* प्रतिनिधी

साधारणपणे मानवी स्वभाव बदलत नाही. पण जेव्हा एखाद्याचे लग्न होते तेव्हा त्याने आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी त्याचा स्वभाव बदलला पाहिजे, तरच वैवाहिक जीवनात गोडवा येईल अन्यथा आपले स्वभाव, सवयी आणि वागणुकीबद्दल अडेलतट्टूपणा ठेवल्याने वैवाहिक जीवनात अंतर वाढत जाते.

आपल्यासमोरही ही समस्या येऊ नये यासाठी या सवयी सोडा :

* आपण लग्नाआधी भले जेव्हा झापले किंवा झापली असाल किंवा उठले वा उठली असाल पण लग्नानंतर आपणास आपल्या जोडीदाराच्या झापण्या आणि उठण्याच्या वेळेशी जुळवून घ्यावे लागेल, म्हणजे आपला स्वभाव बदलावा लागेल. रात्री उशिरापर्यंत जागण्याची किंवा रात्र होताच झोपण्याची सवय बदलली पाहिजे.

* आपण लग्नाआधी भलेही कितीही रागीट किंवा जिद्दी स्वभावाचे राहिले वा राहिल्या असाल, परंतु लग्नानंतर आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी आपण आपला स्वभाव शांत ठेवला पाहिजे आणि हट्टावर अडून राहण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे. जोडीदाराच्या इच्छेचादेखील आदर करावा लागेल.

* लग्नाआधी तुमची खाण्या-पिण्याविषयी सवय कशीही राहिली असेल, पण लग्नानंतर जोडीदाराशी तडजोड करणेच चांगले. तथापि, अन्नाच्या बाबतीत आपली स्वत:ची पसंत किंवा नापसंत असू शकते, परंतु आपण आपल्या जोडीदाराच्या इच्छेसाठी त्यात बदल केला पाहिजे.

* लग्नाआधीही आपण भले घरातील कोणतीही कामे केली नसतील किंवा ते करण्याची गरज पडली नसेल परंतु लग्नानंतर दोघांनीही घरगुती कामात रस घेऊन एकमेकांना मदत करावी. नवऱ्याला पुरुष असण्याचा अभिमान सोडून द्यावा लागेल. घरातील कोणतीही कामे लहान किंवा फालतू नसतात.

* लग्नाआधी तुम्ही स्वत:च्या मर्जीने खरेदी करायचे वा करायच्या पण लग्नानंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीची आणि पसंतीचीही काळजी घेतली पाहिजे, यामुळे परस्पर प्रेम वाढते.

* आपण लग्नाआधी कितीही स्वार्थी राहिले असाल किंवा राहिल्या असल्या हे महत्त्वाचे नाही, परंतु लग्नानंतर आपण हा स्वभाव सोडून आपल्या जोडीदाराबद्दलसुद्धा विचार केला पाहिजे. त्याच्या भावनांनाही किंमत द्यावी लागेल.

* लग्नाआधी तुम्ही कितीही मजा-मस्करी केली असेल, घराबाहेर मित्र आणि मैत्रिणींमध्ये वेळ घालवला असेल, परंतु लग्नानंतर आपण हा स्वभाव बदलला पाहिजे, कारण आता आपण एकटे किंवा एकटी नाही आहात.

* लग्नाआधी आपण भलेही धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल किंवा असल्या पण लग्नानंतर जर जोडीदारास आपली ही सवय आवडत नसेल तर ती त्वरित सोडणे चांगले. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद वाढतो.

* लग्नाआधी तुमचे भलेही प्रियकर किंवा प्रेमिका असाव्यात, परंतु लग्नानंतर तुम्ही त्यापासून अंतर ठेवले पाहिजे, अन्यथा वैवाहिक जिवनातील सर्व आनंद उध्वस्त होऊ शकतो. आपल्या जोडीदाराशी पूर्णपणे निष्ठावान रहा.

* आपण लग्नाआधी कितीही वाद-विवाद करत असला किंवा असल्या तरी लग्नानंतर मात्र आपण आपला स्वभाव बदलावा. वाद घालण्यात काहीच फायदा नाही. हे वादाला जन्म देते. म्हणून, गप्प राहणे चांगले. होय, योग्य संधी पाहून आपण आपला मुद्दा जोडीदारासमोर ठेवू शकता.

* काही लोकांचा स्वभाव असा आहे की ते अनावश्यकपणे इतरांना छेडतात किंवा त्यांचा सल्ला देतात. हा त्यांचा स्वभाव बनतो. पण लग्नानंतर आपण आपल्या जोडीदाराशी टोमणे, छेडणे करू नयेत.

* लग्नाआधी जर तुम्ही वसतिगृहात अभ्यास केला असेल तर तुमची खोली व्यवस्थित ठेवण्याची तुम्हाला सवय नसेल. कपडे, वह्या-पुस्तके, इतर वस्तू सर्वत्र विखुरलेल्या असतात. अभ्यास पूर्ण करूनही तुमचा हा स्वभाव बदलत नाही. पण हा ट्रेंड चुकीचा आहे.

* जर आपण एखाद्या मोठया पदावर नोकरी करत असाल आणि आपल्या अधीनस्थांशी आज्ञार्थक भाषेत बोलण्याची सवय असेल तर ती बदला, कारण जोडीदारामध्ये कोणीही अधिकारी किंवा अधीनस्थ नसतो. दोन्ही समान पातळीचे असतात. म्हणून अधिकाऱ्याचा दरारा जोडीदारावर बसवू नका.

* काही लोकांचा स्वभाव असा आहे की ते प्रत्येकावर टीका करतात किंवा त्याच्या कार्यात दोष काढतात. पण लग्नानंतर त्यांना आपला स्वभाव बदलला पाहिजे. नकारात्मकतेची कल्पना आतून काढावी लागेल. जर जोडीदार एकमेकांवर टीका करतील, कामातील उणीवा मोजण्यास सुरवात करतील तर मग त्यांच्यात आनंद कसा टिकून राहू शकतो? म्हणूनच, वाईट बोलण्याऐवजी गुणांचे गुणगान करणे शिकावे.

* काही लोकांना अशी सवय असते की ते नेहमी स्वत:ला योग्य आणि समोरच्याला चुकीचे समजतात. हा त्यांचा आपला स्वभाव आहे. पण लग्नानंतर हे सर्व चालणार नाही. कारण आपणच नेहमी बरोबर नसतो किंवा नसता. आपला जोडीदारदेखील बरोबर असू शकतो.

* लग्नाआधी आपल्या कामामुळे आपण कितीही व्यस्त असलो किंवा असल्या तरीही लग्नानंतर आपल्याला आपल्या जोडीदारासाठीदेखील वेळ काढायला पाहिजे. त्याच्या इच्छांकडे, भावनांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

* काही लोकांचा स्वभाव समोरच्यावर वर्चस्व गाजवायचा असतो. ही मानसिकता योग्य नाही. पती- पत्नीमध्ये वर्चस्व गाजवायचा स्वभाव त्यांच्यात द्वेषाची भिंत निर्माण करू शकते.

* जर तुमचा स्वभाव चिडखोर असेल तर लग्नानंतर तुमच्या स्वभावात बदल करण्याची वेळ आली आहे कारण आता तुमचा चिडचिडेपणा चालणार नाही. जर तुम्ही तुमचा स्वभाव बदलला नाही तर विवाहित जीवनात तंटे थांबण्याचे नाव घेणार नाहीत.

* जर तुमच्यात संयम नावाची कुठलीही गोष्ट नसेल आणि नेहमी अधीर राहत असाल तर लग्नानंतर तुम्ही तुमचा स्वभाव बदला. एकमेकांना धीराने ऐका, समजून घ्या. त्यानंतरच तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. विनाकारण प्रतिकार करू नका.

* बरेच लोक संशयी स्वभावाचे असतात. ते प्रत्येक गोष्ट, प्रसंग, नातेसंबंध इत्यादीकडे संशयाच्या नजरेने पाहतात, तर प्रत्यक्षात ही त्यांची शंका असते. जर आपणही संशयी स्वभावाचे असाल तर यास बदला, कारण लग्नानंतर जर पती-पत्नी एकमेकांवर संशय घेऊ लागले, तर जोडपे विभक्त होण्यास वेळ लागणार नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...