* गरीमा पंकज

३७ वर्षीय विद्या ही शाळेत प्राचार्य आहे. तिची मुलगी आठवीच्या वर्गात असून नवरा एका खासगी कंपनीत मॅनेजर आहे. म्हणायला त्यांचे जीवन बऱ्यापैकी स्थिर आहे. तिला काही अडचणही नाही, ज्यासाठी ती आपले डोके लढवेन. पण प्रत्यक्षात ती मनाने खूप अस्वस्थ आहे. कधी शाळेची कामगिरी तर कधी नात्यांशी निगडित अपेक्षा, कधी मुलीची चिंता, तर कधी पतीवर संशय म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोंधळामध्ये निमग्न असते.

तिच्या मनात विचारांचे वादळ सुरूच असतात, याचा परिणाम म्हणजे ती तणावात असते. चिडचिडेपणा तिच्या स्वभावाचा एक भाग बनला आहे. यामुळे तिने बऱ्याचवेळा अनेक संकटांचा सामनाही केला. तिच्या चेहऱ्यावरील नैसर्गिक हास्य अदृश्य असते. नात्यातही कडवेपणा वाढू लागला आहे. परिणामी, आनंदी आयुष्य असूनही ती आनंदी नाही, निरोगी दिसत असली तरीही निरोगी नाही.

आज आपण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशाचे झेंडे गाढलेले आहेत. आरोग्य आणि विज्ञान या क्षेत्रातील प्रगतीमुळे आपण विकासाचा कळसदेखील गाठला आहे. आपण प्रत्येक प्रकारे आधुनिक झालो आहोत. आमच्याकडे सर्व सुविधांची सोय आहे, ज्यांद्वारे आपण पाहिजे तेव्हा संपर्क साधू शकतो, आपण इच्छित ठिकाणी जाऊ शकतो. आपल्या मनाची कामे करू शकतो. तरीही आपण कुठे न कुठेतरी दुखी आहोत. कुठली न कुठली गोष्ट आपल्या मनात सतत चालू राहते आणि आपण टेन्शनमध्ये पडतो.

काय आहे अत्याधिक विचार करणे

सर्व प्रथम आपण अति विचार करण्यास एक रोग म्हणून स्वीकारणे आवश्यक आहे. जरी आपल्याला असे वाटते की यातून कोणतेही नुकसान होत नाही, परंतु सत्य हे आहे की गरजेपेक्षा अति-विचार करणे आपल्या क्षमतेत अडथळा आणू शकते.

या संदर्भात कोलंबिया एशिया हॉस्पिटलच्या डॉ. श्वेता शर्मा सांगतात :

ओव्हरथिंकिंगची काही लक्षणे

* संभाषणादरम्यान समन्वय राखण्यात अडचण.

* मनातल्या मनात सतत तुलना करत राहणे.

* प्रत्येक गोष्टीच्या नकारात्मक पैलूबद्दल विचार करणे.

* मागील अपयश आणि उणीवांबद्दल सतत विचार करणे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...