* ऋतू वर्मा

अतुल एका खाजगी रुग्णालयात डॉक्टर होता. महानगरातील राहणीमानाच्या तऱ्हा इतक्या महाग होत्या की त्याला इच्छा असूनही काही बचत करता येत नव्हती. जेव्हा घरच्यांनी लग्नासाठी आग्रह धरायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकच इच्छा होती की त्याची पत्नीदेखील आर्थिकदृष्टया स्वावलंबी असावी जेणेकरून पुढील आयुष्य सुरळीत चालू शकेल. बघता बघता शोध संपला आणि प्रीती त्याच्या प्रेमाच्या नात्यात बांधली गेली.

प्रीती आल्यावर घर-गृहस्थीचा खर्चही वाढला, पण प्रीतीने घरखर्च किंवा इतर कोणत्याही प्रकारचा खर्च वाटून घेण्यात अजिबात रस दाखवला नाही, परिणामी वाढलेले अनेक खर्च अतुलच्या डोक्यावर आले.

अतुलने प्रीतीला घर-गृहस्थीत हातभार लावण्यास सांगितल्यावर ती रडू लागली. म्हणाली, ‘‘बायकोच्या कमाईवर गृहस्थीचा गाडा चालवणारा तू कसा पुरुष आहेस?’’ प्रितीच्या या वागण्याने अतुलला धक्काच बसला.

पल्लवी आणि सौरभच्या घरचीही अशीच परिस्थिती होती. कर्जाचा हप्ता, मुलांचे शिक्षण आणि घरखर्च ही सगळी जबाबदारी

सौरभची होती, इतकेच काय तर कधी-कधी जर इतर काही खर्च अजून आला तर सौरभला मित्रांकडे कर्ज मागावे लागत असे, पण याचा पल्लवीवर काहीही परिणाम होत नसे. प्रत्येक बायकोचा दृष्टिकोन असाच असेल असे नाही. नितीन आणि ऋचाच्या बाबतीत गोष्ट जरा वेगळीच आहे.

ऋचाच्या नोकरीच्या जोरावर नितीनने पैसे उलट-सुलट व्यवसायात गुंतवले आणि मग ठणठण गोपाल. असे अनेकवेळा घडले. मग ऋचाला वाटू लागले की लग्नानंतर नवऱ्याला बळ देण्यासाठी नोकरी करणे ही तिची सर्वात मोठी चूक होती.

दोघांच्या कमाईवरच गाडी चालणार

आता काळ बदलला आहे आणि जगण्याची पद्धतही बदलली आहे. ती पूर्वीच्या काळाची गोष्ट होती जेव्हा नवरा नोकरी करायचा आणि बायको घर आणि मुलं सांभाळायची. आता महानगरांमध्ये महागाईच्या राक्षसाने इतके भयंकर रूप धारण केले आहे की २ जणांच्या कमाई शिवाय घर-गृहस्थीचा गाडा ओढणे अशक्य आहे.

जबाबदारी अशी वाटून घ्या

तुम्ही आणि तुमचा नवरा दोघेही नोकरी करत असाल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा :

* घर तुम्हा दोघांचे आहे, त्यामुळे जबाबदारी समान वाटून घ्या. संपूर्ण महिन्याचे बजेट बनवा आणि समान योगदान द्या, तुमच्या कमाईवर तुमचा हक्क आहे, पण तुमच्या पगाराची वारंवार धमकी देऊन तुमच्या पतीला कमीपणाची जाणीव करून देऊ नका, घराप्रती त्यांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती तुमचीही आहे.

* ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे छंद पूर्ण करता, त्याचप्रमाणे तुमच्या जोडीदारालाही छंद असतात. पगाराचा किती भाग हा छंद पूर्ण करण्यासाठी खर्च करायचा आणि किती भाग इतर महत्त्वाच्या कामांवर खर्च करायचा हे तुम्ही दोघांनी परस्पर संमतीने ठरविले जाण्याची आवश्यकता आहे.

* आजच्या काळाची मागणी आहे की पती-पत्नीमध्ये आर्थिक पारदर्शकताही असावी, अनेक वेळा पत्नी पतीला आपल्या पगाराबाबत चुकीची माहिती देते असेही दिसून येते. यामागचे मुख्य कारण हे असते की जर पत्नीने आपल्या पगारातून घर चालवले तर पती त्याची सर्व कमाई मित्रांवर किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर उधळेल, जे प्रत्येकवेळी योग्यही नसते.

* अनेक वेळा असेही पाहायला मिळते की पत्नी तिच्या मैत्रिणींचे बघून तिच्या पगाराच्या बाबतीत असुरक्षित राहते, भविष्यासाठी आपला पगार वाचवून ठेवावा असे तिला वाटते. कारण नवऱ्याचा काही भरवसा नसतो, पण जर नवराही असाच विचार करू लागला तर तुम्ही काय कराल? जर नात्यात विश्वासच नसेल तर अशा वैवाहिक जीवनाचा काही उपयोग नाही.

* तुम्ही आजच्या स्त्री आहात जी कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकते. मग जबाबदाऱ्यांना खंबीरपणे सामोरे जा, ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आधीपासूनच तुमच्या जीवनसाथीबद्दल कोणतेही गृहितक बांधू नका

* तुमचा नवरा कंजूष असो वा शाही खर्च करणारा, पण तुम्ही लग्नाच्या पहिल्या महिन्यात हे ठरवून घ्या की तुम्ही दोघेही पगाराची किती टक्के बचत करणार.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...