* निधी गोयल

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि समर्पण या भावनांनी जोडलेले असते. जसजसा एकमेकांना वेळ दिला जातो तसे नाते अधिक घट्ट होत जाते. गोड नात्यात काही कारणास्तव आंबटपणा कालवल्यास त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे अतिप्रेम दोघांसाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर, पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तोदेखील तुमच्याकडून बेशुमार प्रेमाचे अपेक्षा करतो. पण प्रेमाची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा तुमचा पार्टनर तुमचे म्हणणे समजून घेऊ शकत नाही. अशावेळी तुमचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दोघेही एकमेकांप्रती चुकीच्या भावना मनात बाळगू लागतात. एकास वाटते की माझ्या प्रेमाला काही किंमतच देत नाही तर दुसरा विचार करतो की, माझा पार्टनर माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेत आहे. मग अशी वेळ येते की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागते. अशीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या सूचनांवर लक्ष द्या :

प्रत्येकक्षणी नजर ठेवू नका : बऱ्याचदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळी त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असा विचार करत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवले जाते. अतिप्रेमामुळे पार्टनर वैतागून जातात. कारण तुम्ही प्रत्येकवेळी त्यांच्यावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपण्यावर, उठण्यावर, येण्याजाण्यावर नजर ठेवता. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांचे स्वातंत्र हिरावले जात असल्याची भीती निर्माण होते. ते स्वत:ला एका बंधनात बांधल्याचा अनुभव घेत असतात.

नात्याला स्पेस देणे : नाते कोणते का असेना, त्या नात्यात स्पेस असणे गरजेचे असते. नाहीतर त्या नात्याचे आयुष्य मर्यादित राहाते. नात्यात स्पेस न दिल्यामुळे प्रेम कमी होते आणि भांडण-तंट्यांमध्ये वाढ होते. यामुळे नात्यात जवळीकतेऐवजी दरी निर्माण होते.

प्रत्येकवेळी पार्टनरच्या सोबत राहणं : आपल्या पार्टनरवर अमाप प्रेम करणारे, त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळस असेही होऊ शकते की पार्टनरची त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसह वेळ घालवण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याच्यासाठी तुमचे प्रेम शिक्षा ठरू शकते.

अपेक्षांना सीमा असावी : बऱ्याचदा तुम्ही पार्टनरकडून खूपच अपेक्षा करू लागता. जर त्याचे माझ्यावर प्रेम असेल, त्याने माझ्या अपेक्षांवर खरे उतरलेच पाहिजे. अशा भावनांनी प्रेमाची परीक्षा घेणे, जेवढे तुम्ही त्याच्यावर प्रेम करता तेवढेच प्रेम त्यानेही तुमच्यावर करावे. अशा अपेक्षांमुळे तुमच्या पार्टनरला बंधनात अडकल्यासारखे वाटते. मग अशावेळी ते या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात.

संशय घेऊ नका : तुमचा पार्टनर प्रत्येक छोटीछोटी गोष्ट तुम्हाला विचारून करेलच असे काही नाही. पण तरीही तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा ठेवू लागता की त्याने प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारूनच करावी. तसेच तुम्ही प्रत्येकवेळी त्याला फोन कुठे आहे? काय करत आहे? असे विचारून प्रश्नांचा भडीमार करता आणि मनात संशयाची सुई निर्माण करता. त्याच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीची बातमी ठेवता इत्यादी सर्व गोष्टींमुळे तुमचा पार्टनर हैराण होऊन जातो.

जवळीकतेला मर्यादा हवी : नात्यात मर्यादेपेक्षा अधिक जवळीकता निर्माण झाल्यावर, एकमेकांमध्ये तक्रारी होण्याच्या संभावना बळावतात. कारण काही वेळेस आपल्या माणसावर हक्क दर्शविणे हे आदेशासमान भासू शकते. म्हणूनच आपल्या पार्टनरवर अतिप्रेम करू नका. तर त्याला प्रेम द्या. म्हणजे मग त्याला स्वत:चे स्वत:लाच जाणवेल की तुमची आणि तुमच्या प्रेमाची किंमत काय आहे ते?

जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे प्रेम तुम्हा दोघांसाठी डोकेदुखी ठरू नये तर यासाठी पुढील बाबी लक्षात घ्या :

* तुमचे तुमच्या पार्टनरवर प्रचंड प्रेम आहे म्हणून ते त्याच्यावर लादू नका आणि कोणत्याही प्रकारची जबरदस्ती तर मुळीच करू नका.

* जेवढे प्रेम आणि काळजी तुम्ही तुमच्या पार्टनरची करता, तेवढेच प्रेम आणि काळजी त्यानेही करावी. अशी अपेक्षा मनाशी बाळगत असाल, तर प्रेम आणि काळजी कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे कधीही चांगलेच ठरेल.

* प्रत्येकवेळी आपल्या पार्टनरच्या जोडीला राहू नका. तुमच्या प्रेमाची सीमा राखा.

* जर तुमच्या पार्टनरकडून तुमच्यावर दबाव टाकला जात असेल तर, त्याच्यापासून वेगळे होणे हा अंतिम पर्याय नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. कोणत्याही दबावामुळे तुमचे नाते दीर्घकाळ टिकणे कठीण होईल.

* तुमच्याएवढे प्रेम तुमचा पार्टनर तुमच्यावर करू शकत नसेल किंवा तुमच्या मनाप्रमाणे प्रतिक्रिया देऊ शकत नसेल तर तुम्ही मनाशी धीर धरा आणि पार्टनरशी यासंबंधी संवाद साधा.

* दिवसागणिक नात्यात बदल येत राहतात. काळानुरूप अनेक गोष्टी बदलतच जातात. पण प्रेमासाठीच्या अपेक्षा तशाच जिंवत राहतात. अशावेळी तुम्ही नात्याला सावरत, त्या बदलांवर तुमच्या पार्टनरशी संवाद साधत राहणे.

* नेहमीच होणाऱ्या तंट्याने आणि रोखठोकीने नाते दीर्घकाळ टिकत नाही. प्रत्येक क्षणी पार्टनरवर लक्ष ठेवणे म्हणजे प्रेम नव्हे तर यामुळे तुमच्या पार्टनरच्या प्रति असलेला अविश्वास दिसून येतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...