महिला बनत आहेत थायरॉईडच्या शिकार

* प्रतिनिधी

अचानक वजन वाढणे, केस गरजेपेक्षा जास्त गळू लागणे इत्यादी लक्षणे सांगतात की, थायरॉईडची समस्या वाढत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लाखो लोक या समस्येने त्रस्त आहेत, तरुण मुलींपासून ते महिलांपर्यंत सर्वच वेगाने याच्या शिकार ठरत आहेत. एका संशोधनानुसार, ८ पैकी १ महिला या समस्येने त्रस्त आहे.

थायरॉईडची ग्रंथी ही गळयासमोर फुलपाखराच्या आकाराएवढी ग्रंथी असते जी हार्मोन्स तयार करते आणि हे हार्मोन्स शरीराच्या वेगवेगळया अवयवांना त्यांचे काम योग्य प्रकारे करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. ते शरीराच्या मेटाबॉलिक म्हणजे चयापचय प्रक्रियेसह हृदय तसेच पचन संबंधी यंत्रणा सुरळीत ठेवतात. मेंदूचा विकास, मांसपेशींवर नियंत्रण आणि हाडे मजबूत राखणेही त्यांच्यामुळेच शक्य होते. थायरॉइडमधील बिघाडामुळे थायरॉइडच्या ग्रंथीच्या कामावर दुष्परिणाम होतो. यामुळे चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स तयार करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो.

महिलांनाच याचा जास्त त्रास का?

थायरॉईडमध्ये होणारा बिघाड ही जास्त करून आपोआपच बरी होणारी प्रक्रिया असते. यात रुग्णाची प्रति सुरक्षा प्रणाली हल्ला करून थायरॉइडच्या ग्रंथी नष्ट करते. विविध संशोधनांनुसार ऑटो इम्युन डिसिस जसे की, सिलिएक डिसिस, डायबिटीस मेलिटस टाइप, इम्प्लिमेंटरी बोवेल डिजिज, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि संधीवाताचा त्रास महिलांना सर्वसामान्यपणे होतोच.

हे आजार शोधून त्यावर उपचार करण्यासाठी यामुळे उशीर होतो कारण, याची वेगवेगळी लक्षणे शोधणे कठीण असते. ऑटो इम्युन आजार आयोडिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतात. गर्भावस्थेत आयोडिनची जास्त कमतरता भासते. याच्या कमतरतेमुळे थायरॉईड हार्मोन्सची पातळी खालावते.

थायरॉईडमधील बिघाडाचे किस्से

हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म, थायरॉईटिस, थायराईड कॅन्सरसारखे आजार पुरुष आणि महिला दोघांनाही त्रासदायक ठरतात. यातील हायपोथायरॉडिज्म, हायपरथायरॉडिज्म हे आजार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १० पट अधिक होतात.

हायपोथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉईडचा आजार आहे. हा आजार तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथीची सक्रियता कमी होते आणि सर्वसाधारण हार्मोन्सच्या तुलनेत कमी हार्मोन्स तयार होतात. यामुळे शरीरातील हार्मोन्स आणि चयापचय प्रक्रियेचे संतुलन बिघडते. महिलांमधील हायपोथायरॉडिज्म होण्यामागील एक सर्वसामान्य कारण म्हणजे ऑटो इम्युन डिसिस. याला हॅशिमोटोज डिसिस असे म्हणतात. यात अँटीबॉडीज हळूहळू थायरॉइडला लक्ष्य करते आणि थायरॉईड हार्मोन्स बनवण्याची क्षमता नष्ट करते.

हायपरथायरॉडिज्म हा एक प्रकारचा थायरॉइडचा बिघाड आहे. हा बिघाड तेव्हा होतो जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त सक्त्रिय होतात आणि गरजेपेक्षा जास्त हार्मोन्सची निर्मिती करतात. हार्मोन्स शरीरातील चयापचय प्रक्त्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

प्राथमिक लक्षणे

बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात थायरॉईडमधील बिघाड लक्षात येत नाही, कारण याची लक्षणे स्पष्ट नसतात. यामुळे त्याला वांझपणा, लिपिड डिसऑर्डर, अॅनिमिया किंवा मानसिक तणाव समजण्याची चूक केली जाते. लक्षणे उशिराने लक्षात येतात. तोपर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई करणे अशक्य होते.

हायपोथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : थकवा, कोरडी त्वचा, मांसपेशी आखडणे, कफ, थंडी सहन न होणे, सुजलेल्या पापण्या, वजन नियंत्रणाबाहेर वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता.

हायपरथायरॉडिज्मच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असतो : भीती वाटणे, झोप न लागणे, वजन कमी होणे, हातांना घाम येणे, हृदयाची वेगवान आणि अनियमित धडधड, डोळे जड होणे, डोळयांच्या पापण्या न मिटता एकटक पाहाणे, दृष्टिदोष, भरपूर भूख लागणे, पोट बिघडणे, गरमी सहन न होणे.

थायरॉईडच्या बिघाडासाठी जबाबदार घटक : थायरॉईडचा आनुवांशिक आजार, ऑटोइम्युन स्थिती, गळयात रेडिएशन असणे, थायरॉइडची शस्त्रक्रिया, थायरॉईड वाढणे.

निर्बंध

थायरॉइडमधील बिघाड हा जीवनशैलीमुळे झालेला बिघाड नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात आयोडिनचे सेवन करण्याव्यतिरिक्त इतर काहीही करण्याची गरज नसते. भारत सरकारने युनिव्हर्सल सॉल्ट आयोडिनेशनला मान्यता दिल्यामुळे आता आयोडाईज्ड मिठात पुरेशा प्रमाणात आयोडिन असते.

थायरॉइडचा बिघाड वेळेवर लक्षात आल्यास आणि योग्य उपचार केल्यास गंभीर परिणाम रोखणे शक्य होते. महिलांनी वर्षातून एकदा थायरॉईड ग्रंथींची तपासणी करून घ्यायला हवी, जेणेकरून आजार लवकर लक्षात येईल आणि वेळीच उपचार करता येईल.

मान्सून स्पेशल : मान्सूनमध्ये काय खाल आणि काय टाळाल

* मिनी सिंह

पावसाचा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही आणतो. त्यामुळे जर आपण या ऋतूत योग्य आहारविहार आणि साफसफाईकडे लक्ष दिले नाही तर आपण अनेक आजारांचे सहज शिकार होऊ शकतो. या ऋतूतल्या योग्य आहाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे, ज्यायोगे आपण स्वत:ला ताजेतवाने आणि तंदुरुस्त ठेवू शकतो.

आपण जाणून घेऊया या ऋतूत आपला आहार कसा असावा :

* पावसाळयात शिळे अन्न खाणे टाळा. नेहमी ताजे अन्नच खा. तसेच लक्षात घ्या की अन्न पचायला हलके असावे. जड आणि तेलकट अन्न नुकसानदायी ठरू शकते.

* या ऋतूत उपाशी राहू नका. उपाशीपोटी बाहेरही जाऊ नका. घरून जेवून किंवा  सोबत डबा घेऊन बाहेर जा. आपल्या लंचबॉक्समध्ये सॅलड असेल याची काळजी घ्या. पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका.

* फळांचे जास्तीत जास्त सेवन करा. फळांमुळे शरीरात ताजेपणा टिकून राहतो. टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे, लीची इ. चे सेवन शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर करतेच, पण त्याचबरोबर आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्ततासुद्धा होते.

* चहाकॉफीऐवजी लिंबू पाणी, थंडाई, कैरी पन्हे, लस्सी, ताक इ. चे सेवन जास्त प्रमाणात करा.

* या ऋतूत बेल, सफरचंद आणि आवळयाचा मोरांबा तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करेल.

* या ऋतूत बॅक्टेरिया आणि व्हायरस अधिकाधिक पसरतात. शुगर कन्टेन्ट असलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ताज्या फळांचे सेवन करा. आधीपासून कापून ठेवलेली फळे खाऊ नका. फक्त ताज्या भाज्याच खा.

* पावसाळयात स्वच्छ पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे.

* शक्य होईल तितके नॉनव्हेज खाणे टाळा.

* या ऋतूत हिरव्या चटण्या खाणे लाभदायक असते. पुदिना, कोथिंबीर, आवळा, कांदा इ.चे सेवन करा.

* घरात पुदिना, कोथिंबीर, ग्लुकोज इ. अवश्य ठेवा. फूड पॉयझनिंगमध्ये आराम  पडतो.

* नियमित व्यायाम अवश्य करा.

फोन मेनिया

* दीपिका

ही दिवसभरातील १५-१६ तास फोनवरच असता का? तसंच तुम्ही सकाळ होताच व्हाट्सऐप वा फेसबुक चेक करू लागता का? तुम्हाला सतत तुमच्या फोनची घंटी वाजतेय असं वाटत राहतं आणि जेव्हा तुम्ही फोन चेक करता तेव्हा फोन आलेला नसतो. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर बदला, कारण तुम्ही जर असेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेळ घालवत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ लागतात. उदाहणार्थ, तुम्ही जर फेसबुक, ट्व्टिर वा व्हॉटसऐपवर दिवसभर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला डिप्रेशन, पाठदुखी, डोळ्यांचे त्रास इत्यादी समस्यांशी सामना करावा लागेल.

चला तुम्हाला सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान यांची ओळख करून देऊया :

प्रत्येक गोष्ट सहजसोपी

फेसबुक असो वा मग व्हॉटसऐप यामुळे लोक एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. तुमचा एखादा मित्र वा नातेवाइक सातासमुद्रापलिकडे राहत असेल तर तुम्ही फेसबुक वा मग इतर नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू शकता. चौकशी करू शकता. तुम्ही फ्रीमध्ये परदेशात राहणाऱ्यांशी गप्पा मारू शकता. जरा आठवा, जेव्हा परदेशात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी ४० ते ५० रुपये प्रति मिनिट खर्च करावे लागत होते. परंतु आता सोशल नेटवर्किंगने प्रत्येक गोष्ट सहजसोपी झालीय.

नेटवर्किंग साइट्स बिनेसचा अड्डा

अलीकडे हा ट्रेण्ड खूपच पहायला मिळतोय. बिझनेसमन आपल्या प्रोडक्ट्सची डिटेल्स फेसबुकवर टाकतात वा फेसबुकवर स्वत:चं पेज बनवतात. एखाद्याला जर प्रोडक्ट्स आवडले तर ते खरेदी करतात, ज्याचा फायदा बिझनेसमनला मिळतो. सोशल नेटवर्किंग साइट्सचा जर विचारपूर्वक विचार केला तर यापासून मोठा फायदादेखील होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्या अलीकडे फेसबुक वा मग ट्विटरवर जाहिरातींच्या माध्यमातून बराच पैसा कमावत आहेत.

माहिती देण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ

जर एखादी माहिती वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असाल तर सोशल नेटवर्किंग तुमच्यासाठी सर्वोत्तम मंच ठरू शकतो. अलीकडे लोकांना आपली समस्या वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकतात, ज्यामुळे गोष्ट वणव्यासारखी पसरते आणि त्यांना लोकांकडून त्वरित प्रतिक्रियादेखील मिळत राहतात.

केवळ फायदेशीर नाहीत या नेटवर्किंग साईट्स, यांचे काही तोटेदेखील आहेत. या, आता तुम्हाला सोशल नेटवर्किंग साइट्सने होणाऱ्या तोट्यांबद्दलही सांगतो.

प्रायव्हसी राहत नाही

अनेकदा लोक सकाळी उठताच फोनचा चेहरा पाहतात. दिवसभर फोनवर गप्पा मारूनदेखील रात्रीदेखील फोनवर असतात. कधी फेसबुक चेक करतात, तर कधी व्हॉट्सऐप. सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रायव्हसी अशी राहतच नाही. कोणीही,  कधीही आपल्याबद्दल सर्च करू शकतो. जसं की आपण काय करतो? कुठे राहतो? कोण कोण आपल्याजवळ आहे? हे योग्य आहे का? स्वत: विचार करा आणि ठरवा. नेटवर्किंग साइट्सवर एवढी माहिती टाकणं योग्य आहे का?

आजारपणाला आमंत्रण

एका रिसर्चनुसार सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करणारे कमीत कमी १६-१७ तास त्यातच घालवतात. रात्रीच्यावेळी अंधारात फोनवर चॅट करतात. कायम ऑनलाइन राहतात. कमीत कमी दर १०-१५ मिनिचांनी आपला फोन वारंवार चेक करतात, ज्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. काळोखात जेव्हा फोनचा वापर केला जातो, तेव्हा आपली पाहण्याची क्षमता कमी होते. दिवसभर सिस्टमवर फेसबुक खोलून बसून राहिल्याने वा स्काइपवर व्हिडिओ चॅट करत राहिल्याने पाठीच्या कण्यात फरक पडतो. सतत फोनचा वापर करून डिप्रेशनदेखील येऊ शकतं.

वेळेचा अपव्यय

अनेकदा आपण आपलं महत्त्वाचं काम सोडून फोनवर मॅसेज चेक करायला लागतो. मॅसेज चेक करता करता केव्हा दीर्घकाळ चॅट होतं, ते समजतच नाही. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे फोनचा वापर कमी करा.

मुलं बिघडत चाललीत

पूर्वी मुलं आजीआजोबांसोबत वेळ घालवत असत. आपल्या मित्रांसोबत संध्याकाळी खेळत असत. परंतु आता मुलं स्वत:मध्येच गुंतून असतात. त्यांच्याकडे कोणासाठी वेळच नाहीए. आईवडिल हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. अगोदरच मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात.

लॅपटॉप, महागडे फोन मिळाल्यामुळे मुलं दिवसभर त्यामध्येच अडकून राहतात. फोन वा लॅपटॉपवर पोर्न मूव्हिज पाहू लागतात, ज्याचे दुष्परिणाम लवकरच आईवडिलांसमोर येऊ लागतात

कसा कराल योग्य वापर

* फोनचा वापर कमीत कमी करा.

* सतत ऑनलाइन राहू नका.

* प्रथम महत्त्वाची कामे करा.

* काल्पनिक मित्रांसोबत गप्पा मारण्यात

वेळ घालविण्याऐवजी स्वत:ला वेळ द्या.

* प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकू नका.

* वैयक्तिक गोष्टी सोशल नेटवर्किंग

साइट्वरून दूरच ठेवा.

* वारंवार फोन चेक करू नका.

वाढत्या वजनामुळे त्रासले आहात?

* श्रेया कत्याल, आहारतज्ज्ञ

अनेकदा कुणी आपल्या वाढत्या वजनामुळे तर कुणी कृश असल्यामुळे त्रासलेले असतात. कारण आपला आहार कसा असावा हेच त्यांना समजत नसते. जर तुम्हीही यामुळे त्रासले असाल तर काळजी करू नका. यासंदर्भात आहारतज्ज्ञ श्रेया कत्यालशी साधलेला संवाद…

आहार म्हणजे काय?

आहार म्हणजे असे परिपूर्ण खाणे ज्यात सर्व पोषक तत्वे असतात.

चांगले आणि वाईट अन्न म्हणजे काय?

अन्न चांगले किंवा वाईट नसते. आपण कसे, कधी, काय आणि किती खातो यावर ते चांगले की वाईट हे ठरते. म्हणून माणसाने सर्व काही खायला हवे, परंतु कमी प्रमाणात. खाण्यापिण्याची इच्छा मारणे शरीराशी प्रतारणा करण्यासारखे आहे.

योग्य पद्धतीचा अवलंब करून एका महिन्यात किती वजन कमी करता येते?

हे व्यक्तिनुरूप अवलंबून असते. योग्य पद्धतीने एका महिन्यात कमीतकमी सुमारे ३-४ किलोग्रॅमपर्यंत (दर आठवडयाला १ किलोग्रॅम) तर जास्तीत जास्त ८ किलोग्रॅमपर्यंत वजन कमी करता येते. वजन कमी करण्यासोबतच जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते.

पथ्याच्या आहारशैलीत बदल केल्यानंतर वजन पुन्हा वाढते का?

योग्य प्रकारे वजन नियंत्रणात आणल्यानंतर ते आहारात बदल केला तरीही नियंत्रणात राहते. परंतु वजन नियंत्रणात तेव्हाच राहू शकते, जेव्हा जीवनशैलीत बदल करणे हे तुमचे ध्येय असेल. त्यामुळेच एकदा का तुम्ही आहार नियंत्रणासोबत सकारात्मकपणे जीवनशैलीतही परिवर्तन करता, तेव्हा आहारशैलीतील बदलांचे पालन न करताही तुम्ही आहात तसेच राहू शकता.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे वगैरे घेण्याचा सल्ला देता का?

वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आहार, औषधे किंवा कुठल्याही कृत्रिम पद्धतीवर मी विश्वास ठेवत नाही. कारण भविष्यात याचे दुष्परिणाम समोर येतात.

रक्तगटानुसार आहारशैलीत बदल करणे किती परिणामक ठरते आणि तुम्ही कशाप्रकारची आहार योजना तयार करता?

‘अ’ रक्तगटावर आधारित आहारशैली एका मर्यादेपर्यंतच उपयोगी ठरते. ती १०० टक्के परिणामकारक नसते. ती प्रभावी असून तिचे सकारात्मक परिणामही दिसून येतात, परंतु ती सर्वांसाठीच पूर्णपणे लागू करता येत नाही. लोकांसाठी आहार योजना तयार करताना मी त्यांचा रक्तगट लक्षात ठेवते, पण आहार योजना पूर्णपणे रक्तगटावर आधारित नसते. व्यक्तिची आवडनिवड, प्राथमिकता, दिनक्रम, जीवनशैली इत्यादी आहार योजना तयार करताना महत्वाची भूमिका बजावतात.

सर्वसाधारणपणे असा समज आहे की पथ्याच्या आहारशैलीनंतर त्वचा निस्तेज होते. यात कितपत तथ्य आहे?

आहार योजनेचे पालन केवळ अतिरिक्त कॅलरीजना संपवण्यासाठी केले जात नाही तर तुमचे आरोग्य अधिक चांगले बनविण्यासाठी केले जाते. सुदृढ स्वास्थ्यासाठी पोषक तत्वांचा योग्य आहार घेणे सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण दिवसभरात ५-६ वेळा काय खायचे याची योजना तयार केली जाते जेणेकरून तुमची चयापचय प्रक्रिया सुधारून तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल. त्यासाठी निरुपयोगी घटकांना दूर करून आहारात पौष्टिक घटकद्रव्यांचा समावेश करण्यात येतो.

वजन कमी करण्यासाठी मिठाई खाणे बंद केले पाहिजे का?

ज्यांना मिठाई आवडते अशांसाठी माझे उत्तर नाही असे आहे. एका निश्चित कालावधीसाठी आपण आहार योजनेचे पालन करू शकतो, पण कायमस्वरूपी आपल्या आवडीचे पदार्थ खाणे बंद करू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला जे आवडते ते खा, परंतु योग्य प्रमाणात व योग्य वेळी खा. एका वेळचे जेवण समजून मिठाई खाऊ नका तर जेवण झाल्यावर ती खा.

रात्रीचे जेवण आठ वाजण्यापूर्वी करायला हवे किंवा मग अळणी जेवण जेवायला हवे का?

तुम्ही जितके वजन कमी केले आहे ते अळणी जेवल्यामुळे कायमचे तसेच राहील असे मुळीच नाही. त्यामुळेच मी रात्रीचे जेवण नेहमीच अळणी असावे, असा सल्ला देणार नाही. शिवाय रात्री आठपूर्वी जेवणे किंवा अळणी जेवण हा नियम कुठलीच व्यक्ती फार काळापर्यंत पाळू शकत नाही. त्यामुळे मी असा कुठलाच सल्ला देत नाही, जो दीर्घकाळ पाळणे शक्य नाही. म्हणूनच रात्रीचे जेवण योग्य वेळी करा, जेणेकरून जेवण व झोपणे यात कमीतकमी २ तासांचे अंतर राहील.

आहार योजनेसोबतच व्यायामही गरजेचा आहे का?

वजन कमी करण्यासाठी ७० टक्के आहार आणि ३० टक्के व्यायाम महत्त्वाचा आहे असे मानले जाते. याशिवाय वजन कमी करण्याच्या प्रयत्नांदरम्यान जीवनशैलीत बदल करणे गरजेचे असते आणि त्यासाठीच काही बेसिक व्यायाम करणेही आवश्यक आहे, कारण आजकाल बहुतांश लोकांची जीवनशैली श्रमहीन झाली आहे. व्यायाम आपली पचनप्रक्रिया उत्तम राखतो, तसेच वजन कमी करण्याच्या प्रक्रियेलाही गती निर्माण करून देतो.

ब्रेन स्ट्रोक कारण आणि निवारण

* प्रतिनिधी

पक्षाघात म्हणजेच ब्रेन स्ट्रोक हा मेंदूच्या आघात किंवा मेंदूच्या कोणत्याही भागात रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होतो. मेंदूत ऑक्सिजन आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे रक्तवाहिन्यांदरम्यान रक्त जमते आणि रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, ज्यामुळे मेंदूच्या पेशी नष्ट होतात व मेंदू स्वत:चे नियंत्रण गमावतो. याला स्ट्रोक किंवा पक्षाघात म्हणतात. यावर वेळेवर उपचार न केल्यास मेंदू कायमचा खराब होतो. त्या व्यक्तिचा मृत्यूही होऊ शकतो.

आज जगातील सुमारे ८० दशलक्ष लोकांना स्ट्रोकचा त्रास आहे, ५० दशलक्षाहूनही अधिक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते, ब्रेन स्ट्रोकचे २५ टक्के रुग्ण ४० वर्षांचे आहेत. हे लक्षात घेऊन ‘वर्ल्ड स्ट्रोक डे’ दरवर्षी २९ ऑक्टोबरला साजरा केला जातो, ज्याचा उद्देश स्ट्रोक प्रतिबंध, उपचार आणि सहकार्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आहे.

मुंबईतील अपॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. मोहिनीश भटजीवाले सांगतात की ब्रेन स्ट्रोक हे जगभरात मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण मानले जाते. एकटया भारतातच दर मिनिटाला ६ लोकांचा यामुळे मृत्यू होत आहे, कारण ब्रेन स्ट्रोकसारख्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितित त्याची लक्षणे, कारणे, प्रतिबंध आणि त्वरित उपाययोजनांबाबत जनजागृतीचा मोठा अभाव आहे. प्रत्यक्षात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळाल्यास ते बरे होण्याची शक्यता ५० ते ७० टक्क्यांपर्यंत वाढते.

प्रमुख कारण

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार आजच्या धकाधकीच्या युगात मानसिक तणाव, जीवनशैली, धूम्रपान, मद्यपान, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी ब्रेन स्ट्रोकसाठी कारणीभूत आहे. याशिवाय आरामदायक आणि सतत काम करण्याची पद्धतही मेंदू आणि हृदयाशी संबंधित आजारांना आमंत्रण देत आहे. याच कारणांमुळे तरुणांमध्ये हा आजार झपाटयाने पसरत आहे.

या सर्व कारणांशिवाय ८० टक्के लोकांना माहिती नसलेले कारण म्हणजे वातावरण आणि हवामानातील असामान्य बदल, जे आपली त्वचा आणि मेंदूवर विपरीत परिणाम करतात. याचे परिणाम आगामी काळात घातक ठरू शकतात. यास प्रामुख्याने वृक्षतोड जबाबदार आहे.’’

मीरा रोडच्या वोकार्ड हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ खारकर यांच्या मते, ‘‘सर्वसामान्यपणे ब्रेन स्ट्रोककडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्यक्षात प्रत्येक ६ पैकी १ व्यक्ति जीवनात कधी ना कधी याच्या विळख्यात अडकते. हिवाळयात याचा धोका अधिक वाढतो. हार्ट अटॅक, कॅन्सर आणि डायबिटीससारख्या आजारांकडे जितके गांभीर्याने पाहिले जाते, तितक्या गांभीर्याने ब्रेन स्ट्रोककडे पाहिले जात नाही. टाईप २ डायबिटीसच्या रुग्णांसाठी याचा धोका अधिक असतो. हाय ब्लडप्रेशर आणि हायपरटेंशनचे रुग्णही याच्या विळख्यात लवकर अडकतात. गर्भ निरोधक गोळयांचे सेवन आणि कोलेस्ट्रॉलचा वाढलेला स्तरही ब्रेन स्ट्रोकला निमंत्रण देतो.

ब्रेन स्ट्रोकची लक्षणे

मेंदूचे कार्य संपूर्ण शरीरात फार महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत जर शरीराच्या इतर आजारांकडे दुर्लक्ष केले तर ते आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. तोंड, हात व पाय दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी, दृष्टी अंधुक होणे, बोलताना व चालताना समस्या, पाठदुखी इत्यादी ब्रेन स्ट्रोकची मुख्य लक्षणे आहेत. स्ट्रोक नॉन ब्लीडिंग आणि ब्लीडिंग अशा दोन्ही प्रकारचा असतो. ज्यात मेंदूत मज्जातंतू फुगतात किंवा रक्तवाहिन्या फुटतात.

स्ट्रोकच्या प्रकारानुसार उपचार

डॉ. भटजीवाले यांच्या म्हणण्यानुसार ब्रेन स्ट्रोकवर त्वरित उपचार करणे फार महत्त्वाचे आहे. उपचार स्ट्रोक सुरू होण्याच्या ३-४ तासांच्या आत केला गेला तर मेंदूचे नुकसान आणि संभाव्य त्रास कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ, ३ तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषध देणे आवश्यक असते. यानंतर, डॉक्टरांकडून संपूर्ण तपासणी जसे की, सिटीस्कॅन, एमआरआय इत्यादी केल्यानंतर स्ट्रोकसाठी उपचार सुरू केले जातात, ज्याचा हेतू मेंदूचे नुकसान टाळणे हा असतो.

जर स्ट्रोक मेंदूत रक्त पुरवठयात अडथळा निर्माण झाल्यामुळे आला असेल तर त्याचे उपचार खालीलप्रमाणे आहेत :

* नॉन ब्लीडिंग ब्रेन स्ट्रोक झाल्याच्या तीन तासांच्या आत क्लॉट बस्टिंग औषधाचे इंजेक्शन देणे फार महत्वाचे आहे. सोबतच रक्त गोठू नये म्हणून ते पातळ करण्याचे औषधही दिले जाते. याशिवाय शस्त्रक्रियादेखील केली जाते, ज्यामध्ये मानेच्या अरूंद रक्तवाहिन्या उघडल्या जातात.

* ब्लीडिंगमुळे ब्रेन स्ट्रोक असल्यास, असे औषध दिले जाते जे सामान्यपणे ब्लड कोटिंग कायम ठेवण्यास मदत करते. मेंदूमधून रक्त काढून टाकण्यासाठी किंवा दबाव कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. खराब झालेल्या रक्तवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. ब्लीडिंग रोखण्यासाठी कॉईल म्हणजेच तार वापरली जाते. मेंदूतील सूज रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी औषध दिले जाते. याव्यतिरिक्त, मेंदूच्या रिक्त भागात ट्यूब घालून दाब कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

अफेसिया होण्याचा धोका

स्ट्रोकनंतर रुग्णाला शारीरिक आणि मानसिक अपंगत्व येण्याची अधिक शक्यता असते, जी स्ट्रोकमुळे प्रभावित झालेल्या भागावर आणि आकारावर अवलंबून असते. नॅशनल अफेसिया असोसिएशनच्या अहवालानुसार, ब्रेन स्ट्रोकच्या २५ ते ४०टक्के रुग्णांना अफेसिया होण्याची शक्यता असते. ही अशी स्थिती आहे जी रूग्णांच्या बोलण्याची, लिहिण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता प्रभावित करते, ज्याला ‘भाषा डिसऑर्डर’ देखील म्हटले जाते. हा आजार ब्रेन ट्यूमर, ब्रेन इन्फेक्शन, अल्झायमर इत्यादीमुळे होतो. बऱ्याच बाबतीत अफेसियाला अपस्मार आणि इतर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लक्षणं म्हणूनही पाहिले जाते.

पुनर्वसन ठरते उपयुक्त

ब्रेन स्ट्रोकमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन बऱ्याच प्रमाणात मदत करते. जरी काही रुग्ण पूर्णपणे ठीक होऊ शकत नसले तरी रिहॅबिलिटेशनमुळे बऱ्याच रुग्णांचे आरोग्य सुधारते. मृत त्वचेच्या पेशी, मज्जातंतूंच्या पेशी दुरुस्त किंवा बदलल्या जाऊ शकत नाहीत, परंतु मानवी मेंदू लवचिक असतो. यामुळे रुग्ण नुकसान न झालेल्या मेंदूच्या पेशींचा वापर करण्याचा नवा मार्ग शिकू शकतो. योग्य काळजी, सोबत आणि प्रोत्साहन देऊन अशा रुग्णांचे जीवन सार्थकी लावता येऊ शकते.

आरोग्यास अपायकारक टाइट जीन्स

– एनी अंकिता

अलीकडे मुलींना टाइट आणि स्किनी जीन्स घालणं आवडतं, मग त्यांना हे घालून कम्फर्टेबल वाटत असो वा नसो, पण त्या कॅरी करतात. खरं तर त्यांना वाटतं की हे घातल्याने त्यांची फिगर सेक्सी वाटेल आणि सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे आकर्षित होईल. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की टाइट जीन्स तुम्हाला आजारी पाडत आहे? यामुळे तुम्ही इस्पितळातही पोहोचू शकता?

ऑस्ट्रेलिया येथील ऐडिलेड शहरात एका मुलीसोबत काहीसं असंच घडलं आहे. स्टायलिश आणि सेक्सी दिसण्यासाठी मुलीने टाइट जीन्स घातली तर खरी, पण या टाइट जीन्सने तिला चक्क इस्पितळात पोहोचवलं. तिथे कळलं की तिच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह थांबला आहे. मुलीची अवस्था इतकी वाईट झाली होती की ती आपल्या पायांवर व्यवस्थित उभीदेखील राहू शकत नव्हती. तिला लोकांची मदत घ्यावी लागली.

फॅशनसोबत स्वत:ला अपडेट ठेवणं चांगली गोष्ट आहे, पण यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं नाही. टाइट जीन्स फिगरला सेक्सी लुक देत असली तरी अपायकारक असते. याच्यामुळे अनेक प्रकारचे हेल्द प्रॉब्लेम्स उद्भवतात, ज्याकडे मुली लक्ष देत नाहीत.

बेशुद्ध पडणं

कायम टाइट फिटिंगचे कपडे घातल्याने दम कोंडू लागतो, ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो.

पाठदुखी

आजच्या काळात आपल्यापैकी अनेक मुलींना लो वेस्ट जीन्स घालणं आवडतं. टाइट आणि लो वेस्ट जीन्स पाठीच्या स्नायूंना कम्प्रेस आणि हिल बोनच्या मूव्हमेंटमध्ये अडथळा आणतात. त्यामुळे स्पाइन आणि पाठीवर ताण पडतो आणि वेदनेची समस्या उत्पन्न होते.

पोटदुखी

जेव्हा घट्ट कपडे घातले जातात तेव्हा कपडा पोटाला चिकटतो. त्यामुळे पोटावर ताण पडतो आणि पोटदुखी होऊ लागते. इतकंच नव्हे, तर टाइट जीन्समुळे पचनक्रियादेखील असंतुलित होते, ज्यामुळे अॅसिडिटीचा त्रास उत्पन होतो.

अंगदुखी

टाइट जीन्स थाइजच्या नर्व्सला कंप्रेस करते, ज्यामुळे झिणझिण्या आणि जळजळ जाणवते. यामुळे डोकेदुखी, अंगदुखी यांसारख्या समस्यांनाही सामोरं जावं लागतं. इतकंच नव्हे तर, टाइट जीन्स घातल्याने बसायला उठायलाही समस्या होते आणि बॉडीचा पोस्चर बिघडू लागतो.

थकवा जाणवणं

जेव्हा टाइट जीन्स घातली जाते तेव्हा खूप लवकर थकवा येतो, ज्याचा आपल्या कामावरही प्रभाव पडतो. तेव्हा आपण विचार करतो की जर ऑफिसातही नाइट डे्रस घालायचं स्वातंत्र्य असतं तर? म्हणून तुम्हालाही जर असं वाटत असेल तर काही दिवस सैल कपडे घालून बघा. तुम्हाला स्वत:मध्ये फरक दिसून येईल.

यीस्ट इन्फेक्शन

ही समस्या त्या ठिकाणी जास्त दिसून येते, जिथे जास्त घाम येतो. टाइट जीन्स घातल्याने शरीराला हवा लागत नाही, ज्यामुळे शरीरात यीस्टचं प्रोडक्शन वाढतं. यामध्ये खाज, जळजळ आणि वेदना होते. याकडे दुर्लक्ष करणं भयंकर ठरू शकतं.

फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका

टाइट जीन्समुळे फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका वाढतो. यामुळे त्वचेवर लाल पुरळ उठतं आणि रॅशेज येतात.

जीन्सव्यतिरिक्तही अनेक आउटफिट आहेत

केवळ टाइट आणि स्किनी जीन्स आपल्याला आजारी करत नाहीत, तर इतरही असे अनेक कपडे आहेत ज्यांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यांच्यापैकी एक आहे शेपवियर. शेपवियर शरीरावरील अधिक फॅट लपवून आपल्याला स्लिम दाखवत असलं तरी याचा आपल्या शरीराच्या अवयवांवर वाईट प्रभाव पडतो. शेपवियरव्यतिरिक्त टाइट ब्रा, पॅण्टी, फिटिंग टीशर्ट, टाइट बेल्ट, आणि हाय हीलचाही वाईट प्रभाव पडतो.

टाइट जीन्स घालणं का आवडतं

* मुलींना वाटतं की त्या टाइट आणि फिटिंग कपड्यांमध्येच सेक्सी दिसू शकतात.

* मुलांचं लक्ष वेधण्यासाठी.

* बोल्ड आणि कॉन्फिडेंट दिसण्यासाठी.

* अपडेट आणि स्टायलिश दिसण्यासाठी.

* मुली आपल्या मैत्रिणींना जळवण्यासाठीदेखील टाइट जीन्स घालणं पसंत करतात.

* काही मुली फक्त दुसऱ्यांचं बघून टाइट जीन्स घालतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें