* डॉ. आरएसके सिन्हा, इंटरनल मेडिसिन स्पेशालिस्ट, जेपी हॉस्पिटल, नोएडा

स्वच्छ पाणी प्रत्येक व्यक्तिची मुलभूत गरज आहे. प्रदूषित पाणी खूप घातक ठरू शकते. स्वच्छ पाण्याला युनायटेड नेशन्सद्वारे मनुष्याची मुलभूत गरज मानले गेले आहे. तरीही जगभरात जवळपास १.८ मिलियन लोक प्रदूषित पाण्यामुळे मरतात.

पाण्याबाबत चार महत्त्वपूर्ण गोष्टी

प्रमाण : प्रत्येक व्यक्तिला रोज पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी, सॅनिटेशन आणि हायजिनसाठी २० ते ५० लीटर पाण्याची आवश्यकता असते.

विश्वसनीयता : पाण्याची उपलब्धता विश्वासार्ह असली पाहिजे. मोसम मग कुठलाही असो, व्यक्तिला प्रत्येक स्थितीत पाणी मिळाले पाहिजे. जर पाण्याचा स्त्रोत विश्वासार्ह नसेल किंवा मोसमी असेल, तर याचा परिणाम व्यक्तिच्या जीवनाच्या गुणवत्तेवर पडतो.

गुणवत्ता : पाण्याच्या वितरणासाठी उचित आणि विश्वासार्ह प्रणाली असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आणि स्वच्छ पेयजल मिळेल.

खर्च : स्वच्छ पाण्याचा विश्वसनीय स्त्रोतही महत्त्वाचा ठरला नसता, जर व्यक्तिला ते मिळाले नसते. यात पैसे आणि वेळ दोहोंचा प्रश्न आहे.

स्वच्छ पाणी यासाठीच आवश्यक

स्वच्छ पाणी पोषण देते : मनुष्याचे शरीर ६० टक्के पाण्याने बनलेले असते. त्याने पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे. जेणेकरून त्याचे शरीर सर्व काम सुरळीत करत राहील. त्याबरोबरच पाणी तोंडाची स्वच्छता करण्यासाठीही आवश्यक आहे. ते रक्ताची तरलता सुरळीत ठेवण्यास मदत करते. रक्ताच्या माध्यमातून पोषक पदार्थ आणि ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत पोहोचवते.

विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्यास मदत करते : स्वच्छ व ताजे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. मग ते विषारी पदार्थ शरीरात बनलेले असो किंवा बाहेरून शरीरात प्रवेश केलेले असो अथवा प्रदूषित पाण्यासोबत शरीरात प्रवेश केलेले असो.

शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राखते : स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्यायल्याने शरीरात तरल पदार्थांचे संतुलन कायम राहते. ते अन्न पचवण्यास ते शरीरात शोषून घेण्यास मदत करते. शरीराचे तापमान सामान्य ठेवून त्याला आरोग्यदायी बनवते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...