* प्रतिनिधी
बाळाच्या जन्मानंतर लगेचच आई आणि बाळ दोघांवरही कुपोषणाचा वाईट परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर कुपोषण हे बाळासाठी अत्यंत घातक ठरू शकते. हे रोखणे खूप महत्त्वाचे आहे.
गर्भधारणेनंतर कुपोषणाची कारणे
* स्तनपान हे याचे पहिले आणि मुख्य कारण आहे. स्तनपान करवणाऱ्या आईला दररोज किमान १००० कॅलरीज उर्जेची आवश्यकता असते. बहुतेक महिलांना योग्य आहार तक्त्याबद्दल माहिती नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे त्या डिहायड्रेशन, जीवनसत्व किंवा खनिजांची कमतरता आणि कधीकधी अशक्तपणाच्या बळी ठरतात. याला प्रसूतीनंतरचे कुपोषण म्हणजेच बाळाच्या जन्मानंतरचे कुपोषण म्हणता येईल.
* स्तनपानामुळे आईला जास्त भूक लागते आणि ती अनेकदा पौष्टिक तसेच आरोग्यदायी नसलेले पदार्थ खाते. चवीला चांगल्या लागणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे कमी असतात, ज्यामुळे आई कुपोषणग्रस्त होते.
* बाळंतपणापूर्वी आणि नंतर प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे घेणे खूप महत्त्वाचे असते. फॉलिक अॅसिडसारखी प्रसूतीपूर्व जीवनसत्त्वे पाण्यात विरघळतात आणि शरीरातून बाहेर टाकली जातात, यामुळे फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे बाळंतपणानंतर महिलांना अनेकदा अशक्तपणाचा त्रास होतो.
* बाळंतपणानंतर कुपोषणामुळे महिला अनेकदा प्रसुतिपूर्व नैराश्याच्या बळी ठरतात. बाळाला जन्म दिल्यानंतर त्यांच्यात भावनिक बदल होतात, ज्यामुळे नैराश्य येऊ शकते. यामुळे, अनेकवेळा महिला व्यवस्थित खाणे थांबवतात आणि कुपोषणाच्या बळी ठरतात.
* गर्भधारणेदरम्यान जवळजवळ सर्व महिलांचे वजन वाढते. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी त्या योग्यरित्या खाणे थांबवतात आणि कुपोषणाच्या बळी ठरतात. त्यासाठी, गर्भधारणेनंतर हळूहळू वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही अचानक कुपोषणाच्या बळी ठरणार नाही. बाळाला जन्म दिल्यानंतर लगेचच, तुम्ही फक्त १ महिन्यात ४-५ पौंड वजन सहज कमी करू शकता. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त डाएट करू नका.
* बाळाच्या जन्मानंतर, महिलांना अनेकदा नीट झोप येत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात पोषक तत्त्वे शोषली जात नाहीत, ज्यामुळे त्या कुपोषणाच्या बळी ठरतात.
बाळासाठी धोका
गर्भवती महिलेमधील कुपोषणाचा तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर दुष्परिणाम होतो. अशा परिस्थितीत बाळाचा विकास योग्य प्रकारे होत नाही आणि जन्माच्यावेळी त्याचे वजन सामान्यपेक्षा कमी राहाते. गर्भधारणेदरम्यान आईमध्ये कुपोषण, आययूजीआर म्हणजे गर्भाशयाच्या आत वाढ कमी होणे आणि जन्माच्यावेळी कमी वजन, यांचा बाळावर नकारात्मक परिणाम होतो, ज्याचे अनेक प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. जसे की, जन्मजात दोष, मेंदूचे नुकसान, अकाली जन्म, काही अवयवांचा विकास न होणे, बाळामध्ये न्यूरोलॉजिकल, आतडे, श्वसन किंवा रक्ताभिसरण विकार, काही मुले जन्मताच रडत नाहीत. यापैकी ५० टक्के प्रकरणे आययूजीआरमुळे घडतात.





