आकर्षण आहे की प्रेम

* पूनम अहमद

३० वर्षीय अमित एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहेत. युवावस्थेतील पहिल्या आकर्षणाबाबत बोलताना त्यांनी हसत सांगितले, ‘‘मी दहावीत होतो. ती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान होती. ती शाळेतल्या मुलींमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि मीसुद्धा तिचा चाहता होतो. आज मला आठवत नाही की मला तिच्याबद्दल इतके आकर्षण का होते, मी तिची एक झलक पाहण्यासाठी धावतपळत शाळेत जात असे. एका नृत्य स्पर्धेत मला तिच्यासोबत नृत्य करायचे होते. मी खूपच खूश होतो. ही माझ्या पहिल्या रोमान्सची सुरुवात होती. जसे की त्या वयातील नाते टिकत नाही, आमचेही नाते लवकरच संपले. मला असे वाटायचे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु मला आश्चर्य वाटले कारण महिन्याभरातच माझ्या मनातून तिचा विचार निघून गेला होता. मी समजून गेलो की हे इन्फॅच्युएशन म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण होते.’’

तज्ज्ञांच्या मते, इन्फॅच्युएशन हे अत्यंत तीव्र पण थोडया काळासाठीचे प्रशंसक भाव असतात. याला आकर्षण, आसक्ति किंवा क्रश असेही म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक अंशू जैन यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला त्या व्यक्तिसोबत राहण्याची तीव्र इच्छा होती. त्या व्यक्तिमुळे तुमचे विचार, झोप, दिनक्रम आणि खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो.’’

इन्फॅच्युएशन ब्रेन केमिस्ट्रीत जागा निर्माण करते. जिथे पुरुष सडपातळ, स्मार्ट महिलांकडे तर, महिला उच्चपदस्थ किंवा उच्चशिक्षित पुरुषांकडे आकर्षित होऊ शकतात. आधुनिक नात्यात बरेच बदल झाले आहेत. अंशूचे म्हणणे आहे की इन्फॅच्युएशनमध्ये अनेकदा आपल्याला वाटते की आपण प्रेमात पडलो आहोत, पण असे काहीच नसते. ते सहजपणे अगदी कधीही संपू शकते.

कसे ओळखावे

इन्फॅच्युएशन ओळखण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेतज्ज्ञ काय टीप्स देतात, हे जाणून घेऊया :

२७ वर्षीय देविका शर्मा सांगतात की, ‘‘कॉलेजमध्ये एका अतिशय हुशार आणि सर्जनशील व्यक्तीबाबत मला खूपच आकर्षण वाटू लागले. मला त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती. मग अचानक तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला. मला त्याच्याशी बोलण्याची जसजशी संधी मिळत गेली तसे माझ्या लक्षात आले की मला वाटत होते तसे त्यांच्यात  काहीच नव्हते. त्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला काहीच वाटेनासे झाले. आमच्यात काहीही साम्य नव्हते. माझ्या मनात त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या, त्या रातोरात नाहीशा ?ाल्या. खरंतर त्याने मला संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्याच्यातील मा?ा इंटरेस्ट संपला होता.’’

सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या मते, ‘‘आपल्या मेंदूत असलेल्या काही प्लेजर सेंटरमधून डोपामाइनचे जास्त प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे मनातील आकर्षणाप्रति असीम प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. त्याचवेळी सेरोटोनिनची पातळी, जी चांगल्या भावनांसाठी जबाबदार असते, ती कमी होऊ लागते. परिणामी, आपल्या भावनांमध्ये बरेच चढउतार दिसून येतात. प्रिय व्यक्ती जी काही प्रतिक्रिया देत असते, त्यानुसार मूड बदलू लागतो.’’

काय करावे

जेव्हा तुम्हाला एखाद्याबाबत आकर्षण वाटते तेव्हा तो खरोखरच कसा आहे, हे जाणून न घेताच तुम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील फक्त एखाद्याच भागाकडे पाहात असता. डॉक्टर रवी यांचं म्हणणं आहे, ‘‘आकर्षणाला प्रोत्साहन देऊ नका, आसक्तीमधून थोडेसे बाहेर पडा. यामुळे विरुद्ध लिंगी आकर्षणामागील योग्य तर्क तुमच्या लक्षात येईल.’’

प्रिय वाटणाऱ्या या व्यक्तींच्या नकारात्मक बाबीही तपासून पाहा. यांच्यातील उणीवांचा विचार करा. इव्हेंट मॅनेजर जयेश सांगतात, ‘‘शाळेत असताना मी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलीकडे आकर्षित झालो. मी तिच्या बाजूच्याच बाकावर काही दिवस बसत होतो. तिच्याशी बोलण्याची हिंमत जास्त करू    शकत नव्हतो. पण तिच्याकडे मी ओढला जात होतो.

‘‘एके दिवशी मी तिला मनातले सांगितले. तेव्हा मला समजले की तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळ येताच ती त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळी मला एक धडा मिळाला की आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून दूर जाण्यासाठी शक्य तितका वेळ मित्र आणि कुटुंबासह घालवायला हवा. यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील प्रिय व्यक्तिची ओढ सतावत नाही किंवा तिची आठवण काढायला जास्त वेळ मिळत नाही.’’

डॉक्टर अखिल श्रॉफ सांगतात, ‘‘तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची वाढलेली पातळी तुमच्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यासाठी भरपूर व्यायाम करा.’’

जेव्हा एखाद्या प्रति इन्फॅच्युएशन, जाणवते, तेव्हा त्या व्यक्तिला कृती आणि त्याच्या शब्दांकडे खूप लक्ष देतो. वारंवार त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलकडे पाहतो. मानसोपचारतज्ज्ञ पवन गोस्वामी सांगतात, ‘‘अशा वेळी त्या व्यक्तिपासून शारीरिक आणि वर्चुअली अंतर ठेवा. स्वत:ला त्या व्यकितपासून दूर ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.’’

४० वर्षीय स्वाती भटनागर आपला अनुभव शेअर करताना सांगतात, ‘‘जेव्हा मी २८ वर्षांची होते तेव्हा माझ्या हँडसम कलीगच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नसे. कामात लक्ष लागत नव्हते. मी लवकर ऑफिसला जायचे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधायचे. मग एके दिवशी मला समजले की ज्याच्याबद्दल मला ओढ वाटतेय, तो विवाहित आहे. माझे हृदय दुखावले गेले. तेव्हा लक्षात आले की केवळ मीच त्याच्याकडे आकर्षित झाले होते.’’

तज्ज्ञ सांगतात की, भलेही तुम्हाला ज्याच्याबद्दल आकर्षण आहे तोही तुमच्याच प्रमाणे त्याच्या भावना व्यक्त करेल, पण त्याच्याशी प्रामाणिकपणा दाखवणे गरजेचे आहे. दोघांनीही या नात्यातील एकमेकांच्या उणीवा आणि चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. पवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘स्वत:च्या आत्मसन्मानाची काळजी घ्या. स्वत:वर प्रेम करा, स्वत:बद्दल चांगले वाटण्याचा अनुभव घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.’’

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘जर तुम्ही दुसऱ्याबद्दल योग्य जास्तच विचार करत असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असाल तर स्वत:च्या विचारांवर गांभीर्याने लक्ष द्या. नोंदवही तयार करा. आपला उद्देश स्पष्टपणे लिहा. काहीसा असा दिनक्रम तयार करा की तुम्हाला या अनैच्छिक आकर्षणाबाबत विचार करायला वेळच मिळणार नाही.’’

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी काही गोष्टी मागे सोडून जाणेच चांगले असते. प्रेमाच्या मागे धावू नका, तर स्वत:ला असे बनवा जेणेकरून लोकांनाच तुमच्याजवळ यावेसे वाटेल.

तुम्हीही जर कोणासाठी असाच अनुभव घेत असाल तर निश्चितच आकर्षणाच्या जाळयात अडकले आहात.

* तुम्ही त्याचाच विचार करता आणि स्वतऱ्च्या कामावर लक्ष देणे तुमच्यासाठी कठीण होते.

* संपर्काचे कोणतेही साधन जसे की व्हॉट्सअॅप, इमेल असो किंवा फोन, त्या व्यक्तिशी संपर्क होताच तुम्ही उत्साहित आणि उत्तेजित होता.

* तुमची एनर्जी लेव्हल अतिशय वाढते. ना तुम्हाला झोप हवी असते ना जेवण.

* तुम्हाला तो परफेक्ट वाटतो. त्याच्यात काहीच कमतरता जाणवत नाही.

* त्याच्याजवळ राहणाऱ्यांबाबत तुम्हाला असूया वाटते.

* अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याच्याकडून न मिळाल्यास तुम्हाला असुरक्षित वाटते. टेंशन येते.

* तुम्ही अस्वस्थ होता आणि कोणतीही रिस्क घ्यायला तयार असता.

पेमेंट एप्स गृहिणींसाठी सोपा मार्ग

– शैलेंद्र सिंह

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट

पेमेंट अप हे तुमच्या पर्सप्रमाणे असते. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पर्समधील पैसे खर्च करता त्याचप्रमाणे पेमेंट अॅपमध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

मध्येही पैसे ठेवून तुम्ही खर्च करू शकता.

पेमेंट अॅपचे हरवणे, खिसा कापला जाणे किंवा पर्स लुटली जाणे यापैकी कोणताच धोका नसतो. पण तरीही पेमेंट अॅपचा वापर सावधानी बाळगून करणेच गरजेचे असते.

नेहाला रेल्वे तिकीट बुक करायचे होते. तिने ते पेमेंट अॅपद्वारे बुक केले. अॅपने तिला रेल्वे तिकिटाच्या बुकिंगसाठी कॅशबॅक सुविधाही देऊ केली. त्यामुळे तिला आपल्या तिकिटावर सूटही मिळाली. अशा अॅप्समुळे छोटीमोठी प्रत्येक प्रकारची खरेदी शक्य झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठया रकमेने खरेदी होत होती. अॅप पेमेंट सिस्टीम खूप कमी वेळातच इतकी लोकप्रिय झाली की प्रत्येक लहानमोठया दुकानात ती उपलब्ध असते. भाजीच्या खरेदीपासून ते महागडी शॉपिंगही पेमेंट अॅपद्वारे होऊ लागली आहे.

नेहा म्हणते, ‘‘पेमेंट अॅपद्वारे खरेदी करणे सोपे झाले आहे. सगळयात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता सुट्टया पैशांची समस्या जाणवत नाही. शॉपिंग मॉल्सपासून प्रत्येक ठिकाणी याचा वापर केला जातो.’’

पेमेंट अॅपचा वापर

पेमेंट अॅपला डोकेदुखी समजणारी प्रेरणा म्हणते, ‘‘डेबिट कार्डमधून पेमेंट करताना भीती असायची की कुणी आपल्या खात्यातले पैसे काढून घेईल. आता पेमेंट अॅपमध्ये आपण तेवढेच पैसे ठेवतो, जितकी आपल्याला खरेदी करायची आहे. अशात पैशांचा ऑनलाइन फ्रॉड होण्याचा धोका नसतो. अॅपमधील पैसे कमी झाल्यास पुन्हा टाकता येतात.

‘‘आता सर्व ऑनलाइन झाल्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूप सोपे झाले आहे. पेमेंट अॅपचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठीच होतो. त्यामुळे ते सोपे आणि सोयीचे असते. आता वेगवेगळया प्रकारची बिले भरणे जसे की लाइट, पाणी, पेट्रोल, फोन आणि रेल्वे तिकिटांचे पैसे भरणे पेमेंट अॅप्सद्वारे केले जाते.’’

विविध प्रकारचे पेमेंट अॅप

आजच्या काळात केवळ बँक आणि मोबाइल कंपन्याच नाही तर शासनदेखील आपले विविध अॅप घेऊन आले आहेत. हे लोक आपल्या अॅपला लोकप्रिय करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना घेऊन येत आहेत. यासाठी मोबाइलवर पेमेंट अॅप डाउनलोड केले जाते. मोबाइलचा नंबर हाच पेमेंट अॅपचा नंबर असतो.

बँकेच्या खात्याप्रमाणे हे सुरू करण्यासाठी विशेष सोपस्कारही पार पाडावे लागत नाहीत. पेमेंट अॅप चालवणाऱ्या कंपन्या आपले मार्केट वाढवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचे पॅकेज जाहीर करत असतात. यामुळे ग्राहकांना कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा लाभ मिळतो.

सुविधाजनक आणि सोपे

ग्राहकांसाठीच नाही तर कंपन्यांसाठीही पेमेंट अॅपचा वापर सुलभ आणि सुविधाजनक बनला आहे. आता पेमेंट अॅपला बँकेच्या खात्याबरोबर जोडले जाते. ज्यामुळे ग्राहकांनी केलेले पेमेंट सरळ पेमेंट अॅपद्वारे कंपनीच्या खात्यात जमा होते. त्यामुळे कंपन्यांचा हा फायदा होतो की त्यांना बँकेत पैसे जमा करण्यासाठी कर्मचारी नेमण्याची आणि पैसे मोजत बसण्याची गरज भासत नाही. शासनानेही पेमेंट अॅपला सुविधाजनक आणि अधिकृत केले आहे.

नोटबंदीच्या वेळी पेमेंट अॅपमुळे ग्राहकांना खूप साहाय्य झाले. त्यांना आपल्या खर्चांसाठी कॅशच्या समस्यांना तोंड द्यावे लागले नाही. हळूहळू या चलनाचे प्रमाण वाढू लागले. आज गृहिणीदेखील मोठया संख्येने याचा वापर करू लागल्या आहेत.

 

स्मार्ट वाइफ यशस्वी करेल लाइफ

– शैलेंद्र सिंह

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील आणि भावनिक असते. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धत होती, त्यामुळे त्या काळात या नात्यात थोडे चढउतार चालून जायचे. परंतु आता एकत्र कुटुंबपद्धत संपुष्टात आल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार फक्त पती-पत्नीवरच आला आहे. अशा परिस्थितीत पत्नीने लेचेपेचे राहाणे कुटुंबासाठी योग्य नाही. आजच्या काळात पत्नीची जबाबदारी पतिपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे.

खरेतर पैसे कमावून आणण्याचे काम पतिचे असते. पैशांचा योग्यप्रकारे वापर करून घर, मुले, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे पत्नीचे काम असते. या महागाईच्या काळात स्मार्ट पत्नी ही पतिने कमावलेले पैसे साठवून ठेवण्याचे आणि पतिला बचतीच्या वेगवेगळया योजनांची माहिती देण्याचेही काम करते. आजची स्मार्ट वाइफ केवळ हाऊसवाइफ म्हणवून घेण्यातच समाधान मानत नाही तर ती चांगली हाऊस मॅनेजरही बनली आहे.

भावना आणि भूपेश लग्नानंतर त्यांचे छोटे शहर गाझापूरहून राहण्यासाठी लखनौला आले. येथे भूपेशला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. भूपेशला दरमहा १५ हजार रुपये पगार होता. त्याने दरमहा २ हजार भाडयाने फ्लॅट घेतला होता. १-२ महिन्यांनंतर भावनाला वाटू लागले की भाडयाच्या घरात राहणे योग्य नाही, पण भूपेशशी याबाबत बोलण्यास तिला संकोच वाटत होता. ती सुशिक्षित होती. त्यामुळे सरकारी योजनांतून मिळणाऱ्या घरांवर लक्ष ठेवण्यास तिने सुरुवात केली.

एका महिन्यातच भावनाला समजले की सरकारच्या गृहनिर्माण योजनेत बरीच घरे अशी आहेत, जी काही लोकांनी बुक केली होती, पण त्यांना ती खरेदी करणं शक्य झालं नाही. अशी घरे पुन्हा विकण्याची तयारी सरकार करीत होते. त्यासाठी घराच्या एकूण किंमतीच्या २५ टक्के रक्कम आधी द्यायची होती. उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये भरता येणार होती.

भावनाने याबाबत भूपेशला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘सर्वात लहान घराची किंमत ३ लाखांहून अधिक आहे. त्यानुसार आपल्याला सुरुवातीला लगेचच ७५ हजार द्यावे लागतील. त्यानंतर, दरमहा हप्ता स्वतंत्रपणे द्यावा लागेल. एवढे पैसे कुठून आणायचे?’’

यावर भावना म्हणाली, ‘‘अडचण फक्त सुरुवातीच्या ७५ हजारांची आहे. त्यानंतर मासिक हफ्ता केवळ २ हजार रुपयांच्या आसपास असेल. एवढे भाडे तर आपण आताही देतो. ७५ हजारांपैकी ५० हजारांची सोय मी करू शकते. २५ हजारांची सोय तुम्ही केली तर आपलेही या शहरात स्वत:चे घर असेल.’’

भूपेशने भावनाने सांगितलेले मान्य केले. काही दिवसांतच त्यांचे स्वत:चे घर झाले. घर थोडे व्यवस्थित केल्यानंतर ते तेथे राहू लागले.

एके दिवशी भूपेश आणि भावना एका लग्नाच्या पार्टीला गेले होते. भावनाला  दागिन्यांशिवाय तयार होताना पाहून भूपेशने विचारले की तुझे दागिने कुठे आहेत? तेव्हा भावनाने सांगितले की दागिने विकून तिने ५० हजारांची सोय केली होती. हे ऐकताच भूपेशने भावनाला जवळ घेतले. त्याला वाटले की खऱ्या अर्थाने भावनाच स्मार्ट वाइफ आहे.

बचतीमुळे सुधारते जीवन

महागाईच्या या युगात संसाराची गाडी चालवण्याची गुरुकिल्ली बचत हीच आहे. ज्या कुटुंबांमध्ये कुठून आणि कसाही पैसा येतो, त्यांनीही बचतीकडे पूर्ण लक्ष द्यायलाच हवे. एका स्मार्ट वाइफने अर्थमंत्र्यांप्रमाणे आपल्या घराचे बजेट तयार केले पाहिजे. संपूर्ण महिन्याचा खर्च एका ठिकाणी लिहिला पाहिजे, जेणेकरून महिन्याच्या शेवटी हे समजेल की महिन्यात किती खर्च झाला. यातून हेदेखील समजते की खर्च कमी करून पैसे कुठे वाचवता येतील. आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चासाठी दरमहा काही ठराविक रक्कम वाचवणे आवश्यक आहे जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या खर्चावेळी पैशांची अडचण भासणार नाही.

दरमहा ठराविक रक्कम बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे. एका वर्षानंतर ते पैसे बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करता येतील. आजकाल म्युच्युअल फंडात पैसे जमा केल्यासही चांगला परतावा मिळवता येतो. स्मार्ट वाइफ दर महिन्याच्या खर्चातून थोडे तरी पैसे वाचवून ठेवतेच.

जर पती, कुटुंब आणि मुलांचे आरोग्य चांगले असेल तर औषधांवरील खर्चही कमी होतो. हीदेखील एक प्रकारची बचत आहे. घरातील स्वच्छतेतूनही बऱ्याच रोगांना दूर ठेवले जाऊ शकते. घरासाठीची खरेदी सुज्ञपणे केली तरी बचत करता येते. एकाच वेळी सर्व खरेदी करा. सामान अशा ठिकाणाहून खरेदी करा, जिथे ते कमी किंमतीत चांगले मिळेल. आजकाल मॉल संस्कृती आल्याने बऱ्याच प्रकारचे सामान स्वस्तात मिळते.

स्मार्ट वाइफ समाजात निर्माण करते स्वत:ची ओळख

सध्या बरेच लोक शहरांमध्ये आपल्या नातेवाईकांपासून वेगळे राहतात. अशावेळी मित्रांना भेटायला त्यांच्याकडे जास्त वेळ असतो. याच लोकांमध्ये आनंद-दु:ख शेअर केले जाते. एकमेकांना भेटण्यासाठी लोक काही ना काही निमित्त करून पार्टीचे आयोजन करू लागले आहेत. येथे पत्नींमध्ये एकप्रकारची अघोषित स्पर्धा सुरू झाली आहे, ज्यामुळे एकमेकांबद्दल अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कोणाची पत्नी कशी दिसते? तिने कशाप्रकारचे कपडे परिधान केले आहेत? तिची मुले किती शिस्तबद्ध आहेत? स्मार्ट पत्नी तीच ठरते जी या सर्व प्रश्नांवर खरी उतरते.

पार्टीत कसे वागायचे हे शिकून त्याप्रमाणेच तेथे वावरावे लागते. अशा प्रकारच्या पार्टींमध्ये अनेकदा चांगले नातेसंबंध तयार होतात, जे पुढे जाण्यासाठीही मदत करतात. स्मार्ट पत्नीने खूपच सोशल राहायला हवे. बऱ्याचदा पती मनात असूनही सामाजिक नातेसंबंध चांगल्याप्रकारे निभावू शकत नाही.

स्मार्ट पत्नी ही उणीव दूर करून पतिला प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास मदत करते. स्मार्ट पत्नीने पतिचे मित्र आणि कार्यालयातील सहकाऱ्यांच्या घरगुती पाटर्यांमध्ये जाणे गरजेचे आहे. यामुळे आपापसांत चांगले संबंध निर्माण होतात. आजकाल मोबाइल, इंटरनेट व फोनद्वारे एकमेकांशी बोलणे अधिक सोपे झाले आहे. याचा फायदा करून घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस नातेसंबंधातील मर्यादेचेही भान ठेवले पाहिजे. कधीकधी नाती जुळताना कमी आणि बिघडताना अधिक दिसतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें