वैवाहिक जीवन सुखी बनवण्याच्या ११ पद्धती

* पूनम मेहता

तुम्ही तुमच्या नातेसंबंधांबाबत नेहमीच चिंतित असता का? जर याचे उत्तर हो असेल तर तुम्हाला यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या चिंतेचे कारण तुमचा अॅटिट्यूड किंवा दोघांची केमेस्ट्री असू शकते. अशावेळी काही गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुरळीतपणे व्यक्तित करू शकता :

1. संवाद : आपल्या भावना, विचार, समस्या एकमेकांना सांगा. तसेच आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल बोला. समोरच्याला आपल्या योजनांबद्दल सांगा. बोलण्यासह ऐकणे हे तेवढेच गरजेचे आहे. मौन हा देखील एकप्रकारचा संवाद आहे. आपले हावभाव, स्पर्श यांतून आपल्या साथीदाराप्रति प्रेम आणि आदर दिसून येतो.

2. सर्व अपेक्षा पूर्ण करण्याचा अट्टाहास नको : जर तुम्ही तुमच्या साथिदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवत आहात तर तुमचे निराश होणे सहाजिक आहे. पार्टनरकडून तेवढयाच अपेक्षा ठेवा, जेवढया तो पूर्ण करू शकतो. बाकी अपेक्षा दुसऱ्याप्रकारे पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करा. पार्टनरला स्पेस द्या. त्याच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारा.

3. विवादापासून लांब राहू नका : निरोगी नात्यासाठी विवाद हे चांगलेही ठरतात. गोष्टींना टाळत राहील्याने राईचा पर्वत होतो. मनातील गोंधळ वाढवू नका, बोलून टाका. तुमचा साथीदार तुमच्याशी वाद घालत असेल तर तुम्ही शांत राहू नका आणि वाईट प्रकारे प्रतिक्रियाही देऊ नका. लक्षपूर्वक ऐका आणि व्यवस्थित समजून घ्या. मारहाण किंवा अपशब्दांचा प्रयोग तर अजिबातच करू नका.

4. चूकीच्या व्यवहाराला आव्हान द्या : कधीच साथिदाराच्या चूकीच्या व्यवहाराने दु:खी होऊन आपला स्वाभिमान गमावू नका. अनेकदा आपण साथिदाराच्या व्यवहाराने एवढे हैराण होतो की आपली वेदना व्यक्त न करता स्वत:लाच अपराधी समजू लागतो. साथीदार शारीरिक मानसिक रुपाने दुखापत देतो. तरीही तुम्ही त्याला नाही म्हणत नाहीत. हे चूकीचे आहे. चूकीचा व्यवहार स्वीकारू नका. यामुळे नात्यात अशी काही फूट पडते जी कधीच भरून निघत नाही.

5. एकमेकांना वेळ द्या : एकमेकांसमवेत वेळ घालवणे आणि क्लालिटी टाईम शेअर केल्याने प्रेम वाढते. साथीदारासह ट्रिप प्लॅन करा, घरातही मोकळे क्षण एकत्र घालवा. यावेळी फक्त चांगले क्षण आठवा, रागाचे विषय काढू नका. मग पाहा जेव्हा कधी तुम्ही हे क्षण आठवाल तेव्हा तुम्हाला छान वाटेल.

6. विश्वास ठेवा आणि मान द्या : तुम्ही तुमच्या साथीदाराची खूप मस्करी करता का? तुम्ही साथिदारावर सतत संशय घेता का? जर असे असेल तर नाते संबंधात सहजता असणार नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांचा आदर करणे सर्वात महत्त्वाचे असते. विश्वास आणि आदर कोणत्याही नात्याचा आधार असतो. म्हणूनच यास मजबूत ठेवले पाहिजे.

7. टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका : लग्न झाल्यानंतरही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नये. साथिदाराच्या आवडी-निवडींवर खरे उतरण्याचा प्रयत्न करा. जसे रोपटयाला व्यवस्थित पाणी देऊन वाढविल्यानंतरच त्याचे भक्कम वृक्ष तयार होतात, योग्य देखभालीने त्याची चांगली वाढ होते. तसेच वैवाहिक जीवनाला दोन लोक मिळूनच सफल बनवू शकतात.

8. हे टिम वर्क आहे : पति-पत्नी तेव्हाच आनंदी जीवन जगू शकतात, जेव्हा दोघे टीमप्रमाणे काम करतील. दोघांनी समजून एकमेकांविरोधात जिंकण्यापेक्षा दोघांनी एकत्रितपणे जिंकणे जरुरी आहे. सुखी वैवाहिक जीवन हा दोघांच्याही मेहनतीचा परिणाम असतो.

9. एकमेकांची काळजी घेणे : जीवनात प्रत्येक गोष्टीच्या वरती एकमेकांना ठेवले तर मनात सुरक्षेची भावना निर्माण होईल. ही भावना नात्याला मजबूत बनवेल. प्रत्येक पति-पत्नीला एकमेकांकडून भरपूर प्रेम आणि आदर हवा असतो.

10. लक्षपूर्वक मित्र निवडा : तुमचे मित्र तुमचे जीवन बनवू किंवा बिघडवू शकतात. मित्रांचा प्रभाव तुमच्या व्यक्तित्वावर आणि व्यवहारावर अधिक असतो. म्हणूनच असे मित्र निवडा, जे तुमच्यासाठी चांगले असतील.

11. बोलण्यावर संयम : वैवाहिक जीवनात अनेकदा तुमचे बोलणे तुमच्या विवाहाला नष्ट करून टाकतात. आपल्या शब्दांचा प्रयोग कटाक्षाने करा. चांगले शब्द वापरा, समजवा, कौतुक करा, यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगल्या पद्धतीने व्यतीत होईल.

लिव इन पोकळ नातं

* गरिमा पंकज

लिव इन हे आजच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तरुणांनी निर्मित केलेली थोडी कमी आजमावलेली कॉन्सेप्ट आहे. मुलामुलीची विवाहित जोडप्याप्रमाणे सोबत राहाण्याची व्यवस्था म्हणजे लिव इनमध्ये वैवाहिक जीवनातील आकांक्षा पूर्ण होतात, एकमेकांचा सहवासही लाभतो परंतु दीर्घकालीन जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते बांधील नसतात. कधीही विलग होण्याचं स्वातंत्र्य असतं. ही कॉन्सेप्ट विवाह करण्याची मानसिकता नसणाऱ्यांना वरकरणी आकर्षक भासते, परंतु आतून तितकीच पोकळ आणि अस्थिर तर आहेच शिवाय त्यातही अनेक जबाबदाऱ्या आहेत. कदाचित हेच कारण आहे की बहुतेक जण खासकरून मुली आजही याचा स्वीकार करत नाहीत.

अपूर्णतेची जाणीव

एक प्रकारे हे नातं धार्मिक मान्यतांच्या बंधनापासून सामाजिक रुढीपरंपरा आणि शोबाजीच्या रंगापासून दूर आहे आणि कायद्यानेसुद्धा याला काही मर्यादेपर्यंत मान्यता दिली आहे. परंतु तरीदेखील या नात्याच्या अपूर्णतेला दुर्लक्षित करता येणार नाही खासकरून मुली अशाप्रकारच्या नात्यांमध्ये अनेकदा गहिऱ्या मानसिक त्रासातून जातात.

वास्तविक, लिव इनमध्ये नातं जेव्हा गहिरं होतं आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात, शारीरिकसंबंध साधतात, तेव्हा ती भावना मुलीच्या मनात कायम सोबत राहाण्याच्या इच्छेला जन्म देते. ५० मिनिटांची जवळीक ५० वर्षांच्या सहवासाच्या इच्छेमध्ये बदलू लागते. परंतु जरुरी नाही की मुलगासुद्धा याच पद्धतीने विचार करेल आणि जबाबदाऱ्या पूर्ण करायला तयार होईल.

बहुतेक प्रकरणांमध्ये या गोष्टीवरून नातेसंबंध तुटतात आणि अखेरीस शारीरिक प्रेमावर आधारीत हे नातं आयुष्यभराचं दुखणं बनून राहातं. अनेकदा या दुखण्यातून निर्माण झालेली वेदना इतकी त्रासदायक असते की मुलगी स्वत:ला संपवून टाकण्यासारखं चुकीचं पाऊल उचलायलाही मागेपुढे पाहात नाही.

अशा नातेसंबंधांमध्ये प्रेम कमी वाद अधिक

अशा नातेसंबंधांमध्ये मुलामुलींचा एकमेकांवर पूर्ण हक्क नसतो. ते संयुक्त निर्णयसुद्धा घेऊ शकत नाहीत. जसं की, विवाहित दाम्पत्य मात्र घेतात. उदाहरणादाखल संपत्ती एक तर मुलाची असते वा मुलीची. दोघांचा अधिकार नसतो. दुसऱ्याला हे विचारण्याचा अधिकार नाही की पैसे कशाप्रकारे खर्च होत आहेत. दोघे आपले पैसे आपल्या मर्जीने खर्च करतात.

याच कारणामुळे बहुतेकदा यांच्यात हक्क आणि अधिकारावरून भांडणं होत राहातात. हा वाद सहजासहजी मिटत नाही. ते प्रयत्न करतात की प्रेम दर्शवून वा आपसांत बोलून वाद मिटवावा. परंतु बहुतेकदा असं होत नाही; कारण कोणतेही नातेसंबंध कायम राखण्यासाठी आणि दोन व्यक्तींना जवळ ठेवण्यासाठी जे गुण सर्वाधिक जरुरी आहेत ते आहेत, विश्वास, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि आत्मिक निकटता.

हे गुण विकसित करण्यासाठी वेळ हवा असतो. केवळ भौतिक वा शारीरिक जवळीक मानसिक आणि भावनिक आधार देईल असं जरुरी नाही. अशा पोकळ नात्यांमध्ये कटुतेचा काळ सहजी संपत नाही.

जबाबदाऱ्यांपासून पळायला शिकवतं लिव इन

लिव इन रिलेशनशिप ही वास्तविक भावनिक बंधनांच्या आधारेसोबत राहाण्याची एक व्यक्तिगत आणि आर्थिक व्यवस्था आहे. यामध्ये कायमस्वरूपी एकमेकांना सोबत देण्याचं कोणतंही आश्वासन नसतं, शिवाय संपूर्ण समाजकायद्यासमोर अशाप्रकारचा कोणताही करार केला जात नाही. त्यामुळे पार्टनर्स एकमेकांवर (लेखी/तोंडी) कोणत्याही प्रकारचा कसलाही दबाव आणू शकत नाहीत. असं नातं एकप्रकारे रेंटल एग्रीमेंटसमान असतं. हे अतिशय सहजतेने बनवलं जातं. आणि जोपर्यंत दोन्ही पक्ष योग्य वर्तन करतात, एकमेकांना खूश ठेवतात तोपर्यंत ते सोबत असतात. याउलट विवाह या पार्टनरशिपहून अधिक गहिरा आहे. हा एक सार्वभौमिक पातळीवर केलेला करार आहे, ज्यासोबत कायदेशीर आणि सामाजिक जबाबदाऱ्या संबंधित असतात. वास्तविक लग्न केवळ २ व्यक्तिचं, २ कुटुंबांचं व समुदायांमध्ये बनलेलं नातं आहे, जे आयुष्यभरासाठी स्वीकारार्ह आहे. जीवनात कितीही दु:ख, समस्या आल्या, तरी परस्पर नातं जपण्याचं आश्वासन यात दिलं जातं.

असं म्हटलं जातं की, हृदयाच्या तारा जुळल्या की मग रीतिरिवाजांची काय गरज? परंतु मुद्दा इथे रीतिरिवाजाचा नाही तर सामाजिक स्तरावर केलेल्या कमिटमेंटचा आहे. कायम जबाबदारी घेण्याची कमिटमेंट, नेहमी साथ निभावण्याची कमिटमेंट, विवाहामध्ये एका वेगळ्या पातळीची कमिटमेंट असते, त्यामुळे एका वेगळ्या पातळीवरील संरक्षण, स्वातंत्र्य आणि परिणामी वेगळ्या पातळीवरील आनंदही यातून मिळतो. जे नातं केवळ परस्पर प्रेम आणि आकर्षण कायम आहे तोपर्यंत निभावलं जातं, त्यापासून हे नातं खूप निराळं आहे. त्या संबंधात उत्तम पर्याय मिळताच विलग होण्याचा मार्ग खुला असतो. कायम मानसिक तयारी ठेवावी लागते की हे नातेसंबंध कधीही संपुष्टात येऊ शकतात.

समर्पण हवं तर लिव इन नको

जेव्हा समर्पणाचा विषय येतो, तेव्हा विवाहित जोडीदार या दृष्टीने अतिशय प्रामाणिक आढळून येतात. ५ वर्षांच्या एका संशोधनानुसार ९० टक्के विवाहित स्त्रिया पतिव्रता असल्याचं आढळलं, याउलट लिव इनमध्ये असणाऱ्या केवळ ६० टक्के स्त्रियाच प्रामाणिक होत्या असं आढळलं.

पुरुषांच्या बाबतीत स्थिती अधिकच आश्चर्यकारक होती. ९० टक्के विवाहित पुरुष आपल्या पत्नीप्रती प्रामाणिक होते. याउलट लिव इन प्रकरणात अवघे ४३ टक्के पुरुषच प्रामाणिक आढळले.

इतकंच नव्हे, लिव इनचं संकट म्हणजे प्रीमॅरिटल सेक्श्युअल एटीट्यूड आणि वर्तन विवाहानंतरही बदलत नाही. जर एक स्त्री लग्नापूर्वी एका पुरुषासोबत राहात असेल तर बऱ्याच प्रमाणात शक्यता असते की ती विवाहानंतरही आपल्या पतीला धोका देईल.

संशोधन व अभ्यास अहवालांनुसार जर एखादी व्यक्ती विवाहापूर्वी सेक्सचा अनुभव घेते, तर विवाहानंतरही ती व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतेल अशी सर्वाधिक शक्यता असते. हे खासकरून स्त्रियांसाठी अधिकीने सत्य आहे

पालकांपासून अंतर

लिव इनमध्ये राहाणाऱ्या मुलामुलींच्या जीवनात सामान्यत: आईवडिलांचा हस्तक्षेप नाममात्र असतो; कारण यासाठी त्यांची संमती नसते आणि ते आपल्या मुलांपासून अंतर राखतात.

घरच्यांना या गोष्टीची माहिती त्यांनी दिली नाही, तरी हे रहस्य अधिक काळ लपवून ठेवणंही सोपं नसतं. अनेक प्रकारच्या गोष्टी जसं की आईवडिलांकडून पैशांची मदत घेणं, पार्टनर आणि त्याचं सामान लपवणं जेव्हा पालक अचानक भेटायला येतात, सातत्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध वागण्याचा अपराधभाव आणि खोटं बोलणं यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या लिव इनमध्ये राहाणाऱ्यांना अस्वस्थ करतात.

विश्वासाचा अभाव

जे विवाहापूर्वी सोबत राहातात, त्यांच्यात बऱ्याचदा अविश्वासाची भावना विकसित होते. परिपक्व प्रेमामध्ये गहिरा विश्वास असतो की तुमचं प्रेम केवळ तुमचं आहे आणि कुणी तिसरं त्यात नाही. परंतु विवाहापूर्वीच जवळीक साधल्यावर व्यक्तिच्या मनात अनेक प्रकारचे संशय निर्माण होऊ लागतात की माझ्यापूर्वी तर जोडीदाराच्या जीवनात कुणी नव्हतं ना वा माझ्याशिवाय भविष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत याचे संबंध बनणार नाहीत ना.

अशाप्रकारचा अविश्वास आणि संशयीवृत्ती बळावल्याने व्यक्ती हळूहळू आपल्या पार्टनरप्रती प्रेम व सन्मान गमावू लागतो. याउलट वैवाहिक जीवनात विश्वास एक महत्त्वपूर्ण भाग असतो.

चला, एकमेकांना समजून घेऊया

– गीता शिंदे

मला आजपर्यंत समजू शकला नाहीस’ ‘तुला समजून घेणं खूप अवघड आहे, तू मला कधी समजून घ्यायचा प्रयत्नच नाही केलास,’ ‘मी तुला कधीही समजू शकणार नाही. ‘तू मला समजून घेऊ शकली असतीस तर किती बरं झालं असतं.’

अशा प्रकारचे संवाद अनेक दाम्पत्यांमध्ये वेळोवेळी होत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवल्यानंतरही दाम्पत्यांची एकमेकांबद्दल तक्रार असते की अजूनही ते एकमेकांना समजून घेऊ शकले नाहीत. रोजच्या आयुष्यातही ते वारंवार एकमेकांना छोट्या छोट्या गोष्टीवरून दोष देताना दिसून येतात. कधीकधी तक्रारींच्या रूपात मनातला क्षोभ बाहेर पडतो. तर कधी ओल्या लाकडाप्रमाणे आयुष्यभर दोघेही मनातल्या मनात धुमसत राहतात.

‘अ’ यांना असं वाटत की त्यांची पत्नी गमतीने बोललेली एखादी गोष्टही गंभीरपणे घेते, खरी मानते आणि मग रुसून बसते. ‘‘आम्ही दोघं आता वयस्कार होऊ लागलो तरी अजूनपर्यंत ती मला समजू शकलेली नाही. मी गमतीने बोललेल्या गोष्टीही ती उगाचच गंभीरपणे घेऊन मनाला लावून घेते.’’

‘ब’ यांना वाटतं की त्यांचे पती त्यांची निष्ठा आणि समर्पण आजपर्यंत समजूच शकलेले नाहीत. ‘‘कोणत्याही पुरुषाबरोबर मग भले तो नात्याने माझा भाऊ का असेना, बोलणं, भेटणं ते सहन करू शकत नाहीत. शेवटी मी दोन मुलांची आई आहे. आणि संपूर्ण प्रामाणिकपणे मी त्यांना समर्पित केलं आहे तरीही हा माणूस मला समजून घेऊ शकत नाही.’’

‘क’ यांची तक्रार आहे की, माहेरची श्रीमंत असणारी त्याची पत्नी माहेरच्यांसमोर तोरा मिरवण्यासाठी माझं संपूर्ण बजेट खलास करते. ते म्हणतात, ‘‘माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावेत हे तिला समजत का नाही? मोठ्या लोकांशी स्पर्धा करण्यासाठी देखावा करणं योग्य नाही. मी माझ्या आयुष्यात कसाबसा जमाखर्चाचा मेळ घालतोय आणि हिला मात्र आपल्या देखाव्यापुढे मुलांच्या भविष्याचीही चिंता नाही.’’

‘डी’ यांना आपल्या पत्नीबद्दल सेक्ससंबंधी खूप तक्रारी आहेत. ‘‘सेक्ससारख्या नाजूक, सुंदर आणि आयुष्यातला सर्वात महत्त्वाच्या गोष्टीला ती एक कर्तव्य समजते आणि एखादं काम उरकून टाकल्याप्रमाणे वागते. आज आम्हाला मुलं झाल्यानंतरही ते परमोच्च सुख मात्र मला मिळालं नाही जे कुणाही पुरुषाला हवंहवसं वाटतं. ती माझ्या शारीरिक गरजा कधी गंभीरपणे समजूनच घेत नाही.’’

‘‘ई’ हिला वाटतं की, तिचा पती अन्य पतींप्रमाणे सर्वांसमोर आपलं प्रेम प्रकट का करत नाही?’’ मी जेव्हा एखाद्या पार्टी किंवा समारंभात इतर पुरुषांना आपापल्या पत्नीचे नखरे सांभाळताना पाहते तेव्हा मलाही वाटतं की, त्यांनीही माझ्यासोबत अशा दिलखेचक ढंगात वागावं. पण ते माझी ही रोमॅण्टिक इच्छा कधी समजूनच घेत नाहीत. ते नेहमीच सभ्यपणे आणि गंभीरपणे वागतात.

दोघंही एकेक पाऊल पुढे टाका

लग्नानंतर वर्षभराने कोणत्या तरी समारंभात दिव्याने जेव्हा आपल्या धाकट्या जावेला पाहिलं तेव्हा ती तिच्याकडे पाहतच राहिली. घट्ट जीन्सवर अगदी नाममात्र स्तिव्हलेस टॉप, रंगवलेले रूक्ष केस, अनावश्यक मेकअपचे थर दिलेला चेहरा. कुठे तिचे सभ्य, सौम्य आणि गंभीर स्वभावाचे प्राध्यापक दीर आणि कुठे ही चटक चांदणी. विवेकना तर केवळ साडी नेसणारी, लांब केसांची भारतीय पारंपरिक स्त्री आवडत होती. मग हा कायापालट कसा? इथेही तोच हताश स्वर, ‘‘काय सांगू, मी तर तिला समजावून थकलो. आपण ज्या समाजात राहतो तशीच वागणूक, कपडे हवेत ना?

जोडीदार स्वत:विषयी काही सांगू पाहतो आणि दुसरा मात्र त्याच्याबद्दल सर्व काही जाणत असूनही अज्ञानीपणाचा बुरखा पांघरून आपल्या जोडीदाराची उपेक्षा करतो, तेव्हाच अशी परिस्थिती निर्माण होते. खरं तर अशा प्रकारची अवहेलना कोणत्याही संवेदनशील माणसाला आतून उद्ध्वस्त करते. पतिपत्नी दोघं आपापल्या आवडीनिवडीनुसार दोन वेगवेगळ्या बाबींवर अडून राहतात तेव्हा नातं तुटायला वेळ लागत नाही. मात्र, दोघांनी आपले विचार आणि आवडीनिवडींमध्ये थोडी तडजोड केली आणि दोन दोघंही २-२ पावलं मागे सरकले तर नातं तुटण्यापासून वाचू शकतं.

जोडीदाराचे विचार जाणून घ्या

अत्यंत लाडात वाढलेली आईवडिलांची एकुलती एक मुलगी श्वेता काहीशी लाजरीबुजरी होती. तिचा पती विकास प्रत्येक छोट्याटोट्या गरजांकडे व्यवस्थित लक्ष द्यायचा. तरीही विकासला आपली पर्वाच नाही असं श्वेताला वाटायचं. तो आईबाबांसारखी आपली ‘काळजी’ घेत नाही वगैरे. मात्र, दुसरीकडे विकासला वाटायचं की तो श्तेवावर इतकं प्रेम करतो, तिची इतकी काळजी घेतो, पण श्वेताकडून मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. वरून फटकळ असणारी श्वेता सतत तक्रारी करून त्याचं भावुक मन दुखावते.

पत्नीच्या सततच्या अवहेलना आणि दोष देण्याच्या स्वभावामुळे विकास आतून कोलमडून गेला आणि त्याला हृदयरोग जडला. आज लग्नाला १५ वर्षं झाल्यानंतरही त्याला सतत गुदमरतच जगावं लागत आहे. ‘यू एस रिव्ह्यू ऑफ द हार्ट असोसिएशन’ने संशोधनाअंती असा निष्कर्ष काढला आहे की, वैवाहिक आयुष्यात एकमेकांना समजून न घेतल्याने होणारी गुदमरलेपणाची भावना बहुदा हृदयासंबंधीच्या समस्यांना जन्म देते. खरं तर जी व्यक्ती दुसऱ्यांच्या भावनांची कदर करते ती इतरांकडूनही तशीच अपेक्षा ठेवते. पतिपत्नीचं नातं तर पूर्णपणे देवाणघेवाणीवर आधारलेलं असतं. कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.

पतिपत्नींनी एकमेकांच्या वागणुकीपेक्षा एकमेकांचे विचार समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. कधीकधी आपण प्रत्यक्षात आपल्या जोडीदाराची इच्छा पूर्ण करू शकत नाही. पण आपले प्रयत्न तर प्रामाणिक असतात. म्हणूनच जोडीदाराने दुसऱ्याची अगतिकता आणि मर्यादा समजून घ्यायला हव्यात.

भावनांचा आदर करायला शिका

लग्नाच्या २५व्या वाढदिवशी जेव्हा सुनंदाच्या मुलीने तिला सतार भेट दिली तेव्हा तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. पतीने नाही, पण मुलीने तरी आपल्या भावना जाणल्या. लग्नापूर्वी सुनंदा एक उत्तम कलावती होती. सतार वाजवणं हा केवळ तिचा छंद नसून तिच्या आनंदाचा एक भाग होता. पण लग्नानंतर तिचा हा ‘मानसिक खुराक’ बनलेला छंद नजरेआड झाला. सतारीचं तुणतुणं वाजवून काय उपयोग? व्यवसाय म्हणूनही याचा वापर केलास तरी काही फायदा नाही. काही करायचंच असेल तर एखादी चांगली नोकरी कर. तेवढाच कुटुंबाला हातभार..’’ पतीने तिला सांगितलं.

मग काय, सुनंदाने आपल्या छंदाला तिथेच गाडून टाकलं. मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी पतीसोबत स्वत: चांगली नोकरी स्वीकारली आणि आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करत राहिली. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात तिची ही सुंदर इच्छा कुठेतरी जागृत होती.

केवळ शरीराचं नाही, मनोमीलनही आवश्यक

जर थोडंसं समजूतदारपणे वागलं तर पतिपत्नींनी एकमेकांना समजून न घेण्याचं दु:ख बऱ्याच अंशी कमी होईल. लग्नानंतर पतिपत्नीचं शारीरिक मीलन तर होतं, पण बऱ्याच वेळा समजूतदारपणाच्या अभावामुळे त्यांचं मनोमीलन होऊ शकत नाही. मग इथूनच अनेक समस्या सुरू होतात. माणसाचं सर्वात संवेदनशील अंग, जे माणसाचं मन अस्पर्शितच राहतं. म्हणूनच लग्नानंतर सर्वात आधी आपल्या जोडीदाराचं मन, त्याचा स्वभाव, आवडीनिवडी आणि सवयी जाणून घ्यायचा प्रयत्न करावा.

एकदुसऱ्यांना समजून घेतल्यानंतर त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयी यांच्यासोबतच त्यांच्यातील कमतरतेबाबतही तडजोड करणं आवश्यक आहे. कारण निसर्गात परिपूर्ण असं काहीच नसतं. म्हणूनच पतिपत्नीनी एकमेकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करू नये.

एकमेकांच्या मर्यादा आणि विवशता समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे समजुतीने आणि मनाचा मोठेपणा दाखवून आपल्या जोडीदाराला योग्य प्रकारे समजून घेऊन आपण एक निरोगी आणि यशस्वी वैवाहिक आयुष्य जगू शकता.

मुलांप्रति आदर बाळगणे आवश्यक

– गरिमा

मुले कच्च्या मातीसारखे असतात. त्यांना कोणते रूप द्यायचे आहे हे आपल्यावर अवलंबून आहे. मोठा झाल्यावर तो चांगल्या व्यक्तिमत्वाचा धनी व्हावा, प्रगती करावी आणि आपले नाव उज्ज्वल करावे ही इच्छा प्रत्येक आई-वडिलांची असते. पण हे शक्य तेव्हा होईल, जेव्हा आपण सुरूवातीपासून मुलाच्या उत्तम पालनपोषणावर लक्ष देऊ. उत्तम पालनपोषणासाठी ही गोष्टही खूप महत्त्वपूर्ण आहे, ज्याकडे बऱ्याचदा आईवडिल दुर्लक्ष करतात आणि ते आहे मुलांना आदर देणे.

मुलाला कधी त्याच्या लहान भाऊ वा बहिणीसमोर ओरडू नये
जर तुमच्या मुलाने एखादे काम तुमच्या मनासारखे केले नाही किंवा त्याने काही खोडी केली, मार्क्स कमी आलेत किंवा मग त्याच्या खोटया बोलण्याचा तुम्हाला राग आला असेल, तर गोष्ट कितीही मोठी असो, मुलाला त्याच्या लहान भावंडासमोर अपमानित करू नये.

कारण छोटा भाऊ वा बहिण, जो मोठयाला आपल्याकडून मार खाताना पाहतोय, वेळ आल्यावर तो ही मोठयाचा आदर करणे सोडून देईल. छोटया भावंडांच्या नजरेत मोठयाचा आदर कमी होईल. तो मोठया भावाची वा बहिणीची टर उडवेल, ज्यामुळे मोठयाच्या मनात निराशा घर करेल. यासाठी जर मुलाला काही बोलायचे असेल तर छोटयांच्या समोर नव्हे तर एकांतात सांगावे.

इतरांच्या समोर आपले नियंत्रण सोडू नका
समजा, मुलाने आपली एखादी वस्तू हरवली आहे किंवा एखादी मोठी चूक केली जिच्याबद्दल आपल्याला दुसऱ्या कोणाकडून कळलंय, तेव्हा बातमी कळताच एकदम त्याला आरडा-ओरड करू लागणे योग्य नाही.

लोकांसमोर मुलाला कधी अपमानित करू नये. एकांतात त्याच्याशी बोलावे. एकदम नियंत्रण वा ताबा सोडण्याऐवजी मुलाला त्याने केलेल्या चुकीबद्दल सांगावे आणि मग त्याचे उत्तर ऐकावे. होऊ शकते कधी परिस्थितीमुळे असे घडले असेल. त्याला स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याची संधी द्यावी. त्याची बाजू ऐकल्यावर निर्णय घ्या की त्याची चूक आहे वा नाही. जरी त्याची चूक असली तरीही त्याला मारझोड करण्याऐवजी तार्किक पद्धतीने समजवावे. त्याला त्याची चूक पटवून द्यावी आणि वचन घ्यावे की भविष्यात असे काही त्याने करू नये. प्रेमाने समजावलेल्या गोष्टीचा प्रभाव खूप खोलवर होतो तर मारझोडीने समझावण्यात आलेल्या गोष्टीने मुलामध्ये संताप आणि असंतोषाची भावना निर्माण होते किंवा मग तो डिप्रेस्ड राहू लागतो.

मुलाच्या त्रुटी दाखवू नयेत
प्रत्येक वेळी मुलाला कामचोर, आळशी, मूर्ख, नालायक, असभ्य यासारख्या शब्दांनी डिवचू नये. आपण त्याला जेवढे फटकाराल, त्याच्या चुका दाखवत राहाल त्यामुळे त्याची तेवढीच जास्त वाईट मार्गावर जाण्याची शक्यता बळावते. बऱ्याच घरात आई-वडील प्रत्येक वेळी मुलाला कोसत राहतात. बाहेरचे, शेजारी आणि नातेवाइकांसमोर त्याच्या दोषांची चर्चा करत राहतात. यामुळे मुलामध्ये नकारात्मक दृष्टीकोन तयार होतो. याउलट जर आई-वडिलांनी मुलाच्या छोटया-मोठया कामगिरींना उत्सवांसारखे साजरे केले, इतरांसमोर त्याची प्रशंसा केली, त्याच्या सुप्त गुणाविषयी रंजकपणे सांगितले तर मुलामध्ये सकारात्मकता वाढीस लागते. त्याच्यात अजून जास्त चांगले काम करून प्रशंसा प्राप्त करण्याची लालसा जागृत होते. त्याच्या मनात क्रोध, दु:ख किंवा प्रतिस्पर्धेऐवजी उत्साह, एकाग्रता आणि निर्दोष स्पर्धेची भावना प्रबळ होते.

मुलाच्या इच्छांना सन्मान द्या
प्रत्येक मूल इतरांपेक्षा वेगळे असते. प्रत्येक मुलांत वेगवेगळया विशेषता असतात. वेगवेगळे कौशल्य असते.

मुलामध्ये जे कौशल्य आहे, त्याला जे करणे आवडते, त्याची भविष्यात जे बनण्याची आकांक्षा असेल त्याला तुम्ही पाठबळ द्यावे. त्याला तेच बनू द्या जे बनण्याची त्याची इच्छा आहे. बऱ्याच घरांत मुलाची इच्छा हे सांगून दाबली जाते की तो अजून छोटा आहे, चांगले वा वाईटाची समज नाही. परंतू अशी प्रवृत्ती योग्य नाही.

मुलाच्या जीवनावर आपला अधिकार दाखवू नका. त्याला पूर्ण सन्मानाने आपले जीवन आणि जीवनाशी निगडित निर्णय घेऊ द्या, ज्यामुळे वय वाढल्यानंतर त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन, तडफड, कोंडमारा आणि क्रोधाची अग्नी नव्हे तर समाधान, आनंद, आपलेपणा आणि प्रेमाचा प्रवाह वाहील. तो तुम्हालाही प्रेम देईल आणि इतरांनाही.

मुलाचे नाव बिघडवू नका
नेहमी आई-वडील वा नातेवाईक मुलाच्या नावात बिगाड करून पुकारतात. जसे चंद्रला चंदर, देवला देवू, मीनलला मिनुआ इत्यादी. त्यांच्या बाहेरील त्रुटीमुळेसुद्धा त्याला त्या नावाने बोलू लागतात. जसे मुलगा काळा असेल तर तो काळू, जाडजूड असेल तर जाडया, छोटा असेल तर छोटू इत्यादी. म्हणून चुकूनही मुलांना कधी अशा नावांनी बोलू नये. उलट जर कोणी परिचित वा नातेवाईक असे करत असेल तर लगेच त्याला असे करण्यास मनाई करा.

बिगडलेल्या नावाबरोबरच मुलाचे व्यत्तिमत्वही बिगडू शकते. नेहमी मुलाला त्याच नावाने बोलवा जसे आपण त्याला पाहू इच्छिता. जसे हर्ष, आशा, निहाल, प्रथम सारखी चांगल्या अर्थाची नावे मुलांमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें