अशी वाढवा शरीराची प्रतिकारकशक्ती

* गरिमा पंकज

हिवाळयात ज्यांची प्रतिकारकशक्ती कमकुवत असते ते अनेकदा आजारी पडतात. या ऋतूत प्रदूषणही उच्चांकावर असते. हवेतील गारवा शरीराची काम करण्याची क्षमता कमी करतो. अशा परिस्थितीत प्रतिकारकशक्ती चांगली असणे अत्यंत गरजेचे असते.

प्रतिकारकशक्ती म्हणजे काय?

रोग प्रतिकारकशक्ती ही आपल्या शरीरात असलेल्या विषारी द्रव्यांशी लढण्याची क्षमता असते. शरीरात टॉक्सिन असण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की, जीवाणू, विषाणू किंवा अन्य नुकसानकारक परजीवी. शरीराच्या आजूबाजूलाही खूप सारे जिवाणू, विषाणू आणि संसर्ग असतो जो आपल्याला अनेक प्रकारचे आजार देतो. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुस आणि श्वसनमार्गाशी संबंधित समस्याही निर्माण होतात.

या बाह्य संक्रमणांपासून, प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी शरीरात एक संरक्षण यंत्रणा असते ज्याला रोग प्रतिकारकशक्ती किंवा प्रतिकारशक्ती म्हणतात. तुमची प्रतिकारकशक्ती मजबूत असेल, तर बदलते हवामान आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांपासून तुमचे संरक्षण होते.

चला, रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करण्याचे उपाय जाणून घेऊया :

शारीरिक सक्रियता महत्वाची

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी तुमचे शरीर सक्रिय असणे गरजेचे असते. शारीरिक हालचालींमुळे एंडोर्फिन नावाचे संप्रेरक बाहेर पडते, जे तणाव कमी करते, मन प्रसन्न ठेवते आणि शरीराची कार्यक्षमता वाढवते. जेव्हा तुम्ही काम करत नाही आणि भूक लागल्यावर अन्न खात नाही, तेव्हा तुम्हाला पोटाशी संबंधित अनेक आजार होतात. शारीरिक निष्क्रियतेचा तुमच्या शरीराच्या प्रतिकारकशक्तीवरही परिणाम होतो. हे टाळण्यासाठी व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा.

व्यायामामुळे तुमच्यातील क्षमता वाढते. पचनशक्ती चांगली राहाते. नियमित व्यायामामुळे लठ्ठपणा, टाईप २ मधुमेह आणि हृदयरोग तसेच व्हायरल आणि जीवाणू, विषाणूंच्या संसर्गासारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो. व्यायामामध्ये योगासह चालणे आणि सायकलिंगचा समावेश करा.

एरोबिक व्यायाम : जसे की चालणे, जॉगिंग, सायकलिंग आणि दीड तास, उच्च तीव्रतेचा एरोबिक व्यायाम जसे की धावणे तसेच रोज ४-५ मैल चालण्याची सवयही ठेवायला हवी. मार्च २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, तुम्ही दररोज जितके जास्त चालाल, तितकी तुमचा अकाली मृत्यू होण्याची शक्यता कमी होते. चालणे आणि व्यायाम केल्याने आयुष्य वाढते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या मते, आठवड्यातून किमान दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगही तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरते. ते तुमची हाडे मजबूत करते, रोग दूर ठेवते आणि पचन सुधारते.

भरपूर झोप घ्या

झोप ही अशी वेळ असते जेव्हा तुमचे शरीर मुख्य रोग प्रतिकारक पेशी आणि रेणू जसे की साइटोकिन्स (एक प्रकारचे प्रथिन जे सूज रोखण्यासाठी लढू शकते किंवा ती वाढवू शकते) टी कोशिका (एक प्रकारची सफेद रक्त कोशिका जी प्रतिरक्षा प्रणाली नियंत्रित ठेवते) आणि इंटरल्यूकिन १२ ला नियंत्रित ठेवते. पुरेशी विश्रांती घेतल्याने आपल्या शरीराची नैसर्गिक प्रतिकारकशक्ती मजबूत होते.

बिहेवियरल स्लीप मेडिसिनच्या जुलै-ऑगस्ट २०१७च्या अंकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, निरोगी तरुणांच्या तुलनेत (ज्यांना झोपेची समस्या नव्हती), निद्रानाश असलेल्या तरुणांना लस दिल्यानंतर त्यांना फ्लू होण्याची शक्यता जास्त असते.

झोपेच्या कमतरतेमुळे कोर्टिसोलची पातळीही वाढते जी रोग प्रतिकारकशक्तीसाठी निश्चितच चांगली नसते. झोपेच्या कमतरतेमुळे रोग प्रतिकारकशक्ती कमी होते आणि आजाराशी लढण्याची किंवा बरे होण्याची क्षमताही कमी होते.

‘नॅशनल स्लीप फाउंडेशन’ सर्व प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी ७ ते ९ तासांची झोप घेण्याची शिफारस करते. झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद करणे, फोनपासून दूर राहणे आणि हिंसक किंवा तणावपूर्ण मालिका किंवा संभाषण टाळणे आवश्यक असते.

आहारात बदल

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि आहारात काही बदल करून तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता तसेच तुमची प्रतिकारकशक्तीही वाढवू शकता. आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुमच्या शरीराला पोषण मिळेल तसेच रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल. चिप्स, मॅगी, फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझ्झा, डबाबांद मिळणारे खाद्यपदार्थ, सोडा, शीतपेय इत्यादींचा चुकूनही तुमच्या आहारात समावेश करू नका. ज्यूस, लस्सी इत्यादींसोबत उकडलेली अंडी, हंगामी ताजी फळे, लापशी, सुकामेवा, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा आहारात समावेश करा.

प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी टोमॅटोचा आहारात नक्कीच समावेश करा. यामध्ये असलेले लाइकोपिन, के जीवनसत्त्व, क जीवनसत्त्व आणि फायबर रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे संत्री, लिंबू, आवळा यासारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, जे सर्व प्रकारच्या संक्रमणांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास मदत करते.

या सर्वांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवा. लसूण शरीरात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स बनवून शरीरातील रोगप्रतिकारकशक्तीला रोगांशी लढण्याची ताकद देते. त्यात अॅलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला कोणत्याही प्रकारच्या संसर्ग आणि जीवाणूंशी लढण्याची ताकद देतो. पालक, मशरूम, मोड आलेली कडधान्ये इत्यादीदेखील तुम्हाला आतून मजबूत बनवतात.

आनंदी रहा

जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोकळेपणाने हसण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने, तुम्ही तणाव कमी करू शकता आणि दीर्घकाळपर्यंत आजारी पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. याशिवाय तुमच्या नात्याला वेळ द्या. सामाजिक संबंध चांगले असल्यास सामाजिक आपलेपणाची सुखद भावना वाढीस लागते. तुम्ही मनाने आनंदी असाल, तर तुमचे शरीर बळकट होईल आणि वातावरणातील रोगांचे विषाणू तुमच्यावर हल्ला करू शकणार नाहीत.

निसर्गासोबत वेळ घालवा

तुमची रोग प्रतिकारकशक्ती सुधारण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ घालवा. निसर्गाचा सहवास शुद्ध हवा आणि आनंदी मन देते. झाडे आणि वनस्पतींचे सान्निध्य आपल्याला अनेक प्रकारे रोगमुक्त करते, आपली श्वसनसंस्था मजबूत करते. दररोज थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा, जेणेकरून सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणे तुमच्यावर पडतील. ऊन हे ड जीवनसत्त्वाचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्यामुळे हाडे बळकट होतात तसेच रोग प्रतिकारकशक्तीही मजबूत होते.

अस्वच्छतेपासून दूर रहा

सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवण्यासोबतच आपल्या शारीरिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण अस्वच्छता ही अनेक रोगांचे कारण असते.

कोरोनाव्हायरस: मग तिसरी लाट मुलांवर निष्प्रभावी होईल

* पारुल भटनागर

आमच्या मुलांना जगातील प्रत्येक आनंद मिळावा, त्यांना कोणत्याही रोगाचा स्पर्श होऊ नये, हीच सर्व पालकांची इच्छा असते. यासाठी ते त्यांच्या प्रत्येक आनंदाची, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेतात. पण आजची परिस्थिती वेगळी आणि जास्त कठीण आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

कोरोनाची तिसरी लाट मुलांवर जास्त पडण्याची भीती पालकांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीत भीती बाळगण्याची नव्हे तर मुलांच्या प्रतिकारशक्तीला चालना देण्याची गरज आहे जेणेकरुन ते रोगाविरूद्ध लढू शकतील.

चला, मुलांची प्रतिकारशक्ती कशी टिकवून ठेवायची ते जाणून घेऊया:

जेवण हे फळे आणि भाज्यांनी समृद्ध असावे

मुले फळे आणि भाज्या खाण्यास कचरतात. याऐवजी त्यांना फास्ट फूड खाणे जास्त आवडते, जे कदाचित त्यांची भूक शमवते, परंतु ते त्यांच्या शरीराला चरबीयुक्त आणि आतून पोकळ बनविण्याचे कार्य करते, तर फळे आणि भाज्या अँटीऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करतात. यामुळे आपल्या मुलामध्ये उर्जेची पातळी देखील राखली जाते आणि तो आपली सर्व कामे संपूर्ण उर्जेसह करण्यास सक्षम असतो.

क्रिएटिव्ह आयडिया : जर तुम्ही फळ आणि भाज्या थेट मुलांना सर्व्ह केल्या तर मुले ते  खायला टाळाटाळ करतील. अशा परिस्थितीत आपण त्यांना आपल्या क्रिएटिव्ह पाककलेद्वारे फळे आणि भाज्या सर्व्ह करा. डाळी आणि भाजीपाल्याचे कटलेट आणि भाज्यांचे रंगीबेरंगी सँडविचेस, ज्यामध्ये त्यांच्या आवडीचे सॉसेज असतील बनवून त्यांना सर्व्ह करा.

दुसरीकडे फ्रुट कटरसह फळांना इच्छित आकारात कापून त्यांना द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमची ही सर्जनशीलता त्यांची फळे आणि भाज्यांबद्दलची चटक वाढविण्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल.

ड्रायफ्रूट्स [कोरडे फळे] मजबूत बनवतात

जे मुले वाढत्या वयातील आहेत, त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असते, अन्यथा लहान वयात त्यांच्यात बर्‍याच कमतरता राहून जातात, ज्या नंतर त्यांच्यासाठी समस्या बनू शकतात.

म्हणूनच त्यांना आतून मजबूत करण्यासाठी दररोज ड्रायफ्रूट्स सर्व्ह करणे आवश्यक आहे. ड्रायफ्रूट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व फायबर समृद्ध असल्याने ते रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात, तसेच मुलांचे मेंदूचे आरोग्य आणि त्यांची स्मृती [स्मरणशक्ती] देखील तीव्र करतात. त्यातील अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे ते विषाणूंविरूद्ध आणि विविध प्रकारच्या हंगामी रोगांविरुद्ध लढायला मदत करतात.

क्रिएटिव्ह आयडिया : जर मुलांना थेट ड्रायफ्रूट्स खाऊ घालणे त्रासदायक होत असेल तर आपण ड्रायफ्रूट्सची पेस्ट बनवून दुधात मिसळून देऊ शकता. त्यांच्या आवडीच्या गुळगुळीत पदार्थात जोडून देऊ शकता किंवा गोड डिशमध्ये जोडू शकता. यासह मूल त्यांना आवडीने खाईल आणि आपला तणाव देखील कमी होईल.

उत्तम दही

आपण आपल्या मुलांना दिवसातून एकदा जेव्हा त्यांना भूक लागेल तेव्हा दही किंवा योगर्ट अवश्य भरवले पाहिजे कारण ते अशा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण असते, ज्याची शरीराला सर्वात जास्त आवश्यकता असते. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे दात आणि हाडे यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरते.

त्यामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डीची उपस्थिती, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याबरोबरच चयापचय मजबूत बनविण्यासाठी देखील कार्य करते. त्यात मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंकची उपस्थिती शरीरात विषाणूमुळे कोणत्याही प्रकारची जळजळ आणि सूज होऊ देत नाही, यामुळे हंगामी रोगदेखील दूर राहतात.

यात स्वस्थ प्रोबायोटिक्स असतात, जे जंतूपासून संरक्षण करण्याचे कार्य करतात. संशोधनात हे सिद्ध झाले आहे की जर मूल दररोज दही खात असेल तर त्याला सर्दी-खोकला, कान आणि घशात दुखण्याची शक्यता 19% कमी होते.

क्रिएटिव्ह आयडिया : आपण आपल्या मुलांना दहीमध्ये चॉकलेट सिरप, गुलाब सिरप आणि ड्राई फ्रूट्स घालून त्यांची चव वाढवू शकता किंवा आंबा, रासबेरी, ब्लूबेरी, अल्फोंसो मॅंगो, स्ट्रॉबेरी दही देऊन आपण त्यांच्या आरोग्याची खास काळजी घेऊ शकता.

नो सप्लिमेंट ओन्ली न्यूट्रिशन [फक्त पौष्टिक आहार, नको पूरक आहार]

जोपर्यंत आपली प्रतिकारशक्ती बळकट होत नाही तोपर्यंत आपण रोगांविरूद्ध लढू शकणार नाहीत. म्हणूनच आज या साथीच्या काळात प्रत्येकजण भले त्यास विषाणूची लागण झाली असो वा नसो स्वतःचे रक्षण करण्यासाठी आरोग्य पूरक आहार म्हणजेच जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण पूरक आहार घेत आहेत जेणेकरून ते रोग प्रतिकारशक्ती वाढवू शकतील.

पण प्रश्न असा आहे की मुलांना पूरक आहार द्यावा का? या संदर्भात फरीदाबादच्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे ज्येष्ठ सल्लागार बालरोग व नियोनॅटोलॉजिस्ट डॉ. सुमित चक्रवर्ती सांगतात की तुम्ही

तुमच्या मुलांसाठी पूरक आहाराचा आधार घेऊ नका, कारण त्याचा त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. ही औषधे शरीरात उष्मा निर्माण करून आंबटपणा, उलट्या यांना कारणीभूत ठरतात, ज्यामुळे मुले खायलाही टाळाटाळ करू लागतात. अशा परिस्थितीत, त्यांना खाण्यात फक्त पौष्टिक आहार द्या.

त्यामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यासाठी लिंबूवर्गीय फळे, अँटिऑक्सिडेंट्स आणि लोहासाठी बीटरूट, जीवनसत्त्वासाठी 3-4 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांना दिवसाला 10-12 बदाम आणि 2-3 अक्रोड आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि जीवनसत्त्वे व खनिजांची कमतरता दूर करण्यासाठी नारळाचे पाणी देत ​​रहा.

वेळेवर झोप घेण्यासह रोग प्रतिकारशक्ती वाढवा

संशोधनात हे सिद्ध झाले आहे की जे लोक वेळेवर झोपत नाहीत किंवा पुरेशी झोप घेत नाहीत, त्यांच्यात हृदयाशी संबंधित समस्यांसह कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात सोडला जातो, जो तणाव वाढविण्याचे काम करतो. तसेच फ्लूशी लढणार्‍या अँटीबॉडीजही अर्ध्या कमी होतात. तुम्हाला माहिती आहे काय की रात्री 6-7 तास संपूर्ण झोप घेतल्यामुळे सायटोकीन नावाचा संप्रेरक [हार्मोन] तयार होतो, जो रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कार्य करतो.

जर्मनीतील संशोधकांनी सांगितले की चांगली आणि गाढ झोप घेतल्याने मेमरी पेशी बळकट होतात, ज्या संक्रमणाशी लढण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. म्हणूनच आपल्या मुलांमध्ये वेळेवर झोपायची सवय विकसित करा.

शारीरिक क्रियाकलापांद्वारे प्रतिकारशक्ती वाढवा

कोरोना विषाणूमुळे मुलं घरातच कैद झाली आहेत आणि त्यामुळे सर्जनशील क्रियाकलाप नसल्याने ते अतिशय तणावाच्या वातावरणात राहू लागले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी आणि त्यांची तंदुरुस्ती, रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी शारीरिक सर्जनशील गोष्टींसह त्यांना जोडणे फार महत्वाचे आहे.

यासाठी आपण त्यांना ऑनलाइन नृत्य, झुम्बा आणि फिटनेस क्लासेसमध्ये सामील करू शकता. जर घरात थोडी मोठी जागा असेल तर मग हाइड अँड सीक गेम खेळू द्या, कारण यामुळे मुलांचे व्हिज्युअल ट्रॅकिंग बळकट होण्याबरोबरच विनोदबुद्धी [सेंस ऑफ ह्युमर] देखील चांगली होते आणि पळल्याने शरीरही बळकट होते. तसेच 5 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांची फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी खोल श्वासोच्छ्वास व गोलंदाजीच्या व्यायामावर जोर द्या. जेव्हा आपण स्वत: त्यांच्याबरोबर हे सर्व कराल तेव्हा मुले ते आनंदाने करतील. याद्वारे आरोग्य आणि मनोरंजन दोन्ही मिळतील.

Winter Special: हिवाळ्यात आरोग्यदायी पौष्टिक भाज्या..

पाककृती * नीरा कुमार

  • मेथी-सांडग्यांची भाजी

marathi-food

साहित्य

* ४ कप मेथीची पानं

* अर्धा कप सांडगे

* १ मोठा चमचा आलंलसणीची पेस्ट

* १ कप बारीक चिरलेला कांदा

* पाव कप दही
* पाव कप टोमॅटो प्यूरी

* अर्धा लहान चमचा हळद पावडर

* १ लहान चमचा धणे पावडर

* पाव लहान चमचा लाल तिखट

* ३ मोठे चमचे रिफाइंड तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

मेथीच्या पानांना चिमूटभर हळद पावडर व पाव लहान चमचा मीठ चोळून १५ मिनिटं तसेच ठेवा. मग पाण्याने धुऊन बारीक चिरा. एका कढईत तेल गरम करून सांडगे लाल होईपर्यंत तळून घ्या. मग त्यांचे तुकडे करा. एका प्रेशर पॅनमध्ये उरलेलं तेल गरम करून त्यामध्ये आलंलसणीची पेस्ट परता. मग त्यावर कांदा पारदर्शी होईपर्यंत परता. टोमॅटो आणि इतर सर्व सुके मसाले टाकून परता. जेव्हा हे साहित्य तेल सोडू लागेल तेव्हा त्यामध्ये तुकडे केलेले सांडगे टाका आणि १ कप पाणी टाकून एक शिटी होईपर्यंत शिजवा, कुकर थंड झाला की त्यामध्ये मेथीची पानं व इच्छेनुसार ग्रेव्ही ठेवण्यासाठी गरम पाणी ओता.    ५ मिनिटं झाकण ठेवून शिजवा. चविष्ट सांडग्याची भाजी तयार आहे.

  • पाकलवडी

marathi-food

साहित्य

* २० पालकाची पानं
* अर्धा कप जाडसर बेसन

* पाव लहान चमचा हळद पावडर

* अर्धा लहान चमचा लाल तिखट

* २ लहान चमचे चिंचेचा कोळ

* १ मोठा चमचा पांढरे तीळ फोडणीसाठी

* १ मोठा चमचा रिफाइंड ऑइल

* चाटमसाला व मीठ चवीनुसार.

कृती

पालकाची पानं व तीळ सोडून इतर सर्व साहित्य बेसनमध्ये मिसळा. मग थोडंसं पाणी टाकून घट्ट पेस्ट बनवून घ्या. पालकाची पानं धुऊनपुसून ठेवा. मग एक पान घ्या आणि त्याच्या मागच्या बाजूला थोडीशी बेसनाची पेस्ट लावा. मग त्यावर दुसरं पान ठेवून पुन्हा पेस्ट लावा. आता त्यावर तिसरं पान ठेवून पुन्हा तीच कृती करा. मग याचा रोल बनवा. थोडी पेस्ट वरूनही लावा. अशा प्रकारे सर्व रोल बनवून १० मिनिटं वाफवून घ्या. थंड झाल्यावर याचे तुकडे करा. एका नॉनस्टिक कढईत तेल गरम करून त्यावर तीळ टाका आणि मग त्यावर तुकडे टाकून उलटसुलट करा. जेव्हा तुकडे लाल होतील तेव्हा सर्व्हिंग डिशमध्ये काढून चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

  • कांदापात-गाजराची भाजी

marathi-food

साहित्य
* २५० ग्रॅम पातीचा कांदा

* २ मध्यम आकाराची गाजरं

* १ मध्यम आकाराचा बटाटा

* ५ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या

* अर्धा लहान चमचा जिरे

* पाव लहान चमचा हळद पावडर

* १ मोठा चमचा मस्टर्ड ऑइल

* लाल तिखट आणि मीठ चवीनुसार.

कृती
कांद्याची पात धुऊन सफेद भागासहित बारीक चिरून घ्या. गाजर सोलून त्याचे गोल तुकडे कापा. बटाटा सोलून त्याचे लहान लहान तुकडे करा. एका कढईत तेल गरम करून जिरं व हिरव्या मिरचीची फोडणी घाला. मग हळद, मीठ टाकून सर्व भाज्या टाका. कढईवर झाकण ठेवून भाजी शिजू द्या. पाणी अजिबात घालू नका. भाजीतील पाणी सुकले की भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढा.

आरोग्यदायी पौष्टिक भाज्या

पाककृती * नीरा कुमार

  • सरसोंची (मोहरी) भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम सरसों साग (मोहरीची भाजी) जाडसर चिरलेली

* १०० ग्रॅम फ्रोजन कॉर्न

* १ मोठा चमचा उभी चिरलेली लसूण

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* १ मोठा चमचा मस्टर्ड ऑइल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका कढईत तेल गरम करून लसूण व लाल मिरच्यांचे तुकडे परता. यामध्ये भाजी व मक्याचे दाणे टाका. जर फ्रोजन कॉर्न नसतील तर मक्याचे दाणे उकडून टाका. आता मीठ टाका. ६-७ मिनिटांत भाजी शिजेल. ही भाजी मक्याची वा बाजरीची भाकरी अथवा पराठ्यांसोबत खूप छान लागते.

  • मूगडाळ-मुळ्याची भाजी

healthy-food-recipe

साहित्य

* ५ कप पानांसहित चिरलेली मुळ्याची भाजी

* अर्धा कप भिजवलेली मूगडाळ

* १ लहान चमचा बारीक चिरलेलं आलं व हिरवी मिरची

* १ लहान चमचा ओवा

* २ अख्ख्या लाल मिरच्या

* पाव लहान चमचा हळद पावडर

* १ मोठा चमचा राईचं तेल

* मीठ चवीनुसार

कृती

एका कढईत तेल गरम करून ओवा व लाल मिरचीची फोडणी घाला आणि त्यामध्ये मुळ्याची भाजी व मूगडाळ टाका. मग हळद पावडर, आलं, मिरची आणि मीठ टाका. भाजीवर झाकण ठेवून ७-८ मिनिटं शिजू द्या. मग मुळा व डाळ शिजली की भाजी सर्व्हिंग बाउलमध्ये काढा.

  • पालक कबाब

healthy-food-recipe

साहित्य

* २५० ग्रॅम ब्लांच केलेला पालक

* पाव कप चण्याची डाळ अर्धा तास पाण्यात भिजवलेली

* पाव लहान चमचा गरममसाला

* १ मोठा चमचा तांदळाचं पीठ

* १०० ग्रॅम कुस्करलेलं पनीर

* २० मनुका

* पाव लहान चमचा काळीमिरी पावडर

* २ लहान चमचे चिरलेली कोथिंबीर

* कबाब शेकवायला पुरेसं तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

भिजलेल्या चण्याच्या डाळीत पाव कप पाणी आणि पाव लहान चमचा मीठ घालून प्रेशरकुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवा. डाळ कोरडी होऊ द्या. डाळ थंड करून मॅशरने मॅश करा. ब्लांच केलेल्या पालकमधील पाणी काढून टाका आणि पालक मिक्सरमध्ये बारीक करा. मग यामध्ये मॅश केलेली डाळ, गरममसाला, पाव लहान चमचा मीठ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिसळून घ्या. यानंतर पनीरमध्ये काळीमिरी पावडर, मनुका, कोथिंबीर आणि चिमूटभर मीठ मिसळा. आता पालकचं थोडं थोडं मिश्रण घेऊन हातावर पसरवा. त्यामध्ये पनीरचं मिश्रण भरून बंद करा. जेव्हा सर्व कबाब बनवून तयार होतील तेव्हा नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून कबाब शेकवा. दोन्ही बाजूंनी परतून लालसर रंग येऊ द्या. स्वादिष्ट कबाब तयार आहेत.

रोगप्रतिकारक शक्ति वाढवणारे खाद्यपदार्थ

*  प्रतिनिधी

तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून हे ऐकले असेल की तुमची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत आहे. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा खोकला, सर्दी किंवा इतर आजारांना लवकर बळी पडता. आजारी पडण्याचा प्रतिकारशक्तिशी काय संबंध आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल? आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुमची रोगप्रतिकारक शक्ति शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. तुमची रोगप्रतिकार शक्ति जितकी अधिक कणखर होईल तितके तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.

हवामान कोणतेही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति योग्य ठेवणे महत्वाचे आहे.

आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होतो. पुढील खाद्यपदार्थ आपली रोगप्रतिकार शक्ति बळकट करतात :

बदाम : दररोज ८-१० भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शरीराची प्रतिकारशक्तिच वाढते असे नाही तर मेंदूला ताणतणावाशी सामोरे जाण्याची शक्तिदेखील मिळते. व्हिटॅमिन ई शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींना वाढविण्यास मदत करते, ज्या विषाणू आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. बदामात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी बनवते तसेच सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया कमी करते.

लसूण : ही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट बनवून आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. यामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्याची शक्ति देतो.

आंबट फळे : संत्री, लिंबू, अननस आणि ईडलिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. या फळांच्या सेवनाने तयार झालेल्या अँटीबॉडीज पेशींच्या पृष्ठभागावर एक कोटिंग बनवतात, ज्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, जे कार्डियो व्हॅस्क्युलर रोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आंबट फळांचा समावेश अवश्य करा.

पालक : पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पालेभाजीला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये फोलेट नावाचा घटक आढळतो, जो शरीरात नवीन पेशी तयार करण्याबरोबरच त्या पेशींमध्ये असलेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याचेही काम करतो. यामध्ये असलेले फायबर लोह, अँटिऑक्सिडेंट घटक आणि व्हिटॅमिन सी शरीराला सर्व प्रकारे निरोगी ठेवतात. उकडलेल्या पालक भाजीच्या सेवनाने पचनयंत्रणा योग्यरित्या कार्य करते.

मशरूम : यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करण्यात मदत करते. यात सेलेनियम नावाचे मिनरल, अँटीऑक्सिडेंट घटक, व्हिटॅमिन बी आणि नाइसिन नावाची खनिजे आढळतात. यांमुळे मशरूममध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीट्यूमर घटक आढळतात. शिटाके, मिटाके और रेशी नावाच्या मशरूमच्या प्रजातीमध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती बळकट करणारे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात.

ब्रोकोली : यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त ग्लूटाथिओन नावाचा एक अँटीऑक्सिडेंट घटकदेखील आढळून येतो. ही एक अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ति बळकट करते, ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात सहजपणे करू शकता. थोडयाशा पनीरमध्ये वाफवलेल्या ब्रोकोलीचे मिश्रण करून एक चविष्ट कोशिंबीर तयार केली जाऊ शकते, ज्याच्या सेवनामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम देखील मिळते.

लाल शिमला मिरची : ही भोजनाचा स्वाद तर वाढवतेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटनि सी पुरेशा प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ असते.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें