* गरिमा

पती-पत्नी आणि ती वा तो ऐवजी पती-पत्नी आणि जीवनाच्या आनंदासाठी नात्याला प्रेम, विश्वास आणि सामंजस्याच्या धाग्यांनी बळकट बनवावे लागते. लहानसहान गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार बनावे लागते. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते :

मॅसेजवर नव्हे तर संवादावर अवलंबून राहा : ब्रीघम युनिव्हर्सिटीत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जी दाम्पत्य जीवनाच्या छोटया-मोठया क्षणांमध्ये मॅसेज पाठवून जबाबदारी पार पाडतात. उदा-चर्चा करायची असेल तर मॅसेज, माफी मागायची असेल तर मॅसेज, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मॅसेज अशा सवयी नात्यांमध्ये पाडतात जसं की आनंद आणि प्रेम कमी करतात. जेव्हा एखादी मोठी घटना असते तेव्हा जोडीदाराला सांगण्यासाठी खऱ्या चेहऱ्याऐवजी इमोजीचा आधार घेऊ नये.

अशा मित्रांची संगत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे : ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने डिवोर्स घेतला असेल तर आपणही असाच निर्णय घेण्याची शक्यता ७५ क्क्यांपर्यंत वाढते.

पती-पत्नीने बनावे बेस्ट फ्रेंड्स : ‘द नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक’द्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जी दाम्पत्य एकमेकांना बेस्ट फ्रेंड मानतात, ती दुसऱ्यांच्या तुलनेत आपले वैवाहिक जीवन दुपटीने जास्त समाधानाने जगतात.

छोटया-छोटया गोष्टीही असतात महत्वपूर्ण : भक्कम नात्यांसाठी वेळोवेळी आपल्या जीवनसाथीला तो वा ती स्पेशल असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. हे दर्शवणेही आवश्यक आहे की आपण त्यांची काळजी घेता आणि त्यांच्यावर प्रेम करता. यामुळे फारकतिची समस्या येत नाही. आपण जरी जास्त काही नाही तरी एवढे तर करूच शकता एक छोटेसे  प्रेमपत्र जोडीदाराच्या पर्समध्ये हळूच ठेवणे किंवा दिवसभराच्या कामानंतर त्यांच्या खांद्यांना प्रेमाने मसाज देणे. त्यांचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस विशेष बनवा. कधी-कधी त्यांना सरप्राईज द्या. अशा छोटया-छोटया घटना आपल्याला त्यांच्याजवळ नेतात.

आपासातील विवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळा : नवरा-बायकोत विवाद होणे खूप स्वाभाविक आहे आणि यापासून कोणी वाचू शकत नाहीत. पण नात्यांची बळकटी या गोष्टीवर अवलंबून असते की आपण हे कशाप्रकारे हाताळतो. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी सभ्य आणि सौम्य व्यवहार करणाऱ्यांचे नातेसंबंध लवकर तुटत नाहीत. भांडण किंवा वाद-विवादादरम्यान ओरडणे, अपशब्द बोलणे किंवा मारहाण करणे, नात्यांमध्ये विष कालवण्यासारखे आहे. अशा गोष्टी मनुष्य कधीही विसरत नाही आणि  त्यामुळे वैवाहिक जीवनावर याचा अनिष्ट प्रभाव पडतो.

एका अभ्यासात या गोष्टीचा खुलासा केला आहे की कशाप्रकारे फायटिंग स्टाईल आपल्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करते. लग्नाच्या १० वर्षांनंतर असे कपल्स की ज्यांनी फारकत घेतली आहे आणि तसे कपल्स की जे आपल्या जीवनसाथीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत. या दोहोंमध्ये जो सगळयात महत्त्वाचा फरक आढळून आला तो म्हणजे परस्पर म्हणजे लग्नानंतरच्या एक वर्षात त्यांचे परस्परांतील विवाद आणि भांडणे हाताळण्याची पद्धत. ते कपल्स ज्यांनी लग्नाच्या सुरूवातीच्या काळात आपल्या जीवनसाथीबरोबर वेळोवेळी क्रोध आणि नकारात्मक पद्धतीने वर्तन केले त्यांचा डिवोर्स १० वर्षाच्या आतच झाला.

संवादाचा विषय विस्तृत असावा : पती-पत्नीमध्ये संवादाचा विषय घरगुती मुद्दयांव्यतिरिक्त असायला हवा. नेहमी कपल्स म्हणतात की आम्ही तर आपसात बोलत असतो, संवादाची काहीही कमी नाहीए. पण जरा लक्ष्य द्या की आपण काय बोलत असता, नेहमी घर आणि मुलांशी संबंधित बोलणेच पुरेसे नसते. आनंदी जोडपे ते असते, जे आपसात आपली स्वप्नं, आशा, भीती, आनंद आणि यश सर्वावर बोलतात. एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही वयात आणि कधीही रोमँटिक होणे ते जाणतात.

चांगल्या प्रसंगाना सेलिब्रेट करा : ‘जनरल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित एका शोधानुसार चांगल्या प्रसंगांमध्ये पार्टनरचे साथ देणे चांगलेच आहे, पण त्याहीपेक्षा गरजेचे आहे की दु:ख, समस्या आणि अडचणीच्या वेळी आपल्या जीवनसाथीबरोबर उभे राहणे. पूर्व अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटनवर मोनिका लेविंस्कीने जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तेव्हा त्यावेळीसुद्धा हिलरी क्लिंटनने आपल्या पतिची साथ सोडली नाही. त्या दिवसांतील दिलेल्या साथीमुळे दोघांचे नाते अजून बळकट केले.

रिस्क घ्यायला घाबरू नये : पती-पत्नीच्यामध्ये जर नाविन्य, विविधता आणि विस्मयकारक गोष्टी घडत असतील तर नात्यात ताजेपणा आणि सामर्थ्य टिकून राहते. एकसाथ मिळून नवीन-नवीन एक्साइटमेंट्सने भरलेल्या अॅक्टिव्हीटिजमध्ये सहभागी व्हावे, नवीन-नवीन स्थळी फिरायला जावे, रोमांचक प्रवासाची मजा घ्यावी, लाँग ड्राईव्हवर जावे, एक-दुसऱ्याला खाणे-पिणे, फिरणे, हसणे, मस्ती करणे आणि समजून घेण्याचे विकल्प द्यावेत. कधी नात्यामध्ये कंटाळवाणेपणा आणि औदासीन्य येऊ देऊ नये.

केवळ प्रेम पुरेसे नाही : आपण जीवनात आपल्या प्रत्येक प्रकारच्या कमिटमेंटसाठी पूर्ण वेळ देतो. ट्रेनिंग्स घेतो, जेणेकरून आपण त्याला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकू. ज्याप्रकारे खेळाडू खेळाच्या टिप्स शिकतात, वकिल पुस्तके वाचतात, आर्टिस्ट वर्कशॉप्स करतात अगदी त्याचप्रकारे लग्नाला यशस्वी बनवण्यासाठी आपण काही ना काही नवीन शिकायला आणि करायला तयार राहायला हवे. फक्त आपल्या जोडीदाराशी प्रेम करणेच पुरेसे नाही तर त्या प्रेमाची जाणीव करून देणे आणि त्यामुळे मिळणारा आनंद सेलिब्रेट करणेही गरजेचे आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास अशाप्रकारचे नवीन-नवीन अनुभव शरीरात डोपामिन सिस्टमला अॅक्टिवेट करतात. ज्यामुळे आपला मेंदू लग्नाच्या सुरूवातीच्या वर्षात अनुभव होणाऱ्या रोमँटिक क्षणांना जगण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना पॉजिटीव्ह गोष्टी बोलणे, प्रशंसा करणे आणि सोबत राहणे नात्यात बळकटी आणते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...