* प्रतिनिधी

  • मी एका मुलावर खूप प्रेम करते. आम्ही अनेकदा शरीरसंबंध ठेवले आहेत, परंतु त्यावेळी गर्भनिरोधक साधनांचा वापर केला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र यावेळेस निष्काळजीपणामुळे संबंध ठेवताना गर्भनिरोधक साधनांचा वापर केला नाही. आता मला भीती वाटते की जर मला गर्भ राहिला तर काय होईल? कृपया सांगा की असं झाल्यास मी या समस्येतून कशी मुक्तता मिळवू?

तुम्ही सविस्तरपणे खुलासा केलेला नाही की तुम्ही संबंध साधून किती कालावधी झाला आहे. सुरूवातीच्या कालावधीसाठी गर्भनिरोधक गोळ्या असतात, ज्यांचं सेवन करून तुम्ही चिंतामुक्त होऊ शकता. परंतु कालावधी अधिक उलटला असेल तर गर्भनिरोधक उपाय उपयोगाचे ठरणार नाहीत. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ लेडी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर गर्भ राहिला असेल तर गर्भपात करून घेऊ शकता. भविष्यात चुकूनही विवाहापूर्वी संबंध साधू नका.

  • मी १६ वर्षीय तरुणी आहे, सध्या शिकत आहे. एका मुलाने मला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी त्याला होकार दिला नव्हता, परंतु त्याच दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करू लागले. या गोष्टीला ६-७ महिने उलटून गेल्यावर जेव्हा मी त्याच्यासमोर माझं प्रेम व्यक्त केलं, तेव्हा त्याने ना धड होकार दिला ना नकार. त्याच्या या तटस्थ वागणूकीचा मी काय अर्थ काढू? त्याची प्रतिक्षा करू की आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू?

आता तुझं वय प्रेमात पडण्याचं वा व्यक्तिला समजून घेण्याचं नाहीए. ज्याला तू प्रेम समजतेस ते प्रेम नाहीए, तर केवळ लैंगिक आकर्षण आहे, जे या वयात विरूद्धलिंगी व्यक्तीप्रति जाणवणं स्वाभाविक आहे. यावेळी तुझ्यासाठी आपल्या करिअरहून अधिक महत्त्वाचं काही असता कामा नये. त्यामुळे सध्या आपल्या शिक्षणावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणं उत्तम.

  • मी ३१ वर्षीय विवाहिता आहे व २ मुलींची माता आहे. माझ्या लग्नाला १६ वर्षं झाली आहेत. मी माझ्या वैवाहिक जीवनात खुश नाही. माझे पती माझ्या मोठ्या बहिणीवर प्रेम करतात. त्या दोघांमध्ये अनैतिक संबंधसुद्धा आहेत. ही गोष्ट मला ४ वर्षांपासून माहीत आहे. परंतु इच्छा असूनही मी काही करू शकले नाही, कारण माझे पती हुकूमशाही वृत्तीचे आहेत. लहानसहान गोष्टींवरून त्यांचा राग अनियंत्रित होतो. मी त्यांना विरोध करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे हे सर्व बघून केवळ कुढत राहाते. ते माझ्या मुलींवरही लक्ष देत नाहीत.

माझी मुलगी ज्या शिक्षकांकडे गेल्या ९ वर्षांपासून शिकत आहे, त्यांना जेव्हा मी त्रस्त असल्याचं कळलं तेव्हा माझ्या चिंतेचं कारण समजून घेत त्यांनी माझ्याप्रति सहानुभूति दर्शवली. आता मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करू लागले आहे. ६ महिन्यांपूर्वी जेव्हा त्यांनी माझ्यासोबत ते आपला आनंद वाटून घेऊ इच्छितात असं सांगितलं तेव्हा मी चकित झाले. अशा संबंधांमध्ये निर्माण होणारी जवळीक वाढणं स्वाभाविक असतं, परंतु मला भीती वाटते. मी काय केलं पाहिजे, तुम्हीच सांगा?

४ वर्षांपूर्वी तुम्हाला तुमच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याची गोष्ट ठाऊक झाली होती, तेव्हाच तुम्ही याला विरोध करायला हवा होता. पती कितीही हुकूमशाही करणारे असले तरी या अन्यायविरूद्ध आवाज न उठवून तुम्ही त्यांना स्वैराचार करण्यासाठी मोकळीक दिली. पतीला घाबरत होतात हे खरं. परंतु तरीसुद्धा तुम्ही आपल्या बहिणीला रागवायला हवं होतं. अजूनही वेळ आहे. तिच्या पतीकडे तक्रार करा. आपल्या माहेरीसुद्धा तिची करतूत सांगा. हे असं केल्याने ती तुमच्या मार्गातून बाजूला होईल.

उरला प्रश्न मुलीच्या शिक्षकांचा तर त्यांना तुम्ही आपली खाजगी गोष्ट सांगायला नको होती. ते सहानुभूती दाखवून तुमच्या अडचणीचा गैरफायदा उठवू पाहत आहेत. अशा संधीसाधू व्यक्तींपासून सावध राहिलं पाहिजे. बाहेर आनंद शोधण्याऐवजी आपल्या कुटुंबात हरवलेला आनंद शोधा. तुम्ही हे विसरता कामा नये की तुमच्यावर २ मुलींची जबाबदारीसुद्धा आहे. तुम्हीच म्हणता की तुमचे पती मुलींवर लक्ष देत नाहीत. मग अशावेळी तर तुमची जबाबदारी अधिक वाढते, तेव्हा समजूतदारपणे वागा.

  • माझ्या भावाचं लग्न १० वर्षांपूर्वी कोटा येथील मुलीशी झालं होतं. मुलीची मोठी बहिण घटस्फोटित होती. हे लग्न जुळवताना लोक आम्हाला हे स्थळ योग्य नसल्याचं सुचवत होते. मुलीची आई मुलींना भडकवते. त्यामुळे मोठ्या मुलीचं सासरी पटू शकलं नाही. आम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं नाही आणि लग्न जुळवलं. परंतु लग्नानंतर सत्य अनुभवास आलं. लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांनी वहिनी माहेरी निघून गेली. प्रसूतीनंतर परतणार असं सांगून गेली होती. मुलगी झाल्यावर ३-४ वेळा भाऊ तिला आणायला गेला, परंतु ती परतली नाही. याच दु:खात माझा भाऊ रात्रंदिवस दारू पिऊ लागला आणि २ महिन्यांपूर्वी वारला. आता मुलीकडचे म्हणतात की आम्ही भावाच्या मुलीला ताब्यात घ्यावं, जेणेकरून त्यांना वहिनीचं पुन्हा लग्न लावता येईल. असंही धमकावतात की आम्ही मुलीला ताब्यात घेतलं नाही तर तिला अनाथाश्रमात सोडून देणार. सांगा काय करू?

लग्न जुळवताना एकमेकांबद्दलची व्यवस्थित माहिती घेतली पाहिजे. तुम्हाला मुलीच्या घरच्यांबद्दल लोकांनी सावध करूनही तुम्ही त्याकडे डोळेझाक केलीत. आत जे घडलं ते घडलं. ते बदलता येणार नाही. त्यापेक्षा भावाच्या मुलीला ताब्यात घ्या, जेणेकरून त्या लहानग्या जीवावर अन्याय होणार नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...