* पुष्पा भाटिया

रीना आणि नरेश यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. पतिपत्नी दोघेही नोकरी करणारे आहेत. ऑफिसमधून कामासाठी दोघांनाही शहराच्या बाहेरही जावं लागतं. आतापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते, पण गेल्या काही महिन्यांपासून रीनाला थकवा, बेचैनी आणि झोप न लागणे असे त्रास होऊ लागले.

डॉक्टरांना दाखवल्यावर समजले की रीना तणावाखाली जगत आहे. नोकरीमुळे पती पत्नी बराच वेळ वेगळे राहत असत. जोपर्यंत तिचा पती सोबत असे, सर्व काही ठीक असे. पण जेव्हा ती घरात एकटी असायची, तेव्हा तिला घरातली कामे आणि नोकरी यांच्यातील ताळमेळ बसवणे मुश्किल होऊन जायचे. तसेही रीनाला आता असेच वाटत होते की तिने आता आपले घर सांभाळावे, कुटुंब वाढवावे, पण तिच्या पतिला आणखी काही वेळ थांबायचे होते आणि याच कारणामुळे रीना तणावाखाली होती.

तणावाची कारणे

* हल्लीची दिवसरात्र होणारी धावपळ, ऑफिसला येण्याजाण्याची चिंता, मुलांचे संगोपन, त्यांच्या अभ्यासाची चिंता, कुटुंबाचे खर्च इ. काही अशी कारणे आहेत, जी पुरुषांपेक्षा महिलांना अधिक त्रास देतात. याशिवाय हार्मोन्स बॅलन्स बिघडणे(मासिक पाळीच्या आधी आणि मेनोपॉजच्या दरम्यान) ऋतू बदल हेसुद्धा एखाद्या महिलेच्या औदासीन्याचे कारण ठरू शकते.

* गर्भधारणेपासूनच महिलांच्या डोक्यात मुलगा होणार की मुलगी ही चिंता भेडसावू लागते. कुटुंबातील लोक सतत मुलगा व्हावाचा धोशा तिच्यामागे लावतात. त्यामुळे तिचा तणाव अधिकच वाढतो. खरंतर हे वैज्ञानिक सत्य आहे की मूल मुलगा असणार की मुलगी यासाठी महिलेला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. पण तरीदेखील आपल्या समाजात अशिक्षितच नाही तर सुशिक्षित लोकही मुलगी झाल्यास आईला दोषी ठरवतात.

* खरं सांगायचं तर तणावाची सुरुवात ही मुलीच्या जन्मापासूनच होते आणि तिच्या वयानुसार ती वाढतच जाते.

* चांगले शिक्षण असूनही मनासारखी नोकरी न मिळणे, नोकरी मिळाल्यास वेळेवर बढती न मिळणे, घरातील बाहेरील कामांचा ताळमेळ जमवण्यात अपयश आल्याने शिकलेल्या मुलीही तणावाखाली राहू लागल्या आहेत.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...