपाय म्हणून आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज करा आणि दही लावा, केसगळती थांबवण्यासाठी दही हा घरगुती उपाय आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. केस धुण्याच्या कमीत कमी ३० मिनिटं आधी दही लावा. दही सुकलं की केस धुवून टाका.

दुसरा उपाय म्हणून कोमट ऑलिव्ह तेलात १ चमचा मध आणि १ चमचा दालचिनी पावडर मिसळून त्याची पेस्ट करा आणि अंघोळीआधी केसांना लावा. एका तासाने केस शॉम्पूने धुवा. यामुळे केसगळती थांबते.

  • मी २९ वर्षांची आहे. माझी समस्या ही आहे की माझ्या डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं आली आहेत आणि माझी त्वचासुद्धा फिकट पडली आहे. चेहऱ्यावरचं तेज परत मिळवण्यासाठी उपाय सांगा?

डोळ्यांखालच्या काळ्या वर्तळांमुळे वय जास्त दिसतंच शिवाय चेहऱ्याचं सौंदर्यही कमी होतं. बऱ्याच काळासाठी चुकीचा आहार, संगणकाचा अतिवापर, त्वचेमध्ये पाण्याची कमतरता, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे ही वर्तुळं घालवण्यासाठी  बदामाच्या तेलाने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करा. हवं तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अंडरआय क्रिमचाही वापर करू शकता.

तुमची त्वचा तेलकट असेल तर चंदन पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने धुवा. वाटलं तर तुम्ही दहीसुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. दही त्वचेच्या आत लपलेली घाण दूर करून चेहऱ्यावरचे डाग, मुरमं नष्ट करते.

आरोग्य परामर्श

* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ५३ वर्षांची आहे. बँकेत ऑफिसर आहे. माझ्यावर कामाचा खूप ताण असतो. कदाचित म्हणूनच माझं ब्लडप्रेशर वाढत आहे. माझ्या लक्षात येतयं की गेल्या २-३ वर्षांपासून हिवाळ्यात जास्त वाढतं. घरी मुलं व नवरा माझी थट्टा करतात की असं काही वसंत ऋतुप्रमाणे ब्लडप्रेशर कमी जास्त होत नाही. पण मला भुक लागली की खायची सवय आहे. कृपया मला सांगा की हिवाळ्याचा ब्लडप्रेशर वाढण्यासाठी काही संबंध आहे का? जर असेल तर ते सामान्य ठेवण्यासाठी काय उपाय करावे जेणेकरून माझं आरोग्य मला सुहृढ राखता येईल.

उत्तर : नक्कीच हिवाळ्यात काहीचं ब्लडप्रेशर वाढू शकतं. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कित्येकाचं ब्लडप्रेशर ६-७ ते १० अंकांनी वाढत असतं असं वैद्यकीय संशोधनात (क्लिनिकल संशोधनात) आढळलं आहे. जर ब्लडप्रेशर वाढून १४० अंक सिस्टॉलिक व ९० अंक डायस्टॉविकच्यावर गेलं तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावी.

ब्लडप्रेशर वाढणं हे तब्येतीला हानिकारक आहे. शरीरातील नसांवर अतिरिक्त दबाव पडल्याने हृदय, किडणी, मेंदू व डोळ्यांचा पडदा यावर हळूहळू परीणाम होऊ शकतो.

ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काही उपयुक्त औषधांशिवाय जीवनशैलीत बदल करायची गरज आहे. समतोल आहारत मीठाचा कमी वापर, नियमित व्यायाम व वजनावर नियंत्रण असायला हवं.

जर सकाळी उठल्यावर डोक्याचा मागचा भाग जड वाटत असेल तर ब्लडप्रेशर जास्त आहे असे मानावे व लगेच ब्लडप्रेशर मोजून घ्या. वाढलं असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी जर तुम्हाला औषधाचा डोस वाढवून दिला तर त्यात चालढकल करू नका. उलट लगेच सुरू करा. कधीकधी एखादं छोटंसं जास्तीचं औषध घ्यावं लागतं.

हिवाळ्यात काही लोकांचं ब्लडप्रेशर वाढतं कारण ते जेवणात अधिक मीठ वापरतात. त्यामुळे दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

ताजी फळं, पालेभाज्या भरपूर खा. शुद्ध दुधाऐवजी स्प्रेटा दुध प्या. जेवणात सॅचुरेटेड फॅट्स कमी करा.

काही रूग्णांमध्ये सकाळी सकाळी ब्लडप्रेशर जास्त आढळते. जर तुमचं असं असेल तर औषधांची वेळ बदलण्याची गरज आहे. काही औषधं सकाळी तर काही संध्याकाळी घेऊन ब्लडप्रेशर नियंत्रणात आणता येतं. याबाबतीत तुम्ही डॉक्टरांना विचारा.

तुमच्या कार्यशैलीतला बदल तुमचा ताण कमी करू शकेल. हसण्या खेळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी वेळ येण्याची गरज आहे. शिवाय एकत्र व्यायाम, ध्यान, वगैरे हे ताण कमी करण्याचे उत्तम उपाय आहेत.

प्रश्न : माझं वय ४४ वर्षं आहे. मला मासिक पाळीच्या काही दिवस आधी स्तनांमध्ये जडत्त्व व वेदना जाणवतात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आहे की काय असं वाटतं. माझ्या मावशीला हा रोग झाला होता. त्यामुळे लहान वयातच ती वारली. आता मी काय करायला हवं?

उत्तर : तुमची मावशी ब्रेस्ट कॅन्सरने गेली. त्यामुळे तुमच्या मनात भीतीचा आजाराप्रति असणं स्वाभाविक आहे. परंतु ज्याप्रकारे मासिक पाळीबरोबर स्तनांमध्ये होणारे बदल तुम्ही सांगता आहात, ते मला फायब्रोयडिनोसिस किंवा फायब्रोसिस्टिक ब्रेस्ट डिसीज याची लक्षणं वाटतात. यात मासिकपाळीच्या ३-४ दिवस आधी वेदना सुरू होतात व स्त्राव सुरू झाल्यावर थांबतात. स्तनांच्या हालचालीबरोबर वेदना वाढतात. हे मासिकपाळीच्या चक्राबरोबर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे प्रेरीत होतं. त्याचा ब्रेस्ट कॅन्सरशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काहीही संबंध नाही.

वेदना कमी करण्यासाठी तुम्ही काही छोटेछोटे उपाय करू शकता. आधी तर दिवसभर २४ तास ब्रेसिअर घालून राहा. ज्यामुळे स्तनांना आधार मिळतो. तरीही    वेदना जाणवल्या तर एखादं सौम्य वेदनाशमक औषध उदा. पॅरासिटामोल, इबुप्रोफेन घ्या. तरीही फायदा झाला नाही तर एखाद्या सर्जनला भेटा. गरज असेल तर व्हिटॅमिन ई व हारर्मोनल औषधांनी बरं वाटेल.

तुमच्या मावशीला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तुमचं याबाबतीत जागृत असणं चांगलं आहे. त्यामुळे दर महिन्याला तुम्ही तुमच्या ब्रेस्टची स्वयंतपासणी नियमितपणे करणं फारच उत्तम ठरेल. बेडवर झोपून किंवा आरशासमोर उभं राहून दोन्ही स्तनांमध्ये गाठ, त्वचेतील बदल व स्तनाग्रातील बदल यांचं निरिक्षण करा. थोडा जरी संशय आला तर ताबडतोब तपासणी करा. चालढकळ करू नका. वेळेत उपचार घेतल्याने कितीतरी केसेसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं मुळासकट निर्मुलन झालं आहे.

आपण वजन, आहार यांचा नेहमी समतोल ठेवा. लठ्ठपणा, जंकफूड, तळलेले पदार्थ, मांसाहार वगैरे ब्रेस्ट कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. तुमच्याकडे असा इतिहास आहे (मावशीचा) तुमच्या कुटुंबात आधीच हा रोग आहे त्यामुळे या रिस्कला अधिक वाढू न देणंच योग्य आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें