महिला का होतात डिप्रेस ?

* पुष्पा भाटिया

रीना आणि नरेश यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. पतिपत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. ऑफिसमधून कामासाठी दोघांनाही शहराच्या बाहेरही जावं लागतं. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते, पण गेल्या काही महिन्यांपासून रीनाला थकवा, बेचैनी आणि झोप न लागणे असे त्रास होऊ लागले.

डॉक्टरांना दाखवल्यावर समजले की रीना तणावाखाली जगत आहे. नोकरीमुळे पती पत्नी बराच वेळ वेगळे राहत असत. जोपर्यंत तिचा पती सोबत असे, सर्व काही ठीक असे. पण जेव्हा ती घरात एकटी असायची, तेव्हा तिला घरातली कामे आणि नोकरी यांच्यातील ताळमेळ बसवणे मुश्किल होऊन जायचे. तसेही रीनाला आता असेच वाटत होते की तिने आता आपले घर सांभाळावे, कुटुंब वाढवावे, पण तिच्या पतिला आणखी काही वेळ थांबायचे होते आणि याच कारणामुळे रीना तणावाखाली होती.

तणावाची कारणे

* हल्लीची दिवसरात्र होणारी धावपळ, ऑफिसला येण्याजाण्याची चिंता, मुलांचे संगोपन, त्यांच्या अभ्यासाची चिंता, कुटुंबाचे खर्च इ. काही अशी कारणे आहेत, जी पुरुषांपेक्षा महिलांना अधिक त्रास देतात. याशिवाय हार्मोन्स बॅलन्स बिघडणे(मासिक पाळीच्या आधी आणि मेनोपॉजच्या दरम्यान) ऋतू बदल हेसुद्धा एखाद्या महिलेच्या औदासीन्याचे कारण ठरू शकते.

* गर्भधारणेपासूनच महिलांच्या डोक्यात मुलगा होणार की मुलगी ही चिंता भेडसावू लागते. कुटुंबातील लोक सतत मुलगा व्हावाचा धोशा तिच्यामागे लावतात. त्यामुळे तिचा तणाव अधिकच वाढतो. खरंतर हे वैज्ञानिक सत्य आहे की मूल मुलगा असणार की मुलगी यासाठी महिलेला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. पण तरीदेखील आपल्या समाजात अशिक्षितच नाही तर सुशिक्षित लोकही मुलगी झाल्यास आईला दोषी ठरवतात.

* खरं सांगायचं तर तणावाची सुरुवात ही मुलीच्या जन्मापासूनच होते आणि तिच्या वयानुसार ती वाढतच जाते.

* चांगले शिक्षण असूनही मनासारखी नोकरी न मिळणे, नोकरी मिळाल्यास वेळेवर बढती न मिळणे, घरातील बाहेरील कामांचा ताळमेळ जमवण्यात अपयश आल्याने शिकलेल्या मुलीही तणावाखाली राहू लागल्या आहेत.

* मनोवैज्ञानिक संशोधनात असे समोर आले आहे की एखाद्या स्पर्धेत अपयश आल्यास महिला निराश होऊन फार लवकर तणावग्रस्त होतात.

* चिंता, त्रास आणि दबाव यामुळेही तणाव उत्पन्न होतो. हा काही रोग नाही. परिस्थितीबरोबर जुळवून न घेता येणे, कुटुंब, मित्र परिवार यांच्याकडून गरजेच्या वेळी मदत न मिळणे, मेनोपॉजच्या वेळी हार्मोन बॅलन्स बिघडणे यांपैकी काहीही महिलांच्या जीवनात तणावाचे कारण बनू शकते. दारू किंवा इतर काही व्यसन, आपल्या एखाद्या आजारावर योग्य उपचार न घेणे हीसुद्धा तणाव निर्माण होण्याची कारणे आहेत. अनेकदा रिटायरमेंट नंतरही महिलांमध्ये अशी परिस्थिती उद्भवते.

लक्षणे

स्मरणशक्ती कमी होणे, मळमळल्यासारखे वाटणे, श्वास घेताना त्रास होणे, भूक मंदावणे, शारीरिक क्षमता कमी होणे, कामात लक्ष न लागणे, डोकेदुखी, खूप घाम येणे, घसा कोरडा पडणे, सारखे लघवीस जाणे या लक्षणांच्या विळख्यात सापडलेल्या व्यक्ती स्वत:ला आपले कुटुंब आणि समाज यांच्यावरील ओझे समजू लागतात. ते प्रयत्न करूनही समस्येच्या मुळाशी जाऊ शकत नाहीत आणि मग ते आपला विश्वास गमावतात आणि अधिकाधिक निराशेच्या गर्तेत ओढले जातात.

तणाव कसा दूर कराल

* आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला निराशेसोबत संघर्ष करावा लागतो. जीवनाचे सार यातच आहे की आपण आपल्या समोर आलेल्या समस्यांशी दोन हात करून आपले लक्ष्य गाठण्यासाठी उत्साहाने पुढे जात राहिले पाहिजे. काम अशाप्रकारे करावे की थकण्याच्या आधीच तुम्हाला विश्रांती मिळेल. उदास किंवा थकलेले दिसणे एखाद्या व्यक्तित तणाव किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करते.

* चांगली झोप न मिळाल्याने फार नुकसान होते. गाढ झोपेसाठी संगीत ऐकणे फायेदशीर ठरते. झोपण्याआधी वाचन करणे हीसुद्धा एक चांगली सवय आहे.

* अति प्रमाणात निराशाच्या हीनभावनेस कारणीभूत ठरते. आपले विचार सकारात्मक ठेवा. जे तुमच्याकडे नाही किंवा जी गोष्ट तुमच्या हातात नाही त्यासाठी चिंता करत बसू नका. जे तुमच्यापाशी आहे त्यात सुखी रहा.

* आपल्या आहाराविहारावर लक्ष देणेही फार महत्त्वाचे आहे. फळ आणि भाज्या यांच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मेनोपॉजच्या काळात महिलांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊ लागते. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आपल्या आहारात समाविष्ट करायला विसरू नका. दररोज व्यायाम करण्याची सवय करून घ्या.

डोळ्यांचे किडणी कनेक्शन

– डॉ. पीएन गुप्ता, चीफ नॅफ्रोलॉजी, पारस हॉस्पिटल, गुरुग्राम

डोळा हा शरीरातील सर्वात नाजूक हिस्सा असतो. त्यांचे आरोग्य हे आपली लाइफस्टाइल आणि आरोग्यावर अवलंबून असते. क्रॉनिक किडणी डिसीज, हायपरटेंशन, डायबिटीस यासारख्या अनेक आजारांचा संबंध आपल्या दृष्टीशी असतो.

किडणीचे आजार आणि डोळे

किडणी फेल्युअरमुळे दृष्टी धूसर होऊ शकते. असे झाल्यास डोळयांच्या डॉक्टरना दाखवून औषधे घेतली पाहिजेत आणि चष्मा लावण्याविषयी विचारले पाहिजे.

जर किडणीच्या आजाराचा इलाज केला गेला नाही तर पूर्ण अंधत्वही येऊ शकते. जरी हे किडणीच्या आजाराच्या लास्ट स्टेजला होत असले तरी या प्रकारची परिस्थिती उद्भवू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली पाहिजे.

किडणीच्या आजाराची लक्षणे

किडणीचे आजार काही एकाएकी उत्पन्न होत नाहीत. दीर्घकालीन चुकीच्या लाइफस्टाइलचा हा परिणाम असतो. किडणीच्या आजारांपासून बचाव करण्याची उत्तम पद्धत म्हणजे लक्षणांवर नजर ठेवून वेळीच इलाज करवून घेणे. किडणीच्या आजाराची काही सामान्य लक्षणे पुढे दिली आहेत :

थकवा : व्यवस्थित खाणेपिणे असूनही जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्हाला किडणीच्या समस्येचा धोका असू शकतो. जर किडणी योग्यरीतीने कार्य करत नसेल तर रक्तात असंख्य टॉक्सिन्स तयार होतात. ज्यामुळे आपल्याला सारखा थकवा जाणवतो.

झोपेच्या समस्या : शरीरात असलेले टॉक्सिन्स किडणीच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम करतात. यामुळे शरीरातून मूत्राद्वारे उत्सर्जित होणारे टॉक्सिन्स शरीरातच राहतात आणि मग झोपेच्या समस्या उद्भवतात.

मूत्रसंबंधी समस्या : किडणीच्या समस्येचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे थोडया थोडया वेळाने लघवीला होणे. जर तुम्हाला दिवसातून बऱ्याचदा लघवीकरता जावे लागत असेल तर हीच डॉक्टरांना भेटण्याची योग्य वेळ आहे असे समजावे. किडण्या माणसाच्या शरीरातील मूत्र प्रक्रियेला नियंत्रित करतात. जर यात काही समस्या निर्माण झाली तर मूत्राच्या सवयीही बदलतात.

मूत्राच्या टेक्श्चर, रंग, गंध इ. मध्ये झालेले बदल हे निश्चितच किडणीच्या समस्येशी निगडित असू शकतात. जर तुम्हाला लघवी करताना खूप बुडबुडे दिसले तर त्वरित डॉक्टरकडे जा.

पायावर सूज : जर एखादी किडणी योग्यप्रकारे काम करत नसेल तर शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू लागते. यामुळे पाय, घोटा यावर सूज येऊ शकते. असेही जर तुम्हाला तुमच्या चपला, बूट घट्ट होऊ लागले तर समजावे की किडणीची काही तरी समस्या असू शकते.

डोळे आणि त्वचेला खाज : आपल्या शरीरात खनिजांचे योग्य प्रमाण राखण्याचे कामही किडणी करत असते. जेव्हा किडणीत काही समस्या उद्भवते तेव्हा या प्रक्रियेवरही परिणाम होऊ लागतो. ज्यामुळे डोळयांसहित संपूर्ण शरीरभर खाज येऊ लागते.

डोळे लाल होणे : डोळे लाल होण्याचे सर्वसाधारण कारण आहे अॅलर्जी आणि इन्फेक्शन, पण किडणीची काही समस्या असल्यासही डोळे लाल होणे, सतत हलकेच दुखणे असे होऊ शकते.

डोळे रुक्ष होणे : हा एक क्रॉनिक सिंड्रोम आहे. जो कालपरत्वे अधिक जोमाने वर येतो. तुम्ही डोळे जेवढे अधिक रगडाल तेवढे ते अधिक रुक्ष होतील. रुक्ष डोळे चांगल्याप्रकारे काम करू शकत नाहीत, यामुळे नीट दिसतही नाही. किडणीची काही समस्या असल्यास डोळयात खूप कॅल्शिअम आणि फॉस्फेट जमा होऊ लागते. यामुळे डोळे अधिकच रुक्ष होतात. ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

डोळयांची जखम : डोळयांची जखम हा एक वेदनेचा सिंड्रोम आहे. याची अनेक कारणे असू शकतात, ज्यातील एक किडणीचा आजारही आहे. जर तुम्हाला डोळयात सारखी जखम होत असेल तर अवश्य डॉक्टरना भेटा. जखमेमुळे डोळे लाल होऊ शकतात आणि डोळयात खाजही येऊ शकते. यामुळे डोळयाच्या कॉर्निया, कंजंक्टिवा आणि स्लेअर म्हणजे सफेद भागाचे नुकसानही होऊ शकते.

रेटिनोपॅथी : हासुद्धा एक डोळयांचा आजार आहे, जो किडणीच्या समस्येमुळे होऊ शकतो. या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे दृष्टी अधू होऊ लागणे.

या सर्व लक्षणांवर लक्ष द्या जेणेकरून किडणी आणि डोळयांच्या समस्या वेळीच ओळखून त्यावर इलाज करणे शक्य होईल. लक्षात ठेवा हेल्दी लाइफ इज हॅप्पी लाइफ.

असा द्या नवजात बाळाला ममतेचा कोमल स्पर्श

* चाईल्ड स्पेशालिस्ट शालू जैन यांच्यासोबत शिखा जैन यांनी साधलेल्या संवादावर आधारित

बाळ लहान असेल आणि रडत असेल तर आईला हे समजून घेणे खूपच कठीण जाते की, त्याला नेमके काय हवे आहे. अशा परिस्थितीत अस्वस्थ होण्याऐवजी आईला हे स्वत:लाच समजून घ्यावे लागते की, बाळाला कोणत्या वेळी काय हवे असते. मात्र यासाठी तिच्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे, जेणेकरुन मुलाचे संगोपन चांगल्या प्रकारे होऊ शकेल. बाळाच्या बाबतीत आईमध्ये कशाप्रकारचा आत्मविश्वास हवा, हे समजू घेऊया :

अंघोळ घालणे

बऱ्याच माता पहिल्यांदा बाळाला अंघोळ घालायला घाबरतात, परंतु पुरेशी खबरदारी घेतल्यास आणि बाळाला अंघोळ घालण्याची योग्य पद्धत समजून घेतल्यास त्याला अंघोळ घालणे तितकेसे अवघड नाही. चला, बाळाला अंघोळ कशी घालायची, याची माहिती करुन घेऊया :

* बाळाला टबमध्ये अंघोळ घालणे सोयीचे ठरते. फक्त याकडे लक्ष द्या की, टब खूप खोलगट नसेल.

* बाळाला नेहमी कोमट पाण्यानेच अंघोळ घाला. पाणी किती कोमट आहे, हे तपासण्यासाठी तुमच्या हाताचा कोपर पाण्यात घाला. जर पाणी गरम वाटत नसेल तर तुम्ही बाळाला त्या पाण्याने अंघोळ घालू शकता.

* सर्वप्रथम बाळावर थोडेथोडे पाणी शिंपडल्यासारखे करा. त्याच्या अंगावर एकदम पाणी ओतू नका. हळूहळू ओता.

* बाळाच्या डोक्यावर कधीही पाण्याची सरळ धार सोडू नका. यामुळे त्याला दुखापत होऊ शकते.

* अंघोळ घालून झाल्यानंतर बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळा, त्यानंतर लोशन लावा.

बाळाचे खूप जास्त रडणे.

बऱ्याच वेळा जेव्हा लहान मुले रडायला सुरवात करतात तेव्हा ती काहीही करुन शांत व्हायचे नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत बऱ्याच माता अस्वस्थ होतात. अशावेळी त्या त्यांच्या नातेवाईकांना बाळाला रडण्यापासून थांबवण्यासाठी काय करायला हवे, असे विचारतात. बाळ जर ३ महिन्यांपेक्षा लहान असेल तर, काही वेळा तो कारण नसतानाही रडू शकतो. अशावेळी त्याला मांडीवर घेतल्यामुळे त्याला बरे वाटेल आणि तो शांत होईल. परंतु मांडीवर घेऊनही तो शांत होत नसेल तर त्याला भूक लागणे, डायपर खराब होणे यासारखे त्रासही होत असण्याची शक्यता असते.

अनेकदा भूक लागल्यावरही बाळ रडू लागते. त्याला खायला भरवल्यानंतर काही वेळातच तो पुन्हा रडू लागतो, कारण त्याचे पोट खूपच लहान असते. त्याला थोडया थोडया वेळानंतर भूक लागू शकते. म्हणून त्याच्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या.

याव्यतिरिक्त या गोष्टींचाही विचार करा :

* बाळाचे डायपर पूर्ण भरते तेव्हा ते ओले होते. त्यामुळे बाळाची झोप उडते आणि ते रडू लागते. ओल्या डायपरमध्ये बाळाला खूपच अस्वस्थ वाटते, म्हणून अधूनमधून त्याचा डायपर तपासा आणि बदलत रहा. तो बदलल्यानंतर बाळ शांत होईल

* कधीकधी खराब डायपरमुळे, बाळाच्या त्वचेवर पुरळ उठते, ज्यामुळे त्याला दुखू लागते आणि खाजही सुटते. यामुळे तर बाळ रडत नाही ना, हेही तपासा.

* बऱ्याचदा बाळाला कंटाळा येतो आणि त्याला आईच्या मांडीची ऊब हवीहवीशी वाटते. त्यासाठीही तो रडू लागतो. अशावेळी त्याला प्रेमाने मांडीवर घ्या आणि डोक्यावरुन हात फिरवत रहा. यामुळे. त्याला शांत वाटेल आणि तो रडायचे थांबेल.

बाळाचे रात्रभर जागे राहणे

नवजात बाळ अनेकदा दिवसा झोपून काढते आणि रात्री जागे राहते. बऱ्याचदा दिवसा जागे राहूनही ते रात्री झोपत नाही. अशावेळी आईवडिलांनाही त्यांच्याबरोबर जागे रहावे लागते, जे अत्यंत त्रासदायक ठरते. बाळाला भूक लागली असेल किंवा त्याला काही हवे असेल तरीही ते झोपत नाही आणि रात्रभर जागे राहते.

अशा परिस्थितीत या गोष्टींकडे लक्ष द्या

बाळाला रात्री अनेकदा उठून दूध पाजावे लागते, कारण बाळ फक्त थोडेच दूध पिते, म्हणून त्याला थोडया थोडया वेळाने दूध पाजा. ब्रेस्टपंपाच्या मदतीने, आपले दूध काढून ठेवा आणि वेळोवेळी बाळाला प्यायला द्या, जेणेकरून तुम्हालाही आराम मिळेल आणि बाळही उपाशी राहणार नाही.

* बाळाला जर एखादे खेळणे किंवा चादर घेऊन झोपायची सवय असेल तर ती वस्तू मिळेपर्यंत ते जागत राहते.

* बाळाची दररोजची झोपेची वेळ ठरवून ठेवा व त्याला त्याचवेळी झोपवा.

* तुमच्या सवडीनुसार त्याला झोपवायचा प्रयत्न करू नका. यामुळे त्याला झोप येणार नाही

खेळणीही असावीत खास

बाळाच्या जन्मानंतर, आईवडिलांसह नातेवाईकांकडूनही भेटवस्तूंच्या रुपात बाळाला भरपूर खेळणी मिळतात. बाळाची संपूर्ण खोली खेळण्यांनी भरुन जाते, त्यातील काही खूपच आकर्षक तर काही उपयोगाची नसतात. अशावेळी आईला माहीत असते किंवा तिला ते माहिती असायलाच हवे की, आपल्या बाळासाठी कोणते खेळणे योग्य आहे.

* बाळाच्या पाळण्यावर रंगीबेरंगी अस्वल, हत्ती, लहान घोडे टांगलेले झुंबर लावणे चांगले असते. त्याच्याकडे पाहून बाळाला गंमत वाटते. आनंद होतो. शिवाय त्याकडे बघून बाळ एकाग्रतेने पहायलाही शिकते. हुशार माता पाळण्यावर असे झुंबर लटकवतातच.

याव्यतिरिक्त, मुलांच्या वयानुसार अनेक खेळणी बाजारात उपलब्ध आहेत. परंतु जे कोणते खेळणे खरेदी कराल ते मऊ असावे, त्याचे कोपरे उघडलेले किंवा कडक नसावेत. ते मुलायम कपडयाने तयार केलेले असावे, ज्यामुळे बाळ त्या खेळण्यासोबत आनंदाने खेळू शकेल.

याकडे विशेष लक्ष द्या

बाळाने अन्न ओकून टाकणे : जन्मल्यानंतर ३ महिन्यांपर्यंत बाळाची लाळ गळत राहते. विशेषत: जेव्हा त्यांना काही भरवले जाते तेव्हा ते पटकन खाल्लेले ओकून टाकतात किंवा उलटी करतात. त्यामुळे आई घाबरुन जाते. यासाठी बाळाची नव्हे तर आईने स्वत:च्या सवयी बदलायला हव्यात. जसे की दूध पाजल्यानंतर लगेचच काही माता बाळासोबत खेळायला लागतात, त्यांना वर उचलून धरतात, यामुळे बाळ प्यायलले दूध ओकून टाकते. म्हणूनच दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन त्याला ढेकर येईल, असा प्रयत्न करा, जेणेकरून प्यायलेले दूध त्याला पचेल आणि ते तो ओकून टाकणार नाही.

* अनेकदा थंड दूध भरवल्यामुळेही बाळ ते ओकून टाकतो, कारण त्याला थंड दूध आवडत नाही.

मुलांना घामोळे आल्यास : उन्हाळयात मुलांना बऱ्याचदा उष्णता, घामामुळे पुरळ, घामोळे येते. परंतु थोडीशी काळजी घेतल्यास घामोळे येणार नाही. जसे की :

* बाळाला विविध प्रकारची टॅल्कम पावडर लागू नका. फक्त तांदळाच्या स्टार्चपासून तयार केलेली बेबी पावडरच वापरा, जेणेकरून त्याला पुरळ, घामोळे येणार नाही.

* घामोळे आलेली जागा दिवसातून २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा किंवा स्पंज करा.

मालिश करताना असावा आत्मविश्वास : आत्मविश्वास असलेल्या माता न घाबरता आपल्या नाजूक बाळाची मालीश योग्य पद्धतीने स्टेप बाय स्टेप करतात. जसे की :

* मालिश करताना बाळाच्या पायांपासून सुरुवात करा. त्यासाठी आपल्या हातांना तेल चोळा आणि आपल्या बाळाच्या मांडीवर त्याने मालीश करत खाली त्याच्या पायापर्यंत मालीश करा.

* बाळाचे हात, छाती आणि पाठीची मालिश करा.

* मालिश करताना बाळ रडू लागल्यास त्याला उचलून घेऊन गप्प करा.

* बाळाची मालीश त्याने दूध प्यायल्यानंतर किंवा झोपायच्या वेळी करा.

तर येईल गाढ झोप

* गरिमा

जीवनाच्या धावपळीत दिवसभर थकलेली व्यक्ती जेव्हा रात्री अंथरुणावर पडते, तेव्हा तिला सुखद गाढ झोपेची अपेक्षा असते. गाढ आणि आरामदायक झोप दिवसभराचा थकवा दूर करून शरीरात नवीन उत्साह भरते.

एका निरोगी माणसासाठी ५-६ तासांची झोप पुरेशी आहे,  तर लहान मुलांसाठी १०-१२ तासांची झोप पुरेशी असते. प्रौढांसाठी ४-५ तासांची झोप पुरेशी असते.

रात्री चांगली झोप न आल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, घोरणे, चिडचिडेपणा आणि एकाग्रतेत कमतरता, निर्णय घेण्यात अडचण, पोटात गडबड, उदासी, थकवा यासारख्या समस्या डोके वर काढतात.

झोप न येण्याची कारणे

झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदा. चिंता, तणाव, निराशा, रोजगाराशी संबंधित समस्या, मानसिक आणि भावनात्मक असुरक्षा वगैरे.

याबरोबरच निश्चित वेळी न झोपणे, चहा किंवा कॉफीचं जास्त सेवन, एखादा त्रास किंवा आजार, उशिरा जेवणे किंवा उपाशी झोपणे, रात्री उशिरापर्यंत टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल फोनला चिकटून राहणे, दिवसभर काही काम न करणे इ. कारणेही अनिद्रेची कारणे बनू शकतात.

कशी येईल सुखद झो

* ज्यांना दिवसभर पुन्हा-पुन्हा चहा किंवा कॉफी प्यायची सवय असते, ते रात्री लवकर झोपत नाहीत. चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफेन झोपेत बाधा निर्माण करतं. म्हणूनच खास करून झोपण्याच्या अगदी आधी त्यांचे सेवन टाळले पाहिजे.

* आपण जर मानसिकरीत्या एखाद्या गोष्टीवरून काळजीत असाल आणि काही निर्णय घेऊ शकत नसाल, तरीही आपल्या झोपेत बाधा येऊ शकते.

* आपण जर झोपण्याचा प्रयत्न करत असाल, पण झोप येत नसेल, तर उठून थोडा वेळ टीव्ही पाहा. एखादे आवडते पुस्तक वाचा किंवा मग हलके संगीत ऐका. त्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.

* झोपण्यापूर्वी थोड्या वेळासाठी आपले मन एखाद्या खास गोष्टीवर केंद्रित करा. त्यामुळे मनाची चंचलता कमी होईल आणि आपल्याला चांगली झोप येईल.

* रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ फेरफटका मारला पाहिजे. त्यामुळे पचनशक्ती चांगली राहते आणि झोपही आरामदायक येते. डिनरमध्ये जड आहार टाळला पाहिजे.

* जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. झोपण्याच्या ३ तास आधी जेवण घ्या.

* झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने गाढ झोप येते.

* झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित ठेवा. रोज एकाच वेळी झोपल्याने गाढ झोप लागते.

* झोपताना नेहमी सैल कपडे घातले पाहिजेत.

* रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्याने चांगली झोप येते.

* झोपताना खोलीत हलका प्रकाश असला पाहिजे.

* दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करावे लागते, त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी होते. त्यामुळे रोज व्यायाम जरूर करा. व्यायाम केल्याने वेदना दूर होतील आणि गाढ झोपही येईल.

या टीप्स आजमावल्यानंतरही झोपेची समस्या जशीच्या तशी राहिली, तर डॉक्टरांना भेटा आणि अनिद्रेच्या समस्येवर उपाय करा.

कसे पाणी पिता आपण?

* डॉ. आरएसके सिन्हा, इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

स्वच्छ पाणी प्रत्येक व्यक्तिची मुलभूत गरज आहे. प्रदूषित पाणी खूप घातक ठरू शकते. स्वच्छ पाण्याला युनायटेड नेशन्सद्वारे मनुष्याची मुलभूत गरज मानले गेले आहे. तरीही जगभरात जवळपास १.८ मिलियन लोक प्रदूषित पाण्यामुळे मरतात.

पाण्याबाबत चार महत्त्वपूर्ण गोष्टी

प्रमाण : प्रत्येक व्यक्तिला रोज पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, सॅनिटेशन आणि हायजिनसाठी २० ते ५० लीटर पाण्याची आवश्यकता असते.

विश्वसनीयता : पाण्याची उपलब्धता विश्वासार्ह असली पाहिजे. मोसम मग कुठलाही असो, व्यक्तिला प्रत्येक स्थितीत पाणी मिळाले पाहिजे. जर पाण्याचा स्त्रोत विश्वासार्ह नसेल किंवा मोसमी असेल, तर याचा परिणाम व्यक्तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर पडतो.

गुणवत्ता : पाण्याच्या वितरणासाठी उचित आणि विश्वासार्ह प्रणाली असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल मिळेल.

खर्च : स्वच्छ पाण्याचा विश्वसनीय स्त्रोतही महत्त्वाचा ठरला नसता, जर व्यक्तिला ते मिळाले नसते. यात पैसे आणि वेळ दोहोंचा प्रश्न आहे.

स्वच्छ पाणी यासाठीच आवश्यक

स्वच्छ पाणी पोषण देते : मनुष्याचे शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले असते. त्याने पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून त्याचे शरीर सर्व काम सुरळीत करत राहील. त्याबरोबरच पाणी तोंडाची स्वच्छता करण्यासाठीही आवश्यक आहे. ते रक्ताची तरलता सुरळीत ठेवण्यास मदत करते. रक्ताच्या माध्यमातून पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत पोहोचवते.

विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते : स्वच्छ व ताजे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. मग ते विषारी पदार्थ शरीरात बनलेले असो किंवा बाहेरून शरीरात प्रवेश केलेले असो अथवा प्रदूषित पाण्यासोबत शरीरात प्रवेश केलेले असो.

शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राखते : स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यायल्याने शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राहते. ते अन्न पचवण्यास ते शरीरात शोषून घेण्यास मदत करते. शरीराचे तापमान सामान्य ठेवून त्याला आरोग्यदायी बनवते.

पेशींना ऊर्जा देते : जेव्हा पेशींना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही, तेव्हा त्यांच्यात वेदना आणि जखडलेपणा सुरू होतो. त्यामुळे पेशींना निरोगी बनवण्यासाठी पाणी खूप आवश्यक आहे.

पाणी मूत्रपिंडांसाठी खूप आवश्यक : जर व्यक्ती पुरेशा प्रमाणात पाणी पित नसेल, तर त्याच्या किडनीमध्ये मूतखडा आणि संक्रमणाची शक्यता वाढते. विशेषत: गरम वातावरणात. याबरोबरच पाणी केस, त्वचा आणि नखांना निरोगी राखण्यास मदत करते. पाण्याने पसरणारे बहुतेक आजार प्रदूषित किंवा घाणेरड्या पाण्याने होतात.

अस्वच्छ पाण्याने होणारे १० आजार

डिसेंट्री : या आजाराची अनेक लक्षणे आहेत- उलटी येणे, पोटात मुरड आणि गंभीर डायरिया. अक्यूट डिसेंट्रीप्रकरणी व्यक्तिला ताप येऊ शकतो आणि मलाबरोबर रक्तही पडू शकते.

डायरिया : डायरिया घाणेरड्या पाण्याने होणारा सर्वात सामान्य आजार आहे. हा बहुतेकदा पाण्याने पसरणाऱ्या वायरसने होतो. याचे मुख्य लक्षण आहे, पातळ आणि पाण्यासारखी मलप्रवृत्ती. त्यामुळे व्यक्तिला डिहायड्रेशन होऊ शकते. नवजात आणि लहान मुलांना तर मृत्यूही येऊ शकतो.

कॉलरा : हा बॅक्टेरियाने होणारा आजार आहे. त्यामुळे व्यक्ती गंभीर डिहायड्रेशन आणि डायरियाने पीडित होतो. जे लोक आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवत नाहीत, त्यांच्यात याची शक्यता जास्त असते. पाण्यासारखे शौचास झाल्यास शरीरातून तरल पदार्थ आणि इलेक्ट्रोलाईट निघून जातात आणि रुग्ण गंभीर डिहायड्रेशनचा शिकार होतो. काही वेळा गंभीर डायरियाच याचे मुख्य लक्षण असते.

टाइफाइड : भोजन आणि पाण्यात असलेल्या बॅक्टेरियामुळे टाइफाइड होतो. ज्या ठिकाणी सॅनिटेशन सुविधा नसतात, त्या ठिकाणांवर हा सहजपणे पसरतो. अति ताप, पोटदुखी, डोकेदुखी, रॅशेस, पेशींमध्ये कमकुवतपणा याची मुख्य लक्षणे आहेत. काही गंभीर प्रकरणात इंटरनल ब्लीडिंगही होऊ शकते.

हॅपिटाइटिस ए : शौचालयांतून येणाऱ्या पाण्यामुळे हॅपिटाइटिस ए सहजपणे पसरतो. सॅनिटेशन म्हणजेच साफसफाई न ठेवल्यास हा आजार सहजपणे पसरतो. या आजाराची लक्षणे आहेत – ताप, थकवा, डायरिया, उलटी, भूक न लागणे, कावीळ इ. गंभीर प्रकरणी लिव्हर फेल्योरही होऊ शकते.

हुकवर्म (जंत) : हुकवर्म असे परजीवी आहेत, जे मलाच्या माध्यमातून पसरतात. अर्थात, हे पाण्याच्या माध्यमातून आपला नवीन होस्ट शोधतात. जर व्यक्तिने हुकवर्मचा लार्वा गिळला, तरी हा आजार होऊ शकतो. पोटदुखी, जखडलेपणा, ताप, भूक न लागणे, रॅशेस, मलातून रक्त जाणे इ. याची लक्षणे आहेत.

स्टमकफ्लू : हा असा आजार आहे, ज्यामुळे पोट आणि आतड्यांत जळजळ आणि सूज येते. हा बॅक्टेरिया किंवा वायरसने पसरतो. याची मुख्य लक्षणं आहेत – डायरिया आणि उलटी. हा आजार सर्व वयाच्या लोकांना होतो. लहान मुलांमध्ये तर खूप सामान्य आहे.

पोलिओ : पोलियोमाइलिटिसला सामान्यपणे पोलिओ म्हटले जाते. हे अक्यूट व्हायरल संक्रमण आहे, जे प्रदूषित पाण्याने पसरते. हा शरीराच्या केंद्रीय तंत्रिकातंत्रावर परिणाम करतो. याची मुख्य लक्षणे आहेत – ताप, डोकेदुखी, चक्कर येणे इ. शेवटी रुग्ण पॅरालाइसिसचा शिकार होतो.

लॅड पॉइजनिंग : लॅड पॉइजनिंग लॅडयुक्त पाणी प्यायल्याने होते. असे पाणी नेहमी जुन्या पाइपातील दूषित पाण्यामार्फत मिसळते. हा आजार मुलांसाठी खूप घातक आहे. हा अनेक समस्यांचे कारण बनू शकतो. उदा. अवयव क्षतिग्रस्त होणे, तंत्रिकातंत्रावर वाईट परिणाम, रक्ताची कमी, हाय ब्लडप्रेशर, किडनी रोग इ.

ई कोलाई : लहान मुले आणि वयस्करांमध्ये याच्या संक्रमणाची शक्यता अधिक वाढते. जर मांस चांगल्याप्रकारे शिजले नसेल, तर हा विना पाश्चयुरिकृत उत्पादनाच्या सेवनाने याची शक्यता वाढते. पाण्यासारखे मल, मलातून रक्त येणे, पोटदुखी आणि जखडलेपणा याची मुख्य लक्षणे आहेत. मलातून रक्त येणे असे लक्षण आहे, ज्यात व्यक्तिने लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

चुकीच्या पद्धतीने तर ब्रश करत नाही तुम्ही?

* प्रतिनिधी

जर योग्य पद्धतीने ब्रश केलं नाही तर दातांमध्ये किड, पायरिया इ. समस्या उद्भवू शकतात. म्हणून ब्रश करताना सावधगिरी बाळगावी आणि यात हलगर्जीपणा करू नये. डेंटिस्ट असेही सुचवतात की योग्य पद्धतीने ब्रश केल्यानेच दातांच्या समस्येपासून बचाव करता येऊ शकतो. योग्य पद्धतीने ब्रश करण्याची सवय लावून घ्या आणि दातांना आजारांपासून वाचवा.

योग्य ब्रशचा वापर

ब्रशची निवड करताना नेहमी काळजी घ्यावी. ब्रशचा आकार लहान आणि मोठा असता कामा नये. ब्रश मध्यम आकाराचा वापरावा. मोठा ब्रश आतपर्यंत नीट पोहोचणार नाही आणि लहान ब्रश पकडण्यातही सहजता असावी. त्याची पकडही योग्य असावी. ब्रिटिश सेंदूल हेल्थ फाऊंडेशन मुलायम ब्रश वापरण्याचा सल्ला देतात.

ब्रशच्या चुकीच्या सवयी

एका दिवसात दोनदा ब्रश करण्याचा सल्लासुद्धा तज्ज्ञ देतात. पण तुम्हाला जर दात आणि हिरड्या निरोगी ठेवायच्या असतील तर कुठलेही गोड पेय प्यायल्यानंतर तोंड स्वच्छ करावे. तसेच दिवसातून ३ किंवा ४ वेळा ब्रश करणेही टाळावे. सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ब्रश करणंच दातांचं आरोग्य कायम राखण्यासाठी पुरेसे आहे. आरामशीर २ किंवा ३ मिनिटे ब्रश करणेच पुरेसे आहे.

दातांची खोलवर स्वच्छता

काही लोक ब्रश करताना फक्त बाहेरील दातांचीच स्वच्छता करतात. प्लेकसारख्या समस्या दातांच्या आतल्या थरापासून सुरू होते. म्हणून दातांची स्वच्छता करताना आतूनही दात स्वच्छ करावेत.

ब्रश स्वच्छ ठेवा

जर तुम्ही बाथरूममध्ये ब्रश ठेवत असाल तर त्या जागी ओलावा असल्याने तिथे किटाणू जमा होऊ लागतात. म्हणून ब्रश कोरड्या जागीच ठेवा. जर ब्रशला कव्हर असेल तर ते नक्की लावा. ब्रश करण्याआधी आणि ब्रश केल्यानंतर ब्रश जरूर स्वच्छ करा.

ब्रश न बदलणे

प्रत्येक डेंटल असोसिएशन हाच सल्ला देते की स्वत: चा ब्रश दर ३ महिन्यांच्या अंतराने बदलावा. कारण ३ महिन्यांनंतर ब्रशचे ब्रिस्टल्स तुटू लागतात. अशावेळी तुम्ही ब्रश बदलला पाहिजे.

दातांना आजारांपासून वाचवण्यासाठी योग्यप्रकारे ब्रश करण्याबरोबरच त्याचा योग्य वापर कसा करावा हेही जाणून घ्या. असे केल्याने तुमचे दात स्वस्छ आणि मजबूत राहण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतर वजन कमी करावे असे

* डॉ. रिनू जैन, कन्सल्टंट ओब्स्टेट्रिक्स अँड गायनाकोलॉजिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

मुल जन्माला घातले की महिलांसमोर मोठे आव्हान असते ते आपले वजन कमी करण्याचे. गर्भावस्थेत पोट आणि कंबरेचा आकार वाढतो. प्रसूतीनंतर पूर्वीसारखा आकार मिळवण्यासाठी महिलांना खूप मेहनत घ्यावी लागते.

प्रसूतीनंतर ३-६ महिन्यांनी स्त्रिया व्यायाम करू शकतात. पण जोवर मूल अंगावर दूध पित असते, तोवर तिने वेटलिफ्टिंग व पुशअप्स करू नयेत, तिने कोणत्याही प्रकारचे डाएटिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

स्तनपान : मुलाला दूध पाजले की वजन सहज कमी होते, कारण शरीरात दूध तयार होत असताना कॅलरीज बर्न होतात. हेच कारण आहे की ज्या महिला बाळाला दूध पाजतात, त्यांचे वजन लवकरकमी होते.

योग्य प्रमाणात पाणी पिणे : जर तुम्हाला तुमची कंबर पूर्वीसारखी कमनीय बघायची असेल तर रोज कमीतकमी ३ लिटर पाणी प्यायला हवे. पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि शरीरातील द्रव्यांचे संतुलन कायम राहते. याशिवाय पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी घटते.

कोमट पाण्यात लिंबाचा रस  व मध एकत्र करून पिणे : रोज सकाळी रिकाम्या पोटी हे प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील आणि फॅट बर्न होतात. दर वेळी जेवणाआधी याचे सेवन करू शकता. असे केल्यास पचन नीट राहिल व फॅट लवकर बर्न होते.

ग्रीन टी प्या : ग्रीन टीमध्ये अनेक असे घटक असतात, जे बर्निंग प्रक्रियेला जलद करतात. यात असलेले प्रमुख घटक अँटीऑक्सिडंट असतात, जे मेटाबोलिझमला जलद करतात. म्हणून दूध टाकलेला चहा घेण्याऐवजी ग्रीन टी घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. हा आरोग्यासाठीही उपयुक्त असतो, शिवाय यामुळे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते.

आरोग्यवर्धक चांगले असे खाद्यपदार्थ निवडा : प्रक्रिया केलेले अन्न खाणे. जास्त कॅलरीज असलेल्या अन्नाचे सेवन करू नका जसे कँडी, चॉकलेट, बेक केलेले पदार्थ जसे बिस्किटं, केक, फास्ट फूड व तळलेले पदार्थ जसे फ्राईड मतं आणि चिकन नगेट्स. प्रक्रिया केलेल्या अन्नात सर्वात जास्त कॅलरीज व साखर असते. जे वजन वाढवतात. अशा आहारात योग्य पौष्टिक घटक कमी असतात. याऐवजी आरोग्यास उत्तम असे पर्याय निवडा. उदा, त्या ऋतूतील फळं, सलाड, घरी तयार केलेलं सूप व फळांचे रस इत्यादी

या घरगुती उपायांशिवाय भरपूर प्रमाणात भाज्या फळांचे सेवन केल्याने पोटावरची चरबी कमी होते. जर तुम्ही बाळाला दूध पाजत असाल तर तुम्ही रोज १८०० ते २२०० कॅलरीजचं सेवन करायला हवं, जेणेकरून तुमच्या बाळाला उत्तम पोषण मिळू शकेल.

जर तुम्ही स्तनपान करत नसाल तर कमीतकमी १२०० कॅलरीजचं सेवन करायला हवं. दिवसातून कमीतकमी ३ वेळा कॅलरीयुक्त पदार्थांचं सेवन करायला हवं. यासाठी तुम्ही प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी नैसर्गिक पदार्थ निवडायला हवे.

नैसर्गिक नाश्ता निवडा जसे ओट्स, दलिया किंवा अंडयातील पांढऱ्या भागाचे आम्लेट. दुपारच्या जेवणात कडधान्याची पोळी, बेक्ड चिकन किंवा कॉटेज चीज हिरवे सॅलड व फळं. रात्रीच्या जेवणात तुमची प्लेट अर्धा प्लेट फळं व भाज्या यांनी भरलेली असायला हवी. उरलेल्या पाव प्लेटमध्ये कडधान्य आणि प्रथिने असावीत. चांगल्या आहारासोबतच नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

जेवणानंतर जलद चाला : जेवणानंतर रोज २० मिनिटं जलद चाला. यामुळे पोटावरची चरबी कमी होईल. हे गरजेपेक्षा जास्त करू नका. मुलाला स्ट्रॉलरमध्ये सोबत घेऊनही चालू शकता. हा व्यायाम करण्याचा सर्वात छान उपाय आहे.

अॅब्ज क्रँच : पोटावरची चरबी कमी करण्याचा हा सर्वात उत्तम उपाय आहे. यामुळे पोटावरील पेशींमधील कॅलरीज बर्न होतात व पोटावरील चरबी कमी होऊ लागते.

लोअर अबडॉमिनल स्लाईड : हा व्यायाम मुलाच्या जन्मानंतर आईसाठी चांगला असतो. विशेषत: बाळाचा जन्म सीसेक्शन पद्धतीने झाला असेल तर. कारण सर्जरीनंतर ओटीपोटातील पेशींवर परिणाम होतो. हा व्यायाम या पेशींवर काम करतो. पाठीवर झोपा, पाय जमिनीवर पसरवा. हात सरळ बाजूला ठेवा व पंजे खालच्या दिशेला असावे. आपल्या पोटाच्या पेशींना आकुंचित करून आपला उजवा पाय बाहेर आणा. मग हा पाय सरळ करून डाव्या पायाच्या बाबतीत असेच करा. दोन्ही पायांच्या बाबतीत ५-५ वेळा असे करा.

पेल्विक टिल्ट : आपल्या पोटाच्या पेशींना आकुंचित करा. असे करताना आपल्या कंबरेला समोरच्या बाजूला वाका. असे तुम्ही झोपून, उभे राहून अथवा बसूनही करू शकता. हे रोज तुम्ही जितके वेळा करू शकत असाल तेवढे करा.

नौकासन : नौकासनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे पोटाच्या पेशी टोन होतात. पचनात सुधारणा होते. तसेच पाठीचा कणा व कंबर मजबूत होते.

पाय वर घेणे : आपले पाय ३० डिग्री, ४५ डिग्री, ६० डिग्री अंशात वर उचला. प्रत्येक अवस्थेत ५ सेकंद थांबा. यामुळे पोटातील पेशी बळकट होतात.

उत्थासन : उत्थासनाचे अनेक फायदे आहेत. यामुळे कंबरेवरील चरबी कमी होते व त्यात आणि खांद्यामध्ये ताण निर्माण होतो.

मॉडिफाइड कोब्रा : आपल्या हातांना फरशीवर टेकवा. खांदे आणि कोपरे आपल्या बरगडयांना लागलेली असावी. आपले डोके व मान वर करा. एवढे पण नाही की आपल्या पाठीवर याचा ताण पडेल. आता अॅब्जना आतील बाजूला ओढा जसे तुम्ही पेल्व्हिसना फरशीपासून वर उचलायचा प्रयत्न करता.

इतर उपाय

पोस्ट मार्टम सपोर्ट बेल्ट : हा बेल्ट पोटाच्या पेशींना टाईट करतो. यामुळे तुमचे पोश्चर चांगले राहते व पाठीचे दुखणे कमी होते.

बेली रॅपचा वापर करा : बॅली रॅप वा पोटपट्टा तुमच्या अॅब्जना आवळून ठेवतो. ज्यामुळे तुमच्या युट्रस व पोटाचा भाग आपल्या मुळ आकारात येतो, हा पोटावरील चरबी कमी करण्याचा सर्वात जुना उपाय आहे. यामुळेसुद्धा पाठीचे दुखणे थांबते.

फुल बॉडी मसाज करा : मसाज शरीरासाठी अतिशय लाभदायक असतो. याद्वारे तुम्ही घाम न गाळता वजन कमी करू शकता. अशा पद्धतीने मसाज करवून घ्या की तुमच्या पोटावरील चरबीवर त्याचा परिणाम होईल. यामुळे फॅट शरीरावर समप्रमाणात पसरेल. मेटाबोलिझिमवर परिणाम होईल व चरबीपासून सुटका होईल.

रोगप्रतिकारकशक्ति वाढवणारे ५ मसाले

* पारूल भटनागर

आज जेव्हा सर्वत्र कोरोना विषाणूचा धोका आवासून उभा आहे अशावेळी खबरदारी घेण्याची गरज आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या संक्रमणापासून आपल्याला स्वत:चे रक्षण करता येईल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण इम्युनिटी वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश डाएटमध्ये करू. तुमची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारकशक्ति वाढवणाऱ्या गोष्टी तुम्हाला अन्य कुठे नव्हे तर तुमच्या स्वयंपाकघरातच मिळतील.

हो, येथे आम्ही स्वयंपाकघरातील गरम मसाल्यांबाबतच सांगत आहोत. ते पदार्थांची चव तर वाढवतातच सोबतच तुमची इम्युनिटीही वाढवतात. चला, तर मग यासंदर्भात फरीदाबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या डाएटिशियन डॉक्टर विभा यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणते गरम मसाले इम्युनिटी वाढवायचे काम करतील.

हळद

हळद हा एक असा मसाला आहे जो प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात सहज मिळतो. शिवाय, सर्वसाधारणपणे प्रत्येक भाजीत घातला जातोच. याला फ्लू फायटर म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण ‘पब्लिक लेबरराय ऑफ सायन्स’मध्ये प्रकाशित अहवालानुसार, हळदीत करक्युमिन नावाचे तत्त्व असते जे अॅण्टीव्हायरल किंवा अॅण्टीइनफ्लेमेंटरी प्रॉपर्टीजसाठी ओळखले जाते. म्हणूनच तुम्ही हळद भाजीत घाला, दुधात किंवा हेल्थ ड्रिंकमध्ये घाला, यातील गुण कमी होत नाहीत.

डाएटिशियन डॉ. विभा यांनी सांगितले की, सध्या बाजारात मिळणाऱ्या हळदीत बरीच भेसळ असते. त्यात लेडही असते, ज्यामुळे शरीराची हानी होते. म्हणूनच हळद खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, त्यात ३ टक्के करक्युमिन आणि १०० टक्के नॅचरल ऑईल असणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या शरीराला हळदीतील वास्तविक गुणधर्म मिळू शकतील. नॅचरल ऑईलमध्ये अॅण्टीफंगल प्रॉपर्टीज असल्यामुळे ते फ्लूमुळे होणाऱ्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट या विषाणूला रोखण्यासाठी सक्षम असते.

नेहमी किती हळदीचे सेवन करावे : जर तुम्ही भाजीमधून हळदीचे सेवन करत असाल तर त्यात ३-४ चिमूट हळद पावडर घालावी. दूध किंवा हेल्थ ड्रिंकमध्ये ती टाकणार असाल तर १-१ चिमूट पुरेशी आहे.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

हळद शरीरात उष्णता निर्माण करण्याचे काम करते. गरजेपेक्षा जास्त वापरामुळे पोटात जळजळ होऊ शकते. जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे हळद ही शरीरातील लोह शोषून घेते. त्यामुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते. म्हणूनच मर्यादित मात्रेतच तिचे सेवन करावे.

दालचिनी

सर्दीखोकला झाल्यास दालचिनीची चहा किंवा दालचिनीचे पाणी दिल्यामुळे तो बरा होतो, कारण यात अॅण्टीबायोटिक आणि बॉडी वॉर्मिंग प्रॉपर्टीज असतात. सोबतच दालचिनीमुळे भाजीची चव वाढते. कुठल्याही वयाचे लोक तिचे सेवन करुन स्वत:चे रोगांपासून रक्षण करू शकतात.

यात पॉलिफेनॉल्स नावाचे अॅण्टीऑक्सिडंट असते, जे शरीराला फ्री रेडिकल्सपासून वाचवण्याचे काम करते. सोबतच यात सिनेमेल्डिहाइड नावाचे तत्त्व असते जे विविध प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवण्याचे काम करते. सिनेमन आयर्नमुळे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, फ्लू बरा होण्यासोबतच तो आपल्यातील इम्युनिटीही वाढवतो. दालचिनी तुम्ही अख्खी वापरा किंवा दालचिनीची पावडर वापरा, कुठल्याही स्वरुपात ती शरीरासाठी फायदेशीरच ठरते.

नेहमी किती दालचिनी खावी : तुम्ही दररोज १ ग्रॅम दालचिनीचे सेवन करू शकता. यामुळे शरीराचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

दालचिनीत सिनेमेल्डिहाइड नावाचे तत्त्व असते. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते. दालचिनीचे गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास तोंड येणे, सूज येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच तिचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.

मेथीदाणे

मेथीदाण्याला आरोग्यासाठी वरदान समजले तर ते चुकीचे ठरणार नाही. पण मेथी काहीशी कडवट असल्याने बहुतांश लोक तिचा वापर डाएटमध्ये करीत नाहीत. प्रत्यक्षात मेथीचे छोटे छोटे दाणे खूपच परिणामकारक असतात. यात अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे ती शरीराला आजारांपासून वाचवते. सोबतच मेथीत कॉपर, झिंक, मॅग्नेशियम, सोडियम, फॉलिक अॅसिड असल्यामुळे ती शरीराला आवश्यक सर्व प्रकारची पोषक तत्त्वे मिळवून देण्याचे काम करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती खाऊ शकता.

नेहमी किती मेथीदाणे खावे : दररोज ५ ग्रॅम मेथीदाणे खाता येतील.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

मेथी गरम असल्यामुळे ती खाल्ल्यामुळे पोटासंबंधी समस्य निर्माण होऊ शकतात. म्हणूनच ती मर्यादित प्रमाणातच खावी.

काळीमिरी

काळीमिरी प्रत्येक देशाच्या पाककृतीतील एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तिच्या वापरामुळे पदार्थाची चव कित्येक पटीने वाढते. सोबतच यात पाइपराइन तत्त्वही असते ज्यात अॅण्टीबॅक्टेरियल आणि अॅण्टीइनफ्लमेटरी गुण असतात, जे आपले प्रत्येक प्रकारच्या संसर्गापासून रक्षण करतात. यात मोठया प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे ती आपल्यामध्ये रोगांविरोधात लढण्याची क्षमता निर्माण करते. म्हणूनच सर्दीखोकला झाल्यास काळीमिरी नॅचरल टॉनिकच्या रुपात वापरली जाते. अनेक जण जेवणाच्या पदार्थात घालूनही तिचा वापर करतात.

नेहमी किती प्रमाणात खावी : नेहमी १ चिमूटभर कालिमिरी खावी. ती अशक्तपणा दूर करण्यासोबतच तुमची अंतर्गत ताकदही वाढविण्याचे काम करते.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

जर तुम्ही दररोज अनेकदा आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात काळीमिरी खात असाल तर त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते, कारण यातील पाईपराइन हे तत्त्व जळजळ निर्माण करण्यासाठी कारणीभूत असते.

आले

आल्यात अॅण्टीइनफ्लेमेटरी आणि अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात ज्या कफ, सर्दी आणि फ्लूपासून वाचवण्याचे काम करतात. आल्यातील अॅण्टीऑक्सिडंट प्रॉपर्टीज शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर काढून टाकण्याचे काम करतात.

नेहमी किती आले खावे : तुम्ही दररोज १ इंच आल्याचा तुकडा खाऊ शकता. हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

गरजेपेक्षा जास्त आले खाल्ल्यामुळे इन्सुलिनची पातळी वाढू शकते. सोबतच त्वचेची अॅलर्जी आणि पोटाची समस्याही निर्माण होऊ शकते. म्हणूनच गरजेपेक्षा जास्त आले खाऊ नका.

स्तनपानावेळी घ्या ही दक्षता

* प्रतिनिधी

स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनाच्या स्वच्छतेकडे खूपच लक्ष देणे आवश्यक आहे. स्वच्छतेसंबंधी टीप्स प्रत्येक आईने जाणून घेणे गरजेचे आहे :

* बाळाला दूध पाजताना हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे कारण, तुम्ही दिवसभरात हाताने बरीच कामे करता. त्यामुळे हात आणि बोटे खराब होण्याची, संसर्ग पसरण्याची शक्यता अधिक असते. शिवाय संसर्ग पसरवणारे जीवाणू आणि विषाणू इतके सुक्ष्म असतात की नुसत्या डोळयांनी दिसत नाहीत आणि बाळाला दूध पाजताना स्थानांतरीत होतात. यामुळे बाळाला अनेक आजार होऊ शकतात. म्हणूनच बाळात संसर्ग पसरण्याआधीच आईने आपले हात व्यवस्थित धुणे आवश्यक आहे.

* स्तन आणि निपल स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण, कपडयांमुळे निपलवर घाम जमा झाल्यामुळे तेथे किटाणू तयार होतात, जे ब्रेस्ट फीडिंगवेळी बाळाच्या पोटात जातात आणि बाळ आजारी पडू शकते. म्हणून बाळाला दूध पाजण्याआधी स्तन आणि निपल हे कोमट पाण्यात कापासाचा बोळा किंवा स्वच्छ कपडा बुडवून त्याने साफ करून घ्या. निपलला आलेली सूज कमी करण्यासाठी दुधाचे ४-५ थेंब निपलवर लावून ते सुकू द्या. अनेकदा बाळ दूध पिताना दातांनी चावतो, त्यामुळे जखम होते आणि दुखू लागते. या वेदना  कमी करण्यासाठी आईचे दूध खूपच उपयुक्त आहे.

* बाळाच्या जन्मानंतर आईच्या स्तनात बदल होतो. अशावेळी घट्ट ब्रा घालू नये. कारण घट्ट ब्रा घातल्यामुळे बरेच नुकसान होते. एकतर बाळाला दूध पाजताना अडचण येते आणि दुसरे म्हणजे स्तनात दूध जमून राहते, जे नंतर गाठीत रुपांतरीत होते.

* बऱ्याच माता दूध पाजताना निपल शिल्डचा वापर करतात, जो दूध पाजताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठीचा अल्पकालीन पर्याय आहे. निपल शिल्ड वापरताना त्याच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ते लावून दूध पाजण्यापूर्वी प्रत्येक वेळी त्याला स्टेरलाईज करायला हवे, जेणेकरून शिल्डवर असलेले किटाणू नष्ट होतील आणि बाळाच्या पोटात जाणार नाहीत.

* ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या माता रेग्युलर ब्रा ऐवजी नर्सिंग ब्रा घालतात, ज्यामुळे बाळाला दूध पाजणे सोपे होते कारण, या साधारण ब्राच्या तुलनेत खूपच आरामदायी आणि फ्लेक्सिबल असतात. कॉटनपासून बनवलेल्या या ब्रामध्ये हवा खेळती राहते शिवाय, याला लावलेले इलास्टिक त्वचेला खूपच सॉफ्ट टच देते. तुम्ही नुकत्याच आई झाला असाल आणि बाळाला ब्रेस्ट फीड करत असाल तर त्वचेचे संरक्षण करणारी नर्सिंग ब्रा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारच्या ब्रामध्ये फक्त निपलवाली जागा उघडण्याची सोय उपलब्ध असते आणि मागे हुकही जास्त असतात, ज्यामुळे तुम्ही ब्रा तुमच्या गरजेनुसार सैल किंवा घट्ट करू शकता. या ब्राची रचना अशी असते की जी स्तनांना चांगल्या प्रकारे आधार देते. पण अनेकदा दूध पाजताना ते ब्रावर पडल्यामुळे तिथे बॅक्टेरिया तयार होतात शिवाय, ती खराबही होते. म्हणून नर्सिंग ब्रा दररोज बदला.

* स्तनपानासाठी तुम्ही जी साधने वापरता जसे की तुम्ही ब्रेस्ट पंपाचा वापर करत असाल तर त्याची स्वच्छताही गरजेची आहे. ब्रेस्ट पंप धुण्यासाठी स्वयंपाकघरातील किंवा बाळाची बाटली धुण्यासाठी असलेल्या ब्रशचा वापर अजिबात करू नका. तो स्वच्छ करण्यासाठी वेगळे ब्रश वापरा.

मुश्किल नाही लठ्ठपणा कमी करणे

* प्राची भारद्वाज

लठ्ठपणा ही तर आधुनिक सभ्यतेची देणगी आहे. काही दशकांपूर्वी तर भारतीय कुपोषणाचे शिकार होते आणि लठ्ठपणा हा केवळ विकसित देशांतच आढळत असे. परंतु आज भारतात कुपोषण आणि लठ्ठपणा दोन्ही आहे. २०१४च्या ब्रिटानी चिकित्सा जर्नल नुसार १९७५ मध्ये भारत लठ्ठपणात १९व्या स्थानावर होता तर २०१४मध्ये महिलांसाठी तिसऱ्या आणि पुरुषांसाठी पाचव्या स्थानावर पोहोचला होता. भौतिक सुखसुविधांना भुलून लोक आहार-विहाराच्या चुकीच्या सवयींमुळे स्थूलता ओढवून घेत आहेत. ज्यामुळे लाइफस्टाइल डिसीज अर्थात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, गुडघेदुखी, पायाची दुखणी, महिलांमध्ये मासिकपाळी आणि वंध्यत्वाच्या समस्या होऊ लागल्या आहेत.

न्यूझिलंडच्या ऑकलंड टेक्निकल युनिव्हर्सिटीद्वारे केलेल्या शोधानुसार जगातील ७६ टक्के लोकसंख्या ही लठ्ठपणाची शिकार आहे. केवळ १४ टक्के लोकसंख्येचे वजन सामान्य आहे.

लठ्ठपणा कोण कमी करू इच्छित नाही आणि अनेकदा याच नादात लोक फसवणुकीला बळीही पडतात. बस, ऑटो यावर लावलेल्या वजन कमी करण्याच्या जाहिराती या केवळ लोकांना भ्रमित करतात. तसेच सर्जरी करूनही काय गॅरंटी असते की वजन पुन्हा वाढणार नाही.

जर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली बदलली नाही तर लठ्ठ व्हायला वेळ लागत नाही. पण घाबरू नका, लठ्ठपणा कमी करणे काही एवढे कठीणही नाही.

डॉ. एस के गर्ग लठ्ठपणापासून संरक्षणासाठी खालील सल्ला देतात :

भरपूर पाणी प्या : एका वेबसाइटनुसार जे लोक जास्त पाणी पितात, ते आपलं वजन इतरांच्या तुलनेत अधिक कमी करू शकतात. याचे कारण असे आहे की जास्त पाणी प्यायल्याने पोट भरते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि जेवणही कमी खाल्ले जाते.

थोडया थोडया अंतराने खात रहा : एकाचवेळी खूप अन्न खाण्यापेक्षा, दिवसभर थोडे थोडे खात जावे. असे केल्याने दिवसभर शारीरिक शक्ती टिकून राहते. साध्या शब्दात सांगायचे तर जेव्हा भूक लागते, तेव्हा खा आणि जेव्हा पोट भरते तेव्हा थांबा.

आपल्या शरीराचे म्हणणे ऐका : आपल्यापैकी बहुतांश लोक हे  बाह्य संकेतांनुसार जेवण सुरू करतात किंवा पूर्ण करतात. जसे आपल्या ताटात अन्न शिल्लक तर नाही किंवा इतरांनी जेवण संपवले आहे किंवा ऑफिसमध्ये लंच टाइम झाला आहे. याऐवजी आंतरिक संकेतांवर लक्ष द्या. हे पहा की तुम्हाला भूक लागली आहे की नाही. शिवाय स्वादिष्ट आहे म्हणून जास्त खाण्याचा मोहही टाळा. आपली वडीलधारी मंडळी नेहमीच सांगत आली आहेत की चांगल्या आरोग्याची शिदोरी ही पोटभर खाण्यात नाही तर दोन घास कमी खाण्यातच आहे.

भावनावश होऊन खाणे टाळा : जेव्हा आपण अधिक भावुक किंवा खुश असतो, चिंतेत किंवा दु:खी असतो, तेव्हा आपण अधिक खातो. ही आपल्या मनाची आपल्या परिस्थितीपासून नजर चुकवण्याची एक मानसशात्रीय पद्धत आहे. ऑफिसमध्ये डेडलाइन जवळ आली असते किंवा मुलाच्या शिस्तीसंबंधी काही समस्या आणि बऱ्याचदा आपण या समस्यांची उत्तरे खाण्यात शोधतो. भूक असो नसो आपल्याला सतत खावेसे वाटत राहते. यापासून सावध राहा. कारण खाल्ल्याने तुमची समस्या सुटणार तर नाहीच उलट ती आणखी वाढेल.

ट्रिगर फूडला नाही म्हणायला शिका : काही खाद्यपदार्थ असे असतात की जे खाताना आपले हात थांबतच नाहीत. चिप्सचे पॅकेट उघडले असता जोपर्यंत ते संपत नाही आपण खातच राहतो. असेच पेस्ट्री, पास्ता, डोनट, चॉकलेट असे पदार्थ खातानाही होते. अशा पदार्थांमध्ये रिफाइंड तेल, मीठ, साखर अधिक प्रमाणात असल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे असंतुलन होऊ लागते. तुम्ही अशा खाण्याला जेवढे लवकर तुमच्या डाएटमधून बाहेर काढाल ते तुमच्याकरता चांगले आहे.

पोर्शन कंट्रोल : सेलिब्रिटी डाएटिशिअन ऋजुता दिवेकर त्यांच्या देखरेखीत वजन कमी करणारी अभिनेत्री करीना कपूर म्हणते सर्व काही खा, पण योग्य प्रमाणात. डॉ. गर्ग यांच्यानुसार आंबा किंवा चिकूसारखी अतिशय गोड फळे भले तुम्ही खा, जर तुम्ही खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवले तर नुकसान होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर तुम्हाला तुमच्या ताटातील पदार्थांचे प्रमाणही योग्यच ठेवावे लागेल. आवडले म्हणून खूप खाल्ले असे करू नका.

सफेद भोजनास करा रामराम : सफेद रंग हा खरंतर शांती आणि चांगुलपणाचा प्रतीक मानला जातो, पण खाण्याच्या बाबतीत मात्र हे उलट आहे. सफेद रंगाचे पदार्थ आपल्या ताटातून दूर करा. उदाहरणार्थ सफेद तांदळापेक्षा ब्राउन तांदूळ अधिक आरोग्यदायी असतात. सफेद ब्रेड, पास्ता, नूडल्स, मैदा यापासून बनलेल्या गोष्टी आणि साखर असलेले पदार्थ आपले स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत असतात. कारण यांचे प्रोसेसिंग करताना यातील पोषणमूल्ये नष्ट झालेली असतात आणि फक्त कॅलरी उरलेली असते. त्याऐवजी ओट, अख्खे धान्य, दलिया, शेंगा, ब्राऊन ब्रेड, ब्राऊन तांदूळ, मावा इ. घ्या.

तळलेल्या पदार्थांना नाही म्हणा : फास्ट फूड, फ्राइज, डोनट, चिप्स, बटाटयाचे चिप्स यासारखे तळलेले पदार्थ आपल्या खाण्यातून वर्ज्य करा. एका मोठया चमचाच्या तेलात १२० कॅलरी असतात. अधिक तेलकट खाल्ल्याने शरीरात आळस भरतो. याऐवजी भाजलेले, उकडलेले, वाफेवर शिजवलेले, विना तेल शिजवलेले किंवा कच्चे भोजन खाणे योग्य असते.

गोड कमी खा : मिठाई, आइस्क्रीम, कॅन्डी, चॉकलेट, केक, जेली किंवा डोनट यांत साखर असल्याने हे पदार्थ आपल्या शरीरात साखर निर्माण करतात, ज्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखेही वाटते आणि अधिक खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यापेक्षा तुम्ही गोड पदार्थाना आरोग्यदायी पर्याय शोधा जसे टरबूज, कलिंगडसारखी फळे. यांत नैसर्गिक गोडवा असतो.

हेल्दी स्नॅक्स खा : जेव्हा भूक हलकीफुलकी असते, तेव्हा हेल्दी स्नॅक्स खा जसे फळे, सॅलेड, कुरमुरे, घरी बनवलेले नमकीन, भाजलेले चणे, भाजलेले शेंगदाणे इ. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये तुमच्याजवळ वरील पदार्थ ठेवा, ज्यामुळे बिस्कीट आणि चॉकलेटवर तुमचा हात जाणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें