आवडत्या व्यक्तीसाठी एवढे तरी कराच

* स्नेहा सिंह

आता त्याला भेटण्यासाठी मन आतूर होत नाही. सर्वकाही सोडून त्याच्या जवळ जाण्याची तितकीशी इच्छा राहिलेली नाही. गप्पांचे विषय संपले आहेत. भावना केवळ कर्तव्य बनून राहिल्या आहेत. शरीराचे आकर्षण संपले आहे. ज्या स्पर्शामुळे अंगावर रोमांच उभे राहायचे तो स्पर्श आता काटयासारखा टोचत आहे. संस्कार, वचन, नातेसंबंध आणि समाजाने आतापर्यंत एकमेकांसोबत जोडून ठेवले आहे, पण सत्य आणि न सांगता येणारे वास्तव हेच आहे की, पहिल्यासारखी त्याची सोबत हवीहवीशी वाटत नाही.

जेव्हा तुमचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असतात तेव्हा ते टिकवून ठेवण्यासाठी त्यातील बरे-वाईट नेहमीच तपासत राहिले पाहिजे. धंद्यात संबंधांचे तत्त्व आणि संबंधांत धंद्याचे धोरण अवलंबले तर दोन्ही बाजूंनी काहीच समस्या येणार नाही. तुम्ही महिला आहात. तुम्हाला आवडीच्या पुरुषासाठी नेहमीच स्वत:ला आकर्षक ठेवावे लागेल.

स्वत:ला आकर्षक ठेवावे लागेल

सामाजिक जबाबदारी आणि मुलांमध्ये महिला अशा काही गुंतून जातात की, पतीसाठी स्वत:ला आकर्षक ठेवणे विसरून जातात. असेच पतीच्या बाबतीतही होते. पैसे आणि नाव कमावण्याच्या नादात ते स्वत:ला व्यवस्थित ठेवण्याकडे दुर्लक्ष करतात. प्रेमसंबंधांतही असेच घडते. स्वत:ला आकर्षक ठेवणे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे चांगल्या पद्धतीने तयार होणे.

मानसिक अपग्रेडेशन

एक घर चांगल्या प्रकारे चालण्यामध्ये गृहिणीची भूमिका फार मोठी असते, पण घर सांभाळण्याच्या व्यापात त्या संबंध सांभाळायला विसरतात. तुम्ही गृहिणी असाल म्हणून काय झाले? मानसिक रूपात स्वत:ला अपग्रेड म्हणजे अद्ययावत ठेवू शकता आणि तसे ठेवायलाच हवे. गृहिणींनी वाचन करायला हवे, चांगले चित्रपट बघायला हवेत. चांगली गाणी ऐकायला हवीत, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी त्यांना माहीत असायला हव्यात.

शरीर

शरीराला सांभाळणे आणि सुडौल राहाणे ही महिलांसाठी एक राष्ट्रीय समस्या झाली आहे. कंबर लवचिक नसली तरी चालेल, पण तिथे चरबीचे साम्राज्य असेल तर मात्र अजिबात चालणार नाही. लैंगिक जीवनासाठी शरीर व्यवस्थित ठेवणे गरजेचे असते. वॅक्स, अंडरआर्म्स, बिकिनी वॅक्स करत राहायला हवे. खासगी अवयवांची स्वछताही तितकीच गरजेची असते.

मॅनर्स

पतीच्या अनुपस्थितीत त्याचा व्हॉट्सअप उघडून वाचणे, त्याने कोणाला कॉल केले हे पाहाणे हे मॅनर्सला धरून नाही. पतीनेही पत्नीसोबत असे वागू नये. तुम्ही खूप छान जेवण बनवत असाल, पण ते वाढायलाही यायला हवे. ताटातली भाजी कुठे वाढायची आणि चपाती कशा प्रकारे ठेवायची, हे सर्व माहिती असायला हवे. किती बोलायचे? कुठे थांबायचे, याचेही ज्ञान हवे. पती तुम्हाला वेळ देत नसल्याची तक्रार सतत करता कामा नये.

अभिव्यक्ती

कुठलेही संबंध टिकवून ठेवण्यासाठी अभिव्यक्ती खूपच गरजेची असते. तुमचे जोडीदारावर किती प्रेम आहे? तुम्हाला एकमेकांची किती आठवण येते? तुम्हाला दोघांना काय आवडते? काय आवडत नाही, हे एकमेकांना सांगणे आवश्यक असते. अनेक लोक सांगतात की आम्ही अंतर्मुख आहोत, पण अंतर्मुख राहूनही तुमच्या वागण्यातून प्रेम व्यक्त होऊ शकते.

आनंदी जीवनासाठी बना स्मार्ट वूमन

* रिता गुप्ता

रक्षिता ही एकत्र कुटुंबातील धाकटी सून. कुटुंबाचा रेडिमेड कपडयांचा मोठा व्यवसाय आहे, सुशिक्षित असल्यामुळे लग्नानंतर तिने व्यवसायातही मदत करायला सुरुवात केली. जिथे तिच्या दोन भावजया घरीच असायच्या तिथे ती रोज तयार होऊन दुकानात जायची आणि व्यवसायाला हातभार लावायची, पण तिचे आर्थिक स्वातंत्र्य तिच्या भावजयांइतकेच होते. ती एका कर्मचाऱ्यासारखे काम करायची आणि तरीही तिला मोबदला दिला जात नव्हता.

रक्षिताला या व्यवस्थेत कोणताही दोष दिसत नाही आणि ती केवळ घराबाहेर पडण्याच्या हक्काच्या आनंदातच समाधानी आहे. घरातल्या महिलांना उत्पन्न, बचत, बँक खाती जाणून घेण्याची गरज आहे, असा साधा विचारही तिचे सासरे, भावजया किंवा तिचा नवरा करू शकत नाहीत. काही महिला स्वत:च असे मानतात की, घरातल्या आर्थिक बाबींमध्ये लक्ष देणे हे त्यांचे काम नाही.

शर्मा यांना कोविड झाला आणि वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सर्व काही इतके अचानक घडले की त्यांची पत्नी जीवनात अचानक आलेल्या या धक्कादायक बदलामुळे गोंधळून गेली. आर्थिकदृष्टया शर्मा दाम्पत्य संपन्न होते. त्यांच्या निधनानंतरही भरपूर बँक बॅलन्स, पेन्शन आणि विमा अशी भक्कम आर्थिक तरतूद होती, पण खंत या गोष्टीची होती की त्यांच्या पत्नीला यातले काहीच माहीत नव्हते.

मुलांवर अवलंबित्व

मुलगा मोठा झाल्यानंतर आणि स्वत: निवृत्त झाल्यानंतर शर्मा यांनी पत्नी उर्मलाला आर्थिक स्थिती, बँक आणि ऑनलाइन व्यवहार समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण उर्मलाला वाटले की, पती सर्व काही पाहात असताना उगाचच आपण लक्ष का घालायचे?

आता शर्मा या जगात नसल्यामुळे त्या उर्मला अचानक पूर्णपणे त्यांच्या मुलावर अवलंबून आहेत. त्या एकटया राहण्याइतक्या सक्षम नाहीत. आता पै-पैसाठी मुलावर अवलंबून राहणे त्यांना त्रासदायक ठरत आहे, पण पर्याय नाही.

उर्मला यांच्या बरोबर विरुद्ध, कांचन बाजपेयी आहेत. उशिरा का होईना, पण त्या सर्व शिकल्या आणि स्वत:चा आत्मसन्मान जपत त्या एक स्वावलंबी जीवन जगत आहेत. कधी गरज भासलीच तर त्यावेळी त्या मुलांची किंवा इतर कोणाची तरी मदत घेतात. उर्मलाप्रमाणेच त्याही गृहिणी होत्या आणि त्यांना आर्थिक ज्ञान शून्य होते.

बाजपेयी यांच्या मृत्यूच्या १० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा पत्नीच्या अज्ञानामुळे रुग्णालयाचे बिल भरण्यापासून ते इतर गोष्टींकरता लागणाऱ्या पैशांसाठी त्यांना नातेवाईक आणि मित्रांवर अवलंबून राहावे लागले. नंतर बरे झाल्यावर त्यांनी ठरवले की, आपल्याला आपल्या पत्नीला सर्व काही शिकवायचेच आहे.

६० वर्षीय कांचन बाजपेयी यांना एटीएममधून पैसे कसे काढायचे एव्हढेच माहीत नाही तर विविध ऑनलाइन पोर्टलवरून व्यवहार कसे करायचे हेही माहीत आहे. कुठे, किती पैसे कोणत्या बँकेत आहेत, वारसदार कोण आहे, कोणत्या खात्यातून खर्चाचे पैसे काढायचे आहेत, इत्यादी सर्व माहीत आहे. या आर्थिक सजगतेमुळे त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमताही निर्माण झाली असून मुलांच्या घरात अडगळीचे सामान बनून पडून राहण्याऐवजी त्या स्वत:च्या घरात स्वत:च्या इच्छेनुसार राहातात.

आर्थिक गुलामगिरी

आर्थिक स्वावलंबन प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे असते. नोकरी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र असलेल्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण तरीही आर्थिक स्वातंत्र्यापासून दूर असलेल्या महिलांची संख्या अधिक आहे. हा लेख मुळात त्या महिलांसाठी आहे ज्या श्रीमंत असूनही आर्थिक गुलामगिरीचे जीवन निवडतात.

बहुतेक महिला आर्थिकदृष्टया वडील, पती किंवा मुलावर अवलंबून असतात आणि तरीही त्यांची विचारसरणीच अशी काही असते की या प्रवलंबित्वाचे त्यांना जराही वाईट वाटत नसते. खरंतर हे गुलामगिरीचेच प्रतीक आहे, हे त्यांनी जाणून घेतले पाहिजे.

गरजा आणि त्रास कधीच सांगून येत नाहीत. प्रत्येक परिस्थितीसाठी पती-पत्नीने सुरुवातीपासूनच योजना आखून महत्त्वाच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या पाहिजेत. पती-पत्नी दोघांनी मिळून आपल्या भविष्याची तयारी करावी, पतीने आपल्या कुटुंबाला केवळ घरगुती कामासाठीचा माणूस समजू नये. बरेच लोक त्यांची आर्थिक माहिती मित्र, नातेवाईकांना देतात, पण त्यापासून स्वत:च्या कुटुंबाला अनभिज्ञ ठेवतात. दरम्यानच्या काळात वाईट प्रसंग ओढावल्यास पैसे कुठून येणार, हे घरातील महिलांना समजत नाही.

पावला-पावलावर फसवणूक

रामकली घरात ब्लाऊज शिवायच्या. त्या ओळखीतल्या काही शिंपयांना ब्लाऊज शिवून ग्राहकांसाठी देत असत. त्यांची कमाई चांगली होती. त्या स्वत: कमावलेले पैसे टेम्पो चालक असलेले पती रणबीर यांच्या हातात देऊन निश्चिंत व्हायच्या. एके दिवशी रणबीर यांचा टेम्पो चालवताना अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी रामकली यांना रुग्णालयाचे बिल कसे आणि कुठून भरायचे, हेच समजत नव्हते.

त्यांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली मात्र काही हजार रुपयांशिवाय काहीही सापडले नाही. रणबीर बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांनी पैसे कुठे ठेवले हे विचारता येत नव्हते. वेळेवर पैसे जमा न झाल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी उशीर झाला. शिलाई मशीन सोडून त्यांनी घरातील जवळपास सर्व वस्तू विकल्या आणि कसेबसे उपचार पूर्ण करून कायमचे अपंगत्व आलेल्या आपल्या पतीला घरी घेऊन आल्या.

नंतर असे समजले की, रणबीर यांनी त्यांची आणि रामकली यांची सर्व कमाई व्याजावर मित्राला दिली होती, ज्याने संपूर्ण रक्कम हडप केली होती. या फसवणुकीनंतर, जेव्हा रामकली यांनी पुन्हा ब्लाऊज शिवणे सुरू केले तेव्हा त्यांनी स्वत:हून आपल्या कमाईचा हिशोब ठेवण्यास सुरुवात केली.

दोष कोणाचा?

बिल गेट्स यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे की, जर तुमचा जन्म गरीब कुटुंबात झाला असेल तर तो तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब राहून मेलात तर मात्र तो तुमचाच दोष आहे.

त्याच धर्तीवर एखादी महिला आर्थिकदृष्टया सक्षम असूनही स्वत:चा मूर्खपणा आणि अज्ञानामुळे इतर कोणावर अवलंबून राहून जगत असेल तर ती तिची चूक आहे. अशा अनेक महिला आपल्या आजूबाजूला दिसतील ज्या आर्थिकदृष्टया सक्षम असूनही आपल्या पतीच्या निधनानंतर असहाय्यपणे इतरांवर अवलंबून असतात. सर्व काही असूनही त्यांचे असे परावलंबित्व पाहून दु:ख होते. अनेकदा गृहिणी तर कधी नोकरदार महिलाही पतीच्या सल्ल्याला न जुमानता आर्थिक ज्ञानापासून गाफील राहणे पसंत करतात. हे चुकीचे आहे. अगदी सुरुवातीपासूनच पतीचा सहाय्यक बनून सर्व माहिती ठेवायला हवी. बदलत्या काळानुसार स्वत:ला अपडेट करत राहायला हवे.

सरला माथूर वयाच्या ७२ व्या वर्षीही खूप सक्रिय आहेत. पती माथूर काही वर्षांपूर्वी खूप आजारी पडले तेव्हा सरला यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्यांसह बँक, पोस्ट ऑफिस, पेन्शन, वैद्यकीय विमा अशा सर्व आर्थिक बाबींचा ताबाही स्वत:कडे घेतला. वेगळया राहणाऱ्या मुलांच्या घरी गेल्यावरही त्या त्यांच्यावर अवलंबून राहात नाहीत. घरात सुरुवातीपासूनच पती-पत्नीमध्ये सामंजस्य होते.

हे कटू सत्य आहे की, पती-पत्नीपैकी एकाचे आधी निधन होते. वय कमी असल्यामुळे बहुतेक पत्नी राहाते. अशावेळी एकतर पती निधनाचे दु:ख आणि दुसरे म्हणजे परावलंबित्व, असे दुहेरी संकट कोसळते. त्यामुळेच काळाची गरज ओळखा. एक हुशार महिला बना आणि स्वत:च्या अटींवर जीवन जगण्याची कला अवगत करा. आर्थिक स्वातंत्र्य ही सुखद, आनंदी, जीवनाची गुरुकिल्ली आहे.

New Year 2022 : या 9 टिपांसह जीवन आनंदी बनवा

* राजलक्ष्मी त्रिपाठी

प्रकरण समजले नाही, पण मोठे झाल्यावर प्रकर्षाने जाणवले. मनावर कितीही ओझं असलं तरी ते कुणाला सांगितलं तर मन हलकं होतं. जीवनात आनंद आणण्यासाठी या गोष्टींचे पालन करा :

  1. सकारात्मक विचार करत रहा

सकारात्मक विचारामुळे आजार दूर राहतातच, पण त्यामुळे कार्यक्षमताही वाढते. सर्वात दुःखी व्यक्ती त्याच्या करिअरसह जगतो. माझ्या खराब कामगिरीमुळे मला माझी नोकरी गमवावी लागेल किंवा मला बढती मिळेल की नाही, ही भीती त्यांच्या मनात नेहमीच असते. अशा प्रकारच्या विचारसरणीमुळे त्याची कार्यक्षमता कमी होते. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळावे आणि नोकरीत प्रमोशन मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही नेहमी आनंदी राहून तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. जीवनात काहीही साध्य करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचे पूर्वग्रह न बाळगता, व्यक्तीने फक्त सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. एकदा चांगला विचार करून वाईटात चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल आणि यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल.

  1. नकारात्मक विचार फेकून द्या

जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला नजर टाकली तर तुम्हाला अशी अनेक माणसे भेटतील, जे आपल्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे जाळे जपून ठेवतात. सर्व प्रकारच्या सुखसोयी असूनही, त्यांच्या चेहऱ्यावर फक्त निराशा आहे, याचे कारण त्यांच्या विचारात नकारात्मक भावनांचे प्राबल्य आहे, ज्यामुळे ते चांगल्या गोष्टींवरही आनंदी राहू शकत नाहीत. जीवनात आनंदी रहायचे असेल, तर सर्वप्रथम तुमच्या आजूबाजूला अशा लोकांचा जमाव असेल तर त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवा. त्यानंतर, तुमच्यातील नकारात्मक विचार काढून टाका. युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदने आपल्या एका संशोधनात सांगितले आहे की, तुमच्या मनातील नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमची नकारात्मक विचारसरणी एका साध्या कागदावर लिहून ती फाडून टाकणे. यामुळे तुमच्या नकारात्मक भावना आपोआप संपतात.

  1. भरपूर व्यायाम करा

जीवनात आनंदी राहण्यासाठी निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. टोरंटो विद्यापीठाने या संदर्भात 25 हून अधिक वेळा संशोधन केले आहे. त्यांनी केलेल्या संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, व्यायामाने मूड सुधारतो. यामुळे तुमचा तणाव तर दूर होतोच पण नियमित व्यायामाने तुम्ही डिप्रेशनपासूनही दूर राहता. जवळच्या उद्यानात २-४ फेऱ्या मारून आल्यावर आतून आनंदाची अनुभूती येते. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता तेव्हा तुम्हाला अनेक नवीन लोक भेटतात. उद्यानात गेल्यावर तिथल्या मुलांना खेळताना पाहून तुमचा सगळा ताण विसरता. तुम्हाला तुमचे बालपणीचे दिवस आठवू लागतात, जे नक्कीच आनंदाचे असतात.

  1. गाढ झोप

वेळोवेळी झालेल्या विविध सर्वेक्षणांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, निरोगी राहण्यासाठी गाढ झोप केवळ आवश्यक नाही तर ती तुमच्यातील नकारात्मकताही दूर करते. जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुम्ही पूर्णपणे ताजेतवाने असता. त्यावेळी तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची इच्छा तुमच्यामध्ये जागृत होते, ज्यामुळे तुम्हाला तुमचे काम चांगल्या पद्धतीने करण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा तुम्ही एखादे काम चांगल्या पध्दतीने करता, तेव्हा तुमच्या आत आपोआपच विलक्षण आनंद संचारतो. त्यामुळे गाढ झोप घ्या, कारण गाढ झोप तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर करते.

  1. चांगल्या आठवणी जतन करा

नेहमी आनंदी राहण्यासाठी तुमच्या चांगल्या आठवणी जतन करा. तुमच्यासोबत काही वाईट घडले असेल तर त्याबद्दल विसरून जा आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या संदर्भात कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ थॉमस गिलोविच यांनी एक संशोधन केले आहे, ज्यामध्ये असे समोर आले आहे की, महागड्या वस्तूंची खरेदी करूनही, तुमचे चांगले क्षण लक्षात ठेवून आणि त्या लोकांसोबत वेळ घालवून तुम्हाला मिळणारा आनंद मिळत नाही. जे तुमच्या हृदयाच्या जवळ आहेत आणि ज्यांच्याशी तुम्ही तुमच्या भावना आणि विचार शेअर करू शकता. सत्य हे आहे की चांगल्या आठवणीतून मिळणारा आनंद कधीच संपत नाही. स्वत:ला ताजे ठेवण्यासाठी, तुमच्या जुन्या मित्रांना भेटा आणि त्यांच्यासोबत गेलेल्या दिवसांच्या आठवणी पुन्हा ताज्या करा, तुम्हाला खूप आनंद मिळेल.

  1. थोडी मदत खूप आनंद

कधीतरी एखाद्याला मदत करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला इतका विलक्षण आनंद मिळेल की तुमचे मन कोणत्याही मदतीसाठी नेहमी तयार राहील. सत्य हे आहे की एखाद्याच्या चेहऱ्यावर थोडेसे हसू आणण्यात जो आनंद आणि दिलासा मिळतो तो खूप संपत्ती आणि मोठे घर खरेदी करूनही मिळणार नाही. आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडा वेळ काढून एखाद्याला मदत करण्यात अपार आनंद मिळतो, हे वेळोवेळी केलेल्या विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे.

  1. तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा

जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी असाल आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय असाल तेव्हाच तुमच्या आयुष्यात आनंदाचा समावेश होऊ शकतो. तुमच्या कामात यश मिळविण्यासाठी, निरुपयोगी मूर्खपणाऐवजी तुमची प्राथमिकता असलेल्या गोष्टी करणे फार महत्वाचे आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमच्या नोकरी आणि व्यवसायात यशाची शिखरे गाठू शकताच, शिवाय तुम्ही स्वतःसाठी आनंदाचे जग निर्माण करू शकता.

  1. स्वतःवर प्रेम करा

सहसा, स्वतःचा, तुमच्या आनंदाचा विचार करण्याऐवजी तुम्ही तुमचे अर्धे आयुष्य इतरांबद्दल विचार करण्यात वाया घालवता. आनंदी राहण्यासाठी तुम्ही स्वतःबद्दल विचार करणे, स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे आहे. इतरांचा विचार करण्याबरोबरच स्वतःचाही विचार करा. जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे हे खरे आहे, पण हेही तितकेच खरे आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला समाधानी ठेवता तेव्हाच तुमच्या आयुष्यात आनंद आणता येतो. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि तुमचे आवडते काम करा, स्वतःवर प्रेम करा, तरच तुम्ही स्वतः आनंदी राहू शकाल आणि इतरांवरही प्रेम कराल.

  1. जाऊ द्या प्रवृत्ती विकसित करा

सहसा लोकांना ही सवय असते की ते त्यांच्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी सहजासहजी विसरत नाहीत. हे खरे आहे की जर एखाद्याने आपले वाईट केले असेल तर त्याची ताकद नेहमीच टिकते. पण जीवनात आनंदी राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे भूतकाळ विसरून पुढे जाण्याची कला आत्मसात करणे. स्वतःमध्ये जाऊ देण्याची प्रवृत्ती विकसित करा आणि इतरांना क्षमा करून जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आत जे घडले ते विसरण्याची भावना असेल, मग तुम्हाला फक्त त्या गोष्टी आठवतील, ज्या तुम्हाला आनंद देतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें