* निधी गोयल

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि समर्पण या भावनांनी जोडलेले असते. जसजसा एकमेकांना वेळ दिला जातो तसे नाते अधिक घट्ट होत जाते. गोड नात्यात काही कारणास्तव आंबटपणा कालवल्यास त्याचे विष बनते. त्याचप्रमाणे अतिप्रेम दोघांसाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर, पार्टनर तुमच्यावर खूप प्रेम करतो तेव्हा तोदेखील तुमच्याकडून बेशुमार प्रेमाचे अपेक्षा करतो. पण प्रेमाची समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा तुमचा पार्टनर तुमचे म्हणणे समजून घेऊ शकत नाही. अशावेळी तुमचं नातं संपुष्टात येण्याची शक्यता असते. अशा स्थितीत दोघेही एकमेकांप्रती चुकीच्या भावना मनात बाळगू लागतात. एकास वाटते की माझ्या प्रेमाला काही किंमतच देत नाही तर दुसरा विचार करतो की, माझा पार्टनर माझे सर्व स्वातंत्र्यच हिरावून घेत आहे. मग अशी वेळ येते की त्यांना एकमेकांपासून दूर व्हावे लागते. अशीच वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून या सूचनांवर लक्ष द्या :

प्रत्येकक्षणी नजर ठेवू नका : बऱ्याचदा आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यावेळी त्याची सर्वतोपरी काळजी घ्यावी असा विचार करत असतो. पण समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा गरजेपेक्षा जास्त लक्ष ठेवले जाते. अतिप्रेमामुळे पार्टनर वैतागून जातात. कारण तुम्ही प्रत्येकवेळी त्यांच्यावर, त्यांच्या खाण्यापिण्यावर, झोपण्यावर, उठण्यावर, येण्याजाण्यावर नजर ठेवता. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांचे स्वातंत्र हिरावले जात असल्याची भीती निर्माण होते. ते स्वत:ला एका बंधनात बांधल्याचा अनुभव घेत असतात.

नात्याला स्पेस देणे : नाते कोणते का असेना, त्या नात्यात स्पेस असणे गरजेचे असते. नाहीतर त्या नात्याचे आयुष्य मर्यादित राहाते. नात्यात स्पेस न दिल्यामुळे प्रेम कमी होते आणि भांडण-तंट्यांमध्ये वाढ होते. यामुळे नात्यात जवळीकतेऐवजी दरी निर्माण होते.

प्रत्येकवेळी पार्टनरच्या सोबत राहणं : आपल्या पार्टनरवर अमाप प्रेम करणारे, त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळस असेही होऊ शकते की पार्टनरची त्याच्या मित्रमंडळींसह नातेवाईकांसह वेळ घालवण्याची इच्छा असू शकते. अशावेळी त्याच्यासाठी तुमचे प्रेम शिक्षा ठरू शकते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...