* प्राची भारद्वाज

भारतीय समाजात सुरूवातीपासूनच काही स्त्रियांवर निरनिराळी बंधने लादली जातात. त्यांना तरूणांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले जाते. कुटुंबामध्ये, मग ते उच्चवर्गीय असो किंवा मध्यमवर्गीय, शिक्षित असो किंवा कमी शिकलेले, मुलीच्या जन्मावर एवढा आनंद साजरा होत नाही जेवढा मुलाचा जन्म झाल्यावर होतो. मुलगा झाल्यावर पूर्ण परिसरात नातेवाईकांना मिठाई वाटली जाते. कित्येक दिवस उत्साहाचे वातावरण असते. मुलगा झाला हे शुभ लक्षण आहे म्हणून ब्राम्हण भोजन केले जाते. मुलाच्या हाताने स्पर्श करून मंदिरांमध्ये दान दिले जाते. नामकरण ते मुंजीपर्यंत सर्व समारंभ अगदी थाटामाटात साजरे केले जातात.

मुलीला मात्र सुरूवातीपासूनच हे सांगून दबाव टाकला जातो की तू तर मुलगी आहेस, तू घरात बैस. स्वयंपाक पाणी कर हेच सासरी उपयोगी पडेल. जास्त उडण्याची गरज नाही.

त्यांची इच्छाही विचारली जात नाही. लग्नाआधी त्यांना नवऱ्यामुलाकडे पाहूही दिले जात नाही. उलट ही ताकीद दिली जाते की तूला परतून यायचे नाही. सासर घरूनच आता तुझी तिरडी निघेल आणि यातच सगळ्यांचे भले आहे. अशा कडक शिस्तीत मुलींचे संगोपन होते, तर मुलांना मात्र मोकळीक असते की कुठेही जावे कधीही घरी यावे.

काळ बदलला, सोबतच समाजाच्या बऱ्याचशा मान्यताही बदलल्या आहेत. आज मुली कॉलेजला जात आहेत. नोकऱ्या करत आहेत. फॅशनेबल कपडेही घालत आहेत. पण तरीही इतके सर्व असूनही कुठेना कुठे मुलांच्या तुलनेत तरी त्यांना ती सूट कमीच आहे. त्यांना आजही कमकुवत समजले जाते. मुलगी उशीरा घरी परतत असेल तर घरच्यांची काळजी वाढते. आईवडिल ताबडतोब तिच्या मैत्रिणींना फोनाफोनी करतात आणि जोपर्यंत ती घरी येत नाही तोवर ते स्वस्थ बसत नाहीत.

रोजच वृत्तपत्रात मुलींवर झालेल्या बलात्काराच्या बातम्या छापून येतात. त्यांच्या अगतिकपणावर कुठलीही दया न दाखवता समाज कानाडोळा करतो आणि मुले त्यांचा हेतू साध्य करून निघून जातात. सर्व दोष मुलीला दिला जातो की फॅशनेबल कपडे घातले का असेच होणार, यात मुलांचा काय दोष म्हणजे मुलांना जसे सर्व काही करायचे लायसेंन्सच मिळाले आहे.

मुलींच्या प्रति समाजाचा असा दृष्टिकोन का आहे? हा एक संशोधनाचा विषय आहे. पण दु:ख तेव्हा वाटते, जेव्हा एखादी फिल्मी सेलिब्रिटी आपल्या अभिनयाची तुलना बलात्कार पिडीतेशी करतो.

सलमान खानने जेव्हा ‘सुलतान’मध्ये भूमिका केली तेव्हा त्याने आपली तुलना बलत्कार पिडीत मुलीशी केली, तेव्हा त्याचा निषेध करण्यात आला. वडिल सलीम खान यांना त्याच्यावतीने माफी मागावी लागली. पण जर त्यांच्या बोलण्याचे लक्षपूर्वक विश्लेषण केले तर हे स्पष्ट होते की समाजात लिंगभेद आजही आहे आणि मुलींप्रति संवेदनांचा अभाव कायम आहे. सलमान खानसारख्या प्रसिद्ध व्यक्तींकडून अशातऱ्हेचे उदाहरण दिले जाणे हे दर्शवून देते की माणसामधील संवेदनशीलता नष्ट होत चालली आहे.

अशा घटना नेहमी ऐकण्यात येतात. एक दिवस रत्नाच्या घरातून अचानक काळजी वाटू लागेल असे आवाज येऊ लागले. दुसऱ्यादिवशी तिची शेजारीण मान्यताने रत्नाच्या घरी जाऊन तिच्या सासूला विचारले की रात्री तुमच्या घरातून आवाज का येत होते. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘अगं, काही नाही, पतीपत्नीमध्ये भांडणे तर होतातच. बस्स मोहितने ३-४ कानाखाली वाजवल्या. मग पूर्ण रात्रभर तिने गोंधळ घातला होता. मुकाट्याने राहाणार नाही मग मार तर खाणारच.’’

‘‘हे काय बोलताय तुम्ही काकू? भाडंणे, वाद इथपर्यंत ठिक आहे. पण मारझोड? पतीपत्नी शेवटी बरोबरीच्या नात्याने बांधले गेलेले असतात.’’

‘‘बरोबरी? हे काय बोलतेस तू? पत्नी नेहमीच दुय्यम दर्जाची असते. हे कोण नाकारू शकतं.’’

एक स्त्री असूनसुद्धा त्या दुसऱ्या स्त्रीबद्दल इतके तुच्छ विचार करत होत्या. जे एकदम चूकीचेच नाही, तर स्त्रीबद्दल समाजाचा असलेला दृष्टीकोनही त्यातून दिसून येतो.

एका प्रतिष्ठित इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या सिनिअर अॅडव्हायझार पल्लवी आनंद यांनी सांगितले की त्या चित्रपटगृहात ‘उड़ता पंजाब’ हा सिनेमा पाहत होत्या. त्यात एका दृश्यात अभिनेत्री आलिया भट्ट रडत रडत तिच्यावर सतत झालेल्या बलात्काराबाबत सांगत असते, त्यावेळी तिथे चित्रपटगृहात अनेक मुले हसून टाळ्या आणि शिट्या वाजवत होते. एका मुलीच्या काळीज चिरून टाकणाऱ्या बोलण्यावर त्या मुलांना हसू येत होते.

यावरून हेच स्पष्ट होते की समाज स्त्रीला पुरुषाच्या हातातील खेळणे समजतो. स्त्रीबाबत बलात्कारासारखी घटना घडली तरी स्त्रीलाच दोषी ठरवले जाते. का आहे हा लिंगभेद? समाज अजूनही स्त्रियांसाठी संवेदनशील का नाही?

मीनाच्या शेजारी राकेश नावाचा एक तरूण राहात होता. त्याच्यावर बलात्काराचा खटला सुरू होता. तरीही त्याचे लग्न झाले. ही गोष्ट कळली, तेव्हा मीनाने तिच्या नवऱ्याला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, ‘‘चांगली गोष्ट आहे. राकेशमध्ये काय कमी आहे? तो एक पुरूष आहे आणि पुरूषावर कधीही कलंक लागत नाही.’’

हे ऐकून मीनाला तिच्या नवऱ्याचा राग तर खूप आला पण ती नाईलाजाने गप्प बसली.

रोजच घडणाऱ्या अशा कितीतरी लहान सहान असंवेदना दाखवून देतात की नारीला देवीचे स्थान देणाऱ्या आपल्या समाजात लिंग संवेदीकरणाची किती कमतरता आहे.

रोहन सुमितला जेव्हा त्याच्या घरी भेटायला आला होता, तेव्हा त्याचे कुटुंब एकत्र बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात रोहनच्या मुलीने घरात प्रवेश केला. तिने छोटा स्कर्ट घातला होता. सुमितने त्याचा मित्र रोहनला म्हटले, ‘‘आजकाल कशाकशा बातम्या येतात, वाचतोस ना? मुली जर असे छोटे कपडे घालू लागल्या तर दोष कोणाला देणार?’’

‘‘हो, भावोजी,’’ सुमितच्या पत्नीनेही री ओढली, ‘‘अशामध्ये मुलांना काय म्हणणार आपण, जर मुलीच शुद्धीवर नसतील? आम्हाला तर काही काळजी नाही, आमच्या घरात तर मुलगा आहे. पण ज्यांच्या घरात मुलगी आहे, त्यांनी तर काळजी घेतलीच पाहिजे की त्यांनी त्यांच्या मुलीवर बंधने घालून ठेवावीत.’’

त्यांच्या या मानसिकतेवर रोहन आणि त्याच्या पत्नीला आश्चर्याबरोबरच रागही आला. जर मुलींप्रमाणेच मुलांनाही नैतिक मूल्य शिकवली गेली तर जर त्यांनाही घरी वेळेत येण्यासाठी बंधने घालण्यात आली. त्यांच्यासमोरही लहानपणापासूनच नैतिकतेचे आव्हान ठेवण्यात आले, तर कदाचित आपल्या समाजात मुलगी घरातून बाहेर निघताना तिला सुरक्षित वाटेल.

लिंग संवेदीकरणावर परदेशींचे विचार

लिंग संवेदीकरणाच्या घटना फक्त भारतातच घडतात असे नाही तर परदेशातही अशा घटना सामान्य आहेत.

अमेरिकन पत्रकार व सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या ग्लोरिया स्टीनेमने सांगितलं की आम्ही आमच्या मुलींनाही मुलांसारखेच वाढवायला सुरूवात केली आहे. पण आपल्या मुलांना मुलींप्रमाणे वाढवण्याची हिंमत खूपच कमी आहे.

निकलस क्रिस्टोफ, जे अमेरिकन पत्रकार व लेखक आहेत आणि दोन वेळेस पुलित्द्ब्रार पुरस्काराचे विजेतेसुद्धा आहेत.त्यांचे म्हणणं आहे की गुलामीशी लढताना शतके निघून गेली. १९व्या शतकात अधिनायकवादाच्या विरूद्ध लढाई लढण्यात आली आणि वर्तमान शतकात पूर्ण विश्वात लैंगिक समानतेचे नैतिक आवाहन सर्वोच्च राहिल.

या विदेशी विचारवंतांच्या विचारावरून हे स्पष्ट आहे की लिंग असमानता फक्त एकाच देशाची समस्या नाही, तर पूर्ण जग या समस्येने ग्रासलेले आहे.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपति पदासाठी असणाऱ्या निवडणूकांमध्ये हिलरी क्लिंटन यांचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हरणे यातूनही हेच दिसून येते की अमेरिकासारखा देशसुद्धा लिंग भेदाच्या दलदलीत अजूनही अडकलेला आहे. जर हिलरी क्लिंटन निवडणूक जिंकल्या असत्या तर त्या २४५ वर्ष जुन्या लोकतंत्राच्या पहिल्या महिला राष्ट्रपति बनल्या असत्या.

जर अमेरिकेसारख्या मॉडर्न देशात लिंग संवेदीकरण आणि स्त्रियांना दुय्यम समजले जाते तर भारतासारख्या भोंदूबाबा यांच्या प्रवचनांच्या व कूपमंडूकांच्या बोलण्याला प्राधान्य देणाऱ्या देशात लिंग असमानता असू शकत नाही हे शक्यच नाही.

जिनेव्हा स्थित विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक जेंडर गॅप इंडेक्सनुसार भारत ११४व्या स्थानावर आहे, याउलट मागील वर्षी भारताचे स्थान भाग घेणाऱ्या १३६ देशांमध्ये १०१ क्रमांकावर होते.

कसे होईल लिंग संवेदीकरण

आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जीवनाची परिभाषाच बदलून गेली आहे आणि म्हणून आपल्याला लिंग संवेदीकरणावर पुनर्विचार करण्याची गरज आहे व असा एक समाज निर्माण करायचा आहे, जिथे लिंग संवेदीकरणाची भावना असावी व स्त्री आणि पुरूषात असमानतेची भिंत नसावी. दोघांनाही एकाच पारड्यात तोलले जावे. स्त्रियांसोबत होणारे गैरवर्तन, अन्याय संपवण्यात यावा.

जर आम्हाला असे वाटत असेल की समाजात लिंग संवेदीकरण व्हावे तर सुरूवात आपल्याला आपल्या मुलांपासून केली पाहिजे आणि घरात याबद्दल जितके कार्य होऊ शकते तेवढेच शाळेतही. पोर्टब्लेअरच्या निर्मला उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कॅरोलीन मॅथ्यू यांचे मत आहे की विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यामध्ये शिक्षकांची भूमिका श्रेष्ठ आहे. सर्वात आधी शिक्षकांचा लिंग संवेदीकरणावर विश्वास असला पाहिजे. एकमेकांबद्दल आदर आणि समानतेची भावना मुलामुलींमध्ये समान असायला पाहिजे. दोघांनाही एकमेकांच्या चांगल्या व वाईट गोष्टी समजून घेता व सहन करता आल्या पाहिजेत.

मुलामुलींना समान संधी दिल्या पाहिजेत. मुलींना प्रसिद्ध महिलांच्या जीवनगाथा वाचून दाखवल्या पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या अधिकारांच्या माहितीबरोबरच आत्मरक्षणाचे प्रशिक्षणही दिले पाहिजे.

कॉलेजमधील शिक्षण घेऊन जेव्हा तरूण तरूणी नोकरीच्या क्षेत्रात पाऊल टाकतात, तेव्हाही लिंग संवेदीकरणाचा विषय समोर येतो. आज कॉर्पोरेट विश्वातही याविषयी खूप काम होत आहे व ते प्रगतिपथावर आहे.

कॉर्पोरेट जगात झालेले बदल

विप्रोमध्ये एचआर हेड असणाऱ्या प्रिती कटारिया सांगतात की त्यांच्या कंपनीमध्ये असे प्रश्न जसे की ‘तुम्ही विवाहित आहात का?’ कधीच विचारू शकत नाही. त्या म्हणतात की भारतीय महिलांना असे प्रश्न उदाहरणार्थ विवाहाविषयी किंवा मुलांसंबंधी विचारणे सहज वाटते. पण असे प्रश्न पुरूषांना विचारले जात नाहीत. असे प्रश्न विचारले जाऊ नयेत कारण अशा प्रश्नांनी महिलांच्या करिअरवर परिणाम होतो. महिलांनाही पुरूषांप्रमाणे आपल्या कामात नैपुण्य मिळवायचे असते.

काही ठोस पावले

लाइफ स्किल्स कोच, मंजुळा ठाकूर म्हणतात की आता लोकांना लिंग संवेदीकरणासारख्या विषयावर मोकळेपणी बोलण्याची गरज वाटू लागली आहे. विविधता असलेल्या या परिपूर्ण देशात लैंगिक समानता आणण्याच्या हेतूने काही विशेष बाबींवर लक्ष दिले पाहिजे.

* रूढीवादी संस्कार तसेच पक्षपातीपणाच्या मूल्यांपासून वेगळे होऊन लिंगाच्या प्रगतिशील अस्तित्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

* दोघांच्याही कार्यक्षेत्रासाठी समजूतदार दृष्टीकोन ठेवला पाहिजे.

* महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी पावले उचलली पाहिजेत. सोबतच हे ही निश्चित केले पाहिजे की यामुळे पुरूषांप्रति कुठलाही भेदभाव होणार नाही.

मंजुळा असे मानतात की प्रशिक्षण देण्याने आणि जागरूकता वाढवल्याने आपला समाज, शैक्षणिक संस्था, कार्यालये इ. मधून लिंग आधारित भेदभाव नक्की कमी होईल आणि स्त्रियांना पुढे जाण्यासाठी अधिकाधिक संधी मिळतील. याच आशेने मंजुळा चंदीगडमधील पंतकुला व मोहालीमध्ये लाईफ स्किल्स टे्रनिंग संस्थेद्वारा सल्ला व प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करत असतात.

अक्षुना बक्षी अवघी २५ वर्षांची आहे. ती असे काही करत आहे की आपण सर्वांनी तिच्याकडून धडा घेतला पाहिजे. तसे तर अक्षुना टॅ्रवलिस्ता नावाची ऑनलाइन साईट चालवते. पण समाजात स्त्रीचे शोषण, स्त्रियांबद्दल असलेल्या द्वेष भावनेला त्रासून अक्षुनाने एका संस्थेची सुरूवात केली आहे. त्यांच्या टीममध्ये फक्त महिलाच आहेत. ज्या महिलांना जीवनातील वेगवेगळे पैलू समजावून सांगतात.

संवेदीकरणावर काम करत असताना अक्षुनाने एक विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे, ज्यात लैंगिक समानता, पुरुषांची जबाबदारी, पुरूषांकडून लहानपणीच मुलींना आदर देणे इ. बाबी त्यांच्या सर्व सत्रात सहभागी केल्या आहेत.

लिंग संवेदीकरणासाठी आपण छोट्याछोट्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील असणाऱ्या ऐलीन मारकीस यांचे म्हणणे आहे की मुलांसमोर आपण सतर्क राहून प्रतिक्रिया दिली पाहिजे. ते सतत आपल्या पालक, शिक्षक आदींचे वागणे बोलणे पाहत असतात आणि म्हणूनच हे खूपच गरजेचे आहे की त्यांच्यासमोर आपले वर्तन योग्य असावे.

आपल्याला हे विसरून चालणार नाही की देशाला प्रगतीच्या पथावर घेऊन जाण्यात या अर्ध्या लोकसंख्येचेही विशेष योगदान आहे. हा वेग कायम राखण्यासाठी आपल्याला लिंग संवेदीकरणाप्रति संवेदनशील व्हावेच लागेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...