* इंदिरा मित्तल

मिस चटणीचे रंग आता बदलत आहेत. आधी हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदीना, कैरी किंवा हिरवी चिंच, काळे किंवा सैंधव मीठ, गुळ, हिंग किंवा लसूण असे सगळे एकत्र घेऊन पाटावरंवट्यावर वाटली जाऊन चिनीमातीच्या भांड्यात जाऊन बसत असे आणि तिथून केळीच्या पानावर ताजी वाटली आणि ताजी खाल्ली जात असे. आता शिळ्या चटणीत ती मजा कुठून येणार?

चिंचेचा कोळ, गुळ, काळेमीठ आणि लालमिरची, भाजलेले जिरे, बारीक चिरलेले खजूर, खारिकांसोबत मिसळून शिजवून, डाळिंबाचे दाणे, द्राक्ष आणि केळ्याचे कापही मिसळले. कधी समोशाचा कोपरा तर कधी भज्यांची पापी घेऊन किंवा मग आलु टिक्की, दहीवडे यांच्यावर लाडात पसरवली आणि खाणाऱ्यांना चटक मटक करायला लावली. कधी पाणीपुरीच्या चटकदार पाण्यातला गोड तिखटपणा चाखला तर कधी भेळपूरी चटपटीत बनवली.

जुन्या दिल्लीमध्ये पान बाजारातील अख्खे मेथीदाणे, जाडी बडीशेप, जिरे, गुळ, कम्रक, शिंडे, अख्ख्या लाल सुक्या मिरच्या, वाळलेली कैरी, वाटलेली हळद, कोथिंबीर, सर्व साहित्य मिठाच्या मिश्रणात रात्रभर पाण्यात भिजवते. सकाळी हलवायांनी मंद आचेवर खूप शिजवले आणि खुसखुशीत कचोरीसोबत वाढले आणि खाणाऱ्यांनी तर अप्रतिम चवीमुळे पत्रावळ्यासुद्धा चाटूनपुसून स्वच्छ केल्या.

दक्षिण भारतात गेले आणि नारळ, आले, मूग, चणा किंवा उडदाची भाजलेली डाळ, भाजलेले शेंगदाणे, भाजलेले तीळ, कडीपत्ता, हिरवी मिरची, दही, मिरची, लिंबूसोबत वाटली जाऊन गोरीपान झाली किंवा भाजलेले टोमॅटो, कांदा, सुक्या लाल मिरच्या यांच्यासोबत लालेलाल झाली. मग हिंग, मोहरीच्या फोडणीने दृष्टही काढून घेतली. आले, तीळ आणि रसरशीत टोमॅटोची हॉट हैदराबादी चटणी बनून कलौंजीची फोडणी दिली.

कोकण महाराष्ट्रामध्ये हिरव्या मिरच्या, कांदा, लसणाबरोबर ठेचा बनली. कारल्याशीही नाते जोडले, सुके खोबरे, मेथी दाणे, लसूण, लाल मिरची, कोकमासोबत सुक्या खोबऱ्याची खमंग चटणी तयार झाली. कच्छच्या रणमध्ये कधी गाजर, कोबी आणि किसलेल्या कच्च्या आंबे हळदीबरोबर दहीकोशिंबिर स्वरूपात आली तर कधी अर्ध्यांकच्या आंब्यांचा गोड छुंदा बनली. बेसनपीठ आणि आंबट दही यांची कढी बनवण्याआधी निसटली आणि गुजराती फाफडा चटणी बनली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...