* मिनी सिंह

पावसाचा ऋतू आपल्यासोबत अनेक आजारही आणतो. त्यामुळे जर आपण या ऋतूत योग्य आहारविहार आणि साफसफाईकडे लक्ष दिले नाही तर आपण अनेक आजारांचे सहज शिकार होऊ शकतो. या ऋतूतल्या योग्य आहाराविषयी माहिती असणे आवश्यक आहे, ज्यायोगे आपण स्वत:ला ताजेतवाने आणि तंदुरुस्त ठेवू शकतो.

आपण जाणून घेऊया या ऋतूत आपला आहार कसा असावा :

* पावसाळयात शिळे अन्न खाणे टाळा. नेहमी ताजे अन्नच खा. तसेच लक्षात घ्या की अन्न पचायला हलके असावे. जड आणि तेलकट अन्न नुकसानदायी ठरू शकते.

* या ऋतूत उपाशी राहू नका. उपाशीपोटी बाहेरही जाऊ नका. घरून जेवून किंवा  सोबत डबा घेऊन बाहेर जा. आपल्या लंचबॉक्समध्ये सॅलड असेल याची काळजी घ्या. पाण्याची बाटली सोबत घ्यायला विसरू नका.

* फळांचे जास्तीत जास्त सेवन करा. फळांमुळे शरीरात ताजेपणा टिकून राहतो. टरबूज, खरबूज, काकडी, संत्री, द्राक्षे, लीची इ. चे सेवन शरीरातील पाण्याची कमतरता तर दूर करतेच, पण त्याचबरोबर आवश्यक पोषक तत्त्वांची पूर्ततासुद्धा होते.

* चहाकॉफीऐवजी लिंबू पाणी, थंडाई, कैरी पन्हे, लस्सी, ताक इ. चे सेवन जास्त प्रमाणात करा.

* या ऋतूत बेल, सफरचंद आणि आवळयाचा मोरांबा तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करेल.

* या ऋतूत बॅक्टेरिया आणि व्हायरस अधिकाधिक पसरतात. शुगर कन्टेन्ट असलेल्या फळांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे ताज्या फळांचे सेवन करा. आधीपासून कापून ठेवलेली फळे खाऊ नका. फक्त ताज्या भाज्याच खा.

* पावसाळयात स्वच्छ पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे.

* शक्य होईल तितके नॉनव्हेज खाणे टाळा.

* या ऋतूत हिरव्या चटण्या खाणे लाभदायक असते. पुदिना, कोथिंबीर, आवळा, कांदा इ.चे सेवन करा.

* घरात पुदिना, कोथिंबीर, ग्लुकोज इ. अवश्य ठेवा. फूड पॉयझनिंगमध्ये आराम  पडतो.

* नियमित व्यायाम अवश्य करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...