* सोमा घोष

मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस आणि सुंदर अभिनेत्री रिना मधुकरने मराठी आणि हिंदी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रिनाचा जन्म पुण्यात झाला. तिथे आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती मॉडलिंग करू लागली. तिथूनच तिला सुरुवातीला मराठी आणि नंतर हिंदी इंडस्ट्रीत काम करण्याची संधी मिळाली. ‘क्या मस्त है लाईफ’ या हिंदी मालिकेत काम केल्यानंतर तिला लगेचच ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यात तिला अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने ‘तलाश’ या चित्रपटात अभिनेता आमिर खानसोबत पोलिसाची भूमिका साकारली. सध्या ‘मन उडू उडू झालं’ या झी मराठीवरील मालिकेत ती ‘सानिका देशपांडे’ नावाची भूमिका साकारत आहे, जी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली आहे. विनम्र आणि स्पष्टवक्ती असलेल्या रिनाने खास ‘गृहशोभिके’सोबत गप्पा मारल्या. त्यातील हा काही खास भाग :

अभिनय क्षेत्रात यायची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली?

अभिनय क्षेत्रात अपघातानेच आली, पण काही दिवसांनंतर मला असे वाटू लागले की, मला येथेच काम करायचे आहे. या क्षेत्रातील माझी सुरुवात नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटाने झाली. मुळात मी लोकनृत्य करणारी डान्सर आहे. माझी नृत्याची कंपनीही होती. मराठी इंडस्ट्रीतील एका आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात नितीन देसाई यांच्याशी माझी ओळख झाली. तिथे मला त्यांच्यासोबत एक फोटो काढायची इच्छा होती. तुला अभिनयाची आवड आहे का, असे तिथेच त्यांनी मला विचारले. मी कधीच अभिनय केला नव्ह्ता. त्यांनी मला प्रयत्न करून बघ, असे सांगितले. मला त्यांचा नंबर दिला आणि मुंबईत येऊन भेटायला सांगितले. मराठी चित्रपट ‘अजिंठा’साठी त्यांना एका चांगल्या डान्सरची गरज होती. मला ऑडिशनसाठी बोलावले आणि माझी निवड झाली. तिथूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रातील माझी वाटचाल खऱ्या अर्थी सुरू झाली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...