* प्रियंका यादव
केस आपल्या एकूण लुकला अधिक सुंदर बनवण्याचे काम करतात, पण जेव्हा केस स्वत:च चिकट होतात तेव्हा काय होते? पावसाळ्यात हे अनेकदा घडते. वातावरणातील आर्द्रतेमुळे केस चिकट होतात आणि चिकट केसांमुळे केवळ तेलकटपणा येत नाही तर आपले सौंदर्यही खराब होते.
याशिवाय, पावसाळ्यात महिलांना टाळूशी संबंधित समस्या उद्भवू लागतात, ज्यामुळे केसांना सतत खाज सुटते, शिवाय, हवामानातील आर्द्रतेमुळे, डोक्यात कोंडा तयार होऊन त्वचेचा संसर्ग होतो. यामुळे केसांचे नुकसान तर होतेच, शिवाय त्यांची वाढही मंदावते.
केस वारंवार धुवू नका
पावसाळ्यात केस वारंवार धुवू नयेत. केस जास्त धुण्यामुळे टाळूमध्ये ओलावा येतो. पावसाळ्यामुळे वातावरणात आधीच ओलावा असतो. आर्द्रता आणि वारंवार केस धुण्यामुळे केस तेलकट दिसू लागतात आणि या काळात जास्त गळू लागतात.
या समस्या टाळण्यासाठी, तुमचे केस वारंवार धुवू नका आणि केसांमध्ये अतिरिक्त ओलावा जमा होऊ देऊ नका. आठवड्यातून ३-४ वेळेपेक्षा जास्त केस धुवू नका.
कठोर शाम्पूंना नाही म्हणा
शाम्पू करताना, तुम्ही वापरत असलेला शाम्पू कठोर नाही, याची विशेष काळजी घ्या. असा शाम्पू तुमच्या केसांसाठी आणि टाळूसाठी चांगला नसतो. असा शाम्पू वापरल्याने केसांचा नैसर्गिक रंग फिका पडू शकतो.
शिवाय, यामुळे अॅलर्जीदेखील होऊ शकते. कठोर शाम्पूचा जास्त वापर केल्याने पुरळ किंवा खाजदेखील येऊ शकते. म्हणून, केसांना असा शाम्पू लावू नका.
अॅप्पल सायडर व्हिनेगरवरयुक्त शाम्पू
पावसाळ्यात, टाळूवर भरपूर ओलावा जमा होतो, ज्यामुळे केसांची पीएच पातळी बिघडते. तुमचे केसही चिकट दिसू लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही अँप्पल सायडर व्हिनेगरपासून बनवलेले शाम्पू वापरू शकता. यासाठी तुम्ही वावचे अँप्पल सायदर व्हिनेगर खरेदी करू शकता.
स्कॅल्प स्क्रब वापरा
ज्याप्रमाणे आपण आपला चेहरा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी स्क्रब वापरतो, त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसात आपल्या टाळूचीदेखील अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. यासाठी स्कॅल्प स्क्रब वापरता येईल.
केसांना तेल नक्की लावा
पावसाळ्यात त्वचेसोबतच केसांनाही भरपूर पोषणाची आवश्यकता असते. केसांना असे पोषण तेल लावल्यामुळे आणि खोलवर कंडिशनिंगद्वारे मिळते. यासाठी तुम्ही दर आठवड्याला केसांना तेल लावा. दर १५ दिवसांनी तुमचे केस डीप कंडिशन करा.





