‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!

* नम्रता पवार

मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे. प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले असून दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टिजरमध्ये दिसून आली आहे.

Teaser Link –

‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टिझरमधून लक्षात येत आहे.

टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. प्रत्येक पात्राची झलक दाखवणारा हा टिझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणणारा आहे. कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे.

चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणतात, “‘दशावतार’ ही कोकणातील मातीशी घट्ट जुळलेली पण जगभरातल्या प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. त्यातली भव्यता, थरारक प्रसंग आणि भावनिक क्षण हे प्रेक्षकांना आजवर न पाहिलेला अनुभव देतील अशी खात्री आहे. हा अनुभव घ्यायला चित्रपटगृहातच यावं लागेल अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे!”

चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे म्हणतात, “या चित्रपटाच्या भव्यतेची झलक टीझरमध्येच दिसून येते. यात प्रेक्षकांना सिनेमॅटिकली काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार आहे. अनुभवी कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपट अधिक उठून दिसतो.”

या चित्रपटाबाबत झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “‘बदलत्या काळानुसार मराठी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अभिरुचीसुद्धा बदलत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दर्जा सोबतच नाविन्याची जोड असणाऱ्या कथांना प्राधान्य देण्याचे काम झी स्टुडिओज करत आहे. प्रेक्षकांना आपल्या मातीतील गोष्ट अतिशय वेगळ्या ढंगाने सांगणारा हा चित्रपट असून या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सिने सृष्टीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास झी स्टुडिओच्या टीमला आहे.”

येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

सोनम कपूरचा ‘आयशा’ला १५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिमान

* सोमा घोष

बॉलीवूडमधील आयकॉनिक स्टाईल फिल्म आयशा ला आज १५ वर्ष पूर्ण होत आहेत. ६ ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित झालेली ही फिल्म हळूहळू कल्ट क्लासिक ठरली – विशेषतः फॅशनप्रेमी आणि तरुण प्रेक्षकांमध्ये. रिया कपूरच्या निर्मिती क्षेत्रातल्या पदार्पणाची ही फिल्म होती, ज्यात सोनम कपूर, अमृता पुरी आणि इरा दुबे मुख्य भूमिकेत होते. दिग्दर्शन राजश्री ओझा यांनी केलं होतं.

या निमित्ताने सोनम कपूरने आपल्या भावना व्यक्त करत म्हटलं: “आयशा करताना आमचं उद्दिष्ट कधीच ‘संस्कृतीवर प्रभाव’ टाकण्या चं नव्हतं. आम्ही दोन मुली होतो, ज्यांना एक अशी फिल्म बनवायची होती, जी आम्हाला प्रेक्षक म्हणून पाहायला आवडेल — आणि जी त्या काळात बॉलिवूड तयार करत नव्हता. लोकांनी ती फिल्म पाहून आम्हाला जाणीव करून दिली की आयशा तरुणाईसाठी एक पिढी-परिभाषित फिल्म बनली होती.”

फॅशनला दिलं केंद्रस्थान

“फिल्म करताना आम्हाला माहीत होतं की आम्हाला फॅशनशी खेळायचं आहे, ती आकर्षक आणि लोकांना सहज पोहोचणारी बनवायची आहे. आमचं दोघींनाही फॅशन आवडत होती, आणि लोक त्यामध्ये रस घेत होते, पण याआधी अशी कोणतीही फिल्म नव्हती जिथे फॅशन इतक्या ठामपणे केंद्रस्थानी होती. आम्हाला ही माहीत नव्हतं की आयशा सिनेमावर, तरुणाईच्या मानसिकतेवर आणि पॉप कल्चर वर इतका परिणाम करेल.”

“आयशा ने बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच फॅशनला पार्श्वभूमी ऐवजी मध्यभागी आणलं. या फिल्मने स्टाईल आणि स्वतःच्या अभिव्यक्तीबद्दल मुख्य प्रवाहात संवाद सुरू केला — ही एक अशी गोष्ट आहे जी मी कायम समर्थन करत आले आहे.”

“आयशा प्रत्येक तरुण मुलीची ओळख होती”

“म्हणूनच मला वाटतं की आजही आयशा माझ्या हृदयात एक खास स्थान राखून आहे — आणि माझ्या पिढीतील प्रत्येक मुलीच्या हृदयातसुद्धा. तिचं पात्र असं आहे, जे प्रत्येक तरुण मुलीला स्वतःला शोधताना प्रतिबिंबित करतं — स्टाईलिश, हुशार, पण एकटी, अधुरी आणि प्रेमाच्या शोधात. त्यामुळेच कदाचित आयशा आजही पॉप कल्चरमध्ये, वॉर्डरोबमध्ये आणि हृदयात जिवंत आहे — आणि हेच आमच्यासाठी आजचं सर्वात मोठं गिफ्ट आहे!”

‘आयशा’ची सहनिर्मिती रिया कपूर, अनिल कपूर आणि सुनील मनचंदा यांनी केली होती.

झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध

* प्रतिनिधी

१५ जुलै २०२५, मुंबई* – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) हे अग्रगण्य कंटेंट आणि तंत्रज्ञान पॉवरहाऊस.  *‘झी रायटर्स रूम’* ची अभिमानाने घोषणा करत आहेत. हा एक लॅन्डमार्क उपक्रम असून यातून देशभरातील युवा आणि भावी पटकथालेखकांना शोधून त्यांचे संवर्धन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्‌य आहे. ‘झी रायटर्स रूम’ हा केवळ एक टॅलेंट हंट नाही, तर ‘युअर्स ट्रुली, झी’ या कंपनीच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत असलेली एक सर्जनशील चळवळ आहे. विविध प्लॅटफॉर्म्सवरील झीच्या कंटेंटचा दर्जा उंचावण्याचा हा उपक्रम आहे. नव्या दृष्टिकोनांची मागणी असलेल्या या काळात, या उपक्रमाचा उद्देश हा अस्सल कथा सांगण्याची क्षमता असलेल्या नवोदितांना व्यावसायिक पटकथालेखनाच्या जगाशी जोडणे हा आहे. या माध्यमातून निवडले गेलेले लेखक झीच्या टीव्ही, डिजिटल आणि चित्रपट प्लॅटफॉर्म्ससाठी कथा लिहिण्याची संधी मिळवू शकतील.

‘झी’च्या सेंट्रल कंटेंट आणि प्रादेशिक टीम्सच्या पुढाकाराने राबवण्यात येणारा हा उपक्रम, भारताच्या सातत्याने विकसित होत असलेल्या मनोरंजन विश्वाच्या गरजा आणि देशभरातील न टिपल्या गेलेल्या प्रतिभा यांच्यातील दुवा साधण्याचे काम करणार आहे. ‘झी रायटर्स रूम’ या उपक्रमाची घोषणा *सात भारतीय भाषांमध्ये* करण्यात आलेल्या मनाला भिडणाऱ्या ब्रँड फिल्मद्वारे करण्यात आली. या फिल्मच्या उद्देश एकच आहे *”उद्याचे लेखक घडवणे.”* ही एकसंध अशी दूरदृष्टी या फिल्मच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.

*८०  शहरांमध्ये* आणि *३२ कार्यक्रम केंद्रांमध्ये* राबवला जाणारा हा उपक्रम *ऑन-एअर, डिजिटल आणि ऑन-ग्राऊंड प्लॅटफॉर्म्सवरून* चालवलेल्या जोरदार प्रचार मोहिमेमुळे आणखी प्रभावी ठरत आहे. या उपक्रमाचा उद्देश *मराठी, हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम* या भाषांमधील प्रतिभावान कथाकारांना शोधून त्यांना एक अद्वितीय संधी देणे हाच आहे — ही एक अशी सहयोगी रायटर्स रूम आहे जिथे कल्पकता, शिस्त आणि रचनात्मक कलेला वाव मिळेल.

या उपक्रमाबद्दल बोलताना *झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर राघवेंद्र हुंसूर* म्हणाले, “भारतातील सर्वात मोठ्या स्टोरीटेलर्सपैकी एक म्हणून, पुढच्या पिढीतील लेखन प्रतिभेला घडवणे ही केवळ आमच्यासाठी संधी नाही, तर आमची जबाबदारी आहे. झीमध्ये आम्ही मानतो की आमची खरी ताकद केवळ आम्ही सांगत असलेल्या कथांमध्ये नाही, तर त्या कथा सांगणाऱ्या लेखकांमध्ये आहे – जे आम्ही शोधतो आणि घडवतो. ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही एक असे व्यासपीठ तयार करत आहोत जिथे अस्सल आवाज, न ऐकले गेलेल्या कल्पना आणि प्रामाणिक भावनांना स्वतःचा आकार मिळू शकेल. हा कार्यक्रम स्पर्धात्मक नाही – ही आमची बांधिलकी आहे, भारताच्या प्रत्येक कोपऱ्यातून येणाऱ्या लेखकांना योग्य साधने, मार्गदर्शन आणि आत्मविश्वास देण्याची, जेणेकरून ते कालातीत अशा प्रभावी कथा सर्व स्क्रीनवर, सर्व प्रांतांमध्ये, सर्व शैलींमध्ये तयार करू शकतील – आमचे काम म्हणजे नव्या सर्जनशील प्रतिभेला सक्षम बनवणे, त्यांना लेखनकौशल्य, धैर्य आणि संधी देणे. कारण स्टोरीटेलिंगचे भवितव्य हे केवळ आपण काय तयार करतो यावर नाही, तर आपण कोणासोबत तयार करतो यावरही अवलंबून आहे.”

*झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक महादेव* म्हणाले, “‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून आम्ही आमच्या ब्रँड वचनबद्धतेला आणखी एक पाऊल पुढे नेत आहोत, उत्तम कथाकथनकौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करून आणि अशा लेखकांचा एक समुदाय तयार करून, जे वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण कथा सांगण्यास आम्हांला मदत करतील. आम्ही एक असे व्यासपीठ निर्माण करत आहोत जे अंतःकरणात लेखनाची खरी धग असलेल्या लेखकांना उद्याचे कथाकार बनण्याचे दरवाजे उघडते.”

*झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या ईस्ट, नॉर्थ, प्रीमियम क्लस्टरचे चीफ क्लस्टर ऑफिसर सम्राट घोष* म्हणाले, “बंगाल ही नेहमीच साहित्यिक आणि सिनेमॅटिक प्रतिभेचे केंद्र राहिले आहे. ‘झी रायटर्स रूम’सह उदयोन्मुख बंगाली कथानाककारांसाठी आम्ही एक आधुनिक व्यासपीठ उभे करत आहोत जिथे त्यांना आपला आवाज सापडेल आणि अशा कथा तयार करता येतील ज्या परंपरेची समृद्धता आणि आधुनिकतेची जाण दोन्ही अधोरेखित करतील.”

*झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्या साउथ आणि वेस्ट क्लस्टरचे चीफ क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन* म्हणाले, “दक्षिण आणि पश्चिम भारत हे देशातील सर्वाधिक समृद्ध आणि सर्जनशील कथाकथन परंपरांचे माहेरघर आहे. ‘झी रायटर्स रूम’ टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट अशा सर्व माध्यमांवर कंटेंट निर्मितीमध्ये ऊर्जा आणि सर्जनशीलता आणण्यास मदत करेल.” स्व-अध्ययनातून विकसित झालेल्या किंवा औपचारिक शिक्षणातून स्वतःमध्ये आधीच सर्जनशीलतेची ठिणगी असलेल्या लेखकांसाठी खास तयार करण्यात आलेला *‘झी रायटर्स रूम’* हा उपक्रम कॉलेज फेस्टिव्हल्स, रायटिंग क्लब्स किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपली चमक दाखवलेल्या पण अद्याप या या मनोरंजन विश्वात न आलेल्या प्रतिभेचे आम्ही स्वागत करतो.

*हा उपक्रम लेखनाच्या प्राथमिकता शिकवण्यासाठी नाही* , तर ज्यांच्यात क्षमता आहे अशा लेखकांना प्रोफेशनल स्क्रीनरायटर्समध्ये घडवण्यासाठी, त्यांचे कौशल्य शिस्तबद्धपणे विकसित करण्यासाठी आहे.

ह्या *७० नवोदित लेखक* आणि *३० उदयोन्मुख तज्ज्ञ लेखक* कलाकारांना आणि त्यांच्या संकल्पनांना टीव्ही, ओटीटी आणि चित्रपट माध्यमांमध्ये जोडण्यासाठी झी कटिबद्ध आहे. या नवोदित लेखकांना झीच्या कंटेंटसाठी नव्या कथा, आकर्षक नवीन जग, प्रभावी पात्ररचना आणि बांधेसूद कथानकांमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका *आयडिया-जेनरेशन इंजिन* मध्ये घडवले जाईल. नोंदणीसाठी भेट द्या: [www.zeewritersroom.com]

*प्रत्येक सहभागी लेखकाला खालील प्रक्रियेतून जावे लागेल:

  • *लेखी चाचणी:* नोंदणी केलेल्या सहभागींच्या निवड कार्यक्रमादरम्यान लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • *सादरीकरणाचे मूल्यमापन:* लेखन गुणवत्तेच्या आधारे एक रीडिंग कमिटी सर्वोत्तम १० टक्के उमेदवारांची निवड करेल.
  • *मुलाखत प्रक्रिया:* अंतिम फेरीत पोहोचलेल्या उमेदवारांचे मूल्यमापन या क्षेत्रातील तज्ज्ञ पॅनेलद्वारे केले जाईल.
  • *झी रायटर्स रूममध्ये समावेश:* निवड झालेल्या सर्वोत्तम १०० लेखकांना ‘झी रायटर्स रूम’मध्ये सहभागी करून घेतले जाईल, जिथे ते तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली कथा कल्पना विकसित केल्या जातील.

*तर मग वाट कसली पाहताय? उद्याच्या कंटेंटविश्वाचा चेहरा घडवण्यासाठी ‘झी रायटर्स रूम’मध्ये आजच सामील व्हा !*

“गोपी सरसोबतचा हा कलात्मक प्रवास माझ्यासाठी सन्मानाची आणि रूपांतर करणारी अनुभूती आहे” – वाणी कपूर

* सोमा घोष

नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंट यांची पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणारी मिथक-गूढ-गुन्हेगारी सीरीज ‘मंडला मर्डर्स’ येत्या २५ जुलैला प्रीमियर होणार आहे. ही मालिका जितकी कथानकासाठी चर्चेत आहे, तितकीच अभिनेत्री वाणी कपूरच्या ओटीटी डेब्यूमुळेही चर्चेचा विषय ठरली आहे.

या सीरीजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वाणी पहिल्यांदाच ‘मर्दानी’ फ्रँचायझीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शक गोपी पुथरन यांच्यासोबत काम करत आहे.

वाणी कपूर आपल्या अनुभवाविषयी म्हणते, “गोपी सरसोबत काम करणं म्हणजे कथाकथनातील एक मास्टरक्लास अनुभवणं आहे. त्यांच्या दिग्दर्शनात असणारी वास्तवतेची धार आणि मनोवैज्ञानिक खोली एकत्र येऊन प्रत्येक प्रसंग एक अनुभव बनतो. ते केवळ थ्रिलर तयार करत नाहीत, तर एक अशी दुनिया उभी करतात जिथे प्रत्येक पात्राचा हेतू एक कोडं असतो आणि प्रत्येक चिन्हामागे एक रहस्य.”

ती पुढे म्हणाली,”गोपी सर जसे प्रत्येक सीनमध्ये प्रामाणिकतेचं दर्शन घडवतात, तसंच कलाकारांकडून ही ते त्याच प्रामाणिकतेची अपेक्षा करतात. पात्राच्या आत खोलवर दडलेल्या भावना शोधण्याची ही प्रक्रिया खूपच आव्हानात्मक असते, पण त्याचवेळी ती सर्जनशील दृष्टिकोनाने समृद्ध करणारी ही ठरते. त्यांच्यासोबतचा हा प्रवास माझ्यासाठी एक परिवर्तनकारी अनुभव आहे.”

‘मंडला मर्डर्स’ ही नेटफ्लिक्स आणि यशराज फिल्म्स यांची दुसरी वेब सिरीज आहे. याआधी २०२३ मध्ये आलेली ‘द रेल्वे मेन’ ही सीरीज प्रचंड यशस्वी ठरली होती.

या मालिकेत वाणी कपूरसोबत वैभव राज गुप्ता, सुरवीन चावला, आणि श्रिया पिळगावकर यांच्यासारखे अनुभवी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दिग्दर्शक गोपी पुथरन आणि सह-दिग्दर्शक मनन रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली ही मालिका वाईआरएफ एंटरटेनमेंटने निर्माण केली आहे. गुन्हेगारी, मानसशास्त्रीय थरार, आणि पौराणिक प्रतीकांचे मिश्रण असलेली ही मालिका प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे.

अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

* नम्रता पवार

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून एक रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावलेली. त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे.

या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ‘’ ‘परिणती’ या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर विचारही करण्यास भाग पाडेल.’’

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

* नम्रता पवार

मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘जारण’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच आता या चित्रपटातील प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या भयावह गाण्याला अमृता सुभाष, सिंधुजा श्रीनिवासन, मनीषा पांडरांकी, लक्ष्मी मेघना यांचा आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या शब्दांनी या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांच्या संगीताने या गाण्यातून चित्रपटाबद्दलची गूढता अधिकच वाढवली आहे. त्यांच्या अफलातून संगीताने हे गाणे एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

‘जारण’च्या पोस्टरपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात टिझर आणि ट्रेलरने या उत्सुकतेत अधिकच भर टाकली. ‘जारण’चा ट्रेलर प्रचंड लोकप्रिय होत असून त्याला अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही येत आहेत. भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. त्यात आता या प्रमोशनल साँगने उत्कंठा वाढवली आहे.

सोनाली आणि भार्गवीने आपल्या प्रभावी अभिनयातून या गाण्यात एक रहस्यमय आणि भीतीदायक वातावरण निर्माण केले आहे. गाण्याचा मूड संपूर्णतः भयावह, गूढतेने भरलेला असून, त्यातील संगीत, पार्श्वभूमी आणि दिग्दर्शन प्रेक्षकांच्या मनात थरकाप निर्माण करणारे आहे. गाण्याच्या माध्यमातून चित्रपटाची संकल्पना अधिकच स्पष्ट होत असून कथानकातील अस्वस्थ करणारी आणि विचारप्रवृत्त करणारी बाजू यानिमित्ताने प्रेक्षकांसमोर येत आहे.

निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या गाण्यातून आम्ही ‘जारण’ची भीतीदायक आणि सोबतच भावनिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, गायन आणि व्हिज्युअल्स यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारे आहे. चित्रपटाचा मूड आणि आशय या एका गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होत आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे सोनाली कुलकर्णी व भार्गवी चिरमुले या गाण्यात पाहायला मिळत आहेत. या दोघी उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच याव्यतिरिक्त त्या माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे मैत्रीखातर त्यांनी या प्रमोशनल गाण्यात सहभाग घेऊन मला व चित्रपटाच्या पूर्ण टीमला सहकार्य केले.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, “ ‘जारण’चे प्रमोशनल साँग तयार करताना चित्रपटाचा मूड लक्षात घेऊनच हे गाणे करायचे होते. चित्रपटाची संकल्पना कुठेही विस्कळीत होणार नाही याची काळजी घायची होती. त्यामुळे हे जरा आव्हानात्मक होते. प्रत्येक मूड, ताल, आवाज यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष दिले. अर्थात हे सगळे गायक, गीतकार यांच्या साथीनेच झाले. हे गाणे कमाल बनले असून प्रेक्षकांना ते नक्की भावेल. ”

या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, ‘’माझ्यासाठी हा अनपेक्षित अनुभव होता. काय गाणे असेल, आपण कोणत्या झोनमध्ये जाणार आहोत, याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. या प्रमोशनल साँगचा झोन खूप वेगळा आहे. गाण्याचे बोल अहिराणी भाषेत असल्याने शब्द सहज कळत नाहीत. त्यामुळे ते जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. ते सतत लूपमध्ये ऐकत राहावसे वाटते. अतिशय भन्नाट गाणे आहे. मला खूप आनंद आहे, या चित्रपटाची जोडले गेले आहे.

अमोल भगत माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटाची निर्मिती करतोय, तर त्याच्या चित्रपटात आपले काहीतरी योगदान असले पाहिजे, असे मनात होतेच आणि ही संधी समोरून चालून आली. त्यामुळे मी त्याला त्वरीत होकार दिला. त्यात हे गाणे मला स्वत:ला खूप आवडल्याने ते करतानाही मजा आली. कोरिओग्राफी खूप कमाल आहे. सगळेच अप्रतिम आहे. शिवाय सोबत भार्गवी आहे. खूप वर्षांनी एकत्र काम करत आहोत. आवडती माणसं असल्याने काम करताना खूप मजा आली.’’

भार्गवी चिरमुले आपल्या अनुभवाबद्दल म्हणते, ‘’ माझ्यासाठी हा खूप वेगळा आणि छान अनुभव आहे. एकतर कधीही न साकारलेली भूमिका मी केली आहे.  चित्रपटाविषयी मी ऐकून होते आणि सगळ्यांसारखीच उत्सुकता मलाही होती. गाण्याचे बोल, संगीत, चित्रीकरण सगळेच अप्रतिम आहे. जबरदस्त कथा, अभिनय यांचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटगृहात येईलच. परंतु या प्रमोशनल साँगचा भाग झाल्याचा माझा अनुभव खूपच छान होता. यासाठी अमोलचं मनापासून आभार.’’

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

 

 

 

यशराज फिल्म्सकडून मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चा टीझर प्रदर्शित

* सोमा घोष

यशराज फिल्म्स (YRF) आणि प्रेमकथांचे बादशाह मोहित सूरी यांचं पहिलंवहिलं सहकार्य असलेली ‘सैयारा’ ही बहुप्रतीक्षित रोमँटिक चित्रपट आज टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

टीझर पहा:

या चित्रपटामधून यशराज फिल्म्स अहान पांडेला हिंदी सिनेमात लॉन्च करत आहे, तर त्याच्या जोडीला आहे अनीत पड्डा, जिने वेब सिरीज बिग गर्ल्स डोंट क्राईमधून प्रेक्षकांची मने जिंकली होती.

टीझरमध्ये ‘सैयारा’ या शीर्षकाचा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे. ‘सैयारा’ म्हणजे एखादं भटकतं आकाशीय पिंड. पण काव्यांमध्ये याचा उपयोग एखाद्या तेजस्वी, स्वप्नवत, आणि अप्राप्य व्यक्ती किंवा गोष्टीसाठी केला जातो—एक असं चमकदार तारा, जो नेहमी दिशा दाखवतो पण कधीही पूर्णपणे जवळ येत नाही.

मोहित सूरी, ज्यांचं सिनेमातलं २० वं वर्ष चालू आहे, याआधी आशिकी 2, मलंग, आणि एक विलन यांसारख्या लोकप्रिय प्रेमकथा दिग्दर्शित केल्या आहेत. त्याचप्रमाणे, वायआरएफ च्या ५० वर्षांच्या प्रवासात यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी हिंदी सिनेमाला अनेक अमर प्रेमकथा दिल्या आहेत.

‘सैयारा’ १८ जुलै २०२५ रोजी जगभरातल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

पहिल्या मैत्रीणीची आठवण करून देणारे ‘मन जाई’ गाणे प्रदर्शित

* नम्रता पवार

उन्हाळ्याच्या सुट्टीची आणि बालपणातील गोड मैत्रीची आठवण करून देणारा ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालपणातील आठवणी जागवणाऱ्या या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असतानाच नुकतेच या चित्रपटातील एक गोड, हृदयस्पर्शी गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा शालेय दिवसांची आणि पहिल्या मैत्रीणीची आठवण जागवली आहे. ‘मन जाई’ असे बोल असणाऱ्या या गाण्याला सोनू निगम यांचा सुरेल आवाज लाभला असून प्रशांत मडपुवार, रोहन प्रधान यांनी शब्दबद्ध केले आहे. तर रोहन -रोहन यांच्या संगीताने हे गाणे अधिकच श्रवणीय बनले आहे.

कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश या तिघांची जाईशी होणारी घट्ट मैत्री यात दाखवण्यात आली आहे.

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ हा एक चित्रपट नाही तर ९० च्या दशकातील प्रत्येकाच्या बालपणाची नाजूक आठवण आहे. आम्ही प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांना त्यांच्या बालपणीच्या आयुष्यातील गोड क्षण पुन्हा अनुभवता यावेत. प्रदर्शित झालेले गाणे हे त्या बालमैत्रीचे आणि नकळत्या वयातील भावनांचे प्रतिबिंब आहे. या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांना आपल्या बालमित्रांची आठवणी नक्की येईल.”

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात,” या गाण्यातून आम्ही त्या निष्पाप भावनांना पकडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्या वयात मैत्री आणि प्रेम यामधील रेषा फारच धूसर असतात. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाई यांची मैत्री आणि त्यातून नकळत फुलणारी भावना ही प्रत्येकाने अनुभवलेली असते. या गाण्यातून प्रेक्षकवर्ग त्यांचे स्वतःचे बालपण नक्कीच अनुभवतील. ९० व्या दशकाची ही गोड सफर प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत.

 

रितेश देशमुखने ‘पीएसआय अर्जुन’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या !

* नम्रता पवार

मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आला असून त्याच्या आगामी ‘पीएसआय अर्जुन’ या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर्स सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. दोन वर्षांनंतर, अंकुश ‘पद्यावर झलकताना’ नंतर एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने, त्याच्या देखण्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘पी.एस.आय.’ स्टाईल आयकॉन ज्याने तिच्या आकर्षक लूकमुळे इंटरनेटवर धुमाकूळ घातला. पोस्टर पाहिल्यानंतर अर्जुनच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

विशेषतः, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना रितेश देशमुखने आपल्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुख किंवा विशेष पथिमबायन हा सर्वांचे लक्ष वेधून घेईल कारण त्याला किंवा नव्या प्रवासाला तो आवडेल आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून मिळणारा उत्साही प्रतिसाद पाहून, ‘पीएसआय अर्जुन’ आधीच पडद्यावर हिट होण्याच्या मार्गावर आहे.

‘पी.एस.आय.’ विस्ट्रोमॅक्स सिनेमा आणि ड्रीमवीव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘अर्जुन’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण पटेल दिग्दर्शित या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम शंकर आणि ध्रुव दास करत आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला

  • सोमा घोष

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राच्या हास्यजत्रेनं महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांत अनेक नामवंत, दिग्गजही आहेत. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या नव्या पर्वातून नवे विषय, नवनवीन प्रहसनं यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेच. नवं पर्व म्हटलं की काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहेत.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचं महारॅप सॉंग हे गुपित आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गायक (रॅपर) सुजय जाधव उर्फ सुजय जिब्रीश यांनी हे महारॅप सॉंग गायलं आहे. संगीत-दिग्दर्शक अनिरुद्ध निमकर यांनी हे महारॅप सॉंग संगीतबद्ध केलं आहे. चल तुला दाखवतो जत्रा असे या महारॅप सॉंगचे शब्द आहेत. या महारॅप सॉंगमध्ये महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतले सगळे कलाकार असणार आहेत.

प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची वेळ आता खास रात्री 9 वाजता करण्यात आलेली आहे. जबरदस्त रॅप गाणं प्रदर्शित करत ‘सोनी मराठी वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आयुष्यात मॅटर आहेत सतरा, काही टेन्शन नाही मित्रा, सगळ्यावरची एकच मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा…! अशा ओळी या रॅपच्या आहेत. हास्यजत्रेच्या नव्या रॅपसाँगमध्ये समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, पृथ्वीक प्रताप, श्रमेश बेटकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, रोहित माने, श्याम राजपूत, प्रथमेश शिवलकर, दत्तू मोरे, ईशा डे, चेतना भट, वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर, निखिल बने हे कलाकार आहेत. याशिवाय निवेदिका प्राजक्ता माळी, परीक्षक प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर हेही या रॅप साँगमध्येमध्ये सहभागी आहेत. हे गाणे पाहण्यासाठी सोनी मराठी पाहत राहा अथवा सोनी मराठी वाहिनीच्या युटयूब पेजवर पाहता येईल.

सोशल मीडिया म्हेणजेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर पाहायला मिळेल. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव महाराष्ट्राची हास्यजत्रा रात्री ९ वाजता आपल्या भेटीला येत आहे… तर पाहायला विसरू नका…

महाराष्ट्राची हास्यजत्रा ३१ मार्च पासून सोमवार ते बुधवार, रात्री ९ वाजता… फक्त सोनी मराठी वाहिनीवर…!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाचं जबरदस्त महारॅप सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला…

महाराष्ट्राची हास्यजत्रा’कार्यक्रमाची वेळही बदलली…!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें