आरोग्य परामर्श

* डॉक्टर ज्योती बाली, इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट बेबीसून फर्टिलिटी अण्ड आईवीएफ सेंटर

प्रश्न : माझं वय ४० वर्षे आहे. मला खूप जास्त वैजायनल डिस्चार्ज होतं. हे कंडिशन खूपच त्रासदायक वाटतं. असं का होतं आणि यावर उपाय शक्य आहे का?

उत्तर : सामान्यपणे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये वैजायनल डिस्चार्ज एक सामान्य समस्या आहे. तुमची स्थिती सामान्य नाही आहे. तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. दोन्ही स्त्रावाच्या दरम्यान योनीमध्ये खाज, जळजळ, पांढरा रंगाचं दाट डिस्चार्ज, स्किन रॅशेज, सूज, वारंवार लघवीला होणं आणि लघवी करतेवेळी वेदनेसारख्या समस्या निर्माण होतात. असामान्य योनी स्त्रावाची अनेक कारणे असू शकतात. जसे की, यौनसंबंधाच्या दरम्यान होणारं संक्रमण रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं व ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या योनीमध्ये फंगल इस्ट नावाचा संक्रमण रोग होऊ शकतो. स्त्रिया सुरुवातीला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे कधीकधी गर्भाशय कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता निर्माण होते. तसंच सुरुवातीलाच याकडे लक्ष दिलं तर यावर उपचार केले तर निश्चितपणे ही समस्या बरी होऊ शकते. परंतु दुर्लक्ष वा बराच उशिराने उपाय केल्यानंतर गंभीर वा असाध्य रोगदेखील होऊ शकतो .

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. मला वारंवार एंडोमिट्रीओसीसची समस्या होत असते. मी सर्जरीद्वारे रिमुव्हदेखील केलं आहे. परंतु पुन्हा एंडोमिट्रीओसीस सांगितलं जातंय. मला पिरियड्समध्ये अधिक स्त्राव तसंच वेदना होतात.

उत्तर : गर्भाशयात होणारी समस्या आहे, ज्यामध्ये गर्भाशयाच्या आतील थर बनवणारा एंडोमिट्रीयम लाइनिंगमध्ये असामान्य वाढ होऊ लागते आणि तो गर्भाशयाच्या बाहेर पसरू लागतो. कधी कधी एंडोमिट्रीयमचा थर गर्भाशयाच्या बाहेरच्या थरा व्यक्तीरिक्त अंडाशय, आतडे आणि इतर प्रजनन अंगांमध्येदेखील पसरला जातो. ज्याला एंडोमिट्रीओसिस म्हटलं जातं. मोठया एंडोमिट्रीयम थरामुळे प्रजनन अंगात जसं फेलोपियन ट्यूब, अंडाशयाच्या क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. इंडोमिट्रीओसिस स्त्रियांमध्ये पिरीएडच्या दरम्यान अधिक ब्लीडिंग आणि वेदनेचं कारण देखील बनतं. यामुळे स्त्रियांना खूप त्रास होतो तर दुसरीकडे रिप्रोडक्टिव्ह वयामध्ये हे इन्फर्टिलिटीचं कारणदेखील बनतं. ही समस्या एखाद्या बाहेरच्या संक्रमणामुळे नसून शरीराच्या आंतरिक प्रणालीच्या कमतरतेमुळे होते. इंडोमिट्रीओसिसच्या अंडाशयापर्यंत पसरणाऱ्या या भागावरती सिस्टदेखील बनतं.

मेडिकल ट्रीटमेंटने आर्टिफिशियल मेनोपोजच्या माध्यमातून एंडोमिट्रीओसीसला रोखलं जातं. यासाठी हार्मोनल औषधं वा महिन्यातून एक इंजेक्शन पुरेसं असतं. याव्यतिरिक्त इंडोमिट्रीओसिसच्या समस्येने ग्रस्त रुग्णाला जर आई व्हायचं असेल तर यासाठी आययुआय आणि आयव्हीएफसारख्या स्पेशल ट्रीटमेंट आहेत. जर रुग्णाचे वय अधिक असेल आणि अनेक सर्जरी झल्या असतील तर गर्भाशय आणि ओवरीज काढून हिस्टरेक्टोमी याचा सर्वाधिक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : मी ७ महिन्याची गर्भवती आहे. माझं वय २८ वर्षे आहे. जसजशी वेळ जवळ येतेय, प्रसुतीबद्दल विचार करून मी घाबरुन जाते. कारण मी असं ऐकलंय की प्रसुतीच्या वेदना खूपच असहनीय असतात. मला जाणून घ्यायचंय की मी पेनलेस डिलिव्हरी करू शकते का? या पद्धतीने प्रसुती केल्यानंतर माझ्या व माझ्या होणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर कोणता दुष्परिणाम तर नाही ना होणार?

उत्तर : अलीकडे एपीड्यूरल एनेस्थेशियाद्वारे पेनलेस प्रसुती करणं खूपच सामान्य प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे सुरक्षित आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आहेत. तसंच मुलासाठी आणि आईसाठीदेखील या प्रक्रियेद्वारा प्रसुतीच्या असहनीय वेदनेपासून वाचू शकतात. या प्रक्रियेत एका छोटया कॅथेटरच्या मदतीने एपीड्यूरल आणि एनेस्थेशियाला लोअर बॉडीच्या एपीड्यूरल पार्टमध्ये टाकलं जातं. काही काळासाठी तुमचं ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. परंतु डॉक्टर आणि एनेस्थेशिया एक्सपर्टच्या देखरेखीखाली स्थितीला नियंत्रित केलं जातं.

प्रश्न : माझं वय ३८ आहे. मेडिकल तपासणीत माझ्या जननांगाच्या ट्यूबवर क्लोसिस आढळलं आहे. मला दुसरं मूल हवं आहे. परंतु अशा परिस्थितीत मी गर्भवती होणं शक्य आहे का? हा आजार माझ्या येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरतीदेखील परिणाम करू शकतो का?

उत्तर : गर्भाशय टीबी हा एक असा रोग आहे जो प्रामुख्याने स्त्रियांच्या जननांगांमध्ये जसं की अंडाशय, फेलोपियन ट्यूब, गर्भाशय, गर्भाशय ग्रीवा आणि योनी व श्रोनिच्या आजूबाजूच्या लिंफ नोड्सला प्रभावित करतो. हा रोग प्रामुख्याने स्त्रियांच्या रिप्रोडक्शन वयाच्या दरम्यान प्रभावित करतो. अनेकदा वांझपणाचे कारण बनतं. जेनाईटल टीबीचा उपचार दोन स्तरावर केला जातो. पहिला स्तरांमध्ये दोन महिन्यापर्यंत कमीत कमी तीन अँटीटीबीच्या औषधांसोबत तसंच दुसऱ्या स्तरांमध्ये चार ते दहा महिन्यासाठी कमीत कमी दोन अँटीटीबीच्या औषधांसोबत कायम उपचार चालू राहतो आणि जेनाईटल पार्टमध्ये सर्जरीद्वारा उपचार केले जातात. उपचाराच्या दरम्यान तुम्हाला देण्यात आलेल्या सूचनांचं योग्य प्रकारे पालन करा. याच्या उपचारानंतर एआरटी तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा करू शकता. परंतु तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हे करावं लागणार.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २५ वर्षीय अविवाहित तरुण आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मेव्हणीवर माझे प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मुलगीही लग्नासाठी तयार आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या घरच्यांचाही या लग्नाला काही विरोध नाही. पण माझी आई या लग्नाच्या ठाम विरोधात आहे. याला मजबूत कारणही आहे.

खरे म्हणजे माझी वहिनी (मुलीची बहीण) खूप उग्र आणि घमेंडखोर स्वभावाची आहे. तिने कधीही आपल्या पतीला आणि ना ही घरातील कुठल्याही सदस्याला मानसन्मान दिला. माझ्या वहिनीने घरातील लहानांनाही कधी जिव्हाळा दाखवला नाहीए. तिला फक्त आणि फक्त स्वत:ची काळजी आहे. ती आपल्या मनाप्रमाणे वागते.

याच कारणामुळे माझा दादा आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही, ती एका खासगी कंपनीत खूपच खालच्या पातळीवरील नोकरी करू लागलीय. त्यामुळे घरातील काम व मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली आहे. माझी आई म्हणते की जर मोठ्या बहिणीने आमच्या नाकीनऊ आणले आहेतच. रोज घरात भांडणं करते, अशा वेळी तिच्या बहिणीशी लग्न केलेस, तर दोघी बहिणी मिळून घराची दुर्दशा करतील, हे मला कळले पाहिजे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मोठ्या बहिणीचा स्वभाव असा आहे, याचा अर्थ छोटी बहीणही कडक स्वभावाची असेल, असे काही नाही. छोट्या बहिणीचा स्वभाव खरोखरंच मोठ्या बहिणीपेक्षा वेगळा आहे. ती खूप सरळसाधी असून तिला जबाबदारीची जाणीव आहे.

मी खूप समजावूनही घरातले लोक तयार होत नाहीएत. मी काय करू? मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांनी परवानगी द्यावी, अशीही माझी इच्छा आहे. कृपा करून काहीतरी उपाय सांगा.

मी त्या मुलीला जेवढे जाणले आहे, ती आपल्या बहिणी(वहिनी)सारखी मुळीच नाहीए, पण ही गोष्ट मी कुटुंबीयाना समजावू शकत नाहीए. आई हट्टाला पेटली आहे की कुठल्याही मुलीशी (मग भले ती सुंदर नसली तरी) माझे लग्न लावून       देणार, पण या मुलीशी मुळीच नाही. मी काय करू?

घरच्यांनी तुमची वहिनी म्हणजेच मुलीच्या मोठ्या बहिणीचे वागणे पाहिले आहे. त्यांना जो वाईट अनुभव  मिळाला, त्यामुळे त्यांना असे लग्न त्या घरात करून देण्यास भीती वाटतेय. जर त्यांच्या बाजूने विचार केला, तर ते आपल्या जागी योग्यच आहेत.

तुमचे म्हणणे आहे की ती मुलगी (आपली प्रेयसी) आपल्या बहिणीसारखी नाहीए, तर तुम्हाला कळले पाहिजे की, लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या जीवनात खूप फरक असतो. विवाहाच्या पूर्वीचे जीवन काल्पनिक असते. तिथे प्रेयसी आणि  प्रियकर स्वत:ला एकमेकांसमोर उत्तम दर्शवण्याचाच प्रयत्न करतात. खरे गुणदोष तर लग्नानंतर कळतात. म्हणून लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे विचार करा. मनाबरोबरच मेंदूचेही ऐका. लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे, जो रिटेक होत नाही.

जर तुम्हाला मुलीमध्ये काही वाईट गुण दिसत नाहीत, तर घरातील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावा की दुसरी मुलगी जिची ते निवड करतील, ती चांगली आणि साधी असेलच, हे जरूरी नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या पसंतीकडे दुर्लक्ष करू नये. जर ते तुमचे म्हणणे ऐकत नसतील, तर एखाद्या नातेवाइकाची किंवा कौटुंबिक मित्राची मदत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, या लग्नाच्या चांगल्या-वाईट परिणामांना आपण जबाबदार असाल.

मी एक सुशिक्षित गृहिणी आहे. लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. २ गोंडस मुले आहेत. पती खूप प्रेम करणारे आणि काळजी घेणारे आहेत. मी हरप्रकारे आनंदी आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक सल लपून राहिला आहे. त्यामुळे मी दु:खी होते.

खरे तर शाळा-कॉलेजमध्ये मी खूप हुशार विद्यार्थिनी होते. लहानपणापासून माझी इच्छा होती की शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करेन, पण कॉलेजमधून बाहेर पडताच लग्न झाले. मग २ मुलांची देखभाल आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढी व्यस्त झाले की मनातील इच्छा मनातच राहिली. मला सारखे वाटत राहते की गृहिणीचे काम हे काय काम आहे? हे तर अशिक्षित आणि कमी शिकलेल्या बायकाही चांगल्याप्रकारे करतात. माझे शिक्षण आणि उच्चशिक्षित असल्याचा काय फायदा? मी काय करू?

आपण एक कुशल गृहिणी आहात. आपण कुशलतापूर्वक घरकुटुंबाची जबाबदारी पार पाडत आणि मुलांची चांगली देखभाल करत आहात, ही कमी महत्त्वाची गोष्ट नाहीए. तुम्ही असे का समजता की गृहिणी बनून राहिल्यास आपले शिक्षण वाया जातेय. असे म्हणतात की एका स्त्रीने शिक्षण घेतल्याने संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे कल्याण होते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्यांना कमी समजू नका.

जर आपल्याला खंत वाटत असेल की गृहिणीच्या कर्तव्यामुळे आपण काही खास करू शकला नाहीत, तर आपण घरबसल्या ट्युशन इ.चे काम करू शकता. यामुळे आपण आपल्या शिक्षणाचा सदुपयोगही कराल शिवाय आपल्याला मानसिक समाधानही मिळेल. एखादी एनजीओ वगैरेही जॉइन करू शकता.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर    डॉ. भारती तनेजा द्वारा

माझे केस काही महिन्यांपासून वेगाने गळत आहेत. त्यामध्ये कोंडादेखील आहे. यासाठी कोणती अशी ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे माझी केसगळती बंद होईल आणि नवीन केस येतील?

केस गळण्यामागे अनेक कारणं असतात, ज्यामध्ये कोंडादेखील एक आहे. अशामध्ये कोंडा ठिक करणं गरजेचं आहे. तुमच्या केसांमध्ये याचं इन्फेक्शन पसरलं आहे, म्हणून आता हे नैसर्गिक पद्धतीने करणं कठीण आहे. कोंडयापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून बायोप्ट्रान घेऊ शकता. या दोन्हीमुळे डिसइन्फेकशन होतं. ज्यामुळे कोंडादेखील जातो आणि केस गळतीदेखील बंद होते. यासोबतच लेझरने केसांचं नूतनीकरण होतं.

माझं वय ४० आहे.वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागला आहे. या वयात मला कशा प्रकारचा मेकअप आणि स्किन केअर करायला हवी? कृपया सांगा?

चाळीशीनंतर त्वचा कोरडी होते. अशावेळी त्वचेला नरिश करण्यासाठी सिटीएमपी अर्थातच क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शनची गरज आहे. क्लींजिंगसाठी तुम्ही नरिशिंग क्लिंजींग मिल्कचा वापर करायला हवा. हे त्वचेला डीप क्लीन करण्याबरोबरच कोरडेपणादेखील दूर करतं. त्वचेवर एजिंग दिसण्याचं प्रमुख कारण ओपन पोर्स आहे. हे पोर्स कमी करण्यासाठी क्लींजिंगनंतर टोनिंग करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की तुमचा टोनर अल्कोहोल युक्त नसावा. सोबत चेहऱ्याचा ओलावा  कायम राखण्यासाठी मॉइश्चरायझर नक्की लावा. चेहऱ्याची केअर करणंही तेवढंच गरजेचं आहे, जेवढं त्याचा संरक्षण. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचा करपली जाते. यामुळे सुरकुत्या, ब्राऊन स्पॉट्स इत्यादी एजिंगची लक्षणें दिसून येतात. म्हणूनच यापासून वाचण्यासाठी उन्हात निघण्यापूर्वी सन स्क्रीन आवर्जून लावा.

खूप काळापासून केसांना घरातच स्ट्रेट करते. परंतु त्याचा रिल्ट पार्लरसारखा मिळत नाही. मला केस स्ट्रेट करण्याची योग्य पद्धत सांगा?

जेव्हा तुम्ही पार्लर वा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करता तेव्हा ते करणारी लोकं नॉर्मली एक्सपर्टस असतात. जे केसांच्या पातळ पातळ लेयर्सना स्ट्रेटनिंग करतात, त्यांच्याद्वारे स्ट्रेटनिंग करण्यामध्ये वापरण्यात आलेलं स्ट्रेटनिंग उत्तम क्वालिटीचेदेखील असतातं, जे घरी तेवढया चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही दररोज घरच्या घरी स्ट्रेटनिंग करण्याच्या बदल्यात परमनंट स्ट्रेटनिंग करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला पार्लरसारखे सरळ केस कायमचे मिळतील. स्ट्रेट केस ठेवण्यासाठी तुम्ही केसांना परमनंट हेअर एक्सटेन्शनदेखील करू शकता. जर परमनंट हेअर एक्सटेन्शन करायचं असेल, तर जेव्हादेखील बाहेर जाल तेव्हा बाहेर एक्सटेंशन लावूनदेखील केसांना सेट करू शकता. यामुळे केस खूपच सुंदर दिसतात.

माझ्या डोळयाच्या आजूबाजूला सूज दिसून येते. असं का होतं आणि ते दूर करण्यासाठी मला काय करायला हवं?

अशा प्रकारची समस्या डोळयांच्या आजूबाजूला लिंफ एकत्रित झाल्यामुळे उत्पन्न होतं. याचं प्रमुख कारण हेल्थ प्रॉब्लेम वा मग औषधांचे साईड इफेक्टस आहेत. जर तुम्ही दीर्घकाळासाठी एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर सर्वप्रथम तुमची इंटरनल तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावर उपचार करा. या व्यतिरिक्त ही सूज कमी करण्यासाठी एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये जा. तिथे लिंफला व्याक्युम मशीनच्या माध्यमातून ड्रेन केलं जातं आणि लेझरद्वारे त्वचेला री जनरेट केलं जातं. ही ट्रीटमेंट खूपच मोठी आहे, परंतु यामुळे फायदा नक्की होईल.

माझं वय ३० वर्षं आहे. माझी त्वचा तेलकट आहे. मला क्रीम वा कोलाजन सिरममध्ये कशाचा दररोज वापर करायला हवा?

सिरममध्ये त्वचेला रिपेअर करणारी तत्व कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात. ज्यामुळे हे खूपच कमी प्रमाणात लागतं आणि अधिक परिणामकारक असतं. जर क्रीम माईंल्ड असेल तर यामुळे सिरम क्रीमपेक्षा अधिक योग्य आहे. तुमची त्वचा डीपली नरिश करण्यासाठी दररोज सकाळी फेस क्लीन वा शक्य असेल  तर लाईट स्क्रब केल्यानंतर कोलाजन सिरमचा वापर करा. याच्या दररोजच्या वापरामुळे तुमची त्वचा रिपेअर करून त्याला प्रोटेक्ट व हायड्रेट करेल. सोबतच एजिंग साइन्सदेखील दूर होईल.

रात्री झोपण्यापूर्वी ए. एच. ए. म्हणजेचं अल्फा हाय ड्रॉक्सी अॅसिड सिरम लावा. यामध्ये १४ फ्रूट अॅसीडस असतात, जे त्वचेत कोलाजन वेगाने बनवून त्यावर सुरकुत्या पडण्यापासून वाचवतात आणि डोळया खालचा काळेपणा दूर करण्यातदेखील मदत करतात. या सीरमच्या दररोजच्या वापरामुळे साईन ऑफ एजिंग कमी होईल, सोबतच त्वचा उजळेल व तरुण दिसून येईल. सिरम तेलकट त्वचेसाठी अधिक योग्य आहे, कारण कोरडया त्वचेवर सिरम लावल्यामुळे थोडा घट्टपणा येतो आणि कोरडया त्वचेसाठी क्रीमचा वापर योग्य आहे.

आरोग्य परामर्श

* शिवानी कंडवाल, आहार विशेषज्ज्ञ, डायबिटीस एज्युकेटेड,, फाउंडर न्यूट्री वाईब्ज

प्रश्न : माझं वय ३४ वर्षे आहे. कोविड -१९ झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या केसांची चांगली काळजी घेऊन आणि त्यामध्ये तेल लावूनदेखील ते खूपच गळत आहेत. तुम्ही कृपया मला सल्ला द्या की मी माझ्या आहारात आणखी काय घेऊ शकते की ज्यामुळे माझे केस गळणे बंद होईल?

उत्तर : या अवस्थेला टॅलोजेन एफियुविएम म्हणतात. हे या आजारानंतर होऊ शकतं. यासाठी तुम्ही प्रोटीन आणि झिंकयुक्त आहार घ्या. जर तरीदेखील काही फरक पडत नसेल तर फेरीटीन, विटामिन डी ची टेस्ट करून घ्या. कारण याच्या कमतरतेमुळेदेखील केस गळू शकतात.

प्रश्न : माझं वय ३० वर्षे आहे आणि मी पीसीओडीची पेशंट आहे. मला माझ्या आहारात मी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

उत्तर : अलीकडे प्रत्येक ५ पैकी एका स्त्रीला तरी पीसीओडी आहे. याचं कारण आपली व्यस्त जीवनशैली. यासाठी तुमची दिनचर्या व्यवस्थित करा. तुमच्या आहारात साखर, मैदा, तळलेले पदार्थ, पॅकेट्स दूध, रिफाइंड तेल वगैरे काढून टाका. जेवढं होऊ शकेल तेवढया ताज्या (फायबर युक्त) भाज्या, फळं आणि मोड आलेले धान्य घ्या.

प्रश्न : माझा मुलगा अजिबात पोष्टिक खात नाही. त्याला फक्त पिझ्झा आणि पास्ता आवडतं. कृपया अशा आहाराचा सल्ला द्या जे पौष्टिकदेखील असेल आणि माझ्या मुलालादेखील आवडेल?

उत्तर : मुलांचा पौष्टिक आहार देण्यासाठी गरजेचं आहे की आहार दिसायला छान आणि रुचकरदेखील असावा. यासाठी भाजी पूर्ण बनवून पोळी वा पासत्यामध्ये टाका. याव्यतिरिक्त साध्या ब्रेड ऐवजी मल्टी ग्रेन ब्रेडचं सँडविच वा मल्टी ग्रेन पास्त्याचा वापर करा. नट्स आणि सिड्स शेक बनवून प्यायला द्या.

प्रश्न : माझं वय ४२ आहे आणि मला मधुमेह आहे. तुम्ही मला गोड पदार्थांचा पर्याय सांगा त्यामुळे मला जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा मी खाऊ शकेन?

उत्तर : मधुमेह तुमच्या वाईट जीवनशैलीमुळे होतो. सर्वप्रथम तुमची दिनचर्या व्यवस्थित करा आणि दररोज व्यायाम करा. याव्यतिरिक्त जेव्हा गोड खावसं वाटेल तेव्हा तुम्ही एक खजूर, १०० ग्रॅम फळ, फ्रुट स्मुदी, डार्क चॉकलेट इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझी आई मधुमेहाची पेशंट आहे. तिने भात खाणे योग्य आहे का? दिवसातून किती वेळा आणि कोणता भात खायला हवा म्हणजे पांढरा का ब्राउन?

उत्तर : कोणताही नैसर्गिक आहार वाईट नसतो. परंतु आपण त्याचा सेवन कसं करतो आहोत हे पाहायला हवं. तुम्ही भात देऊ शकता, परंतु त्याची पेज काढून. ज्यामध्ये जेवढं भाताचं प्रमाण आहे तेवढीच दाळ वा भाजी मिसळून द्या. पांढरा ऐवजी ब्राऊन भात अधिक हेल्दी असतो.

प्रश्न : मी ३० वर्षांची आहे. माझंजन ४५ किलो आणि उंची ५ फूट ७ इंच आहे. माझं वजन खूपच वेगाने कमी होत आहे. कृपया करून याबाबत सल्ला द्या की मी काय खावं जेणेकरून माझं वजन वाढेल?

उत्तर : पहिल्यांदा हे गरजेच आहे की तुमचं वजन कमी होण्याचं कारण जाणून घेणं. यासाठी तुम्ही तुमची थायरॉईड टेस्ट करून घ्या. या व्यतिरिक्त तुमच्या आहारातील पौष्टिक तत्त्वांकडे खास लक्ष द्या. प्रोटीन, कार्बोहायड्रेट युक्त भोजन घ्या.

प्रश्न : माझी नखं खूपच कमजोर झाली आहेत. आठवडयामध्ये जेवढी वाढतात तेवढीच तुटतात. मी नखं वाढविणाऱ्या तेलाचादेखील वापर केला आहे परंतु यामुळे फारसा काही फायदा झाला नाही. कृपया करून मला सल्ला द्या की मला कोणता आहार घ्यायला हवा ज्यामुळे माझी नखं निरोगी होतील आणि वाढीसदेखील लागतील?

उत्तर : तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीन घ्या. कमीत कमी १ वा १.५ ग्राम प्रति १ किलोग्राम शरीराच्या वजनाच्या हिशोबाने प्रोटीन घ्या. यासाठी डाळी, सोयाबीन, पनीर, चिकन, दूध आणि दुधाने बनविलेल्या वस्तू खाऊ शकता. झिंक युक्त जसं की कडधान्ये, नट्स, दही इत्यादी खाऊ शकता.

प्रश्न : माझं वय २६ वर्षे आहे आणि नुकतीच कोविड -१९ ची रिकवरी केली आहे. मला प्रत्येक वेळी खूप आळस येतो. कृपया करून मी आहारात काय घेऊ शकते ते सांगा

उत्तर : कोविड -१९ नंतर अशा प्रकारची कमजोरी येणे खूपच सामान्य झालं आहे. परंतु डायटमध्ये बदल करून तुम्ही तुमची एनर्जी लेवल वाढवू शकता. तुमच्या आहारात एनर्जी वाढविणारे खाद्यपदार्थ वाढवा जसं की कडधान्य खाद्यपदार्थ, रताळी, डाळी, फळे, अंडी, चिकन मासे, सत्व इत्यादींचा आहारात समावेश करा. कोणत्याही आजाराच्या वेळी शरीरात इन्फ्लंमेशन वाढतं, ते कमी करण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिडच्या पदार्थांचा तुमच्या डायटमध्ये समावेश करा. ओमेगा-३ फॅटी अॅसिड अक्रोड, अळशीच्या बियांमध्ये असतं आणि जर तुम्हाला वाटतं की तरीदेखील तुम्हाला आराम मिळत नाही आहे तर तुम्ही त्याची सप्लीमेंट देखील घेऊ शकता.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी २४ वर्षांची तरुणी आहे. ३-४ महिन्यानंतर माझं लग्न होणार आहे. मी अजूनपर्यंत कोणासोबतही सेक्स संबंध केले नाहीत. परंतु नियमित मॅस्टरबेशन करते. मला वाटतं की यामुळे प्रायव्हेट पार्टची त्वचा लूज पडली आहे. त्यामुळे मी खूप तणावात आहे. मी काय करू?

ज्या प्रकारे सेक्स केल्यामुळे नाजूक भागाची त्वचा लूज पडत नाही, त्याचप्रमाणे मॅस्टरबेशननेदेखील त्वचेवर कोणताही फरक पडत नाही आणि शिथिलतादेखील येत नाही. हा तुमचा एक भ्रम आहे.

खरं म्हणजे कोणत्याही अवयवाच्या कमी उपयोगाने शिथिलता येते. नियमित उपयोगाने नाही. तुम्ही तुमच्या लग्नाची तयारी करा आणि मनातील भीती पूर्णपणे काढून टाका. तुमच्या वैवाहिक आयुष्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.

मी २५ वर्षांची विवाहित स्त्री आहे. सासर आणि माहेर जवळजवळच आहे. त्यामुळे माझी आई आणि इतर नातेवाईक अनेकदा सासरी येतजात असतात. माझ्या पतींचा काहीच विरोध नाही. परंतु माझ्या सासूबाईंना हे आवडत नाही. त्या म्हणतात की तू तुझ्या  आईला सांग की सारखं भेटायला येऊ नका. खरंतर सासरी माझ्या माहेरच्या लोकांचा पूर्ण मान राखला जातो. परंतु सासूबाईंचं म्हणणं आहे की नातेवाईकांमध्ये दुरूनच संबंध ठेवल्यामुळे नवेपणा राहतो. यामुळे घरात वाददेखील होतात. परंतु मी माझ्या आईला हे कसं सांगू? एकुलती एक मुलगी असल्यामुळे तिचं मन दुखवायचं नाही आहे. कृपया योग्य सल्ला द्या?

तुमच्या सासूबाईंचं म्हणणे योग्य आहे. नातं प्रेमाने निभवावं त्यामध्ये अंतर असावं. त्यामुळे नातेसंबंध दीर्घकाळ राहतात आणि संबंधांमध्येदेखील गोडवा राहतो.

अनेकदा काही प्रकरणांमध्ये मुलीचं सासर जवळ असतं, तेव्हा तिच्या माहेरच्या नातेवाईकांचंसारखं सासरी येणं जाणं असतं आणि ते अनेकदा कौटुंबिक प्रकरणांमध्येदेखील नाक खुपसतात. यामुळे मुलीचं घर विस्कटलं जातं.

भलेही प्रत्येक सुखदु:खात एकमेकांची साथ द्या, परंतु नात्यांमध्ये थोडं अंतर ठेवा. त्यामुळे सर्वांच्या मनात प्रेम व नात्यांचा गोडवा राहील.

तुम्ही तुमच्या आईशी याबाबत मोकळेपणाने बोलून घ्या. त्या तुमच्या आई आहेत आणि यामुळे तुमच्या घरात क्लेश होईल, हे त्यांना आवडणार नाही. होय, एक मुलगी असण्याची जबाबदारी तुम्हीदेखील निभवा आणि यासाठी एक निश्ंिचत वेळ वा दिवशी तुम्ही स्वत:हून माहेरी जाऊन तिची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्याशी फोनवरुनदेखील नियमित संपर्कात रहा. माहेरच्यांच्या सुखदुखात सहभागी व्हा. नक्कीच यामुळे घरातील क्लेश कमी होईल आणि नात्यांमध्येदेखील गोडवा बनून राहील.

मी ३२ वर्षीय विवाहिता आहे. सासू-सासरे नसल्यामुळे १७ वर्षांच्या दिरासोबत राहते. मी त्याला माझ्या मुलासारखं प्रेम करते. परंतु इकडे काही दिवसापासून पाहते की तो टीव्हीवर अनेकदा क्राईम शो पाहतो आणि त्यावर गप्पादेखील मारतो. काही दिवसांपूर्वी त्याचं २-४ मुलांशी भांडण झालं होतं. मी यावरून त्याला ओरडले तेव्हा उलट उत्तर दिलं नाही परंतु त्या दिवसांपासून तो माझ्याशी कमी बोलतोय. क्राईम शो बघण्याची सवय लागली आहे. अनेकदा त्याला रागावूनदेखील तो दुर्लक्ष करतो. त्याची ही सवय वाईट गोष्टींमध्ये बदलणार तर नाही ना? कृपया योग्य सल्ला द्या?

टीव्हीवर दिसणारे अनेक क्राईम शो हे काल्पनिक असतात. जे समाजात जागरुकता नाही तर लोकांना भडकविण्याचे काम नक्कीच करतात.

अनेकदा नात्यांमध्ये धोका, एका मित्राकडून दुसऱ्या मित्राचा खून, पैशासाठी खून, लग्नात फसवणूक, अनैतिक संबंध, पती-पत्नींच्या नात्यांत विश्वासाचा अभाव दाखवणं, कुठे ना कुठे लोकांच्या मनात आपल्या लोकांबद्दल अविश्वासाचे भाव निर्माण करतं. म्हणूनच टीव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या अनेक क्राईम शो हे नात्यांना प्रभावित करतात. गुन्हेगारांसाठी मार्गदर्शकाची भूमिकादेखील निभावतात.

अलिकडेच एक बातमी प्रसिद्ध झाली होती ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली होती जेव्हा तो पकडला गेला तेव्हा त्याने पोलिसांना सांगितलं की ही हत्या त्याने टीव्हीवरचा एका क्राईम शो पाहिल्यानंतर केली होती. केवळ हेच प्रकरण नाही तर सतत काही ना काही घटना घडतच असतात.

अनेक क्राईम शोमध्ये दाखवलं जातं की गुन्हेगार कशाप्रकारे गुन्हा करतेवेळी काळजी घेतो म्हणजे तो कायद्याच्या कचाटयात सापडणार नाही. यामुळे कुठे न कुठे गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.

मुलांना तर या मालिकांपासून दूर ठेवण्यातच भलाई आहे आणि तसंही तुमच्या दिराचं वय खूपच कमी आहे. त्याचं मन अभ्यासात लागायला हवं. तुम्ही त्याला प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला चांगली मासिकं वा चांगलं साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करा. हवं असल्यास तुम्ही तुमच्या पतीशीदेखील बोलून पहा म्हणजे वेळेतच तो योग्य मार्गाला लागेल.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर

डॉ. भारती तनेजा द्वारा

माझं वय ५० वर्षे आहे. माझे केस गळत आहेत. मी माझ्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी एखादा उपाय सांगा?

केसांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित मसाज करणं गरजेचं आहे. मसाजसाठी हेअर टॉनिक व हेअर ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. तेल केसांना नरिष करण्याबरोबरच मजबूत आणि शायनीदेखील बनवतं. केस प्रोटीनने बनलेले असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. अंद्मद्दरित डाळी, दूध, अंडी, मासे, सोयाबीन, चिकन इत्यादी प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचा तुमच्या खाण्यात समावेश करा. आठवडयातून एकदा घरगुती पॅकचा वापर करणे योग्य आहे. यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई व मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते उकळवा. जेव्हा पाणी सुकून जाईल तेव्हा ते वाटून घ्या आणि त्यामध्ये एलोवेरा जेल व अंड एकत्रित करा. नंतर ते पॅकप्रमाणे लावा.

माझं वय २५ वर्षे आहे. माझ्या डोळयाखाली खूपच काळी वर्तुळे आहेत. ती कमी करण्याचा एखादा सोपा उपाय सांगा?

काळी वर्तुळे घालविण्यासाठी संत्र व बटाटयाच्या रसामध्ये कॉटन बुडवून नंतर डोळे बंद करून पापण्यांवर थोडा वेळ ठेवा. असं नियमित केल्यामुळे डोळयांना आरामदेखील मिळेल. या व्यतिरिक्त आराम व पुरेशी झोप घ्या. अंधारात टीव्ही पाहू नका वा फोनवर अधिक काम करू नका. शक्य असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन यलो लेझर घ्या. यामुळे काळी वर्तुळं लवकरच निघून जातील. दररोज बदामाच्या तेलामध्ये काही थेंब ऑरेंज ऑइल एकत्रित करून करंगळीने हलकसं डोळयांभोवती मसाज करा.

काजळशिवाय माझे डोळे खूपच सुने दिसतात. लाइनर शिवाय बाहेर जायला छान वाटत नाही. काजळ लावल्यामुळे स्मज होतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे मी सुंदर दिसेन?

काजळ विकत घेतेवेळी नेहमी लक्षात ठेवा की ते लाँग लास्टिंग आणि स्मज प्रुफ असावं. तुम्हाला हवं असल्यास पर्मनंट काजळ लावू शकता. जे १५ तास टिकतं. कधी पसरत नाही. लक्षात ठेवा जिथून लाइनर काजळ लावत असाल तिथे हायजिनची खास काळजी घ्या.

माझी नखे खूपच लवकर तुटतात आणि हात सुंदर दिसत नाहीत. नखं मजबूत करण्यासाठी काय करू?

नखे प्रोटीनने बनलेली असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असायला हवं. नखांना मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात विटामिन, फायबर व प्रोटीन अधिक प्रमाणात असायला हवं. दररोज हिरव्या भाज्या आवर्जून खा. फळं आणि डाळीदेखील नखांना चांगलं करण्यासाठी मदत करतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळेदेखील नखे तुटू लागतात. म्हणून कॅल्शियमयुक्त खाणं जसे की दूध, दही, अंड्याचा वापर करा. नखांना शेपमध्ये ठेवा म्हणजे ती तुटणार नाहीत. दररोज काही वेळासाठी कोमट ऑलिव ऑइलमध्ये थोडावेळ त्यांना भिजवून ठेवा आणि हलका हलका मसाज करा. यामुळे नखे मजबूत होतात आणि नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळेदेखील नखे लवकर तुटत नाहीत.

कपाळावर सतत टिकली लावल्यामुळे त्याजागी डाग पडू लागले आहेत. ते काढण्यासाठी व कमी करण्यासाठी काय करू?

तुमचा टिकलीचा ग्लू उत्तम क्वालिटीचा नसेल तर डाग पडण्याचे चान्सेस राहतात. त्यामुळे नेहमी उत्तम क्वालिटीच्या टिकली विकत घ्या. रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. डाग पडले आहे ते कमी करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये काही लिंबाचे थेंब टाकून डागाच्या जागी दररोज अर्धा मिनिट मसाज करा आणि नंतर खोबरेल तेल लावून थोडा वेळ सोडून द्या. असं केल्यामुळे फरक पडण्याचे चान्सेस असतात. तुम्ही हवं असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट व यंग स्किन मास्क लावू शकता. यामुळे डाग खूपच कमी होतील. केमिकल पिलदेखील करू शकता. ज्यामुळे त्वचेचा एक लेयर निघून जाईल आणि डागदेखील कमी होतील.

मला आयब्रोज करतेवेळी थ्रेडिंग केल्यामुळे खूप त्रास होतो. कधी कधी हा त्रास सहन करण्यापलीकडचा असतो. अश्रूदेखील येतात. प्लीज सांगा मी काय करू?

आयब्रोज करणं खूपच गरजेचे आहे. कारण योग्य आकाराच्या आयब्रोज आपल्या चेहऱ्याला योग्य शेप देतात. वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोजवर बर्फाने मसाज करा. ज्यामुळे आयब्रोज मुलायम होतील आणि वेदनादेखील कमी होतील. थ्रेडिंगच्या वेदनेपासून वाचण्यासाठी त्यावेळी चुइंगम खा. वेदना कमी होतील.

जी मुलगी तुमच्या आयेब्रोज करणार आहे तिला थ्रेडला वेट करुन घ्यायला सांगा. यामुळे तुम्हाला कमी वेदना होतील. थ्रेडिंग करतेवेळी व्यवस्थित स्ट्रेच करा यामुळेदेखील वेदना कमी होतील. थ्रेडिंगनंतर मॉइस्चरायझरने व्यवस्थित मसाज करा. आयब्रोजवर एलोवेरा जेल लावा, यामुळे वेदना व जळजळ शांत होईल आणि रेडनेसदेखील कमी होतो.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

अलीकडेच माझं लग्न झालंय. पती खूपच समजूतदार आहेत आणि माझ्यावर खूप प्रेमदेखील करतात. माझी समस्या ही आहे की माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या अनेकदा माझ्या घरी येतात आणि मला त्यांच्या बॉयफ्रेंड्सबद्दल खूपच जवळच्या आणि अंतर्गत गोष्टी सांगत राहतात. त्या मला फोनवरदेखील फोटो व गोष्टी शेअर करत राहतात. त्या बोलता-बोलता माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दलदेखील चेष्टा करत राहतात. हे सर्व ऐकूण मी स्वत:वर नाराज होते. असं वाटतं की लग्नापूर्वीचं आयुष्य किती छान होतं. मी खूप त्रासलेली आहे. कृपया सांगा काय करू?

फॅन्टसी म्हणजेच काल्पनिक जगतात हरवलेल्या अशा तरुणीं खरंतर यामध्येच आनंद मिळवतात आणि त्या याला स्टेटस सिम्बॉल समजतात. तसेच त्यांना वाटत असतं की दुसऱ्यानेदेखील त्यांच्या प्रमाणे विचार करावा आणि तेच करावं. याचा मनावर नक्कीच परिणाम होत असतो.

तुम्ही असं अजिबात करू नका. कारण आता तुम्ही विवाहित आहात आणि तुमचे पती तुमच्यावर खूप प्रेमदेखील करतात. यासाठी योग्य आहे की वैवाहिक आयुष्याची गाडी व्यवस्थित चालवा. लग्नानंतर आयुष्यात आनंद कमी होत नाही.

तुम्ही तुमच्या मैत्रिणींना सांगू शकता की लग्नाबाबत तुमचे विचार वेगळे आहेत, आता मी विवाहित आहे म्हणून या सर्व गोष्टींमध्ये मला अजिबात रुची नाही आहे.

मी २५ वर्षीय विवाहित स्त्री आहे. आम्ही एका शहरात भाडयाच्या घरात रहातो. काही दिवसांपूर्वी माझ्या पतींचा छोटा भाऊ म्हणजेच माझा दिर आमच्यासोबत राहायला आला आहे. दिर अजून अविवाहित आहे. पती ऑफिसच्या कामात व्यस्त असतात, यामुळे मी माझ्या दिरासोबत शॉपिंग इत्यादी करू लागली. तिकडे काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात बदल झाल्यामुळे मी चिंताग्रस्त आहे. तो आता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. मला हात लावायला पाहतो. कळत नाही आहे की मी काय करू? यामुळे दोन्ही भावांमध्ये अंतर यावं असं मला नकोय. अनेकदा वाटतं की पतीना याबद्दल सांगावं. परंतु काहीतरी विचार करून मी पुन्हा थांबते. सांगा मी काय करू?

शक्य आहे की जास्त चेष्टा-मस्करी करून तुम्ही त्याला डोक्यावर बसवलं आहे. दिर आणि वहिनीच नातं खूपच पवित्र असतं आणि जर तुमचा दिर मर्यादा विसरून चुकीची इच्छा ठेवत असेल तर नक्कीच त्याच्यापासून दूर रहा. खरेदी वा बाजारसाठीदेखील दिरासोबत न जाता पतीसोबत जा. तुम्ही तुमचं लहान-मोठं सामान पतीसोबत जाऊनदेखील खरेदी करू शकता. पती ऑफिसमधून आल्यानंतर जवळच्या बाजारात जाऊन खरेदी करू शकता. यामुळे पतीलादेखील चांगलं वाटेल. आठवडयाच्या शेवटी वा ज्या दिवशी पतींना सुट्टी असतील त्यांच्यासोबत जाऊन पूर्ण आठवडयाची खरेदी करून घ्या. या दरम्यान तुम्हाला संयमाने काम करावं लागेल.

मी एकत्रित कुटुंबात रहाते. सासू-सासरे चांगल्या पदावर होते. आता ते निवृत्त आहेत. माझे पती आणि मोठे दिर चांगल्या कंपनीमध्ये काम करतात. ननंदेचं अजून लग्न झालेलं नाहीये. घरात कोणत्याही गोष्टीची कमी नाही आहे म्हणजे सगळी सुखसुविधा आहे. परंतु दररोज किटकिट आणि भांडणामुळे मी त्रासली आहे. पतींना एकत्र कुटुंबात रहायचंय. म्हणून वेगळा फ्लॅट घेऊन राहण्यासाठी सांगू शकत नाही. कृपया सांगा मी काय करू?

घरात छोटी मोठी भांडण होणं सामान्य गोष्ट आहे. असं म्हणतात की जिथे तक्रार असते तिथेच प्रेमदेखील असतं. परंतु जेव्हा मतभेद मनभेदामध्ये बदलून मोठया भांडणाचं रूप घेऊ लागतात तेव्हा ही नक्कीच चिंतेची बाब असते. सध्या तुमच्या घराची अवस्था वाईट नाही आहे की पतीसोबत तुम्ही वेगळं राहण्याचा विचार करावा. घरातील भांडण कोणा मोठया वादाचं रूप घेऊ नये यापासून वाचण्यासाठी तुम्हाला स्वत: पुढाकार घ्यावा लागणार.

एकत्रित कुटुंबात साधारणपणे कामाबाबतदेखील वाद होतात. म्हणून तुम्ही घरातील कामेदेखील व्यवस्थितरित्या मिळून-मिसळून करा. छोटया-मोठया गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्यातच समजूतदारपणा आहे. लोक संयुक्त कुटुंबात राहून स्वत:च्या स्वप्नांना पंख देऊ शकत नाही परंतु एकत्रित कुटुंबात यासाठी खूपच चांगली संधी मिळते. एकत्रित कुटुंबात वाढलेली मुलेदेखील इतर मुलांच्या तुलनेत मानसिक व शारिरिकरित्या अधिक सुदृढ होतात.

मी ४२ वर्षीय पुरुष आहे. एक मुलगा आहे जो होस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतोय. मी आणि माझी पत्नी दोघेही नोकरदार आहोत. समस्या वृद्ध वडिलांबाबत आहे. ते चालू फिरू शकत नाहीत आणि त्यांची विशेष देखभाल करावी लागते. कमी वेळ मिळत असल्यामुळे आम्ही त्यांची योग्य देखभाल करू शकत नाही आहोत. त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात ठेवू शकतो का? एखाद्या वृद्धाश्रमाची माहिती मिळाली तर आमचं काम सहज सोपं होईल?

तुम्ही तुमच्या वृद्ध वडिलांची देखभाल करण्यासाठी दिवसा एखादी केअरटेकर ठेवणे योग्य राहील. या अवस्थेत वृद्धांना फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक व मानसिकरित्यादेखील आपल्या लोकांसोबत राहायला आवडतं. नंतर सकाळ-संध्याकाळ आणि सुटीच्या दिवशी त्यांना तुमची सोबत मिळत राहील. यामुळे ते कंटाळणार देखील नाहीत आणि योग्य देखभालमुळे ते निरोगीदेखील रहातील.

सौंदर्य समस्या

आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालिका डॉ. भारती तनेजा द्वारे

कोरोनामधून बरे झाल्यानंतर केस गळतीने मी हैराण आहे. कृपया मला उपाय सांगा की मी माझ्या केसांची काळजी कशी घ्यावी?

या समस्येला ‘टेलोजन एफ्लुव्हियम’ या नावाने ओळखले जाते. याच कारणाने काही आजार किंवा मानसिक धक्का लागल्याने काही काळ केस गळणे सुरू होते. त्यामुळे शरीराच्या यंत्रणेला एक धक्का लागतो. त्यामुळे केसांची नवीन वाढ थांबते आणि काही वेळाने केस गळायला लागतात.

कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर त्यांचे केस काही आठवडे किंवा महिने गळत राहतात कारण ते त्या धक्क्यातून बाहेर पडू शकत नाहीत. जेव्हा रुग्ण हळूहळू बरे होऊ लागतात, तेव्हा त्यांच्या केसांची वाढ परत येते.

त्यामुळे तोपर्यंत शरीरासाठी आणि केसांसाठी अत्यंत आवश्यक असलेले प्रथिने अन्नामध्ये घ्या. केसांच्या वाढीस चालना देणारे लोह, व्हिटॅमिन डी आणि इतर पोषक तत्वांचे सेवन करण्याचे सुनिश्चित करा. केस गळणे टाळण्यासाठी ताजे कोरफड मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि जेलमध्ये १/४ ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि दररोज टाळूला मालिश करा.

मालिश केल्यानंतर डोक्यावर शॉवर कॅप घाला आणि सुमारे एक तासानंतर शॅम्पूने धुवा. याच्या नियमित वापराने केसगळती कमी होते.

कोविड-१९ सारख्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात सतत घरी राहिल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरील चमक हरवत चालली आहे. ती परत आणता येईल का?

कोविड-१९ मध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्याचा परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. शारीरिक हालचालींमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे चयापचय चांगले राहते.

तुमची चयापचय क्रिया कमी होऊ नये म्हणून तुम्ही घरीच वर्कआउट करा. अन्नामध्ये प्रक्रिया केलेल्या अन्नाऐवजी नारळपाणी किंवा ताज्या रसाचा समावेश करावा. याशिवाय ताजी फळे आणि भाज्या खा.

त्वचेची चमक वाढवण्यासाठी काकडी, टोमॅटो आणि बटाटे धुवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. सकाळी जेव्हा तुम्ही तुमचे काम सुरू कराल तेव्हा चेहऱ्याला क्युबने मसाज करा आणि कोरडे होऊ द्या. थोडया वेळाने स्वच्छ धुवा.

तुमची त्वचा चमकत राहील. शरीरातील रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी १ चमचा बेसनामध्ये अर्धा चमचा ओटमील/रवा मिसळा.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यात गुलाबपाणी टाका. जर तुमची त्वचा सामान्य असेल तर त्यात दही घाला. जर त्वचा कोरडी असेल तर मलाई/दुधाची साय घालून मालिश करा. याने तुमची त्वचा लगेच चमकदार होईल.

माझ्या पोटावर केस आहेत. त्यांच्यामुळे मला शॉर्ट टॉप किंवा ब्लाउज घालता येत नाही. मी त्यांना मुंडण करून उतरवू शकते का?

नाही, तुम्ही रेझर वापरून ते काढू शकत नाही कारण यामुळे जास्त केस परत येतील. जर तुमच्या पोटावर केस कमी असतील तर तुम्ही त्यांना ब्लीच करू शकता. ब्लीचमुळे केसांचा रंग हलका होईल. जोपर्यंत हे केस हलके दिसतील तोपर्यंत काळजी करण्याची गरज नाही.

ते काढण्यासाठी तुम्ही हेअर रिमूव्हल क्रीम वापरू शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही वापरत असलेली क्रीम तुमच्या त्वचेला सूट करणारी असावी. पोटावरील केस काढण्यासाठी तुम्ही पल्स लाइट लेझरदेखील वापरू शकता.

लॉकडाऊनमध्ये फेस मास्कमुळे मेकअप पूर्णपणे खराब होतो. मी मास्क लावून मेकअप करू शकत नाही का?

मास्कसह मेकअप टिकवण्यासाठी तुम्ही मॅट फिनिश आणि खूप वेळ टिकणारे फाउंडेशन आणि कन्सीलर वापरा. याने तुमचा मेकप पसरणार नाही.

हे दोन्ही तुमच्या त्वचेत चांगले मिसळून स्थिरावतात आणि कोरडी चमक आणतात. बेस मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला कमी वजनाचा, हायड्रेटिंग प्राइमर वापरावा लागेल. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीतदेखील दिसेल.

मेकअप केल्यानंतर तुम्हाला मेकअप स्पंज किंवा मोठया फ्लॅकी ब्रशच्या मदतीने तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर थोडी सैल पावडर लावावी लागेल. अतिशय हलकी पावडर लावल्याने तुमची त्वचा चांगली दिसेल आणि तुमचा मेकअपही दिवसभर टिकून राहील. यानंतर तुम्ही पावडरवर सेटिंग स्प्रे करा. कोरडे होऊ द्या. त्यानंतरच मास्क लावा जेणेकरून तुमचा मेकअप योग्य राहील.

लिपस्टिक पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी हायड्रेटिंग घटक असलेले मॅट फॉर्म्युला किंवा लिक्विड लिपस्टिक वापरा, जे तुमचे ओठ कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते.

पर्याय म्हणून तुम्ही कायमस्वरूपी लिपस्टिकही लावू शकता. तुमच्या चेहऱ्यावर फक्त तुमचे डोळे असतात जे मास्क घातल्यानंतरही दिसतात. यासाठी तुम्ही काहीही करून पाहू शकता.

तुम्ही सॉफ्ट स्मोकी आईजपासून रंगीत आयशॅडो, ग्राफिक आयलाइनरपर्यंत काहीही ट्राय करू शकता. भुवया भरण्यास आणि पापण्यांना मस्करा लावण्यास विसरू नका.

गृहशोभिकेचा सल्ला

*  प्रतिनिधी

मी २४ वर्षांचा आहे आणि माझी मैत्रीण २५ वर्षांची आहे. मागील काही दिवसांत मी कंडोम न लावता मैत्रिणीसोबत २-३ वेळा सेक्स केला होता. मैत्रिणीने इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी ७२ तासांच्या वैद्यकीय मर्यादेत घेतली असली तरी आता आम्हा दोघांचे टेन्शन वाढले आहे. मैत्रिणीला २० ते २७ दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते, जी यावेळी आली नाही. ती गर्भवती आहे का?

कंडोमप्रमाणेच आपत्कालीन गोळया या गर्भधारणा रोखण्याचे साधन आहेत. परंतु त्या सहसा तेव्हाच घेतल्या जातात जेव्हा लैंगिक संबंध उत्स्फूर्त झाला असेल आणि त्या काळात गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला गेला नसेल,

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी समागमानंतर ७२ तासांच्या आत घ्यावी लागते. ७२ तासांपूर्वी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता बऱ्याच प्रमाणात टाळता येते.

तुमच्या मैत्रिणीने इमर्जन्सी गोळी घेतल्याने तिच्या रक्तातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तिची मासिक पाळी उशिरा येण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला युरिन प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितल्यास बरे होईल. हे घरीदेखील सहज करता येते.

सेक्समध्ये उतावळेपणा करणे किंवा घाई करणे योग्य नसते आणि कंडोमशिवाय सेक्स केल्याने नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे भविष्यात जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध बनवाल तेव्हा कंडोम अवश्य वापरा जेणेकरून तुम्हा दोघांनाही कोणत्याही भीतीशिवाय सेक्सचा आनंद घेता येईल आणि नंतर कोणतेही टेन्शन येणार नाही.

मी २६ वर्षांची विवाहित आहे. लग्नाला ३ वर्षे झाली आहेत पण अजूनही मला गर्भधारणा होऊ शकलेली नाही. यासाठी मी आता सेक्स करताना उशी खाली ही ठेवते आणि पतीला वीर्यस्खलनानंतर बराच वेळ त्या अवस्थेत राहण्यास सांगते. माझी मासिक पाळी नियमित आहे आणि आम्ही नियमितपणे सेक्सदेखील करतो. तरीही मी गर्भधारणा करू शकत नाही. मला सांगा मी काय करू?

संभोगाच्या दरम्यान वीर्यपतनाच्या वेळी पुरुषाच्या अवयवातून शुक्राणू अतिशय वेगाने बाहेर पडतात आणि खोलवर पोहोचतात. जे शुक्राणू स्ट्राँग नसतात ते योनीतून बाहेर ही पडतात, पण त्यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यामुळे घाबरण्याची ही गरज नाही.

जर तुमच्या पतीची शुक्राणूंची संख्या बरोबर असेल, तुमची मासिक पाळी ही नियमित होत असेल, तर तुमच्या गर्भधारणा न होण्यामागे दुसरे काही वैद्यकीय कारण असू शकते. हे कारण तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पतीमध्ये दोघांपैकी कोणामध्ये ही असू शकते.

स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन प्रजननक्षमतेबद्दल बोलले तर बरे होईल. तरच तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकाल.

मी ३१ वर्षांची विवाहित महिला आहे. आम्हाला २ मुले आहेत आणि आम्ही सासू-सासरे, जेठ-जेठानी आणि त्यांच्या मुलांसह एकाच छताखाली राहतो. माझ्या जेठानी माझ्याशी बऱ्याच वेळा भांडतात आणि सासूचे कान भरत राहतात. मी एक खुल्या विचाराची स्त्री आहे तर जेठानी परंपरावादी आणि कमी शिकलेली आहे. त्या रोज माझ्याशी भांडत असतात. घरात जेठानीशी वारंवार भांडण होत असल्याने आम्हाला वेगळया घरात राहायला हवे का? यासाठी सासूबाई मला मनाई करतात, पण त्याचवेळी जेठानीचे बोलणे सहन करायला ही सांगतात. मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायचे आहे पण मी ते कधी करू शकले नाही कारण, त्याला आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. मला सांगा मी काय करू?

जर सलोख्याचे सर्व मार्ग बंद असतील आणि कौटुंबिक कलह रोज होत असतील तर वेगळे राहण्यात काही नुकसान नाही. पण त्यापूर्वी तुम्ही जर सार्थक पुढाकार घेतलात तर घरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ शकते.

सर्व प्रथम, तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की परस्पर भांडणाचे खरे कारण काय आहे? सामान्यत: घरगुती भांडण हे बजेटमधील भागीदारी, स्वयंपाकघरात कोण किती काम करते, घरातील कामांचे वितरण इत्यादीशी संबंधित असते. कधी-कधी एकमेकांचा मत्सर केल्यानेही परस्परांमध्ये दुराव्याचे वातावरण निर्माण होते.

भांडणाचे खरे कारण जाणून घेतल्यानंतर समेट करण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल, सासू आणि पती यांच्याकडून जेठानीच्या भांडणाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानेही परस्पर संबंध सुधारू शकतात. जेठानी कमी साक्षर आहेत, त्यामुळे हेही एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात तुमच्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. योग्य वेळ पाहून जेठानीशी बोलणे हेसुद्धा तुमच्यासाठी चांगले असेल.

जर सासू तुम्हाला वेगळे घर घेण्यास नकार देत असतील तर साहजिकच त्या तुम्हाला आणि जेठानीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यामुळे फक्त तुमची सासूच योग्य निर्णय घेऊ शकतात.

एक-दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त कुटुंब ही आजच्या काळाची गरज आहे, जिथे राहून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या पंखांना उड्डाण देऊ शकेन.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर सागरिका अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित महिला आहे. माझी काही स्वप्ने आहेत, त्यामुळे मला सध्या आई व्हायचे नाही. जर मला वयाच्या ३५-३६ व्या वर्षी आई व्हायचे असेल तर यात काही अडचण येऊ शकते का? काही लोक म्हणतात की या वयात आई होणे शक्य नाही. ते खरे आहे का?

उत्तर : वाढत्या वयानुसार अंडयांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, त्यामुळे या वयात गर्भधारणा होणे कठीण होते. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला असेल तर यात काही अडचण नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या वयातही गर्भधारणा करता येते. यासाठी तुम्ही आयव्हीएफची मदत घेऊ शकता.

तुम्ही अजून तरुण आहात, त्यामुळे तुमच्या अंडयांचा दर्जा चांगला असेल. तुम्ही तुमची निरोगी अंडी गोठवू शकता जे तुमच्यासाठी भविष्यात आई होण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आयव्हीएफ उपचारदेखील सहज पूर्ण होतील. गोठवलेले अंडे तुमच्या पतीच्या शुक्राणूमध्ये मिसळले जाईल आणि प्रथम गर्भ तयार केला जाईल आणि नंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात रोपण केला जाईल. काही दिवसात तुम्हाला गर्भधारणेची चांगली बातमी मिळेल.

प्रश्न : मी ३५ वर्षांची आहे, माझ्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत, पण अजूनही गर्भधारणा होऊ शकलेली नाही. मला धूम्रपानाची ही सवय आहे. मी आई होऊ शकेन, असा काही मार्ग आहे का?

उत्तर : या वयात गर्भधारणा होण्यात समस्या येणे सामान्य आहे, परंतु याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. जर तुमचा पतीदेखील धूम्रपान करत असेल तर त्याला ही सवय सोडण्यास सांगा. तुमचे वय मोठे आहे, त्यामुळे लवकर गर्भधारणा होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या वयाबरोबर समस्या अजून वाढू शकते. यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर उपचाराने फायदा होत नसेल तर तुम्ही आयव्हीएफ उपचाराची मदत घेऊ शकता.

प्रश्न : मी ४० वर्षांची आहे. मी एकदा आयव्हीएफ उपचार केले, पण ते अयशस्वी झाले. मला पुन्हा आयव्हीएफचा प्रयत्न करायचा आहे. यात काही धोका आहे का?

उत्तर : आपण आयव्हीएफ उपचार अयशस्वी होण्याचे कारण स्पष्ट केले नाही. बरं, आयव्हीएफ उपचारांना कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच न करता ते पुन्हा करू शकता. होय, हे वारंवार केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. यशस्वी आयव्हीएफसाठी तणावापासून दूर राहा आणि वजन संतुलित ठेवा.

आजकाल आयव्हीएफ क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. डॉक्टरांच्या सल्याने आवश्यकतेनुसार तंत्र निवडल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते.

प्रश्न : मी ३५ वर्षांची विवाहित महिला आहे. मला आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने आई व्हायचे आहे आणि आशा आहे की हे तंत्रज्ञान यशस्वी होईल. म्हणूनच मला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भाची संख्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम करते काय?

उत्तर : गर्भधारणा होण्यासाठी, एका गर्भासह यशस्वी होण्याची शक्यता २८ टक्के असते, तर २ भ्रुणांसह यशस्वी होण्याची शक्यता ४८ टक्के आहे. पण यासोबत जुळी मुले होण्याची शक्यताही वाढते. जर तुम्हाला जुळया मुलांचा धोका पत्करायचा नसेल, तर तुम्ही एकच भ्रुण रोपण करून घेऊ शकता. यासाठी तुमच्या निरोगी अंडयाचा भ्रूण तयार केला जाईल आणि त्यानंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जाईल. यामुळे तुमची गर्भधारणा होण्याची शक्यतादेखील वाढेल आणि तुम्हाला जास्त समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

प्रश्न : मी ३१ वर्षांची वर्किंग वुमन आहे. मला हे जाणून घ्यायचे की आयव्हीएफमध्ये जुळी मुले किंवा अनेक मुले होण्याची शक्यता आहे का?

उत्तर : पूर्वीचे तज्ञ चांगल्या गर्भधारणेसाठी अनेक भ्रुण हस्तांतरणाची शिफारस करत असत, कारण तेव्हा हस्तांतरित केलेला गर्भ कमकुवत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण असे. यामुळे कधी-कधी जुळी किंवा अनेक मुले एकत्र जन्माला येत होती, पण आता काळ बदलला आहे आणि तंत्रज्ञानही बदलले आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे गर्भ कमकुवत आहे की नाही हे कळते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही १ किंवा जुळया मुलांची आई होऊ शकता.

प्रश्न : मी ३४ वर्षांची आहे, मी २ वर्षांपासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता मी आशा गमावत आहे. माझ्या मित्राने मला आयव्हीएफ तंत्राबद्दल सांगितले. मला जाणून घ्यायचे आहे की आयव्हीएफ तंत्रात काही धोका आहे का? या तंत्रामुळे माझ्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही का?

उत्तर : होय, आयव्हीएफ तंत्र हे आई होण्यासाठी वरदान ठरू शकते, परंतु त्याचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण आयव्हीएफ घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या दुष्परिणामातून जावेच लागेल असे नाही.

आयव्हीएफ उपचारात मुदतपूर्व बाळाचा जन्म होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गर्भधारणेदरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याची प्रत्येक गोष्ट कळावी म्हणून वारंवार तपासण्या केल्या जातात.

याशिवाय वागण्यात बदल, थकवा, झोप लागणे, डोकेदुखी, खालच्या ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे इत्यादी समस्यांचाही समावेश आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही या समस्या टाळू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें